हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री ओमप्रकाश जी का साहित्य #203 – बाल कहानी – नकचढ़ा देवांश –☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक शिक्षाप्रद बाल कहानी- नकचढ़ा देवांश)

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 203 ☆

☆ बाल कहानी- नकचढ़ा देवांश ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ 

देवांश की शैतानियां कम नहीं हो रही थी। वह कभी राजू को लंगड़ा कह कर चढ़ा दिया करता था, कभी गोपी को गेंडा हाथी कह देता था। सभी छात्र व शिक्षक उससे परेशान थे।

तभी योगेश सर को एक तरकीब सुझाई दी। इसलिए उन्होंने को देवांश को एक चुनौती दी।

“सरजी! मुझे देवांश कहते हैं,” उसने कहा, “मुझे हर चुनौती स्वीकार है। इसमें क्या है? मैं इसे करके दिखा दूंगा,”  कहने को तो देवांश ने कह दिया। मगर, उसके लिए यह सब करना मुश्किल हो रहा था।

ऐसा कार्य उसने जीवन में कभी नहीं किया था। बहुत कोशिश करने के बाद भी वह उसे कर नहीं पा रहा था। तब योगेश सर ने उसे सुझाया, “तुम चाहो तो राजू की मदद ले सकते हो।”

मगर देवांश उससे कोई मदद नहीं लेना चाहता था। क्योंकि वह उसे हमेशा लंगड़ा-लंगड़ा कहकर चिढ़ाता था। इसलिए वह जानता था राजू उसकी कोई मदद नहीं करेगा।

कई दिनों तक वह प्रयास करता रहा। मगर वह नहीं कर पाया। तब वह राजू के पास गया। राजू उसका मंतव्य समझ गया था। वह झट से तैयार हो गया। बोला, “अरे दोस्त! यह तो मेरे बाएं हाथ का काम है।” कहते हुए राजू अपने एक पैर से दौड़ता हुआ आया, झट से हाथ के बल उछला। वापस सीधा हुआ। एक पैर पर खड़ा हो गया, “इस तरह तुम भी इसे कर सकते हो।”

देवांश का एक पैर डोरी से बना हुआ था। वह एक लंगड़े छात्र के नाटक का अभिनव कर रहा था। मगर वह एक पैर पर ठीक से खड़ा नहीं हो पा रहा था। अभिनय  करना तो दूर की बात थी।

तभी वहां योगेश सर आ गए। तब राजू ने उनसे कहा, “सरजी, देवांश की जगह यह नाटक मैं भी कर सकता हूं।”

“हां, कर तो सकते हो,” योगेश सर ने कहा, “इससे बेहतर भी कर सकते हो। मगर उसमें वह बात नहीं होगी, जिसे देवांश करेगा। इसके दोनों पैर हैं। यह इस तरह का अभिनय करें तो बात बन सकती है। फिर देवांश ने चुनौती स्वीकार की है। यह करके बताएगा।”

यह कहते हुए योगेश सर ने देवांश की ओर आंख ऊंचका कर पूछा, “क्यों सही है ना?”

“हां सरजी, मैं करके रहूंगा,” देवांश ने कहा और राजू की मदद से अभ्यास करने लगा।

राजू का पूरा नाम राजेंद्र प्रसाद था। सभी उसे राजू कह कर बुलाते थे। बचपन में पोलियो की वजह से उसका एक पैर खराब हो गया था। तब से वह एक पैर से ही चल रहा था।

वह पढ़ाई में बहुत होशियार था। हमेशा कक्षा में प्रथम आता था। सभी मित्रों की मदद करना, उन्हें सवाल हल करवाना और उनकी कॉपी में प्रश्नोत्तर लिखना उसका पसंदीदा शौक था।

उसके इसी स्वभाव की वजह से उसने देवांश की भरपूर मदद की। उसे खूब अभ्यास करवाया। नई-नई तरकीब सिखाई। इस कारण जब वार्षिक उत्सव हुआ तो देवांश का लंगड़े लड़के वाला नाटक सर्वाधिक चर्चित, प्रशंसनीय और उम्दा रहा।

देवांश का नाटक प्रथम आया था। जब उसे पुरस्कार दिया जाने लगा तो उसने मंचन अतिथियों से कहा, “आदरणीय महोदय! मैं आपसे एक निवेदन करना चाहता हूं।”

“क्यों नहीं?” मंच पर पुरस्कार देने के लिए खड़े अतिथियों में से एक ने कहा, “आप जैसे प्रतिभाशाली छात्र की इच्छा पूरी करके हमें बड़ी खुशी होगी। कहिए क्या कहना है?” उन्होंने देवांश से पूछा।

तब देवांश ने कहा, “आपको यह जानकर खुशी होगी कि मैं इस नाटक में जो जीवंत अभिनव कर पाया हूं वह मेरे मित्र राजू की वजह से ही संभव हुआ है।”

यह कहते ही हाल तालियों की गड़गड़ाहट से गूंज उठा। देवांश ने कहना जारी रखा, “महोदय, मैं चाहता हूं कि आपके साथ-साथ मैं इस पुरस्कार को राजू के हाथों से प्राप्त करुं। यही मेरी इच्छा है।”

इसमें मुख्य अतिथि को भला क्या आपत्ति हो सकती थी। यह सुनकर वह भावविभोर हो गए, “क्यों नहीं। जिसका मित्र इतना हुनरबंद हो उसके हाथों दिया गया पुरस्कार किसी परितोषिक से कम नहीं होता है,” यह कहते हुए अतिथियों ने ताली बजा दी।

“कौन कहता है प्रतिभा पैदा नहीं होती। उन्हें तराशने वाला चाहिए,” भाव विह्वल होते हुए अतिथियों ने कहा, “हमें गर्व है कि हम आज ऐसे विद्यालय और छात्रों के बीच खड़े हैं जिनमें परस्पर सौहार्द, सहिष्णुता, सहृदयता,सहयोग और समन्वय का संचार एक नदी की तरह बहता है।”

तभी राजू अपने लकड़ी के सहारे के साथ चलता हुआ मंच पर उपस्थित हो गया।

अतिथियों ने राजू के हाथों देवांश को पुरस्कार दिया तो देवांश की आंख में आंसू आ गए। उसने राजू को गले लगा कर कहा, “दोस्त! मुझे माफ कर देना।”

“अरे! दोस्ती में कैसी माफी,” कहते हुए राजू ने देवांश के आंसू पूछते हुए कहा, “दोस्ती में तो सब चलता है।”

तभी मंच पर प्राचार्य महोदय आ गए। उन्होंने माइक संभालते हुए कहा, “आज हमारे विद्यालय के लिए गर्व का दिन है। इस दिन हमारे विद्यालय के छात्रों में एक से एक शानदार प्रस्तुति दी है। यह सब आप सभी छात्रों की मेहनत और शिक्षकों परिश्रम का परिणाम है कि हम इतना बेहतरीन कार्यक्रम दे पाए।”

प्राचार्य महोदय ने यह कहते हुए बताया, “और सबसे बड़ी खुशी की बात यह है कि राजू के लिए जयपुर पैर की व्यवस्था हमारे एक अतिथि महोदय द्वारा गुप्त रूप से की गई है। अब राजू भी उस पैर के सहारे आप लोगों की तरह समान्य रूप से चल पाएगा।” यह कहते हुए प्राचार्य महोदय ने जोरदार ताली बजा दी।

पूरा हाल भी तालियों की हर्ष ध्वनि से गूंज उठा। जिसमें राजू का हर्ष-उल्लास दूना हो गया। आज उसका एक अनजाना सपना पूरा हो चुका था।

© श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

02-02-2022

संपर्क – 14/198, नई आबादी, गार्डन के सामने, सामुदायिक भवन के पीछे, रतनगढ़, जिला- नीमच (मध्य प्रदेश) पिनकोड-458226

ईमेल  – [email protected] मोबाइल – 9424079675 /8827985775

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द पक्षी…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

 

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द पक्षी…! ☆ 

☆ 

मेंदूतल्या घरट्यात जन्मलेली

शब्दांची पिल्ल

मला जराही स्वस्थ बसू देत नाही

चालू असतो सतत चिवचिवाट

कागदावर उतरण्याची त्यांची धडपड

मला सहन करावी लागते

जोपर्यंत घरट सोडून

शब्द अन् शब्द

पानावर मुक्त विहार करत नाहीत

तोपर्यंत

आणि

तेच शब्द कागदावर मोकळा श्वास

घेत असतानाच पुन्हा

एखादा नवा शब्द पक्षी

माझ्या मेंदूतल्या घरट्यात

आपल्या शब्द पिल्लांना सोडुन

उडून जातो माझी

अस्वस्थता

चलबिचल

हुरहुर

अशीच कायम

टिकवून ठेवण्या साठी…!

© श्री सुजित कदम

मो.7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्याला… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ प्याला… ☆ श्रीशैल चौगुले ☆

प्याला भरुन दे साकी

आज होईन मी तृप्त

काल घडून जे गेले

स्मृती पेईन अतृप्त.

*

धुंद कैफात हे मन

हृदया भय का, पिण्या

नव्या नशेची हि वेळ

तारुन नेता कारुण्या.

*

मैफल रंगात आली

तोल सावरित हाला

आणखी भरता साकी

अजाण भविष्य प्याला.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- हॉस्पिटल येताच मी पटकन् उतरून निघालो. सोबत घोरपडेसाहेबही होतेच. आम्ही आत गेलो तेव्हा आरती, माझी आई आणि भाऊ केबिनच्या बाहेर बसलेले दिसले. मी आरती जवळ गेलो. मला पहाताच तिचे डोळे भरून आले.

“समीर सिरीयस आहे. डॉक्टर तुझीच वाट बघतायत. जा लगेच. बोल त्यांच्याशी. ” आईचाही आवाज बोलताना भरून येत होताच.

आज माझ्यापुढे काय वाढून ठेवलं असेल या आशंकेनेच मी कसंबसं स्वतःला सावरत डॉक्टरांच्या केबिनकडे धाव घेतली… !!)

पाठोपाठ घोरपडे साहेब होतेच.

भूतकाळातला चटका लावून गेलेला इथवरचा प्रसंग आरतीला सांगण्याची आवश्यकता नव्हती आणि पुढचं सगळं सांगायचं मला धाडस होत नव्हतं.

” मी शांतपणे ऐकून घेईन.. त्रास करुन घेणार नाही.. पण सांगा लवकर.. काय सांगणार होतात?… “

” त्यादिवशी डॉक्टरांच्या केबिनमधून आम्ही बाहेर आलो तेव्हाच डॉक्टर काय म्हणाले ते तुला जाणून घ्यायचं होतं. पण मोघम कांहीतरी तुला दिलासा देणारं सांगून मी वेळ मारून नेली होती. खरी परिस्थिती वेगळीच होती….. “

“वेगळीच म्हणजे.. ?”

” ऍलोपॅथिक औषधांच्या सततच्या टाळता न येणाऱ्या उपचारांमुळेच त्यादिवशी त्याला मॅनेन्जायटीसचा अॅटॅक आला होता. म्हणूनच त्याची घुसमट होऊन त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या तोंडाला फेस आला होता आणि तो काळा निळा पडत चालला होता. मला हे सगळं सांगून शांतपणे डॉक्टरांनी मला समजावलं होतं आणि मी कधी कल्पनाही केली नव्हती असा एक प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता… “

” कसला प्रस्ताव.. ?”

मी धीर गोळा करून तिच्या नजरेला नजर देत अंदाज घेत असतानाच माझ्याही नकळत माझ्याच तोंडून स्वतःशीच बोलावं तसे शब्द निसटलेच…..

“समीरला या यातनांतून सोडवण्याचा… “

ती अविश्वासाने माझ्याकडे पहात राहिली. आता सगळं सांगण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता.

” डाॅक्टर म्हणाले होते,

‘मॅनेन्जायटीसच्या अटॅकमुळे तो यापुढचं त्याचं संपूर्ण आयुष्य अंथरुणाला खिळून रहात मतिमंद म्हणूनच जगणार आहे. ते आयुष्य त्याच्यासाठी फक्त यातनामय असं असह्य दु:खच असेल. या अवस्थेतून त्याच्या अशा दयनीय अवस्थेमुळे तो कधीच बाहेर पडू शकणार नाही. जितकी वर्षं तो जगेल तोपर्यंत अंथरुणावर पडल्या अवस्थेत पूर्णत: परावलंबी आयुष्य ओढत राहील. किती दिवस, किती वर्षं हे सांगता येणार नाही. आणि तोवर त्याची देखभाल आणि सर्व प्रकारची सेवा त्याच्या आयुष्यभर तुम्हाला करावी लागेल. त्याला या सगळ्या यातनांमधून मुक्त करायची हीच वेळ आहे. पण त्यासाठी जन्मदाते पालक म्हणून तुमची संमती गरजेची असणार आहे. “

असं म्हणून त्यांनी माझ्यापुढे सहीसाठी एक फाॅर्म ठेवला. त्याकडे नजर जाण्यापूर्वीच हे सगळं ऐकून मी गोठून गेलो होतो. शून्यात पहात क्षणभरच तसाच उभा असेन तेवढ्यात घोरपडे साहेबांनी मला थोपटलं.. आणि मी भानावर आलो…

“आजपर्यंत खूप सोसलंय बाळानं आणि तुम्ही सगळ्यांनीही. जे जे करायचंय ते ते सगळं केलंयत. आता जे करायचं ते त्या बाळाच्या हितासाठी, डाॅक्टर म्हणाले तसं करणं गरजेचं आणि योग्यही आहे. ऐक माझं… ” असं म्हणून घोरपडे साहेबांनी स्वतःच्या खिशातलं पेन माझ्या हातात दिलं. त्यांचे सगळे शब्द माझ्या कानाला स्पर्शून विरून गेले. कारण मी काय करायला हवं ते मी डॉक्टरांचं बोलणं ऐकलं तेव्हाच मनोमन ठरवलंच होतं जसंकांही. मी ते पेन घेतलं. शांतपणे डॉक्टरांकडे पाहिलं. त्यांनी जे सुचवलं होतं त्यात त्यांचा कणभरही स्वार्थ नाहीय हे मला समजत होतं, पण तरीही.. ?

“डॉक्टर, तुम्ही म्हणताय त्यातलं तथ्य मी नाकारत नाही. पण निर्णय घेण्यापूर्वी एकच प्रश्न विचारायचाय. “

“कोणता प्रश्न?”

“विज्ञानाने लावलेल्या शोधांमुळे हे आपण सहज सुलभ पद्धतीने करू शकतो हे खरं आहे, पण समजा आत्ता मी बाळाला या पद्धतीने यातनामुक्त करायला परवानगी दिली, तर आमच्या संसारात पुढे येणारं आमचं अपत्य त्याच्या आयुष्यभर पूर्णतः निरोगी राहील याची खात्री हेच विज्ञान देऊ शकणाराय कां?”

डॉक्टर माझ्याकडे थक्क होऊन पहात राहीले.

“हे कसं शक्य आहे?अशी खात्री कुणीच देऊ शकणार नाही. ” ते म्हणाले.

“असं असेल तर बाळाचे जे कांही भोग असतील ते तो पूर्णपणे भोगूनच संपवू दे. मी अखेरच्या क्षणापर्यंत त्याची सोबत करेन. जन्म आणि मृत्यू हे देवाचे अधिकार आपण आपल्या हातात नको घ्यायला. तो जिवंत असेल तितके दिवस त्याची सगळी सेवा मनापासून करणं हेच माझं सुख समजेन मी. आपण शक्य असेल ते सगळे उपचार सुरू ठेवूया डॉक्टर… “

माझं बोलणं संपलं तरी आरती त्यातच हरवल्यासारखी क्षणभर गप्प बसलीय असं वाटलं पण ते तसं नव्हतं. आतून येणारे दु:खाचे कढ ती महत्प्रयासाने थोपवू पहातेय हे मला जाणवलं तोवर तिनं स्वतःला कसंबसं सावरलं. आपले भरून येणारे डोळे पुसून कोरडे केले पण ते आतून ओलावतच राहिले.

“आणि.. हे.. हे सगळं आज सांगताय तुम्ही? इतके दिवस स्वतः एकटेच सहन करत राहिलात? मला विश्वासात घेऊन कां नाही सांगितलंत सगळं.. ?”

दोघांनीही दडपणात राहून काय केलं असतं आम्ही? कुणातरी एकाच्या मनातला आशेचा किरण तरी विझून चालणार नव्हता ना? आणि ती हे सगळं सहन नाही करु शकणार असंही वाटत होतं हेही खरं.

“तुला मुद्दाम सांगावं अशी ती वेळ नव्हती. आणि ते तुला सांगायलाच हवं अशी हीच वेळ आहे म्हणून आत्ता सांगितलं. आता मी बोलतो ते नीट समजून घे. माझ्या मनात अनेक प्रश्न गर्दी करतायत. लिलाताईच्या पत्रानं मला सावरलंय, दिलासा दिलाय, म्हणूनच या परिस्थितीतही मी सर्व बाजूंनी या घटनेचा शांतपणे विचार करु शकतोय. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधांनी बरा होण्याच्या पलीकडे गेलाय ही आपल्यापैकी डॉक्टर, मी आणि घोरपडे साहेब याखेरीज बाकी कुणालाच माहित नसलेली गोष्ट लिलाताईपर्यंत पोचणं शक्य तरी आहे कां?आणि तरीही… ? तरीही ते तसं ती तिच्या पत्रात अगदी सहजपणे लिहितेय. हो ना? शिवाय समीर बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि पूर्ण बरा होऊन तो परत येणार आहे हेही आपल्याला सांगतेय. यावर आपला विश्वास बसावा, आपण सावरावं म्हणूनच जणू मला आज तिच्या आईना भेटायला जायची बुद्धी होते, तिथे जाण्यापूर्वीचं तुझ्या अस्वस्थतेमुळं मनात निर्माण झालेलं त्यांच्याबद्दलचं अनाठायी किल्मिष त्यांना अंतर्ज्ञानाने समजले असावे इतक्या सहजपणे त्या आपुलकीच्या शब्दांनी अलगद दूर करतात काय आणि आपल्याला निश्चिंत केल्यासाठीच बोलल्यासारखं लिलाताईच्या वाचासिध्दिबद्दल उत्स्फूर्तपणे सांगतात काय… सगळंच अतर्क्य आहे असं नाही तुला वाटत?”

सगळं ऐकलं आणि खऱ्याखोट्याच्या सीमारेषेवर घुटमळत असावी तशी ती विचारात पडली. पण क्षणार्धात तिने स्वत:ला सावरलं आणि ठामपणे म्हणाली, ” तुम्ही समजता आहात तसं सगळं घडलं तरी तेवढ्याने माझं समाधान होणार नाहीs….. “

“म्हणजे.. ?”

“म्हणजे आपल्याला पुन्हा मुलगाच झाला तर आपला समीरच परत आलाय असं तुम्ही म्हणालही, पण मी…. ? तुम्हाला कसं सांगू… ? रात्री अंथरुणाला पाठ टेकली, अलगद डोळे मिटले की केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात दोन्ही हात पुढे पसरत झेपावत असतो हो तो मी जवळ घ्यावं म्हणून, आहे माहित?आणि मग मनात रुतून बसलेल्या त्याच्या सगळ्या आठवणी खूप त्रास देत रहातात मलाs… तो गेल्यापासून रात्रभर डोळ्याला डोळा लागलेला नाहीय हो माझ्याs. त्याचे टपोरे डोळे,.. गोरा रंग,.. लांबसडक बोटं,.. दाट जावळ.. सगळं सगळं मनात अलगद जपून ठेवलंय मी. मुलगा झालाच तर तो आपला ‘समीर’च आहे की नाही हे फक्त मीच सांगू शकेन… बाकी कुणीही नाहीss.. ” भावनावेगाने स्वतःलाच बजावावं तसं ती बोलली न् उठून आत निघून गेली… !

तिच्या बोलण्यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. माझ्यासाठी हा प्रश्न तिच्या भावना आणि माझी श्रद्धा अशा दोन टोकांमधे तरंगत राहिला… ! यातून बाहेर पडायला ‘लिलाताई’ हे एकच उत्तर होतं आणि या महिन्यातली पौर्णिमाही लगेचच तर होती. जावं कां तिच्याकडे?भेटावं तिला?बोलावं तिच्याशी? हो. जायला हवंच. या विचाराच्या स्पर्शाने दडपण निघूनच गेलं सगळं. मन शांत झालं.. !

मी पौर्णिमेची आतुरतेने वाट पहात राहिलो खरा पण? गूढ.. उकलणार.. नव्हतंच. ते अधिकच गहिरं होत जाणार होतं.. !!

त्याक्षणी मला त्याची कल्पना नव्हती एवढंच!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दंगल… — भाग – १ – लेखक – श्री रवी दलाल ☆ प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दंगल… — भाग – १ – लेखक – श्री रवी दलाल ☆ प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर ☆

(एक अखेरचा डाव) 

(महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, कथाकार श्री रवी दलाल यांची नुकतीच दिल्लीतील रॉक्स पुरस्काराकरीता निवड झाली. मराठी साहित्यकाराने दिल्लीतील दंगल जिंकून बहुमोलाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. राॅक्स हा विविध आठ भाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा विशेषांक निघतो… या पुरस्कारासाठी त्यांच्या “आंगधुणी” या कथासंग्रहातील “दंगल“ या पुढील कथेची निवड झाली आहे.) 

संताजी पाटील हा मौद्याचा अस्कारलेला पहेलवान. त्याने अनेक तगडे पहेलवान मैदानी मारून नाव कमावले होते आणि आपल्या तिन्ही मुलांना देखील कुस्तीत तरबेज केले होते.

आणी मारोती गुजर हा निमखेड्याचा डावशील पहेलवान, त्याला डावपेचात जोड नव्हता. मोठमोठे पहेलवान मारुती समोर नांगी टाकून बसले होते. आणि कित्येकाला त्याने आसमान दाखविले होते.

संताजी आणी मारोती हे दोघेही फागुजी वस्तादाचे चेले, दोघेही कुस्तीतील महाबली, एक अफाट ताकतीचा तर दुसरा डावपेच महारथी पण यांचे मैदानी कधी पटलं नाही. संताजीला ताकतीचा घमंड होता तर मारुती साधा – सोज्वळ, दोघेही मर्द मराठा जातीचे आणि वयोमानाने जवळपास सारखेच.. संताजी पाटीलाच्या घरात तर बाप – जाद्यापासून कुस्ती वीरांची परंपरा होती तर मारुती वर पिढीजात कुस्तीचे संस्कार नव्हते. पण त्याने कुस्तीला कलात्मक बनवलं होतं. नव्हे डावपेच जन्माला घालून लाल माती व्यापून टाकली होती. म्हणून संताजी मारोतीच्या डावपेचाला दचकून होता. भर जवानीत यांची तीन वेळा कुस्ती झाली. दोन वेळा कुस्त्या बरोबरीत सुटल्या, तिसरी आणि शेवटची कुस्ती देवबाहुली गावात झाली.

तब्बल वीस वर्षानंतर कुस्ती होणार होती. या महा कुस्तीची चर्चा गावागावात – खेडोपाडी रंगली आणी देवबाहुलीत जनसागर उसळला. रामटेकचे श्रीमंत मालगुजर भैय्याजी देशमुख पेंडॉल मध्ये आले आणि माईक मधून जाहीर करण्यात आलं, *शेवटची कुस्ती मारोती गुजर, संताजी पाटील यांच्यात होणार असून या कुस्तीला रामटेकचे मालगुजर श्रीमंत भैय्याजी देशमुख यांच्याकडून चार एकर शेती बक्षीस मिळणार आहे म्हणून जाहीर करण्यात आलं. वस्ताद फागुजी मानकर कुस्तीचे पंच म्हणून काम पाहणार होते. लाल लंगोट कचून मारोती मैदानात शिरला. पिकलेल्या झुप्पेदार मिश्या, बलदंड शरीर, गठेल बांधा, मजबूत देह, सावळ्या वर्णाच्या मारोतीने कसरत करून मैदानी ताकद भरवली. दंड – बैठका ठोकून चक्कर मारला, लाल माती छातीवर घासून कोल्हांड उडी मारली, वयाच्या पन्नाशीत अशी अद्भुत कलाबाजी पाहून भैय्याजी देशमुख अचंबित झाले आणि मंग बँडबाजाच्या गजरात पहेलवान संताजी मैदानात उतरला, टक्कल पडलेलं, पिढीदार मिशी, वयाच्या पन्नाशीत संताजीचे कसदार शरीर कायम होते. बलाढ्य शरीरातील नस -नस फुगली होती. एका बैलाची ताकद अंगात फणफणत होती. भरीव गोलाकार दंड, रग्गड मांड्या आणि पोलादी छाती, ताकदीचे दंड ठोकून मिशीला पीळ दिला आणि मैदानी आवाज केला. फागोजीच्या दोन चेल्यात वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार होती. मारोतीला मात देणे सोपे नाही हे संताजी ला माहित होतं. ” मारोती ताकतीने कमी असला तरी डावपेचात गुरु द्रोणाचार्य होता. “

आता दोघात शेवटची लढत होणार होती. वयामानाने कुस्ती पण सोडणार होते म्हणून शेवटची भडास काढायची होती. ही कुस्ती चितपट करेपर्यंत रंगणार होती. देवबावडीचं मैदान गच्च भरलं होतं. पहेलवानात दंगल उसळू नये म्हणून हाफ – पॅन्ट वाल्या पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

घड्याळात अकराचा ठोका पडला आणि वस्ताद फागोजीने इशारा केला. मारोती – संताजी दात – ओठ खावून फणफणत पुढे आले. संताजीच्या नजरेत बदला घेण्याची आग ढगढगत होती तर मारोतीच्या नजरेत खेळ भावना होती भैय्याजी देशमुखाने हातात हात देऊन जोड भरला. कुस्ती सुरू झाली. संतांजीने जाध ठोकून मारोतीवर आक्रमण केले, पंजाला पंजा घातला. मारोतीने सावध पवित्र घेऊन पायाची कमान केली आणि दोघांचे डोके जवळ आले. सुरुवातीला ताकदीचा अंदाज घेणे सुरू झाले. ” पहिला घिस्सा डाव संताजीने मारला. मारोतीने दंडाची पकड ढिली करून आतली डाग लावली आणि संताजीचा घिस्सा डाव फेल गेला. पुन्हा दूरवर होऊन मैदानात गोल झाले. संताजीने माती अंगावर उधळली. पुन्हा मारोतीवर चाल केली. प्रचंड ताकदीच्या संताजीने ” ढाक डाव ” मारला पण मारोती डावपेचातला ” महागुरु ” त्याने सहज मानगुटीवर ” छालावं ” घेत संताजीला तोंडघशी पाडले. छातीत नवा दम भरून डाव – प्रतीडाव सुरू झाले. दोघेही घामाने भिजले होते. संताजीने ” कालगज डाव ” टाकून मारोतीला पाडले आणि पाठीवर बसला. मारोतीने पायाच्या ऐडित संताचा पाय दाबून कडीवार केले आणी बाहेरची टांग लावली. आता मारोती – संताजी पाठीवर स्वार झाला होता. डावपेच रंगले, दोघंही उन्नीस-बीस होते. कुस्ती सुरू होऊन बराच वेळ झाला होता. दोघांच्या ताकदीने, डावपेचाने परिसर तपला. बघणाऱ्यांचे डोळे टकणे झाले आणि बघता बघता मारोतीने ” नक्कल बावडी डाव ” मारून संताजीला अलगत उचलून आपटले. संताजी सफाईने पाठ न टेकवता हातात भार तोलून निसटला. आता दोघंही जेरीस पेटले होते. ” गिस्सा डाव, ढोबी डाव, आतली टांग, बाहेरची टांग, नकाल बाळूडी डाव ” मारून झाले. पण हार – जीत ठरत नव्हती. आता शेवटची कुस्ती पण बरोबरीत सुटणारं असा अनेकांचा अंदाज असतांना चतुर मारोतीने अखेरचा ” हुकमी डाव ” खेळला. ” खेमीडाव ” पोझिशन कायम ठेवून संताजीची मान बगलेत दाबली. आणि मोठ्या चतुराईने ” पैठीडाव ” मारला. संताजीला ” पैठी डावाची ” तोड माहीत नव्हती आणी संताजी मातीत आडवा झाला आणि दोन्ही गुडघ्यात मान दाबून ” पैठी डावाने ” संताजीला चीत केले. हा मारोतीचा ” हुकमी डाव ” तोडणे संताजीला जमले नाही आणि संताजी पराभूत झाला. संताजीचे तीनही पोरं मैदानात घुसली, मारोतीवर हमला केला. दंगल उसळली, मैदानात दोन गट भिडले आणि मारामारी सुरू झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला. घमंडी संताजीला पराभव पचवता आला नाही. पोलिसांची बंदूक हिसकावून मारोतीच्या छाताडावर लावली आणी गोळी झाडली. चपळ मारोतीने उंच उडी घेऊन गोळी चुकविली. सुटलेली गोळी संताजीच्याच पोराचा कंठ भेदून गेली आणि संताजीचा मोठा पोरगा पृथ्वीराज रक्ताच्या थारोळ्यात पडला. बापाच्या हातून पोराचा खून झाला. पोराच्या खुनात संताजीला सात वर्षाची शिक्षा झाली. सजा भोगून संताजी पाटील बाहेर आला. पण त्याची खुमखुमी कमी झाली नव्हती.

ही घटना होऊन पंधरा वर्षे लोटली. काळ बदलला होता. संताजी – मारोती वयोमानाने थकले. नव्या पिढीची हुजूरात सुरू झाली.

संताजीचे प्रताप आणि लखन बापासारखेच पहेलवान झाले. तर पोरगी आशा नागपूरला शिक्षण घेत होती. मारोती गुजरचा पोरगा बळवंता मिलमध्ये नोकरीला होता. निमखेड्यातील ग्रामपंचायतने मारोती गुजरला आखाड्याकरिता जागा दिली. खाली वेळेत मारोती तरुणांना कुस्त्याचे डावपेच शिकवत होता पण बळवंताने कुस्तीत रुची दाखविली नाही. बळवंता दिसायला आकर्षक, कसलेल्या शरीरयष्टीचा गबरू जवान ! त्यानंही कसरत करून शरीर कमावलं होतं. पण आखाड्यात कधी उतरला नाही. कुस्तीचा सराव केला पण मैदानी उतरला नाही.

अशा देखण्या राजबिंड्या बळवंताचं प्रेम संताजीच्याच आशा सोबत जुळलं. भेटीगाठी वाढल्या पण लग्न केलं नाही. कारण दोघांच्या बापाचं हाडवैर जगजाहीर होतं. हे प्रकरण समोर माहीत झालं तर खून पडणार होते. म्हणून दोघांनी विसरायचं ठरवलं. आणि दोघं वेगळे झाले.

आशाच लग्न बिहाडीच्या जमीनदार मुलाशी झालं. पण बळवंताने लग्न केले नाही. आशाच्या विरहात बळवंता स्वतःला संपवत होता. नोकरी करून घरी येणे आणि पडून राहणे हा एकमेव ठरलेला कार्यक्रम होता.

एकुलत्या एका पोराची दशा पाहून बळवंताची माय काळजीत होती. शेवटी बापाने बळवंताला विचारलं….

बल्लू, तू लग्नाचं काय ठरवलं…

सांग…

कधी जायचं…

मुलगी पाहायला….

मी मुलगी पाहून ठेवली आहे…

बळवंताने खाली मान टाकून लग्नास नकार दिला आणी बोलला.

बाबा, या घरात कधीच असून येणार नाही. मी लग्न करणार नाही..

मारोतीने वैतागून विचारले,

अरे, पण कां लग्न करणार नाही

कोंडलेला श्वास मोकळा करून बळवंता म्हणाला,

बाबा, इच्छा नाही…

तुम्हाला घरात सून मिळेल पण तिला माझी बायको होता येणार नाही

इतकं बोलून बळवंता बाहेर पडला.

बळवंता, आता लग्न करणार नाही. बापाला कळून चुकलं होतं. आणि शेवटी मारोतीने लग्नाचा विषय बंद केला.

मौदाला कन्हान नदीच्या काठावर पंचमीला यात्रा भरली. बळवंता मित्रासोबत यात्रेला गेला. झुल्या जवळ त्याला अचानक आशा दिसली पण तिची नजर दुसरीकडे होती. गर्दीतून रस्ता काढत बळवंता जवळ पोहोचला. तर आशा गर्दीत गडप झाली होती. पण क्षणात आशा नजरेतून औझल झाली. बळवंताची नजर भरारली, आशाला पाहण्याची तळमळ वाढली…… पाळण्यावर चढून दूर नजर फेकली. आशा पुन्हा नजरेत आली. बळवंताचा जीव भेटीसाठी कासावीस झाला. गर्दी लोटत बळवंता आशा जवळ पोहोचला आणि दोघांची नजरावर नजर झाली. ” जवळपास एक वर्षाच्या अंतराने एकमेकांना पहात होते, डोळे पाणावले, हुंदका दाटला. आशाने घट्ट कवटाळून घेतले. दोघांचेही हृदय दाटून आलं…. अश्रूचा बांध फुटला, अशाने आव गिळत विचारले….

बल्लू, कसा आहेस ? 

बल्लूने फक्त मान हलवली, आशाने बल्लूला हात धरून बाजूला ओढले…

बर्रर्र बरं, मला सांग, कुठली मुलगी केली तू ? आता ती पण आली कां यात्रेत ? न थांबता आशा बोलत होती, तर बळवंता तिला न्याहाळत होता. आशाने बल्लूच्या डोळ्याची लिंक तोडली,

ये माझ्या हिरो, कुठे हरवला…. ? 

आरे, बघतच राहशील, कां काही बोलशील ?

चुटकी वाजवून सावध केले… पण बळवंता चूप होता, , ,

कशी आहे, तुझी बायको ती आली कां ?

बळवंताने आशाला थांबवलं….

आशा, मी लग्न नाही केलं गं… ?

आशा एकदम डोळे फाडून बोलली…

काय ? 

तू अजून लग्न नाही केल ? आशा गहिवरली….

मी तुला विसरू शकलो आशा, तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही…. बोललो होतो ना…. आशा, माझ्या जीवनात तुझ्याशिवाय कुणी येणार नाही म्हणून ? तुला दिलेल्या वचनावर कायम आहो. माझा शब्द पवित्र प्रेमाची कसोटी आहे… मी लग्न करणार नाही… तुझ्या आठवणीत हे जीवन एकटं काढायचं ठरवलं आहे…

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री रवी दलाल

 9960627818

प्रस्तुती –  सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनसुमने – नृत्यांगना शिल्पाची -> मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

🪷 मनमंजुषेतून 🪷 

☆ मनसुमने – नृत्यांगना शिल्पाची ☆ मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

साल 2025 सुरू झाले आणि माझ्या आयुष्यातील सुवर्णकाल सुरू झाला आहे याची अनुभूती मला यायला लागली. समाजरूपी देवतेने माझ्या कर्तृत्वाचे स्मरण ठेवून मानाचा शिरपेच माझ्या मस्तकात खोवला. आपल्याच सांगली मिरज या भागातील लोकमत सखी मंच या अतिशय प्रतिष्ठित असणाऱ्या सामाजिक संस्थेने लोकमत सखी हा सन्मान देऊन मला पुरस्कृत केलं.

सुश्री शिल्पा मैंदर्गी

माझा स्वयं चा प्रवास – 

स्वयम टॉक्स म्हणजे मोबाईल वरील एक लोकप्रिय ॲप ज्याच्याबद्दल मला फारसे माहीत नव्हते. मिरज मधील प्रतिष्ठित व्यक्ती महेश जी आपटे यांच्यामार्फत माझा स्वयं टॉक या संस्थेशी संपर्क झाला. स्वयं टॉक या संस्थेचे सर्वेसर्वा श्री नवीन काळे सर यांचा मला फोन आला आणि त्यांनी माझा व माझ्या गुरु सौ धनश्री ताई आपटे यांचा 25 वर्षांचा नृत्य प्रवास त्यांना स्वयं टॉक्सच्या मंचावर आणायचा आहे यासाठी तुम्ही तयार आहात का याची विचारणा केली.

अशाप्रकारे आयुष्य समृद्ध करणाऱ्या आणि एक आनंददायी अनुभव देणाऱ्या स्वयं टॉक्स या संस्थेशी मी जोडले गेले.

स्वयं टॉक्स च्या मंचावर माझी व माझ्या नृत्य गुरु सौ. धनश्रीताई आपटे यांची मुलाखत व माझ्या नृत्याचे प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले आणि याची पूर्वतयारी जवळ जवळ वर्षभर सुरू होती.

आता आपल्याला स्वयं टॉक्स च्या मंचावर आपल्या नृत्याचे सादरीकरण करायचे आहे म्हटल्यावर माझा नृत्याचा सराव सुरू झाला. नृत्यासाठी कोणती रचना निवडावी त्या गीतास कशा प्रकारचे संगीत असावे याबाबत आम्हा दोघींची चर्चा सुरू झाली. 64 कलांचा अधिपती असणारा श्री गणेश याचे स्तवन आपल्या नृत्यातून सादर करावे यावर शिक्कामोर्तब झाले. दररोज दोन ते तीन तास ताई माझ्याकडून नृत्याचा सराव करून घेत होत्या. हा सराव सुरू असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या परंतु त्यावरही मात करून आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले.

12 जानेवारी हा दिवस सगळीकडे युवा दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी स्वयं टॉक्स च्या मंचावर आमचा कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. आम्ही 11 जानेवारीलाच मुंबईमध्ये दाखल झालो आमची राहण्याची व्यवस्था स्वयं टीमने केलेलीच होती. मुंबईत गेल्यापासून आमच्याशी वेळोवेळी फोनवरून संपर्क करून स्वयं टीमने आम्हाला खूप सहकार्य केले. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा मुंबई येथे होता. या कार्यक्रमासाठी आमच्या व्यतिरिक्त अजूनही सहा वक्त्यांच्या मुलाखती होत्या. आमची सर्वांशी एकमेकांशी ओळख व्हावी आणि मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम व्हावी या दृष्टीने कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हा सर्वांना एकत्र बोलवले होते. मी प्रत्यक्ष पाहू शकत नसल्यामुळे मला जिथे नृत्य करायचे होते त्या रंगमंचाचा अंदाज येण्यासाठी प्रत्यक्ष रंगमंचावर नेऊन तेथील लांबी रुंदीची कल्पना मला देण्यात आली. तिथे आलेल्या सर्वच वक्त्यानी एकमेकांशी ओळख करून घेतली एकमेकांची मनापासून चौकशी केली आणि असे करता करता जणू त्या रंगमंचाशी आमचे एक मैत्रीचा नातं जुळून आले.

१२ जानेवारी हा मुख्य कार्यक्रमाचा दिवस उजाडला आम्ही सकाळी साडेआठ वाजताच बालगंधर्व रंगमंदिर वांद्रे येथे उपस्थित झालो.

स्वयंंच्या सर्व टीमने आमचे सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आमची मुलाखत घेणारे सुप्रसिद्ध सुसंवादक डॉक्टर उदय जी निरगुडकर आमच्या आधीच तिथे उपस्थित होते. रंगमंचाचा पडदा उघडण्यापूर्वी उदयजींनी आम्हा सर्वांची अगदी प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी केली आणि ओळख करून घेतली. आणि रंगमंचावरती एक खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आमची मुलाखतीची भीती त्याचवेळी निघून गेली.

बरोबर दहा वाजता पहिले वक्ते श्री. हेरंब कुलकर्णी यांच्या मुलाखतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यांच्यानंतर श्री. गणेश कुलकर्णी, धनश्री करमरकर, कियारा, सौरभ तापकीर, आनंदसागर शिराळकर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती झाल्या. या सर्वांचेच अनुभव त्यांना असणारे ज्ञान ऐकून सर्वच प्रेक्षक अगदी भारावून गेले.

संध्याकाळी बरोबर पाच वाजता माझी आणि धनश्रीताईंची मुलाखत सुरू झाली. दृष्टीहीन नृत्यांगना शिल्पा मैंदर्गी आणि तिला स्पर्शाच्या सहाय्याने भरतनाट्यम नृत्य शिकवणाऱ्या तिच्या गुरु सौ. धनश्रीताई आपटे या दोघींची मुलाखत ऐकण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर झाले होते. एखादी दृष्टीहीन मुलगी भरतनाट्यम विशारद कशी होऊ शकते याबाबत सर्वांच्याच मनामध्ये प्रचंड कुतूहल होते आणि हा गुरु शिष्याचा 25 वर्षांचा प्रवास जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

डॉक्टर उदय निरगुडकर आम्हा दोघींना कोणते प्रश्न विचारणार आहेत याची आम्हाला तसूभर ही कल्पना नव्हती. उदय जी यांनी आमची मुलाखत इतक्या कौशल्यपूर्ण रीतीने घेतली की त्यामधून आमचे गुरु शिष्याचे नाते अगदी अलगदपणे उलगडत गेले. आणि आणि गेले 25 वर्षाची आमची तपश्चर्या फळाला आली.

मुलाखतीच्या शेवटी माझ्या नृत्याचे सादरीकरण होते. श्री गणेशाचे स्मरण करून मी ही रचना सादर करायला सुरुवात केली. प्रेक्षक अगदी तन्मयतेने माझी ही रचना पहात होते. त्यांना एक दृष्टीहीन मुलगी भरतनाट्यम सादर करते आहे ही गोष्टच अद्भुत वाटत होती. आणि it’s a miracle, कमाल कमाल कमाल, अद्भुत, it’s impossible, unbeliveable अशा प्रकारच्या उद्गारांनी रसिक प्रेक्षकांनी माझ्या नृत्याला दाद दिली. माझे नृत्य संपल्यानंतर प्रेक्षक जवळजवळ पाच मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवत होते रंगमंदिर टाळ्यांच्या कडकडाटाने भारून गेले होते. मला टाळ्या ऐकू येत होत्या प्रेक्षक उभे राहून माझ्या नृत्याला ताईंच्या अथक परिश्रमाला दात देत होते हे माझ्या बहिणीने सांगितल्यावर मला समजले त्यावेळी मला माझ्या आई बाबांची खूप आठवण आली. त्यांच्याही जीवनाचे सार्थक झाले अशी भावना मनात निर्माण झाली. माझे आई बाबा, माझ्या दोन बहिणी, एक भाऊ यांनी मी दृष्टिहीन असूनही लहानपणापासूनच माझ्या प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन दिले त्यांचेही सहकार्य मला आज मनापासून आठवते. तसेच माझ्या आयुष्यात आजपर्यंत आलेल्या माझ्या अनेक मैत्रिणी यामध्ये विशेष उल्लेख करावा वाटतो त्या म्हणजे गोखले काकू, अनिता खाडिलकर, कानिटकर मॅडम यांचाही मला सतत आधार वाटत आला आहे. या नृत्यकलेमुळेच माझा हा सन्मान आहे.

अशाप्रकारे माझी आणि ताईंची मुलाखत show stopper ठरली. प्रत्येक जण आम्हा दोघींना भेटण्यास उत्सुक झाला होता. प्रत्येकाने आमच्या जवळ येऊन हातात हातात हात घेऊन आमचे अभिनंदन करून शुभेच्छा देऊन आमच्या दोघींच्या प्रयत्नांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भारतीय संस्कृती आणि भरतनाट्यम नृत्य कलेची जोपासना करणाऱ्या आमच्यासारख्या गुरु शिष्यांच्या मुलाखतीच्या गोड आठवणी मनामध्ये साठवून ठेवून प्रेक्षक रंग मंदिरातून बाहेर पडले.

आपली ही भारतीय संस्कृती भरतनाट्यम कला अशीच उत्तुंग नेण्याची माझी इच्छा आहे हे बळ माझ्या मध्ये देण्याची मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आहे.

पुन्हा एक वार स्वयं टॉक्स च्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद ! 

मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी

मिरज

दूरभाष ०२३३ २२२५२७५

शब्दांकन : सौ. अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

(🙏🙏 शिल्पाने दिलेले हे मनोगत खूप बोलके आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कविराज भूषण…’  (पूर्वार्ध) – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कविराज भूषण…’  – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(पूर्वार्ध)

महाकवी भूषण (१६१३ – १७१५) हे ‘रीतिकाल’ मधील प्रमुख हिंदी कवी गणले जातात. जेव्हा इतर कवी शृंगाररसपूर्ण काव्य रचत होते, तेव्हा भूषण यांनी वीररसाने ओतप्रोत रचना करून स्वतःला सर्वांपेक्षा वेगळे सिद्ध केले. कवी भूषण मोरंग, कुमाऊं, श्रीनगर, जयपूर, जोधपूर, रेवा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल इत्यादींच्या आश्रयाखाली राहिले, परंतु त्याचे आवडते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजा छत्रसाल हेच होते.

महाकवी भूषण मूळचे टिकवापूर या गावाचे रहिवासी होते असे मानल्या जाते. हे गाव आजच्या उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातल्या घाटमपूर तालुक्यात स्थित आहे. त्यांचे दोन भाऊ व्यापमणी आणि मतिराम हे देखील कवी होते. त्यांचे मूळ नाव ज्ञात नाही, मात्र ‘शिवराज भूषण’ या ग्रंथाच्या खाली दिलेल्या दोह्याचा संदर्भ जोडला तर, चित्रकूटचे राजे हृदय राम यांचा मुलगा रुद्र शाह याने त्यांना मानाने ‘भूषण’ ही उपाधी दिलेली होती. त्यांच्या उत्तुंग साहित्याला शोभेल अशीच ही पदवी आहे असे वाटते.  

कुल सुलंकि चित्रकूट-पति साहस सील-समुद्र।

कवि भूषण पदवी दई, हृदय राम सुत रुद्र॥ 

भूषण हे आपल्या भावांसोबत राहत असत. एकदा त्यांनी जेवतांना आपल्या भावजयीला मीठ मागितले. भावजयीने हे मीठ विकत घेण्यापुरते पैसे कमावून आणा, अशी त्यांची निर्भत्सना केली. ती जिव्हारी लागल्याने हा स्वाभिमानी कवी घर सोडून निघून गेला. (पुढे राजकवी झाल्यावर त्यांनी आपल्या भावजयीला १ लाख रुपयांचे मीठ पाठवून दिले असे म्हटल्या जाते.) कित्येक राजांच्या दरबारी राहिल्यानंतर ते पन्नानरेश राजा छत्रसाल यांच्याकडे राजकवी म्हणून रुजू झाले, तेथून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयास गेले. कांही वर्षानंतर छत्रसाल महाराजांकडे ते परत गेले. परंतु त्यांचे मन तिथे लागेना अन ते शिवरायांच्या दरबारात परतले ते कायम त्यांच्याच सेवेशी एकनिष्ठ राहण्यासाठी! खरे तर इतक्या राजांच्या दरबारी चाकरी करूनही ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल या दोनच राजांचे खरे प्रशंसक होते. त्यांनी स्वतःच आपल्या काव्यात याची कबुली दिली आहे, ती अशी-

और राव राजा एक मन में न ल्याऊं अब।

साहू को सराहों कै सराहौं छत्रसाल को॥

इसवी १७१५ मध्ये कवी भूषण मृत्यू पावले.  

कवी भूषण यांची साहित्य संपदा: 

विद्वान मंडळी मानतात की शिवराजभूषण, शिवाबावनी, छत्रसालदशक, भूषण उल्लास, भूषण हजारा आणि दूषनोल्लासा असे सहा ग्रंथांचे लेखन कवी भूषण यांनी केले आहे. परंतु यांच्यापैकी फक्त शिवराज भूषण, छत्रसाल दशक आणि शिवाबावनी हेच काव्य ग्रंथ आज उपलब्ध आहेत. कविराज यांनी शिवराजभूषणमध्ये प्रचुर अलंकारिक काव्य, छत्रसाल दशकमध्ये छत्रसाल बुंदेलाचे पराक्रम, दानशीलता आणि शिवाबावनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणवर्णन केले आहेत.

‘शिवराज भूषण’ हा एक विशाल काव्यग्रंथ असून त्यात ३८५ पद्य (काव्ये) आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याचे आणि पराक्रमाचे ओजस्वी वर्णन करणाऱ्या शिवाबावनीमध्ये ५२ कविता आहेत. बुंदेला शूर छत्रसालच्या शौर्याचे वर्णन ‘छत्रसाल दशक’ मधील दहा कवितांमध्ये केले आहे. त्यांचे संपूर्ण काव्य वीररसाने, चैतन्य तेजोमय गुणांनी आणि जोमाने भारलेले आणि रसरसलेले आहे. या काव्यांत महानायक आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि खलनायक आहे मुघल बादशहा औरंगजेब. औरंगजेबाप्रती त्यांचा हा तीव्र विरोध जातीच्या वैमनस्यावर आधारित नाही तर एका जुलमी आणि नृशंस शासकाच्या दुष्कृत्यांविरुद्ध आहे.

रीतिकाव्याची सर्वात महान उपलब्धी होती हिंदीच्या एका सुसंस्कृत आणि सहृदय समाजाची निर्मिती. या काळात सांस्कृतिक आणि कलात्मक वैभवाने चरम सीमा गाठली होती. कलात्मक काव्य या काळात प्रचुर मात्रेत रचल्या गेले.वाकपटू कवींच्या माध्यमातून मुळातच गोड अशी ब्रज भाषा आणखीच रमणीय झाली. लवचिक, भावपूर्ण आणि लालित्यपूर्ण शब्दार्थांच्या अभिव्यक्तीमुळे ही राजस भाषा त्या काळातल्या कवी मंडळींची लाडकी ‘काव्य भाषा’ बनली. त्या काळात शृंगार रसाने परिष्कृत काव्य हे सर्वाधिक परिचित आणि रसिकमान्य होते.

भूषण यांच्या काव्यातील वैशिष्ट्ये:

मात्र या शृंगारिक वातावरणात भूषण यांचे मन रमेना. मुघलांचे हिंदूंवर होत असलेले निर्घृण अत्याचार ते सतत बघत होते. आपला समाज लाचार, बलहीन आणि चैतन्यशून्य झाला होता. म्हणूनच देशभक्तीची ज्योत जगवणे हेच आपले इतिकर्तव्य समजून कवी भूषण यांनी रीतिकालाच्या मळलेल्या वाटेवर चालण्याचे नाकारले. प्रवाहाविरुद्ध पोहत त्यांनी वीररसाने परिपूर्ण अशा काव्य रचना केल्या आणि अखिल आयुष्याचे तेच उद्दिष्ट ठेवले. त्यांच्या प्रत्येक कवितेची मूळ भावना शौर्याचे गुणगान करते. हिंदुत्वाचा सार्थ अभिमान आणि त्यांच्या नायकांच्या अद्वितीय शौर्याचे वर्णन हेच त्यांच्या कवितेचं गमक आहे. भूषण यांची काव्य शैली त्यांच्या विषयास अत्यंत अनुकूल आहे, तसेच ओजपूर्ण आणि वीररसपूर्ण आख्यान मांडायला सर्वथा उपयुक्त आहे. प्रभावोत्पादक, प्रसंगात्मक चित्रमयता आणि सरस शब्दालंकार योजना भूषण यांच्या काव्यशैलीची मुख्य वैशिष्ठे आहेत. या महान देशभक्त कवीने मुघलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आणि निराश झालेल्या हिंदू समाजात आशा निर्माण करून त्यांना संघर्ष करण्यास प्रोत्साहित केले. हा विषय मांडतांना त्यांनी छत्रपती शिवाजी आणि राजा छत्रसाल हे काव्य नायक निवडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल लिहितांना भूषण यांच्या लेखणीला हजारो धुमारे फुटलेले बघायला मिळतात. ‘शिवभूषण’ या काव्यग्रंथातील एक काव्य स्फुल्लिंग बघा. 

सबन के ऊपर ही ठाढ़ो रहिबे के जोग, ताहि खरो कियो जाय जारन के नियरे,

जानि गैर मिसिल गुसीले गुसा धारि उर, कीन्हों न सलाम, न बचन बोलर सियरे।

भूषण भनत महाबीर बलकन लाग्यौ, सारी पात साही के उड़ाय गए जियरे,

तमक तें लाल मुख सिवा को निरखि भयो, स्याम मुख नौरंग, सिपाह मुख पियरे॥’

औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांना जेव्हां सहा हजारी मनसबदारांच्या ओळीत स्थान देण्यात आले, तेव्हां या अपमानाने ते पेटून उठले. भर दरबारात ते क्रोधावेशाने औरंगजेबास दरबारात तक्रार करू लागले, त्या दृश्याचे चित्रण या रौद्ररसाने भरलेल्या काव्यांशात केले गेले आहे. 

अर्थ: मुघल दरबारात सर्वोच्च स्थानी उभे राहण्यास सक्षम असलेल्या सर्जा शिवाजीचा अपमान करण्याच्या उद्देशानेच त्यांना ते आसन दिलेले होते. औरंगजेबाच्या या अपमानजनक वागणुकीमुळे शिवाजी संतप्त झाले, त्या वेळी त्यांनी औरंगजेबाला सलाम केला नाही आणि दरबाराच्या शिष्ठतेनुसार विनम्र शब्द देखील उच्चारले नाहीत. महाबली शिवाजी रागाने गर्जना करू लागले आणि त्याचे हे क्रोधायमान वर्तन पाहून मुघल दरबारातील सर्वांच्या मनात चलबिचल होऊन ते घाबरून किंकर्तव्यमूढ झाले. रागाने लाल झालेला शिवरायांचा चेहरा पाहून औरंगजेबाचा चेहरा काळवंडला आणि सैनिकांची तोंडे कमालीच्या भीतीग्रस्ततेने पिवळी पडली.

धर्मरक्षक शिवाजी महाराजांचे कवी भूषण यांनी केलेले काव्य वर्णन:

हिंदू धर्माच्या अतिरेकी द्वेषाने पछाडलेला मुघल बादशहा औरंगजेब जेव्हां हिंदू समाजावर, त्यांच्या धर्मावर आणि संस्कृतीवर घाला घालत होता, तसेच मुस्लिम धर्माची पाळेमुळे हिंदुस्तानात रुजवण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हां गो ब्राम्हण प्रतिपालक, हिंदू धर्माचे रक्षणकर्ते म्हणून छत्रपती शिवराय अखंड प्रयत्नशील होते.  त्याच संदर्भातील हे वर्णन बघा!

देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डूबे राव राने सबी गये लबकी,

गौरागनपति आप औरन को देत ताप आप के मकान सब मारि गये दबकी।

पीरा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत सिद्ध की सिधाई गई रही बात रबकी,

कासिहू ते कला जाती मथुरा मसीद होती सिवाजी न होतो तौ सुनति होत सबकी॥

अर्थ: संपूर्ण हिंदुस्थानात हिरवी फडकी ज्यावर चंद तारे कोरले आहेत अशी फडकी फडकताना दिसत होती. मोठमोठाले राजे मात्तब्बर राजे मुसलमानांचे मांडलिक झाले होते. साधू संतांची सिद्धी फळाला येत नव्हती तसेच तपश्चर्या कामाला येत नव्हती. अशावेळी कविराज भूषण गणरायाला लटक्या रागाने विचारतात: अहो गणराय आणि श्री गौरी तुम्ही खरे असुर संहारक परंतु तुम्ही देखील तुमच्या देवळात दडी मारून बसलात. अहो छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्याचे काम हाती घेतले नसते तर काशीची कला लयाला गेली असती, मथुरेत मशीद वसली असती आणि आम्हा सर्व हिंदूंना सुंता करून घ्यावी लागली असती!

भारतीय संस्कृतीचे जाणकार कविराज भूषण:  

हिंदूंना त्यांची हरवलेल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी कविराजांनी संस्कृतीचा उचित वापर केला. त्यांनी अनेक देवी-देवतांच्या कार्यांचा उल्लेख केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांची गणना त्या महान देवी देवतांच्या कार्यांच्या श्रेणीत केली. शिवाजी महाराजांना धर्म आणि संस्कृतीचे प्रणेते म्हणून त्यांनी आपल्या काव्यात चित्रित केले. खालील ओळी त्याच्याच परिचयक आहेत.  

बेद राखे बिदित पुरान परसिद्ध राखे राम-नाम राख्यो अति रसना सुघर में। 

हिंदुन की चोटी रोटी राखि है सिपाहिन की काँधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में। 

मीड़ि राखे मुग़ल मरोड़ि राखे पातसाह बैरी पीसि राखे बरदान राख्यो कर में। 

राजन की हद्द राखी तेग-बल सिवराज देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में॥ 

अर्थ: भूषण म्हणतात की महाराज शिवाजींनी आपल्या अफाट सामर्थ्याच्या जोरावर हिंदू धर्माचे रक्षण केले. औरंगजेबाला परास्त करून त्याने वेदांसारख्या हिंदू धर्मग्रंथांना नष्ट होण्यापासून वाचवले आणि दुसरीकडे वेदांमध्ये असलेल्या ज्ञानाचा प्रसार केला. याशिवाय त्यांनी हिंदू धर्माचे सार असलेल्या पुराणांचे रक्षण केले आणि रामनामाचे महत्त्वही अबाधित ठेवले. त्यावेळी हिंदूंची धार्मिक प्रतीके मुस्लिमांकडून नष्ट केली जात होती. त्यांनी हिंदूंना डोक्यावरील केसांच्या शेंड्या (शिखासूत्र) कापण्यापासून वाचवले आणि त्यांना उदरनिर्वाह देऊ केला. त्यांनी हिंदूंना त्यांच्या गळ्यात पवित्र जानवे (यज्ञोपवीत) आणि तुळशीमाळ घालण्याचे संरक्षण दिले. त्यांनी दिल्लीच्या पातशहाचे कंबरडे मोडले आणि त्याच्या सर्व शत्रूंचा नाश केला. राजांच्या हातात देवतुल्य वरदहस्ताची शक्ती होती, अर्थात जो कोणी त्यांच्या आश्रयास गेला, त्याला त्यांनी आपल्या पंखांखाली घेतले. या महान राजाने हिंदू राजांच्या राज्याच्या सीमांचे रक्षण केले आणि आपल्या तळपत्या तलवारीच्या बळावर देवस्थानांचे रक्षण केले. इतकेच नव्हे तर शूरवीर शिवाजी राजाने प्रत्येक घराघरात स्वधर्म (हिंदू धर्म) अबाधित राखला. 

उत्तरार्धात कविराज भूषण यांच्या अशाच काही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत अशा काव्य रचना बघू या.  

– क्रमशः भाग पहिला (पूर्वार्ध)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रामदासी झरे…”  – लेखक – श्री धनंजय केळकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “रामदासी झरे”  – लेखक – श्री धनंजय केळकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

सगळ्यांना दासबोध आणि मनाच्या श्लोकांपुरतेच माहीत आहेत समर्थ रामदास !

पण त्यांची स्वराज्यासाठीची कामगिरी फारशी कोणाला माहीत नाही.

संन्यासी, एक भगवी छाटी, कमंडलू, काखेतील कुबडी आणि समर्थ लंगोट, एव्हढीच त्यांची संपत्ती..

स्नानाचे काय? झोपायचे कुठे? समर्थांनी हा प्रश्न सोडवतानाच महाराजांसाठी सैन्य तयार केले.

समर्थांनी गावोगाव मारुती मंदिरांची स्थापना केली. यातील बहुतेक मंदिरांमध्ये तळघरे आणि भुयारे आहेत. नाथमाधवांच्या कादंबऱ्यात याचे वर्णन आढळते.

प्रत्येक मंदिराला लागूनच एक व्यायाम शाळा. हनुमानाची उपासना म्हणजेच बलदंड शरीर, हा मंत्र त्यांनी महाराष्ट्राला दिला.

गावोगाव तरुण पोरे या आखाड्यात घुमू लागली. दंड बैठका, फरी गदगा, ढाल तलवार शिकू लागली. महाराजांचा मावळा बलदंड आणि शस्त्रनिपुण होत होता.

पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत धावत जायचे आणि नंतर रात्रभर लढत गड गाठायचा. पावन खिंड लढवायची. ही काटकता आणि ताकद याच आखाड्यात तयार झाली.

बजरंगबलीकी जय!

रामदासी झरे हा त्यांचा दुसरा अद्भुत खेळ.

आम्ही गोव्याला जात असताना प्रधानगुरुजींनी गाडी थांबवायला सांगितली. गाडी बंद करून सगळ्यांना बाजूच्या झाडीच्या बाजूला उभे केले, आणि विचारले, “काही ऐकू येतंय का?”

गाडीच्या आवाजानी आमचे कान बधीर झाले असावेत. काहीच ऐकू येईना. ते आम्हाला त्या झुडपांच्या मागे घेऊन गेले.

अहो आश्चर्यम्….

हायवेवरील त्या झुडुपांच्या मागे एक दोन फूट रुंदीचा खळाळून वाहणारा स्वच्छ पाण्याचा झरा होता.

हाच तो रामदासी झरा. सगळ्या महामार्गांवर दर बारा कोसांवर समर्थांनी असे झरे शोधले आहेत, तयार केले आहेत. संन्याशांना स्नानसंध्या करायला आणि राजांच्या फौजेला कूच करत असताना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारे, बारमाही खळाळून वाहणारे रामदासी झरे. आजही हे महाराष्ट्राचे वैभव खळाळून वहात आहे.

माहितगाराशिवाय कळणार नाहीत, असे रामदासी झरे. बहिर्जीच्या हेरखात्याला, हे माहीत असत. मारुती मंदिरातील तळघरे आणि भुयारे त्यांच्या कामाला यायची. रामदासी झरे सैन्याला पाणी पुरवायचे.

राजे स्वराज्य उभारणी करत होते आणि समर्थ सैन्य तयार करत होते. दास मारुतीची उपासना करणारे मावळेच, राजांसाठी जीव देणारे जिवलग असे तयार झाले.

समर्थांच्या कुबडीत गुप्ती असायची असे म्हणतात. तेव्हापासून लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर, डॉक्टर हेडगेवार, योगी अरबिंदो घोष, सेनापती बापट, नेताजी सुभाषचंद्र घोष आदि सगळे राजकीय नेते हे राजकारण, क्रांतीकार्य आणि योग, अध्यात्म यात सहज संचार करणारे होते. संन्याशाचा संसार म्हणजेच जगाचा संसार, ही उक्ती या सगळ्यांनी सार्थ केली.

महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची ही पुढील साखळी. आपणही त्याच मालिकेतील लढवय्ये बनूयात..

भारतमाताकी जय.. !!

लेखक : श्री धनंजय केळकर

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रांगोळीचा किस्सा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “रांगोळीचा किस्सा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आजेसासूबाई आंघोळ उरकून, बाहेर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढत होत्या. अनेक ठिपक्यांच्या रांगा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या बोटांमधून भरभर पडणारी, न तुटणारी, ओल्या तांदूळ पिठाची ओळ. बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अनेक पाकळ्यांचं कमळ तयार झालं, तेही ओळ कुठेही न तुटता.

थोड्या वेळाने बेल वाजली. मी दार उघडलं. रोजचा भाजीवाला आला होता. त्याने आपली टोपली खाली ठेवली तर त्याचा तोल थोडा सुटून, रांगोळीच्या एका पाकळीवर ती पाटी घासली. अजून तांदूळ पिठाच्या ओळी सुकल्या नव्हत्या. त्यामुळे ती पाकळी साहजिकच विस्कटली. आजींनी इतका वेळ खपून काढलेली रांगोळी जेमतेम पंधरा मिनिटंसुद्धा टिकली नव्हती. मला खूप वाईट वाटलं.

मी त्या भाजीवाल्यावर ओरडणार, इतक्यात आजीच बाहेर आल्या.

त्यांनी भाजी घेतली, पैसे दिले आणि त्या परत आत निघून गेल्या. विस्कटलेल्या रांगोळीकडे त्यांनी पाहिलं, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मात्र खूप वेळ हळहळत होते.

नंतर दुपारी जरा निवांत बसलो असता, मी आजींना विचारलं, इतकी खपून काढलेली सुरेख रांगोळी पंधरा मिनिटंसुद्धा टिकली नाही. तुम्हाला वाईट नाही वाटलं ?

त्या हसल्या. म्हणाल्या, रांगोळी काढीत होते तोवर ती माझी होती. ज्या क्षणी रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी ती बघणाऱ्याची झाली. रांगोळी काढताना ज्या आनंदाची अनुभूती मला झाली होती, त्याच आनंदाची अनुभूती तुला रांगोळी बघताना झाली ना ? मग झाला रांगोळीचा उद्देश सफल !

इतकी मन लावून काढलेली सुरेख रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी त्यांनी त्या रांगोळीतून स्वतःच्या भावना अलगद हलक्या हाताने सोडवून घेतल्या होत्या.

रांगोळीचा उद्देशच हा असतो. जीवन कितीही सुंदर असलं, तरी ते रांगोळीसारखंच क्षणभंगुर आहे, हे स्वतःला दररोज बजावून सांगण्याचा रांगोळी हा एक सुंदर मार्ग.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चहाबोध… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चहाबोध... ? सौ शालिनी जोशी 

प्रभाते मनी चहा चिंतीत जावा l

पुढे मुखे तोचि प्राशन करावा l

चहापान हे थोर सांडू नये रे l

करी तोचि तो सदा धन्य हो रे ll १ ।। 

*

जो आलंयुक्त चहापंथेची जाये l

तो तरतरीत तत्काळ होये l

म्हणोनि चहाचा आळस नको रे l

अतीआदरे सेवना योग्य तो रे Il २ ll

*

सदा सर्वदा प्रिती चहाची धरावी l

सर्व निराशा चहाकपी बुडवावी l

परी अतीचहा सर्व दु:ख करी रे l

विवेके मंत्र हा विसरू नये रे ll3ll

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares