मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पद्मश्री डाॅ.विष्णू श्रीधर वाकणकर…’ – डाॅ.अस्मिता हवालदार ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर…’ – डाॅ.अस्मिता हवालदार ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर

पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरिभाऊ वाकणकर, भारताच्या पुरातत्व शास्त्राचे  पितामह. संपूर्ण जगात पुरातत्व संशोधनात हे नाव आदराने घेतलं जातं….. त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आदरांजली.

वाकणकर म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ते भीमबेटका. भोपाळच्या जवळ असलेल्या भीमबेटकाच्या गुहांत पुराश्म युगातली दगडावरची चित्रे शोधली ती हरिभाऊनी. भीमबेटकाला जगाच्या नकाशावर आणून त्यांनी मानाचे स्थान दिले. अलेक्झांडरच्या आधी भारताला इतिहासच नव्हता. किंबहुना भारत  हे नावच अस्तित्वात नव्हते, ते देण्याची महान कृपाही इंग्रजांनी  केली असं आपल्या डोक्यावर मारलं जात होतं. शत्रूच्या मनावर हल्ला केला,आत्मबल खच्ची केलं की राज्य करणं सोपं जात हे त्या धूर्त, मतलबी व्यापाऱ्यांना उमजले नसते तरच आश्चर्य. आपला इतिहास विकृत पद्धतीने मांडण्याचे यशस्वी प्रयत्न  त्यांनी केले आणि आपल्याकडच्या काही ‘थोर’ विद्वानांनी त्यावर विश्वास ठेवला ! हरिभाऊंच्या या शोधामुळे आपला देश किती पुरातन आहे, इथली संस्कृती किती प्राचीन आहे याचे सज्जड पुरावे मिळाले. हा मोठा विजय आहे. प्रत्येकाची लढाई वेगळी,रणांगण वेगळं,शस्त्र वेगळी आणि शत्रूही वेगळे. समानता फक्त एकच –लक्ष्याप्रती असलेली प्रतिबद्धता ! हरिभाऊंनी याच बळावर लढाई जिंकली होती.

भीमबेटकातली शैलचित्रे त्यांनी कशी शोधली यापाठी एक लहानशी कथा आहे. ते कामाच्या निमित्ताने भोपाल  ते नागपूर ट्रेनने प्रवास करत असत. भोपाळजवळ असलेल्या जंगलात त्यांना नेहमी दगडांचे उंच सुळके दिसत. इथे काय असेल याबद्दल त्यांना नेहमीच कुतूहल वाटायचं. सहप्रवाशांना विचारल्यावर तिथे गुहा आहेत, दाट जंगल आहे, तिथे कोणी जात नाही, असं समजलं. हरिभाऊना आता आंतरिक उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारून सरळ भीमबेटका गाठलं आणि आजवर काळोखात दडपून राहिलेला इतिहास जगासमोर आला. १९६१ पासून सलग सहा वर्ष त्यांनी भीमबेटकामध्ये संशोधन केले. साडेआठशे गुहांत पुराश्म आणि मध्य पुराश्म युगात राहिलेल्या माणसांनी दगडांवर काढलेली  चित्रे सापडली. प्राणी, पक्षी,  माणसे, झाडे, पाने,फुले आदी त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सगळ्याची चित्रे सापडली. पांढऱ्या आणि लाल नैसर्गिक, खनिज रंगांत असलेल्या या चित्रांत काही ठिकाणी हिरवे ठिपके दिसतात. जणू मोठा खजिना हाती लागला होता. माणसाच्या विकासाचा एक टप्पा उलगडायला मदत होणार होती.

त्यांनी सहा वर्षे सलग संशोधन कसं केल असेल हा विचार मनात येताच त्यांच्याविषयी आदर दाटून येतो. एवढे निबिड अरण्य, तिथे खायलाप्यायला काय मिळणार? ते पिशवीत बटाटे घेऊन जात.  जंगलात गेल्यावर ते जमिनीत गाडत. सूर्याच्या प्रकाशाने, मातीच्या उबेने बटाटे शिजले की सोलून खात. हेच अन्न …. किती कठोर तपश्चर्या आहे ही ! भीमबेटकाचं महत्व सरकारच्या लक्षात आलं नव्हतं. त्यांनी हरिभाऊना वार्षिक १०००० रुपये इतके  (घसघशीत !) अनुदान दिले होते. या रकमेतून त्यांचा चरितार्थ चालवणेही अवघड होते, मग संशोधनाला पैसा कुठून पुरणार ? तरीही संशोधनात खंड पडला नाही. रानात प्राण्यांचे भय असतेच. इतक्या जुन्या गुहांत वटवाघळाचा कुबट वास असतो. तिथेच तासनतास संशोधन करायचं योद्ध्याप्रमाणे ! युनेस्कोने भीमबेटका (भीमाची बैठक ) जागतिक वारसा जाहीर केलं. भारतात सापडलेले पुरातत्वीय पुरावे,वस्तू,चित्र आदी बाकी जगात सापडणाऱ्या पुराव्यांपेक्षा अधिक मोलाचे आहेत, पण त्यांची काळजी घेतली जात नाही, महत्व समजलं जात नाही याची त्यांना खंत होती.

‘सरस्वती शोध अभियान ‘ हाही त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. सरस्वती नदीचा उल्लेख वेदात वारंवार येतो. पण प्रत्यक्षात ती शोधता आलेली नव्हती. वैदिक संस्कृती सरस्वतीच्या काठावर फुलली होती. या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन इस्त्रोने त्यांना मदत केली. पाकिस्तानातल्या आदिबिद्री पासून कच्छच्या रणापर्यंतचा चार हजार किलोमीटरचा प्रदेश त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासला.  हरीभाऊनी सरस्वती नदीचा शोध लावण्यासाठी संस्था स्थापन केली.  त्यांच्याबरोबर पुरातत्व शास्त्रज्ञ, लोककला अभ्यासक, फोटोग्राफर आदी तज्ञ मंडळी होती. सेटेलाईट चित्रांच्या आधाराने त्यांनी सरस्वतीचा मार्ग शोधला. वैज्ञानिक कसोटी लावून तिची लुप्त होण्याची कारणे सिद्ध केली. आर्यांनी सिंधू सरस्वती संस्कृती नष्ट केली ही समजूत चुकीची आहे हे सिद्ध केलं. आर्य युरोपातून भारतात आले असा शोध युरोपियन लोकांनी लावला होता. तसे नसून आर्य मूळचे इथलेच आहेत हे त्यांनी ठासून सांगितले.  सरस्वतीच्या अस्तित्वाबद्दल अविश्वास दाखवणाऱ्या लोकांसमोर भरभक्कम पुरावा ठेवला. तरीही लोक या संशोधनाला दुजोरा द्यायला धजावत नव्हते.  कारण युरोपीय संशोधकांच्या विरुद्ध बोलल्यावर आपली किंमत कमी होईल अशी मनोधारणा होती. त्यांना गुलामगिरीच्या मानसिकतेचे वैषम्य वाटत असे. स्वातंत्र्य मिळाले तरीही मनाने स्वतंत्र झालो नाही. हरिभाऊनी जगासमोर पूर्ण आत्मविश्वासाने संशोधन ठेवले आणि आजवर थोपलेल्या मिथकांना आव्हान दिले.

१९५४ पासून त्यांनी भारतात आणि बाहेरच्या जगात शैलचित्र अभ्यासायला सुरवात केली. त्यांनी युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेला शैलचित्रांचा अभ्यास करून पुरातत्वावर पुस्तके लिहिली. केवळ भारतात त्यांनी ४००० गुहा शोधल्या. त्यांनी चंबळ आणि नर्मदेच्या खोऱ्यांत संशोधन केले. त्यांनी महेश्वर, नेवाडा, मनोती, आवरा, इंद्रगड,कायथा, मंदसौर, आझाद नगर, दंगवाडा भागांत खोदकाम करून पुरातत्वीय पुरावे गोळा केले. त्यांनी इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, इटली, स्पेन, ग्रीसमध्ये १९६१-६२ साली संशोधन केले.  ते उत्कृष्ट चित्रकार होते. त्यामुळे शैलचित्र त्यांनी कागदावर उतरवली. अशी ७५०० चित्र वाकणकर संस्थानाकडे आहेत. त्यांनी सहा पुस्तके आणि ४०० शोधनिबंध प्रकाशित केले. ‘ वाकणकर भारतीय संस्कृती अन्वेषण न्यासा ‘च्या संग्रहालयात त्यांनी गोळा केलेली ५००० नाणी आहेत. ते नाणकशास्त्राचे तज्ञ होते. जी.डी.आर्ट्सची पदवी संपादन केल्यावर त्यांना पुरातत्वात विशेष रस वाटू लागला. भारतीय कलांमध्ये त्यांना रस होताच. कलांच्या संवर्धनासाठी त्यांनी संस्कारभारतीची स्थापना केली. उज्जैनच्या विश्व विद्यालयातल्या पुरातत्व उत्खनन विभागाचे आणि रॉक आर्ट इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. ललित कला संस्थान आणि शैलचित्र कला संस्थानाचे ते संचालक होते. त्यांनी ‘मेरा पुरातत्त्वीय उत्खनन ‘आणि ‘भारतीय शैलचित्र कला’ ही पुस्तके लिहिली.  हिंदीमध्ये कथासंग्रह प्रसिद्ध केला आणि आर्य प्रश्नावर रोबर्ट आर. यांच्यासह लेख लिहिला. २५० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले. भीम बेटकाच्या शैलचित्रांवर प्रदर्शने भरवली. १९७५ साली हरिभाऊना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

माळव्यातल्या मंदसौर जिल्ह्यातल्या नीमचमध्ये ४ मे १९१९ रोजी हरीभाउंचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीला सर्वजण लक्ष्मीवाहिनी नावाने ओळखत. पतीच्या कार्यात त्यांचा तन मन धन अर्पून सहभाग होता. लक्ष्मी वहिनींचा त्याग तितकाच मोठा आहे.  हरिभाऊच्या पायावर चक्र पडलं होत. अशा व्यक्तीबरोबर संसार करणे किती कठीण असते ते लक्ष्मी वहिनीच जाणो. हरिभाऊचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सबळ नसले तरी समाजकार्य आणि राष्ट्रप्रेम या शिकवणीची शिदोरी त्यांना कुटुंबाकडून मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी उज्जैनमध्ये एक आर्ट सेंटर चालवून अर्थार्जन केले. कालिदासाने मेघदूत लिहिले ती जागा या परिसरात असायला हवी असे त्यांना वाटत असे. त्यानुसार त्यांनी रामगिरी पर्वतावर जाऊन शोधायला सुरुवात केली, पूर्ण प्रदेश विंचरून काढल्यावर एका गुहेवर ‘मेघदूत’ अशी अक्षरे सापडली. एका बाजूला ‘सुतनुका’ लिहिलेले दिसले आणि थोडे पुढे गेल्यावर ‘कालिदास’ असे लिहिलेले दिसले. पुढे कालिदासावर अधिक संशोधन केल्यावर हेच ते स्थान हे सिद्ध झाले. 

त्यांनी अजून एक महत्त्वाचे संशोधन केले. उज्जैनजवळच्या डोंगला गावात २१ जून रोजी सूर्यकिरण पृथ्वीशी लंबकर्ण अवस्थेत  पडतात. त्यामुळे सावली पडत नाही. हे गाव प्राचीन काळाचे time meridian होते.  कर्कवृत्त आणि रेखावृत्त इथे एकमेकांना छेद देतात. हरिभाऊनी कुठल्याही आधुनिक उपकरणांचा वापर न करता ती जागा दाखवून दिली. प्राचीन काळी हे वृत्त उज्जैनमधून जात असल्याने तिथे कर्कराजेश्वर मंदिर बांधले होते ! उज्जैनच्या वेधशाळेला वाकणकरांचे नाव दिले आहे. भारतीय पुरातत्व खात्यातर्फे हरिभाऊंच्या नावे पुरस्कार दिला जातो. पुरातत्वात रचनात्मक आणि सृजनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीला दोन लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

१९८८ साली सिंगापूरला एका हिंदू संमेलनाच्या निमित्ताने गेले असताना खिडकीतून दिसणाऱ्या चित्राचे रेखाटन करताना त्यांना मृत्यू आला. उणेपुरे सत्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले, जे खऱ्या अर्थाने ‘जीवन’ होते. संशोधकाचा मूळ पिंड असलेले हरिभाऊ कलाकार होतेच, राष्ट्रभक्तही होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करताना महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करत  होते. आनंदी,खेळकर स्वभावामुळे संकटाना सहज सामोरे जात. आपला ‘खरा’ इतिहास समोर येण्याची नितांत गरज आहे याची त्यांना जाणीव होती आणि त्यासाठी ते आयुष्यभर झटले. हरिभाऊनी सुरु केलेल्या कार्याची पताका पुढे नेण्यासाठी संशोधक काम करत आहेत, निश्चितच हे कार्य लवकर सुफळ होईल. मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालेला त्यांच्या स्वप्नातला भारत नवा, स्वाभिमानी, आत्मविश्वासपूर्ण भारत असेल, हीच आपणा सर्वांकडून त्यांना वाहिलेली आदरांजली असेल.

कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींची इथे आठवण होते:

रात सरे ये प्राचीवरती तेजाची रेषा, 

नव्या मनूचा घोष घुमे हा, दुमदुमतात दिशा…  

जागृत झाल्या दलित जगाच्या बलशाली आशा …. 

डॉ. अस्मिता हवालदार

इंदूर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खुळ्या कळ्या… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ खुळ्या कळ्या… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

खुळ्या कळ्या…

पूजेसाठी आलेल्या फुलपुड्यामध्ये निशिगंधाच्या काही कळ्या आल्या. आणि मग त्यांना नीट फुलायला मिळावं म्हणून मी एका हिरव्या बाऊलमध्ये थोडसं पाणी घालून त्यांना खिडकीत ठेवलं. किती प्रयत्न केला पण त्या काही उभ्या राहात नव्हत्या. सारख्या आडव्या होत होत्या. मग मला जाणवलं की त्यांची अजूनही त्यांची नीज उतरली नाहीये‌. हा मंदधुंद श्वास जणू त्यांच्या गोड झोपेची साक्षच !…. काय बरं स्वप्नं पहात या निजल्या असतील. आपण आपल्या हिरव्या आईच्या कुशीत नाही आहोत हे कळलं असेल का त्यांना.‌.. उठल्यावर जेव्हा त्या बघतील की आपण भलतीकडेच आहोत तेव्हा त्या काय विचार करतील… दुःख होईल का त्यांना… काय बरं वाटत असेल या कळ्यांना….. 

… आणि वाटीतल्या कळ्या उमलल्या नाही तरी.. माझ्या मनात मात्र त्या कळ्या उमलू लागल्या…

साध्या भोळ्या शब्दांत फुलूही लागल्या……. 

हिरव्यागार वाटीत

निजवलं होतं कळ्यांना

किती वेळ झोपावं 

कळेनाच की खुळ्यांना 

झोपेतही चालू होता 

त्यांचा मंद मंद श्वास

अन् घरभर दरवळला 

त्यांचा निरागस सुवास 

इवलुसा देह त्यांचा

इवलुसं हे जगणं 

इवलुशा या जीवांचं  

इवलुसंच स्वप्नं 

असू कुठेही आपण

फांदीत अथवा मातीत 

दुःखी नाही व्हायचं

नि:स्वार्थतेनं जगायचं 

सोनुले किरण आले की 

त्यांच्या संग खेळायचं

वाऱ्यासंगे सुगंधाला

सुरेल गुणगुण द्यायचं 

कधी पडायचं परडीत

कधी सजायचं वेणीत

कधी गुंफायचं हारात

तर कधी झुलायचं दारात 

इवलुसं हे आपलं आयुष्य

सदा घमघमत ठेवायचं

अखेरच्या क्षणीदेखील 

अत्तर होऊन जगायचं …

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंदाश्रू… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आनंदाश्रू… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

सकाळी सातची वेळ, शांतारामअण्णांना जोरात प्रेशर आलं होतं पण घरात मुलाची,नातवाची आवरायची लगबग होती. खरंच होतं ते. डोंबिवलीतला वन बीएचकेचा ब्लॉक, तो सुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला.

अण्णा करीरोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते.रोज सकाळी साडेसहाला घर सोडायचे. ओव्हरटाईम करुन रात्री उशिरापर्यंत घरी यायचे.

आताशा दोन महिने झालेले, अण्णांना रिटायर्ड होऊन. पहिली पहिली ही हक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना. थोडे दिवस गावी जाऊन आले; पण तिथेही थोरला भाऊ नोटांची पुडकी मागू  लागला. पहिल्यासारखं आदराने बोलेनासा झाला. शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नीसोबत माघारी आले. घरी आल्यावर मयंकच्या (मुलाच्या) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच,”रहाणार होतात ना,इतक्या लवकर कसे परतलात?” काही वाक्यं चेहऱ्यावर वाचता येतात. त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते आणि अशी वाक्यं आपल्या पोटच्या मुलाच्या चेहऱ्यावर पेरलेली पाहणे, याहून क्लेशदायी काही नाही.

“आणायची कोठून प्रत्येकाला द्यायला नोटांची पुडकी? अरे मी काय टाकसाळीत होतो का?” अण्णा स्वतःशीच बोलले व कुशीवर वळून निजले;पण त्यांना आत्ता थोपवेना. ते गेलेच तडक टॉयलेटमध्ये. इकडे मयंकलाही प्रेशर आलं. अण्णा दहा मिनटं झाली तरी बाहेर पडेनात. मयंक तिथल्या तिथे येरझाऱ्या घालून दमला. टॉयलेटचं दार ठोकवू लागला.

शेवटी एकदाचे अण्णा बाहेर आले. आताशा अर्ध्या अधिक दंताजींचे ठाणे उठल्याने अण्णांना अन्न नीट पचत नव्हते. त्यामुळे त्यांना नीट मोशन होत नव्हते. बराच वेळ बसून रहावे लागे. त्यांचे पायही वळून येत. अण्णा बाहेर येताच मयंक आत पळाला. पोट मोकळं करुन बाहेर आला व पेपर वाचायला घेणार तर अण्णा पेपर वाचत बसलेले. मयंकला रागच आला. मयंक अण्णांच्या अंगावर खेकसलाच,”काय हे अण्णा? सकाळीसकाळी कशाला उठता? टॉयलेट अडवून ठेवता. आत्ता पेपर घेऊन बसलात. मी ऑफिसला गेल्यावर करा की तुमची कामं निवांत. माझ्या वेळेचा कशाला खोळंबा करता? आत्ता माझी आठ चौदाची डोंबिवली लोकल चुकली. पुढच्या गाड्यांत पाय ठेवायलाही जागा नसते. तुम्हाला कसं समजत नाही.”

“हो रे बाळा, मी कुठे ऑफिसला गेलोच नाही कधी. मला कसं कळणार?”

“काय ती तुमची नोकरी, अण्णा! कुठेतरी चांगले नोकरीला असला असतात तर आत्ता रिटायरमेंटनंतर भरघोस पेंशन मिळाली असती. पीएफ,ग्रेज्युइटी मिळाली असता. टुबीएचके घेता आला असतं आपल्याला. टॉयलेटचा असा प्रॉब्लेम आला नसता. माझ्या मित्राचे बाबा बघा गेल्या वर्षी रिटायर झालेत. त्यांनी लेकाला टुबीएचके घेऊन दिला. शिवाय कर्जतला फार्महाऊस घेतलंय,एक होंडा सिटी घेतली. बढाया मारत होता लेकाचा. अण्णा, तुम्ही काय केलंत हो माझ्यासाठी?”

अण्णांचे डोळे पाण्याने डबडबले. मोठ्या कष्टाने त्यांनी आसवांना बांध घातला व हॉलच्या खिडकीशेजारी असणाऱ्या त्यांच्या पलंगावर जाऊन खिडकीत पहात बसले. त्यांना तसं पाहून आभाळही भरून आलं. मधुराने(सुनेनं)चहा आणून दिला. तो कसातरी गळ्याखाली उतरवला त्यांनी.

अण्णांची सौ., लताई देवळातून आली. लताई रोज पहाटे स्नान उरकून महालक्ष्मीच्या देवळात जायची. देवीला स्नान घालणं,साडीचोळी नेसवणं,आरती करणं हे सारं ती भक्तीभावाने करायची. अण्णा रिटायर्ड झाले म्हणून तिने तिच्या नित्यक्रमात बदल केला नव्हता. घरी आल्यावर अण्णांचा मुड पाहताच तिच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय. अण्णांनी लताईकडे आपलं मन मोकळं केलं तेव्हा नकळत त्यांच्या डोळ्यांतून दोन मोती ठिबकले.ते पाहून मधुराला गलबलून आलं.

मधुराला वडील नव्हते; पण सासरी आल्यापासून अण्णांनी तिची ही पोकळी त्यांच्या वात्सल्याने भरून काढली होती.

संध्याकाळी मधुरा,मयंक व छोटा आर्य फिरायला गेले. मयंक आर्यसोबत फुटबॉल खेळला. आर्य मग मातीत खेळू लागला, तसा मयंक मधुराशेजारी येऊन बसला. मधुराने मयंकजवळ सकाळचा विषय काढला. ती म्हणाली,”मयंक, तू लग्न झालं, तेव्हा मला अण्णांबद्दल किती चांगलं सांगितलं होतंस. अण्णा स्वतः जुने कपडे वापरायचे; पण तुझ्या साऱ्या हौशी पुरवायचे. तुला खेळण्यातल्या गाड्या फार आवडायच्या. अण्णा तुला दर महिन्याला नवीन गाडी आणून द्यायचे. पुढे तुला वाचनाचा छंद लागला,तेव्हा अण्णांनीच तुला चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं त्यांच्या तुटपुंज्या पगारातून आणून दिली. तुला हवं त्या शाखेत प्रवेश घ्यायची मोकळीक दिली. तुला अकाऊंट्ससाठी क्लास लावावा लागला नाही. अण्णांनीच तुला शिकवलं पण आज तू ‘अण्णा, तुम्ही माझ्यासाठी काय केलंत?’ या एका प्रश्नाने चांगलेच पांग फेडलेस त्यांचे. मयंक,अरे तुला वडील आहेत तर तुला त्यांची किंमत नाही रे. आपल्या आयुष्यात वडिलांची किंमत काय असते, ते माझ्यासारखीला विचार, जिला आपले वडील नीटसे आठवतही नाहीत.”

आर्य मम्मीपप्पांजवळ कधी येवून बसला, त्यांना कळलंच नाही.

आर्य म्हणाला,”खलंच, पप्पा. तुम्ही फाल वाईट्ट वादलात आजोबांशी. आजोबा ललत होते. आजीने गप्प केलं त्यांना. आजोबा दुपाली जेवलेपन नाही.”

मयंकला अगदी भरुन आलं. त्याला त्याची चूक कळली. घरी परतताना तो लायब्ररीत गेला व अण्णांची वार्षिक मेंबरशिप फी भरली. तसंच मधुराला म्हणाला,”आपला बाथरुम मोठा आहे त्यात आपण एक कमोड बसवून घेऊया अण्णांसाठी आणि थोड्या वर्षांत जरा मोठं घर बघूया. मी अण्णांशी नीट बोलेन. माझं असं कधी परत चुकलं, तर अशीच मला माझी चूक वेळोवेळी दाखवत जा.”

घरी गेल्यावर मयंक अण्णांबरोबर चेस खेळायला बसला. मधुराने त्यांच्या आवडीचा मसालेभात  व मठ्ठा केला. चेस खेळता खेळता मयंकने अण्णांचा हात हलकेच दाबला व  तो त्यांना ‘सॉरी’ म्हणाला.

आर्य तिथेच त्यांचा खेळ बघत बसलेला. तो आजोबांच्या गळ्यात हात टाकून म्हणाला,”बाबा,यू आल आलवेज वेलकम.” अण्णांचे डोळे पुन्हा भरुन आले; पण आत्ताचे अश्रू सकाळच्या अश्रूंपेक्षा वेगळे होते. हे तर आनंदाश्रू होते.

एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की, “we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same”

म्हणजे,

“आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं ते तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे.”

किती सुंदर वाक्य आहे, नाही! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेलो असतो. पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे, तो का नष्ट होऊ द्यायचा? ज्या क्षमता आहेत, त्या का लयास जाऊ द्यायच्या? तसेच रंगाचे खडूदेखील कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो… अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!

 “जिंदगी एक बार मिलती है”

  “बिल्कुल गलत है!”

सिर्फ मौत एक बार मिलती है!

 जिंदगी हर रोज मिलती है !!

  बस जीना आना चाहिए!!

 

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मोहोरला बहावा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मोहोरला बहावा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

 चैत्रमहिना आला कि.. निसर्गाच्या रंगपंचमीला उधाण येतं.पळस, पांगारा, करंजा, सावरी, कुडा यांच्या जोडीला बहावा फुलतो.जसा गेले आठ-दहा महिने समाधिस्थ असलेला मुनी समाधी अवस्थेतून जागृत व्हावा तसा हा बहावा फुलतो.

सोनसळी लावण्याने हा सजतो.याची फुले म्हणजे स्वर्णफुलेच.अंगांगावर या कळ्याफुलांचे साज.लेवून हा राजवृक्षएखाद्या सम्राटा प्रमाणे आपल्या ऐश्वर्याने सर्वांचे मन मोहित करतो. हीस्वर्णलेणी इतकी झळाळत असतात कि सूर्याचे तेजच प्राशन करून उमलली आहेत असे वाटावे.यालाकर्णिकार म्हणतात. तसेच अमलतास असेही संस्कृत भाषेतम्हणतात.

बहावा हा वृक्ष आठ ते दहा मीटर पर्यंत वाढतो. पाने संयुक्त व समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.बहाव ही सदहरित असून वर्षावनात आढळणारी पानझडीची वनस्पती आहे.

बहावा पूर्णपणे भारतीय वनस्पती आहे.

बहाव्याच्या द्राक्षाच्या झुपक्यांसारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष ‘Golden shower tree’ म्हणून ओळखला जातो.

बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात.

फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात बिया असतात.हा वृक्ष बहुपयोगी आहे.

उपयोग पुढील प्रमाणे

१ कर्णिकाराच्या मोठ्या खोडापासून इमारती लाकूड मिळते.

२ बहाव्याची साल कातडे कमावण्यासाठी उपयुक्त आहे.

३ शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी आहे, तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी गर वापरतात.

४ बहाव्याचे लाकूड अत्यंत टणक असून ते वजनाला जड असते. शेतीची अवजारे, चाके, टेबल, खुर्च्या तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आदिवासी स्त्रिया याच्या फुलांची आणि कळ्यांची भाजी करतात.  

..Cassia Fistulal (कॅसिया फिस्टुला) हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. पिवळाधम्म एक सारखा फुललेला, नाजूक पाकळी, डोळ्यांना सुखावणारा सोनसळी पिवळा रंग, पोपटी रंगाची पाने आणि मध्ये झुलणाऱ्या करड्या रंगाच्या शेंगा एवढा मिलाफ क्वचितच इतरत्र पाहायला मिळेल.नवरीला नटवावे आणि हळद ल्यालेल्या अंगाने तिने अकृत्रिम लाजावे तसा दिसतो बहावा. बहावा फुललेला असताना त्याला नववधूच्या हळदीच्या हातांना हिरव्याकंच चुड्याची शोभा किती मोहक असते ना तशी शोभा येते बहाव्याला दांडीवर वर थोडे जास्त आणि खाली कमी कमी होत निमुळते होत गेलेले घोसच्या घोस लटकलेले असतात. जणूस्वर्गलोकीची झळकती स्वर्णझुंबरेच. शेवटच्या टोकावर न उमललेल्या चार पाच कळ्या.नाजूक पाकळी आणि मिटून बसलेली कळीही. विशेष म्हणजे या देठावर एकही पान नाही आणि असंख्य घोस उलटे टांगल्यागत झुलत असतात वार्‍याच्या झुळकीने सोबत जातात इकडून तिकडे. डोळ्यांना अत्यंत सुखद अनुभव येतो बहाव्याच्या दर्शनाने.भारतातल्या काही क्षेत्रात महावृक्ष रूपात दिसतो. याचेखोड पांढरट असते.एरवी हेझाड ओळखूही येणार नाही. पण वसंतराजाच्या जादूई किमयेने याच्या अंतरीचे सौंदर्य खुलून येते एप्रिल ते मे महिन्यात. मला हा फुललेला बहावा “लेकुरवाळा” वाटतो.

अगदी विठू माझा लेकुरवाळा असाच.कारण याच्या फुलां मधील मध चाखण्यासाठी कीटक, मुंग्यां, मधमाशां याच्या़ अवती भवती, अंगाखांद्यावर खेळतात.बहावा मात्र यांचा दंगा, रुंजी घालणं असा कौतुक सोहळा स्वतः शांत बसून बघतो. बहावा फुलल्यानंतर साधारण४०-४५ दिवसात पाऊस येतो, असे म्हणतात. भारतात बहुतेक सर्वत्र बहावा आढळतो. पिवळाधम्मक बहावा फुलल्यानंतर झाड गोलाकार पिवळ्या उघडलेल्या छत्री सारखा दिसतं. बहावा जणू थंडीत ध्यानस्थ होतो. बहाव्या ची पाने साधारणपणे एकमेकांसमोर असतात देठाला चिकटून, रंग नाजूक पोपटी असतो. पोपटी पानांआडून खळखळून हास्य करीत पिवळे घोस येतात एकामागून एक.फुलोरा साधारणपणे अर्धा हात लांब असतो. मे च्या शेवटच्या आठवड्यात शेंगा तयार होतात. शेंगा हातभर लांबीच्या असतात.खुळखुळा वाजतो तशा वाळल्यावर वाजतात.दक्षिण भारतात बहाव्याच्या फुलांना विशेष लोकप्रियता लाभली आहे. तिकडे या फुलांना सोन्याचे म्हणजेच वैभवाचे प्रतीक मानतात. त्याला ‘कणिपू’ असे म्हणतात. ‘विशूच्या’ सणाला घरातील ज्येष्ठ व्यक्ती सर्व सौभाग्य व संपत्तीच्या गोष्टींची आरास करतात त्यात बहाव्याची फुलेदेखील असतात. घरातील प्रत्येकाने झोपेतून उठताना डोळे उडताना ही आरास पाहिली की त्याचे संपूर्ण वर्ष सोन्यासारखे भरभराटीचे जाते अशी त्यामागे श्रद्धा आहे. केरळ या राज्याचे राज्यफूल ‘बहावा’ असून भारत सरकारच्या टपाल खात्याने बहाव्याच्या फुलांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीटदेखील काढले आहे.

वसंत राजानंमोठ्या कौशल्यानं आणि रसिकतेनं आपल्या लाडक्या वसंतलक्ष्मीला साजशृंगार करून नटवले आहे असेच या फुललेल्या बहाव्या कडे बघून वाटते.

 निसर्ग आपला गुरु असतो.तसेच बहाव्याकडे पाहून मला वाटते, बहावा सांगतोय संकटाच्या काळातही हसत रहावे सर्व मानवांनी अगदी आनंदाने सामोरे जावे.कारण तीव्र उन्हाच्या झळा सोसून अग्नीत जसे सुवर्ण झळकते तसे या बहाव्याचे अंगांग सुवर्ण लेणी लेवून सजते.आनंदोत्सव साजरा करते या तीव्र उन्हातही!

☆ मोहोरला बहावा ☆

 सोनवर्खी साज लेऊनी

 बहावा मोहोरला वनी

 कुसुम कळ्यांची कनकवर्णी

 अंगांगावर लेऊनी लेणी

 ऋतु रंगांची उधळण करुनी

 राज वृक्ष हा शोभे वनी वनी

याचे फुलणे बहरुनी येणे

तप्त धरेवर सडे शिंपणे

अगांगातून तेज झळकणे

 फुले बहावा अंतरंगातूनी

डोलती झुंबरे पुष्प कळ्यांची

पखरण जणू ही चांदण्यांची

 वर्दळ येथे शत भुंग्यांची

 हसे वसंत शत नेत्रांतूनी

 तप्त उन्हाचा ताप साहतो

 शीतल कौमुदी जणू पांघरतो

 समाधानाचा मंत्रची देतो

 वार्‍यासंगे हा दंग नर्तनी

 

फुललेला बहावा पाहून या काव्यपंक्ती सुचल्याशिवाय रहात नाहीत.

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ वसंतोत्सव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ वसंतोत्सव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘कोकीळ कुहू कुहू बोले’ गाण्याचे बोल रेडिओवरून कानावर पडताच वसंत ऋतुची चाहूल मनाला लागली! फाल्गुनातील रंगपंचमीचा रंग उधळत होळीच्या सणाची सांगता होते आणि वेध लागतात ते वसंताचे! सूर्याच्या दाहक किरणांनी सृष्टी पोळली जात असतानाच वसंताचे होणारे आगमन नकळत सृष्टीतील नव्या बदलाची जाणीव करून देते. संध्याकाळी येणारी थंड वाऱ्याची झुळूक वसंताचा निरोप आपल्याला देते! सुकलेल्या झाडांना पालवी येण्याचे दिवस जवळ येतात. पिवळी, करड्या रंगाची, वाळलेली पाने जमिनीवर उतरतात.जणू ती आपल्या आसनावरून- जागेवरून- पायउतार होतात आणि नव्याला जागा करून देतात.कॅशिया, गुलमोहरा सारखी रंगांचे सौंदर्य दाखवणारी झाडे आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर केशरी, जांभळे पिसारे फुलवून उभी असतात. त्याच वेळी आंब्याचा मोहर आपला सुगंध पसरवीत असतो!

 आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक ऋतुचे स्वागत आपण सणाने करतो. वसंत ऋतु येतो तेव्हा चैत्रगौरीचा उत्सव सुरू होतो.

पूर्वी अंगणात चैत्रांगण घातले जाई.या चैत्रांगणातून चंद्र, सूर्य, गाई, झोका, कैरी… अशा विविध प्रतीकांची रांगोळी काढली जाई. निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवण्याचा हा उत्सव असतो. चैत्री पाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या तीजेला चैत्र गौरीची

स्थापना करतात. देवीचा उत्सव म्हणून तिला पानाफुलांची सजावट करून झोक्यावर बसवतात. रुचकर कैरीची डाळ, कैरीचं पन्हं आणि खरबूज, कलिंगडासारखी थंड फळे देवीसमोर ठेवली जातात. या सर्व गोष्टींचा एकत्रित आनंद घेता यावा म्हणून चैत्रागौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीये पर्यंत हा सण साजरा केला जातो. हळदीकुंकू सारख्या समारंभात सुगंधित गुलाब पाणी शिंपडून, अत्तर, गुलाब देऊन सुवासिनी वसंताचे स्वागत करतात.

 काही ठिकाणी ‘वसंत व्याख्यानमाला’चे कार्यक्रम चालू असतात. अशा व्याख्यानमालां मुळे लोकांना नवीन ज्ञान आणि मनोरंजन मिळत असते. याच काळात गायनाचे कार्यक्रम होत राहतात. कोणत्याही ऋतूत, सण साजरे

करून माणूस आनंद शोधत असतो. आणि त्यानिमित्ताने निसर्गाची जवळीक साधली जाते!

पंजाब, उत्तर प्रदेश यासारख्या भागात या दिवसात कलिंगड, खरबुजे यासारखी फळे ही थंड म्हणून खाल्ली जातात.फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी अधिक चांगले असते. त्यात वाळा, मोगरा टाकला की पाण्याला एक प्रकारचा सुगंधही येतो.

 आपल्या महाराष्ट्रात कोकम, लिंबू, कैरी,वाळा,खस यांची सरबते थंडाव्यासाठी आपण वापरतो. निसर्गाने दिलेले नैसर्गिक पदार्थ या उन्हाळ्याच्या काळात वापरणे हे शरीराला हितकर असते. पुढे येणाऱ्या वर्षा ऋतूत कोणतेही त्रास होऊ नयेत म्हणून शरीराला सज्ज ठेवण्याचे काम नैसर्गिक विटामिन ‘सी’ घेण्यामुळे होत असते!

 वसंत ऋतुची खासियत यातच आहे की, हा ऋतू नवीन सृजनाची सुरुवात करून देतो. वसंतोत्सवामुळे नवचैतन्य दिसते. शिशिर आणि हेमंत ऋतूत थंड, निद्रिस्त झालेले वातावरण वसंत ऋतूच्या आगमनाने चैतन्यमय बनते आणि तोच निसर्गाचा खरा ‘वसंतोत्सव’ असतो !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मरावे परी — एक सत्यकथा ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ मरावे परी — एक सत्यकथा ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, “बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आजपर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल.” 

त्याची मुलगी सारा म्हणाली, “बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही काहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवडू द्या.” 

थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला. 

तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली..

मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, ” तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ…..?

यावर सारा म्हणाली, “मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत.”

मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, ” ओहो, तू टॉम स्मिथची मुलगी आहेस? “

— पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, ” हा स्मिथ नावाचा मनुष्य तोच आहे बरं का, ज्याने ‘ Institute of Administrators ‘ या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती, आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं…” 

इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, ” मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा…”

— सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हरसहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं. 

नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली. 

एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारल्या गेलं तेव्हा अश्रूभरल्या नेत्रांनी ती उत्तरली, ” माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिकदृष्ट्या जरी ते गरीब होते, तरी सचोटी, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते.

“आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?” — मुलाखतकाराच्या या प्रश्नावर त्या उत्तरल्या, ” माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून उठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही.”

मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. 

“मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल का?”—- यावर त्या म्हणाल्या, ” मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दिवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे काही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते.”

आपणही टॉम स्मिथसारखेच आहोत का..? —- 

कीर्ती रूपाने शिल्लक राहता येऊ शकते. कीर्ती पसरायला आणि कीर्तीरूपाने जिवंत रहाण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो..सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणीव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे..आपल्या मुलाबाळांसाठी हा वारसा ठेवावा..

—आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू या आणि ही सत्यकथा आपल्या माणसांत अधिकाधिक शेअर करू या.

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सासू – सून समीकरण”  – लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “सासू – सून समीकरण”  – लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

काल ताई कडे गेले होते. सहजच आठवण आली आणि गेले. ताई व भाऊजी आरामात TV बघत बसले होते. ताई माझ्या पेक्षा चार वर्षं मोठी.आमच्या बागेतले देवगड हापूस घेऊन गेले.•••

छान गप्पा रंगल्या आमच्या. जुन्या गोष्टी निघाल्या व वेळ कसा गेला कळलेच नाही.••••

 संध्याकाळ झाली.मी ताईला म्हणाले,•••• निघते ग मी आता, •••

 अग !! आरती येण्यातच आहे, तिला भेटून जा.ताई म्हणाली.••••

 भावजी म्हणाले,हो,मी तसा तिला मेसेज केला आहे,येईलच ती इतक्यात.•••

 थोड्या वेळाने आरती आली.

 कशा आहात मावशी ? तिने विचारले. छान झालं मावशी, तुम्ही आलात.••••

आई बाबांना पण छान वाटलं असेल. आमच्या दोघांच्या नोकरी मुळे त्यांना कुठे बाहेर जाता येत नाही,अडकलेले असतात ते दोघे.••••

 ताईने विचारलं,••••

 कसा गेला ग दिवस आज ऑफिस मधे ?

खूप काम असतं ग दोघांना.आम्ही काय घरीच असतो. शनिवार, रविवारी आरती काही करू देत नाही आम्हाला. कधी कधी तर नाटक / सिनेमाची तिकीटं हातात आणून देते.••••

माझ्या लक्षात आलं,दोघी आपापली बाजू मांडत होत्या.व एकमेकांच्या मदतीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत होत्या.••••

मावशी !! आई बाबा आहेत म्हणून मला घरची, आर्याची काळजी नसते हो. आर्या म्हणजे ताईची नात. ••••

ताई म्हणाली,••••

अग !! आर्या आज दूध प्यायला नाही म्हणाली बघ.मग मी तिला केळं आणि थोडे ड्राय फ्रूट दिले व खेळायला पाठविलं.

अग !! आज तिला औषध द्यायचे राहून गेलं बघ,विसरलेच ग मी. असं कर आरती,तू माझ्या मोबाईलवर अलार्म लावून दे. म्हणजे मग मी विसरणार नाही. •••••

ठीक आहे आई.काही हरकत नाही.होतं कधी कधी असं. मी देते.आरती म्हणाली.•••

ताई चहा करायला उठणारच होती, तर लगेच आरती म्हणाली, ••••

आई !! तुम्ही रोज करताच चहा. आज बसा मावशीबरोबर गप्पा मारत, मी करते सगळ्यांसाठी चहा. बाबांचा मेसेज मिळाला होता. म्हणून येताना मी समोसे आणले आहेत.•••••

मी शांतपणे दोघींचे बोलणे ऐकत होते.ताई म्हणाली,•••

अग आरती !! मावशीने आंबे आणले आहेत. उद्या न विसरता घेऊन जा हं तुझ्या आईसाठी. ••••

आई बाबा, औषध घेतले ना वेळेवर?..आरती ने विचारले.•••

हा हिचा रोजचाच प्रश्न असतो बघ आम्हाला. कौतुकाने ताई म्हणाली,•••

आरती आल्यापासून, त्यांच्या गप्पा ऐकून,एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की दोघी एकमेकींना सांभाळत आहेत. एकमेकींची काळजी घेत आहेत.•••

छान वाटलं बघून.•••••

‘Old Age Parenting’ म्हणजे आजी आजोबा नातवंडे सांभाळतात. हे आता बरेच ‘Common’ झाले आहे.पण ते सोप्पं नाही.••••

दोन पिढ्यांनी एकत्र रहायचे व तिसऱ्या पीढीला सांभाळायचे, म्हणजे तारेवरची कसरतच.••••

खरं तर यापेक्षा मोठे सुख तरुणांना काय असू शकतं की त्यांची मुलं सुरक्षित हातात आहेत. मुलांची मुलं तर ‘दुधावरची सायच ‘. त्यांना सांभाळणे तर आनंदाची गोष्ट आहे आजी आजोबासाठी, पण दडपणाखाली नाही. ••••

 ताई आणि आरतीची रिलेशन्स बघून खूप छान वाटलं.••••

 ” दोन शब्द काळजीचे, प्रेमाचे पुरतात आजी आजोबांना.”••••

खूप नाजूक धागा आहे हा दोघांच्या मधला. एकमेकांच्या अडचणी समजल्या, चुका पदरात घातल्या,थोड्या सवयी बदलल्या, मदतीचा हात पुढे केला तर ,सर्वच आनंदात राहू शकतात.मोकळेपणा हवा नात्यात.•••••

आजी आजोबांची ही ‘second inning ‘आहे मुलांना मोठं करायची. वेळेनुसार सर्वच बदललंय. पद्धती पण. आजी आजोबांची पण वयाप्रमाणे शक्ती,गती कमी झाली आहे. विस्मरण होऊ लागलं आहे.••••

तडजोड,आदर सर्वांचा सर्वांसाठी हवाच. ही ‘Two Way प्रोसेस’ आहे. बोलणे स्पष्ट पण मधुर ठेवलं तर छानच. आमच्या वेळेस, तुमच्या वेळेस हे शब्द नकोच.••••

सोपं नाही,पण अशक्य नक्कीच नाही. तरुण व जेष्ठ -दोघेही आपलं जीवन आनंदाने जगू शकतील.दोघांचा अधिकार आहे तो व गरजही.••••

ताई निश्चिंत झाली आहे.कारण आता तिला अमरची काळजी नाही.त्याला तिने सुरक्षित हातात सोपवले आहे.•••••

ताईला सासू सूनेचे समीकरण चांगलं जमलंय. ती म्हणते,•••

आरती माझी ‘स्पर्धक’ नाही, माझी जबाबदारी उचलणारी माझी ‘सहयोगी ‘ आहे.ती आणि मी या घराचे ‘आधारस्तंभ’ आहोत.•••••

आनंदाचे दिवस केव्हा येतील ?याची वाट बघायची नसते. दोन्ही कडून प्रयत्न करुन ते आणायचे असतात.••••

म्हणतात ना,•••

” जहां चाह वहां राह “••••

“रिश्ते बरकरार रखने की सिर्फ एक ही शर्त है,किसी की कमियां नहीं अच्छाइयां देखें “•••

 

लेखिका: सुश्री संध्या बेडेकर

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 64 – मातृभूमीचे पहिले दर्शन ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 64 – मातृभूमीचे पहिले दर्शन डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

जहाजाने इंग्लंड सोडले आणि मातृभूमीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. मनात अनेक स्वप्न बाळगुनच. इतकी वर्षे भारताबाहेरचे प्रगत देश पाहिले,पाश्चात्य संस्कृती अनुभवली, तिथले लोकजीवन पाहिले,त्यांचे सामर्थ्य आणि ऐश्वर्य पाहिले. तिथल्या लोकांचे त्यांच्या धर्माबद्दलचे विचार ऐकले, समजून घेतले, तिथला सुधारलेला समाज जवळून अनुभवला.वेळोवेळी आपला भारत देश आणि त्याच्या आठवणीने त्यांचे मन भरून यायचे. मनात तुलना व्हायचीच, आपल्या देशातले अज्ञान, काही रूढी,परंपरा, दारिद्र्य आठवले की मन दु:खी व्हायचे. पण आपल्या मातृभूमीचा वारसा, अध्यात्म, धर्म, विचार या बद्दल मात्र आदर वाटायचा आणि गौरवाने मान ताठ व्हायची.

पण बाहेरच्या देशात त्यांना ख्रिस्त धर्म व त्याची शिकवणूक हे आणखी स्पष्ट अनुभवायला मिळत होतं. आता इंग्लंडहून निघून ते फ्रांसला उतरले होते. ख्रिस्त धर्म प्रसाराचा आरंभ जिथे झाला त्या इटलीत . ऐतिहासिक रोमन साम्राज्य आणि तिथल्या परंपरा, जगद्विख्यात चित्रकार ‘लिओ नार्दो द व्हिंची’ च्या कलाकृती, पिसा चा झुकता मनोरा, उद्याने वस्तु संग्रहालये पाहण्याचा त्यांनी आनंद घेतला आणि काय आश्चर्य तिथे उद्यानात अचानक हेल पतिपत्नीची भेट झाली . दोघेही सुखावले. अमेरिकेत उतरल्यावर प्रथम ज्यांनी घरात आश्रय दिला होता त्यांची ही जणू निरोपाचीच भेट असावी.

रोमचा इतिहास त्यांनी अभ्यासला होताच. युरोपातले रोम आणि भारतातले दिल्ली ही शहरे मानव जातीच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेली शहरे होत असे विवेकानंदांना वाटत असे.  त्यामुळे रोम मधील सौंदर्य आणि इतिहासाच्या खाणाखुणा सर्व पाहताना ते चटकन संदर्भ लावू शकत होते.संन्यासी असले तरी ते स्वत: कलाकार होते, रसिक होते म्हणून तिथल्या सौंदर्याचे दर्शन घेताना ते आनंदी होत होते.  योगायोगाने ख्रिस्त जन्माच्या दिवशी विवेकानंद रोम मध्ये होते. मेरीच्या कडेवरील बालरूपातील ख्रिस्त आणि आमच्या हिंदू धर्मातील बाळकृष्ण यात विवेकानंदांना साम्य वाटले. आणि मेरीचा मातृरूप म्हणून आदर पण वाटला. आई मेरी आणि बाळ येशू यांच्या विषयी भक्तीभाव मनात तरळून गेला. हेल पती पत्नी विवेकानंदांबरोबर इथे आठवडा भर होती. आणि ही साम्यस्थळांची वर्णने स्वामीजींकडून ऐकून ते दोघे भारावून गेले होते.विवेकानंदांच्या मनात सर्व धर्मांबद्दल आदरभाव होता तो त्यांच्या भाषणातून सगळ्यांनी अनुभवला होता. तरीही काही प्रसंग असे घडत ,की हिंदू धर्माबद्दल गरळ ओकणारे विवेकानंदांना भेटत, याच प्रवासात दोन ख्रिस्त धर्म प्रचारक जहाजावर होते. विवेकानंद त्यांच्याशी अर्थात हिंदू धर्म आणि ख्रिस्त धर्म यांची तुलना आणि श्रेष्ठत्व यावर बोलत होते. विवेकानंद यांच्यापुढे आपला टिकाव लागत नाही असे लक्षात आल्याने ते दोघे आता हिंदू देवदेवता आणि आचार विचार यांची टवाळी करण्यावर आले. स्वामीजींनी या निंदेकडे बराच वेळ दुर्लक्ष केलं.पण आता सहनशक्तीचा अंत झाला आणि स्वामीजींनी एकाची कॉलर पकडून, जवळ जवळ दरडाऊनच दम भरला की आता माझ्या धर्माबद्दल पुढे काही बोललात तर धरून समुद्रात फेकून देईन. त्यामुळे त्या धर्म प्रचारकांचे तोंड गप्प झाले. स्वामीजींना उदार मनोवृत्ती मुळे आपल्या धर्मा बद्दल कोणीही काहीही बोलेल ते आपण ऐकून घ्यायचे मुळीच पटत नव्हते. त्यात त्यांना दौर्बल्य तर वाटायचेच पण, पाश्चात्य देशातील लोकांना धर्मा धर्मातील भेद बाजूला सारून एकाच विश्वधर्माशी पोहोचावे असा विचार त्यांनी दिला होता आणि भारतात मात्र ख्रित धर्म प्रचारकांच्या प्रचारला बळी पडून अनेक हिंदू धर्मांतर करत होते, तर सुशिक्षित समाज याकडे दुर्लक्ष करत होता हे त्यांना अजिबात आवडले नव्हते.

अशा अनेक गोष्टींना, प्रसंगांना विवेकानंद आपल्या भ्रमण यात्रेत सामोरे जात होते. “नरेन एक दिवस सारं जग हलवेल” असा त्यांच्या गुरूंचा रामकृष्णांचा शब्द खरा करून दाखवलेला हा नरेंद्र सहा वर्षांपूर्वी शारदा देविंचा आशीर्वाद घेऊन निघाला होता तो आता विश्व विजेता होऊन भारतात परतत होता. त्यामुळे त्यांच्या गुरुबंधूंना कोण आनंद झाला असेल ना? स्वामींनी सर्वधर्म परिषदेला शिकागो येथे जाण्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले होते.ते सर्वजण खूप आनंदले होते. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी चालू होती. विवेकानंद सुधा मातृभूमीला भेटायला उत्सुक होते. हा विचारच त्यांच्या अंगावर रोमांच उभे करत होता. भारताच्या आत्म्याला जाग आणण्यासाठी पुढे प्रयत्न करून हिमालयात अद्वैताश्रम उभा करायचे स्वप्न आणि योजना त्यांचे मन आखत होते. पंधरा जानेवारी चा सूर्योदय पहिला तो श्रीलंकेच्या किनार्‍यावरचा अर्थात तेंव्हाच्या सिलोन चा. जहाज पुढे पुढे जात होते तसतसे किनार्‍यावरीला नारळीच्या बागा दिसू लागल्या. कोलंबो बंदर लागले. भारताचे दर्शन झाल्याने स्वामीजींच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव होतेच. आता उतरल्यावर आपल्या बरोबर आलेले तीन पाश्चात्य सह प्रवासी म्हणजेच पाश्चात्य शिष्य यांची उतरल्यावर राहण्याची सोय करायची हाच विचार त्यांच्या डोक्यात होता.

कोलंबो बंदरात जहाज थांबले आणि एक नाव घेऊन स्व्मिजिना उतरवायला गुरु बंधु निरंजनानंद,आणि काही प्रतिष्ठित नागरिक आले. विवेकानंद, सेव्हियर पाती पत्नी, आणि गुडविन यांना त्या नावेतून किनार्‍यापर्यंत आणले. प्रचंड जमलेल्या जन समुदायाच्या साक्षीने पी कुमारस्वामी यांनी भला मोठा पुष्पहार घालून स्वामीजींचे स्वागत केले आणि सजवलेल्या घोडा गाडीत चौघांना बसवून त्यांची स्व्गता प्रीत्यर्थ मिरवणूक सुरू झाली, हे सर्व अनपेक्षित होतं,प्रचंड जल्लोषात स्वामी विवेकानंद यांचे पहिले स्वागत भारतात करण्यात आले

रस्त्यावरून जाताना नयनरम्य स्वागत सोहळा अनुभवत होते ,स्वामीजी, आणि विशेषत त्यांचे पाश्चात्य शिष्य. सुशोभित भव्य कमानी, स्वागत करणारे भव्य फलक, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या पताका, घरांवर केलेली  सजावट,प्रकांड, मंडप, व्यासपीठ, मस्तकावर होणारी पुष्पवृष्टी, मंगल वाद्यांचे स्वर, तामिळ व संस्कृत मध्ये म्हटले जाणारे मंत्र, नागरिकांनी लिहिलेले मानपत्र अहाहा केवढा तो आनंदी सोहळा होता.हा सोहळा उत्स्फूर्तपणे ,प्रेमापोटी होत होता. त्यात उच्च पदस्थापाऊण सर्व सामान्य लोकांपर्यंत सर्व जन सहभागी झाले होते. एखाद्या धनाढ्याचा प्रायोजित मॅनेज केलेला स्वागत सोहळा नव्हता, तो निष्कांचन असलेल्या एका सन्याशाच्या स्वागताचा सोहळा होता. या संस्कृतीमधून विवेकानंद यांना भारतीय आत्म्याचा एक सुंदर आविष्कार दिसला होता. यात ते आपल्या महान संस्कृतीचे वैशिष्ठ्य अनुभवत होते आणि ते जतन केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. इथेच सुरू झाली होती त्यांची गौरवयात्रा.

ही तर सुरुवात होती भारतातल्या स्वागताची. छत्री, अबदागिरी, पताका, निशाणे, वाद्ये, मंत्र पठण, या सर्व पारंपारिक प्रकारांचा समावेश या स्वागतात केला गेला होता. जणू भगवान शिवाचा अवतार म्हणूनच विवेकानंद यांची पुजा केली होती. हा सर्व आश्चर्यकारक स्वागत सोहळा स्वत: गुड्विन यांनी पत्राने बुल यांना कळवला होता आणि म्हटले होते की, स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर सेव्हीयर पतिपत्नी आणि मी, आम्हा तिघांच्याही वाट्याला हे जिव्हाळा असलेले स्वागत/सन्मान आले.

त्यानंतर श्रीलंकेतले प्राचीन मोठे शहर  अनुराधापुरम, जाफना इथे भेट दिली. २००० लोकांपुढे त्यांचे व्याख्यान झाले. सार्वजनिक सत्कार, मानपत्र,३ किलोमीटर लांब रस्त्यावर केळीचे खांब दुतर्फा लावून सुशोभित केलेले. शेकडो लोकांची मशाली हातात घेऊन विवेकानंदांना आणण्यासाठी निघलेली मिरवणूक, त्यात पंधरा हजार लोकांचा सहभाग,आणि आसपासच्या लहान मोठ्या गावातून विवेकानंदांना पहाण्यासाठी अमाप उत्साहात आलेले लोक. त्यात गौरवपर झालेली भाषणे, विवेकानंद यांचे व्याख्यान आणि लोकाग्रहास्तव झालेले सेव्हीयर यांचे भाषण. हे सगळं कशाच द्योतक होतं? हा तर स्वामी विवेकानंद यांच्या बद्दलचा व्यक्त झालेला आदरभाव होता. त्यांच्या कामाची पावती होती. आता सुरू होणार होता पुढचा प्रवास … 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तुझी माझी जोडी…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तुझी माझी जोडी…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

माझ्या या कामामध्ये खूप वेळा हृदय पिळवटणाऱ्या घटना घडतात, भावनांचा कस लागेल, अशा गोष्टी हाताळाव्या लागतात… अश्रू बर्फ होतील की काय असं वाटायला लागतं…. ! 

गाण्यातले सूर हरवले की ते गाणं बेसूर होतं…. 

परंतु जीवनातलं मन हरवलं की अख्ख आयुष्य भेसूर होतं… 

असे भेसूर प्रसंग डोळ्यांनी पहावे लागतात… अनुभवावे लागतात…. मन सुन्न होतं… असंही काही असतं यावर विश्वास बसत नाही.,. या परिस्थितीत नेमकं काय करावं बऱ्याच वेळा कळत नाही…! 

असे अनेक करुण प्रसंग पुस्तक रूपानं शब्दबद्ध करून ठेवले आहेत….! माझ्या पुस्तकातल्या पानात हे प्रसंग बंदिस्त झाले आहेत…  पिंपळाच पान ठेवावं तसे … !  या पानाच्या आता जाळ्या झाल्या आहेत… पण हरकत नाही ! … ही सुंदर नक्षीदार जाळी, मला माझ्या म्हाताऱ्या झालेल्या याचकांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची दरवेळी आठवण करून देते… ! 

…. आणि मीच रचलेल्या या जाळ्यात दरवेळी अडकायला मलाच खूप आवडतं….! 

मात्र संपूर्ण दिवसात एक तरी प्रसंग असा घडतो जिथं पोट धरून हसावं…. एक तरी सुखद प्रसंग असा घडतो की तो अनुभवताना वाटतं, धन्य झालो… या प्रसंगाचा साक्षीदार होण्यासाठी निसर्गाने मला जिवंत ठेवलं… ! … संपूर्ण आयुष्य जगून झालं, तरीही सुख आणि समाधान म्हणजे काय हे अनेकांना कळत नाही, अशावेळी रस्त्यात बसलेला माझा एखादा याचक, चार ओळींमध्ये जगण्याचं सार सांगून जातो….! 

हे प्रसंग आणि आशावादी चित्र, मला सुद्धा जगायचं बळ देतं…. उद्या उठून परत तिथेच जाण्यासाठी प्रवृत्त करतं…. हे आशावादी चित्र म्हणजे माझ्या कामाचं टॉनिक आहे..! 

हे सर्व प्रसंग नंतर आठवून शब्दबद्ध करता येतात, परंतु दरवेळी कॅमेऱ्यात ते टिपता येत नाहीत…

पण, असं एक क्षणचित्र चुकून का होईना, पण कॅमेऱ्यात काल शनिवारी २५ मार्च रोजी बंदिस्त करता आलं. 

वरवर गमतीचा वाटावा, असा हा प्रसंग. परंतू  खूप काही शिकवून गेला. भेगाळलेल्या मातीवर पावसाचा टिपूस पडावा, तेव्हा त्या मातीला काय वाटत असेल ….?  नेमकं तेच मला या प्रसंगातून वाटलं…! 

तोच हा प्रसंग…

… एक आजी, वय वर्षे साधारण ७५….तिला माझ्याकडून काही वैद्यकीय साधने हवी होती, पण त्यावेळी ती साधने माझ्याकडे नव्हती. आजी माझ्या प्रेमाचीच, परंतू त्यावेळी मात्र ती चिडली, मला उलट सुलट बोलायला लागली. आमच्यात मग रस्त्यावरच्या रणांगणावर, “शाब्दिक घनघोर युद्ध” झाले…! 

… जुनं खोड हे … म्हातारी काय बोलायला ऐकते का मला ? प्रश्नावर प्रतिप्रश्न …. उत्तरावर प्रतिउत्तर… ! 

…. पट्टीच्या पैलवानाला दहा मिनिटात रिंगणात आसमान दाखवावं, तसं म्हातारीने दहा मिनिटात, मेरे जैसे छोटे बच्चे की बोलून बोलून जान ले ली राव …! 

एक दिन मैं पानी में  “शिरा” फिर “पोहा”…. अशा टाईपचे माझं हिंदी…. 

“गाडी के नीचे कुत्रा बसलाय…”  हे सुद्धा अस्मादिकांचेच वाक्य आहे …. ! 

वरील दोन्ही हिंदी वाक्यांचा मूर्ख (सॉरी, “मुख्य” म्हणायचं होतं….) निर्माता मीच आहे… !

तरीही मी खूप आनंदी आहे, कारण नवनिर्मिती महत्त्वाची ! 

असो….

तर यानंतर, मी पराभूत होऊन, तिला शरण गेलो, मान खाली घातली…! तरीही म्हातारीचा जिंकण्याचा आवेश अजून उतरला नव्हता….तिने उठून उभे राहत, अक्षरशः कसलेल्या पैलवानागत शड्डू ठोकत, मला कुस्ती खेळण्यासाठी आव्हान दिले…! .. आभाळाकडे दोन्ही हात नेऊन आभाळाला गुदगुल्या कराव्या तशी बोटांची ती हालचाल करत होती… मध्येच एका पायावर उभे राहण्याची कसरत करत, शड्डू ठोकत, मला चिडवत, डिवचायची…’.ये की रं… घाबरलास का ? खेळ माझ्यासंगं कुस्ती…ये…!’ 

…. इकडे माझ्यावर इतका “भीषण प्रसंग” उद्भवला होता आणि आजूबाजूची मंडळी पोट धरधरून हसत होती… तेवढ्यात एक जण माझ्या कानाशी येऊन, जोरात हसत म्हणाला, ‘ खेळा डॉक्टर म्हातारीशी कुस्ती….!’

…. चिडलेल्या म्हातारीने नेमके हे ऐकले आणि ती आणखी चवताळली… या मूर्खाला जोरातच बोलायचे होते, तर कानाशी का बरं हा आला असेल ? मूर्ख लेकाचा….पण आता हे बोलून त्याने काळ ओढवून घेतला होता…! ‘ ये मुडद्या तू बी ये, कुस्ती खेळायला….’, म्हातारीने कुस्ती खेळण्याचे आवाहन शड्डू ठोकत त्याला सुद्धा दिले. म्हातारीचा आवेश काही केल्या उतरेना…! 

…. मेलेल्या उंदराला शेपटीला धरून बाहेर फेकावं, तसं म्हातारी आता माझ्या ॲप्रनला चिमटीत धरून, मला हवेत गरागरा फिरवून, चितपट करणार… हे स्पष्ट होते. … “सर सलामत तो पगडी पचास” असा शहाणा विचार करून मी तिच्यापुढे पुन्हा शरणागती पत्करली. “बचेंगे तो और लढेंगे” असा प्रेरणादायी विचार मनात घोळवत… ‘ म्हातारे, मी हरलो ‘ असं जाहीरपणे कबूल केलं. कोंबडीनं मान टाकावी, तशी मान टाकून पराभूत योद्धाप्रमाणे मी तिथून निघालो. 

लटपटत का होईना… परंतु शूर योद्धाप्रमाणे म्हातारी पुन्हा माझ्यासमोर आली . चेहऱ्यावरच्या प्रत्येक सुरकुतीमधून विजयाचा आनंद ओसंडून वाहत होता…! …. “आयुष्यभर परिस्थितीशी कुस्ती करून, कायम पराभूत झालेली ही म्हातारी, आमच्या या कुस्तीत मात्र जिंकली होती” 

पण, योग्य वेळी हार मानून आपल्या माणसांना जिंकताना पाहणं यातही वेगळाच आनंद असतो….! 

तर… उंदराला मारलं, तरी मांजर काही वेळ त्याच्याशी खेळत राहतं, त्याप्रमाणे म्हातारी मला पुन्हा डिवचत म्हणाली, ‘का रं… हरलास ना ?’  म्हातारीला तिचा विजय माझ्या तोंडून पुन्हा वदवून घ्यायचा होता….! 

इंजेक्शन टोचल्यागत, कळवळून मी तिला, ‘ म्हातारे, तुच जीतलीस ‘ म्हणालो..! 

माझा पराभूत चेहरा आणि पडलेले खांदे पाहून म्हातारीला आता माझी दया आली असावी….

मला म्हणाली, ‘ चिडलास व्हय लेकरा…? आरं म्या गंमत केली तुजी… जितायची जितं खात्री आस्ती, मानुस तितंच कुस्ती खेळाया जातू…. तू मलाच जितवणार हे मला म्हाईत हुतं ल्येकरा….!’ … आजीच्या डोळ्यात आता पाणी होतं…! ‘ आरं कसली आलीया हार आणि कसली आलीया जीत ल्येकरा ??? बुद्धिबळाचा डाव संपल्यावर राजा,वजीर, हत्ती, घोडे आणि प्यादी एकाच डब्यात गप गुमान बसून असत्यात बग…! ‘ 

… वरवर अडाणी वाटणाऱ्या आजीने, या गमतीशीर प्रसंगातून, अख्ख्या आयुष्याचं सार सांगितलं….!!!

आजीच हे वाक्य ऐकून खरं तर मी अंतर्बाह्य हलून गेलो होतो….खरंच किती सत्य होतं हे ?  

तरीही, आजीची आणखी थोडी गंमत करावी, म्हणून मग मी अजून थोडा “रुसून” बसलो… तिच्यापासून बाजूला सरकून बसलो….

….. “आंतर चालण्यात असावं बाबा…. बोलण्यात आणि नात्यात ठेवू न्हायी” असं समजुतीने म्हणत,  माझ्या जवळ येत, छोट्या नातवाचा रुसवा काढावा, तशी ती माझ्याजवळ आली… म्हणाली, ‘ बाळा, ज्याला कुटं, कंदी, काय हरायचं त्ये कळतं…त्योच खरा जिततो…’

यानंतर, माझे दोन्ही हात हातात घेऊन, झोपाळ्यागत हलवत ठेक्यात ती गाणं गाऊ लागली….

तुजी माजी जोडी…

झालास का रं येडी…

चल जाऊ शिनीमाला…

आणू का रं गाडी…? 

…. आता इतक्या मायेने आजी जर नातवाला विनवत असेल…. तर कुठल्या नातवाचा राग पळून जाणार नाही ? तिचे सुरकुतलेले ते हात अजूनही माझ्या हाती होते… हातावरची आणि चेहऱ्यावरची प्रत्येक सुरकुती ही आयुष्यानं शिकवलेल्या अनुभवांची होती… पचवलेल्या पराभवाची होती…! 

रस्त्यावर एकटी आयुष्य कंठत असताना, समोर येणाऱ्या वाईट परिस्थितीला सुद्धा, या वयात, दरवेळी शड्डू ठोकत, ‘ये खेळ माझ्यासंगं कुस्ती’ असं म्हणत आव्हान देत होती….! 

…. छोट्या छोट्या गोष्टींनी पिचून जात, रडत राहणारे आपण… चटकन हार मानणारे आपण….! 

माझ्यासाठी ती मात्र एक “अजिंक्य मल्ल” होती…! तिच्या कानाशी जाऊन मी म्हणालो, ‘आजी मी तुला जितवलं नाही… तू खरोखर जिंकली आहेस …! 

…. यावेळी मी तिच्या डोळ्याकडे पाहिले आणि सहज आभाळाकडे लक्ष गेलं….. दोन्ही पाण्याने भरले होते…! मी ते माझ्या ओंजळीत घेतलं …

…… तीर्थ ….तीर्थ …म्हणत असावेत, ते हेच असेल काय ???

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ध चा मा ? …लेखक – श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ध चा मा ? …लेखक – श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आमच्याकडे एअरपोर्टला (इंडियन एयरलाईन्स) कधी कोणती घटना अचानकपणे वावटळीसारखी अंगावर येईल, याबद्दल भविष्य वर्तवणे मोठ्या मोठ्या ख्यातनाम ज्योतिषाचार्यांनाही शक्य होणार नाही.

त्या दिवशी पण तेच झाले. दुपारच्या (आफ्टरनून) शिफ्टला मी ड्युटी मॅनेजर होतो. आमची सर्व डिपार्चर फ्लाईटस व्यवस्थित वेळच्या वेळी निघाली होती. येणारी फ्लाईटस पण वेळेवर होती. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय उत्साही, आनंदी मूडमध्ये होते. संध्याकाळच्या पांच वाजताच्या हैद्राबाद फ्लाईटची “प्रवाश्यांनी विमानाकडे प्रस्थान करावे,” ही अनाऊन्समेंट झाली होती. तेवढ्यात वॉकीटॉकीवर बोर्डिंग पॉईंट स्टाफचा आवाज आला. “ Coordination cell, Base Coordination, Duty Manager all to note, a lady passenger wants to cancel her journey to HYD on flight IC117 on health ground.”

 हा मेसेज ऐकताच मी कपाळाला हात लावला. या क्षणाला प्रवास रद्द करणे म्हणजे त्या महिलेचे बॅगेज विमानातल्या बॅगेज होल्डमधून असंख्य बॅगमधून शोधून खाली उतरवायचे. मग बोर्डिंग लिस्टमध्ये फेरफार करायचे. म्हणजे एकूणच फ्लाईटला उशीर होणार.

पांचच मिनिटांत पुन्हा  वॉकीटॉकीवर त्याच स्टाफचा आवाज घुमला, “Duty manager , please rush to Boarding gate area. It’s an emergency situation. The lady passenger is having heated arguments with Tarmac Officer Bannerjee.”

आता काय नवीन प्रॉब्लेम आला? मी बोर्डिंग गेटच्या दिशेने धांव घेतली. आमचा बॅनर्जी नांवाचा ऑफिसर त्या महिला प्रवाशाशी कांहीतरी बोलत होता. ती महिला प्रचंड भडकलेली होती. मला कांहीच कळेना, की तिची सफर रद्द करण्यामध्ये एवढं भडकण्यासारखं काय झालं असेल. मी त्या महिलेला कांही विचारणार, तोच बॅनर्जी तिला म्हणाला “ ऑप इतना गडम क्यूँ होता हाई म्हातारीअम्मा ? हाम आप को सिर्फ टांग उपर करने को बोला.”

यावर ती महिला उसळली. “बेशरम आदमी हम को टांग उपर करने को बोलता है ? मैं तुम को जमीन में जिंदा दफना देगी. एयरलाईन्स का ड्रेस पेहना तो खुद को बादशहा समझाने लगा क्या ? और मै तुम को बुढ्ढी लगती हूँ ?”

मी त्या महिलेला हाताच्या इशाऱ्याने शांत व्हायला सांगितले, “क्या हुवा बेहन जी ? आप मुझे बताइये . मैं आपकी मदद करुंगा . प्लीज आप गुस्सा मत होईये. इन्हे हिंदी में ठीक तरह  से बातचीत करने नहीं आती. इसलिये ‘मोहतरमा’ के बदले ये ‘म्हातारी अम्मा’ कह गये. मै उनकी तरफ से माफी मांगता हूं . ”

माझ्या या सांगण्यावर ती महिला थोडी शांत झाली, पण चढ्या आवाजांत म्हणाली, “मेरे दांत में बहोत दर्द है . मैं सफर नहीं कर सकुंगी. बस इतना मैंने इन जनाब से कहा, तो उन्होने मुझे टांग उपर करने को कहा. क्या ऐसे बेहुदा बाते करनेवाले अफसर आपने तैनात किये हैं ? मैं उपरतक इनकी कम्प्लेंट करूंगी.”

मला आश्चर्याचा धक्का बसला. बॅनर्जी म्हणजे देवमाणूस. त्याच्या तोंडात कधी शिवीसुद्धा नसायची. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्याच्या बोलण्यात सदैव असायची. हा माणूस असं कांहीतरी अभद्र बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.

मी बॅनर्जीला म्हणालो, “यार, पहलेही सिच्युएशन खराब है. और क्यूँ इसे बिगाड रहे हो ? इस लेडी को टांग उपर करने को क्यूँ कहा आप ने ?”

यावर बनर्जीने जे उत्तर दिले, ते ऐकून मला हसावे की रडावे, ते कळेना.

तो म्हणाला “ मुझे डेंटल प्रॉब्लेम की एक आयुर्वेदिक दवा मालूम है. मुझे भी कभी कभी ये प्रॉब्लेम होती है. इसलिये मैं वो दवा हमेशा मेरे पास रखता हूं. मैंने लेडी को बोला: टांग उपर करो,” असं म्हणून बॅनर्जीने आपली अख्खी जीभ बाहेर काढली. ये … ये … इस को बोलते है ‘टांग,’ रेगे साब. वो ‘टांग’ उपर करेगी, तो मुझे मालूम पडेगा स्वेलिंग किधर है. फिर उधर ये गोली रख के मूंह बंद रखनेका. बस्स दस मिनिट में दोर्द गायब होता है.”

अरे देवा !! म्हणजे हा सद्गृहस्थ जिभेला ‘टांग’ म्हणत होता, टंगच्या ऐवजी. आणि ती महिला हिंदी ‘टांग’ समजली होती. आता चारचौघात “टांग उपर करो” म्हटल्यावर कोणीही भडकेल. पण ‘टंग’चा बंगाली उच्चार “टांग” होऊ शकतो, ‘वडा’चा उच्चार ‘बोडा’ होऊ शकतो, अनिलचा उच्चार ‘ओनील’ होतो, ‘चाय पिओगे’चं ‘चाय खाबे’ होऊ शकतं, ‘कवी’चा ‘कोबी’ होऊ शकतो हे मला ठाऊक होते. मी त्या महिलेला हळू आवाजांत हा सर्व भाषिक घोटाळा नीट समजावून सांगितला. बॅनर्जीने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या आणि त्या दुखऱ्या जागी ठेवून द्यायला सांगितल्या. ती महिला हे ऐकल्यावर खूप ओशाळली. शाब्दिक गैरसमजातून एका सज्जन माणसाला आपण नको नको ते बोललो, याचा खेद तिला होत होता. पुन्हा पुन्हा बॅनर्जीला सॉरी … सॉरी … म्हणत, ती विमानाच्या दिशेने चालू लागली. बॅनर्जीच्या ‘टांग’ने आमच्या फ्लाईटच्या उड्डाणात अडवली जाणारी कॅन्सलेशनची ‘टांग’ नाहीशी केली. पण यानंतर आमच्या ऑफिसांत ‘टांग उपर करो’ हा परवलीचा शब्द झाला. कोणी साधं ‘डोकं दुखतं आहे’ असं म्हणाला, तरी समोरचा त्याला म्हणायचा ‘टांग उपर करो’ आणि पाठोपाठ सर्वांच्या हास्याचा धबधबा कोसळायचा.

लेखक : श्री अनिल रेगे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares