मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यक्ती तितक्या प्रकृतीही — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

व्यक्ती तितक्या प्रकृतीही — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

काही वेळा आपल्या बघण्यात येते, लोक तरी किती विविध प्रवृत्तीचे असतात ना. कोणी फक्त भविष्यात जगतात तर कोणी भूतकाळात.

वर्तमानात जगायचे, पण भविष्याची स्वप्ने बघायची,हा तर मानवी स्वभाव आहे. त्यात गैर काहीच नाही पण काही लोक असे बघण्यात येतात जे फक्त आणि फक्त भूतकाळातच रमलेले असतात.

मी डॉक्टर असल्याने आपोआपच माझा समाजाशी जास्त संबंध आला,येत असतोही. निरनिराळ्या वेळी माणसे कशी  वागतात, हेही मला चांगलेच अनुभवाला आलेले आहे.

काहीवेळा आडाखे चुकतात पण आपण बांधलेले अंदाज तंतोतंत खरे आले की मजा वाटते. माझ्या बघण्यात आलेले काही लोक खूप मजेशीर आहेत. 

माझी एक मैत्रीण आहे… ती कधीही भेटली तरी मी – माझे – मला, या पलीकडे जातच नाही. कधीही भेटली की “ अग ना, काय सांगू, आमचे हे ! इतके बिझी असतात.. इथपासून,आमची पिंकी कशी हुशार, हे आख्यान सुरू. लोकांना बोलायला मध्ये जागाच नाही. मग मी नुसती श्रोत्यांची भूमिका घेऊन “ हो का ? वावा, “ इतकेच म्हणू शकते.

दवाखान्यात  अप्पा बोडस यायचे. अतिशय सज्जन साधे मध्यमवर्गीय गृहस्थ. पण सतत भूतकाळातच रमलेले… “ काय सांगू  बाई तुम्हाला.. .काय ते वैभव होते आमचे. मोठा वाडा, पूर्वापार चालत आलेला,रोज १५-२० माणसे असत पंक्तीला. गेले ते दिवस.” .. मग मला विचारायचा मोह अनावर व्हायचा की “ अहो, मग ते राखले का नाही कोणी? तुम्ही का चाळीत रहाताय?” पण मी हे नुसते ऐकून घेते. त्यांचा विरस मी का करू? 

मग आठवतात इंदूबाई. सध्या करतात दहा घरी पोळ्या आणि स्वयंपाकाची कामे. पण आल्या की सुरूच करतात. “ काय सांगू बाई तुम्हाला ? किती श्रीमंत होतो आम्ही. काय सुरेख माझं माहेर. पण ही वेळ आली बघा. तुमच्यासारखी शिकले असते, तर हाती पोळपाट नसता आला.” .. मला हसायला येते. मी त्यांना विचारले, “ अहो,मग तेव्हा का नाही शिकलात?” .. उत्तर असे..  “ तेव्हा कंटाळाच यायचा बघा मग दिली शाळा सोडून.” — आता अशा इंदूताईंचे भविष्य सांगायला ज्योतिषी नको. पण त्या रमतात आपल्याच आठवणीत. माझा दवाखाना हे एक चावडीचे ठिकाण होते लोकांना.

निम्न वस्तीत माझा दवाखाना, त्यामुळे उच्चभ्रू लोकांचे नियम यांना लागू नाहीतच. मी जराशी रिकामी बसलेली दिसले की सरळ येऊन,  आपल्या मनीची उकल करायला सुरुवात.

लता एक कॉलेज कन्यका… बुद्धी अतिशय सामान्य, रूप बेताचेच. माना वेळावत दवाखान्यात यायची.     “ बाई,येरहोष्टेश व्हायला काय करावे लागते हो? “ मी कपाळावर हात मारून घेतला.

“लता, तो शब्द एअरहोस्टेस असा आहे. आणि अगं लता तुझे स्वप्न खूप छान आहे, पण त्याला डिग्री लागते. इंग्लिश लागते उत्तम. तू आधी बी ए तर हो, मग मी सांगते पुढचे.” 

मग कधीतरी यायचे एक कवी… “ बाई वेळ आहे का?” नसून कोणाला सांगते. पेशंट नाहीत हे बघूनच ते आलेले असत. “ बघा किती सुंदर कविता केलीय आत्ताच. तुम्हीच पहिल्या हं ऐकणाऱ्या.” – ती निसर्ग कविता,पाने फुले मुले प्रेम,– असली ती बाल कविता ऐकून मला  भयंकर वैताग यायचा. कवी आणि कविता दोन्हीही बालच..

मग आठवतात काळे आजी. या मात्र इतक्या गोड ना. “ बाई,तुमच्यासाठी ही बघा मी स्वतः पर्स विणली आहे.आवडेल का ?वापराल का? “ किती सुंदर विणायच्या त्या. पुन्हा जराही मी मी नाही. ती माझी पर्स बघून माझ्या बहिणीने त्यांना बारा पर्सेस करायची ऑर्डर दिली आणि नकळत त्यांचा तो छोटासा व्यवसाय सुरू झाला. त्यांना चांगले पैसे मिळायला लागले अगदी सहज. असेही उद्योगी लोक मला भेटले.

असेच मला काळेकाका आठवतात. आले की हातात स्मार्ट फोन आणि फेसबुक उघडून, मला त्या पोस्ट दाखवण्याची हौस ! वर,वावा किती छान म्हणावे ही अपेक्षा. सतत यांच्या पोस्ट्स फेसबुकवर. त्याही जुन्या,अगदी जपून ठेवलेल्या. हे फेसबुक प्रकरण माझ्या आकलनापलीकडले आहे.

— काय  ते  अहो रुपम् अहो ध्वनिम्… आपल्या कविता,आपल्या पाककृती लोक वेड्यासारखे टाकत असतात. बघणारे रिकामटेकडे, तयार असतातच, लाईक्स द्यायला,अंगठे वर करायला. काय हा वेळेचा अपव्यय… 

तर हेही  माझे असेच एक पेशंट !!—  मी  2000 साली गेलो होतो ना चीनला, ते बघा फोटो. ही माझी बायको. बघा,कशी दिसतेय चिनी ड्रेस घालून..  हे आम्ही,आफ्रिकेला गेलो होतो तेव्हाचे फोटो. हा माझा लेख बघा बाई..  २०११  साली आला होता .” —-  सतत जुन्या गोष्टींचा यांना नॉस्टॅल्जिया.  हे जपून तरी किती ठेवतात असले फुटकळ लेख , कोणत्यातरी  सदरात आलेले.  मग त्यांनी केलेल्या परदेशीच्या ट्रिप्स. पुन्हा,मी मी आणि मी… लोकांना काय असणार हो त्यात गम्य. नाईलाज म्हणून देतात आपले  भिडेखातर   लाईक्स. पण लोकांनी कौतुक करावे याची केवढी हो हौस. त्यातूनही  खरोखरच चांगले ध्येय  असणारे, काहीतरी करून दाखवायची जिद्द असणारे लोकही भेटले.

अशीच भेटली अबोली. अतिशय हुशार, गुणी, पण दारिद्र्य पाचवीला पुजलेले. बारावीला उत्तम मार्क्स

आणि आईवडील म्हणाले ‘ बस झालं शिक्षण.आता लग्न करून टाकू तुझं.’ बिचारी आली रडत माझ्याकडे. “ बाई,मला नाही लग्न करायचं इतक्यात. मी काय करू ते सांगा. मला पायावर उभं रहायचं आहे माझ्या.”  मी तिला ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स करायला आवडेल का ते विचारलं. पहिली फी मी भरली तिची. तिने तो कोर्स मन लावून पूर्ण केला. छान मार्क्स मिळवून पास झाली आणि तिला एका चांगल्या ट्रॅव्हल कंपनीत नोकरीही मिळाली. तिच्या ऑफिसमध्ये मी मुद्दाम तिने बोलावले म्हणून भेटायला गेले होते. सुंदर युनिफॉर्म घातलेली अबोली किती छान दिसत होती ना. मला फार कौतुक वाटलं तिचं. असेही जिद्दी लोक भेटले मला माझ्या आयुष्यात.

असाच अभय अगदी गरीब कुटुंबातला. सहज आला होता भेटायला. तेव्हा माझा  मर्चंट नेव्ही मधला भाचा काही कामासाठी दवाखान्यात आला होता. मी अभयची त्याच्याशी ओळख करून दिली. अभय म्हणाला, “ दादा,मला माहिती सांगाल का मर्चंट नेव्हीची. अभय त्याच्या घरी गेला. माझ्या भाच्याने, अभयला सगळी माहिती नीट सांगितली.अभयकडे एवढी फी भरण्याइतके पैसे नव्हते. इतके  पैसे भरण्याची ऐपतच नव्हती त्यांची. पण मग त्याने माझ्या भाच्याच्या सल्ल्याने इंडियन नेव्हीची परीक्षा दिली. तो पास झाला,आणि आज इंडियन नेव्हीमध्ये छान ऑफिसर आहे तो… त्या मुलाने, मानेवर बसलेले दारिद्र्य मोठ्या जिद्दीने झटकून टाकले. आज त्याचा मोठा फ्लॅट,  छान बायको मुले बघून मला अभिमान वाटतो.

— असेही छान जिद्दी लोक मला भेटले आणि नकळत का होईना, हातून त्यांचे भलेही झाले.

तर लोकहो, असे जुन्या वेळेत सतत भूतकाळात गोठलेले राहू नका. इंग्लिशमध्ये छान शब्द आहे,

‘फ्रोझन  इन  टाईम.’  जुन्या स्मृती खूप रम्य असतात हे मान्य. पण त्या तुमच्या पुरत्याच ठेवा, नाही तर हसू होते  त्याचे. आपला आनंद आपल्या पुरताच असतो… असावा. लोकांना त्यात अजिबात रस नसतो.

म्हणून तर आपले रामदासस्वामी  सांगून गेलेत ना…

                                             आपली आपण करी जो स्तुती,

                                                         तो येक पढत मूर्ख.

आणि केशवसुत म्हणतात …… 

                                         जुने जाऊद्या, मरणा लागुनी

                                          जाळूनी किंवा पुरुनी टाका 

                                          सडत न एक्या ठायी ठाका 

                                           सावध ! ऐका पुढल्या हाका 

— आपणही हे नक्कीच शिकू या.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Pin-drop silence — ☆ अनुवाद आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ Pin-drop silence — ☆ अनुवाद आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

Pin-drop silence —

तुम्ही कधी निस्तब्ध शांतता अनुभवली आहे ?

टाचणी पडली तरी ऐकायला येईल अशी शांतता ?

Pin drop silence …. याचा नेमका अर्थ सांगणाऱ्या खालील काही घटना आहेत, जेव्हा शांतता आवाजापेक्षाही मोठ्याने बोलू शकली होती.

प्रसंग 1

फील्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांच्या आयुष्यातला एक प्रसंग.

एकदा सर सॅम बहादूर माणेकशॉ एका सभेमध्ये भाषण करण्यासाठी अहमदाबादला गेले होते. सरांनी भाषणाला सुरुवात केली. ते अर्थातच इंग्रजीमधून बोलत होते.. श्रोत्यांमधे अचानक गडबड सुरू झाली… .. 

“ आपण गुजराथीत बोला. गुजराथीत बोललात तरच आम्ही आपले भाषण पुढे ऐकू.”

सर माणेकशॉ बोलायचे थांबले, त्यांनी श्रोत्यांवरून त्यांची करडी नजर फिरवली. आणि काही क्षणांत अगदी ठामपणे ते म्हणाले …. 

“  मित्रांनो, मी माझ्या प्रदीर्घ लष्करी सेवेत अनेक लढाया लढलो आहे, आणि त्या दरम्यान बऱ्याच भाषा बोलायलाही  शिकलो आहे. म्हणजे बघा ….
मी माझ्या शीख रेजिमेंटमधल्या सैनिकांकडून पंजाबी शिकलो…

मराठा रेजिमेंटच्या सैनिकांकडून मराठी शिकलो.

मद्रास सॅपर्समध्ये असणाऱ्या सैनिकांकडून तमीळ शिकलो. बेंगॉल सॅपर्सबरोबर काम करत असतांना  बंगाली शिकलो. हिंदी शिकलो ते बिहार रेजिमेंटबरोबर असतांना.  इतकंच काय, गुरखा रेजिमेंटकडून नेपाळी भाषाही शिकलो…..

… पण दुर्दैवाने …. ज्याच्याकडून मला गुजराथी भाषा शिकता आली असती असा गुजरातमधला एकही माणूस भारतीय सेनेत मला भेटला नाही .. अगदी एकही नाही.”

आणि अहमदाबादच्या त्या भल्यामोठ्या सभागृहात टाचणी पडली तरी ऐकायला येईल एवढी शांतता पसरली होती.

प्रसंग 2

स्थळ : पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ.

नुकत्याच लँड झालेल्या एका अमेरिकन विमानातून रॉबर्ट व्हायटिंग, वय ८३, हे गृहस्थ पँरिस विमानतळावर उतरले. तिथल्या फ्रेंच कस्टमस् ऑफिसपाशी गेल्यावर खिशातला पासपोर्ट काढण्यासाठी ते आपले खिसे चाचपत होते.

” महोदय, फ्रान्सला भेट देण्याची ही आपली पहिलीच वेळ आहे का ? ”  त्यांना जरासा वेळ लागल्याचे पाहून त्यांचा उपहास करण्याच्या हेतूने एका उद्धट कस्टम ऑफिसरने विचारणा केली..

आपण याआधीही फ्रान्सला येऊन गेल्याचं रॉबर्टनी सांगितलं..अजूनही ते पासपोर्टसाठी खिसे चाचपत होते पण हाताला पासपोर्ट काही लागत नव्हता.

“ मग इथे दाखवण्यासाठी तुम्ही तुमचा पासपोर्ट हातात तयार ठेवला पाहिजे हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे “

“ हो. पण मागच्या वेळी मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मला कुणालाही पासपोर्ट दाखवावा लागला नव्हता.” — तो वयस्कर अमेरिकन माणूस म्हणाला.

 “ हे शक्यच नाही. अमेरिकन माणसांना फ्रान्समध्ये उतरल्या उतरल्या आपला पासपोर्ट दाखवावाच लागतो. “ .. कस्टम ऑफिसर कुत्सितपणे म्हणाला.

त्या वृद्ध अमेरिकन माणसाने समोरच्या फ्रेंच माणसाकडे काही क्षण जराशा रागानेच रोखून पाहिलं, आणि मग शांतपणे म्हणाला .. “ नीट ऐका ..  १९४४ साली * D-Day*च्या दिवशी पहाटेच्या ४:४० ला तुमच्या ओमाहा समुद्रकिनाऱ्यावर मी आणि माझे सहकारी विमानातून उतरलो होतो …. तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या देशात आलो होतो ….  आणि तेव्हा माझा पासपोर्ट दाखवण्यासाठी त्या किनाऱ्यावर एकही फ्रेंच माणूस मला सापडला नव्हता. 

हे ऐकून त्या कक्षात एकदम निस्तब्ध शांतता पसरली होती. टाचणी पडली असती तरी आवाज ऐकू आला असता. 

(दुसऱ्या महायुद्धातील फ्रान्सची नामुष्की कोण विसरेल ? …. * D-Day…* ६ जून १९४४ – दुसऱ्या महायुद्धातला तो पहिला दिवस, ज्या दिवशी मित्रराष्ट्रांच्या सैन्याने नॉर्मनडीच्या समुद्रकिनाऱ्यांवर उतरून उत्तर फ्रान्सवर आक्रमण केले) 

प्रसंग 3

सन १९४७ …. 

ब्रिटिश राजवतीतून भारत मुक्त झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशातल्या महत्त्वाच्या पदांवर नेमणुका करण्यासाठी विचार विनिमय करणे चालू झाले होते.  याच कारणासाठी भावी अघोषित पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती — भारताचे पहिले “जनरल ऑफ इंडियन आर्मी ‘ यांची निवड करण्यासाठी 

“मला असे सुचवावेसे वाटते की आपण एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करावी. कारण हे  पद सांभाळण्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा अनुभव असणारी व्यक्ती आपल्याकडे नाही.”

… ब्रिटिशांकडून जे आजपर्यंत फक्त आज्ञापालन करायलाच शिकले होते — नेतृत्व करायला नाही –  अशा सर्वांनी.. ज्यात काही प्रतिष्ठित नागरिकही होते आणि सैन्यातले गणवेशधारीही – अशा सर्वांनीच नेहरूंच्या या प्रस्तावाला माना हलवत दुजोरा दिला..

…  मात्र एक वरिष्ठ अधिकारी नथुसिंह राठोड यांनी यावर आपले वेगळे मत मांडण्याची परवानगी मागितली. त्या अधिकाऱ्याचा आपल्यापेक्षा काही वेगळा आणि स्वतंत्र विचार आहे हे नेहरूंसाठी अनपेक्षित होते, त्यांना खरं तर आश्चर्यच वाटले होते . पण तरी त्यांनी राठोड यांना त्यांचे मत मोकळेपणाने मांडायची परवानगी दिली.

“सर, असं बघा की देशाचे नेतृत्व करण्यासाठीसुद्धा पुरेसा अनुभव नाही आहे आपल्याकडे. तर मग भारताचे पहिले पंतप्रधान म्हणूनही आपण एखाद्या ब्रिटिश माणसाची नेमणूक का करू नये ? —–

आणि सभागृहात एकदम निस्तब्ध शांतता पसरली …. टाचणी पडली असती तर तो आवाजही अगदी स्पष्ट ऐकू आला असतं

.. पंडित नेहरूंनी चमकून राठोड यांचेकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले..  “ तुम्ही तयार आहात का भारताचे पहिले ‘ जनरल ऑफ आर्मी स्टाफ ?’ व्हायला ? “

हा प्रस्ताव नम्रपणे नाकारत राठोड म्हणाले, “ नाही सर, मी नाही. पण आपल्याकडे एक अतिशय बुद्धिमान असे एक लष्करी अधिकारी आहेत .. माझे वरिष्ठ.. जनरल करिअप्पा. आणि ते या पोस्टसाठी आपल्यापैकी सर्वात जास्त अनुभवी आणि सर्वात जास्त योग्य असे आहेत.”

राठोड यांचा प्रस्ताव ऐकून बैठकीत पुन्हा एकदा एक निस्तब्ध शांतता पसरली. कर्नल राठोड यांच्या सूचनेने बैठकीचा नूरच बदलला. पं. नेहरू आणि उपस्थित इतर सर्वांनीच  एकमताने जनरल करिअप्पा यांच्या नावाला संमती दिली.  

अशा रीतीने अत्यंत बुद्धिमान असणारे जनरल करिअप्पा हे भारताचे पहिले ‘जनरल ऑफ आर्मी स्टाफ‘ म्हणून नेमले गेले. आणि  भारतीय सैन्याचे सर्वात पहिले ‘लेफ्टनंट जनरल ऑफ आर्मी स्टाफ’ म्हणून नथू सिंह राठोड यांची नेमणूक झाली.

(लेफ्टनंट जनरल निरंजन मलिक, PVSM (Retd) यांच्या एका इंग्लिश लेखावरून)

अनुवाद आणि प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोटी मोलाची कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ कोटी मोलाची कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

लग्नात आहेर म्हणून आलेली भेटपाकिटं उघडतांना एका पाकिटात फक्त एक कागद अन् एक रुपयाचा ठोकळा हातात लागल्यानं त्यांची उत्सुकता वाढली. कागदाची घडी उघडली अन् त्यात खरडलेल्या पाच सहा ओळींचा मजकूर वाचताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यात लिहील होत, ” माफ करा. मी तुमच्या नात्यातला काय, ओळखीचा सुद्धा नाही. वृद्ध आई-वडीलांनी माझ्याबाबत पाहिलेली स्वप्ने फुलवण्यासाठी ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात आलेला एक उच्चशिक्षित बेरोजगार तरूण आहे मी. कडकडून भूक लागली होती. जवळ पैसेही नव्हते. येथून जातांना हे लग्न दिसलं. तसाच आत शिरलो नि भूक शमवली. या रुपयाचं हल्लीच्या काळात काहीच मोल नाही, हे पुरेपूर जाणून आहे मी. तरीही खाल्लेल्या अन्नाबद्दलची कृतज्ञता, म्हणून यात हा रुपया टाकला आहे.” 

— या एकाच गोष्टीला किती पैलू आहेत !

भूक पापी आहे.

परिस्थिती नाइलाजाची आहे.

हातून अपकृत्य घडलं आहे.

त्याची मनाला खंत आहे.

कांटा बोचरा आहे.

पश्चात्तापाची भावना आहे.

पापक्षालनाची इच्छा आहे.

पण तेव्हढीही ताकद खिशात नाहीये.

रुपयाला अर्थ नाही याची जाण आहे.

पाकिटातल्या रुपयाला नुकसानभरपाई म्हणावं की आहेर म्हणावं? समजत नाही !

या साऱ्या प्रकाराला एकच गोष्ट जबाबदार आहे – पापी भूक.

ती सुद्धा रोज रोज लागते.

उपाशी माणसाने अन्नाची चोरी करावी कां – हा प्रश्नच अमानुष आहे.

“पापी पेटका सवाल है भाई”

पण माणूस नेक आहे.

त्याच्यापाशी देण्यासारखं असलेलं सर्वस्व –

एक रुपया – देऊन त्यानं  लाखमोलाचं पुण्य जोडलं आहे.

म्हणूनच ही कथा कोटीमोलाची आहे !

मित्रांनो, काळजी घ्या…. कृपया अन्न वाया घालू नका. भूक भागवण्यासाठी अन्नाची खूप गरज आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कर्माचा नियम… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ कर्माचा नियम… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपण लहानपणी पासून ऐकतो, पेरावे तसे उगवते किंवा आपण जे किंवा जसे वागतो ते आपल्या कडे कोणत्याही रूपात परत येते. हे होऊ द्यायचे नसेल तर काय करावे बघू या. खरे तर हे सर्वांना माहिती आहे. पण काही गोष्टी परत उजळाव्या लागतात. तसेच हे आहे.

आपल्याला पावलोपावली काही निर्णय घ्यावे लागतात.

बऱ्याच गोष्टींवर आपण प्रतिक्रिया देत असतो. आणि त्या देताना जसे पूर्वग्रह मनात असतात. तसे आपण व्यक्त होतो. समजा एखाद्या व्यक्तीने पूर्वी आपला अपमान केला असेल तर तो राग मनात असतो.मग त्या व्यक्तीने साधा “कसे आहात?” असा प्रश्न विचारला तरी आपल्या कडून सरळ उत्तर दिले जात नाही. त्या वेळी अपमान,बदला,चिड,राग अशा भावना मनात येतात.

 किंवा एखाद्या व्यक्ती विषयी चांगले मत असेल आणि ती व्यक्ती रागावली तरी आपण फारसे मनावर घेत नाही. 

थोडक्यात आपले पूर्वग्रह जसे असतात तशी प्रतिक्रिया दिली जाते. प्रतिक्रिया किंवा प्रती उत्तर चांगले असेल तर आपण विसरुन जातो. पण कोणी आपला अपमान केला असेल तर विविध प्रतिक्रिया मनात येतात. त्यातील एकच प्रतिक्रिया योग्य असते. पण ती दुर्लक्षित केली जाते. आणि त्या पूर्वग्रह दूषित ठेवून दिलेल्या प्रतिक्रियेचा जास्त त्रास आपल्यालाच होतो. पण हे आपण टाळू शकतो. थोडक्यात चुकीच्या कर्मातून सुटका करुन घेऊ शकतो. या साठी काही छोटे उपाय प्रत्यक्ष करुन बघू.

▪️ १) लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही.

पूर्वी मोठी माणसे सांगायची राग आला की,पाणी प्या. मनात अंक मोजा. तसेच काहीसे करायचे. प्रतिक्रिया देण्याची वेळ आली की, लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. आपण जी प्रतिक्रिया देणार आहोत ती फायद्याची, आनंदाची, हितकर आहे का? याचा विचार करायचा.

जी प्रतिक्रिया देणार आहोत त्याचा विचार मनात आल्यावर आपल्या हृदयात किंवा पोटात आनंद,समाधान जाणवले तर ती प्रतिक्रिया योग्य आहे असे समजायचे.आणि त्यामुळे जर भीती वाटली,धडधड जाणवली किंवा राग,ईर्षा,चिडचिड असे जाणवले तर ती प्रतिक्रिया अयोग्य समजावे.

काय जाणवते या कडे लक्ष द्यायचे. त्या नंतर प्रतिक्रिया द्यायची.

▪️ २) कोणत्या भावना निर्माण होतात या कडे लक्ष देणे.

कोणत्याही घटना,भाष्य या वर प्रतिक्रिया देताना कोणत्या भावना / लहरी मनात निर्माण होतात या कडे लक्ष द्यावे.चांगले /वाईट तरंग (vibration) आपल्याला जाणवतात.

ते जर चांगले असतील तरच मनात आलेली प्रतिक्रिया / प्रत्युत्तर द्यावे.

▪️ ३) कर्माचे कर्ज कसे फेडावे?

🔅१) परिणाम भोगणे –

निसर्ग नियमा नुसार ते भोगून फेडावे लागते.

🔅२) समुपदेशन करणे –  आपण ज्या चुका केलेल्या आहेत,त्या इतरांच्या कडून होऊ नयेत या साठी त्यांचे समुपदेशन करायचे.कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत व त्या कशा टाळाव्यात या विषयी मार्गदर्शन करावे. ज्याला अपयश मिळाले आहे,किंवा शिक्षा मिळाली आहे तिच व्यक्ती कोणत्या गोष्टी करु नयेत या विषयी चांगले सांगू शकते.

🔅३) गॅप मध्ये जाणे – म्हणजे मेडिटेशन करणे.दिवसातून दोन वेळा मेडिटेशन करावे.त्या मुळे विविध विचारांच्या पासून आपण दूर जातो.

त्या मुळे आपण योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त करु शकतो.

आपले कार्मिक दोष कमी करायचे असतील तर पुढील गोष्टी कराव्यात.

🔅 १) दान, समुपदेशन, मेडिटेशन करणे.

🔅 २) प्रत्येक प्रतिक्रिया देताना थांबणे – विचार करणे.

🔅 ३) प्रतिक्रिया देताना आपल्या हृदयाला योग्य आहे की अयोग्य आहे विचारणे.म्हणजेच ( Heart Vibration) तपासून मग प्रतिक्रिया देणे.

हे उपाय आपल्याला कर्म दोषातून मुक्ती देऊ शकतात.फक्त हे मनापासून करावे.

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सपोर्ट सिस्टीम…” ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

डॉ. प्राप्ती गुणे

? मनमंजुषेतून ?

☆ “सपोर्ट सिस्टीम…” ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

परवाच पेपरमध्ये अमेरिकेतील सुप्रसिद्ध भारतीय वंशी जर्नल सर्जन यांचे बोल वाचले.

‘एकाकीपणामुळे मनुष्याच्या तब्येतीवर कसा हानिकारक परिणाम होतो’ असे त्यांचे भाष्य होते.

काल ‘पोज’ नावाची 1980-90 दशकातलं चित्रण असणारी वेब सिरीज पाहिली. त्या काळात अमेरिकेत तृतीयपंथी लोकांनी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, मूलभूत आरोग्य सेवेसाठी दिलेला लढा, त्यांची एड्स या गंभीर आजारामुळे झालेली दुरावस्था, त्यांचा खडतर जीवनप्रवास असे अनेक अतिसंवेदनशील मुद्दे,यात नाजूकपणाने हाताळले होते.

  शीर्षकाशी ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध काय,असा प्रश्न आपल्याला पडलेला असेल.

.. ही वेब सिरीज पाहताना अनेक वेळा माझे डोळे पाणावले. परंतु ते दुःखद घटनांपेक्षा आल्हाददायक भावनिक प्रसंगांमुळे घडले. 

सर्वांची एकमेकांना असणारी अतूट साथ, एकमेकांच्या प्रगतीसाठी स्वतःच्या सुखाचा केलेला  निरपेक्ष त्याग, चुकांमध्ये अडकलेल्या दुसऱ्यांसाठी त्याला नावं न ठेवता, प्रसंगी स्वतः जोखीम पत्करून, धोकादायक परिस्थितींमधून त्यांना सोडवणं, स्वतःला मिळालेली जास्तीचं जीवन जगायची संधी दुसऱ्याला, ज्याचं आयुष्य जगणं अजून उरलंय, त्याला देण्यातली निस्वार्थता, पाहून कोणाचेही हृदय भरूनच येईल. मी ही त्याला अपवाद नव्हते.

त्याकाळात, समाजात अनेक गैरसमजुती व अपुरी माहिती असल्याने, स्वतःच्या कुटुंबाने झिडकारलेल्या आणि हिंस्र जगात अनोळखी व्यक्तींमध्ये स्वतःचं ‘घर’  सापडलेल्या व्यक्तींचा हा एकत्रित प्रवास होता.

घर म्हणजे छत, भिंती आणि खांब. डोक्यावरचं छत जरी सुरक्षा देत असलं, तरी भिंती आणि खांब, या  सपोर्ट सिस्टीममुळे छत त्याच्या जागी खंबीर राहतं. 

आपल्याला आयुष्यात येणारया वादळवाऱ्यांपासून सुरक्षा हवी तर आपल्या जीवनात मनुष्यरुपी खांब, भिंती म्हणजे ‘सपोर्ट सिस्टीम’ ही तेवढीच खंबीर हवी. आपल्या डोक्यावरचं कधी छप्पर उडालं की आपल्याला निवारा देणारी माणसे हवीत. आपण व्हर्चुअल जगात असणाऱ्या फॉलोवर्स, फ्रेंड्स च्या आकड्यांवरून आपलं गणगोत ठरवत असू, तर आपण चुकतोय,असं ते जर्नल सर्जन यांचे मत होतं.  आपल्या आयुष्याची खरी सफलता, आपल्या आयुष्यात असणाऱ्या त्या मोजक्या लोकांमुळे ठरते, जे एका मध्यरात्री केलेल्या फोन कॉल मुळे स्वतःची झोप मोडून आपल्या मदतीसाठी धावत येतात.

आपण चुकल्यावर ,आपल्याला दोन बोल कमीजास्त सुनावून आपली चूक सुधारण्यासाठी मार्ग सुचवतात आणि म्हणतात “खबरदार ! पुन्हा असा चुकलास तर याद राख.”

ज्यांच्याशी वर्षांचा अबोला असला तरी आपल्या आयुष्यातली सुखद अथवा दुःखद घटना घडल्यावर त्यांना सांगण्यासाठी आपला फोनकडे हात वळतो, ज्यांच्यावर किती जरी राग असला तरी आयुष्याने आपल्या श्रीमुखात भडकवली, की जो बर्फाप्रमाणे वितळून जातो,

जे स्वतःच्या आयुष्यात कधी कमी पडले असतील कधी, पण तुम्हाला गरज पडली म्हणून, आपल्या गरजांना मुरड घालून तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहतात,

— अशा लोकांना कधीच कोणत्याही परिस्थितीत, आपल्या आयुष्यातून जाऊ देऊ नका.

 या खंबीर सपोर्ट सिस्टिम मुळेच, अनेक वादळं आली तरी आपण ठामपणे उभे राहू शकतो.

 हे ‘सपोर्ट सिस्टीम’ नात्यात सापडतीलच असं नाही, जिथे सापडेल तिथे त्यांना आपण मात्र घट्ट धरून उभं राहावं.

© डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीराम प्रसवतांना – ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

पुरूष असूनही तो एके दिवशी दोन जीवांचा झाला. पण त्याचे गर्भाशय पोटाऐवजी हृदयात वसलं होतं. आई बालकाला जन्म देण्यापूर्वी पोटातल्या गर्भात वागवते. याचं मात्र बाळ त्याच्या बुद्धीत आकार घेत होतं आणि हृदयात नांदत होतं….जन्माची प्रतिक्षा करीत! त्याच्या हृदयगर्भात बालक श्रीराम वाढत होते….आणि या बालकाचं त्याच्या गर्भातलं वय होतं साधारण पाच-सहा वर्षांचं!   

मानवाला नऊ महिने आणि नऊ दिवसांचा प्रतिक्षा काल ठरवून दिला आहे निसर्गानं. पोटी देव जन्माला यायचा म्हणून दैवानं या मनुष्याला प्रतिक्षा कालावधीत मोठी सवलत दिली. 

ग.दि.माडगूळकर गीत रामायण लिहित असताना प्रत्यक्ष श्रीरामजन्माचं गाणं लिहिण्याचा प्रसंग आला. त्यांनी खूप गाणी लिहिली पण त्यातलं त्यांना एकही पसंत होईना. गाणं मनासारखं उतरलं नाही तर ते गाणं लिहिलेला कागद चुरगाळून तो मेजाशेजारी टाकून देण्याची त्यांना सवय होती. त्यांच्या पत्नी विद्या ताई हे सर्व पहात होत्या. शब्दप्रभू गदिमांच्या बाबतीत एकदा गीत लिहिलं की ते पुन्हा बदलण्याचा विषय फारसा उपस्थित होत नसे. एकदा तर त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या गडबडीत असताना, त्या ऐन लग्नाच्या दिवशी संगीतकाराला एक अत्यंत लोकप्रिय गीत लिहून दिल्याचं वाचनात आलं…लळा जिव्हाळा शब्दचि खोटे…मासा माशा खाई…कुणी कुणाचे नाही! स्वत:च्या मुलीच्या लग्नाच्या मंगलदिनीसुद्धा मानवी जीवनावर ठसठशीत भाष्य करणे गदिमांसारख्यांनाच शक्य होते! तर….रामजन्माच्या पसंतीस न उतरलेल्या गाण्यांच्या कागदांचा एवढा मोठा ढीग पाहून त्यांच्या पत्नी विद्याताई आश्चर्यचकित झाल्या…त्यावर गदिमा या अर्थाचं काहीसे म्हणाले होते….जगाचा निर्माता,प्रभु श्रीराम जन्माला यायचाय…कुणी सामान्य माणूस नव्हे!

हा माणूसही गदिमांसारखाच म्हणावा. यालाही श्रीरामच जन्माला आणायचे होते…मात्र ते कागदावर नव्हे तर पाषाणातून. ज्यादिवशी त्याला ही गोड बातमी कळाली तेंव्हापासून तो कुणाचाही उरला नाही. एखाद्या तपोनिष्ठ ऋषीसारखी त्याच्या मनाची अवस्था झाली…जागृती..स्वप्नी राममुर्ती….ऋषी-मुनी तरी कुठं वेगळं काही करतात…सतत देवाच्या नामाचा जपच! याला मात्र नाम स्मरण करण्याची आवश्यकता नव्हती. त्याची बोटं राम राम म्हणत पाषाणावर चालत होती….त्याच्या हातातल्या छिन्नीच्या रूपात. त्याच्या घराण्याची मूर्ती निर्माणाची परंपरा थोडीथोडकी नव्हे तर अगदी तीनशे वर्षांची. देव त्यांच्या रक्तातच भिनला म्हणावा. दगडांतून निर्माण होणा-या आणि अमरत्वाचं वरदान लाभलेल्या मुर्तीच त्यांचे उदरभरणाचे स्रोत झाले होते. त्यातून मिळणारा सात्विक आनंद तर त्यांना न मागताही मिळत होता. हा मूर्तिकार अगदी तरूण वयातला. त्याचे वडीलच त्याचे गुरू. त्यांच्या हाताखाली शिकत शिकत त्याने छिन्नी हातोड्याचा घाव घालून दगडाचा देव करण्याची हातोटी साधली होती. 

आपल्याला बालकरूपातील श्रीराम घडवायचे आहेत हे समजल्यापासून त्याची तहानभूक हरपली. आई जसं पोटातल्या गर्भासाठी अन्न घेते, श्वास घेते, निद्रा घेते आणि डोहाळे मिरवते तशीच याची गत. तीन शतकांच्या पिढीजात अनुभवाच्या जोरावर त्याने जगातला सर्वोत्तम पाषाण निवडला. 

पहाटे अगदी तनमनाने शुचिर्भूत होऊन राऊळात दाखल व्हायचं….आणि त्या पाषाणाकडे पहात बसायचं काहीवेळ. त्यातील मूर्तीला वंदन करायचं मनोमन. आणि मग देव सांगेल तशी हातोडी चालवायची…छिन्नीलाही काळजी होती त्या पाषाणातील गर्भाची…जराही धक्का लागता कामा नये. यातून प्रकट होणारी मूर्ती काही सामान्य नव्हती…आणि बिघडली…पुन्हा केली..असंही करून भागणार नव्हतं. आरंभ करायला लागतो तो मसत्कापासून. जावळ काढून झाल्यानंतरच्या चार-पाच वर्षांत विपुलतेने उगवलेले काळेभोर,कुरळे केश. कपाळावर रूळत वा-यावर मंद उडत असणारे जीवतंतुच जणू. केसालाही धक्का न लागू देणे याचा हा ही एक अर्थ व्हावा,अशी परिस्थिती. पण गर्भातलं बालकही या आईला पूर्ण सहकार्य करीत होतं…कारण त्यालाही घाईच होती तशी….पाचशे वर्षापासूनची प्रतिक्षा होती! 

काहीवेळा तर हे बालक मुर्तिकाराच्या छिन्नी-हातोड्यात येऊन बसायचं….आणि स्वत:लाच घडवू लागायचं! देव जग घडवतो…देव स्वत:ला घडवण्यात कशी बरे कुचराई करेल? 

मुर्तीत संपूर्ण कोमल,निर्व्याज्य बाल्य तंतोतंत उतरावे, यासाठी त्याने या वयोगटातील बालकांची हजारो छायाचित्रे न्याहाळली. त्यातील भावमुद्रा, भावछ्टा डोळ्यांत साठवून ठेवल्या आणि आपल्या मुर्तीत त्या कशा परावर्तीत करता येतील याची मनात शेकडो वेळा उजळण्या केल्या. कागदावर ते भाव रेखाटण्याचा नेम सुरू केला. मनाचं समाधान झालं तरच छिन्नी चालवायची अन्यथा नाही. 

मुर्तिकारालाही स्वत:ची मुलं होती. दीड-दोन वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची कन्या. ही आई आपल्या ह्या लेकीला त्याने पाषाणात कोरलेल्या बाळाच्या मुर्तीचा फोटो दाखवायची…आणि विचारायची….हे मूल किती वर्षांचं वाटतंय? लहान वाटतंय की मोठ्या मुलासारखं दिसतंय? जो पर्यंत मुलगी म्हणाली नाही की ..हो हे मूल खरंच चार-पाच वर्षांचं दिसतंय…तो पर्यंत मुर्तिकारानं काम सुरू ठेवलं….आणि पूर्ण होकार मिळताच त्याच्या छिन्नी हातोड्याचा वेग वाढला! 

या कामात त्याला अनेकांनी साहाय्य केलं. हो…गर्भारशीची काळजी घेतातच की घरातले. पण आता त्याचं घर तर खूप मोठं होतं. अयोध्या या घराचं नाव. काम सुरू असताना काही माकडे आतमध्ये घुसायची…आणि तयार होत असलेल्या मूर्तीकडे काही क्षण पाहून निघून जायची…कुठेही धक्का न लागू देता. त्यांचा उपद्र्व होईल या शक्यतेने त्यांनी मूर्ती घडवण्याच्या कक्षाची दारे पक्की बंद करून घेतली तर ही माकडे त्यांची पूर्ण ताकद लावून ते अडथळे दूर सारायची! लंका जाळणा-या हनुमानाचे वंशज ते….त्यांना कोण अडवणार? त्यांना कुणी तरी पाठवत असावं…हे निश्चित…अन्यथा ज्या जागी केवळ पाषाणाचे तुकडेच पडलेले आहेत..अशा जागी त्यांना येऊन काय लाभ होणार होता?

प्रसुतीकळा सुरू झाल्या! आणि शुभ घडीला शुभ मुहूर्ती या पाच वर्षीय बालकाने हृदयगर्भातून बहेर डोकावले…आणि प्रकट झाले स्वयं बाल श्रीराम! केवढंसं असतं ना अर्भक….किती वेगळं दिसत असतं. आईला जसं आहे तसं प्राणापलीकडं आवडत असतं…कुणी काहीही म्हणो. मात्र हे बालक पाहणा-याच्या मनात कोणताही किंतु आला नाही. श्रीकृष्ण नावाच्या बालकाला पाहून जसं गोकुळच्या नारींना वाटलं होतं…तसंच या बाळाला पाहून वाटलं सर्वांना….रामलल्ला पसंद हैं…प्रसन्न हैं! बाळ-बाळंतीण सुखरूप..त्यातील आईतर सर्वोपरी सुखी. सा-या भारतवर्षांचं लक्ष होतं या प्रसुतीकडे…काळजाच्या वंशाचा दिवा पुन्हा प्रज्वलीत व्हायचा होता मुर्तीरूपात…एवढं लक्ष तर असणार होतंच….याचा ताण प्रत्यक्ष आईवर किती असतो…हे फक्त बाळाला जन्म दिलेल्या माताच सांगू शकतील. बाकीचे फक्त दे कळ आणि हो मोकळी! असं म्हणू शकतात फार तर! 

ही आई आता शांत…क्लांत! कर्तव्यपूर्ती करून घेतली श्रीरामांनी. हे भाग्य म्हणजे गेल्या कित्येक पिढ्यांच्या आशीर्वादांचं फलित. कोट्यवधी डोळे ही मुर्ती पाहतील…आणि शुभाशिर्वाद मिळवतील….माझ्या हातून घडलेली ही मूर्ती…आता माझी एकट्याची राहिलेली नाही! 

या बालकाला नटवण्याची,सजवण्याची,अलंकृत करण्याची जबाबदारी आता इतर सर्वांनी घेतली…अनेक लोक होते…वस्त्रकारागीर,सुवर्णकारागीर…किती तरी लोक! देवाचं काम म्हणून अहोरात्र झटत होते…हे काम शतकानुशतकं टिकणारं आहे…ही त्यांची भावना! आपण या जगातून निघून जाऊ…हे काम राहील! 

मुर्ती घडवणारी आई हे कौतुक पहात होती…मग तिच्या लक्षात आलं….बालक आपलं रूप क्षणाक्षणाला पालटते आहे…अधिकाधिक गोजिरे दिसते आहे. संपूर्ण साजश्रुंगार झाला आणि लक्षात तिच्या लक्षात आलं…..हे मी घडवलेलं बालक नाही….मी तर फक्त पाषाणाला आकार देत होते..आता या पाषाणात चैतन्याचा प्रवेश झाला आहे! नेत्रांतले,गालांवरचे,हनुवटीवरचे भाव मी साकारलेच नव्हते…ते आता प्रत्यक्ष दिसू लागलेत…..ही माझी कला नाही…ही त्या प्रभुची किमया आहे…स्वत:लाच नटवण्याची. त्याची लीला अगाध…मी निमित्तमात्र! यशोदेसारखी! …देवकीला तरी ठाऊक होतं की अवतार जन्माला येणार आहे…पण यशोदा अनभिज्ञ होती? तिला पुत्रप्राप्तीचा आनंद पुरेसा होता! कृष्णाची आई ही उपाधीच तिचा जन्म सार्थक करणारी होती. 

जसे अवतार जन्माला येतात, तसे कलाकारही जन्माला येतात. अवतारांच्या मुर्ती साकारण्याचं भाग्य नशिबात असणारे कलाकारही जन्माला यावे लागतात…कलाकार योगी असावे लागतात…यांच्यातर कर्मातही योग आणि नावातही योग….अरूण योगिराज या कलाकाराचे नाव. यांनी रामलल्लांच्या मुर्तीचं आव्हान पेललं! सात महिने आपल्या हृदयात श्रीरामांना अक्षरश: एखाद्या गर्भार स्त्रीसारखे निगुतीने सांभाळले आणि कोट्यवधी श्रीरामभक्तांच्या ओटीत घातलं ! 

अरूण योगिराजजी…तुम्हांला सामान्यांच्या आशीर्वादांची आता खरोखरीच गरज नाही…..पण तुम्ही आम्हां सामान्यांचे धन्यवाद मात्र अवश्य स्विकारा….या निमित्ताने आमचेही नमस्कार तुम्ही साकारलेल्या रामलल्लांच्या चरणी पोहोचतील !     

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भारतीय संस्कृती जपणारी * टिकली… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

🌸 विविधा 🌸

भारतीय संस्कृती जपणारी* टिकली… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

भारतीय संस्कृती जपणारी* टिकली

टिकली

तिच्या कपाळावर ची

टिकली चमकलीपैठणी नेसून ती झोकात चालली

आज चंद्र ढगाआड का लपला

स्त्रीच्या जीवनात कुंकू किंवा टिकलीचे महत्त्व खूप आहे. सोळा शृंगारातही कुंकवाला महत्त्वाचे च स्थान आहे.

*चिरी कुंकवाची लखलख करिते

जीव जडला जडला जडला

खरं वाटंना वाटंना वाटंना*

या जुन्या मराठी चित्रपट गीतात कुंकवाची चिरी असा उल्लेख आहे. खरंचपूर्वी स्त्रिया कुंकवाची आडवी रेघ म्हणजेच चिरी कपाळा वर रेखत असत.माझी आई, मावशी यांच्या कडे फणीकरंड्याची लाकडी पेटी असायची. त्यात पिंजर कुंकू, मेणाची

डबी,फणी(कंगवा),काजळाची डबी आणि लहान साआरसा असायचा. त्या आधी कपाळावर मेण लावून मग गोलाकार कुंकू लावायच्या. मावशी सांगायची ते मेणही मधमाशीच्या पोळ्यातील असे.कुंकूही सात्विक (भेसळीविना)असे.

टिकली विषय इतका जिव्हाळ्याचा आहे कि त्यावर त्रिवेणी करण्याचा मोहच आवरत नाही.

त्रिवेणी 

तिच्या  कपाळावरची टिकली लक्ष वेधत होती

ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती

कुठंतरी आडोशाला थांबावं म्हणतोय .   

भारतीय संस्कृतीत कुंकवा चे महत्त्व अनन्य साधारण आहे.कुंकवाचा इतिहास पाहता फार पूर्वीच्या काळात डोकावावे लागेल.पूर्वी आर्य-अनार्य (द्रविड) टोळ्या होत्या. त्यांच्यात सतत युध्दे होत.त्यावेळी आर्य स्त्रियां ना द्रविड किंवा अनार्य पळवून नेत.मग आर्य पुन्हा

आपल्या स्त्रियांना युध्दात जिंकून परत आणत.मग या स्त्रियांना शुध्द करण्या साठी घोड्याच्या रक्ताने त्यांना स्नान घालत. पुढे पुढे त्याऐवजी घोड्याच्या रक्ताचा टिळा स्त्रीच्या कपाळी लावत व तिला शुध्द करून घेत. यातूनच मग कुंकवाची प्रथा उदयास आली. हा  इतिहास रक्त रंजित जरी असला तरी कपोल कल्पित नाही.

शुध्द कुंकू हळद हिंगूळ आदि पदार्थ वापरून तयार केले जाते. कुंकू कोरडे असेल तर त्याला पिंजर म्हणतात. ओल्या कुंकवा लागंधम्हणत.शुद्ध कुंकवाचा सुगंध ठराविक अंतरापर्यंत दरवळत रहातो. शुद्ध कुंकवात आर्द्रता असूनही ते पूर्ण पणे कोरडे असते. त्याचा स्पर्श बर्फासारखा गार असतो. शुद्ध कुंकू रक्त वर्णाचे असते. त्यामध्ये लोह या घटकाचे प्रमाण जास्त असते. हे कुंकू कपाळावर लावल्याने वाईट शक्ती भ्रूमध्यातून प्रवेश करू शकत नाहीत.

असं म्हणतात. पूर्वीच्या काळी (सत्य, त्रेता व द्वापार या युगांत) शुद्ध कुंकू मिळायचे; मात्र त्या युगांनुसार कुंकवाची सात्त्विकता कमी कमी होत गेली. हल्ली कली युगामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत लोकच सात्त्विक कुंकू तयार करतात.’

१. `कुंकू लावतांना भ्रूमध्य व आज्ञाचक्र यांवर दाब दिला  जातो व तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना रक्‍तपुरवठा चांगला होतो.

२. कपाळावरील स्नायूंचा ताण कमी होऊन चेहरा उजळ दिसतो. कुंकवा मुळे वाईट शक्‍तींना आज्ञाचक्रा तून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो, असे समजतात.कुंकू हे पावित्र्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे. कृत्रिम घटकांपेक्षा नैसर्गिक घटकांमध्ये देवतांच्या चैतन्यलहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते. म्हणून पूजापाठ,धार्मिक विधीं वेळी पुरुषांच्या कपाळा वर सुध्दा कुंकूम तिलक रेखतात.

योगशास्त्रानुसार शरीरातील षट्चक्रांपैकी आज्ञाचक्राचे स्थान कपाळा वर ज्याठिकाणी कुंकू किंवा टिकली लावली जाते तेथे आहे. म्हणजे कुंकू लावणे हे एक प्रकारे आज्ञाचक्राचे पूजन आहे.

त्रिवेणी बघाः

टिकली

काल ती चांदणी आकाशात चमकत होती

आज ती तिच्या कपाळावरील टिकली म्हणून चमकत होती

हल्ली चांदण्या कुठंही लुकलुकत असतात कालानुरूप या कुंकवाची जागा टिकल्यां नी घेतली. कारण लावाय ला सोपी, बाळगायला सोपी, तसेच घाम,पाऊस

याने ओघळायची भीती नाही. टिकली लावली किंवा कुंकू तरी संस्कृती शी नाळ जोडण्याचा प्रयत्न त्यातून दिसतो. भले त्या त आकार, रंग,वेगवेगळे असतील. फँशनचा विचार असेल तरीही टिकलीचे महत्त्व ही कमी होत नाही.

त्रिवेणी

 टिकली

उगवत्या सूर्याने जणू कुंकू

रेखले भाळी

रात्री चंद्राची चमचमणारी  टिकली

कशी विश्वनिर्मात्याची किमया सारी

खरंच निसर्गातही ठायी

ठायी निर्मिकाची कलाकारी वेड लावते. 

चकित करते.

त्यात कुंकवाचा तिलकही भासमान होतो.

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जास्वंदीच्या कळ्या ! ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

?  मनमंजुषेतून ? 

☆ 🥀 जास्वंदीच्या कळ्या ! ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

जास्वंद : “अगं, मी वीतभर असताना, मला किती प्रेमाने लावलं होतस तुझ्या अंगणात. तुझ्या बाळांप्रमाणे तू माझी काळजी घेतलीस. अजूनही घेतेस…आता  माझं वय दोन वर्षे असेल ना? माझी मुळं मातीत घट्ट रुजेपर्यन्त तुझ्या प्रेमळ स्पर्शाने मी आनंदी होत होते. आणि मनाची खात्री झाली की, ही मला छान घडवणार!रोज पाणी घालण, वरचेवर माती बदलणं,  तू घरी केलेलं खत घालण, माझ्या फुटलेल्या कोवळ्या पालवीवर धुळ जरी पडली तरीही कससं होणारी तू, माझ्या आजूबाजूला किडही लागू देत नव्हतीस. 

नव्या उमेदीने मला एकेक फांदी नवीन फुटत गेली, मी बहरत गेले. कधीतरी एखादी कळी जणू त्या एकसारख्या कापलेल्या पानातून वर डोकवायची! दोन-तीन दिवसात फुलायची! लालभडक ….पहिलं फुल देवाला घातलंस. आता माझा विस्तार आणि वंशावळ वाढलीय! हळूहळू करत लहान मोठ्या भरपूर कळ्या वर डोकावू लागल्या. आपलं आकाश शोधू लागल्या!

तुझ्या मुलीला तारुण्याच्या उंबरठ्यावर नाजूक उपदेश देताना पाहिलय मी! माझ्या अपत्यानाही  मी हलकेच गोंजारत तसे उपदेश देऊ लागले. कोवळ्या कळ्यांच्या वरील आवरणाच्या हिरवळीतून हलकेच उठून दिसणारा त्यांचा आतला लालसर रंग! त्या कळीच सौंदर्य अधिकच वाढवत असे. कळीच फुल होतानाच तीच सौन्दर्य आणि टप्पे काय वर्णू! मला वाटत होतं माझीच दृष्ट लागेल की काय ह्या माझ्याच बाळांना. 

लालभडक फुलं हसताना…मी समाधानी होत असे ! खूप फुलं फुलू लागली…लाल पताक्यांसारखी उंच हलु लागली आणि आपलं अस्तित्व ठळकपणे दाखवू लागली. 

अशातच…तू एकदा पाहिलंस, शेजारच्या,रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांनी लाल फुल तोडायला सुरुवात केली. तुला कसतरी वाटायचं.. इतकं देखणं झाड आपलं आहे, फक्त आपलं आणि इतर लोकं याची फुल तोडतात. पण तू एकदा माझ्याशी गप्पा मारताना हे बोलून दाखवलस आणि मला आणि स्वतःलाही समजावलस की आपला काय आणि लोकांचा काय… देव एकच! त्या देवाच्याच चरणी जातील ही फुल! ह्या विचाराने तू थोडी शांत झालीस आणि मीही.

पण तुला सांगावं की नाही? न राहवून सांगते आता…आताशा, आजूबाजूचे लोक, रस्त्यावरचे लोक कळ्याच काढून न्हेत आहेत. अगदी ओरबाडून, काठीला आकडा लावून, उड्या मारून फांद्या तोडून मुक्या कळ्या तोडत आहेत ग. माझ्याच न फुललेल्या बाळांची ही अवस्था…लोक जवळ आले तरी पोटात गोळा येतो आता…माझ्यापासून माझ्या तारुण्याचा उंबरठा ओलांडत असलेल्या माझ्या पोटच्या कळ्यांची ही अवस्था बघवत नाही मला…त्यांचा रंग आता कुठे खुलणार असतो…त्यांना पूर्ण आकारणार  असतात…पण, त्यांच्या अवयवांचा रेखीवपणा आहे त्या अवस्थेत ओरबाडून घेऊन, स्वतःच्या घरात नेऊन ठेऊन, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देवाला वाहण्यात काय आनंद मिळतो त्यांना ? आणि कोणत्याही देवाला हे आवडेल का? एकीकडे म्हणतात, निसर्ग ही देवता आहे म्हणतात ना, मग आम्हाला त्रास देऊन ते स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त देवाच नाव घेऊन समाधान का मानतात? आमचं समाधान त्यांनी जाणलेय कधी?

माझं रडू, माझं रक्त नाही दिसत त्यांना…माझ्या भावना नाही समजू शकत ते…आईपासून त्यांना अकाली पोरकं करणं…संवेदनाहीन झालीत का ही माणसं?

पोटच्या गोळ्याला गर्भातच खुडणारी माणसं ऐकली होती.. अत्याचार करून ‘ती’ ला संपवणारी माणसं ऐकली होती. पण आता आमच्याही तरुण कलीका अशा खुडून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांचं जगणं संपवणारे..रांगोळ्या घालण्यासाठी एकेक पाकळी वेगळी करणारे…आम्हाला ओरबडणारे…तुम्ही ‘नराधम’ म्हणता तुमच्या भाषेत अशा लोकांना,  मी काय म्हणू?

सगळेच तुझ्यासारखे दुसऱ्याचं काळीज जाणारे नसतात ग! “

मी : पाणावल्या डोळ्यांनी निशब्द…

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग २ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग २ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण बघितले,

‘हरी है ये जमीं कि हम तो इश्क बोते है

हमीं से हँसी सारी, हमीं पलके भिगोते है

धरा सजती मुहब्बत से, गगन सजता मुहब्बत से

मुहब्बत से ही , खुशबू, फूल, सूरज, चाँद होते है… ) आता इथून पुढे — 

कथेच्या ओघात दोन बोचरी सत्ये लेखकाने प्रगट केली आहेत. एनकाऊंटरमधे शहीद झालेल्या आपल्या परममित्राची आठवण काढता काढता, मोहितच्या मनात येतं, जोर्यंत तुम्ही शहीद होत नाही, तोपर्यंत तुम्ही बहादूर नसता. ज्या देशासाठी तुम्ही जीव गमावला, त्या देशवासीयांना क्षणभर थांबून तुमच्यासाठी दु:ख करायला वेळ नसतो. दुसरं सत्य म्हणजे,  आपण बहादूर आहात की नाही, हे दाखवण्यासाठी, आपण कुठे लढलात, ती जागा महत्वाची. दूर चीड – देवदारच्या जंगलात झालेलं राहूलचं युद्ध, दिल्ली-मुंबईच्या परिसरात झालं असतं, तर तो आत्तापर्यंत हीरो झाला असता. आता मात्र न्यूज चॅनेलच्या बातम्यांच्या खाली धावणार्‍या पट्टीपुरतं त्याचं हिरोइझम मर्यादित झालय.

‘इक तो सजन मेरे पास नही रे’ ही संग्रहातील अतिशय सुरेख, भावुक, हळवी कथा. कथेच्या सुरूवातीला एका दृश्याचं वर्णन येतं. झेलमच्या साथीने जाणारा रस्ता जिथे तिची साथ सोडतो, तिथे चिनारचा एक पुरातन वृक्ष आहे. गावाची वस्ती जिथे संपते, तिथे हा वृक्ष आहे. नियमित पेट्रोलिंगसाठी जाणार्‍या विकास पाण्डेयला नेहमी वाटतं, तिथे उभ्या असलेल्या देखण्या, चित्ताकर्षक तरुणीला त्याला काही तरी सांगायचय आणि ते खरंच असतं. एक दिवस आपली जीप थांबवून तो तिची चौकशी करतो. ती सुंदर तर आहेच. पण तिचे डोळे त्याला दल आणि वुलर सरोवराचा तळ गाठणारे वाटतात आणि तिच्या नाजूक देहातून उमटणारा आवाज अतिशय गंभीर वाटतो. वेगळीच ओढ लावणारा. व्याकूळ करणारा. त्याला पाकिस्तानी गायिका रेशमाची आठवण होते. विशेषत: तिचं गाणं,  ‘चार दिना दा प्यार ओ रब्बा बडी लंबी जुदाई.’ तिच्या डोळ्यातली तळ गाठणारी दल आणि वुलरची सरोवरं, तर कधी त्यात उसळलेलं झेलमच तूफान आणि तिचा रेशमासारखा व्याकूळ करणारा आवाज आणि रेशमाचं ते गाणं.. लंबी जुदाई… याची गुंफण कथेमधून अनेक वेळा इतकी मोहकपणे आणि मार्मिकपणे झाली आहे, की सगळी कथा प्रत्यक्ष वाचायलाच हवी.  

ती तरुणी रेहाना. तिचा प्रियकर सुहैल गेल्या महिन्यापासून गायब आहे. त्याचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती ती मेजर विकास पाण्डेयला करते. तो तिला त्याचा शोध घेण्याचं आश्वासन देतो.

सुहैलचा शोध घेतल्यावर असं लक्षात येतं की तो सरहद्दीपलीकडे जिहादी कॅम्पमधे दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलाय. सुलतान नावाचा मेंढपाळ पाच हजार रुपये आणि दोन पोती आटा, डाळ याच्या मोबदल्यात, सुहैलशी मोबाईलवर बोलणं करून देण्याचा मान्य करतो. दिल्या शाब्दाला आणि दिल्या पैशाला, आटा-डाळीला तो जागतो. विकासाचं सुहैलशी बोलणं होतं. तो जन्नत म्हणून तिकडे गेलेला असतो. प्रत्यक्षात जहन्नूमचा अनुभव घेत असतो. आपल्याला यातून बाहेर काढण्याची तो विनंती करतो. विकास त्याला ‘सरहद्द पार करून या बाजूला ये, पुढचं सगळं मी बघेन’, असं सांगतो. एका जिहादी गटाबरोबर तो इकडे यायचं ठरवतो पण…

एके दिवशी विकासच्या चौकीवर, सरहद्दीजवळ एनकाऊंटर झाल्याची बातमी येते. सरहद्द पार करून येणार्‍या एका जिहादी दहशतवादी गटाला, आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सैन्याच्या तुकडीने मारून टाकल्याची ती बातमी असते. सुलताना नावाच्या कुणा मेंढपाळाने पन्नास हजार रुपयांच्या बदल्यात, ही खबर दिलेली असते. मेलेल्यांच्या यादीत सुहैलचंही नाव असतं.

त्या रात्री सायलेंट मोडवर असलेल्या विकासच्या मोबाईलवर रेहानाचा नंबर वारंवार फ्लॅश होत होता आणि त्याच्या लॅपटॉपवर रेशमा गात होती…

‘इक तो साजण मेरे पास नाही रे

दूजे मीलन दी कोई आस नही रे

‘गर्ल फ्रेंड’ ही कथा दहशतवाद्यांशी  प्रत्यक्ष झालेल्या चकमकीचं वर्णन करते. एका मोठ्या घरात दोन अफगाण दहशतवादी लपून बसल्याची माहिती कळते. त्यांचा सफाया करण्याचा प्लॅन ठरतो. त्या प्रमाणे अंमलबजावणी होते, पण अनपेक्षितपणे चकमकीला वेगळं वळण लागतं. मेजर प्रत्यूशचा बड्डी तळघर झाकणारी पट्टी उचकटणार असतो आणि प्रत्यूश आत ग्रेनेड टाकणार असतो. मेजर सिद्धार्थ व त्याचा बड्डी त्यांना फायरिंग कव्हर देणार असतात. सिद्धार्थ म्हणतो, ‘सर, तुम्ही अनेक यशस्वी ऑपरेशन्स पार पाडलीत, यावेळी मला ग्रेनेड आत टाकू द्या. प्रत्यूश मान्य करतो आणि दोघे आपआपल्या जागा बदलतात आणि अनपेक्षितपणे अफगाणीच अंदाधुंद गोळीबार करत, पट्टी उचकटून बाहेर येतात. या गोळीबारात सिद्धार्थ आणि त्याचा बड्डी धराशायी होतात. आपल्यासाठी बाहेर पडलेली गोळी सिद्धार्थचा जीव घेणारी ठरली, या विचाराने प्रत्यूश कासावीस होतो. त्याला सतत वाटत रहातं, आपण सिद्धार्थचं म्हणणं मान्यच केलं नसतं तर…

इतक्या गंभीर कथेचा शेवट मात्र नर्म विनोदाने होतो. इथे नर्स शकुंतलाला तो सांगतो, ‘मृत्यू समोर दिसत असताना मी माझ्या गर्ल फ्रेंडचे नंबर मोबाईलवरून डीलीट करत होतो कारण मी मेल्यानंतर माझ्या सामानासकट मोबाईल माझ्या बायकोकडे जाईल आणि मी तर तिला सांगितलं होतं की आता मी कुठल्याही गर्ल फ्रेंडच्या संपर्कात नाही. तिला हे नंबर बघून काय वाटलं असतं?’

असाच नर्म विनोदी शेवट ‘हॅशटॅग’ कथेचा आहे. ही समर प्रताप सिंह या तरुणाच्या एकतर्फी विफल प्रेमाची कहाणी. या कथेत प्रामुख्याने मिल्ट्री कॅंडिडेट्सना जे कठोर प्रशिक्षण दिलं जातं, त्याची माहिती येते. ही माहिती, समर आपल्या बहिणीला मुनमूनला आपल्या दिनचर्येची माहिती देतो, त्यावरून कळते.

लॅपटॉपवरून जेव्हा त्याला कळतं त्याची प्रेयसी सगुना हिचा साखरपुडा आदित्यशी झाला आहे, तेव्हा तो कासावीस होतो. सगुनाशी प्रत्यक्ष बोललं, तर ती आपलं प्रेम मान्य करेल अशीही त्याला भाबडी आशा आहे. यावेळी त्याच्या कंपनीतली सगळी मुले एकजुटीने कसं कारस्थान रचतात आणि दोन दिवसांसाठी वरिष्ठांच्या नकळत त्याला सगुनाला भेटायला कसं पाठवतात, याचं मोठं खुसखुशीत वर्णन कथेत येतं. हे सारं प्रत्यक्षच वाचायला हवं. तो रात्री तिला  भेटतो. ती अर्थातच त्याचं बोलणं धुडकावून लावते. मग तो त्याचा रहात नाही. फळं कापायची सूरी तो तिच्या पोटात खुपसतो आणि आपल्या कॅम्पसवर निघून येतो.

नंतर त्यांची पहिली टर्म संपते. सगुना सुखरूप असल्याचे त्याला कळते. त्याला आनंद होतो. सगुणा-आदित्यचं लग्नं होतं, हे कळल्याने त्याला दु:ख होतं. घरी आल्यावर सगुनाला एकदा तरी बघावं, म्हणून तो तिच्या घराजवळ रेंगाळतो. त्याला एकदा रिक्षात ती दिसते. त्याला पहाताच ती आदित्यला अधीकच खेटून बसते. त्यावेळी तो दोन प्रतिज्ञा करतो. एक म्हणजे तो आजन्म अविवाहित राहील आणि कधी तरी आपल्या विरह-व्यथेवर एक कथा लिहील, पण त्यात सगुना आदित्यला खेटून बसणार नाही, तर त्याच्यापासून दूर सरकून बसेल. वरील दोन्ही कथांमधून कठोर कथानायकांच्या निरागसतेचं मोठं मनोज्ञ दर्शन घडतं.            

‘चिलब्लेन्स’ म्हणजे हिमदंश. या कथेत ‘दर्ददपुरा’ या कुपवाड शहरापासून सुमारे ७० की.मीटर अंतरावर असणार्‍या खेड्याची आणि त्याच्या ‘दर्द’ची म्हणजे दु:खांची कहाणी येते. गाव इतकं सुंदर, जसं काही भोवतालच्या पहाडांनी आपले बाहू पसरून स्वर्गालाच कवेत घेतलय. पण गावाची दु:खे अनेक. वीज नाही. डॉक्टर नाही. उपचारासाठी लोकांना थेट कुपवाडाला जावं लागतं. मेजर नीलाभचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असलेल्या माजीदचं हे गाव. आपल्या दोन सुंदर मुलींना, शायर नवर्‍याला, भरल्या संसाराला सोडून माजीदची बायको एका जिहादीबरोबर गेलीय. गावात घरटी एक तरी जिहादी. त्यामुळे तरुण मुले बरीचशी गारद झालेली. उपवर मुलींसाठी मुलेच नाहीत. हे दु:ख तर काश्मीर घाटीतल्या अनेक ठिकाणांचे.

माजीदच्या वडलांच्या डाव्या हाताला चार बोटे नाहीत. त्याचे कारण नीलाभने विचारले असता, त्याला कळते, हिमदंशामुळे बोटात होणार्‍या वेदानांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वत:च केलेला हा उपचार आहे. बोटंच तोडण्याचा. नीलाभला वाटतं, सगळा ‘दर्ददपुरा’ आपल्याकडे बघून रडतो आहे. तो तिथून परत येताना ठरवतो, ‘हेडक्वार्टरकडे प्रस्ताव द्यायचा, की कंपनीच्या. डॉक्टरांनी आठवड्यातून दोन वेळा ‘दर्ददपुरा’ गावाला व्हिजीट द्यावी आणि त्याला वाटतं ‘दर्ददपुरा’ आता आपल्याकडे बघून हसतोय.

‘द बार इज क्लोज्ड ऑन च्युजडे. ही एक अगदी वेगळ्या प्रकारची कथा. रहस्यमय अशी ही भूतकथा तीन तुकड्यातून आपल्यापुढे येते आणि शेवट तर भन्नाटच. प्रत्यक्ष वाचायलाच हवा असा.

दुसरी शहादत, हैडलाईन, हीरो, आय लव्ह यू फ्लाय बॉय, अशा एकूण 21 कथा यात आहेत. अनेक विषयांवरच्या या सगळ्याच कथा वेधक आहेत. लेखकाची चित्रमय शैली, स्थल, व्यक्ती, घटना-प्रसंग यांचा साक्षात् अनुभव देणारी आहे. याला बिलगून आलेले काव्यात्मकतेचे तरल अस्तर, कथांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. ‘गर्ल फ्रेंड’, ‘हॅशटॅग’, ‘एक तो सजन …’ सारख्या काही कथा वाचताना वाटत राहातं, यावर उत्तम दर्जेदार चित्रपट होऊ शकतील. यातील कथांबद्दल किती आणि काय काय लिहावं? प्रत्येकाने प्रत्यक्षच वाचायला आणि अनुभवायला हवा, हिरव्या हास्याचा कोलाज.

– समाप्त – 

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “०९|०२… एक विशेष  दिवस” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “०९|०२… एक विशेष  दिवस” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

नऊ फेब्रुवारी. ही  तारीख बाबा आमटे ह्यांचा स्मृतीदिन. बाबांचे आनंदवन उभे करण्याचे, कृष्ठरोग्यांचे काळजी घेऊन त्यांना समाजिक पत मिळवून कामास लावणे हे बाबांचे कार्य माहिती नसलेली व्यक्ती विरळीच. याच तारखेला माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकापैकी एका पुस्तकाच्या लेखनाची सुरवात त्या लेखकाने केली होती. ते पुस्तक म्हणजे “श्यामची आई” आणि ते लेखक म्हणजे आपल्या सगळ्यांना आदर्शवत असलेले साने गुरुजी. साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल.

हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. खूप सारं शिकवणारं, शहाणपणा म्हणजे काय, किंचित कठोर माया म्हणजे काय हे ह्या पुस्तकाने शिकवलयं. हे पुस्तक वाचतांना डोळ्यातील पाणी, मनातील भावना उचंबळून येतात.

व्यक्तीपरत्वे, वयापरत्वे आवडीनिवडी ह्या बदलत जातात वा निरनिराळ्या असतात. परंतु काही गोष्टी ह्या कुठल्याही व्यक्तींना, कुठल्याही वयात आवडतातच. त्यांच दर्शन झाल्याबरोबर मन वा जीभ त्याला नकार हा देतच नाही, दिसल्याबरोबर कुठल्याही वयात ह्या गोष्टी साठी कायम हात पुढेच येतो. ती गोष्ट म्हणजे चाँकलेट.

आज व्हँलेंटाईन वीक मधील तिसरा दिवस, चाँकलेट डे. चाँकलेट म्हंटलं की मला आधी आठवते ती माधुरी, लाखो दिलोंकी धडकन, तीची ती हम आपके है कौन मधील चाँकलेट खाणारी “निशा”बघीतली की दिल खल्लास. माधुरी आणि चाँकलेट दोन्हीही माझे प्रचंड आवडते. चाँकलेट त्यातल्या त्यात डेअरी मिल्क कँटबरीज ची आवड ही माझ्यात आणि माधुरीत काँमन.

आज व्हँलेंटाईन उत्सवातील चाँकलेट डे. त्यावरून दरवर्षी प्रमाणे उद्या रस्त्यांवर चाँकलेट कँडबरीज चे रँपर्स अस्ताव्यस्त पडलेले दिसतील ह्या विचाराने खरचं विषण्ण वाटतं.  असे सार्वजनिक ठिकाणी चाँकलेट, कँडबरीज चे रँपर्स बेजबाबदारपणे फेकलेले बघून सुजाण नागरिकत्व नावाची काही चीज असते ह्या वरचा विश्वासच उडतो.

मुळात हा असा वेगळा म्हणून काही चाँकलेट डे असतो हे आता आता खर तर समजायला लागलं आहे. कारण बोलता यायला लागल्यापासून आमचा चाँकलेट डे म्हणजे आईने सगळ्यांना एकाचवेळी वरच्या फळीवरच्या डब्यातून सगळ्यांना समसमान मोजूनमापून हातावर टिकवलेलं चाँकलेट म्हणजे आमचा चाँकलेट डे. दुकानात जावून स्वतः सर्रास चाँकलेट्स मनाने, न विचारता विकत घेऊन येण्याची प्राज्ञाच नसायची तेव्हा. आमच्या लहानपणी तर चाँकलेट्स म्हणजे कँटबरीज ही संकल्पना ही कळली नव्हती.

आमचे तेव्हाचे चाँकलेट्स म्हणजे आँरेंज पेपरमींटच्या गोळ्या, रावळगाव चाँकलेट पारले चाँकलेट्स. काही काळाने ती संकल्पना राजमलाई ह्या चाँकलेट पर्यंत येऊन थांबली. माहेरच्या आडनावाचे राजमलाई अजूनही खूप प्रिय आहे. तेव्हा बाबा पगार झाल्यावर एकदा रानडेंच्या दुकानातून स्ट्रॉबेरी चे रंग रुप आकार असलेले, साखरेचे चाँकलेट घेऊन द्यायचे त्याच खूप अप्रुप वाटायचं, त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे आणि आनंद मनात तसाच तेवतोयं. मला वाटतं तेव्हा मिळणारी अल्प प्रमाणातील गोष्ट कदाचित जास्त आनंद देऊन जायची. वाट पाहून नंतर मिळणारी गोष्ट वेळेची किंमत समजवायची.

चाँकलेट्स अनेक फायद्यापैकी एक प्रमुख फायदा मध्यंतरी वाचनात आला. कँडबरी बाईट्स ह्या डिप्रेशन म्हणजेच मानसिक तणाव ब-याच प्रमाणात कमी करतात म्हणे. म्हणून मी तणाव यायच्या आधीच कँटबरीज खाल्याने तो तणाव आसपासही फिरकतं नाही. अशी मी मनाची समजूत घालून मस्त कँडबरीज चा आस्वाद घेत असते.

चला परत एकदा ह्या निमीत्ताने कँडबरीज ला न्याय देणार. लहानपणी आपण पुढे काय करिअर काय करायचं तर मनात सर्वात आधी यायचं आपण नक्की कँडबरीची फँक्टरी टाकायची. लहानपणची स्वप्नं पण खूप अफलातून असतात, नाही का?

परत एकदा मनापासून चाँकलेट डे च्या शुभेच्छा देऊन मनापासून आपल्या दातांची आणि असल्यास शुगरची काळजी घेऊन कँडबरीचा आस्वाद घेऊन बघा कसं मस्त तणावरहीत वाटतं ते, मग घरच्या लहानग्यांनी आश्चर्याने बघितलं तरीही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares