मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पद्मश्री”… पोस्टाने पाठवा साहेब !… श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

☆  “पद्मश्री”… पोस्टाने पाठवा साहेब !… श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

(एक अफलातून सत्यकथा)

पद्मश्री हलधर नाग

“पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब ! दिल्लीपर्यंत  यायला पैसे नाहीत  “पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब ! – पद्मश्री हलधर नाग

ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी “श्री” लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !

त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की,

दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत …. “पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब !

अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची.

कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी, कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे.

आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या “हलधर ग्रंथावली – भाग -2” याचा पाठ्यक्रमात समावेश करण्यात आलाय.

साधाच वेष, शक्यतो पांढरं धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत .

हे  खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधरजीसारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले– तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर !

*श्री हलधरजी यांची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तर ही पोस्ट करतोय.

ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले. आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधरजी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडावी लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्यांची दया आली व त्यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं.

*

नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन – पेन्सिल – आणि शालेय वस्तूंच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले.  आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले.

*

आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. श्री हलधरजी यांनी १९९५ च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत “राम शबरी” सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची ही कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाला.

अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधरजी फक्त तिसरीपर्यत शिकलेले , पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट  विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत.

त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की,

आप किताबो में प्रकृति को चुनते है

पद्मश्री ने, प्रकृति से किताबे चुनी है।।

डीडी क्लास : भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधरजी– त्यांच्यासारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. ” सगळी परिस्थिती वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं ” अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच ही  आजची हलधरजी यांची कहाणी तुम्हापुढे ठेवली. शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो,

काहीही होवो….. रडायचं नाही

तर लढायचं आणि लढून जिंकायचं !

लेखक — धनंजय देशपांडे

 संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शुभास्ते पंथान: सन्तु ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ शुभास्ते पंथान: सन्तु ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे, विचारशील आहे, हे कितीही खरं असलं तरी प्रत्येक माणूस आपल्या बुद्धीचा आणि विचार शक्तीचा प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने वापर करत असतोच असे नाही. तो तसा वापर करणे पूर्णतः अपेक्षित असलेली तर्क ही संकल्पना! आपल्या बुद्धीचा आणि विचारशक्तीचा योग्य पद्धतीने कसा उपयोग करायचा याचे विकसित झालेले शास्त्र म्हणजेच ‘तर्कशास्त्र’! इंग्रजीतील ‘लॉजिक’ या शब्दाचे भाषांतर म्हणून तर्कशास्त्र हा शब्द सर्रास वापरला जातो. लॉजिक हा शब्द तसा सुसंगत विचारांच्या सहाय्याने ज्ञाननिर्मिती करु पहाणाऱ्या विविध क्षेत्रांसाठी अतिशय अर्थपूर्ण ठरतो. म्हणूनच फक्त तर्कशास्त्रच नव्हे तर इतर विविध ज्ञाननिर्मिती शाखांच्या नामकरणासाठी सुद्धा लॉजिक हा शब्द प्रत्यय बनून आलेला दिसून येतो. बायॅलॉजी, सोशॉलॉजी, अॅस्ट्रोलॉजी, सायकॉलॉजी अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

अर्थात तर्कशास्त्र हा  विचारवंत आणि अभ्यासक यांच्यासाठी एक सखोल अभ्यासाचा विषय असेलही कदाचित पण सर्वसामान्य माणसांसाठी ‘तर्क’ हा फक्त स्वतःकडून नकळत होणाऱ्या एका मानसिक पातळीवरील प्रक्रियेच्या प्रवासापुरताच परिचयाचा असतो.

तर्क म्हणजे अनुमान, कयास, अंदाज असेच बरेच कांही हा सर्वसाधारण समज. तर्क करण्याच्या रूढ पद्धतीचा विचार केला तर ते पूर्णांशाने खरेही आहे. कारण सहसा सर्वसामान्य व्यक्तींकडून अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने तर्क केला जात नाहीच. ‘असे घडले असेल किंवा असे घडेल’ हा ज्याचा त्याचा अंदाजच असतो आणि त्यालाच सर्रास तर्क असे म्हटले आणि म्हणूनच समजले जाते. म्हणूनच तर्क म्हणजे अंदाज असला तरी प्रत्येक अंदाज ‘तर्क’ असतोच असे नाही. तर्काला वास्तवाचा, सत्यघटनांचा, आपल्या अनुभवांचा आणि सुसंगत विचारांचा आधार आवश्यक असतो. सर्वसाधारणपणे अंदाज मात्र व्यक्तिगत भावना, इच्छा, वासना यांनी प्रभावित झालेले असू शकतात. त्यामुळे बुद्धिनिष्ठ, सुसंगत विचारांच्या आधारे केला केलेला अंदाज आणि त्यातून काढलेले अनुमान हाच तर्क. आणि भावनिक प्रभावाखाली केलेले अंदाज मात्र अशास्त्रीय म्हणूनच कुतर्क, वितर्क, तर्कट ठरण्याची शक्यता अधिक.

सुसंगत विचारांच्या सहाय्याने केलेल्या तर्काचे सर्वांच्या परिचयाचे असे बुद्धिबळाच्या खेळाचे उदाहरण देता येईल. या खेळात प्रतिस्पर्ध्या विरुद्ध डावपेच करतानाच त्याच्या चालीवरून त्याच्या अपेक्षित चालींबद्दलचा तर्कशुद्ध विचार करून स्वतःची पुढची खेळी ठरवली जाते. युद्धात किंवा गनिमी काव्यात तर्कशुद्ध विचाराने घेतलेले निर्णयच अतिशय महत्त्वाचे असतात. गुन्हेगारांचा तपास करतानाही त्यातल्या चाली आणि निर्णयही असेच तर्कसंगत असणे आवश्यक ठरते. एरवी चोर सोडून संन्यासी फासावर लटकतो. राजकारण हासुद्धा तर्काधिष्ठित निर्णयातून आकाराला येणारा बुद्धिबळाचा खेळ असला तरी त्या खेळाला बुद्धिबळासारखे काटेकोर नियम मात्र नसतात. तरीही राजकारणाच्या खेळातही शह आणि काटशहांसाठी तर्कशुद्ध अनुमान, अंदाज महत्त्वाचेच ठरतात. या उलट दैनंदिन व्यवहारातले बरेचसे तर्क हे भावनांनी प्रेरित असल्याने व त्यामध्ये सारासार विचार व बुद्धी चातुर्याचा बऱ्याचदा अभाव असल्याने वितर्कच ठरत असतात.

संतुलित मन आणि तर्कशुद्ध विचार हे अचूक तर्कासाठी अतिशय अत्यावश्यक म्हणूनच महत्त्वाचे ठरतात. अचानक समोर येऊ पहाणाऱ्या संकटाच्यावेळी या दोन्ही गोष्टींचा अभाव असण्याची शक्यता असल्याने तर्कशुद्ध निर्णयांअभावी त्या संकटामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता खूप वाढल्याचे बऱ्याचदा अनुभवाला येते. त्यामुळेच अशा कसोटीच्या क्षणी तर्कशुद्ध निर्णयच संकटाची तिव्रता कमी करु शकतात.

यासाठी तर्क हा विचारांचा एक प्रवास आहे हे समजून घ्यायला हवे. योग्य निर्णय हा या प्रवासाचा अखेरचा थांबा. तिथवर सुखरूप पोहोचायचे तर बुद्धी आणि संतुलित मन यांच्या सोबतीनेच हा प्रवास व्हायला हवा. तरच तो न भरकटता अचूक दिशेने होईल. आणि त्यातून आकाराला आलेला तर्कच योग्य निर्णयाच्या थांब्यावर आपल्या स्वागताला हजर असेल!

आपणा सर्वांसाठी यापुढील अथक तर्कप्रवासासाठी ही संवादांची शिदोरी आणि ‘शुभास्ते पंथान: सन्तु’ या शुभेच्छा !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”गरज” – डॉ. कुलदीप शिवराम यादव ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ ”गरज” – डॉ. कुलदीप शिवराम यादव ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

एका मैत्रिणीच्या आईचे परवा 95 व्या वर्षी निधन झाले. वडील आधीच निवर्तले होते. 65 वर्षांच्या त्यांचा सहजीवनातला संसार आणि विस्तार म्हणजे तीन लेकी, दोन लेक, आठदहा खोल्यांचा प्रशस्त बंगला, प्रत्येकाचे स्वतंत्र शयनकक्ष, कपाटे, तेवढे कपडे, कार्यप्रसंगी 100 माणसे जेवू शकतील एवढी भांडी, फर्निचर, बाग, हौसेमौजेने तीर्थयात्रा, पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू, प्रचंड माळे, आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज, वस्तू, सामान…पण आता सर्व मुलेबाळे स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रांत मग्न, यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली !

आईपश्चात वर्षभर रिकामे, प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा यक्षप्रश्नच !!

कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही, 100 माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही, जुने अवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही, शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही, मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवणे सुरक्षित नाही, बाग मेंटेन करायला मनुष्यबळ नाही, अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमता नाही…असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर मग जेवढे चांगले व शक्य तेवढे गरजू संस्था व संसार असलेल्या लोकांना देण्यात आले, आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली असे करता करता त्या घराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली !!!

या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप, कठोर निर्णय, नकार, उस्तवार आणि शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा व ताण मुलांना सोसावा लागला. या सगळ्यांपेक्षा सर्वाधिक मौल्यवान असा त्यांचा वैयक्तिक वेळ त्यांना वाया गेल्याची भावना निर्माण झाली. ज्या पिढीने हे सगळे जमवण्याचा अट्टाहास करण्यासाठी कष्ट झेलले ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली. हे सर्व सांगतांना ‘ती’ मैत्रीण खरेच दुःखी, खिन्न व अंतर्मुख झाली होती.

यातून काही बोध घ्यावा असे वाटले तो म्हणजे…

१) गरजा कमी हीच आनंदाची हमी.

२) घर हे माणसांचे वसतिस्थान आहे, वस्तूंची अडगळ नव्हे.

३) आपल्यासाठी वस्तू, वस्तूंसाठी आपण नाही…नाहीतर अवघे आयुष्य साफसफाई करण्यात व वस्तू राखण्यात जाते.

४) प्रवासात फक्त सुंदर क्षणांचा संचय करा, शोभेच्या वस्तूंचा नव्हे.

५) जितकी अडगळ कमी तेवढा तुमचा आत्मशोध सुलभ.

६) विकत घ्यायच्या आधी ‘का ?’ चा शोध लावावा.

७) साधेपणा, सुसंगतता आणि सुयोजकता हे नियम पाळावेत.

८) दान हे संचय करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच मानावे.

९) आजचा संचय उद्याची अडगळ.

१०) दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे अजिबात खर्चू नयेत.

११) जेवढ्या वस्तू कमी तितके घर मोकळा श्वास घेते, माणसे शांत व समाधानी असतात, मानसिक विकार व नैराश्य येत नाही.

१२) सुटसुटीत, मोकळे घर म्हणजे पैशाची, मनुष्यबळ ऊर्जेची व वेळेची बचतच.

हा वेळ तुम्ही परस्पर मानवी संबंध, सुसंवाद, छंद जोपासणे, व्यायाम, आरोग्य सुधारणे यासाठी देऊ शकता.

१३) किमान गरजा ही जीवनशैली काळानुसार अत्यावश्यक गरज ठरणार आहे.

१४) शाश्वत सुखाचा राजमार्ग हा ‘समाधान’ नावाच्या गावातूनच असतो.

ले. ~ डॉ. कुलदीप शिवराम यादव.

प्रस्तुती : मीनाक्षी सरदेसाई 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रार्थनेचे शब्द – सुश्री हेमलता फडणीस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रार्थनेचे शब्द – सुश्री हेमलता फडणीस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात, तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो… ( का इंग्रजी मेसेजचा हा अनुवाद.)

एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे.

नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे.

हा दिनक्रम रोजचाच झाला होता.

देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्याला वाटू लागली. त्याला वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला समजणे केवळ अशक्य.

तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ !—-असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्याची बेचैनी वाढू लागली. एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर तो तेथे पोहोचला. तिचा नित्यक्रम संपण्याची त्याने वाट पाहिली. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला म्हणाला, मागील १५ दिवसांपासून तू नियमितपणे येथे येते हे मी पहात असतो. तू काय करतेस ?

ती एकदम म्हणाली, “प्रार्थना”.

पुजाऱ्याने जरा साशंकतेनेच  विचारले, तुला एखादी प्रार्थना येते?

“नाही” असे ती म्हणाली.

“ मग तू डोळे मिटून रोज काय करतेस ?” असे त्याने हसून विचारले.

अगदी निरागसपणे ती म्हणाली, “ मला कोणतीच प्रार्थना येत नाही पण मला,” a,b,c,d पासून z पर्यंत माहित आहे. ते ५ वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या alphabets च्या बाहेर असूच शकत नाही.  ही alphabets तुझ्या इच्छेनुसार क्रमश: लावून घे आणि तीच माझी प्रार्थना. “

—ती उड्या मारत बेभानपणे धावत निघून गेली.  ती दिसेनाशी होईपर्यंत निरखून तिच्याकडे पहात पुजारी नि:स्तब्ध होऊन उभा राहिला.

ज्याची आपण मनोभावे पूजा करतो, अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा.

@ fb~हेमलता फडणीस

(अगा बावन्न वर्णा परता। कोण मंत्रु आहे पांडुसूता।। —ज्ञानेश्वरी ) 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 4 ☆ सौ. अमृता देशपांडे  

चिंतन लहानपणापासून हुशार मुलगा. पहिला नंबर कधीच सोडला नाही. मित्रांच्यात प्रिय, शिक्षकांच्यातही लाडका . तो सातच वर्षाचा होता,  तेव्हा त्याचे वडील स्वर्गवासी झाले. आईनं नोकरी करून उपजीविका केली. चिंतन आणि त्याच्या बहिणीनं कधीच आईकडे काही मागितलं नाही,  कसलाच हट्ट केला नाही. शाळा,  अभ्यास,  परीक्षा, स्पर्धा,  आणि क्रिकेट,  बस्स, इतकंच! इतकंच त्याचं जग.दहावी ला 94% मार्क मिळाले,  राज्यात सहावा व शाळेत पहिला आला. आईला झालेला आनंद तिच्या डोळ्यांतून घळाघळा वहाणा-या पाण्यातून ओसंडत होता. पती गेल्याचं दुःख, मुलांना वाढवताना एकटीनं केलेला प्रवास , मुलांच्या भविष्याच्या काळजीने जागून काढलेल्या रात्री या विचारांनी मनात काहूर उठवलं होतं. चिंतन चं यश बघून ती कृतार्थ झाली.  अनेक ठिकाणी अभिनंदनाचे सत्कारसोहळे झाले.त्याच्या शाळेत जेव्हा त्याचा सत्कार झाला तेव्हा त्याचं नाव पुकारताच सर्व शिक्षक आणि मुलांनी उभे राहून त्याच्यासाठी वाजवलेल्या टाळ्या आणि मुख्याध्यापकांनी त्याचं तोंडभरून केलेलं कौतुक बघून आईला तिचे अश्रू कसेच आवरता येत नव्हते. आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर तिला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.  त्यामुळे ‘ आसवांचा पूर माझ्या पापण्यांना पेलवेना’ अशी तिची अवस्था झाली.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जाहिरात : “हरवला आहे” – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ जाहिरात : “हरवला आहे” – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

मी पेपर उघडला !!

त्यात मीच दिलेली

जाहिरात होती —-

 

हरवला आहे .. “आनंद”

पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद …

 

रंग …  दिसेल तो

उंची …भासेल ती

कपडे सुखाचे

बटण दुःखाचे  !!

 

कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून

थकलो आहोत सगळीकडे शोधून शोधून !!

 

“आनंदा” परत ये

कुणीही तुझ्यावर रागावणार नाही

तुझ्यावर कसलीही सक्ती करणार नाही

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट

दार उघडं ठेवलंय, वाढून ठेवलंय आशेचं  ताट

शोधून आणणाऱ्याला दिलं  जाईल इनाम

मग म्हटलं आपणच करावं हे काम !!

 

आणि काय आश्चर्य .. सापडला की गुलाम ….

 

एका नव्या कोऱ्या पुस्तकाआड….

एका जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड ….

आठवणींच्या मोरपिसात ….

अगरबत्तीच्या मंद वासात ….

मोगऱ्याच्या मखमली स्पर्शात ….

अवेळी येणाऱ्या पावसात ….

 

त्यानेच मारला पाठीत धप्पा– जुन्या मैत्रिणीशी मारताना गप्पा ..

मी म्हटलं अरे इथेच होतास उगाच दिली मी जाहिरात..

 

तो म्हणाला वेडी असता तुम्ही माणसं ..

मला बाहेर शोधता …पण मी तर असतो तुमच्याच मनात … !

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हरखचंद सावला..माणसातला देव” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆“हरखचंद सावला..माणसातला देव” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

परळ भागातील प्रसिद्ध टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहून तिशीतील एक तरुण खाली उभ्या असलेल्या गर्दीकडे टक लावून पाहत राहायचा. मृत्यूच्या दारात उभं राहिल्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावर दिसणारी ती भीती, त्यांच्या नातेवाईकांची भकास चेहऱ्याने होणारी ती धावपळ पाहून तॊ तरुण खूप अस्वस्थ व्हायचा.

बहुसंख्य रुग्ण बाहेर गावाहून आलेले गरीब लोक असायचे. कुठे कोणाला भेटायचे, काय करायचे हेही त्यांना ठाऊक नसायचे. औषधपाण्यासाठीच नव्हे तर त्यांच्याकडे जेवायलाही पैसे नसायचे. ते सारे दृश्य पाहून तो तरुण खूप खिन्न मनाने घरी परतायचा. ‘ त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे.’..  रात्रंदिवस त्याने ह्याच विचाराचा ध्यास घेतला.

आणि एक दिवस त्याने त्यातून मार्ग काढलाच.

आपलं चांगलं चाललेलं हॉटेल त्याने भाड्याने दिलं आणि काही पैसे उभे राहिल्यावर त्याने चक्क टाटा हॉस्पिटलच्या समोर असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर आपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे २७ वर्षे अविरत सुरु राहील याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती.

कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन द्यायचा त्याचा हा उपक्रम परिसरातील असंख्य लोकांना आवडला. सुरुवातीला पाच पन्नास लोकांना भोजन देता देता शंभर, दोनशे, तीनशे अशी संख्या वाढू लागली.  तसे असंख्य हात त्यांच्या सोबतीला येऊ लागले. बघता बघता एकामागून एक वर्ष उलटत गेली. कधी हिवाळा,कधी उन्हाळा तर कधी मुंबईतला भयंकर पावसाळाही त्यांच्या यज्ञात खंड पाडू शकला नाही. तोपर्यंत दररोज मोफत भोजन घेणाऱ्यांची संख्या ७०० पार करून पुढे गेली होती.

हरखचंद सावला एवढं करूनच थांबले नाहीत. त्यांनी गरजू रुग्णांना मोफत औषधं पुरवायलाही सुरुवात केली.

त्यासाठी त्यांनी औषधाची बँकच उघडली. त्यासाठी तीन फार्मासिस्ट व तीन डॉक्टरांची अन सोशल वर्करची टीमच त्यांनी स्थापन केली. कॅन्सरग्रस्त बालरुग्णांसाठी त्यांनी टॉयबँकही उघडली.

आज त्यांनी स्थापन केलेला “जीवन ज्योत” ट्रस्ट ६० हून अधिक उपक्रम राबवत आहे. ५७ वर्षीय हरखचंद सावला आजही त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांच्या त्या अफाट उत्साहाला, त्यांच्या त्या प्रचंड कार्याला शतशः प्रणाम !

२४ वर्षे क्रिकेट खेळून २०० कसोटी आणि शेकडो एक दिवसीय सामने खेळून १०० शतके अन ३० हजार धावा केल्या म्हणून सचिन तेंडूलकरला “देवत्व” बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत.

पण २७ वर्षात १०-१२ लाख कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद सावलाना मात्र कोणी ओळखतही नाही—-

आणि त्यांना देवही मानत नाही — ही आहे आपल्या देशातील मीडियाची कृपा. ( विशेष म्हणजे गुगलवर अथक परिश्रम करूनही त्यांचा फोटो सापडला नाही ).

कधी पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात, कधी प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात, कधी शिर्डीच्या साई मंदिरात, तर कधी त रुपतीच्या बालाजी मंदिरात… आणि नाहीच  जमलं तर जवळपासच्या मंदिरात जाउन देवाचा शोध घेणाऱ्या त्या करोडो भक्तांना देव कधीच सापडणार नाही. तो आपल्या आजूबाजूलाच असतो. पण आपल्याला मात्र त्याचा पत्ताच नसतो. आपण मात्र वेड्यासारखे कधी बापू, कधी महाराज, कधी बाबा म्हणून त्यांच्या मागे पळत असतो. सगळे बाबा, महाराज, बापू अब्जाधीश होतात आणि आपल्या व्यथा, वेदना, आणि संकटे काही मरेपर्यंत संपत नाहीत.

गेल्या २७ वर्षात लाखो कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाइकांना मात्र देव सापडला तो हरखचंद सावला यांच्या रुपात.

जसे चारोळी, कविता, जोक, इतर बातम्या लगेच पुढे पाठविता तसेच हे सुध्दा सगळयांना पाठवा. अशा माणसाचा सन्मान झाला पाहिजे. त्यांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे !

माहिती संकलन  : अनामिक

प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आभार माना… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आभार माना… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

जीवनात तुम्हाला ज्या लोकांमुळे त्रास झाला अशा लोकांचे सुद्धा आभार माना, कारण त्याच लोकांमुळे आयुष्यात कसं वागायचं व कसं जगायचं हे अचूकपणे शिकायला मिळतं.

समोरच्या व्यक्तीने तुमच्याबरोबर काय आणि का केले हा विचार करण्यात वेळ दवडू नका. कारण तुमच्या जागी त्याचे कर्मच त्याला उत्तर देईल व त्याला त्याच्या कर्माची फळं भोगण्यासाठी भाग पाडेल. कधीकधी शांत राहणे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात.

लक्षात ठेवा– जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता तेव्हा लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील.  अशावेळी खाली बघू नका, तर अजून उंच उडा. त्यामुळे त्यांनी भिरकावलेले दगड तुमच्यापर्यत पोहोचणारच नाहीत. जर परिणामांचा विचार करत बसाल तर आलेला क्षण निसटून जाईल आणि प्रत्येक क्षण जगून पाहिलात तर परिणाम स्विकारायला सोपं जाईल.

श्री सोमेश्वर व्यसन व मधूमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र लोटे ता.खेड जि.रत्नागिरी 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३१ परिव्राजक ९. मूर्तीपूजा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३१ परिव्राजक ९. मूर्तीपूजा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

अलवरला राजेसाहेबांचे दिवाण मेजर रामचंद्र यांना स्वामीजींबद्दल कळलं होतं. त्यांनीही स्वामीजींना आपल्या घरी बोलावलं. अलवर संस्थानचे राजे महाराज मंगलसिंग होते. त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृती आणि तिथले रीतिरिवाज यांचा प्रभाव होता. त्यामुळे दिवाण साहेबांना वाटलं की स्वामीजींची भेट घडवून आणली तर राजेसाहेबांचा दृष्टीकोण थोडा तरी बदलेल. म्हणून त्यांनी महाराजांना चिठ्ठी पाठवली की, उत्तम इंग्रजी जाणणारा एक मोठा साधू इथे आला आहे. तसे दुसर्‍याच दिवशी राजे साहेब दिवाणांच्या घरी स्वामीजींना भेटायला आले. त्यांनी स्वामीजींना पहिलाच प्रश्न विचारला की, “आपण एव्हढे विद्वान आहात, मनात आणले तर महिन्याकाठी कितीतरी पैसा सहज मिळवू शकाल. मग आपण असे भिक्षा मागत का फिरता?”स्वामीजींना हा प्रश्न नवीन नव्हता. हाच प्रश्न रामकृष्ण संघाचं काम सुरू केलं तेंव्हा भिक्षा मागायला गेले असताना अपमान करण्यासाठी विचारला गेला होता. पण आज प्रश्न विचारणारी व्यक्ती  श्रेष्ठत्वाचा अहं असणारी, हातात सत्ता असणारी व्यक्ती होती.

महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर न देता स्वामीजींनी त्यांना उलट प्रश्न विचारला की, “महाराज आपण सदैव पाश्चात्य व्यक्तींच्या सहवासात वावरता. शिकारीला वगैरे जाण्यात वेळ दवडता. प्रजेविषयीच्या आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करता. हे आपण का करता सांगा बरं?” उपस्थित लोक जवळ जवळ भ्यायलेच.  राजेसाहेबांना असा थेट प्रश्न ? पण राजेसाहेब शांत होते. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “का ते मला नेमकं सांगता येणार नाही. पण मला आवडतं म्हणून मी सारं करतो”. स्वामीजी यावर म्हणाले, “याच कारणामुळे मी पण अशी भिक्षावृत्ती स्वीकारून संचार करीत असतो”.

राजेसाहेब हसले. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. “स्वामीजी माझा मूर्तिपूजेवर विश्वास नाही. तर माझं काय होईल?” मी धातूची, दगडाची किंवा लाकडाची अशा मूर्तीची पुजा करू शकत नाही. तर मला मरणोत्तर वाईट गती प्राप्त होईल का? या प्रश्नावरून त्यांना पाश्चात्य दृष्टीकोनाचा आणि आधुनिकतेचा अहंकार होता हे स्वामीजींच्या लक्षात आलं होतं. स्वामीजी म्हणाले, “हे पहा, धार्मिक दृष्ट्या ज्याची ज्या मार्गावर श्रद्धा असेल त्याने त्या मार्गाने जावं”.

दिवाण साहेबांच्या घरात राजेसाहेबांचे चित्र भिंतीवर लावलेले होते ते चित्र स्वामीजींनी खाली काढण्यास सांगितलं. सगळे बघत होते की आता स्वामीजी पुढे काय करतात? त्यांना काही केल्या अंदाज येईना. स्वामीजींनी हे चित्र दिवाणसाहेबांच्या समोर धरलं आणि विचारलं, “हे काय आहे?” दिवाण साहेब म्हणाले, “हे महाराजांचे छायाचित्र आहे”. स्वामीजी म्हणाले, “थुंका याच्यावर”. हे ऐकताच, सगळे खूप घाबरले. इतर लोकांकडे वळून स्वामीजी म्हणाले, “तुमच्यापैकी कोणीही यावर थुंका. त्यात काय एव्हढं? तो एक कागद तर आहे”. मग दिवाणसाहेबांना पुन्हा म्हणाले, “थुंका यावर. थुंका यावर”. दिवाणसाहेब न राहवून म्हणाले, “स्वामीजी हे भलतंच काय सांगताय? हे महाराजांचं चित्र आहे. तुम्ही सांगता ते आम्हाला करणं कसं काय शक्य आहे?”           

“ते तर खरच. पण यात प्रत्यक्ष महाराज नाहीत ना. त्यांचं शरीर, अस्थि, मांस, अवयव यातलं काहीही नाही या कागदात. महाराज बोलतात,फिरतात, हिंडतात. तसं काहीच हा कागद करू शकत नाही. पण तरीही तुम्ही त्यावर थुंकण्यास नकार देता. हे तुमचं बरोबर आहे. कारण ते तुमचे महाराज आहेत. त्यावर थुंकणे हा त्यांचा अपमान आहे. असे तुमच्या मनात येते”. महाराजांबद्दल आदरभावनेचा स्वामीजींनी उल्लेख केल्यामुळे उपस्थित लोक जरा मनातून शांत झाले.

मग स्वामीजी महाराजांकडे बघून म्हणाले, “हे पहा महाराज, हा कागद म्हणजे तुम्ही नाहीत. पण दुसर्‍या दृष्टीने पाहिलं तर, त्यात तुम्ही आहात. त्यावर थुंका म्हटलं तर तुमचे विश्वासू सेवक तसं करायला तयार नाहीत. कारण ही तुमची प्रतिकृती पाहिली की, त्यांना तुमची आठवण होते. त्यामुळे ते ज्या आदरभावाने तुमच्याकडे बघतात, त्याच आदरभावनेनं ते या चित्राकडे बघतात. वेगवेगळ्या देवतांच्या धातूच्या, पाषाणाच्या बनवलेल्या मूर्तींची पुजा जे लोक करतात, त्यांची पण हीच दृष्टी असते. ते लोक धातूची किंवा दगडाची पुजा करत नाहीत. ती मूर्ती बघितली की त्यांना परमेश्वराची आठवण होते आणि त्या परमेश्वराची ते पुजा करतात.

मी इतक्या ठिकाणी फिरताना बघितलं की अनेकजण मूर्तिपूजा करताना बघितलंय, पण कोणीही, हे दगडा, मी तुझी पूजा करतो. हे पाषाणा, माझ्यावर दया कर. असं म्हणत नव्हता. त्यांची पुजा किंवा प्रार्थना असते ती त्या मूर्तीच्या रुपानं असलेल्या प्रतिकाच्या मागे उभ्या असलेल्या परमेश्वराची. महाराज आपण लक्षात घ्या, की, प्रत्येक जण प्रार्थना करत असतो ती अखेर त्या विश्वचालक सर्वशक्तिमान प्रभूची. अर्थात हे सारं माझं मत झालं. तुमचं जे काही मत असेल ते तुमचं. त्याबद्दल मी काय बोलू?”

राजे मंगलसिंह अवाक झाले. त्यांनी दोन्ही हात जोडून म्हटले, मूर्तिपूजेकडे कोणत्या दृष्टीने पाहायला हवं याबद्दलचं असं स्पष्टीकरण आजवर मी कधी ऐकलं नव्हतं. आपण माझे डोळे उघडलेत. आपल्या देशावर राज्य गाजवलेलं इंग्लंड, परकीय राज्यकर्ते, त्यांची संस्कृती, त्यांचा ख्रिस्त धर्म याचा त्यावेळच्या सुशिक्षित वर्गावर काय परिणाम होत होता हे स्वामीजींनी कलकत्त्याला असताना अनुभवलं होतं. पण संस्थानिक असलेल्या व्यक्तीवर झालेला परिणाम त्यांना राजे मंगलसिंह यांच्या रूपात पाहायला मिळाला होता.अशा वेगवेगळ्या प्रसंगातून स्वामी विवेकानंदांना अनेक प्रकारची लोकं कळत जात होती. त्यांचा दृष्टिकोन समजत होता. कुठे काय परिस्थिति आहे हे समजत होते. समाज रचनेचा अभ्यास होत होता.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संग्रहालयाच्या बुरुजावरून ☆ श्री रमेश जावीर ☆

??

☆ संग्रहालयाच्या बुरुजावरून ☘️ श्री रमेश जावीर 

सन १९९३ ते १९९७ पर्यंत मी रयत शिक्षण संस्थेच्या ठक्कर बाप्पा विद्यालय, गांधी टेकडी, मारूल हवेली, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून होतो. तेव्हा माझा होलिया काव्यसंग्रह व  वाजप कथासंग्रह प्रकाशित झाला होता .आणि मला काष्ट शिल्प निर्मितीचा छंद जडला होता. मी भाग शाळा, दिवशी मध्ये कार्यरत होतो. भाग शाळा दिवशीमध्ये मला पाठवण्याचे कारण कवी संमेलन, तसेच सामाजिक चळवळीत मी वरचेवर जात असे आणि माझ्या तिथल्या उपस्थितीबाबत वर्तमानपत्रातून बातम्या येत असत. ते आमच्या तत्कालीन मुख्याध्यापकांना आवडत नव्हते. भाग शाळा दिवशी ही ढेबेवाडीच्या खोऱ्यात होती. नागमोडी घाट, सागाची उंचच्या उंच झाडे, ग्रामीण भागात जनावरे राखणारी माणसे, विहरणारे पक्षी, दऱ्याखोऱ्यातून वाड्याबस्यातून शिक्षणासाठी आलेली मुले, हे वातावरण पाहून अध्यापन करायला मजा येत असे. माझा मुख्य विषय इंग्रजी असला तरी मला चित्रकला, शिल्पकला, अक्षरलेखन, भाषण, कथाकथन,काव्यवाचन, इत्यादी कला अवगत असल्यामुळे मी विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होतो. विद्यार्थ्यांशी हितगुज साधत मी अध्यापन करीत असे. त्यामुळे शनिवारी रविवारी,आणि  सुट्टीच्या दिवशीसुद्धा विद्यार्थी माझ्यासोबत घुटमळत असत. दिवशीच्या हायस्कूलजवळ रस्त्यालगत एक सागाचे वठलेले खोड होते. मी चार-पाच विद्यार्थ्यांना सोबत घेतले आणि ते खोड हलवून उताराला ढकलून दिले. नको असलेल्या मुळ्या विद्यार्थ्यांकडून मागून घेतलेल्या कुऱ्हाडीच्या साह्याने तोडल्या .आणि थोडे संस्कारीत केले. आणि काय आश्चर्य…  त्यामध्ये उतरलेला गरुड….. बैठक म्हणजे दोन पंख बैठकीला, चार मुळ्या मान, डोके, चोच….. गरुडाचा हुबेहूब आकार मिळाला. या काष्ट- शिल्प निर्मितीसाठी दोन महिने राबत होतो.  त्याचे वजन अंदाजे 25 किलो असून काष्ट-शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना निर्माण झाला आहे.  या काष्ट- शिल्पाचे प्रदर्शन वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, देवापुर, तालुका मान, जिल्हा सातारा ,अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर ,मरवडे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, आटपाडी, जिल्हा सांगली, इत्यादी ठिकाणी झाले आहे. याचे सविस्तर वर्णन मी माझ्या ‘क्षमताधिष्ठित सप्तरंगी कला ‘ या ललित लेख संग्रहामध्ये केले आहे. या ललित लेख संग्रहाला ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक पुरस्कार‘ प्राप्त झाला आहे. ३४ वर्षे सेवा कालावधीमध्ये मला माझा द्वेष करणाऱ्या व्यक्ती भेटल्या, तशाच तितक्याच सन्मानाने वागणूक देणाऱ्यासुद्धा भेटल्या. अशा आंबट गोड आशयाचे प्रसंग सांगण्यासारखे भरपूर आहेत.

 

© श्री रमेश जावीर 

खरसुंडी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares