मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #131 – मैत्रीचं नातं…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 131 – मैत्रीचं नातं…! ☆ श्री सुजित कदम ☆

मित्रांनो वेळ काढून भेटा एकदा

खूप खूप बोलायचंय‌…

हरवलेलं बालपण एकदा

पुन्हा जगून बघायचंय…!

 

क्रिकेट विट्टी दांडूचा

खेळ पुन्हा मांडूया

टेन्शन बिन्शन नको काही

एकदा मनसोक्त जगूया..!

 

नावं सोडून टोपण नावांनी

एकमेकांना चिडवूया

दुरावलेली मैत्री आपली

पुन्हा जवळ आणूया..!

 

मैत्री जरी कायम असली तरी

हल्ली भेट काही होत नाही

वर्ष वर्ष एकमेकांचे आपण

चेहरा सुद्धा पाहत नाही..!

 

रोजच्या पेक्षा थोडं जरा

वेगळं वळण घेऊया

आपणच आपल्या साठी

एकदा पुन्हा लहान होऊया..!

 

कितीही मोठं झालो तरी

आपली मैत्री अजून कायम आहे

आपल्या साठी आपला कट्टा

अजूनही तोच आहे…!

 

आणखी खूप बोलायचंय मित्रांनो

सारं शब्दात मांडता येत नाही

मित्रांनो तुमच्या शिवाय वयाचं

भान विसरता येत नाही…!

 

म्हणून म्हणतो मित्रानो

एकदा वेळ काढून भेटायला हवं

मैत्रीचं नातं आपलं पुन्हा

घट्ट करायला हवं…!

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नुसतंच… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ नुसतंच… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

गालावर तव ओघळला ,

दव वेलीच्या फुलांचा.

मी चकोर अधीर टिपण्या ,

कणकण साैंदर्याचा.

सुखदुःखाच्या लाटांची,

तू कालप्रवाही सरिता .

मी हरवल्या काठाची,

निर्बंध मूक कविता.

साक्षात काैमुदी तू,

तू चाँद पूनवेचा.

मी नाममात्र उरलो,

ऋतू शरद चांदण्याचा.

झाले कसे निखारे,

ओंजळीतल्या फुलांचे.

अरण्यरुदन ठरले,

अप्राप्य चांदण्याचे.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूक….भाग ४ ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ भूक….भाग ४ ☆ मेहबूब जमादार ☆

(यावर कुठलाच उपाय वा पर्याय शिल्लक राहिला नव्हता.माणूसकी जपण्याला पैसा लागत नाही पण पोट भरायला पैशाशिवाय कांही चालत नाही हे त्रिकाल सत्य होतं.) इथून पुढे वाचा…

आज गावांत बैठक बोलाविली होती. गांवचे प्रमुख बोलणार होते. पण बोलणं ऐकून काय पोट भरणार नव्हतं.तरीही गावक-यानां एखादा आशेचा किरण कदाचित दिसेल या आशेनं सारे गांवकरी देवळासमोर गोळा झाले होते. प्रमुख बोलले.त्याचा आशय असा होता कि आपल्या भोवती असणा-या निसर्गाकडून कांहीही मिळवून आपण जगायला शिकलं पाहिजे.गावांत रेशनच्या दुकानांत धान्य येवून वर्ष झालं होतं. गोरगरीब,आंधळे-पांगळे कसंबसं रेशनवर जगत होते. पण सरकारला हे ही जमत नव्हतं.सर्व योजनां बंद पडल्या होत्या.त्या केंव्हा उभारी घेतील याची सूतराम शक्यता नव्हती. वटलेल्या झाडाला पालवी फुटणार नव्हती.

टेकडीवर पाण्याचे झरे होते. झाडं होती. झाडानां फळ लागत होती. हाच एक मानसिक गारवा तिथल्या राहणाऱ्या तीस एक कुटूंबाकडे होता.यावर्षी ब-यापैकी भात पिकला होता. परंतू त्याला लागणा-या किराणा मालाचा दुष्काळ कांहीकेल्या हटत नव्हता.

दुशाआजीनं गावांत फेरफटका मारला.वास्तविक तिच्या वयांच गावांत कोणीच हयात नव्हतं. तिनं घरोघरी जावून गावांतल्या बायकानां अडगळीत पडलेली चूल पेटवून स्वयंपाक करायला सांगितलं. रानांतली भाजी आणा, भात शिजवा अन मिरच्याचा ठेचा करून खावा.मुलानां भाताची पेज द्या. गावातल्या सगळ्यांना हे पटलं.भूकेपुढं गांववाले सर्व भांडण तंटा विसरून गेले.

कांही बायका तर न सांगता दूशाआजी च्या घरी येवू लागल्या.आपल्याकडे काय असलं ते देवू लागल्या.स्वतःकडे काय नसेल ते मागू लागल्या.गावानं टेकडी सोडली नाय. बाहेरून काय आणायचं नाय उलट कुणाला लागली तर मदत करायची हे सगळ्यानीं जणू ठरवून टाकलं होतं.

दुशाआजीनं रानांत ओहोळ अडवून भाजीपाला केला. तसंच गावांतलं सांडपाणी आडवून बायकानां घराशेजारी खाण्यापूरत्या भाज्या लावायला सांगितल्या.

महिन्यांभरात लावलेल्या बियानां रोपटी उगवून आली. कुठं भाजी तर कुठे मिरची, दोडका, कारलं यानां फुलं येवू लागली. कांही दिसांनी त्यानां फळ लागणार होती. कांही खर्च न करता टेकडीवरल्या लोकांच जीवन चालणार होतं.

तिथल्या वस्तीनं बाहेरची कुठलीही खबरबात येवू दिली नाही. त्याचबरोबर येणा-या कुठल्याच भल्या-बू-या बातमीवर विश्वास ठेवला नाही. ते ऐकून होते की सिलेंडरला आज नंबर लावला तर तो सहा महिन्यानीं मिळणार होता. पेट्रोल पंपावर तर तेल मिळण्याची कुठलीच शाश्वती राहीली नव्हती. मूळांत त्यानां हे काहीच नको होतं.

टेकडीवरील वस्तीतील सर्वानां दुशाआजीचं स्वावलंबनांच गणित पटलं होतं. या सर्व बाबी तरूणांपासून ते म्हाता-यानींही उचलून धरल्या. बायकानींही आपला हातभार यथाशक्ती लावला होता. गावांत पाण्याची कमतरता नसलेने कुठल्या गोष्टीची उणीव भासली नाही. पाणी हेच जीवन आहे हे त्यांना पटलं होतं. प्रसंगीं पाण्यावर तहान भागवून गांवकरी जमेल ती कामे आनंदाने करत होते. गावप्रमुखानीं आजीला साथ दिली. त्यानीं गांवच्या शिपायांमार्फत पिकलेली भाजी प्रत्येक घरांत पोहचविली. कांही कुटूंबाकडे भाकड म्हशी होत्या. त्यांच्या लहान मुलानां त्यामूळे दुध मिळत नव्हतं. त्यानां लहान मुलांसाठी दुध पोहोच केलं.

क्रमशः…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तनोटराय देवी…. लेखिका – सुश्री विभा पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ तनोटराय देवी…. लेखिका – सुश्री विभा पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

तनोट राय देवी – खरं तर हे नावसुध्दा मी आधी ऐकले नव्हते. पण आम्ही राजस्थान टूरला गेलो असताना जैसरमेलला टेन्टमधे राहून तेथील थरचे वाळवंट व त्या अनुषंगाने   वालुकामय सौंदर्याचा आस्वाद घेत असताना आमच्या गाईडने सांगितले की येथून साधारण २०० किलोमीटरवर प्रसिध्द श्री तनोट राय देवीचे जागृत मंदिर आहे. तेथे जायला ४ तास लागले. मंदिरात प्रवेश करतानाच मला नेहमीपेक्षा जरा वेगळे वाटले. चौकशीअंती कळले की हे मंदिर BSF – Border Security Force च्या अखत्यारीत आहे व या मंदिराची पूर्ण देखभाल अगदी पूजेसहीत BSF करते. त्यामुळे सर्वत्र एकप्रकारची शिस्त जाणवते. कसलेही अवडंबर नाही. सकाळची पूजा झाल्यावरचे प्रसन्न वातावरण, देखणी फुलांची आरास केली होती. स्थानिक लोक भक्तीभावाने दर्शनास येत होते. दर्शन लांबूनच होते. शेजारी बरेच गोटानारळ ठेवलेले होते, ते प्रत्येकजण घेऊन वाढवत होते. अर्धा देवीपुढे व अर्धा प्रसाद –हे सर्व विनाशुल्क. मंदिरात कोणीही पुजारी वा गुरूजी नव्हते. पण सारे काही शांतपणे चालले होते. 

मंदिर परिसरात फिरत असताना तेथे शोकेसमधे खूप सारे जवानांचे व बॉम्बचे फोटो दिसले. अशी माहिती मिळाली की BSF चे हे आराध्य दैवत आहे. १९६५च्या युध्दात पाकिस्तानी सैन्याने या मंदिराच्या परिसरात ३०००+ बाँम्ब फेकले होते, पण तरीही मंदिराचे काहीही नुकसान झाले नाही व सर्व बाँम्ब न फुटता वाया गेले. तेथे आजही बरेच बाँम्ब पहायला ठेवले आहेत. एवढे बॉम्ब टाकल्यावर कसलेही नुकसान न होणे हा आपल्या व पाकिस्तानी सैन्यासाठी एक चमत्कारच होता. म्हणून या देवीला ‘ बमवाली देवी ‘ असे पण म्हणतात. हा चमत्कार पाहून पाकिस्तानी सैन्याचे ब्रिगेडीयर शाहनवाज यांनी देवीदर्शनाची परवानगी मागितली. आपल्या सरकारने अडीच वर्षाने ती दिल्यावर त्यांनी देवीचे दर्शन घेतले व मंदिराला चांदीची छत्री अर्पण केली, जी आपल्याला आजही पहायला मिळते . 

मंदिराबाहेर १९६५च्या भारत पाकिस्तान युध्दाची आठवण म्हणून एक विजयस्तंभ उभारला आहे. हा स्तंभ आपल्या मनात आपल्या जवानांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण जागवतो. मंदिराएवढेच या विजयस्तंभासमोर नतमस्तक होत असताना मी परत एकदा माझ्या हजारो जवानांचे प्राण वाचवणाऱ्या देवीपुढे विनम्रपणे झुकले व प्रार्थना केली की ‘ देवीमा अशीच माझ्या जवानांवर तुझी कृपा ठेव व अखंड पाठीशी रहा.’ 

येथून भारत पाकिस्तान सीमा २० किमी आहे. तेथे जाण्यासाठी या मंदिर परिसरातच BSF ने काही औपचारिकता पूर्ण केल्यावर पास देण्याची व्यवस्था केली आहे. ती पूर्ण करून आपल्याला बॉर्डरपर्यंत जाता येते. तेथे मोठा वॅाचटॅावर आहे. येथून सर्व परिसर छान दिसतो. यावेळी प्रथमच Front line – Border वर कार्यरत असलेली महिला ऑफिसर ड्युटीवर दिसली . तिच्याशी संवाद साधत आम्ही तिच्याप्रती वाटणारा आदर व अभिमान व्यक्त केला. त्यांचे नाव श्रीमति सुमती, व त्या श्री गंगानगरच्या असल्याचे त्यांनी सांगितले. या बॅार्डरपोस्टचा नंबर ६०९ आहे व शेवटचे गाव आहे बावलीया.  प्रत्यक्ष बॅार्डरवर, जेथून पाकिस्तान फक्त १५० मीटरवर आहे, तेथे जाण्याचा एक संस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही समला परतलो.

 

लेखिका : सुश्री विभा पटवर्धन  

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

* तुम्ही गाडीतून जाताना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला, तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, “दादा, पत्ता सांगता का?” असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी स्किनचं मलम देऊन टाकायचं…

गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.

 

*कमी जागेत बाईक पार्क करताना तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं “थँक यू” ऐकायला मस्त वाटतं….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.

माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

– अज्ञात 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य#153 ☆ तन्मय के दोहे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का  चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है  “तन्मय के दोहे…”)

☆  तन्मय साहित्य # 153 ☆

☆ तन्मय के दोहे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

कुछ दोहे….

फूलों जैसा दिल कहाँ, पैसा हुआ दिमाग।

दिल दिमाग गाने लगे, मिल दरबारी राग।।

 

भीतर की बेचैनियाँ, भाव-हीन संवाद।

फीकी मुस्कानें लगें, चेहरे पर बेस्वाद।।

 

संबंधों  के  बीच में,  मजहब की  दीवार।

देवभूमि, इस देश में, यह कैसा व्यवहार।।

 

निश्छल सेवाभाव से,  मिले परम् संतोष।

मिटे ताप मन के सभी, संचित सारे दोष।।

 

शुभ संकल्पों की सुखद, गागर भर ले मीत।

जितना बाँटें  सहज हो,  बढ़े  सभी से प्रीत।।

 

कर्म अशुभ करते रहे, दुआ न आये काम।

मन की निर्मलता बिना, नहीं मिलेंगे राम।।

 

चार बरस की जिंदगी, पल-पल क्षरण विधान।

साँस-साँस नित मर रहे, मूल्य समय का जान।

 

जब-जब सोचा स्वार्थहित, तब-तब हुए उदास।

जब भूले हित स्वयं के,  हुआ सुखद अहसास।।

 

सत्य मार्ग पर जब चले, कठिनाइयाँ अनेक।

अंत मिले संतोष धन, दृढ़ता विनय, विवेक।।

 

यह जीवन फिर हो न हो, आगे सब अज्ञात।

भेदभाव की  बेड़ियाँ, छोड़ें  जात – कुजात।।

 

रंग-रूप छोटे-बड़े, अलग/अलग सब लोग।

भिन्न-भिन्न मत-धर्म हैं,  यही सुखद संयोग।।

 

सत्कर्मों के पेड़ पर, यश-सुकीर्ति फलफूल।

ध्यान  रहे  यह  सर्वदा, रहें  सींचते  मूल।।

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

अलीगढ़/भोपाल   

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलमा की कलम से # 43 ☆ पैगंबर मोहम्मद साहब के जन्मदिन पर विशेष – ग़ज़ल – मोहम्मद से प्यारा-… ग़ज़ल – मोहम्मद से प्यारा-… ☆ डॉ. सलमा जमाल ☆

डॉ.  सलमा जमाल 

(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से  एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त ।  15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव  एवं विगत 25 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक 125 से अधिक राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन।

आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है।

आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ  ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है डॉ सलमा जमाल जी द्वारा 9 अक्तूबर को पैगंबर मोहम्मद साहब  के जन्मदिन पर रचित विशेष ग़ज़ल मोहम्मद से प्यारा-…”।

✒️ साप्ताहिक स्तम्भ – सलमा की कलम से # 41 ✒️

? पैगंबर मोहम्मद साहब के जन्मदिन पर विशेष – ग़ज़ल – 🕋 मोहम्मद से प्यारा-… 🕋 ✒️  डॉ. सलमा जमाल ?

मोहम्मद से प्यारा ,

कोई नहीं है ।

नबी जैसा दुलारा ,

कोई नहीं है ।।

 

आमना की बेटे ,

हलीमा के तारे ।

आज तुमसा सहारा ,

कोई नहीं है ।।

 

जो भी करूं उसमें ,

रब की रज़ा हो ।

क़ुरआन से प्यारा ,

कोई नहीं है ।।

 

बचा लो नबी बड़ी ,

ज़ालिम है दुनिया ।

मुझसे गुनहगार ,

कोई नहीं है ।।

 

नवासे तुम्हारे ,

हुसैनो – हसन से ।

फ़ातिमा सी बेटी ,

कोई नहीं है ।।

 

दमें वापसी ,

सामने हो मदीना ।

अब ख़ुश क़िस्मत मुझसा,

कोई नहीं है ।।

 

अदब से कहूं सलमा ,

उम्मत तुम्हारी ।

बरसाओ रहमत ,

अब कोई नहीं है ।।

 

© डा. सलमा जमाल

298, प्रगति नगर, तिलहरी, चौथा मील, मंडला रोड, पोस्ट बिलहरी, जबलपुर 482020
email – [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – उजास ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ नवरात्र  साधना सम्पन्न हुई 🌻

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – उजास ??

अमावस की गहन रात में चार पथिक मिले। जिज्ञासा ने चारों से एक ही प्रश्न पूछा, ‘क्या दिख रहा है?’ ….’घुप्प अंधेरा है’, पहले ने उत्तर दिया। दूसरे ने कहा, ‘सवाल ही ग़लत है। अंधेरे में कभी कुछ दिखता है क्या?’ तीसरे ने कहा, ‘बेहद लम्बी काली रात है।’ चौथे ने कहा, ‘रात है, सो सुबह की आस है।’… समय साक्षी है कि केवल चौथा पथिक ही उजास तक पहुँचा।

© संजय भारद्वाज

संध्या 4:58 बजे, 13 सितम्बर 2022

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈



हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा कहानी # 52 – कहानियां – 1 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

श्री अरुण श्रीवास्तव

(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे। उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। आज से प्रस्तुत है आपकी एक विचारणीय  कथा श्रंखला  “ कहानियां…“ की  प्रथम कड़ी ।)   

☆ कथा कहानी  # 52 – कहानियां – 1 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

सबसे ज्यादा पढ़ने का आनंद स्वंय अनुभवित कहानियों में आता है जिन्हें आत्मकथा कीै श्रेणी में भी वर्गीकृत किया जा सकता है. इसके पीछे भी शायद यह मनोविज्ञान ही है कि हम लोग दादा /दादी की कहानियां सुनकर ही बड़े हुये हैं जो अक्सर रात में बिस्तर पर लेटे लेटे सुनी जाती थीं और सुनते सुनते ही कहानियों का स्थान नींद लेती थी. कहानियां तब ही खत्म होती थीं जब ये कहानियां सुनने की उमर को छोड़कर बच्चे बड़े हो जाते थे और अपनी खुद की कहानी लिख सकें, इसकी तैयारियों में लग जाते थे. ये दौर शिक्षण के मैदान बदलने का दौर होता है जब बढ़ने का सफर प्राथमिक, माध्यमिक, उच्चतर विद्यालयों से गुजरते हुये महाविद्यालय, विश्वविद्यालय में विराम पाता है और उसके बाद नौकरी, विवाह, परिवार, स्थानांतरण, पदोन्नति के पड़ावों पर ठहरने की कोशिश करता है पर रुकता सेवानिवृत्ति के बाद ही है. जब समय मिलता है , तो समय न मिलने के कारण बंद बस्तों में जंग खा रही रुचियां पुनर्जीवन पाती हैं, साथ ही व्यक्ति धर्म और आध्यात्म, योग और पदयात्रा की तरफ भी कदम बढ़ाता है. हालांकि इसके बाद फिर वही दादा दादी की कहानियों का दौर शुरू होता है पर भूमिका बदल जाती है, सुनने से आगे बढ़कर सुनाने वाली. पर आज के बदलते दौर में, आधुनिक संसाधनों और न्यूक्लिक परिवारों ने कहानियां सुनने वालों को, सुनाने वालों से दूर कर दिया है. ये कटु वास्तविकता है पर सच तो है ही, हो सकता है कि अपवाद स्वरूप कुछ लोग कहानियां सुनाने का आनंद ले पा रहे हों पर सामान्यतः स्थितियॉ बदल चुकी हैं. पर यहां इस ग्रुप में सबको अपने अनुभवों से रची कहानियां कहने का और दूसरों की कहानियां सुनने का मौका मिल रहा है तो बिना किसी दुराग्रह के निश्चित ही इस मंच पर अपनी कहानियां कहने का प्रयास किया जाना चाहिए क्योंकि कहानियां सुनने का शौक तो हर किसी को होता ही है.

“मिलन चक्रवर्ती ” जब अपने बचपन के कोलकाता डेज़ को याद करते हैं तो उनकी फुटबाल सदृश्य गोल गोल आंखों से आँसू और दिल से एक हूक निकलने लगती है.बचपन से ही दोस्तों के मामले में लखपति और दुश्मनों के मामले में भी लखपति रहे थे और ये दोस्तियां स्कूल और कॉलेज से नहीं बल्कि फुटबॉल ग्राउंड पर परवान चढ़ी थीं. मोहनबगान के कट्टर समर्थक, मिलन मोशाय हर मैच के स्थायी दर्शक, हूटर, चियरलीडर सबकुछ थे और उनकी दोस्ती और दुश्मनी का एक ही पैरामीटर था. अगर कोई मोहनबगान क्लब का फैन है तो वो दोस्त और अगर ईस्ट बंगाल क्लब वाला है तो दुश्मन जिसके क्लब के जीतने पर उसकी पिटाई निश्चित है पर उस बंदे को घेरकर कहां मोहन बगान क्लब की हार की भड़ास निकालनी है, इसकी प्लानिंग स्कूल /कॉलेज़ में ही की जाती थी. जब भी ये टारगेट अकेले या मात्र 1-2 लोगों के साथ सपड़ में आ जाता तो जो गोल मिलन बाबू का क्लब फुटबाल ग्राउंड में नहीं कर पाया, वो एक्सट्रा टाईम खेल यहां खेला जाता और फुटबाल का रोल यही बंदा निभाता था. यही खेल मिलन मोशाय के साथ भी खेला जाता था जब ईस्ट बंगाल क्लब हारती थी. पर दोस्ती और दुश्मनी का ये खेल फुटबाल मैच के दौरान या 2-4 दिनों तक ही चला करता था जब तक की अगला मैच न आ जाय. फुटबाल मैच उन दिनों टीवी या मोबाइल पर नहीं बल्कि ग्राउंड पर देखे जाते थे और अगर टिकट नहीं मिल पाई तो ट्रांजिस्टर पर सुने जाते थे. हर क्रूशियल मैच की हार या जीत के बाद नया ट्रांजिस्टर खरीदना जरूरी होता था क्योंकि पिछला वाला तो मैच जीतने की खुशी या मैच हारने के गुस्से में शहीद हो चुका होता था. (फुटबाल में मोशाय गम नहीं मनाते बल्कि गुस्सा मनाते हैं.)आज जब मिलन बाबू पश्चिम मध्य रेल्वे में अधिकारी हैं तो अपने ड्राइंग रूम के लार्ज स्क्रीन स्मार्ट टीवी पर सिर्फ फुटबाल मैच ही देखते हैं. नाम के अनुरूप मिलनसारिता कूट कूट कर भरी है और अपने हर दोस्त को और हर उस ईस्ट बंगाल क्लब के फैन को भी जो कोलकाता से दूर होने के कारण अब उनका दोस्त बन चुका है, उसके जन्मदिन, मैरिज एनिवर्सरी पर जरूर फोन करते हैं. अगर उनकी मित्र मंडली के किसी सदस्य के या उसके परिवार के साथ कोई हादसा होता तो भी फोन पर बात करके उसके दुःख में सहभागी बनने का प्रयास करते रहते थे.जब कभी कोलकाता जाना होता तो कम से कम ऐसे मित्रों से जरूर घर जाकर मिलते थे. मिलन मोशाय न केवल मिलनसार थे बल्कि अपने कोलकाता के दोस्तों से दिल से जुड़े थे. ये उनकी असली दुनियां थी जिसमें उनका मन रमता था. बाकी तो बस यंत्रवत काम करना, परिवार के साथ शॉपिंग और सिटी बंगाली क्लब के आयोजन में परिवार सहित भाग लेना उनके प्रिय शौक थे. डॉक्टर मुखर्जी की सलाह पर उन्होंने टेबल टेनिस खेलना शुरु किया जिसमें एक्सरसाईज़ भी होती थी और मनोरंजन भी. यहां बने उनके कुछ मित्रों की सलाह पर प्रोग्रसिव जमाने के चालचलन को फालो करते हुये उन्होंने स्मार्ट फोन ले डाला और जियो की सिम के दम पर वाट्सएप ग्रुप के सदस्य बन गये.

जारी रहेगा…

 

© अरुण श्रीवास्तव

संपर्क – 301,अमृत अपार्टमेंट, नर्मदा रोड जबलपुर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी… 17 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है आपकी विदेश यात्रा के संस्मरणों पर आधारित एक विचारणीय आलेख – ”न्यू जर्सी से डायरी…”।)

? यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी… 17 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ?

भारत में अच्छे से फ्लैट, बंगले में बाहरी गैलरी में प्रायः अरगनी पर कपड़े सूखते दिखते हैं, क्योंकि वहां कपड़े धूप में प्राकृतिक गर्मी से सुखाए जाते हैं । वहां का मौसम ऐसा होता है ।

यहां किसी के घर में बालकनी में कपड़े सूखते नहीं दिखते , क्योंकि यहां अक्सर मौसम ही नमी भरी हवाओ वाला होता है । इससे यहां लांड्री बिजनेस खूब चल निकला है । ढेर सारी वाशिंग मशीन, और उतने ही ड्रायर लगे हुए हैं । लोग रोज के कपड़े लांड्री बैग में इकट्ठे करते जाते हैं फिर दो चार दिनों में एक बार किसी पास की लांड्री में जाकर दो तीन घंटों में कपड़े, धो सुखाकर ले आते हैं ।

हर स्ट्रीट में ऐसी कई लांड्री सहज दिखती हैं ।

भारत में भी कोई स्टार्टअप यह बिजनेस खड़ा करे तो शायद चल निकलेगा ।

कम ही लोगों के घरों में ही वाशिंग और ड्रायर मशीनें व्यक्तिगत होती हैं, जगह और इन्वेस्टमेंट दोनो की बचत, बेटे के घर पर दोनो ही मशीनें लगी हैं, इतना ही नहीं लाक डाउन की अवधि में जब श्रीमती जी को खुद कपड़े धोने सुखाने की नौबत आई तो बेटी ने आन लाइन सेमसंग का ड्रायर ही भेज दिया था तो अब वे भी धोकर कपड़े सीधे अलमारी में ही रखा करती हैं।

विवेक रंजन श्रीवास्तव, न्यूजर्सी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈