मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

(योगायोगच म्हणावा की यशोदाही याचवेळी आई होणार होती. पण मीही बाप होणार होतो याचा मला विसरच पडून गेला होता म्हणा !) – इथून पुढे —

व्यवहारी मनाला हा हिशेब पटला होता. माझी मुलगी वासुदेवाच्या हातून कंसाच्या हाती पडेल. आठवा मुलगा असणार होता… आणि हे तर स्त्री जातीचं अर्भक. स्त्री काय करणार या कंसराजाचं? असा विचार अविचारी कंस नक्कीच करणार. कंस तिला देवकीच्या हाती परत सोपवेल आणि निघून जाईल. देवकीचा कृष्ण माझ्याकडे आणि माझी माया देवकीकडे सुरक्षित वाढतील. पुढचं पुढं बघता येईल की… फक्त ही वेळ निभावून नेणं गरजेचं आहे. आणि काळाचंही हेच मागणं होतं माझ्याकडे.

मनावरचा गोवर्धन सावरून धरीत मी तिला दोन्ही हातांवर तोलून धरलं आणि छातीशी कवटाळलं. तिचे डोळे आता मिटलेले होते. आईच्या आधी ती बापाच्या काळजाला बिलगली होती. ती माझ्या हृदयाची कंपनं ऐकत असावी कदाचित. पण मला मात्र ते ठोके निश्चित ऐकू येत होते… नव्हे कानठळ्या बसत होत्या त्या श्वासांच्या आंदोलनांनी. चिखल तुडवीत निघालो. पाऊस थांबला होता. यमुनेपर्यंतची वाट हजारो वेळा तुडवलेली होती… पायांना सवयीची होती. तरीही वीजा वाट दाखवायचं सोडत नव्हत्या. मी आज चुकून चालणार नव्हतं हे त्यांना कुणीतरी बजावलेलं असावं बहुदा! पण माझी पावलंच जड झालेली होती. काही विपरीत घडलं तर या आशंकेने मनाच्या यमुनेत भयानक भोवरा फिरू लागला. योजनेनुसार नाहीच घडलं तर? कंसाशी गाठ होती. कंसाची मिठी सुटली तरच आयुष्याचं प्रमेय सुटण्याची आशा. अन्यथा त्याच्यात अडकून पडावं लागणार हे निश्चित होतं. तीरावर पोहोचलो. आता अंगावर खरे शहारे यायला सुरूवात झाली. यमुना दावं सोडलेल्या कालवडींसारखी उधळलेली होती रानोमाळ. वासुदेव येणार कसा या तीरावर? यमुनेच्या धारांच्या आवाजाने काही ऐकूही येण्यासारखी स्थिती नव्हती आणि त्यात त्या वीजा! माझ्या कुशीत मला बिलगून असलेल्या तिनं… डोळे किलकिले केले आणि यमुना दुभंगली! वाटेवर पाणी असतं, वाटेत पाणी असतं… इथं पाण्यात वाट अवतरली होती. आणि त्या अंधारातून दोन पावलं घाईघाईत या किना-याकडे निघालेली होती. त्या पावलांच्या वर जे शरीर होतं त्या शरीराच्या माथ्यावर एक टोपलं होतं… भिजलेलं. आणि त्यातून दोन कोमल पावलं बाहेर डोकावत होती… जणू ती पावलंच या पावलांना गती देत होती. इकडं माझ्या हातातल्या तिनं डोळे मिटून घेतले होते.

वासुदेव जवळ आला. बोलायला उसंत नव्हती. पण आधीच भिजलेल्या डोळ्यांत आसवं आणखी ओली झाली आणि बोलावंच लागलं नाही फारसं. त्याने टोपली खाली ठेवली. तो माझ्याकडे पाहू लागला. मी तिला वासुदेवाच्या हाती देताना शहारून गेलो. हातांना आधीच कापरं भरलं होतं. आणि त्यात ती माझ्याकडे पहात होती… मायेच्या डोळ्यांतली माया त्या अंधारातही ठळक जाणवत होती. वासुदेवानं तिला त्याच्याकडे अलगद घेतलं. मी त्याच्या मुलाला उचलून घेतलं. वासुदेवानं रिकाम्या टोपलीत तिला ठेवलं. तिने आता डोळे मिटले होते…. ती आता मथुरेकडे निघाली होती.. तिथून ती कुठं जाणार होती हे दैवालाच ठाऊक होतं.

“मुलगी आहे असं पाहून कंस हिला काही करणार नाही. ” वासुदेव जणू सांगत होता पण मला मात्र ते काही पटत नव्हतं… मला म्हणजे माझ्यातल्या पित्याला! धर्माच्या स्थापनेसाठी हा एवढा मोठा धोका पत्करावा लागणारच हे देहाला समजलं होतं पण मनाची समजूत काढणं अशक्य…. आणि त्या बालिकेच्या डोळ्यांत पाहिल्यापासून तर केवळ अशक्य! वासुदेव झपाझप पावलं टाकीत निघूनही गेला…. कंस कधीही कारागृहाचा दरवाजा ठोठावू शकत होता. त्याला त्या रात्री झोप लागू शकतच नव्हती. पण त्याच्या पापण्या क्षणार्धासाठी एकमेकींना स्पर्शल्या होत्या मात्र आणि लगोलग उघडल्या सुद्धा… पण या मिटण्या-उघडण्यामधला निमिष खूप लांबला होता त्या रात्री…. दोन जीवांची अदलबदल जगाला यत्किंचितही सुगावा लागू न देता घडून गेली होती. कृष्ण गोकुळात अवतरले होते आणि नंदनंदिनी माया कारागृहात देवकीच्या पदराखाली निजली होती.

माझ्या मनाने आता माझ्याच वै-याच्या भुमिकेत प्रवेश केला होता नव्हे परकाया प्रवेशच केला जणू. प्रत्यक्ष भगवंत माझ्या हातांत असताना मला कुशंकांनी घेरलं होतं पुरतं. कंस आधीच कारागृहात पोहोचला असेल तर? पहारेकरी जागे झाले असतील तर? कंसाला संशय आला तर? मन जणू यमुनेचे दोन्ही काठ…. प्रश्नांच्या पुराला व्यापायला आता जमीनही उरली नव्हती…. काळजाच्या आभाळापर्यंत काळजीचं पाणी पोहोचू पहात होतं…. विचारांचा गोवर्धन त्यात बुडून गेला होता…. पण त्याचं ओझं कमी मात्र झालं नव्हतं.

पण वाटेत एक गोष्ट लक्षात आली. मघासारखी थंडी नव्हती वाजत आता. बाळाला छातीशी धरलं होतं तिथं तर मुर्तिमंत ऊबदारपण भरून राहिलं होतं. बाळाचे आणि माझे श्वास आता एकाच गतीनं आणि एकच वाट चालत होते. तसाच यशोदेच्या कक्षात शिरलो आणि बाळाला तिच्या उजव्या कुशीशेजारी अलगद ठेवले आणि त्यानं आपण अवतरल्याचा उदघोष उच्चरवाने केला…. सारं गोकुळ जागं झालं…. अमावस्येच्या रात्री पूर्ण चंद्र आकाराला आला होता… हजारो वर्षांपूर्वी अयोध्येत भरदुपारी उगवलेला सूर्य आता गोकुळात चंद्राचं रूपडं लेऊन मध्यरात्री अवतरला होता. जगाच्या लेखी यशोदेला पुत्र झाला होता… नंदाला लेक झाला होता…. गायींना गोपाळ मिळाला होता आणि गवळणींना त्यांचा कान्हा! मी मात्र मथुरेकडे दृष्टी लावून बसलेलो!

वासुदेवही आता मथुरेत पोहोचला असेल… माझी लेक आता देवकीवहिनीच्या कुशीत विसावली असेल. माझी वासुदेवाच्या वाटेकडे पाठ असली तरी माझ्या मनाचे डोळे मात्र त्याचीच वाट चालत होते. मी बाळाला यशोदेच्या हवाली करून राजवाड्याच्या मथुरेकडे उघडणा-या गवाक्षाजवळ जाऊ उभा राहिलो…. !

नीटसं पाहूही शकलो नव्हतो तिला. डोळेच लक्षात राहिले होते फक्त… अत्यंत तेजस्वी. मूर्तीमंत शक्तीच. या मानवी डोळ्यांनी ते तेज स्मृतींमध्ये साठवून ठेवणं शक्तीपलीकडचं होतं. मथुरेकडच्या आभाळात वीजा आता जास्तच चमकू लागल्या होत्या. ढगांचा गडगडाट वाढलेला होता. काय घडलं असेल रात्री मथुरेच्या त्या कारागृहात? कंस कसा वागला असेल मुलगा जन्माला येण्याऐवजी मुलगी जन्मल्याचं पाहून? नियतीची भविष्यवाणी एवढी खोटी ठरेल यावर त्याचा विश्वास बसला असेल सहजी?

आणि एवढ्यात सारं काही भयाण शांत झालं घटकाभर…. सारं संपून तर नाही ना गेलं?

यानंतरचा एक क्षण म्हणजे एक युग. कित्येक युगं उलटून गेली असतील माझ्या हृदयातल्या पृथ्वीवरची. आणि तो क्षण मात्र आलाच…. अग्निची एक महाकाय ज्वाळा आभाळात शिरून अंतरीक्षात दिसेनाशी झाली… तिने मागे सोडलेला प्रकाशझोत मथुरेलाच नव्हे तर अवघ्या गोकुळालाही प्रकाशमान करून गेला…. मायाच ती… ती बरं कुणाच्या बंदिवासात राहील… सारं जग तिच्या बंधनात बांधले गेलेले असताना ती य:कश्चित मानवाच्या कारागृहातील साखळदंडांनी जखडून राहीलच कशी?

कंसाच्या हातून निसटून माझी लेक आता ब्रम्हांड झाली होती. माझी ओंजळ कदाचित तिचं तेज सांभाळून ठेवू शकली नसती म्हणून दैवानं तिला माझ्याच हातून इप्सित ठिकाणी पोहोचवलं असावं… परंतू तिचं जनकत्व माझ्या दैवात लिहून नियतीनं माझ्यावर अनंत उपकार करून ठेवले होते.

मायेने जाताना माझ्या काळजावरचा काळजीचा गोवर्धन अलगद उचलून बाजूला ठेवला होता… एका बापाचं काळीज आता हलकं झालेलं होतं !

पुत्रप्राप्तीच्या आनंदात यशोदा मग्न झाली आहे.. आता पुढे कित्येक वर्षे तिला हे कौतुक पुरेल.. अक्रूर गोकुळात येईपर्यंत. काही घडलंच नाही अशी भावना आता माझ्या मनात घर करू लागली आहे… नव्हे निश्चित झाली आहे… ही सुद्धा तिचीच माया!

(भगवान श्रीकृष्णांच्या जीवनकथा अलौकिक. त्यांचा जन्म आणि त्यांचं गोकुळात यशोदेकडे जाणं यावर करोडो वेळा लिहिलं, बोललं गेलं आहे. घटनाक्रम, संदर्भात काही ठिकाणी बदलही आहेत. पण ते सारे एकच गोष्ट सांगतात… श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ! हरी अनंत आणि हरिकथा अनंत ! नंदराजाचा विचार आला मनात आणि त्यांच्या मनात डोकावलं. आणि हे काल्पनिक शब्दांमध्ये उतरलं… प्रत्यक्षात जे काही घडून गेलं असेल ते समजायला माझ्या बुद्धीच्या मर्यादा आहेत. जय श्रीकृष्ण.)

– समाप्त – 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाईचा न दिसणारा संसार –‘कालनिर्णय’… लेखिका : अनामिक ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 बाईचा न दिसणारा संसार –‘कालनिर्णय’… लेखिका : अनामिक ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

आईनं रबरबॅन्डमध्ये रोल केललं कालनिर्णय कपाटातून बाहेर काढलं… देवासमोर ठेऊन त्याला हळद कुंकू वाहत नमस्कार केला आणि दरवर्षीप्रमाणं ते फ्रिजजवळच्या भिंतीवर लटकवलं. आई दरवर्षी हे असं करते… मनात प्रश्न आला… काय आहे या साध्या बारा कागदांमध्ये… म्हणून गेल्या वर्षीचं कालनिर्णय चाळत बसलो…

आईनं गॅस सिलेंडर लावलेली तारीख, बाबांच्या पगाराची तारीख, ताईची पाळी, किराणा भरल्याची तारीख व पैसे, दादाची परिक्षा, बचत गटात पैसे भरलेली तारीख, भिशी, दूध, पेपर व लाईट बिल भरल्याची तारीख, ईएमआयची तारीख, घरकाम करणा-या ताईंचे खाडे यासारख्या ब-याच गोष्टींच्या नोंदी होत्या या कालनिर्णयमध्ये… अगदी मावशीच्या मुलाच्या लग्नतारखेपर्यंत…

डिजीटल कॅलक्युलेटर जरी आकडेमोड करत असलं तरी महिनाभराचं आर्थिक नियोजन याच कागदी कालनिर्णयवर उमटत असतं. गरोदर महिलेच्या चेकींगची तारीख, नंतर तिच्या बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवल्याची तारीख ते अगदी बाळंतीण झाल्याचा दिवसही या कालनिर्णयमध्ये लिहून ठेवला जातो…

दहावी बारावी बोर्डाचं टाईमटेबल शाळेतून मिळाल्यावर ते घरी आल्या आल्या या कालनिर्णयवर नोंदवण्याची आमच्यात प्रथा असे… अगदी शाळेत दांडी ज्या दिवशी मारली ती तारीख ते लायब्ररीतून घेतलेलं पुस्तक परत करण्याची तारीख याची नोंद आर्वजून या कालनिर्णयवर व्हायची. सहकुटूंब बाहेर फिरायला जायचं म्हटलं तरी बिचा-या या कालनिर्णयला एक तास चर्चा ऐकावी लागे…

काही घरांमध्ये आजी आजोबांच्या औषधाच्या वेळाही कालनिर्णयवर पाहायला मिळतात. गंमत म्हणजे नवं कालनिर्णय आल्यावर घरातल्यांचे वाढदिवस कोणत्या वारी आलेत, हे पाहण्याचा एक जणू इव्हेंटच असतो. श्रावण, मार्गशीर्षातले उपवास यांचं एक वेगळंच स्थान या कालनिर्णयवर असतं. का कुणास ठाऊक पण संकष्टी चतुर्थी, आषाढी एकादशी, गणेशोत्सव, रक्षाबंधन, नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, होळी, संक्रांत यासारखे दिवस व सण कालनिर्णयमध्ये एकदा पाहूनही मन भरत नाही, ते पुन्हा पुन्हा पाहण्यात एक वेगळंच समाधान वाटतं.

हातात स्मार्टफोन, एक चांगली डायरी घरी असूनही गृहिणी अशा कालनिर्णय का लिहीत असतील बरं… कालनिर्णयचं निरीक्षण केल्यावर उत्तर मिळतं… डोळ्यांसमोर राहणारं शाश्वत असतं म्हणतात, तसंच काही गोष्टी परंपरागत आहेत… गृहिणी घरात ज्या ठिकाणी जास्त असते त्या स्वयंपाकगृहातच अधिककरून हे कालनिर्णय लावलं जातं. याच कालनिर्णयकडं पाहत एकीकडे बाईच्या मनात आठवड्याभराचं सारीपाट मांडणं सुरु असतं आणि दुसरीकडे तितकाच चोख स्वयंपाक सुरु असतो… या दोन्हीमध्ये गल्लत मुळीच होत नाही…

या कालनिर्णयकडे पाहिल्यावर असं वाटतं घरातल्या प्रत्येकाच्या सुख दुःखाची, चांगल्या वाईट परिस्थीतीची नोंद घेण्याची जबाबदारीच जणू या कॅलेंडरनं आपल्याकडे घेतलीये. कदाचित काही महिलांना या कालनिर्णयकडे पाहिल्यावर काहीसा आधारही वाटत असेल… इवल्याशा हुकवर वर्षभर लटकणारं हे कालनिर्णय पाहिल्यावर कदाचित अनेकांना बळही मिळत असेल…

इतक्यात आतून आईचा आवाज आला, “कालनिर्णय टाकून नको रे देऊ ते… इतक्यात नसतं टाकायचं… ” मला हसू आलं… पण खऱं सागू… ज्या कालनिर्णयवर वर्षभराच्या सुख दुःखाच्या, प्रत्येक घटनेच्या नोंदी झाल्या त्या कालनिर्णयविषयी आईच्या मनात हा जिव्हाळा निर्माण होणं स्वाभाविक आहे…

२०२३ चं कालनिर्णय पुन्हा रोल करून त्याला रबरबॅन्ड लावला. त्यावेळी जाणीव झाली आपल्या हातात आहेत, ते फक्त साधे बारा कागद नव्हे तर, बाईचा न दिसणारा संसार आहे… 

लेखिका : अनामिक

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “याला जीवन ऐसे  नाव….” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “याला जीवन ऐसे  नाव….” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

याला जीवन ऐसे नाव गुलजार ह्यांच्या रचना वाचल्यावर त्या मनात घट्ट रुतून बसतात, भावतात आणि विचारात देखील पाडतात. परवा गुलजार ह्यांच्या खूप आवडतील अशा आशयपूर्ण चार ओळी मैत्रीणीने पाठविल्यात. त्या पुढीलप्रमाणे.

“इतनी सी जिंदगी है, पर ख्वाब बहुत है ।

जुर्म का पता नही, साहब मगर इल्जाम बहुत है।।

खरचं तसं बघितलं तर ह्या मानवजन्माला आलो आणि अवघी एकच इनिंग खेळायचं परमिट मिळालं.त्या अवघ्या पूर्ण हयातीत बालपण आणि म्हातारपण हे तसे बघितले तर जरा परस्वाधीनंच. फक्त जे काही तरुणपण शिल्लक उरतं त्यात आपलं कर्तृत्व दाखवावं लागतं.

हे आपलं कर्तृत्व दाखविण्यासाठी आपण आपल्या जिवाचा आटापिटा करतो जेणेकरून जनतेच्या,लोकांच्या नजरेसमोर आपली उर्जितावस्था आली पाहिजे. सध्याचं आपलं जगं हे खूप आभासी जगं तयार झालयं.ह्या आभासी जगाचा हिस्सा काही मूठभर मंडळी सोडली तर जवळपास सगळेजणं बनतात.

ह्या आभासी जगात वावरण्यासाठी मग “माझा सुखाचा सदरा “ह्याच प्रेझेंटेशन जगासमोर केल्या जातं.कित्येक भावंड सोशल मिडीयावर भाऊबीज, राखीपोर्णिमेचे फोटो धूमधडाक्यात व्हायरल करतांना प्रत्यक्षात मात्र वयस्कर पालकांची जबाबदारी घेतांना वा मालमत्तेची वाटणी करतांना एक वेगळचं चित्र आपल्यासमोर आणतात. तसेच एकमेकांच्या आचारविचारात साधर्म्य नसलेली जोडपी “मेड फाँर इच अदर”भासवतं अँनिव्हर्सरी केक कापतांनाचे फोटो अपलोड करतात.प्रत्यक्षात ही धडपड, द्राविडीप्राणायाम, आटापिटा कशासाठी केल्या जातो हे एक न उलगडलेले कोडेच.काही वेळा आपल्याला इतरांसाठी पण जगावं लागतं म्हणां. कदाचित त्यासाठी असावं.

ह्या आपल्या छोट्याशा आयुष्याच्या तरुणपणाच्या काळात माणूस मात्र स्वप्नं खूप विणतो आणि हे स्वप्नं विणणं अगदी स्वाभाविक असतं.जणू “करलो दुनिया मुठ्ठीमे”सारखीच अवस्था जवळपास प्रत्येकाच्या जीवनात येतेच.

खरचं ही स्वप्नं विणतांना पण खूप मजा येते.काही स्वप्नं ही नशीबाने आपोआपच आपलं काही कर्तृत्व खर्च न करताच पूर्ण होतात,काही स्वप्नं ही धडपड करुन, जिवाचा आटापिटा करुन माणूस पूर्ण करतो.ह्यात त्रास,दगदग, मनस्ताप हा होतोच पण स्वप्नपूर्ती नंतरचा आनंद पण खूप सुख देऊन जातो.काही स्वप्नं ही तशी आवाक्याबाहेरची असतात, आपल्याला कळतं ही अशक्यप्राय आहेत पण तरीपण कुठेतरी असंही वाटत असतं एखादा चमत्कार घडेल आणि कदाचित आपलं हे स्वप्नं पूर्णत्वास जाईल सुध्दा.

ही स्वप्नं उराशी बाळगतं बाळगतं एकीकडे आपण आपल्या जबाबदा-या पार पाडण्याचे काम पण लिलया करीत असतोच.जो घरातील सर्वात जास्त जबाबदार व्यक्ती असतो त्याच्या माथी वाईटपणा हा अटळंच.आपल्या जबाबदा-या पार पाडतांना त्याला कित्येक जणांच्या रोषाला कारणीभूत व्हावं लागतं तर कित्येकांच्या नाराजीचं कारण म्हणजे जबाबदा-यांच ओझं वाहणारी व्यक्ती असते.

जबाबदा-या उचलतांना प्रसंगी व्यक्तींना काही वेळ कठोर भूमिका पण नाईलाजाने घ्यावी लागते.हे सगळं करीत असतांना नशीबाने चांगुलपणा पदरी पडला तर आपण नशीबवान खरे.

ह्या सगळ्या जबाबदा-या स्विकारतांना, प्रमुख भूमिका बजावीत असतांना,ब-याच वेळा घडलेल्या घटनांचे पडसाद जर सकारात्मक उमटले तर काहीच प्रश्न नसतो पण चुकून जर का काही उन्नीस बीस झाले वा पडसाद नकारात्मक उमटले तर दोष हा जबाबदार व्यक्तीच्याच माथी येतो.कित्येकदा आपला स्वतः चा गुन्हा,अपराध नसतांनाही आळ,आरोप हा अंगावर येऊन पडतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-1 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-1 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

(गदिमांच्या आंघोळीच्या ‘मिशा’ ते ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’.) 

गदिमांच्या आयुष्यात घडलेल्या काही गंमतशीर गोष्टी, त्यांच्या काही सवयी ज्या तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील !.

गदिमांना त्यांच्या मित्रांना गंमतशीर नावांनी हाक मारण्याची सवय होती. नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मधुकर कुळकर्ण्यांना “पेटीस्वारी”, राम गबालेंना “रॅम् ग्याबल”, वामनराव कुळकर्ण्यांना “रावराव”, पु.भा.भाव्यांना ‘स्वामी’, पु.ल.देशपांड्यांना ‘फूल्देस्पांडे’. राजा मंगळवेढेकर यांना ‘मंगळ’, ‘राजा ऑफ मंगळवेढा’. पंचवटीत येणारा नवखा असेल तर ‘या’ असे भारदस्त आवाजात स्वागत व्हायचे. सलगीच्या लोकांना ‘क्यो गुरू’, ‘काय माकडेराव?’, ‘कसं काय फास्टर फेणे?’ असे स्वागत ठरलेले असायचे. अनेक मित्रांची अशी वेगवेगळी नावे ठरलेली असायची.

पु.भा.भावे म्हणजे गदिमांचे खास मित्र! तेही गदिमांना काही नावाने हाक मारत – गम्पटराव, बुवा, स्वामी, डेंगरु, लाल डेंगा, वुल्फ ऑफ माडगूळ, चित्तचक्षुचमत्कारिक!.. आणि गदिमांकडून चक्क त्या नावांस प्रतिसादही मिळत असे!.

त्या काळात जशी गदिमा-बाबूजी जोडगोळी प्रसिद्ध होती, तशी त्याच्या आधी एक त्रिकुट प्रसिद्ध होते – ‘लाड-माड-पाड’.. लाड म्हणजे गीतरामायणाचे जनक सीताकांत लाड, माड म्हणजे ग.दि.माडगूळकर व पाड म्हणजे पु.ल.देशपांडे!

गदिमा आनंदात असले, कुठले काम किंवा गोष्ट मनासारखी झाली, किंवा आवडली, तर त्यांचे वाक्य असे –  ‘गुड रे, गुड गुड गुड गुड गुड गुड….’, तर कधी ‘बेस्टम बेस्ट आणि कोपरानं टूथपेस्ट!’

एकदा गदिमांचा संबंध कोल्हापूरच्या ‘उत्तमराव शेणोलीकर’ नावाच्या गृहस्थांशी आला. त्यांना हे नाव इतके आवडले की त्यांनी त्या नावाचे रूपांतर ‘उत्तमराव’ –> ‘बेष्टराव’ शेणोलीकर असे करून टाकले. घरात कुठला चांगला पदार्थ झाला की त्यांचे पेट वाक्य ठरलेले असे, ‘एकदम ‘बेष्टराव शेणोलीकर’ झाला आहे!’

गदिमांना एक फोन आला, त्यांनी स्वतःच उचलला, समोरून आवाज आला, “मला ग.दि.माडगूळकर यांच्याशी बोलायचे आहे. मी ‘सत्येन टण्णू बोलतो आहे.” गदिमांना वाटले कोणीतरी गंमत करतो आहे. त्यांनी हे आडनाव ऐकले नव्हते. ते लगेच उत्तरले, “मी माडगूळकर अण्णू बोलतो आहे, बोला!”

गदिमांनी मराठी चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवले होते. ते इतके व्यस्त असत की, सकाळी एक, दुपारी एक व रात्री एक अश्या तीन चित्रपटांच्या कथा ते दिवसभरात लिहायला बसत. कधी कधी त्यात साहित्यिक कार्यक्रम असत. ते १२ वर्षे आमदार होते, त्या संबंधित कार्यक्रम असत. ते तयार होत. जाणे आवश्यक असे, पण कंटाळले की तयार होऊन म्हणत, ‘आम्ही नाय जायचा’, नाही जायचा की अजिबात नाही जायचा…’ मग अगदी मुख्यमंत्र्या॓चीही भेट ठरलेली का असेना!

बऱ्याच वेळा सकाळी उठल्यापासून मित्रांच्या बैठकी रंगत. विद्याताई मधूनच राहिलेल्या आंघोळीची आठवण करत. शेवटी गदिमा नाखुषीने उठता उठता म्हणत, ‘पाच मिनिटात आंघोळीच्या मिशा लावून येतो!’ ‘आंघोळीच्या मिशा’ हे एक गंमतशीर प्रकरण होते. एक गाणे होते गौळण खट्याळ कृष्णाला यमुनेच्या काठावर लाडिक रागाने म्हणत असते, ‘आंघोळीच्या मिषाने भिजविलेस अंग…’ पण एकदा गदिमांच्या नेम्याला (नेमीनाथ उपाध्ये उर्फ पुणे आकाशवाणीचे ‘हरबा’) प्रश्न पडला की ‘आंघोळीच्या मिशा’ कसल्या?  आणि तेव्हापासून गदिमा ‘आंघोळीच्या मिशा लावू का?’, ‘आंघोळीच्या मिशा लावून टाकतो म्हणजे सुटलो’, अशीच स्नानाच्या बाबतीत भाषा वापरत असत.

गदिमांचे एक मित्र होते ‘बाळ चितळे’ नावाचे. त्यांची एक वेगळीच तऱ्हा होती. सगळ्यांसारखे न करता वेगळे काहीतरी करायचे. उदा. सगळेजण हॉटेलमध्ये गेले आहेत व सगळ्यांनी डोसा मागविला, तर हे मिसळ मागविणार! अगदी सगळे करतील, त्याच्या बरोबर उलटे करायचे. यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आमच्या घरात कोणी असे वेगळे वागायला गेला की त्याला ‘बाळ चितळे’ ही पदवी मिळत असे!.

गदिमांना कधी कधी छोटे अगदी सर्दीसारखे आजार पण सहन होत नसत. मग अगदी शिंक आली तरी त्यांचे मरणवाक्य सुरू होई, ‘मरतंय की काय आता!’ बिलंदरपणा हा त्यांच्यात ठासून भरलेला होता. हे सर्व गुण जन्मजात माडगूळच्या मातीतून आलेले होते. एकदा माडगूळ गावात सभा झाली. सभेनंतर एकाने टेबल-खुर्ची-सतरंजी या सकट अध्यक्ष, वक्ते यांचे आभार मानले. ते आभाराचे भाषण सीतारामबापू नावाच्या सरपंचाना इतके आवडले की, पुढे बोलताना बापू आभार शब्दाशिवाय बोलेनासेच झाले. अगदी त्यांना कोणी सांगितले की, ‘अमक्या तमक्याला मुलगा झाला’. तर ते चटकन म्हणायचे, ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’ कोणी बातमी दिली की कडब्याच्या गंजीला आग लागली, तर बापू झटक्याने म्हणणार, ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’ शेवटी सगळ्या गावाने त्यांचे नाव ‘आभार सीताराम’ असे ठेवले होते. तर सांगायचे असे की, हे विनोदी गुण बहुतेक गदिमांना आपल्या गावाकडच्या मातीतून व माणसांकडून उपजतच मिळाले होते.

गदिमांच्या धाकट्या भावाचे लग्न होते. वऱ्हाड घेऊन मंडळी लग्नघरी गेली. नवरा मुलगा बघायला नवरीच्या मैत्रिणींची पळापळ सुरू झाली. नवरा मुलगा कुठला, हे कोणालाच माहीत नव्हते. एक कोणीतरी मैत्रीण मोठ्याने गावाकडच्या टोनमध्ये म्हणाली, ‘कोन्ता ग कोन्ता?’ झालं. पुढचे अनेक दिवस कुठल्याही बाबतीत चौकशी करायची असेल तर गदिमांचे वाक्य तयार असे ‘कोन्ता ग कोन्ता?’ एखादे वाक्य दुसऱ्याला कंटाळा येईपर्यंत लावून धरणे, हे आम्हा माडगूळकरांचे खास वैशिष्ट्य!.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री सुमित्र माडगूळकर

प्रस्तुती : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके 

वासुदेव दादाला शब्द दिला होता खरा…पण प्रत्यक्षात तो शब्द पाळण्याची वेळ आली तेंव्हा यशोदेच्या शेजारून तिला अलगद उचलताना हात प्रचंड थरथरू लागले!

पुरूषांचं काळीज पाषाणाचं असतं तसं माझंही असेल असा माझा समज होता. पण याच पाषाणातून कधी माया पाझरू लागली ते माझं मलाही समजलं नाही…होय माझ्या पोटी माया उपजली आहे!

आणि या पाझरानं आजच्या या भयाण रात्री महाप्रलयाचं रूप धारण केलं आहे. यमुनेच्या उरात जलप्रलय मावत नाहीये. तिला आणखी दोनचार काठ असते तरीही ते तिला अपुरेच पडले असते त्या रात्री. वीजांचा एरव्ही लपंडाव असतो पावसाच्या दिवसांत. पण आज त्या लपत नव्हत्या…आभाळात ठाण मांडून होत्या! एक चमकून गेली की तिच्या पावलावर पाऊल टाकून दुसरी वीज धरणीला काहीतरी सांगण्याच्या आवेगात आसमंत उजळून टाकीत होती. या दोन क्षणांमधल्या अवकाशातच काय ती अमावस्या तग धरून होती. अमावस्येला निसर्गाने जणू आज खोटं पाडण्याचा चंग बांधला होता. अमावस्या म्हणजे काळामिट्ट अंधार….पण आजच्या रात्री अंधाराने काळेपणाशी फारकत घेतली होती….जगाचं माहित नाही…पण मला तरी स्पष्ट दिसत होतं…सारं काही!

दूर मथुरेच्या प्रासादातले दिवे लुकलुकत होते. आणि तिथून जवळच असलेल्या कारागृहाच्या भिंतीवरच्या पहारेक-यांच्या हातातील मशाली लवलवत होत्या…काहीतरी गिळून टाकण्यासाठी. या कारागृहाने आजवर सात जीव गिळंकृत केले होतेच. त्याच्या भिंतींवर रक्ताचे डाग सदोदित ताजेच भासत असत. सुरूवातीपासून आठ जन्म मोजायचे की शेवटापासून मागे मोजत यायचे हा प्रश्न नियतीने कंसाच्या मनात भरवून दिला होता. पाप कोणताही धोका पत्करत नाही. धोका पत्करण्याचा मक्ता तर पुण्याने घेतलेला असतो. पापाला अनेक सल्ले मिळतात आणि पुण्याला सल्ल्याची आवश्यकताच नसते.!

आज देवकी गर्भारपणाच्या नवव्या महिन्यानंतरच्या नवव्या दिवसात गवताच्या गंजीच्या बिछाण्यावर

निजून आहे. आणि याची तिला सवय झालीये गेल्या सात वर्षांपासून. खरं तर ती राजकन्या. सोन्याचा पलंग आणि रेशमाची सेज तिच्या हक्काची होती. पण दैवगतीपुढे तिचाही नाईलाज होता. तिची कूस माध्यम होणार होती एका धर्मोत्थानाची. पण त्यासाठी तिला एक नव्हे, दोन नव्हे तर आठ दिव्यांतून जावे लागणार होते. पण कसं कुणास ठाऊक आज तिला प्रसुतीपूर्व कळा अशा जाणवतच नव्हत्या..आधीच्या खेपांना जाणवल्या होत्या तशा. आज अंगभर कुणीतरी चंदनाचा लेप लावल्यासारखं भासत होतं. रातराणी आज भलतीच बहरलेली असावी कारागृहाबाहेरची. पहारेकरी देत असलेले प्रहरांचे लोखंडी गोलकावरचे कर्णकर्कक्ष ठोके आज तसे मधुर भासत होते. घटिका समीप येऊ लागली होती. आज तो येणार..आठवा! त्याच्या आठवांनी आत्मा मोहरून गेला होता. पावसाची चिन्हं होती सभोवती आणि वा-यातून पावा ऐकू येऊ लागला होता.

यशोदेच्या दालनाबाहेर मी दुस-या प्रहारापासूनच येरझारा घालीत होतो, याचं सेविकांना आश्चर्य वाटत नव्हतं. या गोकुळाच्या राज्याला वारस नव्हता लाभलेला अजून. बलराम होता पण तो यशोदेचा नव्हता. वासुदेवाचा होता. आम्हांला आपलं बाळ असण्याचा कित्येक वर्षांनी योग आला होता. राजाला चैन कसे पडेल? त्यात हा पाऊस! एखाद्या अनाहूत पाहुण्यासारखा….घडणा-या सर्वच घटनांचा साक्षीदार होण्याचा प्रयत्न करणारा. तो जा म्हणता जाणार नाही!

मध्यरात्र जवळ येऊन उभी आहे सर्वांगी थरथरत. तिलाही जाणीव झालेली असेलच की तिच्या उदरातून उदय होऊ पाहणा-या विश्वाची. माझ्या महालाबाहेर पहा-यावर असणारे गोपसैनिकही आता पेंगळून गेले आहेत. दिवसभर गायी चारायला जाणारी आणि दिवेलागणीला गोकुळात येणारी माणसं ती. त्यांनाही प्रतिक्षा होती त्यांच्या राजाच्या भविष्याची. सुईणी तर दुपारपासूनच सज्ज होत्या. दासी आज त्यांच्या घरी जाणार नव्हत्या. कोणत्याही क्षणी जन्माचं कमलदल उमलेल ते सांगता येत नव्हतं. गोठ्यांतील गायींचाही आता डोळा लागलेला असावा कारण त्यांचं हंबरणं कानी येईनासं झालं होतं आणि त्यांच्या वासरांचे नाजूक आवाजही. पोटभर दूध पिऊन झोपली असतील ती लेकरं.

यशोदेला कळा सुरू होऊन आता तसा बराच उशीर झाला होता. ती प्रचंड अस्वस्थ होती पण तिच्या डोळ्यांत आज निराळीच चमक. अंग चटका बसावा इतकं उबदार लागत होतं. सुईणी सांगत होत्या तशी यशोदा कळा देत होती पण तिची सुटका काही होत नव्हती.

माझी एक नजर यशोदेच्या कक्षातून येणा-या आवाजाकडे तर एक नजर यमुनेपल्याडच्या काठाकडे खिळून राहिलेली होती. आज त्या काठावरून या गोकुळाच्या काठावर प्रत्यक्ष जगत्जीवनाचं आगमन होणार होतं. पण यमुना तर आज भलतीच उफाणलेली! तिला काय झालं असं एकाएकी. असे कित्येक पावसाळे पाहिले होते मी आजवर पण आजचा पाऊस आणि आजची यमुना…न भूतो! पण माझी ही अवस्था कुणाच्या ध्यानात येण्यासारखी परिस्थिती नव्हती. यशोदा तर भानावर असण्याचा प्रश्नच नव्हता. एका जीवाला जन्माला घालताना तिचा जन्म पणाला लागलेला होता.

कळा देऊन यशोदा क्लांत पहुडलेली….सुईणीच्या,दासींच्या पापण्या अगदीच जडावलेल्या होत्या. मानवी देहाच्या मर्यादा त्यांनाही लागू होत्या. त्या निद्रेच्या पांघरूणाखाली गडप झाल्या…तारका काळ्या ढगांनी व्यापून जाव्यात तशा. त्या रात्रीतील सर्वांत मोठी वीज कडाडली आणि इकडे यशोदा प्रसुत झाली….आणि लगोलग तिला बधिरतेने व्यापलं…ती स्थळ-काळाचे भान विसरून गेली. गायींसाठीच्या चा-याचं प्रचंड ओझं डोक्यावरून खाली उतरवून एखादी गवळण मटकन खाली बसावी तशी गत यशोदेची. बाळाच्या श्वासांचा स्पर्श गोकुळातल्या हवेला झाला आणि सर्वकाही तिच्या प्रभावाखाली आलं. मायेचा प्रहर सुरू झाला होता…गोकुळ भारावून गेलं होतं…निपचित पडलं होतं आणि माया गालातल्या गालात मंद स्मित हास्य करीत कक्षाच्या दरवाज्याकडे पहात होती.

मी लगबगीने आत शिरलो तसा माझ्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश आला. डावा हात डोळ्यांवर उपडा ठेवीत ठेवीत मी यशोदेच्या पलंगापर्यंत पोहोचलो…ती निपचित झोपलेली…तिच्या चेह-यावर पौर्णिमेचं चांदणं.

मला आता थांबून चालणार नव्हतं. वासुदेव यमुना ओलांडून येतच असावा….मला यमुनातीरी पोहोचलं पाहिजे. आणि मी लगबगीनं बाळाच्या मानेखाली हात घातला आणि तिच्या डोळ्यांकडे लक्ष गेलं. कक्षातील दीप अजूनही तेवत होते. बाहेरचा थंड वारा गवाक्षांचे पडदे सारून आत घुसण्याचा प्रयत्न करीत होता. हे तर मुलीचे डोळे….माझ्या मुलीचे डोळे! डोळ्यांच्या मध्यभागी जणू सारी काळी यमुना जमा झालेली. आणि त्या दोन डोहांभोवती पांढरे स्वच्छ काठ. आता मात्र माझी नजर खिळून राहिली….मी सारे काही विसरून जातो की काय असं वाटू लागलं. आणि ठरलंही होतं अगदी असंच…मी सारं काही विसरून जाणार होतो नंतर.

मायेच्या पुरत्या अंमलाखाली जाण्याआधी तिला उचलली पाहिजे सत्वर असं एक मन सांगत होतं पण बापाचं काळीज….गोकुळाच्या वेशीवर असलेला सबंध गोवर्धन येऊन बसला होता काळजावर. आणि तो हलवायला अजून कृष्ण गोकुळात यायचा होता! तोपर्यंत हे ओझं मलाच साहावं लागणार होतं!

वासुदेवाला शब्द देताना किती सोपं सहज वाटलं होतं सारं! दैवाची योजनाच होती तशी. मथुरेत देवकीनंदन येतील आणि गोकुळात नंदनंदिनी. तो वासुदेव-देवकीचा आठवा तर ही माझी,नंद-यशोदाची पहिली! बाप होण्याची स्वप्नं पाहून डोळे आणि मन थकून गेलं होतं. यशोदा गर्भार राहिल्याचं समजताच मला आभाळ ठेंगणं झालेलं होतं. गाईला वासराशिवाय शोभा नाही आणि आईला लेकराशिवाय. शेजारच्या गोठ्यांतील गायींची वासरं पाहून इकडच्या गायी कासावीस झालेल्या पाहत होतो मी. आणि आता माझा मळा फुलणार होता…..मी आणि यशोदा..आमच्या दोघांच्या मनांची रानं अपत्यप्राप्तीच्या सुखधारांनी आबादानी होऊ पहात होती. स्वत:च्या शिवारात आता स्वत:ची बीजं अंकुरणार होती…ही भावना ज्याची त्यालाच समजावी अशी!

कंसाने सात कळ्या खुडून पायातळी चिरडल्या होत्या आणि आता फक्त एक कळी यायची होती वेलीवर. काटेरी कुंपणाआड वेल बंदिस्त होती. वा-यालाही आत जाण्यास कंसाची अनुमती घ्यावी लागत होती. देवकीच्या उदरातून अंकुरलेला जीव मोठा होऊन त्याला संपवणार होता म्हणून तो मोठा होऊच द्यायचा नाही असं साधं सरळ गणित त्याचं. योगायोगच म्हणावा की यशोदाही याचवेळी आई होणार होती. पण मीही बाप होणार होतो याचा मला विसरच पडून गेला होता म्हणा !

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनोरुग्णांचा कुंभमेळा… — लेखक : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मनोरुग्णांचा कुंभमेळा… — लेखक : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

तुमचं नातं कितीही जवळचं असो….

जाणं येणं कमी झालं .. गाठीभेटी कमी झाल्या .. संवाद होईनासा झाला की प्रेमाला , आपुलकीला ओहटी लागणारच !

शेअरिंग झाल्याशिवाय , दुःख सांगून रडल्याशिवाय कुणीही कुणाचं होऊच शकत नाही !

 

आणि हल्ली हेच होईनासे झाले आहे

किंवा कमी कमी होत होत बंद होण्याच्या मार्गावर आहे !

आपल्याच हाताने आपल्या जवळच्या नात्याला जर तुम्ही अग्नी देणार असाल तर जगण्यामध्ये उदासीनता , डिप्रेशन , भकास वाटणे हे होणारच !

नको तितकी आर्थिक संपन्नता आणि प्रमाणाच्या बाहेर प्रॉपर्टी गोळा करण्याच्या विळख्यात माणूस सापडला की जगण्यातला आनंद , मजा संपणारच !

 

म्हणून Hi , Hello वाली मंडळी जमा करण्यापेक्षा माणसं जपा , नाती जगा !

सुखदुःखात साथ देणारे दोन चार मित्र , हाकेला धावून येणारे सख्खे शेजारी आणि वेळ प्रसंगी धाऊन येणारी चार रक्ताची नाती जर आपल्या जवळ असतील , तर आणि तरच आपले जगणे सुसह्य होऊ 

शकते , नसता मनोरुग्णाच्या कुंभमेळ्यातले आपणही एक मनोरुग्ण व्हायला वेळ लागणार नाही !

 

मी आणि माझं कुटुंब इतक्या छोट्या वर्तुळात आपण ” सुख मिळवण्याचा ” प्रयत्न करत असाल तर आपल्या प्रयत्नांना तडे जाऊ शकतात !

एखाद्या विषयातलं जबरदस्त टॅलेंट , त्याच्या पोटी मिळणारे गलेलठ्ठ पॅकेज ,उच्चभ्रू  सोसायटीतला वेल फर्निशड् फ्लॅट आणि पार्किंग मध्ये असलेली चकचकीत गाडी म्हणजे सुख , या भ्रमातून बाहेर पडा !

काही नाती तरी जपा .. कुणाकडे तरी जात जा .. कोणाला तरी बोलवत जा

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यक्त न होता , दुःख न सांगता कुढण्यापेक्षा जे आहे ते सांगून मस्तपैकी मोकळं रडा !

…. लक्षात घ्या खळखळून हासल्याशिवाय आणि मोकळं रडल्याशिवाय तुम्ही तणावमुक्त होऊच शकत नाही . भावनांचा निचरा झाल्याशिवाय टेन्शन कमी होणारच नाही आणि त्याशिवाय माणूस आनंदी राहूच शकणार नाही .

 

आणि दुसरी महत्वाची गोष्ट …

…. आपलं समजून तुमच्याजवळ जर कुणी मन मोकळं केलं तर त्याचे गॉसिपिंग करू नका , पाठ वळली की त्या व्यक्तीला हसू नका !

…. इतरांना कुत्सितपणे हसण्याची आणि पदोपदी दुसऱ्याला टोमणे मारण्याची सवय लागली की आपल्या मनाला झालेला कॅन्सर थर्ड स्टेजला गेला आहे , असे समजण्यास काहीच हरकत नाही.

लेखक : प्रा.विजय पोहनेरकर

मो 94 20 92 93 89

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्वामी विवेकानंद-ज्योतिर्मय आदर्श’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

‘स्वामी विवेकानंद-ज्योतिर्मय आदर्श’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार वाचकांनो!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचे निमित्य साधण्यासाठी हा लेख आहेच! पण या वर्षाच्या नूतन लेखासाठी माझे आदर्श स्वामी विवेकानंदांविषयी लिहिण्याची संधी मिळणे यापेक्षा दुसरे औचित्य कांहीच असू शकत नाही. आपण ‘स्वामी’ या नावाचा उच्चार करताक्षणी आपल्या डोळ्यासमोर भगव्या वस्त्रांकित, एकाकी जंगलात किंवा गुहेत कठोर तपश्चर्या करणारे एखादे व्यक्तिमत्व उभे राहते! जाणून बुजून स्वीकारलेल्या अशा विजनवासाचे कारण असते, या नश्वर जगातील मायेच्या मोहपाशातून मुक्ती शोधत ईश्वर प्राप्तीचे! 

पण मंडळी याला एक अपवाद स्मरतो, स्वामी विवेकानंद, हिंदू धर्माच्या समृद्ध संकल्पनेचे महान वैश्विक दूत! ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच संपूर्ण वसुधा किंवा विश्व हे एका कुटुंबासारखे आहे, हा मौलिक आणि अमूल्य संदेश जगाला देणारे खरे खुरे जागतिक नेते! मैत्रांनो, आजच्या पवित्र दिनी अर्थात, १२ जानेवारीला या महान वैश्विक नेत्याची जयंती आहे. १८६३ साली या तारखेला कोलकाता येथे जन्मलेल्या, ‘ईश्वराबद्दल पूर्ण अविश्वासी’ अशा अत्यंत जिज्ञासू नरेंद्रनाथ दत्त (स्वामीजींचे पूर्वीचे नाव) हे अनेक ज्ञानी लोकांना आणि संतांना प्रश्न विचारायचे, “तुम्ही ईश्वर पाहिलाय कां?” दक्षिणेश्वर मंदिरातील ‘काली माँ’ चे प्रखर, अनन्य भक्त, महान संत, स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याकडून मात्र एकमेव ‘हो’ असे उत्तर आले आणि मग गुरू आणि शिष्याचा लौकिक अणि पारलौकिक असा ऐतिहासिक समांतर प्रवास सुरू झाला. यांत नरेंद्रला देवी माँ आणि त्याच्या परम गुरूंचे शुभाशीर्वाद आणि मोक्षप्राप्ती मिळती झाली.

स्वामीजी महान भारतीय संन्यासी आणि महान तत्वज्ञानी होते. १९ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे जागतिक धर्माच्या संसदेत, विवेकानंदांचे सुप्रसिद्ध भाषण म्हणजे ‘हिंदू धर्म आणि आंतरधर्मीय संवादाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि प्रभावशाली क्षण’ होता हे स्पष्टपणे दिसून आले. जेव्हां इतर सर्व धार्मिक नेते अत्यंत औपचारिकपणे ‘सभ्य स्त्री पुरुषहो!’ म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते, तेव्हां ब्रिटिश भारताच्या या युवा आणि तेजस्वी प्रतिनिधीने उपस्थित ७००० हून अधिक प्रतिष्ठित सभाजनांना ‘माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो’ असे प्रेमभराने संबोधित केले. धर्म, वंश, जात अन पंथ ही सर्व बंधने झुगारून या अलौकिक बुद्धिमत्तेच्या स्वयंप्रकाशित तरुणाने मानवतेच्या समान धाग्याने सभागृहातील प्रत्येक व्यक्तीशी अनवट नातं जोडलं. त्यानंतर तीन मिनिटांहून अधिक काळ हे सर्वस्वी परके लोक त्याला टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद देते झाले यात नवल ते काय? म्हणून त्याला भाषणासाठी दिलेला अल्पावधी मोठ्या आनंदाने वाढवला गेला.या प्रथम दिव्य भाषणाचे अनोखे प्रतीक म्हणून ‘दि आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो’ मध्ये आजही हे ‘४७३ प्रकाशमय शब्द’ अभिमानाने प्रदर्शित केला जात आहेत. या एका भाषणाने जणू या तेजस्वी भारतपुत्राने अखिल जग पादाक्रांत केले आणि नंतर जगभरातील अनेक ठिकाणी त्याला अति सन्मानाने मार्गदर्शन वक्ता म्हणून आमंत्रित केले गेले.

अतीव आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या या पहिल्या भाषणात स्वामीजी म्हणाले होते, ‘धर्म हा भारताचा अग्रक्रम नाही, तर गरिबी आहे!’ आपल्या गरीब भारतीय बंधुबांधवांची हर तऱ्हेने उन्नती व्हावी हे त्यांचे मूलभूत लक्ष्य होते. याच सामाजिक कारणासाठी ‘रामकृष्ण मठ’ आणि ‘रामकृष्ण मिशन’ ची स्थापना करण्यात आली. हे मिशन जगातील २६५ केंद्रांद्वारे (२०२२ च्या आकडेवारीनुसार भारतात अशी १९८ केंद्रे आहेत) गरजू लोकांना सेवा पुरवते. धार्मिक प्रवचनांच्या पलीकडे जाऊन या संस्था बरेच कांही करतात. हे मिशन स्वामीजींचे स्वप्न पुढे नेण्यासाठी, तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी असते. स्वामीजी आणि त्यांच्या शिष्यांच्या विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या साहित्याद्वारे या उद्दिष्टांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. मिशनद्वारे चालवण्यात येणारी धर्मादाय रुग्णालये, फिरते दवाखाने आणि प्रसूतीकेंद्रे भारतभर विखुरलेली आहेत. तसेच मिशनची परिचारिकांसाठी प्रशिक्षण केंद्रे, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम देखील आहेत. हे सामाजिक कार्य ग्रामीण आणि आदिवासी कल्याण कार्यासोबत समन्वय साधीत अव्याहतपणे सुरु आहे. शाळांमध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, अल्पाहार आणि पुस्तके दिली जातात.

मानवतेची मूर्तिमंत प्रतिमा, निस्वार्थी सामाजिक नेते आणि हिंदू धर्माचे कट्टर अनुयायी असलेल्या स्वामीजींनी प्रत्येक भारतीयात देव पाहिला. त्यांनी संपूर्ण देशाचा पायी प्रवास केला. जनतेशी जवळीक साधत त्यांनी भारतीयांचे प्रश्न समजावून घेतले, आत्मसात केले अन त्यांच्या या प्रश्नांचा गुंता सोडवण्यात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांचे दिव्य प्रतिभासंपन्न गुरु परमहंस यांच्या सांगण्यावरून त्यांनी हा संपूर्ण भारत-प्रवास केला. परमहंसांनी स्वामीजींना बहुमोल सल्ला दिला होता, “हिमालयाच्या गुहांमध्ये ध्यान करीत केवळ स्वतःची मुक्ती साधण्यापेक्षा भारतातील सकल गरीब लोकांची सेवा कर.” आपल्या गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानीत प्रकृती अस्वास्थ्य असतानाही विवेकानंदांचे हे सेवाव्रत सुरूच होते. स्वामीजी ४ जुलै १९०२ रोजी वयाच्या जेमतेम ३९ व्या वर्षी बेलूर मठ, हावडा येथे महा-समाधीत लीन झाले. 

मैत्रांनो, स्वामीजींच्या प्रेरणादायी उद्धरणांची वारंवार आवर्तने होता असतात. त्यांपैकीच माझ्या आवडीची त्यांची काही अनमोल वचने उद्धृत करते:

*परमेश्वराची लेकरे असल्याचा आत्मविश्वास

“तू सर्वशक्तिमान आहेस. तू कांहीही आणि सर्व काही करू शकतोस”

*आत्मचिंतन

“दिवसातून किमान एकदा स्वत:शी बोला, नाहीतर तुम्ही या जगातील एका बुद्धिमान व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल”

*अडथळे आणि प्रगती

“ज्या दिवशी तुम्हाला कोणतीही समस्या भेडसावत नाही, तेव्हा तुम्ही खात्री बाळगू शकता की, तुम्ही चुकीच्या मार्गाने प्रवास करत आहात”

प्रिय वाचकांनो, आजच्या या विशेष दिनी भारताचे महान सुपुत्र, प्रभावशाली तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि संपूर्ण जगाला वंदनीय असलेले वेदांताचे विश्व प्रचारक अशा स्वामी विवेकानंदांच्या स्मृती-चरणी विनम्र प्रणाम करून त्यांचे प्रेरणादायी तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करू या!

धन्यवाद🙏🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक-१२ जानेवारी २०२४

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज मलाही वाटलं  नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला,  श्वापदांच्या पदभाराने  त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या  गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा  पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती  त्यासंगितातून…  तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला  रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून  समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला  वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गानसरस्वती… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ गानसरस्वती… ☆ श्री विश्वास देशपांडे

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्याबद्दलचा एक किस्सा नुकताच वाचनात आला. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील एका सभागृहात किशोरीताईंचे गाणे सुरु होते. कार्यक्रम नुकताच सुरु झाला होता आणि साऊंड सिस्टीम बिघडली. संयोजकांनी बरेच प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. ताई स्टेजवरून उठून गेल्या. श्रोत्यांमध्ये कुजबुज सुरु झाली. आता काय होईल ? दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. कोणी म्हणाले ताईंचा स्वभाव विचित्र आहे. कोणी म्हणाले त्या स्वतःला फार ग्रेट समजतात. ज्याला जे वाटले ते तो बोलू लागला. शेवटी कोणी तरी बराच प्रयत्न करून साऊंड सिस्टीम सुरु केली. ताई आतमध्ये होत्या. कोणीतरी भीतभीतच त्यांना सांगितले की साऊंड सिस्टीम सुरु झाली आहे.

ताई आल्या. त्यांनी गायला सुरुवात केली. हळूहळू मैफलीत रंग भरू लागला. उत्तरोत्तर मैफल अधिकाधिक गहिरी होत गेली. ताईंचा स्वर सप्तकातून सहज विहार करू लागला. जणू आपल्या गायनातून त्यांनी अनंताचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांची गानसमाधी लागली. त्यांच्याबरोबर श्रोते देखील स्वरांच्या पावसात चिंब झाले होते. ताईंच्या सुरात भक्तीभाव होता, बेहोशी होती, माधुर्य होते. आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे जाणारे आणखी काहीतरी होते. अनंताची आराधना होती. सुरांच्या माध्यमातूनच त्या अनंताचा शोध घेत होत्या. त्यामागे त्यांची खडतर तपश्चर्या होती. आणि अशी खडतर साधना करणाऱ्या साधकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की ज्या क्षणी त्याचा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. मी आणि तू वेगळे नाहीतच. माझ्यातच तू आहेस आणि तुझ्यातच मी आहे असा साक्षात्कार साधकाला होतो. तशी ताईंची गानसमाधी लागली होती. पण आपल्यासवे त्या श्रोत्यांना देखील त्यांनी त्यात सामील करून घेतले होते.  त्यांचा ‘ स्व ‘ विश्वव्यापक झाला होता. हळूहळू त्या समेवर आल्या. श्रोते सुरसागरात डुंबत होते. पाच मिनिटांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.

अशी ही गानसरस्वतीची गानसमाधी. मला त्यांचा हेवा वाटला. आणि माझेही मन नकळत त्यांच्या तपश्चर्येपुढे लीन झाले. मी त्यांना मनोमन प्रणाम केला. आपण जो काही जीवनमार्ग निवडला आहे त्याच्याप्रती केवढे हे उच्च प्रतीचे समर्पण ! पुन्हा त्यामध्ये स्वार्थाची भावना नाही, हाव नाही, कुठलीही अपेक्षा नाही. ताई कोणासाठी गात होत्या ? म्हटले तर सर्वांसाठी आणि म्हटले तर कोणासाठीच नाही ! त्या गात होत्या आनंदासाठी. आणि हा आनंद श्रोत्यांनाही त्यांनी भरभरून वाटला. त्या आनंदाचे झाड झाल्या. सुरांच्या कल्पवृक्षाला आनंदाची फळे लागली. वृक्ष फळभाराने झुकला. सप्तसुरांची मधुर फळे त्या वृक्षाला लागली. ज्याला हवे त्याने यावे आणि मधुर फळांची गोडी चाखावी.

गीतरामायणातले ग.दि.मांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर नकळत कानात घुमू लागले.

          सात स्वरांच्या स्वर्गामधुनी

          नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी

          यज्ञ मंडपी आल्या उतरुनी

          संगमी श्रोतेजन नाहती.

असेच नाही का ताईंच्या मैफलीबद्दल म्हणता येणार ?

आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात असेच समर्पण आपल्याला करता आले तर …! आपले जीवन ही सुद्धा एक साधना होईल, एक तपश्चर्या होईल. आपल्या कामाचे समाधान, आपल्या कामाचा आनंद आपल्याला तर मिळेलच पण दुसऱ्यांनाही हा आनंदाचा ठेवा आपल्याला वाटता येईल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रांगोळी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ रांगोळी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सकाळी लवकर ऊठून अंगणात सडा टाकायचा मग त्यावर छानशी रांगोळी काढायची असा दिवस सुरू व्हायचा•••

तेव्हा आजीला विचारले “ का गं आजी सडा रांगोळी करायची? “ तेव्हा आजीने सांगितले••••

“ या कृतीतच संसाराचे सार दडलेलं आहे गं•••

आश्चर्याने मी विचारले “ ते कसं?”

तशी आजी म्हटली, “ ते मी सांगते. पण तू मला सांग, सडा रांगोळीचे अंगण पाहिले तर तुला काय वाटते?”

मी म्हटलं “ काय वाटणार? छान वाटते. प्रसन्न वाटते. अजून काय?”

आजी म्हटली, “ बरं आता मी सांगते बरं का ! सकाळी उठून जेव्हा बाई आधी अंगण झाडते ना••• तेव्हा कालची मनातली घाण रुसवे फुगवे कुरबुरी यांचा कचरा ती बाहेर फेकून देते. नंतर जेव्हा पाण्याने ती सडा टाकते ना•••• तेव्हा आपल्याच मनावर ती समजुतीची, सामंजस्याची शिंपण करीत असते आणि सगळी नकारात्मकता ती दाबून टाकत असते. मग जेव्हा ती या दाबलेल्या मनावर अर्थात सडा टाकलेल्या अंगणावर रांगोळी काढते ना? तेव्हा सगळी सकारात्मकता त्यात येते. माझे अंगण चांगले दिसावे, माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला मी सूख द्यावे याकडे तिचे चित्त जाते.  मग कोणासाठी काय काय करायचे कसे करायचे याचे नियोजन ती रांगोळी काढताना करते. .. मग असे सकारात्मक उर्जेने भरलेलं मन तिला दिवसभर सळसळतं ठेवतं. तिच्याकडून घरातील सदस्यांना सुखावण्याचा आटोकाट प्रयत्न करतं.  पर्यायाने तिच्या बाजूने घरातील शांतता प्रसन्नता टिकवण्याचा प्रयत्न होत असतो…. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जेव्हा सुंदर रांगोळी पहाते तेव्हा ती पण प्रसन्न होते. जरी वाईट विचार मनात घेऊन आली असेल तरी त्याचाही काही अंशी निचरा होतो. पर्यायाने त्याचा या घराला मोठा फायदाच होतो.”  

अशा प्रकारचा सकारात्मकतेचा एक स्त्रोत सध्याच्या काळात आपणच बंद केला आहे. सध्या अंगणच नाही तर त्यापुढे रांगोळी तरी कशी येणार?

पण असा विचार करण्यापेक्षा दारात जेवढी रिकामी जागा असेल तेवढ्या जागेतच छोटीशीच रांगोळी काढूया.  सगळी नकारात्मकता घालवून जेवढी सकारात्मकता घेता येईल तेवढी घेऊया. दिवसाची सुरुवात चला निर्मळतेने करू या…

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares