मराठी साहित्य – विविधा ☆ “…करूया आपण आत्मपरीक्षण…–” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “…करूया आपण आत्मपरीक्षण…–☆ श्री जगदीश काबरे ☆

(3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त)

अपवाद वगळता आजच्या अनेक शिक्षित-अशिक्षित स्रियांना स्वत:ची अशी ओळख आहे का? स्वत:ची अस्मिता, स्वत:चा स्वाभिमान आहे का? मी नेहमी स्रियांना एक प्रश्न विचारत असतो की, तुम्ही शिकून नवीन काय केलं? सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्ही उपयोग काय केला? तुम्हाला सावित्रीबाईनी शिक्षण दिलं त्यासाठी अंगावर दगड माती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला, संत्संगला जायला, पोथीपुराणे वाचता यावीत, उपासतापास करता यावेत, वैभवलक्ष्मीची पारायणे करता यावीत याच्यासाठी सावित्रीबाईनी तुम्हाला शिक्षणासाठी उद्युक्त केलं का? याच्यासाठी सावित्रीबाईंनी का दगड-माती खाल्ले? याच्यासाठीचं का सावित्रीबाईंनी वाटेल तसा मान-अपमान सहन केला? कशासाठी केला त्यांनी हा उपद्व्याप? तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून? तुम्हाला पार्लरला जाऊन स्वत:ला नटता यावे म्हणून? ह्या शिक्षित स्रियांनी नवीन काय केलं? दोनशे वर्षापुर्वीही स्री हे सर्व न शिकता, आपल्या, मुलाबाळांना, पतीला, सासू-सासऱ्याला न्याय देत होती की. न शिकताच सर्व करीत होती तर मग तुम्ही नवीन काय केलं?

सावित्रीबाई फुले यांच्यामुळे गेल्या काही वर्षात स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन असे टप्पे घेत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारे कसे तिच्या मनासारखे झाले. पण तिचे जळणे, सोसणे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार थंबला का? वर्तमानपत्रातील बलात्काराच्या बातम्या, हुंडाबळी आणि मारहाणीच्या बातम्या ओरडून, किंचाळून सांगताहेत की, स्त्रीचे जळणे अद्याप सुरू आहे. विद्याविभूषित आणि भरमसाठ पगार घेणारी स्त्रीसुध्दा कधीकधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचे पाऊल उचलते. स्वत:ला आधुनिक समजणाऱ्या प्रथितयश अभिनेत्रीनासुध्दा स्त्रीदेहाचे प्रदर्शन आणि कधीकधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. हे सारे पाहिले की वाटते, आजही स्त्रीचे सती जाणे सुरूच आहे. फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलली आहे. स्त्री खरेच मुक्त झाली आहे का?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वर्ष सरते शेवटी… ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

वर्ष सरते शेवटी…  ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

पाहता पाहता २०२४ संपत आले, नव्हे संपलेच. प्रत्येक नवीन वर्षात अनेक गोष्टी, अनेक घटना घडतात. काही खूप संवेदनशील असतात, तर काही आयुष्यभर आनंद, उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. तर काही, जे घडले, ते घडले नसते तर बरे झाले असते. असे मनाला वाटून जाणाऱ्या असतात. काही आनंद, दुःखाची झालर वा अस्तर लावून येतात. पण चेहऱ्यावर कधीच त्याच्या छटा दिसू दिलेल्या नसतात. पण असे का ?  खरे जगावे, सुखात आनंदी, तर दुःखात थोडी निराशा दाखवण्याचे स्वातंत्र्य आहेच ना आपल्याला.  मनाच्या सगळ्या भावना जशा आहेत, तशा सम्यक पद्धतीने व्यक्त करता येतील अशा व्यक्ती असतातच आपल्याकडे. त्या पारखायला हव्या. मनातली आशा मात्र कायम जीवंत राहायला हवी. थोडा अंधार जास्त आहे पण त्यामुळेच तर उजेडाचे महत्व अधोरेखित होत आहे.

आजपर्यंत समविचारी आपण सगळे सोबत होतो. आजही सोबत आहोत. आणि यापुढेही कायम सोबत राहू. स्त्रीने तिच्या स्त्रीपणाच्या चौकटीतून बाहेर पडताना स्वतःला पुरुषसत्ताक मानसिकतेचे वाहकत्व टाळू शकेल, आणि स्त्री पुरुष दोघांचा मानवतेच्या दिशेने, समतेच्या वाटेने नव्या आधुनिक प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करता येईल ही आशा आहे.

प्रेमाला व्यवहाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे हे खरे आहे. पण विनाअट / निर्हेतू प्रेम नव्याने जन्माला येईलच. ही आशा सोडायची नाही. आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येईल अथवा न येईल, आपण स्वतःवर मनापासून प्रेम करायला शिकूया. खरे जगूया, खरे बोलूया  ! एकमेकांच्या सोबत सुख दुःख वाटून घेऊया..!

वर्षाचा शेवटचा महिना जसा.. तसा अडचणींचा, वाईट घटनांचा, दुःखाचा शेवटचा महिना असता तर, वेदनांना कायमचा निरोप देता आला असता तर.. वेदनांचे तण उपसून काढता आले असते तर, अगदी मुळापासून खोल मनातून. जसे कॕलेंडर भिंतीवरुन कायमचे हटवतात तसे…! कधीही परत दिसणार नाही असे.. आनंदी क्षणांचे वट वृक्ष झाले असते तर मग समाधानाचा फुलोरा नक्कीच दिर्घकाळ बहरत राहिला असता नाही का.. !

नको असलेलेच जास्त डोके वर काढताना दिसते. जे जे गंधीत ते जणू शापित वाटू लागते. चांगल्या आठवणी आठता येत नाहीत. साठवता येत नाहीत. कुणाला सांगता येत नाहीत. या व्यवहारी जगात चांगल्या आठवणींचा कचराच होताना दिसतो. ते ही दूर दूर निघून जातात. उजाड माळरान मागे ठेवून. असे वाटणे ही तर मनाची अडचण असते. परत मशागत करायला हवी. स्वतःला अंतःपर्यंत सुगंधीत ठेवण्यासाठी.

खरंतर वेदनेचे गाणे करता यावे आणि संवेदनांनी ते गात रहावे. आणि हो आनंदाचा उन्माद होऊ नये एवढं मात्र नक्की करावे.

 ग़म का ख़ज़ाना तेरा भी है, मेरा भी

ये अफ़साना तेरा भी है, मेरा भी

अपने ग़म को गीत बना कर गा लेना

राग़ पुराना तेरा भी है, मेरा भी

© डॉ. सोनिया कस्तुरे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रकाशक – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ प्रकाशक – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(दोन महीन्यानंतर मी लंडनहून आलो.मधल्या काळात जयंताने अनघाशी लग्न केले होते आणि त्यांनी खेतवाडीत बिर्‍हाड केले होते.हा मला मोठा धक्का होता.) – इथून पुढे — 

अनघा जयंताशी लग्न करेल असे मला अजिबात वाटत नव्हते किंबहुना अनघा आणि मी एकमेकांसाठी अनुरूप आहोत असाच माझा कयास होता. माझे आई-बाबा सुद्धा अनघाने असा का निर्णय घेतला आणि माझे तिच्याशी वादभांडण झाले होते की काय अशी विचारणा केली.

खरतर या दोघांनी मला कसलीच कल्पना दिली नव्हती .

मी मुंबईत आलो पण या दोघांना भेटायला गेलो नाही. 

मला या दोघांचा खूप राग आला होता.मनस्ताप झाला होता.कशातही लक्ष लागत नव्हते .याच काळात माझ्या मनात कली शिरला.

या दोघांचा संसार कसा मोडेल याची मी वाट पाहू लागलो.

अनघाला सांस्कृतिक जगाची भूक होती. त्यामुळे तिला त्या जगात अडकवावे असा विचार मनात आला.

त्याच सुमारास मुंबई दूरदर्शन सुरू होत होते. त्या करीता विविध विभागात निर्माते, सहनिर्माते शोधणे सुरू होते. मी माझ्या कविमित्राकडे अनघाची निर्मात्याच्या पदासाठी शिफारस केली.

अनघा मुळातच हुशार त्यामुळे तिला निर्मात्याच्या पदाची नोकरी मिळाली.

या मायावी दुनियेत तिचा प्रवेश झाला आणि वेगवेगळे कलावंत तिच्या आयुष्यात येऊ लागले.

तिला मुलाखतीसाठी प्रसिद्ध साहित्यीक, नाटककार, संगीतकार हवे असायचे. त्यामुळे ती मला भेटू लागली.

त्यामुळे दोघा नवरा बायकोत खटके उडायला लागले.मला हे लांबून कळत होते आणि मनातून आनंद होत होता.

शेवटी अनघाने जयंताबरोबर काडीमोड घेतला आणि एका मराठी नटाची ती पत्नी झाली.

या सर्व प्रकाराने जयंता सैरभैर झाला आणि वारंवार माझ्याकडे येऊ लागला,त्याची नाटके छापूया आणि प्रकाशीत करूया असे सांगू लागला.पण मी काहीन काही कारणे सांगून ते टाळू लागलो.

मला जयंताचा सूड घ्यायचा होता.त्याचे कवितासंग्रह  आणि कथासंग्रह पूर्वी आम्ही छापले होते.त्याचे अधिकार आमच्याकडे होते. 

त्याच्या आवृत्या काढूया असे तो सांगत होता. मी त्याच्या कडे दुर्लक्ष केले.

आमच्या प्रकाशनाकडून नाटकांची छपाई होत नाही म्हणून तो मुंबईतील इतर प्रकाशकांकडे खेपा घालू लागला.पण सर्व प्रकाशकांना जयंता हा माझा मित्र असल्याचे माहीत होते,

त्यामुळे मुंबईतील एकही प्रकाशक त्याचे पुस्तक छापण्याचे धाडस करू इच्छीत नव्हता .म्हणून नाईलाजाने त्याने पुण्याचा नवीन प्रकाशक गाठला,पण पुस्तक छपाईची क्वालिटी अगदी खराब होती आणि त्या प्रकाशकाला मार्केटिंग ची माहीती नव्हती,त्यामुळे ती पुस्तके दुकानात  उपलब्ध झाली नाहीत.

त्यानंतर च्या काळात मी अत्यंत व्यस्त होत गेलो.आमच्या शाखा दिल्ली,बंगलोर,अहमदाबाद  या शहरात निघाल्या आणि आम्ही इंग्रजी पुस्तके प्रकाशीत करू लागलो.

त्यामुळे मी मुंबईत फार कमी असायचो.पण जयंता माझ्या मोठ्या भावाला येऊन भेटत होता हे मला कळत होते.

या नंतरच्या काळात जयंताने कविता लिहील्या. कथा लिहील्या पण त्याच्यातला स्पार्क कमी होत गेला कारण अनघा त्याची स्फुर्ती होती.त्याने त्याच्या कविता,कथा माझ्या मोठ्या भावाला दाखविल्या पण त्याला त्या आवडल्या नाहीत.

जयंताचे त्याच्या नोकरीवर कधीच लक्ष नव्हते. जो पर्यंत त्याचे फडके साहेब होते तो पर्यंत सहन केले,पण फडके साहेब निवृत्त होताच नवीन साहेबा बरोबर याचे पटेना, शेवटी जयंताने नोकरीचा राजिनामा दिला.

एकंदरीत यामुळे त्याची सर्वबाजूने कोंडी झाली असावी.

या काळात जयंताने मला काही पत्रे लिहीली.मुंबईतल्या मुंबईत त्याची पत्रे मला मिळत.त्याचे म्हणणे असे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्याची पुस्तके लागावित म्हणून मी प्रयत्न करावेत,त्यामुळे त्याला अर्थप्राप्ती झाली असती.अर्थातच मी त्याकडे दुर्लक्ष केले.

माझ्या मुलाच्या अ‍ॅडमिशन च्या संबधात मी आणि पत्नी अमेरीकेत गेलो असताना जयंताला मृत्यू आला,शेवटची काही वर्षे तो मधुमेहाने त्रस्त झाला होता. मी अंत्ययात्रेत नव्हतो म्हणून साहित्यीक वर्गात खळबळ उडाली,पण माझा मोठा भाऊ अंत्ययात्रेत होता.

त्याच्या मृत्यू नंतर आमच्या प्रकाशनाने त्याची पुस्तके छापली आणि ती हातोहात खपली.

दोन महिन्यांनी मी अमेरीकेतून आलो आणि पुण्याच्या प्रकाशकाकडे जाऊन त्याच्या नाटकाच्या पुस्तकांचे हक्क विकत घेतले आणि जयंताची सर्व नाटके प्रकाशीत केली.आमच्या प्रकाशनाने त्याच्या नाटकाची पुस्तके सर्वत्र उपलब्ध केली. त्यामुळे ती चांगलीच खपली. एवढेच नव्हे तर मुंबईतील प्रतिष्ठीत नाट्य संस्थानी त्याची नाटके  रंगभूमीवर आणली.जयंताच्या एका नाटकात अनघाने मुख्य भूमिका केली.

या नाटकाचा प्रयोग पहायला मी पत्नीसह शिवाजी मंदिरात गेलो तेव्हा त्या नाटकात अनघाला पाहताना जयंताची खूप खूप आठवण आली.

त्याच्या नाटकाचे प्रयोग त्याने पहायला हवे होते असे मला वाटले आणि भर नाट्यगृहात मी रडू लागलो.

या नंतर माझ्या आयुष्यात सतत बेचैंनी आली.माझ्या पत्नीला कॅन्सर झाला,मुलीने माझ्या मना विरूद्ध लग्न केले,माझा मुलगा अमेरीकेत स्थायीक झाला.

आमची पुढची पिढी आमच्या व्यवसायत येईना. माझा मोठा भाऊ सतत आजारी पडु लागला.

थोडक्यात आमचे वाईट दिवस आले.माझी फिरती बंद झाली.नवीन पुस्तके प्रकाशीत करण्याची ईच्छा नाहीशी झाली,मी दुकानात बसु लागलो.आता हळू हळू ही प्रकाशन संस्था बंद करण्याचा किंवा विकण्याचा विचार करत आहे.

या आयुष्यातील कातर वेळी जयंता,मला तुझी आठवण येते .तुझ्या सारख्या प्रतिभावान लेखकावर अन्याय झाला. लोकांना वाटते ही साहित्यीक मंडळी म्हणजे हुशार मंडळी, सुसंस्कृत मंडळी यांच्यात कसली राजकारणे असणार .

पण पुण्यातील श्रोते हो! तुम्हाला सांगतो,राजकारण्यांची राजकारणे , वाद,भांडणे तुम्हाला कळतात दिसतात. पण ही पुस्तके लिहीणारे आणि छापणारे ,प्रकाशित करणारे यांच्यातील घाणेरडी राजकारणे तुम्हाला कळत नाहीत.

आणि अशा हेव्यादाव्यामुळे जयंतासारख्या साहित्यकावर अन्याय होतो.त्याला आयुष्यातून उठवले जाते. निरनिराळे पुरस्कार ठराविक लोकांनाच मिळतात आणि साहित्यकातील कंपू इतरांना वर चढू देत नाहीत.

साहित्यिक जीवन या पुण्यातील कार्यकर्ते हो,आम्हा साहित्यीक लोकांचे हात असे बरबटलेेले असतात. 

माझा प्रिय मित्र जयंता त्याच्या लेखनाला मी न्याय देऊ शकलो नाही. उलट मी त्याचा व्देश केला .याचे मला वाईट वाटते.खेद वाटतो 

कॉलेज मधील आम्ही तीन मित्र जयंता मी आणि अनघा. अनघाने त्याला मधेच सोडले.मी त्याचा तिरस्कार केला.त्याचे लिखाण कुजवलं.मित्रा, जयंता कुठे असशील तेथून या तुझा मित्रास माफ कर , असं म्हणून एवढ्या श्रोत्यांसमोर मी ओक्साबोक्सी रडू लागलो.

समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शिक्षण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “शिक्षण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

शिक्षण किती झालंय तुमचं?

‘ मी डॉक्टर, मी इंजिनीयर, मी वकील,मी शिक्षक, मी एम.बी.ए.,मी शेतकरी, मी ऑफीसर,मी दुकानदार, मी एम. ए. पीएच डी डॉक्टरेट  मिळवली – – ‘ 

‘वा वा अभिनंदन अभिनंदन..  अरे वा  म्हणजे बरचं शिक्षण झालय तुमचं. व्यवसाय चांगला करताय आता इतकं शिकलात तर तुम्ही हुशारच असणार म्हणा .. मग एक विचारू का?

— मी एक छोटी परीक्षा घेते .. काही  वाक्य विचारते ..  ती म्हणायला शिकलात का? पण खरी उत्तरं सांगा हं ….. 

बायकोला कधी हे म्हणालात का?– 

” तू संसार चांगला केलास, घर नीट ठेवतेस, तुझी रांगोळी रेखीव असते, स्वयंपाकात  सुगरण आहेस, सगळ्यांची सेवा करतेस, घर आणि नोकरी ही तारेवरची कसरत केलीस, नाती जपलीस “

….. तशी ही यादी मोठी आहे.  तूर्तास या साध्या सोप्या प्रश्नांची  तर उत्तरं द्या ‘ 

 

‘ अरेच्चा एकदम गप्प का झालात ? आत्ता आठवत नाहीये का..? वाटलं तर विचार करून थोडा वेळ घेऊन उत्तरं द्या …. 

काय म्हणताय ….. ‘ हे तेवढं राहिलं….’…… असं कसं बरं झालं…? हेच नेमकं  शिकायच राहिलं ?

का हा विषयच ऑप्शनला टाकला होता का.. याचा अभ्यास केला नाही….. बरं .बरं..असू दे असू दे. 

होत अस बऱ्याच जणांचं … ‘ 

 

मग आता करा की हा कोर्स …. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरही हे शिकता येतं … वयाची तर काहीच अट नाही

ऑनलाइन.. करस्पॉन्डन्स.. सिलॅबस…. ते तुमचं तुम्ही ठरवायचं किती दिवसांचा आहे … कधी पूर्ण होईल … परीक्षा कधी आहे ??? 

…. सांगते सांगते… सगळं नीट सांगते

… तुम्ही कसा अभ्यास कराल त्याच्यावर हे अवलंबून आहे … परीक्षेची वेळ तुमची तुमची … 

 रिझल्ट ताबडतोब समोर प्रत्यक्ष दिसेल …  

आणि फी….सांगते ना…..

एकदम किती प्रश्न विचारता?

 

आणि हो … हा प्राथमिक कोर्स झाला …. असे बरेच आहेत …

हळूहळू त्याची पण माहिती देईन ..  सध्या तरी इतकं पुरे

 

विचार कसला करताय…. हुशार आहात जमेल तुम्हाला … घ्या की अॅडमिशन

आधीच उशीर झालाय राव … करा अभ्यासाला सुरुवात … 

…. अरे एक सांगायच राहिलं .. याची गाईड बाजारात नाहीत .. हा विषय स्वयंशिक्षणाचा आहे

हवी असेल तर मी मदत करीन. मला फी पण नको .. मग लागा तयारीला .. प्रॅक्टीस केली की जमेल

 

आणि हो … रिझल्ट लागला की या पेढे घेऊन ..वाट बघते……ऑल द बेस्ट !! ‘ 

…….

साने  काका घरी आले होते .. काकांनी हे वाचलं आणि हळुवार आवाजात म्हणाले

‘ मी त्या कोर्सला अॅडमिशन घ्यायच्या आधीच नापास झालो आहे ..

ही वर गेली .. आता हे सांगायच  राहून गेलं. मला कधी सुचलंच नाही बघ .. नेहमी गृहीत धरलं तिला सगळ्या बायका हेच तर करतात त्यात काय विशेष .. त्याचं काय कौतुक करायचं असं मला वाटायचं ती असेपर्यंत कधी त्याची किंमत कळली नाही तुला एक सांगू .. तू त्या कोर्समध्ये अजून एक विषय ॲड कर …

… आयुष्यात कधीतरी  ” माझं तुझ्यावर प्रेम आहे ” .. हे बायकोला एकदा तरी सांगा असं लिही ….

ती गेली आणि मग मला समजलं माझं तिच्यावर प्रेम होतं…”

 

हे बोलता बोलता त्यांचा आवाज विलक्षण कापरा झाला होता..

” काका खरं तर आम्हा बायकांना ते न सांगताच माहीत असतं   जाणवतही असतं….

आतल्या आत…”

“असेल …कदाचित  तसही असेल…”

“तरीपण बोलुन दाखवल तर आनंद होईल की नाही ?..”

“हो हे तुझं अगदी पटलं मला ” 

“आजारपणात तुम्ही काकूंची काळजी घेत होता … तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या …’ यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर.. कसं होईल ग यांच  माझ्या नंतर…’. 

” हो खरंच असं म्हणाली होती ती?…”

”  हो काका…..”

……. काकांचे डोळे भरून वहात होते……

 

पंच्याऐशींच्या सानेकाकांना समाधान व्हावे यासाठी खोटं बोललं तरी देव मला माफ करणार आहे……

हे मला पक्कं माहित आहे… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “Minimalism…” — ☆ सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

??

☆ “Minimalism…” — सौ. प्रतिभा कुळकर्णी 

आज सकाळीच महिन्याचे वाणसामान आले होते. त्यातील बरेचसे खराब होईल म्हणून फ्रीज मध्ये ठेवण्यासारखे होते. त्यासाठी मी चक्क बैठक मारून फ्रीज च्या पुढेच बसून विचार करत होते. इतक्यात माझ्या एका जवळच्या मैत्रीणीची मुलगी नीता खास आम्हाला भेटायला आली. ही स्वतः इंजिनिअर आणि उच्चपदस्थ असून ही अतिशय टापटीपीने संसार करणारी आणि सासू सासऱ्यांची लाडकी सून.

 

माझा एकंदरीत अवतार बघून म्हणाली, ” मावशी काय ग हा पसारा मांडून बसली आहेस? “

मी तिला माझी व्यथा ( हो व्यथा च तर काय…) सांगितल्यावर म्हणाली, 

” रागावू नकोस मावशी, पण म्हणूनच आम्ही हल्ली minimalism lifestyle अंगिकारली आहे. म्हणजे काय तर, कंजूष पणा नाही . पण शक्यतो जेवढे लागेल तेव्हढेच आणायचे. आधी प्लॅनिंग केले की छान जमते. अवास्तव पसारा वाढवायचाच नाही. तू पण पुढल्या महिन्यापासून काकांना तशी लिस्टच काढून दे.” मला ही हे पटले. काका तर काय (मिशीतल्या मिशीत) हसतच होते. 

गप्पा मारता मारता तिने येताना आमच्यासाठी आणलेला इडली सांबारचा नाश्ता केला. दुपारच्या जेवणासाठी ही मस्त रस्सा भाजी घेऊन आली होती. त्यामुळे मस्त मनसोक्त गप्पा मारल्या आणि आमची बॅटरी चार्ज करून गेली सुद्धा……

जाताना मला मात्र food for thought देऊन गेली.

 

ती गेल्यावर मी माझ्याच दोघांनी सुरु केलेल्या आणि आता पुन्हा दोघांवरच येऊन ठेपलेल्या संसाराकडे त्रयस्थपणे नजर टाकली. एक सर्कल पूर्ण झाले होते….

अक्षरशः दोन बॅग्ससह सुरु केलेल्या संसाराचा केवढा हा पसारा….आता खरच आवरायला हवा. 

Minimalism स्वीकारायलाच हवे….

 

आणि मग डोळ्यासमोर आली एक एक घरातील वस्तू….

कपड्यांनी खचाखच भरलेली कपाटं, पुस्तकांनी भरलेले शेल्फ, हौस हौस म्हणून घेतलेले तर्‍हेतर्‍हेचे क्राॅकरी  सेट्स, भांडीकुंडी हे सारेच आता कमी करायलाच हवे….

अनावश्यक वस्तूंचे Minimalism….

 

मग मनाशी विचार आला, वस्तूच काय….आपण स्वतःकडून आणि इतरांकडूनही किती अपेक्षा ठेवतो. 

मी ह्यावेळेस असे वागलेच पाहिजे, हे केलेच पाहिजे……

मुलांनी, नातेवाईकांनी माझ्याशी असे वागावे, असे वागू नये….

नुसत्या अपेक्षाच नव्हे तर तसे घडले नाही तर मनस्ताप ही होतो. मग डिप्रेशन, बिपी ,शुगर मध्ये वाढ…

कशासाठी हे सारे???

त्यांच्याही काही अडचणी  असतीलच की ….म्हणूनच आताची मुलं म्हणतात तशी प्रत्येकालाच त्याची space देऊया.

आपली मुलं, आपल्या मित्र मैत्रीणी ,जीवाभावाचे नातेवाईक ह्यांच्यावर आता निरपेक्ष प्रेम करण्याची वेळ आली आहे. 

हेच तर अवास्तव अपेक्षांचे Minimalism….

 

हे दुष्टचक्र एवढ्यावरच थांबत नाही. मग सुरू होतात राग/ रुसवे…….

मीच का साॅरी म्हणू ? गरज तिला/त्याला ही आहे…अशा नको त्या मानापमानाच्या कसरती!

ह्यातून निष्पन्न होतो तो फक्त नात्यात दुरावा…

ह्या सगळ्यावर उपाय एकच राग / रुसव्या चे Minimalism!

आपल्या ह्या संसारातून परमेश्वरही सुटला नाही आहे बरं का….

कोणतेही व्रत, नामस्मरण करताना आपण ते निरपेक्षपणे किती करतो हा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा. काहीही मागितले नाही तरी फक्त, ” आम्हा सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी असू दे” एवढे तरी मागणे असतेच.( खरंतर लांबलचक लिस्टच असते…)

आता येणाऱ्या नवीन वर्षात मात्र शांतपणे परमेश्वराचे मनापासून नामस्मरण करुया आणि खरच minimalism lifestyle जगण्याचा प्रयत्न करुया. 

अवघड आहे (कारण अनेक गोष्टीत आपली भावनिक गुंतवणूक असते…) पण अशक्य नक्कीच नाही.

© सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ☆ कलीयुगातील राम – सीता… माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ कलीयुगातील राम – सीता… माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

मालेगांव जवळच्या “गिल पंजाब हॉटेल” चे मालक लकी आबा गिल यांना आज रस्त्याच्या कडेने एक वयस्कर जोडपं पायी जातांना दिसलं. भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं त्यांनी सहजच जेवणाचं विचारलं. तर ते नको म्हणाले. म्हणून त्यांना 100 रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले. मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय? त्यानंतर सुरू झाला त्यांचा जीवनपट – ते 2200 km चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी चालले होते. त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही. मग माझ्या आईने डॉक्टर ला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येईल. म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय, मग मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करायला येते म्हणून निघाली. ते 25 % हिन्दी 75% इंग्रजी बोलत असल्यामुळे त्यांचे‌ शिक्षण विचारलं तर उत्तर ऐकून सुन्न झालो. त्यांनी लंडन येथे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र विषयात पीएचडी केलीय तर त्यांच्या बायकोने मनोविकार शास्त्र या विषयावर लंडन येथेच पीएचडी केलीय. (एवढ शिकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्वाचा लवलेशही नव्हता. (नाहीतर आपल्या कडे 10वी नापास सुद्धा छाती ताणून हिंडतो) एवढच नाही तर व सी. रंगराजन (गव्हर्नर) यांचे बरोबर, तसेच कल्पना चावला ह्यांच्या बरोबर काम व मैत्रीचे संबंध होते. त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एका अंधांसाठी काम करणाऱ्या ट्रस्ट ला देऊन टाकतात. सध्या ते सोशल मेडियापासून लांब राहतात. रोडच्या कडेने जाणारं प्रत्येक जोडपं भिकारी असतंच असं नाही. एखाद जोडपं हे आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होतं. आणि आपल्या पती सोबत कोणी सीता सुद्धा होतं म्हणूनच आज भेटलेली माणसे ही कलीयुगातील राम सीता च समजतो.

आम्ही जवळ जवळ 1तास गप्पा मारल्या रस्त्यात उभे राहूनंच. इतके प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला. आणि वाटलं की आपण उगाचंच खोट्या फुशारकी‌ वर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून ३ महिने झाले आणि अजून घरी पोहचायला १ महिना लागेल.

त्यांचे नाव डॉ. देव उपाध्याय आणि डॉ. सरोज उपाध्याय

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – २… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – २… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सगळे आनंदाचे प्रेक्षणीय क्षण अनुभवत मुख्य पुस्तक दालनात प्रवेश केला. आणि कुठे जाऊ हा प्रश्नच पडला. कारण समोर फारच मोठे पुस्तकांचे मायाजाल होते. लगेच लक्षात आले, हे एक दिवसाचे काम नव्हे. एकदा माणूस आत शिरला की किमान ४/५ तास हरवून जाईल. इतकी मोठी तीन दालने त्यात सातशे स्टॉल्स. एका फेरीत एक दालनही नीट बघून होणार नाही याचा अंदाज आला. शेवटी एक बाजू ठरवून आत शिरले. पहिलेच स्वागत  जुन्या जिव्हाळ्याच्या  पुणे मराठी ग्रंथालय याच्या स्टॉल वर झाले. तिथे उपस्थित जाणत्या मंडळींनी लगेच नावानिशी ओळखले. आणि “अष्टदीप – लेखक श्री. विश्वास देशपांडे यांच्या पुस्तक परीक्षणाचे पारितोषिक मिळालेल्या तुम्हीच ना?” असे स्वागत झाले. मग त्यांच्या समवेत छायाचित्रे काढली गेली. थोड्या गप्पा अर्थातच पुस्तकांच्या विषयी झाल्या. आणि पुढचे स्टॉल खुणावत असलेले दिसले. प्रत्येक स्टॉल व तेथील पुस्तके आपल्याला खुणावत असलेले दिसत होते.

प्रत्येक स्टॉलवर व्यवस्थित स्वागत व आवश्यक ती माहिती सांगणे होत होते.  विशेष म्हणजे स्टॉल वर ३/४ खुर्च्या तर काही ठिकाणी टेबल पण दिसले. आणि त्यावर बसून मंडळी पुस्तक उघडून बघण्याचा आनंद घेत असलेली दिसली. स्टॉल मध्ये गेल्यावर त्या पुस्तकांना हातात घेताना फार समाधान व आनंद होत होता. ऑनलाईन पुस्तके मगवताना या आनंदाला पारखे झालो आहोत याची खंत वाटली. 

सर्वात कौतुक वाटले  ते पाठ्यपुस्तकांच्या स्टॉल वर. सर्व इयत्तांची पुस्तके एकाच छताखाली दिसली. व  आपण शिकवलेली सगळीच पुस्तके बघायला मिळाली. आपल्या संविधानाची मूळ प्रत एका स्वतंत्र दालनात दिसली. त्याच्या वरील स्वाक्षरी असलेल्या पानाचा फोटो काढता येत होता. आणि ग्रुप फोटो सुद्धा काढता येत होता. त्याच्या जवळच

शिवरायांचा सिंहासनावर बसलेला तर कट आऊट इतका सुंदर, की प्रत्यक्ष शिवराय या महोत्सवाचे साक्षीदार आहेत असेच वाटत होते. सर्व वाचलेला  शिवइतिहास आठवला. त्या भारावलेल्या इतिहासाची मनात उजळणी होत असतानाच समोर दिसला पु. ल. यांचा हसरा पुतळा. जणू तेही कोण काय वाचत आहे,काय चाळत आहे? हे आपल्या दृष्टीतून बघत असावेत. आणि सगळे बघून काही मिश्किल लिहिणार असे दृष्य डोळ्या समोर येत होते. ते विचार मनात घोळतच होते तोच समोर साक्षात हातात शिवपिंड घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा दिसला आणि नतमस्तक झाले! आश्चर्य म्हणजे तेथे असलेली मंडळी मोठ्या नम्रतेने “चप्पल बाहेर काढून आत या”, असे सांगत होते. तेथे आत प्रविष्ट झाल्यावर त्यांचे चरित्र चित्ररूपाने लावलेले दिसले. खूप छान वाटले. मात्र तेथे त्यांच्या विषयीची पुस्तके  उपलब्ध नव्हती. म्हणून थोडी निराशाच झाली. 

लगेच समोरच हॅपी थॉटस हे दालन दिसले. मग काय सरश्री यांची सगळी पुस्तके एकाच ठिकाणी बघून फारच हरखून गेले. तेथील मंडळी खूप छान माहिती देत होती. पुस्तके शोधायला मदत करत होती. आणि तिथेच टेबल,खुर्ची याची व्यवस्था असल्याने चर्चाही करता येत होती.

किती विविध साहित्य! विविध भाषेतील साहित्य! ज्याला ज्याची आवड तो ते पुस्तक घेऊन बघत होता.

मुलांच्या साठी स्वतंत्र दालने, विविध रंगीबेरंगी पुस्तके, चित्र साहित्य! शालेय सहली बरोबर आलेल्या मुलांच्या हातात चांदोबा,किशोर, या बरोबरच शामची आई, स्वामी, छावा अशी पुस्तके दिसत होती. किती सुंदर दृश्य!! 

मी तर वय विसरून तेच बघत बसले. 

स्टॉलच्या शेवटी एक सुंदर स्टेज व खुर्च्या दिसल्या. चौकशी केल्यावर समजले तिथे  लेखक आपल्या भेटीला येत होते. त्यांच्याशी बोलता येत होते. 

गर्दी तर होती. पण त्याला एक शिस्त होती. सगळे जणू एका आनंद सोहळ्याला उपस्थित असावे असे वाटत होते. बंदोबस्त खूप होता. पण त्यातील महिला पोलिस आपल्या बाळांना घेऊन पुस्तक खरेदी करताना दिसत होत्या. खूप कौतुक वाटले त्यांचे!

विविध शाळांची मुले व शिक्षक दिसत होते. कॉलेज मधील तरुणाई दिसत होती. अक्षरशः आबाल वृद्ध दिसत होते. कॉलेज युवती सिनियर असणाऱ्यांना मदत करताना दिसत होत्या. इतके फिरून पाय बोलायला लागले होते. पण एका कॉलेज युवतीने बसायला लगेच स्वतःची खुर्ची दिली आणि मला अचंबित केले. बहुतेक वातावरणाचा परिणाम असावा. एकंदर सर्व वातावरण संस्कारी, सकारात्मक दिसत होते.

यात गंमत म्हणजे व्यसनी लोक जसे एका ठिकाणी सापडतात तसे पुस्तक वाचनाचे व्यसन असणारे पण सापडले आणि आपली इथे भेट होणारच! अशी वाक्ये पण झाली. पुस्तकांवर चर्चाही झाली. 

एकूणच  पुस्तक महोत्सव हा एक सोहळाच झाला होता. वाचन संस्कृती लोप पावत आहे, याला उत्तर मिळाले आहे असे मनात आले. या सगळ्यात बाल चित्रपट मात्र बघता आला नाही. आणि बाहेरूनच त्याचा फलक बघावा लागला.

बरेच दिवस मनात रेंगाळणारी पुस्तके हाताळून खरेदी करता आली याचा खूप आनंद व समाधान मनात घेऊन परतले. 

अशा महोत्सवाची कल्पना मांडणारे व ती साकार करणारे सर्वांना शतशः धन्यवाद ! आणि हा असा महोत्सव दर वर्षी अनुभवायला मिळावा ही मनापासूनची इच्छा! 

समाप्त

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी आता पुस्तक वाचत नाही… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 मी आता पुस्तक वाचत नाही… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी ☆

 मी हल्ली 

पुस्तकं नाही

माणसंच वाचतोय ! 

 

पुस्तकं महाग झालीयत

माणसं स्वस्त. 

 

शिवाय,

सहज सगळीकडे उपलब्ध असतात 

माणसं. 

 

बरीचशी चट्कन वाचून होतात

कधी कधी मात्र 

खूप वेळ लागतो 

समजायला. 

 

काही तर 

आयुष्यभर कळत नाहीत ! 

 

सगळ्या साईजची 

सगळ्या विषयांची.

 

छोटी माणसं, मोठी माणसं

चांगली माणसं, खोटी माणसं. 

 

आपली माणसं, दूरची माणसं

दूर गेलेली माणसं, जवळची माणसं. 

 

दु:खी माणसं, कष्टी माणसं 

कोरडी माणसं, उष्टी माणसं 

 

बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं

निमग्न, तिरसट, मूडी माणसं. 

 

पाठीवर थाप मारणारी

हातावर टाळ्या मागणारी

थरथरत्या हाताने

घट्ट धरून ठेवणारी. 

 

मोजकं बोलणारी कविता-माणसं

कादंबरीभर व्यथा माणसं. 

 

सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं

डोळ्यांनी मौन सोडणारी माणसं. 

 

काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही

काहींच्या मजकुरात विषयच नाही

 

वर्षामागे वर्ष पानं जातात गळत

काहींची प्रस्तावनाच संपत नाही ! 

 

पुस्तकांचं एक बरं असतं

कितीही काळ गेला तरी

मजकूर कधी बदलत नाही

 

माणसांचं काय सांगू

वेष्टन, आकार

विषय, मजकूर 

सारंच बदलत बदलत 

शेवटी वाचायला 

माणूसच उरत नाही.

 

तरीही शब्द शब्द 

वाचतोे मी माणसं,

पानापानातून

वेचतोे मी माणसं………!!!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ हुंदक्यांचा गाव (कविता संग्रह) –  कवी : श्री नरेंद्र वानखेडे  ☆ परिचय  प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? पुस्तकावर बोलू काही?

☆ हुंदक्यांचा गाव (कविता संग्रह) –  कवी : श्री नरेंद्र वानखेडे  ☆ परिचय  प्रा. भरत खैरकर 

पुस्तक : हुंदक्यांचा गाव ( कवितासंग्रह )

कवी : नरेंद्र सीताराम वानखेडे 

साधा भोळा भाव “हुंदक्याचा गाव”…

“अनुभवाचा वेचा” ह्या पहिल्या काव्यसंग्रहानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी “हुंदक्याचा गाव “हा नरेंद्र सिताराम वानखेडे ह्या कवीचा काव्यसंग्रह आपल्या भेटीस आला आहे. पहिल्या काव्यसंग्रहाच्या वेळी थोडीशी बाल स्वरूपात असलेली कविता दुस-या संग्रहात पोक्त झाल्यासारखी वाटत आहे.

“हुंदक्यांचा गाव” मध्ये एकूण ८६ कविता आहेत. काव्यसंग्रहाच्या सुरुवातीला मित्रवर्य भरत खैरकर यांनी “अनुभवाचा वेचा”साठी लिहिलेला छोटेखानी अभिप्राय आहे.. त्यानंतर गजानन दिगंबर संगेकर ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना व कवीचं मनोगत आहे.

महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणात काम करणारा हा कवी.. वेळ मिळेल तसा आपला गाव.. तिथली माणसं.. परिसर.. ऑफिस.. व्यक्ती.. नातेवाईक.. श्रध्दास्थानं.. इत्यादी सह जगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.. त्यामध्ये जे काही त्याला सुचतंय.. दिसतंय.. किंवा रुचतंय.. ते सारं त्यानं जमेल तसं कवितेच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

भौतिक सुखाला सुख समजण्याच्या वृत्तीमुळे माणसाला सुख मिळत नाही त्यातून तो प्रचंड निराशेच्या आहारी गेला आहे. असं कवीच ठाम मत आहे. मनुष्य हीच जात मानणारा हा कवी आहे. त्याला “वसुधैव कुटुम्बकम” असावं असं वाटतं. माणसाला काय हवं हे सांगत असताना तो प्रेमाचा भुकेला आहे. पाहुण्याला गडवाभर पाणी.. भिक्षुकाला भाकरी चटणी.. घायाळाला घोटभर पाणी.. एवढं “हवं आहे” असं त्याचं म्हणणं आहे.

अलीकडे रात्रीला अंगणात चांदणं पडत नाही ,ही खंत कवीची आहे. संग्रहातला कवी एकदम प्रामाणिक साधा भोळा सोबतच देवभोळाही आहे. इथेच करा इथेच भरा हा निसर्गाचा न्याय असं त्याचं म्हणणं आहे.. नव्हे ती वाचकाला समज आहे. स्वप्न आणि कष्टाचं नातं सांगताना स्वप्न आनंदी ठेवतात व कष्ट जिवंत ठेवतात असं त्यांचं म्हणणं आहे.

काव्यसंग्रह वाचताना ‘ चार कडव्याचीच कविता असते. ‘असं जणू कवीचं मत असावं असं वाटून गेल्याशिवाय राहत नाही.. कारण बऱ्याचश्या कविता ह्याच पठडीतल्या आहे.. जास्त कविता लिहिण्याच्या नादामध्ये.. एका विशिष्ट चाकोरीत अडकल्याचे आपण कवीला बघतो..

बहिणाबाईची जवळीक साधू पाहणारी “अरे संसार संसार.. कधी चढ कधी उतार” ही कविता आपण येथे वाचू शकतो. पैशामागे लागलं तर काय होऊ शकतं हे सांगताना “खूप धावू नको पैशासाठी.. समाधान ठेव काही सुखासाठी” असा सल्ला कवीचा आहे. १९८०च्या दशकातलं ग्रामीण जीवन ” जुनी श्रीमंती ” ह्या कवितेतून कवीने मांडली आहे. दिव्याखाली अभ्यास करणाऱ्यांचा तो जमाना आणि ती श्रीमंती किती मस्त होती! हे कवी या ठिकाणी दाखवून देतो. “बाप बोलतो” ही कविता बापाचं कुटुंब.. मूल.. पोरंबाळ.. त्यांचं शिक्षण.. त्यांची सुरक्षा.. त्यासाठी धडपडणार जीवन मांडत. तर “मुलास उद्देशून” ही कविता मुलाने बापजाद्याची परंपरा चालविली पाहिजे.. हे सांगताना “बापाच्या धनाभोवती मारू नको गुंडाळी”… तुझं जगणं तू जग.. असा सल्ला मुलाला देतो.. वाचकाला मिळतो. आई.. बाबा.. मुलं.. गाव.. नातेवाईक.. ऑफिसचे कर्मचारी.. इत्यादींमध्ये रमणारा कवी कुटुंब वत्सल वाटतो.. आईच्या व बापाच्या कष्टाची कदर असलेला कवी आपल्याही मुलाने तोच वारसा सांभाळावा ही आशा बाळगतो..

कवी जलसंधारण विभागात काम करत असल्याने थेंब थेंब पाण्यासाठी त्याचा जीव तळमळतो आहे.. त्यातून जलबचतीचे भान कुणालाही उरलं नाही आणि गाय व माय कशी पाण्यासाठी रानोरान भटकते आहे. हे वाचून वाचकाच्या डोळ्यात पाणी येत!

“आठवणीतले दिवस “जगत असताना कवीला बाल मैत्रिणी आठवते.. अजून मुलाबाळासाठी झटू नकोस.. स्वतःसाठी जग.. कशाला धरतेस पंख पाखरांचे.. उडू दे त्यांना.. त्यांच्या आकाशात.. कशाला बघतेस जुनी राजा राणीची चौकट असलेला फोटो.. जिंदगी फक्त चार पावले शिल्लक आहे.. हे लक्षात ठेव.. हे सांगणारा कवी अजूनही बालमैत्रिणीला विसरला नाही हे दिसतं! आपल्या सजनासाठी सजलेल्या “नवल परी”ला चार प्रश्न कवी विचारतो,तिही कविता फार छान झाली आहे.

आपल्या चिमुकल्या मुलीचं.. लेकीचं हळूहळू किलबिलत.. प्रौढ होणं.. तिचं बापाला लळा लावणं.. हे सारं आठवून कवी लेकीचं महत्त्व विशद करतो. संकटाच्या काळी कोणीच मदतीला येत नाही, ही लोक त-हा कवी लागोपाठच्या “हात सैल होताच” व “नजरेत आले “ह्या कवितेतून मांडतो.

मधेमध्ये गझल सदृश कविता लिहिण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. मात्र अभ्यास कमी पडल्याने कवितेला पाहिजे तसा उठाव दिसत नाही.. तुत्यारी मधून बैलाच दुःख मांडणारा कवी प्राणीमात्रावर प्रेम करा हे शिकून जातो. निवृत्तीच्या वयात आलेला कवी ऑफिस मधील पीएफ आणि निवृत्तीनंतरची उलघाल दोन-तीन कवितेत मांडताना दिसतो. ” युद्धावर उत्तर फक्त बुद्धच आहे. ” असं ठाम मत कवीच आहे. सोबतच बाबासाहेब.. गौतम बुद्ध.. रमाई.. महात्मा फुले.. प्रजासत्ताक.. संविधान आणि देशप्रेम.. यांच महत्त्वही कवीने इतर कवितातून विशद केलं आहे.

कवीच्या गावाजवळ असलेल्या पारडसिंगा येथील सती अनुसया मातेचे महात्म्य कवीने नेमक्या शब्दात मांडलेल आहे. सोबतच सिंधुताई सपकाळ यांच्या अकस्मित मृत्यूनंतरचा विरह ” सिंधुमाई ” कवितेत कवीने मांडला आहे.. केवळ “मुठभर फुलांचा धनी” व्हावं एवढीशी आशा कवीला आपल्या जगण्यातून आहे… कवी स्वतःला खूप मोठा मान्यवर किंवा थोर समजत नाही.. ह्यातूनच.. कवीच साधं जगणं आणि आजूबाजूच्या भोवतालाशी समरसून जाणं लक्षात आल्यावर ” हुंदक्यांचा गाव “मधली कविता इतकी साधी.. सहज.. सोपी.. आणि भोळीभाबळी कां आहे ? हे वाचकाला समजून येतं.. थोडा इतर कवितांचा अभ्यास वाचन व वैचारिक व्याप्ती वाढवल्यास पुढच्या कविता अधिक चांगल्या व वाचकप्रिय झाल्याशिवाय राहणार नाही. कवीला पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा..

परिचय –  प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 271 ☆ व्यंग्य – एक प्यारा प्यारा जीव ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम व्यंग्य – ‘एक प्यारा प्यारा जीव‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 271 ☆

☆ व्यंग्य ☆ एक प्यारा प्यारा जीव

मोहन बाबू को कुत्तों से ‘एलर्जी’ है। सड़क पर कुत्ते को आते देखते हैं तो साइड बदल देते हैं। आसपास कोई कुत्ता आ जाए तो तुरन्त हाथ में पत्थर लेकर ‘दूर-दूर’ करना शुरू कर देते हैं। जिन घरों में कुत्ते हैं उनमें प्रवेश करने से पहले गेट को खटखटाकर गृहस्वामी को बाहर बुला लेते हैं ताकि आदमी से पहले कुत्ते से मुलाकात न हो जाए। ऐसे घरों में भीतर बैठने पर अगर कुत्ता प्रेमवश उनके पास आकर उन्हें सूंघना-सांघना शुरू कर दे तो उनकी रीढ़ में डर की झुरझुरी दौड़ने लगती है और पांव अपने आप ज़मीन से ऊपर हवा में उठ जाते हैं। यह प्रेम-क्रीडा देर तक चली तो वे गुहार लगाना शुरू कर देते हैं, ‘अरे भाई, इसे पकड़ो।’ गृहस्वामी मित्र हुआ तो शिकायत भी कर देते हैं, ‘यह क्या बला पाल ली, यार। घर में बैठना मुश्किल है।’

मोहन बाबू का अपना मकान है। घर में सिर्फ चार प्राणी हैं— खुद,पत्नी, एक पढ़ने वाला बेटा और एक अविवाहित बेटी। दो बड़े बेटे नौकरियों पर बाहर हैं और एक बड़ी बेटी विवाह को प्राप्त हो ससुराल में सुखी है।

रिटायर होने पर मोहन बाबू को इकट्ठी रकम मिली तो ऊपर तीन कमरे बनवाये और ऊपर ही शिफ्ट हो गये। नीचे का बड़ा हिस्सा किराये पर दे दिया। मुहल्ला शहर के भीतर है इसलिए मकानों का किराया तगड़ा है। मोहन बाबू का मकान बीस हज़ार रुपये महीने में उठ गया। किरायेदार वर्मा साहब एक प्राइवेट कंपनी में अधिकारी हैं।
वर्मा साहब के परिवार के आने से पहले उनका सामान आया। सामान को देखकर मुहल्ले वालों ने जांच लिया कि आदमी हैसियत और नफ़ासत वाला है। सामान के बाद कार और  स्कूटरों पर परिवार के सदस्य आये। मोहन बाबू का खून यह देखकर सूख गया कि कार में एक कद्दावर, काली चमकदार चमड़ी वाला श्वान भी विराजमान था। वर्मा जी से पहले उसके बारे में कोई बात नहीं हुई थी। अब कहने से क्या फायदा? मोहन बाबू ने सोचा कि उन्हें तो ऊपर रहना है, उन्हें क्या फर्क पड़ने वाला है। बस नीचे आते-जाते थोड़ा संभल कर चलना होगा।

वर्मा जी सवेरे कुत्ते को टहलाने ले जाते थे। लगता था कि कुत्ता ही उनको टहलाने ले जा रहा है क्योंकि कुत्ता आगे आगे भागता था और वे उसकी जंजीर पकड़े पीछे घिसटते जाते थे। उसी वक्त मुहल्ले  के कुछ और कुत्तों के स्वामी अपने अपने कुत्तों को टहलाने निकलते थे। वर्मा जी के कुत्ते को देखकर दूसरे कुत्तों का शौर्य जागता था और वे भौंकना और उसकी तरफ लपकना शुरू कर देते थे। लेकिन बार-बार लपकने के बाद भी वे उससे सुरक्षित दूरी बनाये रखते थे और शौर्य प्रदर्शन के वक्त भी उनकी दुम टांगों के बीच चिपकी रहती थी। वर्मा जी का कुत्ता उनकी तरफ हिकारत से देखता हुआ, बेपरवाह, अपने रास्ते चला जाता था। अगर कभी वह रुक कर किसी कुत्ते की तरफ देख ले तो वह कुत्ता डर कर अपने मालिक की टांगों के बीच घुस जाता था।

कभी वर्मा जी का कुत्ता जंजीर से छूटकर सड़क पर आ जाए तो आसपास के घरों में हड़कंप मच जाता था। पड़ोसियों के दरवाजे़ फटाफट बन्द हो जाते, और वे तभी खुलते जब कुत्ते को पकड़ कर फिर से जंजीर से बांध दिया जाता। घरों के आसपास खड़े लोग दौड़कर भीतर घुस जाते और सड़कें सूनी हो जातीं। मोहन बाबू ऊपर इन बातों से अप्रभावित रहते थे।

अन्त में पास-पड़ोस के लोग एक ‘डेलिगेशन’ लेकर मोहन बाबू के पास पहुंचे। उन्हें उस खूंखार कुत्ते के आने से पैदा हुए संकट के बारे में बताया और उन्हें सलाह दी कि  उन्हें अच्छे पड़ोसी का धर्म निबाहते हुए इस संकट का समाधान करना चाहिए। चूंकि अकेले कुत्ते को मुहल्ले से निष्कासित नहीं किया जा सकता, इसलिए उसके स्वामी से ही कोई दूसरा घर देख लेने के लिए कहना चाहिए। किरायेदारों की क्या कमी है? वर्मा जी जाएंगे तो दूसरा आ जाएगा।

मोहन बाबू धर्मसंकट में पड़ गये। बात सही थी। कुत्ते से लोग खासे आतंकित थे। उसकी वजह से लोग ऐसे चौकन्ने रहते थे जैसे मुहल्ले में कोई शेर आ गया हो। बच्चों को मोहन बाबू के घर से दूर रहने की हिदायत थी। कुत्ते के दर्शन मात्र से लोगों की रीढ़ में कंपकंपी दौड़ जाती थी। मोहन बाबू को खुद भी कुत्ते से परेशानी होती थी। कुत्ता रोज़ सवेरे बड़ी देर तक भौंकता रहता था। मोहन बाबू सवेरे रामायण का पाठ करते थे। कुत्ते के भौंकने के कारण उनकी रामायण गड़बड़ हो जाती थी।

उन्होंने पड़ोसियों को आश्वासन दिया कि वे वर्मा जी से बात करेंगे।

वर्मा जी ने पड़ोसियों के दल को देखकर स्थिति को भांप लिया था और मोहन बाबू का बुलावा आने से पहले उन्होंने अपनी रणनीति तैयार कर ली थी। यह मुहल्ला उनके लिए सुविधाजनक था और वे किसी भी कीमत पर उसे छोड़ना नहीं चाहते थे।

मोहन बाबू ने वर्मा जी को बुलाया। उनके आने पर संकोच से बोले, ‘मुहल्ले के कुछ लोग आये थे।’

वर्मा जी सावधानी से बोले, ‘हां मैंने देखा था।’

मोहन बाबू बोले, ‘आपके कुत्ते को लेकर एतराज़ कर रहे थे।’

वर्मा जी ने आश्चर्य व्यक्त किया, कहा, ‘अच्छा। टाइगर तो बड़ा भला जानवर है। कभी किसी को तंग नहीं करता। वैसे भी हम उसको बांधकर रखते हैं।’

मोहन बाबू हंसे, बोले, ‘हां, लेकिन लोग उसकी शक्ल-सूरत से डरते हैं।’

वर्मा जी बोले, ‘अब इसके लिए क्या कीजिएगा? अगर कोई कुत्ते के फोटो या उसके खिलौने से डरने लगे तो उसका क्या इलाज है? यहां के लोग भी खूब हैं।’

फिर उन्होंने अपना अस्त्र निकाला। बोले, ‘मुझे आपसे एक बात करनी थी। आपके घर में मुझे सब सुविधा मिल रही है। अच्छा मकान मालिक खुशकिस्मती से मिलता है। मुझे लग रहा है कि आपने अपनी भलमनसाहत की वजह से मकान का किराया कम रखा है। मुझे हाल में तरक्की मिली है। सोचता हूं किराया दो हज़ार रुपये बढ़ा दूं।’

मोहन बाबू गद्गद हुए। लक्ष्मी जी बिना पूर्व सूचना के आ गयीं। बोले, ‘आप बड़े सज्जन व्यक्ति हैं। अपने मन से भला कौन  किरायेदार किराया बढ़ाता है?’

अस्त्र की सफलता के बारे में निश्चिन्त होने के बाद वर्मा जी बोले, ‘आप टाइगर के बारे में कुछ कह रहे थे?’

मोहन बाबू बोले, ‘उसके बारे में अब क्या कहना। वह तो बड़ा प्यारा जीव है। इन मुहल्ले वालों का दिमाग मुफ्त ही खराब होता रहता है।’

वर्मा जी मोहन बाबू को चित्त करके नीचे उतर आये।

मुहल्ले वालों ने जब देखा कि वर्मा जी मोहन बाबू के घर में अंगद के पांव से जमे हैं तो पुराने डेलिगेशन के एक दो सदस्य मोहन बाबू के पास पहुंचे।

पूछा, ‘आपने उस मामले में कोई कार्यवाही नहीं की?’

मोहन बाबू ने भोलेपन से पूछा, ‘किस मामले में?’

वे बोले, ‘हमने आपसे कहा था न कि वर्मा जी को दूसरा घर देख लेने के लिए कह दीजिए।’

मोहन बाबू याद करने का अभिनय करते हुए बोले, ‘अरे वाह! मैंने उस पर विचार किया था। अब,भाई, मुश्किल यह है कि मैं सभी जीवों से बहुत प्रेम करता हूं। और फिर यह कुत्ता तो बड़ा ही प्यारा है। देखने में भले ही डरावना लगे लेकिन है बड़ा सीधा-सादा। आज तक किसी को नहीं काटा।

‘दूसरी बात यह है कि कुत्ते को जरूरी इंजेक्शन लगे हुए हैं। धोखे से काट भी लेगा  तो कोई नुकसान नहीं होगा। मरहम-पट्टी तो वर्मा जी करा ही देंगे। बड़े भले आदमी हैं। ऐसे किरायेदार बड़ी मुश्किल से मिलते हैं। आप लोग बेकार ही कुत्ते को लेकर परेशान हो रहे हैं।’

पड़ोसी बोले, ‘आप उस कुत्ते के पीछे मुहल्ले वालों से बुराई ले रहे हैं।’

मोहन बाबू ने सन्तों की वाणी में जवाब दिया, ‘बुराई तो आप लोग ही बेकार में पाल रहे हैं। मैं तो सब मुहल्ले वालों से प्रेम करता हूं। आप जीव-दया के सिद्धान्त से हटकर मुझे परेशानी में डाल रहे हैं। दूसरे देशों में लोग पशु- पक्षियों को बचाने में लगे हैं, यहां आप एक कुत्ते के पीछे लाठी लेकर पड़े हैं।’

मुहल्ले वाले कुपित होकर उठ गये और मोहन बाबू उनसे मुक्ति पाकर गुनगुनाते हुए अपने काम में लग गये।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares