मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ म्हातारपण, श्रवणयंत्र व ऐकू न येणे… लेखक – श्री अतुल मुळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ म्हातारपण, श्रवणयंत्र व ऐकू न येणे… लेखक – श्री अतुल मुळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

—  हे प्रॉब्लेम आम्ही आमच्या आईचे कसे सोडवले? याचा स्वानुभव. 

आमच्या आईसाठी केवळ घ्यायचे म्हणून तीन श्रवणयंत्रे ती जाईपर्यंत घेतली. साधारण ₹ ४५ हजार खर्च झाला. साधारण ₹ १५ हजार श्रवणयंत्राची किंमत असते. त्या श्रवणयंत्राचा, आई फक्त कुठे प्रोग्रामला गेली तर एक दागिना येवढाच उपयोग झाला. ते ॲडजस्ट करणे, सांभाळून वापरणे, म्हातारपणी त्रास असतो. प्रॅक्टिकली वापर फार कमी केला जातो व खराब होतात. पेशंटला फक्त समाधान असते की आपल्या प्रॉब्लेमवर मुलांनी खर्च केला. दुर्लक्ष केले नाही. 

यावर प्रॅक्टिकल उपाय काय? हा प्रश्न अनेक नातेवाईकांना असतो. 

यावर अनुभवातून सापडलेले उपाय सांगतो…… 

) श्रवणयंत्रापेक्षा खूप चांगला नोकियाचा साधा एक फोन या लोकांना द्यावा. टीव्हीला एक लोकल एफ एम ट्रान्समीटर लावावा. आम्ही असे १५ वर्षे आमच्या घरात आईसाठी केले होते. त्या एफ एम ट्रान्समीटरची रेंज घरापुरतीच असते. त्याची फ्रिक्वेन्सी मोबाईलवरील एफ एम रेडिओवर छान कॅच होते. टीव्ही इतका सुंदर ऐकू येतो की बहिरे लोक फारच खूश होतात व ते लोक टीव्ही बघताना बाहेर मोठा आवाज नसल्याने घरात शांतता राहते. —–अशा प्रकारे टीव्हीचा प्रॉब्लेम सोडवावा. 

) इतर वेळेस अशा घरातील पेशंटबरोबर बोलताना अनलिमिटेड टॉकटाईम पॅक मोबाईलवर टाकावे व या लोकांशी मोबाईलवरूनच संपर्क साधावा. 

मोबाईलला हेडफोन्स लावून या लोकांना टीव्ही ऐकणे व इतर संभाषण करणे या प्रकारे सोपे जाते. नोकियाचे साधे हजार रूपयाचे फोन दहा वर्षे खराब होत नाहीत. कायम गळ्यात फोन लटकवायची सवय होते. 

मी माझ्या आईची शेवटची १५ वर्षे अशीच मॅनेज केली व त्याचे मला व घरातील सर्वांनाच समाधान आहे.

शेवटपर्यंत तिने टीव्ही ऐकला. फोनवर नातेवाईक लोकांशी संवाद साधला. 

त्या काळात अनलिमिटेड टॉक टाईम पॅक सेवा फोनसाठी नसायची. म्हणून कधी कधी मोठ्याने बोलावे लागायचे. पण आता तो प्रश्न शिल्लक नाही. सर्वत्र वायफाय वगैरे असते. फोनवरही अनलिमिटेड डाटा टाकता येतो. व्हॉटस ॲप कॉलही छान होतात. 

श्रवणयंत्रापेक्षा, वृद्ध व कमी ऐकू येणारे बहि-या लोकांसाठी ‘ स्वस्त मोबाईल फोन सेवा ‘ अशी पद्धत सरकारनेच स्वस्तात द्यायची गरज आहे. ते फार सोईस्कर आहे. ही कल्पना संबंधितांपर्यंत पोहोचवा. 

॥ शुभम् भवतु ॥

संग्राहक :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होळी… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ होळी… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

आपण भारतीय लोक उत्सव प्रेमी लोक. भारत संस्कृती प्रधान देश. कृषी प्रधान देश. आपल्या संस्कृतीत सणांना खूपच महत्त्व आहे. सर्व सण हे पर्यावरणावर आधारित असेच आहेत. फाल्गुन हा मराठी वर्षाचा शेवटचा महिना. शेतकऱ्यांचा थोडा निवांतपणाचा काळ. सृष्टीमध्ये नवनवीन रंग घेऊन येणाऱ्या, वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत आणि थंडीला निरोप असा हा सण  म्हणजे होळी.

हा सण फाल्गुनी पौर्णिमेला साजरा केला जातो. काही ठिकाणी तो दोन दिवस , तीन दिवस तसेच पाच दिवसही साजरा करतात. पौर्णिमेच्या दिवशी ‘ होळी ‘ दुसरे दिवशी धुळवड, आणि पाचवे दिवशी रंगपंचमी असा साजरा करण्याची प्रथा आहे. ‘होलीका ‘  या नावावरून ‘,होळी’ हे नाव या सणाला पडले आहे .आपल्या देशाच्या उत्तर भागात ‘ होरी ‘ किंवा  ‘दोलायात्रा ‘असेही म्हणतात. गोवा, महाराष्ट्रात कोकणात ‘ शिमगा ‘ ‘हुताशनी ‘ ‘होलिका दहन ‘ ‘ फाल्गुनोत्सव ‘ वसंतोत्सव  तसेच दक्षिणेत काम दहन असेही म्हणतात.

पुराणकथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाणले होते .त्यानंतर त्यांनी रंग रूपाने पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे हाही या उत्सवा मागील हेतू आहे. आणखीही अशी कथा सांगितली जाते की ,लहान मुलांना  पीडा देणाऱ्या ‘ होलिका ‘, किंवा  ‘होलाका ‘   ‘ढुंढा’, ‘ पूतना,’ यासारख्या राक्षसींच्या प्रतिकांचे होळी पेटवून दहन केले जाते.

त्याचबरोबर आणखीही अशी कथा सांगतात की ,हिरण्यकश्यपू या अहंकारी राजाचा प्रल्हाद हा मुलगा नारायणाचा भक्त होता. राजाला नारायणाचे नाव घेतलेले पसंत नव्हते. अनेक प्रकारे तो प्रल्हादाला घाबरवत होता. जेणेकरून त्याने नारायणाची भक्ती सोडून द्यावी .राजाने आपली बहीण ‘होलीका ‘ हिच्याकरवी एक योजना आखली. ‘ होलीकेला’ अग्नीवर विजय मिळविण्याचे वरदान मिळाले होते .त्यामुळे होलीकेला राजाने सांगितले की, तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बैस . त्याप्रमाणे ती  प्रल्हादाला घेऊन चितेवर बसली. प्रल्हाद नारायणाच्या नामस्मरणात लीन झाला होता .इतक्यात होलिका जळायला लागली. आकाशवाणी झाली . तिला वरदानात असं सांगितलं होतं की, तिच्या वरदानाचा तिने दुरुपयोग केला तर , ती स्वतः जळून जाईल. त्याप्रमाणे ती स्वतः भस्मसात झाली .आणि प्रल्हादाला काहीच झालं नाही .सृष्टीचा दृष्टांवर होणाऱ्या  विजयाचे प्रतीक म्हणून ही होळी .

होळी प्रज्वलित करताना, रचनेच्या मध्यभागी खोड उभे केले जाते . त्याला ‘माड ‘ असे म्हणतात. .त्याच्याभोवती इतर लाकडे रचली जातात. होळी प्रज्वलित करताना कर्त्याने शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. “सहकुटुंबस्य मम  ढुंढा राक्षसी प्रित्यर्थं  तत्पीडा परिहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये” असा मंत्र म्हणून, समिधा वाहून होळी पेटवितात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. आणि नारळ अर्पण करतात. फाल्गुन पौर्णिमेला ‘पूर्वा फाल्गुनी ‘ नक्षत्र येते. त्या नक्षत्राची ‘भग ‘ ही देवता आहे. महाराष्ट्रात भगाच्या नावाने बोंबा मारत होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. यामागचे मानसशास्त्रीय कारणही आहे .मनात जे किल्मिष, द्वेष, राग ,चीड ,असे शड्ररिपू  बाहेर पडून जावेत. मन स्वच्छ  हॅलो अँड एमटी असे व्हावे . मनातले अमंगल अशुभ होळीच्या अग्नीत जाळून नाश करायचे. आणि चांगल्या शुभ, मंगल अशा गोष्टींचा स्वीकार करायचा हा संदेश होळीचा आहे. होळी शांत झाली की दूध आणि तूप शिंपडून शांत केली जाते.

उत्तर भारतात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात .इंदूर शहरात वेगळी पद्धत आणि एक  शान असते .या दिवशी शहरातील सर्व लोक राजवाड्याजवळ एकत्र येऊन होळी साजरी करतात. हा सण सुरुवातीला बंगालमध्ये खेळला जात असला तरी, ब्रजप्रदेशातील श्रीकृष्णाच्या मथुरा , वृंदावन ,बरसाना ,नंदगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने ते पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. रात्री नृत्य गायनाचा कार्यक्रम करून करमणूक  केली जाते .इंग्रजीत या सणाला ” होली फेस्टिवल ऑफ कलर्स ” असे म्हणतात. वजीराला होळी दिवशी पुरुष– महिला  एकमेकांना रंग लावतात. आणि महिला पुरुषांना काठीने मारतात . ही प्रथा पाहण्यासाठी लोक मुद्दाम  व्रजयान या ठिकाणी जातात. आपण टीव्हीवरही प्रथा पाहतो.पहाताना गंमत वाटते.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला ‘ ‘धुळवड’, असे म्हटले जाते. या दिवशी, आदल्या दिवशीच्या होळीच्या रक्षेची म्हणजे धुळीची पूजा करून ,रक्षेची प्रार्थना करतात. ” वंदितासि  सुरेंद्रेण ब्रम्हणा शंगकरेणच ।

अतस्तं  पाहिनो देवी भूतो भूतिप्रदा भव ।। हे देवी धुली, तू ब्रम्हा, विष्णू ,महेशानी  वंदित आहेस. म्हणून तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो. आणि आमचे रक्षण कर. असे म्हणून ती रक्षा, शेण, आणि चिखल असे पदार्थ अंगाला लावून नृत्य गायनही करतात. आयुर्वेदात मडथेरपी अशाच पद्धतीची असावी.

फाल्गुन वध पंचमीचा दिवस म्हणजे ” रंगपंचमी “.महाराष्ट्रात किंवा इतरही ठिकाणी ग्रुप करून, एकमेकांच्या घरी जाऊन, रंग आणि गुलाल लावण्याची किंवा उडवण्याची प्रथा आहे.  ” “बुरा मत मानो,  होली है।असं म्हणतात. पूर्वीच्या काळी केशराचे आणि नैसर्गिक रंग उडवून आनंद लुटत असत .रासायनिक रंग उडवणे म्हणजे प्रकृती बिघडवून घेणे होय.

आता होळी साजरी करत असताना, आपणही मनातील किल्मिष, एकमेकांबद्दल वाटणारा राग सोडून देऊन नवीन वर्ष रंगा रंगात  न्हाऊन जाऊन एकमेकात आदर आणि प्रेम प्रस्थापित करूया. होळीला नमस्कार करून आशीर्वाद घेऊ या.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी … सुश्री पल्लवी पाटणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी … सुश्री पल्लवी पाटणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक मूलभूत पायर्‍या.    

एकाच जोकवर आपण परत परत हसत नाही. तर मग एकाच दुःखावर आपण परत परत का रडतो?

कधी विचारलं आहे आपण स्वतः ला की आपण एकाच दुःखावर वारंवार का विचार करतो, आणि जर करतोय हे जाणवते आहे तर मग त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतः ची मदत कशी आणि किती करतोय?

मानसोपचाराच्या क्षेत्रात गेली 15 वर्षे सतत काम करताना मला ही गोष्ट नेहमीच जाणवत राहिली की आपण सगळेच आपल्याला किती आणि कसा त्रास होतोय, कोणामुळे होतोय हे पुनःपुन्हा बोलत असतो आणि त्या प्रत्येक वेळी पुनःपुन्हा स्वतः ला नकारात्मक विचारांमधे घेऊन जात असतो. हे अगदी नकळतच होते, पण त्याने त्या प्रत्येक वेळी होणारा त्रास मात्र अधिकाधिक वाढतच राहतो हे लक्षात येत नाही.

भावनिक त्रास कमी करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण किती दुर्दैवी आहोत, आपल्यावर कसा अन्याय झाला आहे, कोणी आपला किती छळ केलाय, आपणच किती भोगलय, किती असह्य झालय आणि आपला कसा बळी गेलाय किंवा आयुष्याची कशी माती झालीय त्यामुळे आता काही होऊ शकणार नाही इत्यादी…… सगळे स्वतः ला सांगणे पुर्णपणे बंद करणे.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला हेच तर जमत नाही, हे विचार बंद करणं इतक सोपं असतं तर मी केव्हाच केलं असतं ना असेही स्वतः ला सांगणे थांबवले तरच एक पाऊल पुढे म्हणजेच प्रगतीच्या, भावनिक सौख्याच्या दिशेने जाता येईल.

स्वतः ला आपणच देत असलेले नकारात्मक संदेश बंद करणे ही उपचाराची पहिली पायरी म्हणूया.

मग दुसर्‍या पायरीवर काय येईल तर आपण स्वतः ला काय सांगावे याचा सराव करणे. हा सराव तुम्हाला रोज काही सकारात्मक तार्किक विचार लिहून करता येतो आणि दीर्घ श्वसन करून शांत झालेल्या मनालाही स्वयं सूचना देऊन करता येतो.

१. मी एक सामान्य व्यक्ति आहे जी नकारात्मकतेकडे जाऊ शकते, खचू शकते, दुखावली जाऊ शकते. पण तरीदेखील हे दुःख म्हणजे माझे सर्व आयुष्य नसून हा माझ्या आयुष्यातला एक छोटासा हिस्सा आहे, ज्यातून मी अगदी सहजपणे बाहेर पडू शकेन.

२. माझा स्वतः वर ठाम विश्वास आहे की मी प्रत्येक संकटातून यशस्वीपणे बाहेर पडू शकेन.

३. कोणत्याही दुःखाचा माझ्यावर अंमल चढू न देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याची मानसिक शारीरिक ताकद माझ्यात आहे यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. 

४. ज्या गोष्टी चे दुःख, त्रास आहे ती सोडून माझ्या आयुष्यात इतर खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि प्राधान्य आहेत ज्यावर मी माझे लक्ष केंद्रित करून तिथे माझी शक्ति वापरून त्यातला आनंद वाढवू शकेन.

५. कोणी माझ्याशी कसे वागले याचा विचार करण्यापेक्षा मी नको असलेल्या, इतरांच्या नकारात्मक वागण्याला महत्व न देणे यावर माझा पूर्ण ताबा आहे.

६. भूतकाळात जे काही घडले त्यावर मात करून वर्तमानात जगण्याची आणि त्यातून आनंद मिळवण्याची क्षमता माझ्यात आहे.

आता तिसरी पायरी म्हणजे या विचारांचा लिहून आणि स्वयंसूचना देऊन अगदी नियमितपणे श्रद्धेने सराव करणे. करताना मात्र याचा कधी फायदा होईल, होईल की नाही, किती दिवस करावे लागेल असे जर पुन्हा नकारात्मक विचार केले, तर मग जे काही कराल त्याचा फायदा मिळत नाही. खूप प्रयत्न केले पण आमचा त्रास कमी होत नाही असे जेव्हा लोक म्हणतात, तेव्हा त्यामागे मूळ कारण हे आहे की प्रयत्नांमध्ये सातत्य नसते, विश्वासाचा अभाव असतो आणि जे प्रयत्न आहेत त्याबद्दल साशंकता असते.

जर योग्य दिशेने, योग्य प्रमाणात, संपूर्ण सकारात्मकतेने प्रयत्न केले तर नक्किच आहे त्या भावनिक त्रासातून बाहेर पडता येईल हे सगळ्यांपर्यंत पोहोचावे या प्रामाणिक उद्देशाने लिहिलेला हा लेख.

धन्यवाद . 

लेखिका :  सुश्री पल्लवी पाटणकर

(Psychotherapist) 

संग्राहिका : सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ धोंडी महार… – लेखक – श्री आनंद नाईक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ धोंडी महार… – लेखक – श्री आनंद नाईक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

अठराव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात “थिओडोर कुक” या, बोरघाटात ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेसाठी काम करणाऱ्या ब्रिटीश अभियंत्याने “धोंडी महार” या त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगाराच्या मदतीने खंडाळा घाटातील वनस्पतींच्या नोंदी करून सखोल अभ्यास केला आणि “फ्लोरा ऑफ दी प्रेसिडेंन्सी ऑफ बाॅम्बे” हा वनस्पतीशास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ त्याने त्या वेळी त्याच “धोंडी महार” या व्यक्तीस सादर अर्पण केला होता, त्याची गोष्ट…..

मुंबईत रेल्वे आली होती. पण पुण्यात येण्यासाठी रेल्वेमार्ग नव्हता, त्या काळातली ही गोष्ट. पूर्वीच्या काळी मुंबई पुणे प्रवासासाठी १८ तास लागायचे. इतक्या कमी वेळात पुण्यातून मुंबईस जाता येतं  म्हणून लोक खुषीत असायचे.

तो प्रवास कसा असायचा, तर पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की, सगळ्या लोकांना खाली उतरवून तिथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यात बसवून सर्वांना घाटाखाली खोपोलीत आणले जायचे. ठाकर आणि कातकरी लोकांच्याकडे सामान वहाण्याचे काम होते. लोकांना अशा प्रकारे खंडाळ्यातून खोपोलीस घेऊन जाण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटची या पारशी व्यापाऱ्याकडे होते. हा प्रवास अठरा तासात पूर्ण व्हायचा आणि इतक्या कमी वेळात पुणे-मुंबई प्रवास होतो, म्हणून लोक खूष असायचे.

याच काळात कर्जत पळसदरीवरून बोरघाट खोदण्याचे काम चालू होते. इंग्रज अभियंता असलेला थिओडोर कुक यांच्या मार्गदर्शनाखाली बोरघाटात रेल्वेलाईन टाकण्याचे व बोगदे खोदण्याचे काम सुरू होते.

आजही घाट पाहिल्यानंतर जाणवते की, त्या काळात पुरेशा सोईसुविधा नसताना देखील हे काम कसे केले असेल. या कामासाठी लाखांहून अधिक कामगार दिवसरात्र खपत होते. कोणतीही यांत्रिक अवजारं नसल्याने मजुरांकरवी साधी घमेली, फावडी व लोखंडी पहारी अशी जुजबी हत्यारं वापरून हे काम चालायचे. साहजिक त्यामुळे दररोज शेकडो अपघात होत असत. 

दिवसाला याची गणती कशी होती, तर दर दिवशी १०० एक अपघात व्हायचे. त्यामध्ये कित्येकांची हाडे तुटायची, कुणाच्या पायावर भल्लामोठ्ठा दगड पडायचा. खरचटण्यापासून जीवघेण्या अपघातापर्यन्तच्या जखमा व्हायच्या. इतक्या मोठ्या कामगारांसाठी वैद्यकीय सेवा उभारणे ही त्यावेळी अशक्य कोटीतली गोष्ट होती. नाही म्हणायला आठ दहा डॉक्टर प्राथमिक उपचार करण्यासाठी तळ ठोकून असल्याच्या नोंदी मिळतात, मात्र लाखोंच्या संख्येने असणाऱ्या कामगारांवर उपचार करण्यासाठी असणारी डॉक्टरांची संख्या असून नसल्यासारखी होती.

अशा वेळी लाखभर लोकांसाठी उपचार असायचा, तो धोंडी नावाच्या व्यक्तीचा. धोंडी इथेच मजूर म्हणून काम करीत होता. पण त्याला वनस्पतीशास्त्राची चांगली माहिती व जाणीव होती. कुणाचा पाय मुरगळला किंवा मोठमोठ्या जखमा झाल्या तर मजूर धोंडीकडे जात. तो जंगलातला पाला तोडून आणत असे, आणि त्यावर तात्काळ उपचार करीत असे. पिचलेली हाडे तो वनस्पतींचा लेप लावून ठीक करत असे. आपल्या डॉक्टरांकडून उपचार होत नाहीत, पण इथे असणाऱ्या या धोंडी महार या व्यक्तीकडून कसे पटकन उपचार होतात, जखमा बऱ्या होतात, असा प्रश्न मुख्य इंजिनियर असणाऱ्या थिओडोर कुक्स या अधिकाऱ्याला पडत असे.

त्याने धोंडी महार या व्यक्तीला सोबत घेतलं आणि संपूर्ण बोरघाट पालथा घातला. घाटात असणाऱ्या वनस्पतींची इत्यंभूत माहिती, त्यांचे औषधी गुणधर्म नोंद करुन घेतले. वनस्पतींचे नमुने गोळा करून त्यांची हुबेहुब चित्रं काढून घेतली आणि वनस्पतीशास्त्रावर इत्थंभूत माहिती असणारा इंग्रजी ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे नाव ‘फ्लोरा ऑफ दी प्रेसिडेंन्सी ऑफ बाॅम्बे’. वनस्पतीशास्त्रात हा ग्रंथ आजही आधारभूत गणला जातो.

विशेष म्हणजे कुकने हा ग्रंथ धोंडी महार या व्यक्तीस अर्पण केला. त्याने पुस्तकामध्ये हा ग्रंथ ‘धोंडी महार’ यास नम्रपणे  अर्पण करत असल्याचे नमूद केले आहे.

संदर्भ : प्रबोधनकार ठाकरे समग्र साहित्य

लेखक : श्री आनंद नाईक 

9822314544.

संग्रहिका : सौ प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 59 – सारा चॅपमन बुल (१८५० -१९११) ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 59 – सारा चॅपमन बुल (१८५० -१९११) ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

सप्टेंबर महिना स्वामी विवेकानंद यांनी बोस्टन मध्ये घालवला. थोडी फार व्याख्याने झाली पण मोकळा वेळ बराच मिळाल्याने आता शांतता मिळते तर काहीतरी धर्माविषयक लिहावे ,अनेक भेटी, अनेक चर्चा, अनेक संवाद झालेले होते. तेंव्हा काही गोष्टी अजूनच स्पष्ट झाल्याने, धर्म या बद्दल मोकळेपणाने आपले विचार कागदावर उतरवावेत असे वाटून, ते मिसेस आर्थर स्मिथ यांना पत्र लिहून म्हणतात की, “ आपल्याला शांतता हवी आहे आणि तशी व्यवस्था मिसेस ग्युएर्न्सी आनंदाने करतील” . नेमके हेच सारा बुल यांच्या कानावर आले आणि लगेच त्यांनी विवेकानंदांना पत्र लिहून मी तुमची सारी व्यवस्था करेन तुम्ही केंब्रिज ला  यावे असे कळवले. त्याप्रमाणे विवेकानंद ऑक्टोबर मध्ये बुल यांच्याकडे गेले.तशी सारा ची विवेकानंद यांच्याबरोबर १८९४ मध्ये भेट झाली होती, तेंव्हाच ती विवेकानंद यांच्या आध्यात्मिक ज्ञानामुळे प्रभावित झाली होती.     

  नॉर्वेमधील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक/ संगीतकार ओले बुल यांची पत्नी .म्हणजे सारा बुल . लग्ना आधीची मिस सारा थॉर्प. यांची कहाणी फार वेगळी आहे.

वयाच्या सतराव्या वर्षीच ओली बुल यांच्या व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम ऐकून त्यांच्यावर लुब्ध होऊन यांच्याशीच लग्न करायचे ठरवले.सारा वीस वर्षांची, तर बुल साठ वर्षांचे. एव्हढे मोठे अंतर . वडिलांनी विरोध केला पण आईने संमती दिली आणि १८६८ मध्ये लग्न झाले. सारा, ओले बरोबर कार्यक्रमाच्या दौर्‍यावर अमेरिका आणि युरोपला जात असे. त्यांच्या संगीत मैफिलीत ती पियानोवादक म्हणून साथ करे.   दोन वर्षानी मुलगी ओलियाचा जन्म झाला. आणि सारा च्या आईला अनुभवायला आले की हा अव्यवहारी नवरा साराला योग्य नाही/ चुकीची निवड झाली आहे, म्हणून तिने मुलीसह सारा ला परत आपल्या घरी आणले. पण सारा चे बुल यांच्यावरील प्रेम जिंकले आणि परत आईवडिलांना न जुमानता ती मुलीला घेऊन बुल यांच्याकडे नॉर्वेला येऊन राहिली. आता मात्र तिने स्वतात बदल केला होता. त्याचे व्यवहार सुरळीत करण्या करिता तिने आपल्या हातात सर्व सूत्रे घेतली. आणि जीवनाला एक शिस्त आणली . त्याच्या कार्यक्रमांची आखणी करणे, प्रोग्राम ठरवणं, प्रवास नियोजन, आर्थिक व्यवहार सर्व काही स्वत: हिमतीने पाहू लागली. तिच्या कुशलते मुळे या कलाकाराच्या जीवनाच्या उत्तरार्धात शांती आणि स्थैर्य आले.

कारण त्या आधी लोक ओली बुल यांना व्यवहारात लुबाडत असत. त्यांना अमाप पैसा मिळत होता. प्रसिद्धी होती. म्हणून सारा कार्यक्रमाचे बारीक बारीक तपशील सुद्धा नियंत्रित करू लागली आणि व्यवहाराचे अनुभव घेत यातूनच समृद्ध होत गेली. पण हे सगळं होतं ते तिच्या ओली बुल यांच्या प्रेमावरील अत्यंत निष्ठेमुळे . अशा अल्लड लहान वयात सुद्धा ती विचाराने आणि अनुभवाने परिपक्व झाली. तत्वज्ञानाचा लौकीकार्थाने अभ्यास नसला तरी जीवनाचे तत्वज्ञान शिकली. आणि जीवनाकडे बघण्याचा तीचा एक दृष्टीकोण तयार झाला. विचार पक्के झाले. १८८० मध्ये ओली बुल यांच्या मृत्यूमुळे एकतीस वर्षांची सारा केंब्रिजला आपल्या आई वडिलांकडे परत आली. लग्न करताना असलेलं बुल यांच्यावरील प्रेम आणि त्या वयातली विलासी वृत्ती आता संपून विचारात गांभीर्य आले. सारा ने ओले च्या मृत्यूनंतर लगेचच ‘ओले बुल एक संस्मरण’ या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. बोलता बोलता चौदा वर्षे झाली होती बुल यांना जाऊन. पुढे एव्हढं मोठ्ठं आयुष्य पडलं होतं. पण बुल यांच्यावरील प्रेम तसच कायम होतं. आपल्या घरात सारा यांनी कलावंत बुल यांची अनेक चित्रे ठिकठिकाणी लावली होती. आपले बुल वरील प्रेम नंतरही जपले होते.

 कुठल्याही विषयावर चर्चा आणि विचार याची ओढ सारा ला नेहमीच असायची. पुढे पुढे ती अध्यात्मिकतेकडे ओढली गेली. तिचे घर एक वैचारिक घडामोडींचे केंद्रच बनले होते. त्यामुळे प्रसिद्ध अशा बुद्धिजीवींचे तिच्याकडे सतत येणेजाणे असायचे. सारा ने आता एक केंब्रिज कॉन्फरन्स आपल्या घरात चालू केली होती. त्यात विल्यम जेम्स,थॉमस वेंटवर्थ, हिगिन्सन, जेन अॅडम्स, जोशिया रॉईस, अशा नामवंत व्यक्ती सहभागी होत. हे सर्व जण  तत्वज्ञानाचे  एक स्वतंत्र दृष्टीकोण असणारे विचारवंत, गाजलेले प्राध्यापक होते. हार्वर्ड विद्यापीठातले असे अनेक विचारवंत प्राध्यापक बुल यांच्याकडे विवेकानंदांच्या व्याख्यानला व वर्गाला येत. विषय असे वेदान्त. त्यामुळे विवेकानंद यांचा त्यांच्याशी जवळून परिचय झाला. इतका की पुढे याच विद्यापीठात विवेकानंद यांना व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ही अमेरिकेच्या विश्वातली मोठ्या सन्मानची बाब होती. आणि एव्हढच काय पुढे जाऊन तर हार्वर्ड विद्यापीठातील पौर्वात्य तत्वज्ञानाच्या विभागाचे अध्यासनपद स्वीकारण्याची विनंती विवेकानंद यांना केली गेली होती, पण ती त्यांनी नाकारली. खरच अमेरिकेसारख्या देशात एका भारतीय नागरिकाला ही संधी म्हणजे अभिमानाचीच गोष्ट होती.   

केंब्रिज हे गजबलेल्या बोस्टन शहरातले एक शांत उपनगर होते. वातावरण शांत, गर्दी नाही. हार्वर्ड विद्यापीठ आणि केंब्रिज यांच्यामधून वाहणारी शांत चार्ल्स नदी. हे निसर्गरम्य शांत सुंदर वातावरण असलेलं ठिकाण विवेकानंदांना न आवडेल तरच नवल.

सारा ने विवेकानंद हे आध्यात्मिक धारणा असलेले एक महापुरुष आहेत हे केंव्हाच ओळखले होते. त्यांच्या जीवनात आणि कार्यात आपण कशी मदत करू शकू याचा सारासार विचार करून ठेवला होता. ही मदत  ती कुठेही याची वाच्यता न करता आपल्या कृतीतून  सहजतेने, आदरपूर्वक आणि कौशल्याने वेळोवेळी करत असे. सारा ने विवेकानंदांना अतिथि म्हणून बोलावले .तिच पत्र व्यवहार विवेकानंद यांच्या बरोबर होत होता त्यात तिने एकदा म्हंटले होते की माझे पती आज हयात असते तर त्यांनी तुम्हाला आपला पुत्र मानला असता.तर माझ्या या घराचा पण आपल्या महान कार्यासाठी केंव्हाही उपयोग करून घ्यावा, तुम्ही आणि तुमचे देशबांधव हे आमचेही बांधव आहेत ,यांच्यासाठी मदत म्हणून मी पैसे देईन त्याचा उपयोग करावा. आणि हे वचन त्यांनी पुढे निभावलेले दिसते.विवेकानंद त्यांचे भारतीय पुत्र आणि गुरु झाले.    

अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांचा परिचय करून दिला. त्यांचा हा मुक्काम आठवडा भर होता. जसे सारा ने विवेकानंद यांचे श्रेष्ठत्व सुरुवातीलाच ओळखले होते तसेच विवेकानंद यांनीही या भेटीत, सारा यांचे व्यक्तिमत्व ओळखले होते. त्यांचा मोठेपणा ओळखला होता.आपल्याकडे बघण्याचा सारा यांचा दृष्टीकोण  त्यांना कळला आणि त्यांनीही सारा यांना आपली अमेरिकन माता या रूपात स्वीकार केला. ते त्यांना धीरा माता/शांत माता म्हणत . विवेकानंद सारा यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे नव्हते तरीही त्यांनी आदरपूर्वक  मातेच्या रूपात सारा यांना स्वीकारले होते ते त्यांच्या धीरोदात्त, समंजस आणि निर्मळ प्रेमा मुळेच.या पहिल्याच अतिथि भेटीत सारा यांनी पाचशे डॉलर भेट दिले आणि एक आदरपूर्वक पत्रही. त्यात लिहिले होते, “आपल्या वास्तव्याने आपल्या उच्च कार्यासाठी या घराचा उपयोग केल्याने माझी ही वास्तू पावन झाली आहे..” त्यांचा हा विश्वास आणि भाव पुढे विवेकानंद यांचे कार्य, वेदान्त वर्ग, पुढे बुल यांच्या घरात सुरू होण्यात उपयोगी ठरला.पुढे विवेकानंद यांचा पुढचा प्रवास वोशिंग्टन,बाल्टिमोर न्यूयॉर्क असा सुरू झाला. उपक्रमशील सारा यांनी डिसेंबर मध्ये केंब्रिज येथे २,३ आठवड्यांचा असा कार्यक्रम ठरवला. त्या व्याख्यानला त्यांनी संगीताची जोड दिली. एम्मा थर्स्बी यांना सारा यांनी पियानो ची साथ दिली. व्याख्यानला संगीतसाज ही कल्पना वातावरण निर्मितीला पोषक ठरली.  

सारा बुल यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीने हेरले की, सार्वजनिक व्याख्यानांपेक्षा विवेकानंद यांचा आध्यात्मिक विचार नीट पोहोचायला हवा असेल तर ३०,४० जिज्ञासू च पुरेत. मोठ्या समुदायापुढे ठराविक व्याख्यानपेक्षा २,३ आठवड्याचा वर्ग घेतला तर विषय सलग पोहोचेल. कमी माणसां मुळे श्रोता आणि वक्ता यांच्यात चांगला संवाद होऊ शकेल आणि जिज्ञासूंना त्याचा उपयोग होईल. हे निरीक्षण तंतोतंत खरे ठरले . सारा यांनी विवेकानंद यांसी जी काही भाषणे, व्याख्याने चर्चा झाल्या त्या सर्व , त्या  स्टेनेग्राफर कडून नोंद करून ठेवत.   

अभेदानंद, तुरीयानंद. सारदानंद, हे विवेकानंद यांचे गुरुबंधु अमेरिकेत आले ते सारा यांच्या आधारावरच.पुढे सारा यांनी भारत दौरा केला.वेदान्त सोसायटीच्या या कार्यासाठी मोठी आर्थिक मदत करत राहिल्या.त्यांच्या घरातच वेदांताचे वर्ग चालू झाले.शेवट पर्यन्त सारा काम करत राहिल्या.      श्रीरामकृष्ण आणि विवेकानंद यांच्या परिवरातीलच एक सदस्य झाल्या . कलकत्त्यामध्ये जिथे शारदा मातांसाठी बांधलेलं घर होतं, त्या घरात पुढे सारदानंद बसत तिथे शारदा मातांच्या फोटो बरोबर सारा बुल यांचाही फोटो लावलेला असे.  १९११ साली सारा बुल अर्थात विवेकानंद यांच्या अमेरिकन माता स्वर्गवासी झाल्या.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आता ती बघू शकेल. – भाग 2… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

 (मागील भागात आपण पाहिले –  प्रसादची आई म्हणाली ताई मला माहित्येय तुम्हाला काय विचारायचे आहे. मीच सांगते. तुम्हाला असं वाटतं ना प्रसाद आरती सारख्या आंधळ्या पोरीशी का लग्न केले आणि ती फोटो कसे बघू शकेल? आर्यनच्या आईनं होकारार्थी मान डोलावली. – आता इथून पुढे )

ताई, मी एका गरीब शेतमजुराची मुलगी आहे, माझ्या आई बापाने घरची थोडीफार शेती असलेल्या घरात माझे लग्न लावून दिले होते. घरची शेती काही फार जास्त नव्हती , पण खाऊन पिऊन सुखी होतो एवढंच. लग्नानंतर चार महिन्यांनी  शेजारच्या शेतकऱ्याने शेताच्या बांधावरून  भांडण उकरून काढले. भांडण एव्हढे विकोपाला गेले की शेजाऱ्यांनी रागात प्रसादच्या बाबांच्या डोळ्यात विषारी कीटक नाशक ओतले. खूप दवाखाने केले. डॉक्टर केले. पण त्यांचे डोळे गेले ते कायमचेच.’ आर्यनच्या आईच्या तोंडातून ‘आई ग , कीती निर्दयी आणि अमानुष’ असे उद्गार निघाले.

‘आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते, प्रसादच्या बाबांचे डोळे जाऊन आणि त्यांचा इलाज करण्यात दोन महिने गेले होते. लग्नानंतर सहाव्या महिन्यात मला पाळी आली तेव्हा, प्रसादचे बाबा बोलले, माझं आयुष्य तर आता अंधारात जाईल, आपल्याला मूलबाळ झालं नाही. तुला मी काडीमोड देतो, तुझे दुसरे लग्न झाले तर तू तरी सुखी राहशील. कशाला माझ्या आंधळ्या सोबत आयुष्याची नासाडी करतेस मला सांभाळत राहून?’ त्यावेळी मी ठाम राहिले त्यांनी माझ्या सुखासाठी मनापासून घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान वाटला आणि मी त्यांचा निर्णय नाकारला. घरातल्या शेतीची सगळी सूत्र मी हाती घेऊन संसार करू लागले. एक वर्षाने आम्हाला प्रसाद झाला पण वयाच्या नवव्या वर्षी त्याचा एक डोळा गेला. त्यावेळी खूप खचायला झाले पण प्रसादच्या आंधळ्या बाबांनी धीर दिला. माझे दोन डोळे गेलेत त्याचा एक तरी आहे ना, माझ्यावेळी हार नाहीं मानलीस मग आता का खचून जातेस?’

प्रसाद अभ्यासात हुशार होता, अभ्यास आणि शेती करता करता तो बँकांच्या आणि सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा देत होता. दीव्यांग कोट्यातून त्याला बँकेत चांगली नोकरी लागली. आता वर्षभरापूर्वी प्रसादचे बाबा वारले. वर्षभरात त्याचे लग्न करायचे म्हणून त्याच्यासाठी मुली बघायला लागलो. प्रसादला एक डोळा नाही म्हणून कधी मुलगी तर कधी मुलीचा बाप नकार देऊ लागला. कोणी कोणी तर मुलीच दाखवत नव्हते. जवळपास वीस एक ठिकाणी नकार आला होता.

आर्यनच्या आईने विचारले, मग आरती सोबत कसं काय लग्न जुळलं?

ही माझी सून आहे ना आरती ती आमच्याच गावातली. प्रसादच्या बाबांच्या डोळयात विषारी औषध ज्या माणसाने टाकले होते, त्याच माणसाची पोरगी आहे ही आरती. आरतीचा बाप जेल मधुन सुटून आल्यावर प्रसादच्या मागे चार वर्षांनी झाली होती त्यांना. जेव्हा त्याला कळले की त्यांची पोरगी जन्मजात आंधळी आहे, तेव्हा तो रडत रडत प्रसादच्या बाबांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला आला. ‘दादा मी चुकलो देवाच्या काठीला आवाज नसतो मला माफ करा, देवानेच मला शिक्षा केली.’

गेल्या महिन्यात प्रसादला मुलगी बघायला आम्ही ज्या बसने तालुक्याच्या गावात चाललो होतो, त्या बस मध्ये आरती पण होती. आरतीचे देखणे आणि सुंदर रूप बघून बसमधील बाया, बाई ग, एव्हढी देखणी पोरं पण दिसत नाही तिला, कसं हीचं लग्न व्हायचं? हिला पण कोणीतरी आंधळाच मिळणार अस एकमेकींशी पुटपुटत होत्या.

तालुक्याच्या गावी ज्या मुलीला बघितलं तिने तिथेच नकार दिला, मी बिन लग्नाची राहीन पण या एक डोळ्याशी लग्न नाही करणार.’ ती म्हणाली होती.  तेव्हापासून प्रसाद ने डोळ्यावर चष्मा लावायचे सोडून दिले. बस मधील बायकांची कुजबुज त्याने पण ऐकली होती.           

घरी आल्यावर त्याने मला विचारले, आई आरतीला तुझी सून केली तर चालेल का? मी त्याला म्हणाले, माझा संसार झाला करून. तुझे तू ठरव. मी तुझ्यासोबत आहे.’

आरतीच्या  बापाला निरोप पाठवल्यावर तो पुन्हा घरी आला आणि आधीच मेलेल्याला अजून मारू नका म्हणू लागला. पण त्याला प्रसादने समजावले.

तुमची परिस्थिती नव्हती तशी आमचीसुद्धा परिस्थीती नव्हती म्हणून माझ्या बाबांना आणि तुमच्या आरतीला बघता आले नाही. पण आता मला चांगली नोकरी आहे, आज ना उद्या परिस्थीती सुधारेल. खुप लोकं नेत्रदान करतात, आपण आरतीसाठी बघू या कोणा दुसऱ्याचे डोळे मिळतात का? मला दोन डोळे असते तर माझाच एक तिला दिला असता. मीच कशाला माझ्या आईनेदेखील बाबांना दिला असता पण जग एवढं पुढे गेले हे माहितीही नव्हतं आणि माहिती असून ऐपत सुद्धा नव्हती. आता दोन महिन्यांपूर्वीच आमचे दोघांचे लग्न झाले. आम्ही गावाकडून मुंबईतल्या मोठ्या डोळ्यांच्या दवाखान्यात आलो होतो. आनंदाची गोष्ट अशी आहे की आरतीला बघता येणार आहे. दुपारपर्यंत दवाखान्यातले सगळं आटोपले म्हणून या लहानशा बोटीतून मांडवा की काय तिथं जाऊन पुन्हा याच बोटीने परत मुंबईला फिरणार. पुन्हा कधी समुद्र बघायला मिळेल की नाही म्हणून आजच साधली संधी.

हे सर्व ऐकताना आर्यनची आई अवाक झाली होती. न राहवून तिने प्रसादच्या आईला विचारले, ‘पण काकी आरतीसाठी नेत्रदान कोण करणार आहे? तिला कोणाचे डोळे लावणार आहेत? अवयव दान ही खुप खुप गुंतागुंतीची, खर्चिक आणि कायदेशीर पद्धतीने करायची प्रक्रिया आहे ना?’

प्रसादची आई म्हणाली, लग्न ठरल्या ठरल्या प्रसादने सगळी माहिती काढली होती, कोणी मृत्यूपूर्वी नेत्रदान केले असेल तर मिळतील असं काहीबाही तो सांगायचा. मी म्हटलं जिवंत असताना कोणी नाही का नेत्रदान करू शकत. मी माझा एक डोळा दिला तर नाही का चालणार? सुरवातीला तो नाही म्हणाला होता पण नंतर त्याला आणि मला डॉक्टरांनी तुम्ही म्हणताय तसे समजावले, कोणाचाही अवयव  कोणालाही सहजपणे नाही देता येत , रक्तगट , तो अवयव ज्याला द्यायचा आहे त्याचे शरीर ते स्वीकारू शकते का. अवयव दान करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य आणि वय हे अवयव दान करण्यासाठी योग्य आहे का, हे सगळे बघावे लागते.

आरतीचे बाबा पण डॉक्टर सांगत होते ते सगळं ऐकत होते. त्यांनी स्वतःहून पुढे होऊन सांगितले माझा आणि आरतीचा रक्तगट एकच आहे, तुम्हाला लागतील त्या सगळ्या चाचण्या करा पण माझाच डोळा माझ्या लेकीला द्या. माझ्या कर्माचे प्रायश्चित्त भोगल्याचे समाधान तरी मला लाभेल. डॉक्टरांनी आरतीच्या बाबांचे म्हणणे ऐकले आणि तशा चाचण्या करायला सांगितले. ते म्हणाले मी हॉस्पिटलमध्ये थांबतो तुम्ही आलाच आहात तर फिरून या कुठेतरी. या बोटीत बसण्यापूर्वी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की चाचण्या पाहिजे तशा आलेल्या आहेत. डॉक्टरांनी कायदेशीर प्रक्रियांची तयारी करायला सांगितले आहे.

आर्यनची आई हे सर्व ऐकून निःशब्द झाली. तिला काय बोलावे हेच बराच वेळ सुचत नव्हते.

क्षुल्लक कारणावरून अमानुषपणे वागणारी आरतीच्या बापासारखी माणसं ज्यांना नंतर पश्र्चाताप सुद्धा होतो, अशा माणसांना मोठ्या मनाने माफ करणारे प्रसादचे आई बाबा , प्रसाद सारखा उच्च विचारसरणी असलेला तरुण. राहणीमानाने साधारण आणि भोळे असलेले पण मनाने सधन असणारे शेतकरी जमिनीत बियाणे रुजवून नुसते अन्नधान्यच पिकवत नाहीत तर लाखमोलाचे विचार सुद्धा समाजात रुजवतात.

– समाप्त –

लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनिअर, कोन, भिवंडी ठाणे

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहस्त्रगंगाधर… लेखक बाबासाहेब पुरंदरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

सहस्त्रगंगाधर… लेखक बाबासाहेब पुरंदरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा आविष्कारही तितकाच उग्र आहे! पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि!

त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरूषी आहेत, त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे, त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न… रामोशासारखा. 

पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो!

आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य!

तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली,

त्याच्या अटिव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या, 

त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला,

मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले…

सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो! रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही, डोळेच फिरतात!

मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते! बेहोश खिदळत असतो. 

पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्रि सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी.दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्‍या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात, “आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊं हं ! तोपर्यंत वाट पाहा !” रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात.दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातली वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा !

असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्रि बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतहि आहे. कारण तेहि मराठ्यांच्याइतकेच शूर आहेत !सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याहि.

सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत. दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोर्‍याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत.प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच. सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थवणी ओढ्या-नाल्यांना सामील होते. ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात. सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात. या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत. एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना. पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत. एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी ! काय ही नावे ठेवण्याची रीत ? चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखें नाही का होत ?कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत. कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे. मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ आणि अशीच काही.मावळच्या नद्या फार लहान. इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, गंगा यमुनांची.

सह्याद्रि हा सहस्त्रगंगाधर आहे. मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. कांही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्‍या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते. मावळे एकूण चोवीस आहेत. पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत.

मोठा अवघड मुलूख आहे हा…..  इथे वावरावे वार्‍याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.

लेखक – बाबासाहेब पुरंदरे

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बिनचेह-याची माणसं रेखाटणारा चित्रकार… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ बिनचेह-याची माणसं रेखाटणारा चित्रकार… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

पुणे विद्यापीठातल्या प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात मी रूजू झालो त्यावेळी विद्यापीठ कक्षेतल्या पाच जिल्ह्यांतल्या शेकडो महाविद्यालयांमधून प्रौढ शिक्षण कार्यक्रम धडाक्यात चालू होता.कार्यकर्त्यांची शिबीरं,प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे इथपासून राष्ट्रीय, विभागीय चर्चासत्रं,कृतिसत्रं सतत होत होती. विविध स्तरावरच्या कार्यकर्त्यांची उठबस इथं नेहमीच असायची. विविध पुस्तकं, नियतकालिकं, वर्तमानपत्रं यांचा इथं खच पडलेला असायचा. भितींवर अनेक तक्ते, पोस्टर्स आणि चित्रं असायची.  त्यात एक चित्र उठून दिसायचं. एक माणूस या विभागाची दिशा दाखवत असलेले हे चित्र होते. एअर इंडियाच्या महाराजाच्या  वेषात हा माणूस आदबीनं उभा होता. पण या माणसाला चेहरा नव्हता. त्या ठिकाणी प्रौढ शिक्षणाचं चिन्ह होतं-गोलात इंग्रजी वाय आकार. वायमध्ये  एक भरीव ठिपका. या चित्राचे मला नेहमी कौतुक आणि कुतूहलही वाटत असे. आयडिया भन्नाट होती. कुणाकडून तरी कळलं की, आपल्या विभागात एक चित्रकार होते  रामनाथ चव्हाण नावाचे. त्यांनी अशी बरीच चित्रं काढली होती.

चित्रकार रामनाथ चव्हाण  

केवळ रेखाटलेल्या चित्राला व्होकॅब्युलरी पिक्चर म्हणतात. त्यापेक्षा आशयघन कन्सेप्ट पिक्चर्सना प्रौढ शिक्षणात महत्वाचे मानले जाते.चव्हाणांची चित्रं कन्सेप्ट पिक्चर्स होती. चव्हाणांविषयी मी खूप ऐकून होतो.सर्वसामान्य नव्हे तर गरिब घरातून जिद्दीनं पुढं आलेल्या या युवकाला त्याच्या विचारांच्या माणसांची साथ इथं मिळाली.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सापेक्ष दृष्टीकोन… ☆ डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

अल्प परिचय 

शालेय शिक्षण: मराठी माध्यमातून हुजूरपागा, पुणे

M.Sc. आणि  Ph.D. (Physics), पुणे विद्यापीठ

LLM (Intellectual Property Rights -IPR), Turin University, Italy

इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र प्राध्यापिका

छंद: निसर्ग निरीक्षण, शास्त्रीय संगीत श्रवण, मराठी-इंग्रजी ललित वाचन, फोटोग्राफी, Facebook blogger

? मनमंजुषेतून ?

☆ सापेक्ष दृष्टीकोन… ☆ डाॅ. शुभा गोखले ☆ 

एखादी मुलगी आणि मुलगा यांना टाळ्या देत हसतखेळत भेळ खाताना पाहून बहुतेक कपाळांवर ‘ काय हा थिल्लरपणा ‘ – असं म्हणणाऱ्या आठ्या उमटतात. पण त्याचवेळेला एका कोपऱ्यात उभे असलेले त्यांचे आई-बाबा, नुकतीच दृष्टी मिळालेल्या आपल्या धाकट्या बहिणीला भेळ खायला घालत, समोरच्या समुद्रात वेगाने जाणाऱ्या मोटर-बोटी दाखवणाऱ्या आणि एकमेकांना टाळ्या देऊन एन्जॉय करणाऱ्या दादाचं कौतुकच करत असतात….  म्हणजेच पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर सगळं अवलंबून असतं!

तसंच काहीसं  गेले काही आठवडे WA/FB व इतर माध्यमांतून आपल्यावर भडिमार होणाऱ्या गुरू-शुक्र युतीचं ! ……. सूर्यापासून ७८ कोटी किलोमीटर वरचा गुरू हा आकारानी सगळ्यात मोठा असलेला भाऊ, तर ११ कोटी किलोमीटर वर असणारा शुक्र …  हे दोघेही आपापल्या कक्षांमधून आपापल्या वेगाने सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतात ! गुरूला एका परिक्रमेला साधारण ११. ८ वर्षं,  तर शुक्राला केवळ २२५ दिवस लागतात…. असे परस्परांशी फारसा संबंध नसलेले ग्रह आपला क्रम आक्रमित असताना, त्या  दोघांनाही कल्पनाही नाहीये, की सूर्यापासून १५ कोटी किलोमीटर वर असलेल्या आपल्या पृथ्वी नावाच्या बहिणीवर वास्तव्य करणारे माणूस नावाचे प्राणीमात्र त्यांच्याकडे दुर्बिणी रोखून बसले आहेत ! 

कारण काय …  

… तर पृथ्वीवरून या दोघांच्या आपापल्या कक्षांमधल्या  आजच्या स्थिती अशा रीतीने एका सरळ रेषेत आल्यात की वाटतंय, ते एकमेकांच्या खूप जवळ आलेत. यालाच विज्ञानात ‘ युती  असे म्हणतात. ही स्थिती फक्त पृथ्वीच्या आजच्या सापेक्ष स्थानामुळे दिसतेय. अवकाशातल्या इतर कुठल्याही बिंदूवरून ते दोघे अगदी सुट्टे-सुट्टे दिसतील.

म्हणूनच म्हटलं दृष्टीचा-कोन महत्वाचा ! …. पटतंय का?

(फोटो सौजन्य : डॉ. गौरी दळवी, फ्लोरिडा. )  

© डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कुठलाही आजार आपल्याला का होतो? ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ कुठलाही आजार आपल्याला का होतो?  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

या प्रश्नाचे सहज सोपे उत्तर आहे…….  तुम्ही स्वीकारल्यामुळे !

आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल ? आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे,  तो पाण्यावर तरंगणार आहे. अहो सापाला हात पाय नसतात. तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. बघा जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. 

याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे. ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा. हेच खरे शरीर शास्त्र आहे. ही शक्ती तुमच्यात नसेल तर मेडीकल सायन्स काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.

अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे शरीरावर अत्याचार आहेत. ही अंधश्रद्धा आहे. शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे.

आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहिती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.

मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघू या.

१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते. 

२) परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो, 

३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते.

४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे, पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची ! ताकतवार असला तरी तो गुलामच ! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम ! आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.

१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार : – समजा एखादा माणूस नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, उदा. – त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं!

        – ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!

        – माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!

— क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो. डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही. ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.

—  थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.

२) आतड्यांचे विकार – जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.

३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत. खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे. तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचा, जसं की एखादे चूर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.—- आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात……. 

काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं.. कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो.

ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो. पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गिक नियंत्रण तो हरवून बसतो.

असंही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते.

४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.

५) डोकेदुखी – 

आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?

– ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!

– त्याने माझं खुप डोकं खाल्लं!

– आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,

— निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे. — आणि मायग्रेनचा त्रास चालू !

डोकेदुखीची अजूनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.

तेव्हा असे कटू अनुभव विसरुन जाणेच इष्ट !

कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.

६) पाठदुखी वा कम्बर दुखी – 

एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकून गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कम्बरदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात. ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो. चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.

— आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?—- 

आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचना हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.

जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सूचना द्या –

‘आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे — आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे —डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे —  माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरिक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे — माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे — काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल !—आणि डोकेदुखी गायब !

प्रत्येक रोगासाठी अशा सूचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते.

सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील.  राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा !

इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो. त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपूर्ण भाव ओतून रिते व्हायचे.  ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.

— अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.

तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares