मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दृष्टांत…तांबड्या गणपती ☆ प्रस्तुती – सुश्री लता निमोणकर ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ दृष्टांत… तांबड्या गणपती ☆ प्रस्तुती – सुश्री लता निमोणकर

श्री गजानन विजय ग्रंथानुसार श्री निमोणकर हे महाराष्ट्रात राहणारे गृहस्थ होते व यांना योगाभ्यास यावा अशी इच्छा होती. अनेक ठिकाणी फिरून अनेक लोकांना भेटून त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही तेव्हा ते हताश झाले व आपल्या दैवाला दोष देऊ लागले. तेव्हा अहमदनगरजवळ इगतपुरी तालुक्यात कपिलधारा नावाचे तीर्थ आहे, त्या तीर्थाजवळ त्यांना एक योगी भेटले.. त्या योग्यांनी त्यांना एक तांबडा खडा दिला व सांगितलं की या तांबड्या खड्यासमोर रोज योगाभ्यास करत जा….  असं म्हणून ते योगी गुप्त झाले. निमोणकरांना हुरहुर वाटायला लागली की हे योगी कोण होते, यांचं नाव गाव काय, तांबडा खडा दिला याचा अर्थ काय… काही दिवसांनी त्यांना तेच योगी पुन्हा भेटले.   निमोणकरांनी विचारलं की “ त्या दिवशी आपली भेट झाली, पण आपण आपलं नावगाव सांगितलं नाही,” तेव्हा महाराज थोडंसं रागवून त्यांना म्हणाले, “ तुला तांबडा खडा दिला होता त्यातच माझं नाव आहे. हा लाल रंगाचा दगड नर्मदेत सापडतो आणि याला नर्मद्या गणपती असे म्हणतात आणि म्हणून माझं नाव गणपती हे मी तुला सुचित केलं होतं. पण तुला ते समजलं नाही. म्हणून आता तुला आदेश आहे या खड्याच्या प्रभावाने तुला योगाभ्यास येईल. हा खडा आपल्या देवघरात ठेवून त्याच्यासमोर योगाभ्यास करत जा”… 

एवढे कथानक, एवढा दृष्टांत श्री गजानन विजयामध्ये आहे. परंतु या पुढील कथानक हे आम्हाला निमोणकरांच्या नातसुनेने सांगितले. ती म्हणाली की तेव्हा घरातल्या कोणालाही हे माहिती नव्हतं की यांच्याजवळ म्हणजेच निमोणकर या गृहस्थाजवळ हा तांबडा खडा आहे. ते काहीतरी नेहमी आपल्या कमरेतल्या धोतरात बांधून ठेवायचे.   बाह्य अंगावरून काही कोणाला कळत नव्हतं. कालमानाप्रमाणे काही दिवसांनी वार्धक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस ते अहमदाबादकडे होते. गृहस्थ असल्यामुळे तिथेच त्यांना अग्निसंस्कार करण्यात आला. तो अग्निसंस्कार होत असताना कमरेच्या वरचा व खालचा भाग जळून राख झाला पण कमरेचा तेवढा भाग– त्याला अग्नी लागत नव्हता. तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले व विचार करू लागले की असं का झालं असेल? तेव्हा त्यांच्या मुलाला असं आठवलं की वडील काहीतरी आपल्या धोतराच्या सोग्यात बांधायचे. ते जर आपण काढलं तर कदाचित या भागाला सुद्धा अग्नी लागेल. तेव्हा बास घेऊन तो तांबडा खडा काढला गेला व लगेच त्या भागाला अग्नीस्पर्श झाला. तो तांबडा खडा आणि काही वस्तू त्यांनी अनेक वर्ष पेटीमध्ये जपून ठेवल्या. काही वर्षांनी एक अधिकारी गृहस्थ त्यांना भेटले.  निमोणकरांच्या मुलाला  त्यांनी असं सांगितलं की ‘ तुमच्या पेटीत तुम्ही काहीतरी कुलूप लावून ठेवलेलं आहे, ते  आपण बाहेर काढा व पूजा करा.’ तेव्हा त्यांनी पुन्हा पेटी उघडून तांबडा खडा काढला आणि रोज त्याची पूजा करायला लागले. असा हा ‘ तांबड्या गणपती ‘ ज्याला ‘ नर्मदा गणपती ‘ सुद्धा म्हणतात, तो आज ४० वर्ष त्यांच्या नातवाकडे आहे, जे रतलामला वास्तव्य करून आहेत. असा हा प्रासादिक गणपती.  महाराजांच्या कृपेने आम्हा सर्वांना त्याचे दर्शन घडले . जे लोक नाही येऊ शकले त्यांना सुद्धा दर्शन घडावं या हेतूने ही कथा व हा फोटो.  

– जय गजानन –

माहिती संग्राहिका : लता निमोणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रामरक्षेचा आणि संस्कृत उच्चारांचा प्रभाव… श्री.संतोष गोविन्द जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

रामरक्षेचा आणि संस्कृत उच्चारांचा प्रभावश्री.संतोष गोविन्द जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

माझे एक मित्र होते, सुनील जोशी. होते म्हणजे दुर्दैवाने आज हयात नाहीत. पण त्यांच्याबाबतीत प्रत्यक्ष घडलेली हकीकत सांगतो.

पूर्वी आम्ही ज्या सोसायटीत रहात होतो, त्या रस्त्याच्या सुरूवातीच्याच सोसायटीत ते रहायचे. त्याच सोसायटीच्या तळघरातील एका हाॅलमधे ते आणि त्यांची पत्नी असे दोघेजणं संस्कृतच्या शिकवण्या घ्यायचे. नंतर आम्ही काही काळाकरता गंगापूर रोडला रहायला जाऊन आमचं घर बांधून झाल्यावर परत कामठवाड्यात आलो. तोपर्यंत ते इंदिरानगरला फ्लॅटमधे रहायला गेले होते. त्यामुळे बर्‍याच वर्षांत भेट नव्हती. ५-६ वर्षांपूर्वी आमच्यामागेच श्री. योगेशजी मांडे रहातात, त्यांनी सुनील जोशींना पॅरालिसिसचा अॅटॅक आल्याचे सांगितले. त्यातून ते बरे झाले. मला त्यांना भेटायला जायचे होते, पण कुठे रहातात हे माहिती नसल्याने एक दिवस योगेशजींबरोबरच त्यांच्या घरी गेलो. आता इथून पुढचं काळजीपूर्वक वाचा.

त्यांच्याकडे गेल्यावर आम्हाला दोघांनाही आनंद झाला. एखाद्या आजारातून बरं झालेल्या व्यक्तीला जसं आपण सहज विचारतो की काय झालं, कसं झालं, तसं मीपण विचारलं; तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते असं—-

” मी सकाळी १० च्या सुमारास डिशमधे पोहे खात इथेच बसलो होतो. निम्म्याहून अधिक पोहे खाल्ले असतांना अचानक माझ्या हातातून डिश गळून पडली. पॅरालिसीसचा झटका आला होता. त्यामुळे एक बाजू गळाल्यासारखी झाली होती आणि तोंडही वाकडं व्हायला लागलं होतं. एरवी त्यावेळी घरात कोणीच नसतं, पण नशिबाने मुलाच्या क्लासला सुट्टी असल्याने तो घरी होता. तो लगेच धावत बाहेर आला. त्याला मी कसेबसे माझ्या त्या मित्राला घेऊन यायला सांगितले, ज्याच्याबरोबर नाष्टा झाल्यावर मी कंपनीत जायला निघतो. मुलगा खाली गेला तर तो मित्र रोजच्याप्रमाणे स्कूटरवरून आलाच होता. मुलाने त्याला सांगितल्याबरोबर तो मला घेऊन खाली आला आणि जवळच्याच डाॅक्टरांकडे घेऊन गेला. तिथे तपासणी होईपर्यंत २ वाजले होते. डाॅक्टरांनी ताबडतोब न्युराॅलाॅजिस्टकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सुचविलेल्या हाॅस्पिटलमधे आम्ही गेलो. तिथे लगेच तपासणी होऊन अॅडमिट केले आणि प्राथमिक उपचार सुरु केले. संध्याकाळी डाॅक्टर येऊन तपासून गेले आणि स्टाफला सूचना देऊन गेले. त्याप्रमाणे आैषधोपचार सुरू झाले. रात्री ८-८॥ च्या बेताला एक फिजिओथिअरपिस्ट भेट ध्यायला आली. मला तपासल्यावर हिला सांगितले की ‘ मी उद्या सकाळी लवकर आठ वाजता येते, तोपर्यंत यांना झोपू देऊ नका. यांच्याशी सतत बोलत रहा आणि जागं ठेवा.’ ती निघून गेल्यावर मला जे काय थोडंफार उच्चार करून बोलता येत होतं, तसं मी आणि ही, आम्ही दोघेजणं संस्कृतमधून गप्पा मारत होतो. (लक्षात घ्या हं, दोघं नवरा-बायको संस्कृतमधूनच एकमेकांशी बोलत होते.) आणि विशेष म्हणजे अधूनमधून मी रामरक्षा म्हणत होतो. अशा रितीने रात्रभर बर्‍याचवेळेस मी रामरक्षा म्हटली.

सकाळी ती फिजिओथिअरपिस्ट जशी आली आणि मला जसं बघितलं, तसे तिचे डोळे विस्फारले गेले. तिने हिला विचारलं की रात्रीतून तुम्ही काय केलं? हिने थोडसं घाबरत सांगितलं की ‘ काही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ह्यांना रात्रभर जागं ठेवलं.’

त्यावर ती म्हणाली की ‘ नाही. तुम्ही नक्कीच काहितरी निराळं केलं असणार. कारण यांचं तोंड वाकडं झालेलं होतं, त्यासाठी मी माझ्याजवळच्या निरनिराळ्या आकाराच्या लाकडी गोळ्या गालात ठेवण्यासाठी आणल्या होत्या (तोंड सरळ होण्यासाठी फिजिओथिअरपिमधला हा एक भाग असतो), पण यांचं तोंड तर सरळ झालेलं दिसतंय. मला नक्की सांगा तुम्ही काय केलं?’

…….. तेव्हा हिने सांगितलं की ‘आम्ही रात्रभर संस्कृतमधून थोड्या गप्पा मारल्या आणि ह्यांनी बर्‍याच वेळेस “रामरक्षा” म्हटली.’

तिला आश्चर्य वाटल्याचं तिच्या चेहेर्‍यावर दिसत होतं. ती लगेच निघून जातांना म्हणाली की मग आता माझं काही कामच नाही. यासाठीच मी आले होते. (म्हणजे त्या रोग्याच्या तोंडाच्या आकारानुसार योग्य अशा आकाराची लाकडी गोळी जिकडे तोंड वाकडं झालं असेल त्याविरूद्ध गालात काही तास ठेवली जाते, जेणेकरून तोंड सरळ होण्यास मदत होते.)

फक्त रामरक्षा म्हटल्याचा आणि संस्कृत उच्चारांचा शरीरावर काय परिणाम होतो याचं हे माझ्यासमोरचं जिवंत उदाहरण मी पाहिलं. माझ्याशी ते अगदी व्यवस्थित बोलत होते.  

रामरक्षेच्या प्रभावाचा त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव, जो त्यांनी स्वतः मला सांगितला, तो मनांत ठसला आहे.

लेखक : श्री.संतोष गोविन्द जोशी

माहिती संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एवढे जमले पाहिजे — ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ एवढे जमले पाहिजे — ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण असते. कालचा दिवस हा अनुभव असतो, आजचा दिवस हा प्रयोग असतो, तर उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.

जो सर्वात आधी क्षमा मागतो, तो धाडसी असतो, जो सर्वात आधी माफ करतो, तो पराक्रमी असतो, आणि जो सर्वात आधी दुःख विसरून जातो, तो सुखी असतो.

जगात येताना आपल्याकडे देह असतो पण नाव नसते, जग सोडताना मात्र आपल्याकडे नाव असले तरी देह उरलेला नसतो.  मिळालेल्या देहाचे, नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आपले आयुष्य असते.

जिनकी आँखे आँसू से नम नही, इसका अर्थ ऐसा नही की उन्हे कोई गम नहीं । 

कोई तडप कर रो लेते है, तो कोई अपना गम छुपाके हँसते हैं ।

मुस्कुराने की वजह ना ढूंढो, वरना जिंदगी यूही कट जायेगी, 

कभी बेवजह भी मुस्कुराके देखो, आपके साथसाथ जिंदगीभी मुस्कुरायेगी ।

A person’s most valuable asset is not a brain loaded with knowledge, but a heart full of love, with an ear open to listen, and a hand willing to help.

वेळ संभाळायला, वचन पाळायला, हृदय जोडायला जमले, की परकी माणसेपण नकळत आपली होतात.

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान… ☆ सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर ☆

25 सप्टेंबर…बॅ. नाथ पै यांचा जन्मदिवस निमित्त :

Image result for फोटो बॅरिस्टर नाथ पै

? विविधा ❤️

☆ कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान… ☆ सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर ☆

कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान

‘पाहू चला रे हिरवे डोंगर, हिरवी झाडी,

कोकणात आली बघा ही रेल गाडी.’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1996 साली सर्वप्रथम कोकण रेल्वे अवतरली. तिच्या स्वागतासाठी लिहिलेली ही कविता! कोकण रेल्वेच्या रूपाने एक नवा अध्याय कोकणवासियांच्या आयुष्यात सुरू झाला. हा अध्याय बॅ. नाथ पै यांच्याच स्वप्नाचा एक भाग होता.  बॅ. नाथ पै यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते सत्यात उतरवले. असे म्हणतात ‘जर स्वप्न द्रष्ट्या माणसाने पाहिले तर स्वप्न सत्य बनून जाते’ असा द्रष्टा नेता म्हणजेच बॅ. नाथ पै! तत्कालीन रत्नागिरी म्हणजे नररत्नांची खाण असलेल्या जिल्ह्यातील चमकता हिरा!

बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म 25 सप्टेंबर 1922 रोजी वेंगुर्ले या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ल्यातच झाले. उर्वरित शिक्षण बेळगाव आणि पुणे या ठिकाणी झाले आणि उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी कायद्याचा व संसदीय लोकशाहीचा अभ्यास केला.

बॅरिस्टर नाथ पै यांचे बालपण कोकणात गेल्यामुळे त्यांनी येथील जीवन अनुभवले होते. परशुरामाच्या या भूमीला निसर्ग सौंदर्याचे भरभरून दान लाभले असले तरी दारिद्र्याचे चटके तितकेच सोसावे लागतात, हे नाथांनी पाहिले होते. कोकणचा समृद्ध निसर्ग डोळ्यात साठवत ते लहानाचे मोठे झाले. या भूमीने त्यांना संस्काराची शिदोरी दिली. येथील समुद्रकिनाऱ्यांनी त्यांच्या विचारांना सखोलता आणि भव्यता दिली. समुद्राच्या गाजेचे गांभीर्य आणि माधुर्य त्यांच्या वाणीत होते. उंच उंच माड फोपळी त्यांच्या कर्तुत्वाला साद घालीत. त्यांनी त्यांच्या व्यक्तीमत्वाला ताठ कणा दिला, त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षेचे बीज रोवले. रानावनातील फुलांनी कलासक्तपणा दिला. एकीकडे निसर्गाचे श्रीमंतरूप आणि दुसरीकडे कमालीचे दारिद्र्य असा विरोधाभास त्यांनी लहानपणीच अनुभवला. ‘येथील लोकांचे दारिद्र्य दूर करण्याचा मी प्रयत्न करीन’ अशी त्यांनी भीष्मप्रतिज्ञा केली. बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकणचे पालकत्व स्वखुशीने स्वीकारले व निभावलेही!

बॅरिस्टर पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मायदेशात परत आल्यावर नाथ पै राजकारणात उतरले. राजापूर मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. निवडून आल्यावर त्यांनी केवळ मतदारसंघाचेच नेतृत्व केले नाही तर देशाचेही नेतृत्व केले. लोकशाहीच्या या पुजाऱ्याचे, समाजवादाच्या वारकऱ्याचे कोकणवर फार मोठे ऋण आहे. समाजवादी चळवळीत आघाडीवर असलेल्या या कोकणपुत्राने समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढविली. कोकणविषयक प्रश्नांची जाण आणि अमोघ वाणीने त्यांनी साऱ्या मतदारांची मने जिंकून घेतली. ‘नाथ येती घरा तोची दिवाळी दसरा’ अशी कोकणवासियांची अवस्था होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सत्ताधारी पक्षाचे मोरोपंत जोशी होते. त्यांच्याशी टक्कर देणे ही सामान्य बाब नव्हती. जाणकार असे म्हणतात की, कुणकेश्वरच्या जत्रेतील जाहीर सभेने निवडणुकीच्या निकालाचे पारडे नाथांच्या बाजूने झुकविले.

सन 1957 पासून बॅ. नाथ पै सलग चौदा वर्षे राजापूर मतदार संघाचे अनभिषिक्त सम्राट होते.’ सौंदर्य उपासना म्हणजेच राजकारण’ ही त्यांची राजकारणाची व्याख्या होती. म्हणूनच ते अन्यायाविरुद्ध पेटून उठत. लोकसभेच्या त्यांच्या पहिल्या अधिवेशनात ‘तो आला, तो बोलला आणि जिंकून घेतले सारे’ अशी सभागृहाची स्थिती होती. मतदारसंघातील प्रश्नांबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर ते तुटून पडत असत. त्यांच्या समतोल, सडेतोड व अभ्यासपूर्ण भाषणांमुळे त्यांना तत्कालीन प्रधानमंत्री पं. नेहरूंनी ‘असामान्य संसदपटू’ हा किताब बहाल केला.

अमोघ वक्तृत्वाबरोबरच विवेक, प्रखर देशभक्ती आणि समाजवादावर ठाम निष्ठा असणारे नाथ दीनदलित जनतेवर अपार प्रेम करत. ‘कठीण वज्रास भेदू ऐसी’ संसदेतील विरोधी पक्षावर हल्ला करताना असलेली बॅरिस्टर नाथ पै यांची भाषा सामान्य लोकांशी बोलताना ‘मऊ मेणाहूनी मुलायम’ असे. त्यामुळे त्यांनी कोकणी माणसाच्या हृदयात राज्य केले.

संसदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी मतदार संघाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यांच्या खासदारकीच्या काळात कोकणात तीनदा वादळे  झाली. संपर्काची त्यावेळी कोणतीही साधने उपलब्ध नसताना मिळेल त्या साधनाने ते कोकणात पोहोचले. सरकारी मदत पोहोचण्यापूर्वी लोकांच्या मदतीने वादळग्रस्त भागात काम केले. वाड्यावस्त्यांवर पोचून नुकसानीची पाहणी करून राज्य शासन व केंद्र शासनाची अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. 1961 साली झालेल्या वादळात रस्ते मोकळे नसल्यामुळे नाथ पै डोक्यावर सायकल घेऊन मतदारांपर्यंत पोहोचले. सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता ग्रामस्थांच्या सहाय्याने रस्ते मोकळे केले. पंतप्रधानांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागांना भरपाई मिळवून दिली.

दशावतार ही कोकणची लोककला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची खास ओळख. मंदिरांच्या परिसरात मध्यरात्रीनंतर लोकरंजनातून सुसंस्कारासाठी ही दशावतारी नाटके साजरी केली जातात. पौराणिक कथांवर उस्फूर्तपणे संवाद सादर केले जातात. पण त्याकाळी या दशावतारी कलाकारांची स्थिती ‘रात्रीचा राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा’ अशी हलाकीची होती. दशावतार ही कोकणची लोककला असूनही त्याला शासनमान्यता नव्हती याची नाथ पैना खंत वाटत होती. नाटककलेविषयी त्यांना जिव्हाळा होता, कलाकारांविषयी त्यांच्या मनात अआत्यंतिक प्रेम होते. दशावतारी नाटकांना व कलाकारांना शासन मदत व प्रोत्साहन देणार नसेल तर आपण द्यायला हवे, या भूमिकेतून त्यांनी दशावतारी नाटकांच्या स्पर्धा आयोजित केल्या. अजूनही या स्पर्धा घेतल्या जातात.

वेंगुर्ले ते शिरोडा या मार्गावरील मोचेमाडच्या खाडीत होडी उलटून वधू-वरांसह लग्नाचे वराड बुडाले. काही व्यक्तींचा अंत झाला. ही बातमी नाथांना दिल्लीत समजली. त्यांनी तात्काळ वेंगुर्ले गाठून मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केलेच, पण मुंबईला जाऊन बांधकाम सचिवांची भेट घेतली.” आणखी किती लोकांचे बळी गेल्यावर सरकार मोजेवाडच्या खाडीवर पूल बांधणार?” असा खडा सवाल विचारला. पंधरा दिवसात जागेची पाहणी करून फुलाचा आराखडा तयार करण्यात आला. पण जमीन संपादनासाठी अनावश्यक विलंब झाल्यामुळे नाथ यांच्या हयातीत पूल पूर्ण होऊ शकला नाही.

गणेश चतुर्थी हा कोकणवासीयांचा मुख्य सण. वाडीवस्त्यांमधून या काळात भजनांना उधाण येते. भजन हा उपासनेचाच एक मार्ग मानला जातो. कोकणात ठिकठिकाणी भजन डबलबारीच्या स्पर्धा होतात. भजनाला जात असताना कणकवली गडनदीनजीक भजनी मंडळाच्या ट्रकचा अपघात होऊन मृत्युमुखी 20 जण मृत्यूमुखी पडले. नाथांना ही बातमी समजताच त्यांनी दिल्लीहून कणकवली गाठली व अपघातग्रस्तांना मदत केली.

कोयनानगर परिसरात 11 डिसेंबर 1967 ला भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपात मोठ्या प्रमाणात हानी झाली. भूकंपाचा काही भाग देशावर तर काही भाग कोकणात होता. तरीही सरकारी मदत फारशी कोकणच्या दिशेने वळताना दिसली नाही. ही तफावत दूर करण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांनी आवाज उठवला. स्वयंस्फूर्तीने घेतलेले कोकणचे पालकत्व त्यांनी जबाबदारीने निभावले.

कोकण हा निसर्ग संपन्न प्रदेश! पण निसर्गाची श्रीमंती अनुभवणारा कोकणी माणूस मात्र अर्धपोटी! बुद्धिमंतालाही कोकणाबाहेर पडल्याशिवाय धन सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे घरातील पुरुषमंडळी रोजगारासाठी मुंबईकडे धावत.’ मनीऑर्डर वर जगणारा जिल्हा’ अशी जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकण विकास परिषदेची स्थापना केली.

मुंबईला जोडणारा महामार्ग त्यावेळी नव्हता. त्यामुळे कोल्हापूर मार्गे प्रवास करावा लागे. त्यामुळे बोटीची वाहतूक परवडणारी होती. रहदारीच्यामानाने बंदरे अविकसित होती. बंदराची देखभाल व सुधारणा आवश्यक होती.त्यांनी कोकण किनाऱ्यावर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आगबोट कंपन्यांना भाग पाडले. बारमाही बंदरांचा शोध घेऊन बारमाही करण्यासाठी कोकण विकास परिषदेमार्फत काम केले.  बंदरांना जोडणारे रस्ते, मुंबई गोवा महामार्ग, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी नदीवर पूल व साकव यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोकण विकास परिषदेमार्फत त्यांनी समविचारी लोकांना एकत्र करून शासनावर दबाव टाकला.

बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकणच्या विकासाचा ध्यास घेतला होता.  कोकणची उपेक्षा थांबवण्यासाठी ते सतत झटत असत. कोकणच्या डोक्यावरून जाणाऱ्या कोयनेच्या विजेचा कोकणवासियांना लाभ मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. काजू धंद्याच्या विकासाला चालना दिली. कोकणातील शेतीनंतरचा दुसरा प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी. मासेमारी व इतर छोटे उद्योग संघटित व सहकारी क्षेत्रात सुरू करण्यास प्रोत्साहित केले. पोस्ट व तार ऑफिसे अधिकाधिक असावीत यासाठी ते प्रयत्न करत होते. ते एक सुजाण लोकप्रतिनिधी होते. त्यांनी लोकांच्या गरजांच्या प्राथमिकता निश्चित करून त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची योजना केली. आदर्श लोकप्रतिनिधीचा ते एक मापदंडच बनले.

बॅरिस्टर नाथ पै यांना ‘कोकण रेल्वेचा शिल्पकार’ असे म्हटले जाते. लोकसभेत नाथ पै यांनी कोकण रेल्वेचा प्रश्न मांडला. त्यासाठी 1969 साली एक रुपयाची कपात सूचना मांडली. संसदीय लोकशाहीत एक रुपयाच्या कपातीला खूप महत्त्व आहे, पण तांत्रिक कारणाने ती फेटाळली गेली. मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नाथ पै यांच्याशी चर्चा करून कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाचे आश्वासन दिले. कोकणात रेल्वे धावली की विकासाची गंगाच अवतीर्ण होईल असे नाथांना वाटे. डोंगरद-यातून रेल्वे धावणे हे स्वप्नरंजनच होते. कोकण रेल्वे प्रकल्पाचा पाया घालण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या हयातीत कोकण रेल्वे कोकणात धावू शकली नाही तरी जॉर्ज फर्नांडिस व मधू दंडवते या त्यांच्या सहकाऱ्यांनी समयबद्ध कालावधीत कोकण रेल्वेचे काम पूर्ण केले.

सरकारी पडजमिनीचे शेतकऱ्यांना वाटप करावे यासाठी नाथांनी सत्याग्रहाचे आयोजन केले. माणगाव खोऱ्यातील शेकडो एकर जमीन कसवटधारकांना वाटावी असा ठराव घेतला.

बॅरिस्टर नाथ पै आपल्या भाषणात सांगत ‘देवाने  जर मला पुनर्जन्म दिला तर त्याला मी सांगेन कोकण भूमीतच जन्म दे’. नाथ पैचं कोकणप्रेम असं बावनकशी होतं. एक माजी खासदार एवढी मर्यादित नाथ पै यांची ओळख असूच शकत नाही.  एक राजा माणूस, कोकण रेल्वेचा शिल्पकार, देशातील एक नंबरच्या मतदार संघाचा एक नंबर खासदार अशी त्यांची ओळख आहे.

शूर सैनिकाची अखेर रणांगणात, नटसम्राटाची अखेर रंगमंचावर, तशीच या तेजस्वी वक्त्याची अखेर व्यासपीठावर झाली. बेळगाव येथील भाषणानंतर ते झोपी गेले ते उठलेच नाही. कोकणी जनतेच्या काळजाचा तुकडा विधात्याने हिरावून घेतला. त्यांचे स्मरणही आपल्याला बळ देईल. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना सार्थक करील.    

तव स्मरणाने जागृत होई आज पुन्हा अभिमान

 लोकशाहीच्या नम्रसेवका तुझेच मंगलगान…

© सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माहेर… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ माहेर… अनामिक  ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

आई बाप असतात तिथं माहेर असतंच असं नाही…. 

आणि जिथं माहेर असतं तिथं आई बाप असतातच असंही नाही….. 

माहेर ही खरं तर भावना असते….. जगून घेण्याची,  तर कधी अनुभूती असते काही क्षणांची…

तुम्हाला बरं नसल्यावर अर्ध्या रात्री मोबाईलच्या टॉर्चमध्ये नेमकी गोळी शोधून देणारा नवरा…

तुमचं लेकरू त्रास देतंय म्हटल्यावर हातातलं काम सोडून त्याला तुमच्याआधी पोटाशी घेणारी जाऊबाई…

तुम्ही झोपल्या असाल याचा अदमास घेत हळूच त्यांच्या कामाची वस्तू आवाज न करता, झोप न मोडता घेऊन जाणारे सासरे बुवा…

जास्त न बोलताही तुमच्यावर कायम मोठ्या भावाची सावली धरणारे भाऊजी……

सणाच्या दिवशीही नैवेद्याअगोदर तुम्हाला “आधी तू जेव” म्हणणाऱ्या सासूबाई…

एखाद्याच msg वरून तुम्ही नाराज असल्याचं नेमकं कळणारा मित्र…

” मी कायम आहे ” म्हणत सारं काही ऐकून घेणारी मैत्रीण.. 

आणि तुमच्या आजारपणात तुमचं बाळ हक्कानं घेऊन जाणाऱ्या, त्याला खेळवणाऱ्या, जेवण भरवणाऱ्या स्वैपाकाच्या काकू…

किंवा मग होळीला नवा कोरा ड्रेस बाळाला घालून त्याला घरी पाठवून देणाऱ्या शेजारीण काकू…

ह्या सगळ्या माणसांच्या सहवासात घालवलेल्या कित्येक क्षणांत माहेराचीच तर ऊब असते…

तीच शाश्वती …. तोच गोडवा… तोच विश्वास… ही माणसं आपल्याला एकटी पडू द्यायची नाहीत हे कायम स्वतःला सांगू शकणारे सुदैवी आपण !

आयुष्य खरंच सुंदर आहे……. फक्त हे असं माहेर जपता आलं पाहिजे !

लेखक : अनामिक 

संग्राहिका –  सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदाची गंगोत्री…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? इंद्रधनुष्य ? 

☆ आनंदाची गंगोत्री…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

बागेत रोजच्याप्रमाणे सकाळी फिरायला गेलेलो मी आणि माझी बायको एका बाकावर बसलो होतो. थोडावेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की ती आयुष्यात आनंदी नाही आहे. माझा विश्वास बसेना. कारण लौकिकदृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले, “असे का वाटते तुला? “

” मला माहित नाही. सगळेजण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही आहे, पण मला आतून आनंदी वाटत नाही आहे.”

—आता मी स्वतःला विचारू लागलो की ‘ खरच मी स्वतः आनंदी आहे का?’

काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला – ‘ नाही! मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते.’

माझ्यासाठी हा एक धक्का होता. मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे ?—-

आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले. काही लेख वाचले, तज्ञ व्यक्तींशी बोललो, पण काहीच मेळ बसत नव्हता. शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले, ज्यामुळे माझे समाधान झाले.

त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले, आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे.

—-तो म्हणाला, आपल्या शरीरात चार संप्रेरके असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी, प्रसन्न वाटत राहते-

१. एंडॉर्फिंस

२. डोपामाईन

३. सेरोटोनिन

४. ऑक्सिटोसिन

आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.

इंडॉर्फिंस

–आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते. मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो, कारण इंडॉर्फिंस आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात.

–हसणे हा इंडॉर्फिंस निर्मितीसाठी आणखी एक चांगला मार्ग आहे.

–आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे इंडॉर्फिंस निर्मितीसाठी मदत करू शकते.

डोपामाइन

आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते.

– जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते, कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते.

–यातून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते.  

–आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हासुद्धा डोपामाइन तयार होते. आता आपल्याला समजले का, खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते?

सेरोटोनिन

जेव्हा पण आपण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते. जेव्हा आपण स्वार्थापलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो, तेव्हा सिरोटोनिन तयार होते. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळेसुद्धा सिरोटोनिन तयार होते.

— हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो.

ऑक्सिटोसिन

हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो. 

–जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते.  मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते.   

–तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळेसुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते.

 

तर मित्रांनो, खूपच सोपे आहे—

दररोज व्यायाम करून इंडॉर्फिंस मिळवा . 

छोट्या-मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून  डोपामाइन मिळवा.  

इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन  मिळवा .  

आणि आप्तेष्टांना बिलगून ऑक्सिटोसिन  मिळवा !

अशाप्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात, की तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्‍वासाने सामोरे जाल.

आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते. 

आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी…

१. कोणतातरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद  लुटा….  इन्डॉर्फिन

२. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा. कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका…..  डोपामाइन

३. जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांनाही मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा….  सेरोटोनिन

४. जवळच्या माणसांना विनासंकोच आलिंगन द्यायला शिका.  यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतो…. ऑक्सिटोसिन

आनंदी राहा, मस्त जगा !

लेखक –  अज्ञात

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 9 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 9 ☆ सौ. अमृता देशपांडे  

सध्याच्या digital युगाच्या झपाट्याने बदलत असलेल्या वेगानं पुढे जाणा-या जगात धावताना माणसाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत की काय असे वाटू लागले आहे. जे नैसर्गिक होतं ते कृत्रिम झाले आहे. हल्ली रडावंसं वाटतं असताना रडलं तर लोक हसतील किंवा आपण कमकुवत ठरू म्हणून लोक रडण्याचं टाळतात, डोळ्यातलं पाणी परतवून लावतात. तेव्हा ते रडणारं ह्रदय घाबरतं आणि आपलं काम करताना त्याचाही तोल ढळतो. ह्रदयाच्या आजाराचं आणि अकार्यक्षमतेचं हे सुद्धा एक कारण असू शकतं. मन व शरीर यांची एकरूपता म्हणजे तंदुरुस्ती. अशी निरामय तंदुरुस्ती हवी असेल तर संवेदना बोथट होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. शारिरीक व मानसिक सुदृढतेसाठी आचार-विचार, आहार-विहार या सह हसू आणि आसू दोन्ही आवश्यक आहेत.

देवाने सृष्टी निर्माण करताना डोळ्यात पाण्याची देणगी दिली आहे. 

गाई म्हशी, कुत्रे घोडे, याकडे, हत्ती असे पशू रडून आपल्या भावना व्यक्त करतात. त्यांना अश्रू आवरण्याची बुद्धी नाही म्हणून ह्रदयाचे दुखणे नाही. या दैवी देणगी चा प्रसंगी अडवणूक  करून,  नाकारून आपण अपमान तर करत नाही ना असा विचार मनात येतो.

थोडक्यात काय तर आपल्या भावना आणि मन खुलेपणाने योग्य वेळी योग्य प्रकारे व्यक्त होणे महत्वाचे. सुख-दुःख, हसू-आसू, ऊन- सावली यांचं कुळ एकच. नैसर्गिकता. दुःख न मागता येतंच, सावली आपल्याला हवीच असते. मग आसू का नाकारायचे? ते सकारात्मतेने अंगिकारून व्यक्त करावेत. मन हलकं होतं……..

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आपलं माणूस…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आपलं माणूस…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नुकत्याच भिकेच्या डोहातून बाहेर काढलेल्या एका आजीचं आता कसं करावं ? काय करावं ? हा विचार डोक्यात सुरू होता… ! अशातच वाढदिवसानिमित्त गौरी धुमाळ या ताईंचा मला शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. 

गौरीताई पौड भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वृद्धाश्रम चालवतात. 

सहजच मी या आजीबद्दल गौरीताईंशी बोललो. त्या सहजपणे म्हणाल्या “ द्या माझ्याकडे पाठवून दादा त्यांना…! “

…. त्या जितक्या सहजपणे आणि दिलदारपणे हे वाक्य बोलल्या, तितक्या सहजपणे सध्या हा वृद्धाश्रम त्या चालवू शकत नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे. 

गौरीताई रस्त्यावर फिरत असतात…. निराधार आणि बेवारस पडलेल्या आजी-आजोबांना त्या रस्त्यावर आधी जेवू घालतात आणि त्यांना आपल्या आश्रमात कायमचा आसरा देतात. असे साधारण वीस ते बावीस आजी आजोबा सध्या त्या सांभाळत आहेत. 

एका फोटोमध्ये गरीब लोकांना भरपेट खाऊ घालताना त्या मला दिसल्या… मी त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं…. यावर त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, “ दोन-तीन वर्षांपूर्वीचा फोटो आहे तो …. या दोन-तीन वर्षांत माझे हे आजी आजोबा असे भरपेट जेवल्याचे मला आठवत नाही. रोजचं दोन वेळचं जेवण हीच आमच्यासाठी चैन आहे. अनेक बिलं थकली आहेत… कधी कधी वाटतं जग सोडून जावं… पण पुन्हा या आजी-आजोबांचा विचार येतो…. त्यांच्या चेहऱ्यावरचं करुण हास्य बघून दरवेळी मी माघारी फिरते….” —- हे बोलताना गौरी ताईंचा बांध फुटतो…! 

या ताईंना हा वृद्धाश्रम चालवण्यासाठी खरं तर कोणाचीच साथ नाही, सरकारी अनुदान नाही, जे काही थोडेफार डोनेशन मिळत आहे, त्यावर इतक्या लोकांचा संसार चालणं केवळ अशक्य आहे. 

आंबा खाऊन झाल्यावर त्याची कोय जितक्या सहजपणे रस्त्यावर फेकून देतात …. तितक्या सहजपणे आपल्या आई आणि बापाला रस्त्यावर सोडणारी मुले- मुली -सुना – नातवंड आम्ही रोज पाहतो…. 

दुसऱ्याच्या आईबापाला स्वतःच्या मायेच्या पदराखाली घेणारी ही ताई मला खरोखरी “माऊली” वाटते. 

परंतु आज हीच माऊली व्याकूळ झाली आहे…. परिस्थितीपुढे हरली नाही…. पण हतबल नक्कीच झाली आहे… ! 

अशा आई-वडील, आजी – आजोबा यांना आपला मदतीचा हात गौरीताईच्या माध्यमातून देता येईल. 

नळ दुरुस्त करणारा कितीही कुशल असला तरी डोळ्यातले अश्रू थांबवायला आपलं माणूसच असावं लागतं… 

गौरीताई यांच्या माध्यमातून आपणही या अंताला पोहोचलेल्या आजी-आजोबांचं ” आपलं माणूस ” होऊया का ? 

गौरीताई धुमाळ  यांच्याशी 74988 09495 या नंबरवर संपर्क साधता येईल…!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सीट बेल्ट… श्री दिवाकर बुरसे ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ सीट बेल्ट… श्री दिवाकर बुरसे ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर  ☆ 

कार चालविताना सुरक्षिततेचे नियम पाळा. 

काल टाटा सन्सचे माजी अध्यक्ष श्री सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची वार्ता सर्वांनी वाचली असेल. ते कारच्या मागच्या आसनावर सीट बेल्ट धारण न करता बसले होते.

मित्रहो, कारच्या मागच्या सीटवर बसणारासाठीही सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करून देणे कार उत्पादकांना अनिवार्य आहे. ते देतातही. कार विकत घेताना आपण त्याचे पैसे देतो. तरीही हे बेल्ट मागे बसणारे सहसा वापरतच नाहीत असे निरीक्षण आहे.

अपघाताच्या वेळी मागे बसणारा ग्रॅव्हिटीच्या ४० पट वजनाने पुढे फेकला जातो. म्हणजे ८० किलो वजन असलेला माणूस ८०x४०=३२०० किलो वजनाने पुढील चालकावर कोसळतो. मागे बसणारे आणि  कार चालक यात गंभीरपणे दुखावले जातात. कदाचित त्यांचा मृत्यू ओढवतो. केवढा हा निष्काळजीपणा !  

म्हणून मित्रांनो, कारमधून प्रवास करताना ड्रायव्हर आणि मागे बसणाराने कटाक्षाने सीट बेल्ट लावले पाहिजेत. त्यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा करणे सर्व प्रवाश्यांच्या जिवावर बेतू शकते.

सीट बेल्ट वापरा, सुरक्षित प्रवास करा, ही ‘ यंत्रदासा ‘ची सर्व प्रवाशांना कळकळीची विनंती.

लेखक – श्री दिवाकर बुरसे, पुणे.

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार – पुष्प – भाग ३६ – परिव्राजक १४ – मध्यभारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार – पुष्प – भाग ३६ – परिव्राजक १४ – मध्यभारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

जुनागडहून स्वामीजी पालिताणा, नडियाद, बडोदा इथे फिरले. जुनागडच्या दिवाण साहेबांनी बडोद्याला जाताना ज्यांच्या नावे परिचय पत्र दिलं होतं ते बहादुर मणीभाई यांनी बडोद्याला स्वामीजींची व्यवस्था केली होती. तिथून स्वामीजी लिमडीच्या ठाकूर साहेबांखातर महाबळेश्वरला गेले. ठाकुर साहेबांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली होती. तिथे ते एक दीड महिना राहिले. त्या काळात महाबळेश्वर हे एक श्रीमंत व्यापारी आणि धनवंत संस्थानिक यांचं, दिवस आरामात घालवण्याचं एक ठिकाण मानलं जात होतं. इथला मुक्काम आणि ठाकूर यांची भेट आटोपून, ते पुण्याहून ते खांडवा इथं गेले आणि तिथले वकील हरीदास चटर्जी यांच्याकडे उतरले. दोन दिवसातच त्यांना स्वामीजी एक केवळ सामान्य बंगाली साधू नसून, ते असाधारण असं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे हे कळलं. तिथे अनेक बंगाली लोक राहत होते, त्यांचीही स्वामीजींची ओळख झाली. काही वकील, न्यायाधीश, संस्कृतचे अभ्यासक असे लोक भेटल्यानंतर स्वामीजींचे उपनिषदातील वचनांवर भाष्य, संगीतावरील प्रभुत्व, आणि एकूणच त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे हे लोक भारावून गेले होते.(खांडवा म्हटलं की आठवण झाली ती अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार गांगुली यांची, हे सिनेसृष्टीतले गाजलेले कलावंत सुद्धा या खांडव्याचेच राहणारे.)

खांडव्याहून स्वामीजींनी इन्दौर, उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर या ठिकाणी भेटी दिल्या. भारतातल्या  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवाचे स्थान असलेले उज्जैन शहर, महाकवी कालीदासांचे उज्जैन, दानशूर आणि कर्तृत्ववान असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे  इन्दौर आणि महेश्वर, अशी पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणं पाह्यला मिळाल्याने स्वामीजींना खूप आनंद झाला. ही ठिकाणं फिरताना स्वामीजींना खेडोपाड्यातली गरीबी दिसली. पण त्या माणसांच्या मनाची सात्विकता आणि स्वभावातला गोडवा पण दिसला. हीच आपली खरी संस्कृती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. याच्याच बळावर आपल्या देशाचं पुनरुत्थान घडवून आणता येईल असा विश्वास त्यांना वाटला होता. कारण त्यांना भारतातील सामान्य जनतेचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं.

या भागात त्यांनी जे पाहिलं आणि त्यांना जाणवलं ते वर्णन आपल्या दिवाण साहेबांच्या प्रवास वार्तापत्रात ते करतात. ते म्हणतात, “एक गोष्ट मला अतिशय खेदकारक वाटली ती म्हणजे, या भागातील सामान्य माणसांना संस्कृत वा अन्य कशाचेही ज्ञान नाही. काही आंधळ्या श्रद्धा आणि रूढी यांचे गाठोडे हाच काय तो सारा यांचा धर्म आहे आणि त्यातील सर्व कल्पना, काय खावे, काय प्यावे, किंवा स्नान कसे करावे एव्हढ्या मर्यादेत सामावल्या आहेत. धर्माच्या नावाखाली काहीही सांगत राहणारे आणि वेदातील खर्‍या तत्वांचा गंध नसलेले स्वार्थी व आप्पलपोटे लोक समाजाच्या अवनतीला जबाबदार आहेत”.

हा प्रवास संपवून स्वामीजी पुन्हा खांडव्याला हरीदास चटर्जी यांच्याकडे आले. हरीदास पण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वावर भारावून गेले होते. त्यातच शिकागो इथं जागतिक सर्वधर्म परिषद भरणार आहे ही बातमी त्यांना समजली होती. हरीदास बाबू स्वामीजींना म्हणाले, आपण शिकागोला जाऊन हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करावे. हा विषय स्वामीजींच्या समोर याआधी पण मांडला गेला होता. धर्मपरिषद म्हणजे, विचार मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ. पण स्वामीजी म्हणाले, प्रवास खर्चाची व्यवस्था होईल तर मी जाईन. धर्म परिषदेला जायला तयार असल्याची इच्छा स्वामीजींनी पहिल्यांदाच व्यक्त केली होती.

हरीदास बाबूंचे भाऊ मुंबईत राहत होते. हरीदास बाबूंनी स्वामीजींना परिचय पत्र दिलं आणि सांगितलं की, माझे बंधू तुमची मुंबईत, बॅरिस्टर शेठ रामदास छबिलदास यांची ओळख करून देतील. त्यांची यासाठी काही मदत होऊ शकते. मध्यप्रदेशातली भ्रमंती संपवून स्वामीजी मुंबईला आले. हरीदास बाबूंच्या भावाने ठरल्याप्रमाणे स्वामीजींचा छबिलदास यांच्याशी परिचय करून दिला. छबिलदास यांनी तर स्वामीजींना आपल्या घरीच आस्थेने ठेऊन घेतले. छबिलदास आर्यसमाजी होते. स्वामीजी जवळ जवळ दोन महीने मुंबईत होते. छबिलदासांकडे स्वामीजींना काही संस्कृत ग्रंथ वाचायला मिळाले त्यामुळे ते खुश होते. छबिलदास एकदा स्वामीजींना म्हणाले, “अवतार कल्पना आणि ईश्वराचे साकार रूप यांना वेदांतात काहीही आधार नाही. तुम्ही तो काढून दाखवा मी आर्य समाज सोडून देईन”. आश्चर्य म्हणजे स्वामीजींनी त्यांना ते पटवून दिलं आणि छबिलदास यांनी आर्यसमाज खरंच सोडला. यामुळे त्यांच्या मनात स्वामीजींबद्दल खूप आदर निर्माण झाला हे ओघाने आलेच.

आता स्वामीजी मुंबईहून पुण्याला जायला निघणार होते. छबिलदास त्यांना सोडायला स्टेशनवर आले होते. रेल्वेच्या ज्या डब्यात स्वामीजी चढले त्याच डब्यात योगायोगाने बाळ गंगाधर टिळक चढले होते. ते छबिलदास यांच्या जवळचे परिचयाचे असल्याने त्यांनी स्वामीजींचा परिचय करून दिला आणि यांची व्यवस्था आपल्या घरी करावी असे टिळकांना सांगीतले. बाळ गंगाधर टिळक नुकतेच राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले होते. तर स्वामीजींना राजकारणाशी काहीही कर्तव्य नव्हते पण, हिंदूधर्माविषयी प्रेम, संस्कृत धर्म ग्रंथांचा अभ्यास, भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, अद्वैतवेदांताचा पुरस्कार या गोष्टी दोघांमध्ये समान होत्या. तसच भगवद्गीते विषयी प्रेम हा एक समान धागा होता. देशप्रेमाचे दोघांचे मार्ग फक्त वेगळे होते. दोघांचा रेल्वेच्या एकाच डब्यातून मुंबई–पुणे प्रवास सुरू झाला.

 © डॉ.नयना कासखेडीकर

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares