ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
वसंत दिगंबर कुलकर्णी
वसंत दिगंबर कुलकर्णी (23 ऑगस्ट 1923 – 25 ऑगस्ट 2001) हे नामांकित समीक्षक होते.
एस.पी. महाविद्यालयातून ते एम.ए.झाले.
त्यांनी ‘आलोचना’ मासिकातून ‘संगीत सौभद्र’ विषयी लिहिलेल्या लेखमालेचे पुस्तक झाले. त्यावर त्यांनी पीएच.डी. मिळवली.
सुरुवातीला ते माध्यमिक शाळांत अध्यापन करत.पुढे एस.पी.महाविद्यालयात ते मराठी-संस्कृतचे प्राध्यापक होते. नंतर पार्ले महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले. पुढे ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रथम प्रपाठक, नंतर प्राध्यापक व शेवटी विभागप्रमुख झाले.
महानुभाव वाङ्मय, संतसाहित्य, समीक्षा, संशोधन, नाटक व रंगभूमी, नियतकालिकांचा अभ्यास, पाश्चात्य साहित्य सिद्धांत या विविध विषयांत त्यांना रस होता.
त्यांची दृष्टी उदार व मोकळी होती. साहित्यकृतीचे रचनासौंदर्य व त्यातून होणारे जीवनसमस्यांचे सूक्ष्म भान त्यांना अपेक्षित असे. वाचनाने वाचकाच्या जाणिवा विस्तारल्या जाव्यात व त्यामुळे त्यांना मानवी जीवन समजायला मदत व्हावी, अशी त्यांची धारणा होती.
कुलकर्णी अभ्यासू वक्ते होते. विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रंथपुरस्कार समिती वगैरेंवरही त्यांची नेमणूक झाली होती.
मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय वगैरेंशीही त्यांचा निकटचा संबंध होता.
‘गॅलिलिओ’, ‘लीळाचरित्र :एक अभ्यास’, ‘संगीत सौभद्र: घटना आणि स्वरूप’, ‘ज्ञानेश्वर :काव्य आणि काव्यविचार’, ‘ संत सारस्वत: आकलन आणि आस्वाद’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ इत्यादी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
‘मराठी कविता :प्राचीन कालखंड’, ‘एकांकिका वाटचाल’, ‘अप्रकाशित तांबे’ वगैरे इतर लेखकाच्या सहकार्याने केलेली संपादनेही त्यांच्या नावावर आहेत.
त्यांनी ‘उत्तम’ या दिवाळी वार्षिकाचे 1969, ’70, ’71मध्ये वा. रा ढवळे यांच्याबरोबर संपादन केले होते.
साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दोन साहित्यिकांना, कुलकर्णींच्या स्मरणार्थ दरवर्षी एक स्मृतिगौरव पुरस्कार देण्यात येतो.
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विवेक, महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २४ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
रामकृष्ण गोपाळ भांडारकर (6जुलै 1837 – 24 ऑगस्ट 1925)
रामकृष्ण भांडारकर हे संस्कृत पंडीत, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाज सुधारक आणि प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते.
त्यांचा जन्म मालवण इथे झाला. शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई इथे झाले. नंतर त्यांनी मुंबईतील एल्फिस्टन कॉलेज, पुण्यातील डेक्कन कॉलेज या ठिकाणी संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1893 ते 1895, ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
ते प्राच्य विद्येचे अभ्यासक होते. प्रकृत भाषा, ब्राम्ही, खारोष्टी या लिप्यांचे ज्ञान मिळवून त्यांनी भारताच्या इतिहासाचे संशोधन केले. भारतातील लुप्तप्राय इतिहासाची पुनर्मांडणी करून त्यांनी तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन ते प्रकाशित केले. पुरातत्वशास्त्राचा इतिहास अभ्यासणारे संशोधक आजही त्यांचे ग्रंथ प्रमाण मानतात.
1883 मधे झालेल्या व्हिएन्नामधील प्राच्यविद्या परिषदेला ते हजर होते. त्यांचा अभ्यासाचा आवाका बघून त्यावेळी तेथील सरकार व जगभरचे विद्वान आचंबीत झाले होते.
पहिल्या प्राच्यविद्या परिषदेत भांडारकर यांनी नाशिकजवळील लेण्यांमधल्या शिलालेखाचा अर्थ उलगडून सांगितला. यामुळे प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली. त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले. त्यांनी प्राच्यविद्याविषयक विपुल लेखन केले. त्यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने 1917 साली पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, ही संस्था स्थापन केली. भांडारकर इंस्टिट्यूट म्हणून ही संस्था आजही पुण्यात कार्यरत आहे.
भांडारकरांची ग्रंथसंपदा –
1.भारताचा पुरातत्व इतिहास – पाच खंड
२.मुंबई निर्देशिकेसाठी (गॅझेटियर) दक्षिण भारताचा इतिहास
३.भावाभूतीचा ‘मालती माधव’वर टीका
४. संस्कृत व्याकरण भाग 1 व 2
आज भांडारकर यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांच्या विद्वत्तेला शतश: प्रणाम.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २३ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
आज प्रा. डॉ. आशा दस्तगीर आपराद यांचा स्मृतिदिन. ( मृत्यू दि. २३/८/२०१९ ) .
हिन्दी भाषेच्या प्राध्यापक असणाऱ्या डॉ. दस्तगीर यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि लेखिका अशी ठळक ओळख होती. मुस्लिम समाज आणि त्यातही महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विपुल लेखन केलेले होते. महिला दक्षता समितीबरोबर त्यांनी केलेले कार्य फार महत्वाचे मानले जाते. त्याचबरोबर विविध सामाजिक चळवळींशीही त्यांचा सक्रिय संबंध होता.
अत्यंत धाडसाने त्यांनी लिहिलेले त्यांचे आत्मकथन म्हणजे “ भोगले जे दुःख त्याला —” हे त्यांचे आत्मचरित्र, जे खूप गाजले. सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांच्या वाट्याला येणारे आयुष्य त्यांनी यात अतिशय ओघवत्या भाषेत आणि अत्यंत संवेदनशीलतेने आत्मकहाणीच्या रूपात मांडले आहे. या पुस्तकाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यातील काही पुरस्कार असे —
१) उत्कृष्ट साहित्यकृतीबद्दल देण्यात येणारा “ भैरुरतन दमाणी पुरस्कार.
२) महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांच्यातर्फे पुरस्कार.
३) “ उत्कृष्ट मराठी वाङ्मय “ म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्य पुरस्कार.
या आत्मकहाणीचे “ दर्द जो सहा मैंने —” या नावाने हिंदीतही अनुवाद केला गेला आहे.
मृत्यूसमयी डॉ. दस्तगीर यांचे वय ६७ वर्षांचे होते. त्यांना आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
मराठी लेखक, ग्रंथकार, आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचाही आज स्मृतिदिन.( २८/१२/१८९७ – २३/८/१९७४ ) .
डॉ. शंकर पेंडसे यांनी अतिशय कठीण प्रसंगांना तोंड देत, एम.ए. ( संस्कृत आणि मराठी –नागपूर विद्यापीठ ) तसेच पंजाब विद्यापीठाची “ शास्त्री “ ही पदवी मिळवली होती. तसेच “ Master of Oriental Learning “ ही पदवीही मिळवली होती. “ ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान “ या विषयावर प्रबंध लिहून पी.एच.डी. मिळवली होती. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रबंध पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला.
त्यांनी चाळीस वर्षे नागपूर येथील हिस्लॉप महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. लो. टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या तात्विक लेखनाला सुरुवात झाली. प्राचीन मराठी साहित्य, मराठी संतांचे साहित्य, संस्कृत साहित्य, आणि वेदोपनिषदे हे त्यांच्या अभ्यासाचे खास विषय होते. या विषयांवरील त्यांचे ग्रंथ पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील असेच आहेत. १९१९ साली ‘गीतेतील कर्मयोग‘ हा प्रदीर्घ निबंध त्यांनी लिहिला. संत रामदास यांचे चरित्र आणि त्यांचे अतिशय मोलाचे कार्य यांची तपशीलवार माहिती देणारा “राजगुरू रामदास“ हा त्यांचा ग्रंथ १९७४ मध्ये प्रसिद्ध झाला. म्हणजे सतत ५५ वर्षे त्यांनी तात्विक विषयांवर मौलिक लेखन केले. संस्कृत ग्रंथांमधील अत्यंत अवघड प्रकरणे त्यांनी कमालीची सुबोध करून मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली. “ बृहत भाष्य “ हा त्यांचा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचे “ अमर भूषण “ आहे असे मानले जाते.
संत स्वामी स्वरूपानंद त्यांच्याकडे येणाऱ्या आध्यात्मिक साधकांना मार्गदर्शन करतांना आवर्जून असे सांगत असत की, “ डॉ. सोनोपंत दांडेकर, डॉ. शं. दा. पेंडसे, आणि डॉ. प्र. न. जोशी, या फक्त तीन ग्रंथकारांचे लिखाण वाचा, त्याने चित्ताला स्थिरता आणि विचारांना दृढता येईल “ – हा या तिघांचाही खरोखरच मोठा सन्मान मानायला हवा.
डॉ. पेंडसे यांच्या सर्वच ग्रंथांमधून त्यांची अफाट विद्वत्ता, प्रचंड व्यासंग, आणि त्याचबरोबर त्यांची रसिकता यांचा प्रत्यय येतो.
त्यांचे प्रकाशित साहित्य :-
१) महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास
२) ज्ञानदेव आणि नामदेव
३) वैदिक वाङ्मयातील भागवत धर्माचा विकास
४) पौराणिक भागवत धर्म
५) भागवतोत्तम संत श्री एकनाथ
६) साक्षात्कारी संत तुकाराम
७) राजगुरू रामदास
त्यांनी केलेले बरेच स्फुटलेखनही प्रसिद्ध झालेले होते, जसे की —- ‘ कर्मयोग की कर्मसंन्यास ‘, ‘ टिळकांची धर्मविषयक मते ‘, ‘ शिवकालीन संस्कृती व धर्म ‘, मराठी राजकारणाचा आत्मा ‘, ‘ विद्यापीठे व मातृभाषा ‘.
अनेक परिसंवाद व चर्चासत्रे यातही त्यांच्या भाषणांचा प्रचंड प्रभाव पडत असे.
१९५३ साली मोझरी येथे झालेल्या साहित्य-संमेलनाचे, आणि १९५५ साली पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले होते.
विसाव्या शतकातील ऋषितुल्य साहित्यिक म्हणून गौरविले गेलेले डॉ. शंकर पेंडसे यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २१ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
काका कालेलकर
दत्तात्रेय बाळकृष्ण ऊर्फ काका कालेलकर (1 डिसेंबर 1885 – 21ऑगस्ट 1981) हे पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ व स्वातंत्र्यसैनिक होते.
त्यांचा जन्म साताऱ्यात झाला. ते मूळ कारवारचे. त्यांची मातृभाषा कोंकणी व मराठी. बरीच वर्षे गुजरातमध्ये राहिल्यामुळे त्यांनी गुजराती भाषा शिकून त्यात प्रभुत्व मिळवले.ते गुजरातीतील नामवंत लेखक होते.
गांधीजींच्या प्रभावामुळे काका साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. सर्वोदय पत्रिकेचे ते संपादक होते. अहमदाबादमध्ये गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
काका राष्ट्रभाषा समितीचे सदस्य होते. हिंदीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले.
1952 ते 1964 या काळात ते राज्यसभा सदस्य होते.
साहित्य अकॅडमीत काका गुजराती भाषेचे प्रतिनिधी होते.
सोप्या पण ओजस्वी भाषेत विचारपूर्ण निबंध आणि विविध विषयांवरील तर्कशुद्ध भाष्य हे काकांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य होते.
काकांनी गुजराती, मराठी, हिंदी भाषांत अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी काही:
‘प्रोफाइल्स इन इन्स्पिरेशन’, ‘महात्मा गांधीज गॉस्पेल ऑफ स्वदेशी’ इत्यादी इंग्रजी पुस्तके , ‘स्मरणयात्रा’, ‘उत्तरेकडील भिंती’ व त्याचा इंग्रजी अनुवाद ‘इव्हन बिहाईंड द बार्स’, ‘लाटांचे तांडव’, ‘हिमालयातील प्रवास’ वगैरे मराठी पुस्तके, ‘जीवननो आनंद’, ‘मारा संस्मरणो’ इत्यादी गुजराती पुस्तके.
काकांना 1965 मध्ये त्यांच्या ‘जीवन व्यवस्था’ या गुजराती लेखसंग्रहासाठी साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाले.
1971 मध्ये त्यांना साहित्य अकॅडमीची फेलोशिप मिळाली.
1964मध्ये सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’प्रदान केले.
1985 मध्ये काकांच्या गौरवार्थ स्टॅम्प काढण्यात आला.
☆☆☆☆
श्री. पु. भागवत
श्री. पु. भागवत (27 डिसेंबर 1923 – 21 ऑगस्ट 2007) हे साक्षेपी संपादक व प्रकाशक होते.
त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले होते.
‘मौज’ (साप्ताहिक व वार्षिक) व ‘सत्यकथा’ मासिकाच्या माध्यमातून 40-50 वर्षे त्यांनी संपादक व प्रकाशक म्हणून मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजवला.त्यातील साहित्याची निवड तावून सुलाखून केलेली असे.
प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती वगैरे माध्यमांतून मराठी प्रकाशकांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
‘साहित्याची भूमी’, ‘मराठीतील समीक्षालेखांचा संग्रह’, ‘साहित्य :अध्यापन आणि प्रकार’ ही त्यांची गाजलेली पुस्तके.
महाबळेश्वर येथे 31 जानेवारी 1987 रोजी झालेल्या तिसऱ्या मराठी प्रकाशक संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार देते.
काका कालेलकर व श्री. पु. भागवत यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली.
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २० ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
नरेंद्र दाभोळकर (१ नोहेंबर १९४५ – २० ऑगस्ट २०१३ )
नरेंद्र दाभोळकर हे बुद्धिजीवी, विज्ञानवादी, सामाजिक सुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला आयुष्यभर त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. १९८९ मधे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समीती ही संस्था त्यांनी स्थापन केली. या समीतीचे ते अध्यक्ष होते. त्यांचे शालेय शिक्षण सातार्यातील न्यू इंगलीश स्कूलमध्ये झाले. मीरज वैद्यकीय कोलेजातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. ते उत्तम कबड्डीपटू होते. कबड्डीवर त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. कबड्डीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना शिवछत्रपती हा पुरस्कारही मिळाला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर सातारा इथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
डिसेंबर १९९८ मधे ते साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते संपादक झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत ते ‘साधना’चे संपादक होते.
समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, टाकाऊ परंपरा नाहीशा व्हाव्या म्हणून त्यांनी आयुष्यभर लढा दिला. अनेक भोंदू बाबांचे पितळ त्यांनी आणि त्यांच्या समीतीने उघडे पाडले. बुवा आणि बाया करत असलेले चमत्कार, हे चमत्कार नसून त्यामागील विज्ञान, त्यांनी व त्यांच्या समीतीने सप्रयोग स्पष्ट केले.
२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर , २ माथेफिरू तरुणांनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला. महाराष्ट्र ‘अंनिस’ लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने दाभोळकरांच्या हत्येचा ‘ रिंगणनाट्याच्या माध्यमातून निषेध केला.
दाभोळकरांचे साहित्य
१. अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, २. ऐसे कैसे झाले भोंदू, ३. तिमिरातून तेजाकडे, ४. प्रश्न तुमचे उत्तर दाभोळकरांचे, ५. ब्रम्ह आणि निरास, ६. माती भानामती, ७. विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी, ८. श्रद्धा अंधश्रद्धा इ. त्यांची महत्वाची पुस्तके आहेत.
दाभोळकरांच्या संस्था –
१. अंधश्रद्धा निर्मूलन समीती २. परिवर्तन
दाभोळकरांना मिळालेले पुरस्कार –
१. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन यांच्यातर्फे १ला समाज गौरव पुरस्कार ‘‘अंनिस’ (अंधश्रद्धा निर्मूलन समीती) ला दिला गेला. २. समाज गौरव पुरस्कार- रोटरी क्लब ३. दादासाहेब साखळकर पुरस्कार, ४.पुणे विद्यापीठाचा साधना जीवन गौरव पुरस्कार ५. भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (मरणोत्तर )
दाभोळकरांच्या नावाचे पुरस्कार –
न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशन यांच्यातर्फे २०१३पासून सामाजिक कार्य करणार्या व्यक्तीला, डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार दिला जातो.
‘दाभोळकरांचे भूत’ या नावाने श्याम पेठकर यांनी नाटक लिहिले. हरीष इथापे यांनी ते दिग्दर्शित केले. समीर पंडीत यांनी नाटकाची निर्मीती केली आणि वैदर्भीय कलावंतांनी ते रंगभूमीवर आणले.
आज नरेंद्र दाभोळकरयांचास्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांच्या सामाजिक कार्याला आणि त्यांच्या लेखनाला शतश: वंदन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
जयंत साळगावकर – (१फेब्रुवारी १९२३ – २० ऑगस्ट २०१३)
जयंत साळगावकर यांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. त्यांनी पंचांगआणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड निर्माण केला. कालनिर्णय ही दिनदर्शिका ९ भाषातून प्रकाशित होते. केवळ मराठी भाषेत कालनिर्णयाचा खप ४८ लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३पासून प्रसिद्ध होत आहे. कालनिर्णयचे ते संस्थापक, संपादक होते. दिनदर्शिकेचा वरच्या पानावर तारीख, तिथी, वार, त्या दिवसाचा सण-वार, विशेष माहिती प्रसिद्ध होते आणि मागील पानावर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी माहिती दिलेली असते.
साळगावकरांनी ज्योतिषशस्त्र आणि धर्मशास्त्र यावर विपूल लेखन करून लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न केले. सामाजिक आणि संस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत.
जयंत साळगावकर यांचे सार्वजनिक क्षेत्रातील काम-
महाराष्ट्र सार्वजनिक गणशोत्सव मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांनी अनेक संस्थांचे अध्यक्षपड भूषविले आहे. सिद्धिविनायक मंदिराचे ते माजी ट्रस्टी होते. आयुर्विद्यावर्धिनी या आयुर्वेदिक संशोधन करणार्या ट्रस्टचे ते माजी अध्यक्ष होते. मुंबई मराठी साहित्य संघ या सस्थेचे ते माजी अध्यक्ष होते. सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी या क्षेत्रात महत्वाचे काम करणार्या ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष होते. श्रीगणेशविद्यानिधी (पुणे) या शिक्षण क्षेत्रात कांम करणार्या ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. इतिहास संशोधन मंडळाचेही ते अध्यक्ष होते.
मुंबई येथे झालेल्या ७४व्या नाटयसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते, तर १९८३ साली झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष समेलनाचे ते अध्यक्ष होते.
जयंत साळगावकर यांची ग्रंथसंपदा
१. सुंदरमठ ( समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावरील कादंबरी)
२. देवा तूची गणेशु (गणेश दैवताचा इतिहास, स्वरूप आणि समजजीवनवर त्याचा प्रभाव याचा अभ्यासपूर्ण आढावा)
३. विविध सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक विषयावर २००० हून अधीक लेख प्रसिद्ध
४. देवाचिये द्वारी – धार्मिक, परमार्थिक अशा स्वरूपाचे लेखन. ३०९ लेखांचा संग्रह प्रसिद्ध
५. दुर्वांची जुडी – देवाचिये द्वारीमधील श्रीगणेशवरील लेखांचे संकलन
जयंत साळगावकर यांना मिळालेले पुरस्कार –
संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी ‘ज्योतीर्भास्कर’ ही पदवी दिली.
ज्योतिषालंकार – मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे सनमानदर्शक पदवी
ज्योतीर्मार्तंड – पुण्यातील ज्योतिष संमेलनात दिलेली पदवी
महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने ‘विद्यावाचस्पती (डी.लिट.) ही बहुमानाची पदवी दिली.
अशा विद्वान ‘विद्यावाचस्पतीला त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शतश: प्रणाम
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(श्रीरामरक्षास्तोत्रम् में मेरा अटूट विश्वास है। बुधकौशिक ऋषि द्वारा अनुष्टुप छंद में रचित यह स्तोत्र सकारात्मक ऊर्जा का साकार शब्दब्रह्म है। इसकी सकारात्मक ऊर्जा आप स्वयं भी अनुभव कर सकते हैं। वर्ष 2020 अप्रैल- मई का समय भारत में कोविड-19 का शुरुआती समय था। विश्व पहली बार एक अनजान महामारी से जूझ रहा था। श्रीरामरक्षास्तोत्रम् का 35वाँ श्लोक है,
हमें आपदा के विरुद्ध लड़ना था, अत: इस आध्यात्मिक आंदोलन का नामकरण आपदां अपहर्तारं किया एवं सभी सम्माननीय सदस्यों के सामूहिक प्रयासों से इसे 19 मई 2020 को प्रारम्भ किया गया। )
– संजय भारद्वाज
विगत आपदा के समय सभी लोग किसी न किसी रूप में प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से मानवता के लिए अपना योगदान देने का प्रयास कर रहे थे । सबकी अपनी-अपनी सीमायें हैं। कोई व्यक्तिगत रूप से, कोई चिकित्सकीय सहायता के रूप से तो कोई आर्थिक सहायता के रूप से अपना योगदान दे रहे थे।
विश्व में कुछ लोग सम्पूर्ण मानवता के लिए अपना अभूतपूर्व आध्यात्मिक योगदान दे रहे हैं। उनका मानना है कि हमारी वैदिक परंपरा के अनुसार यदि हम सामूहिक रूप से प्रार्थना, श्लोकों का उच्चारण करें तो समस्त भूमण्डल में एक सकारात्मक ऊर्जा का संचरण होता है और “वसुधैव कुटुम्बकम” की अवधारणाना के अंतर्गत समस्त मानवता को इसका सकारात्मक लाभ अवश्य मिलता है। ऐसे ही एक आध्यात्मिक अभियान “आपदां अपहर्तारं” के प्रणेताद्वय श्री संजय भारद्वाज जी एवं श्रीमति सुधा भारद्वाज जी के हम हृदय से आभारी हैं, जिन्होंने मानवता के लिए एक सकारात्मक पहल करने का सफल प्रयास किया।
आध्यात्मिक अभियान “आपदां अपहर्तारं” के अंतर्गत इस समूह के सदस्य विभिन्न स्तोत्रों और मंत्रों के पाठ द्वारा आध्यात्मिक साधना का प्रयास करते हैं। हम प्रतिदिन श्री संजय भारद्वाज जी के ई-अभिव्यक्ति के दैनिक स्तम्भ (मनन चिंतन)/साप्ताहिक स्तम्भ (संजय उवाच) के प्रारम्भ में ‘आज की साधना’ के अंतर्गत स्तोत्र /मंत्र पाठ का स्मरण निम्नानुसार कराने का प्रयास करेंगे।
☆ आपदां अपहर्तारं ☆
आज की साधना – माधव साधना (11 दिवसीय यह साधना कल गुरुवार दि. 18 अगस्त से रविवार 28 अगस्त तक)
इस साधना के लिए मंत्र है –
ॐ नमो भगवते वासुदेवाय
(आप जितनी माला जप अपनी सुविधानुसार कर सकते हैं यह आप पर निर्भर करता है)
– संजय भारद्वाज
आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से मोबाइल– 9890122603 / संजयउवाच@डाटामेल.भारत / [email protected] पर संपर्क कर सकते हैं।
आपका अभिन्न
हेमन्त बावनकर,
पुणे (महाराष्ट्र) / बेम्बर्ग (जर्मनी)
19 अगस्त 2022
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १८ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
नारायण धारप:
नारायण धारप हे मराठीतील ख्यातनाम कथालेखक होते. त्यांच्या कथा या प्रामुख्याने भयकथा,गूढकथा व विज्ञानकथा असत.’समर्थ’ हे त्यांचे काल्पनिक पात्र अत्यंत लोकप्रिय झाले होते.त्यांनी नाट्य लेखनही केले होते.
धारप यांचे काही साहित्य:
विज्ञानकथा: अशी रत्ने मिळवीन, अशी ही एक सावित्री, कांताचा मनोरा, चक्रधर, दुहेरी धार, नेणचिम, पारंब्यांचे जग, मृत्यूच्या सीमेवर इत्यादी
भगत कथा: काळी जोगीण, सैतान
समर्थ कथा: मृत्यूजाल, मृत्यूद्वार, विषारी वर्ष, शक्तीदेवी, समर्थ, समर्थांचा प्रहार, समर्थांचे पुनरागमन, समर्थांची शक्ती, समर्थाचिया सेवका इत्यादी
नाटक: चोवीस तास.
श्री.नारायण धारप यांचे 18/8/2008 रोजी निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन आहे.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
प्रभाकर लक्ष्मण मयेकर
प्र.ल.मयेकर हे प्रामुख्याने नाटककार म्हणून ओळखले जातात.मुंबईत बेस्ट मध्ये नोकरीत असल्यापासून व नंतर रत्नागिरीत स्थायिक झाल्यावरही त्यांनी नाट्यलेखन केले.सुरूवातीला सत्यकथेत आलेल्या मसीहा या कथेचे त्यांनी नाट्यरूपांतर केले.नंतर हौशी रंगभूमी व व्यावसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाट्यलेखन केले.मोहन वाघ यांच्या चंद्रलेखा व मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली या संस्थांकडून त्यांची नाटके सादर झाली.मालवणी भाषेतील त्यांची नाटके भद्रकाली ने सादर केली. कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यमय, थरारक अशा सर्व प्रकाचे नाट्यलेखन त्यांनी केले आहे.तसेच एकांकिका, पटकथालेखन, मालिका लेखन व कथा लेखन ही केले आहे. त्यापैकी काही याप्रमाणे:
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
नारायण सुर्वे (१५ ऑक्टोबर १९२६- १६ ऑगस्ट २०१०)
नारायण गंगाराम सुर्वे हे मराठीतले एक नामवंत आणि लौकिकसंपन्न कवी. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९८ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता. त्यांनी समाज परिवर्तनाचा ध्यास घेतला होता आणि हाच आशय त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केला आहे.
१९२६- २७ मधे गंगाराम सुर्वे यांना कापड गिरणीसमोर एक लहान बाळ सापडले. निपुत्रिक असलेल्या गंगाराम आणि काशीबाईंनी हे बाळ आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. त्याला नारायण हे नाव दिले. हे बाळ म्हणजेच पुढच्या काळात सुप्रसिद्ध झालेले कवी नारायण सुर्वे. त्यांनी नारायणला शाळेत घातले. चौथीपर्यंतचे शिक्षण दिले. पुढे ते निवृत्त झाले आणि कोकणातल्या आपल्या गावी निघून गेले. नारायण मुंबईतच राहिला. पुढील शिक्षण त्यांनी स्वत:च्या हिमतीवर केले.
पुढच्या काळात जीवनाशी संघर्ष करताना त्यांनी घरगडी, होटेलमधला पोर्या:, कुणाचं कुत्रं, कुणाचं मूल सांभाळणं, हरकाम्या, दूध टाकणार्याग पोर्याध, पत्रे उचलणे, हमाली अशी अनेक कामे केली. हा त्यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर असा होता.
१९५८मधे ‘नवयुग’ मासिकात त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. ‘डोंगरी शेत माझं…’ हे त्यांचं गीत अतिशय गाजलं. १९६२साली त्यांचा पाहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर एका पाठोपाठ एक त्यांचे कविता संग्रह येत राहिले. ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’, ‘पुन्हा एकदा कविता’, ‘सनद’ हे त्यांचे कविता संग्रह वाचकप्रिय झाले. सुर्वे यांचे पहिले वहिले काव्यवाचन झाले, ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील मडगावच्या साहित्य संमेलनात. त्यानंतर ते प्रत्येक काव्यमैफलीत आपल्या खडया सुराने रंग भरत राहिले. ‘मास्तर तुमचं नाव लिवा’, ‘असं पत्रात लिवा’, ‘मनीऑर्डर’, मुंबईची लावणी’, ‘गिरणीची लावणी’ या त्यांच्या कविता विशेष रसिकप्रिय झाल्या.
नारायण सुर्वे यांच्या कविता त्यांनी अनुभवलेल्या कठोर वास्तवाचे , त्यांच्या जीवन संघर्षाचे दर्शन घडवणार्यास आहेत. कामगार, हातावर पोट असलेल्यांचे जग त्यांनी शब्दबद्ध केले आहे. मराठी कवितेला त्यांनी सामाजिक बांधीलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला.
नारायण सुर्वे यांच्यावरील पुस्तके
१. नारायण सुर्वे यांच्या पत्नीने ‘मास्तराची सावली’ या आत्मकथनात त्यांच्या आठवणी दिलेल्या आहेत.
२. सुर्वे यांच्या काव्याची इहवादी समीक्षा ( डॉ. श्रीपाल सबनीस)
आज नारायण सुर्वे यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त या थोर कर्मयोग्याला आणि त्याच्या प्रतिभेला शतश: वंदन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १४ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
गंगाधर नारायण जोगळेकर:
गं.ना.जोगळेकर या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ लेखक हे भाषाशास्त्रज्ञ व समीक्षकही होते.त्यांचा जन्म जमखंडी येथे झाला.मॅट्रीक पर्यंत तिथे शिक्षण पूर्ण करून पुढचे पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी सातारा व सांगली येथे पूर्ण केले.त्यानंतर पुणे विद्यापीठात एम्.ए.केले.पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात ते मराठी विभाग प्रमुख होते व त्या महाविद्यालयाचे प्राचार्यही होते.काही काळ त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महविद्यालयात मराठी अध्यापनाचे काम केले.महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे या संस्थेशी सुमारे तीस वर्षे ते निगडीत होते.या संस्थेचे ते सहा वर्षे कार्याध्यक्ष होते.
सुरुवातीला त्यांनी विडंबनात्मक काव्य लेखन केले.परंतु पुढे त्यांचे लेखन हे भाषाशास्त्र व समीक्षा याविषयीच होते.
त्यांची ग्रंथसंपदा:
महाराष्ट्र आणि मराठी भाषा
अभिनव भाषाविज्ञान.
मुद्रा उपचार पद्धती.
मराठी वाड्मयाचा अभिनव इतिहास.
मराठी टीकाकार व साहित्य समीक्षा स्वरूप व विकास या पुस्तकांसाठी त्यांनी सहलेखन केले.त्यांचे ‘मराठी भाषेचे ठळक विशेष’ हे पुस्तक मुक्त विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात आले.
श्री.जोगळेकर यांचे 2007 मध्ये निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.
श्री.जोगळेकर यांना विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :विकिपीडिया, सहपिडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘पद्मिनी’, ‘महाराणी’, ‘मुक्ती’, ‘विषकन्या’ व ‘स्वामिनी’ ही पाच नाटके त्यांनी लिहिली.
‘ठरीव ठशाची गोष्ट’, ‘फुलवा’, ‘पहिला पाऊस’, ‘प्रतारणा’ इत्यादी 11 कथासंग्रह त्यांनी लिहिले.
‘रक्त आणि अश्रू’, ‘विठ्ठला पांडुरंगा’ इत्यादी 14 लेखसंग्रह त्यांनी लिहिले.
त्यांचे ‘प्रथमपुरुषी एकवचनी’ हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.
ते ‘आदेश’ व ‘सावधान’ या नागपूरच्या वृत्तपत्रात स्तंभलेखनही करत असत.
‘रायगडचा राजबंदी’ या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती.
‘अंमलदार’मध्ये त्यांनी छोटीशी भूमिकाही केली होती.
1977मध्ये पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
भाषाप्रभू पु. भा. भावे समिती दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना कै. पु. भा. भावे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करते. 🙏🏻
☆☆☆☆
शांताराम विष्णू आवळसकर
शांताराम विष्णू आवळसकर (9 नोव्हेंबर 1907- 13 ऑगस्ट 1963) हे ऐतिहासिक लेखन करत असत.
त्यांनी ‘रायगडची जीवनकथा’ हे पुस्तक लिहिले.
मराठेकालीन कोकणच्या इतिहासाच्या साधनांचा त्यांनी प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला.
गतेतिहासाचा शोध घेत असताना राजकीय, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक संदर्भ परिश्रमपूर्वक ध्यानात घेत आवळसकरांनी आपली संशोधनदृष्टी सूक्ष्म, चौफेर, व्यापक व विश्लेषक बनवली होती.
‘शिवचरित्र साहित्य खंड 9’, ‘आंग्रेकालीन अष्टागर’, ‘शिवचरित्र साहित्य खंड 10’, ‘ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड 10’, ‘रायगडची जीवनकथा’ वगैरे अनेक ऐतिहासिक पुस्तके त्यांनी लिहिली.
पु. भा. भावे व शांताराम विष्णू आवळसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली. 🙏🏻
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈