मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गवसले की हरवले – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ गवसले की हरवले – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

नुकत्याच निर्माण झालेल्या चौपदरी महामार्गावरून सदाशिव ड्रायव्हर शंभर, एकशे वीसच्या गतीने कार चालवत होता. बाजूच्या सिटवर बसून मी दूरवर न्याहाळीत होतो. गुळगुळीत सिमेंटचा चौपदरी महामार्ग अगदी सरळ, नजर जावी तोपर्यंत वळण नसलेला ,दोन्ही बाजूस लोखंडी मजबूत कठडे, काठावर पांढरे पेंटचे पट्टे. मध्येच उंच पूल, नजर वळवली तर गावाला बाजूला टाकून मार्ग बनविला गेल्याचे लक्षात आले. अश्या कितीतरी छोट्या गावांना बाय पास करून मार्ग बनविण्यात आला होता . सदाशिवच्या आवाजाने मी भानावर आलो.

“मस्त बनलाय सर रस्ता. काही चिंता नाही समोरून येणाऱ्या वाहनांची, फक्त चालवीत रहायचे बस, तीन तासांत गावाजवळ”.

सदाशिवकडे माझं लक्षच नव्हतं. माझं मन भूतकाळात केव्हाच गेलं होतं .मामाच्या गावाला याच मार्गाने आईसोबत जाण्याचे ते दिवस आठवले. सी.पी. सिख कंपनीच्या बसने सकाळी सातला निघायचे नि दुपारी केव्हातरी मामाच्या गावी पोहचायचे. एकेरी वाहतुकीचा डांबरी रस्ता, लहान मोठे अनेक रपटेवजा पूल, दुतर्फा हिरवीकंच झाडे, त्यात तीस चाळीसच्या गतीने धावणारी, नि प्रत्येक गावाला थांबणारी ती बस आजही डोळ्यासमोर उभी राहते.  खिडकी- -जवळ बसून बाहेरचे दृश्य पाहणे हा माझा आवडीचा छंद होता. पावसाळ्याचे दिवस असले की शेताकडे जाणाऱ्या बायांचे थवे दिसायचे. प्रत्येकीच्या हातात विळा असायचा .कडेवर मूल ,डोक्यावर शिदोरीची टोपली- जलद गतीने जाणाऱ्या बायांकडे पाहून मला कुतूहल वाटायचे.त्यांच्यामागे एखादी बैलगाडी, त्यात भरलेले शेतीपयोगी सामान, ढवळ्या पवळ्यांची  जोडी , त्यांना हाकणारा गाडीवान पाहून आम्हाला चांदोबा मासिकातील चित्रे आठवायची .मध्येच बस अचानक थांबायची नि ड्रायव्हर जोरजोराने पोंगा वाजवायचा. नकळत नजर समोर जायची. गायी म्हशींचा कळप रस्त्यावरून चाललेला दिसायचा. काही लहान वासरे आपल्या आईच्यामागे असायची. एखादी धिप्पाड म्हैस हळूहळू डौलात चालायची, जणू काही चाळीतला दादा चाळीत फिरतोय असे वाटायचे .इतक्यात गुराखी धावत यायचा. हातातील काठीने गुरांना बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा. त्याची धावपळ व तोंडातून काढलेले आवाज ऐकून खूप आनंद वाटायचा. पुढे निघालो की बसला गती घेतांना जो घुरर घुर …..आवाज यायचा त्याची नक्कल आम्ही खेळताना करायचो. 

पुढे एखादे खेडे लागायचे. बाजूला एखादा तलाव दिसायचा. तलावात असलेली कमळाची फुले मन मोहून घ्यायची. काठावर कपडे धुणाऱ्या बाया, नि बैल धुणारे, त्यांना पाणी पाजणारे शेतकरी दिसायचे. तलावात एखादी होडी दिसायची. त्यावर बसलेला कोळी आपले जाळे फेकून मासे पकडीत असायचा. क्षणभर दिसणारी ही दृश्ये. पण मनपटलावर बिंबवली जायची. दिवाळीला मामाकडे जाताना ड्रायव्हर इथे गाडी थांबवायचा .लगेच अनेक स्त्रिया बसला गराडा घालायच्या. त्यांच्या हातात शिंगाड्यानी भरलेल्या परड्या असायच्या. तेव्हा पंचवीस पैशांना वीस शिंगाडे मिळायचे. दोन चार शिंगाडे जास्त मिळावे म्हणून घासाघीस चालायची. आईने घेऊन दिलेले शिंगाडे खाताना चालत्या गाडीतून  टरफल बाहेर फेकण्याची मजा वाटायची. मार्गात रेल्वेचे क्रॉसिंग यायचे. फाटक उघडे असावे असे लोक बोलायचे. पण मला मात्र ते बंद असले की आनंद वाटायचा. काही प्रवासी उतरून लघुशंका उरकून घ्यायचे नि फाटकाजवळ जाऊन उभे राहायचे. मला मात्र आई बसमधूनच पहा म्हणायची. दुरून आगगाडीची शिटी वाजली की तिकडे बघायचे. धडधडत गाडी यायची. त्यातही कोळशाचे इंजिन असले की धडधड आवाज यायचा. गाडी प्रवासी असली की गाडीतील काही प्रवाशी हात हलवायचे. खूप आनंद वाटायचा.

—क्रमशः…

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पक्ष्यांच्या गाण्याची खरी गोष्ट… श्री शरद मगदुम ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पक्ष्यांच्या गाण्याची खरी गोष्ट… श्री शरद मगदुम ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

पक्ष्यांच्या गाण्याची खरी गोष्ट 

एका भारतीय संगीतकाराच्या, इतिहास घडवणाऱ्या या पक्षांच्या गाण्याची खरी गोष्ट नक्कीच वाचा – सोनेरी गाणं

ऋषीतुल्य ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित ‘ माचीवरला बुधा ‘ या चित्रपटाच्या वेळी ज्येष्ठ संगीतकार धनंजय धुमाळ यांना स्वतःलाही माहीत नव्हतं की या चित्रपटातलं एक संस्मरणीय, विश्वविक्रमी गीत संगीतबद्ध होण्यासाठी त्यांची वाट पहातयं. याचं कारण असं की तब्बल ४० संगीतकारांनी नाकारलेलं गाणं आता प्रत्यक्षात कधी येणारच नाही अशी हळहळ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना वाटायला लागलेली असतानाच हे गाणं धनंजयजींच्या वाट्याला आलं आणि गाण्याचं अक्षरशः सोनं झालं.

झालं असं की, या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय दत्त आणि पटकथा, संवाद लेखक प्रताप गंगावणे एकदा बोलत होते. आपल्या चित्रपटात वेगळं काय बरं करता येईल असा विचार सुरू असतानाच अचानक, या चित्रपटात केवळ पक्षांचेच आवाज वापरून एक गाणं करायचं ही कल्पना प्रतापजींना सुचली. * कोणतंही वाद्य नको, कोणताही आवाज नको, फक्त पक्षांचेच आवाज असतील * असं गाणं हवं असं ठरलं. पण हे गाणं करायला कुणीही पुढे येईना. सिनेइंडस्ट्रीतील लहानमोठे तब्बल चाळीस संगीतकार गाठले, पण कुणीही हे आव्हान पेलण्याची तयारी दाखवली नाही. कुणी म्हणे, आम्ही तोंडाने आवाज काढू. कोणी म्हणे वाद्यावर आवाज काढू. पण वाद्याशिवाय, आवाजाशिवाय, केवळ पक्षांच्याच आवाजात गाणं करायचं ही कल्पनाच पचणारी नव्हती. आणि दुसरीकडे, केवळ नैसर्गिक आवाजांनी बद्ध असलेलं गाणंच हवं असा जणू दिग्दर्शकांनी (विजयदत्तजींनी) हट्टच धरला होता. अशावेळी कसं कोण जाणे, प्रतापजींना एकदम धनंजयजींचच नाव सुचलं आणि लगोलग त्यांना निरोप धाडला गेला. मुंबईला दादरला शिवाजी पार्कजवळ भेट झाली.

पक्षी आणि निसर्गातले वेगवेगळे आवाज घेऊन गाणं बनवायचंय, तुम्ही बनवू शकाल का.. असा प्रश्न समोरून येताच, धनंजयजींनी क्षणार्धात हे आव्हान घेतलं.. धनंजयजींचा आत्मविश्वास बघून खूश होऊन तत्क्षणी दिग्दर्शकांनी आपल्या खिशातले पाच हजार रूपये काढून बक्षीस म्हणून धनंजयजींच्या हातावर ठेवले आणि कामाचा श्रीगणेशा झाला.

मग सुरू झाला धनंजयजींचा प्रवास, अगदी झपाटल्यागत.. आव्हान घ्यायचं आणि ते पेलूनच यशस्वी व्हायचं हा स्वभाव असलेल्या धनंजयजींनी दिग्दर्शक विजयदत्तजींना सोबत घेऊन दोन- तीनदा जंगलाची सैर केली. केवळ पक्षांचेच आवाज ऐकायचे, आणि निसर्गातल्या अन्य आवाजांचा सतत कानोसा घेत जायचं– पक्ष्यांच्या गुजगोष्टींना ताल लयीत मांडायचे कसे हाच विचार… त्यासाठी जंगलं जंगलं पायाखाली तुडवली. लोणावळा, अर्नाळा, त्र्यंबकेश्वर, सातारा, सगळीकडली जंगलं पालथी घालता घालताच तिथले जे जे आवाज ऐकू येतील, ते ते निसर्गातले पक्ष्यांचे आवाज ध्वनिमुद्रीत करावे अशी कल्पना सुचली, आणि आपले मोठे बंधू ध्वनीमुद्रक गोरखनाथ धुमाळ यांना घेऊन जंगलाजंगलात फिरून आवाजांचं ध्वनीमुद्रण केलं.

तब्बल १९००० कि.मी. चा प्रवास करत, सहा महिने, रात्री बेरात्री, उन्हा पावसाची पर्वा न करता, पक्ष्यांचे आवाज गोळा करता करता, सुमारे २० ते २५ जीबीचा डाटा गोळा झाला. एवढ्या प्रचंड माहितीतून नेमकी माहिती हेरायची, नेमके आवाज हेरायचे, त्यांचाच उपयोग करून गाणं बनवायचं… सोपी गोष्ट नव्हतीच मुळी, अजिबातच… पण ते हरले नाहीत.. पुढला आठवडाभर या आवाजांचाच ध्यास घेतल्यागत दिवसरात्र तेच ते आवाज ऐकत राहिले. पक्ष्यांच्या आवाजासह मनातलं संगीत शोधत राहिले.

दोन आठवडे लोटले…. 

अन् एका जादूई क्षणी बुलबुल, सुतार, खंड्या, कावळा, चिमणी, करकोचे, बदक, कोकीळ अशा तब्बल ७२ पक्षांच्या आवाजासह मनातलं गाणं प्रत्यक्षात आलं. जगाच्या पाठीवरलं पहिलं असं गाणं, ज्यात कोणतंही वाद्य नाही, कोणतेही मानवनिर्मित आवाज नाहीत, कोणाही व्यक्तीचा आवाज नाही … आहेत ते केवळ नैसर्गिक आवाज, पक्षांचे आवाज.. आणि या गाण्याचे जन्मदाते, माझ्या नाशिकचे, थोर, जेष्ठ संगीतकार – पं. धनंजयजी धुमाळ ( सर ).. .. 

(आज जगात व्हायरल झालेले हे ७२ पक्ष्यांचे गाणे ऐका. आणि आनंद घ्या निसर्ग संगीताचा…..चित्रपट “ माचीवरला बुधा “) 

– मोहिनी घारापुरे – देशमुख, पत्रकार, नागपूर

संकलन : शरद मगदूम

अबकड कल्चरल ग्रुप, सांगली मो 94226 22626

 संग्राहिका : माधुरी परांजपे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 25 – परिव्राजक –३. गाजीपूर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 25 – परिव्राजक –३. गाजीपूरडाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गाजीपूरच्या लोकांबरोबर स्वामीजींच्या खूप छान वैचारिक चर्चा होत होत्या. आपल्या समाजात दूरवर शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. आपल्या संस्कृतीतील सत्वांश जाणून घेऊन समाजाला प्रेमाने विश्वासात घेऊन सुधारकांनी सुधारणा घडवून आणली पाहिजे. ती सहज प्रक्रियेतून व्हायला हवी. लादली जाऊ नये. शिक्षणाचा पाया आणि त्यातील तत्वे हिंदू विचारधारेवर आधारित असली पाहिजेत. जे चांगलं आहे ते गौरवपूर्वक मांडलं गेलं पाहिजे. हिंदू धर्मात मानले गेलेले आदर्श नीट समजून घेऊन समाजासमोर ठेवले पाहिजेत. असं समाजसुधारकांना बजावून सांगताना स्वामीजी म्हणतात, “ध्यानात ठेवा हिंदू धर्म हे काही केवळ चुकीच्या गोष्टींचे एक गाठोडे नाही. खोलवर बुडी मारा, तुमच्या हाताला अनमोल रत्ने लागतील. परक्या लोकांची संस्कृती आणि चालीरीती, यांच्या डामडौलावर भुलून जाऊ नका. आपली ही मातृभूमी कशी आहे ते समजून घ्या. आपल्या भारतीय समाजाचा जीवनहेतु काय आहे आणि त्याच्या अस्तित्वाची प्रेरणा कशात आहे, याचा तुम्ही शोध घ्या. आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक आदर्श आपण विसरून गेलो आहोत, हे आपले खरे दारिद्र्यपण आहे. आपल्या ठायी स्वत:च्या अस्मितेचे भान उत्पन्न होईल तेंव्हाच आपले सारे प्रश्न सुटतील”.

इथेच गाजीपूरमध्ये स्वामीजींच्या विचारांना एक आकार येत चालला होता. सतत आध्यात्मिक विचार तर होतेच डोक्यात, पण देशाच्या वर्तमानस्थितीबद्दल त्यांना चिंता सतावत होती आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधताना भविष्यातला दृष्टीकोण आकार घेत होता असे दिसते.

गाजीपूरला काही इंग्रज अधिकारीही होते. त्यातील दोघांशी स्वामीजींचा संवाद होत होता. अफू विभागात रॉस म्हणून एक अधिकारी होते, त्यांना हिंदू धर्म व त्यातले देवदेवता, उत्सव, सामाजिक चालीरीती, याचे खूप कुतूहल होते. काही रूढी आणि आचार उघड उघड सदोष होते, अशा आचारांना हिंदूच्या धर्मग्रंथात काही आधार आहे का याचं त्यांना कोडं पडलं होतं. मग स्वामीजींनी प्रतिसाद देत, धार्मिक कल्पनांचा विकास, आणि सामाजिक आचारांच्या मागे उभी असणारी आध्यात्मिक बैठक त्यांनी सांगितली. हे ऐकून हिंदू धर्मातला व्यापक दृष्टीकोण रॉस यांच्या लक्षात आला.

एकदा, रॉस यांनी तिथले जिल्हा न्यायाधीश पेंनिंग्टन यांची स्वामीजींशी भेट घडवून आणली. स्वामीजींनी त्यांच्या बरोबर हिंदू धर्माचे पुनरुत्थान, आजच्या विज्ञानामुळे होऊ घातलेले परिवर्तन, योगाच्या मागचा शास्त्रीय विचार, सन्याशांचा संयम आणि मनोनिग्रह यावर आधारित जीवननिष्ठा यावर संवाद साधला. स्वामीजींचा, मुलभूत मानवी शक्ति, प्रेरणा आणि साधना याबद्दलचा वेगळा दृष्टीकोण  पेंनिंग्टन यांना खूप आवडला. त्यांना वाटलं याचं तर आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे विश्लेषण होऊ शकतं की. ते एव्हढे प्रभावित झाले की, ते म्हणाले, “हिंदूंचा धर्म आणि त्यांचा सामाजिक आचार याविषयीचे आपले विचार तुम्ही इंग्लंडला जाऊन तेथील विचारवंतांपुढे ठेवले पाहिजेत.”

“वादे वादे जायते तत्वबोध:” सतत तत्वचिंतन सुरू असल्याने स्वामीजींचे हे विचार  आतापर्यंत फक्त गुरुबंधु, आपल्या समाजाचे लोक यांच्यापुरताच मर्यादित होते. आज मात्र ते निराळ्या संस्कृतीत वाढलेल्या विचारवंतांपुढे मांडल्यामुळे त्याचे परिमाणच बदलले होते.

स्वामीजींच्या या समाधानकारक चर्चा तर चालू होत्याच, पण गाजीपूरला येण्याचा त्यांचा मूळ उद्देश होता, श्रेष्ठ आध्यात्मिक विभूति पवहारी बाबा यांची भेट घेणं. न्याय, वेदान्त, व्याकरण अशा सर्व शास्त्रांचा अभ्यास, भारतभर केलेला प्रवास, संस्कृत बरोबर इतर भाषांचे ज्ञान, सद्गुरूंकडून योगमार्गाची मिळालेली दीक्षा, त्याप्रमाणे वर्षानुवर्षे केलेली साधना आणि शेवटी शेवटी चालू असलेला निराहार अवस्थेतला एकांतवास व मौनाचा स्वीकार अशा तपश्चर्येचं तेज असणारे पवहारी बाबा. स्वामीजींची यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यानंतर ते वाराणशी करून वराहनगर मठात आले. कारणही तसच होतं,  बलराम बाबू यांचं निधन झालं होतं, त्या पाठोपाठ सुरेन्द्र नाथांचे पण निधन झाले, त्यांच्या आध्यात्मिक परिवारात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.

वराहनगर मठाची  व्यवस्था लावून, नंतर त्यांना हिमालयात जाऊन गढवाल च्या शांत परिसरात साधना करण्याची इच्छा होती. यावेळी त्यांचा भ्रमणाचा काळ जवळ जवळ सलग पावणेतीन वर्ष होता. आणि प्रदेश थेट हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंतचा, विविध प्रांत, भाषा, प्रदेश, अनेक प्रकारच्या व्यक्ती असा विविधतेने नटलेल्या भारताच्या भागात त्यांनी संचार केला. त्यांनी गाजीपूरला समाजसुधारकांना म्हटलं होतं की, ‘आपली मातृभूमी समजून घ्या’ त्याप्रमाणे ते ही याच उद्देशाने स्वदेश संचाराला निघाले होते.    

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंढरीच्या वारी निमित्ताने… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

??

☆ पंढरीच्या वारी निमित्ताने… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

काय असेल विठोबाकडे ? इतकी का धाव या माऊलीच्या भेटीसाठी ? पाडुरंग भेटल्यावर समाधानी का होतात हे भक्त ? ही भक्ती  खरी असते का ?

वारीला जाता न येणाऱ्यांना खूप खंत का वाटते ? असे अनेक प्रश्न लहानपणी पडायचे.. आई म्हणायची 

सखू निघाली पंढरपूरा

येशीपासूनी आली घरा !

घरदार सोडून, अनंत व्याप सोडून लोक वारीला चालत जातात. सर्व सुखं दुःखं बाजूला सारुन एकमेकांना “माऊली” म्हणत अनेक स्त्री-पुरुष भक्तीमय वातावरणात विलिन होतात. तल्लीन होतात.

” पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज की जय ! “

हा जयघोष अखंड चालू असतो. पण या जयघोषात रुक्मिणी, जनाबाई, सोयराबाई, कुठेच नाहीत याची खंत मात्र माझ्यासारख्यांना वाटल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा भाग वेगळा असला तरी विचार करायला लावणारा आहे हे मात्र नक्की.

माझे आई वडील दोघेही विठोबाचे निस्सिम भक्त होते. आई दुसरा कोणताच देव मानत नव्हती. सर्व देवांचा देव म्हणजे विठोबा अशी तिची धारणा होती. वडिलांना संकष्टी सुद्धा करू द्यायची नाही. फक्त एकादशी करायची. घरातले सगळेच एकादशी करायचे. आम्हा लहानांना ते ऐच्छिक होतं, पण आम्हीही वेगवेगळ्या पदार्थांच्या आशेने एकादशी करायचो. आठवड्यातून दोन वेळा भजनी मंडळासोबत घरी भजन असायचे.. एकनाथ षष्ठी, रामनवमी, गोकूळ अष्टमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज हे सगळे दिवस अहोरात्र चोवीस तास भजन करुन साजरे केले जायचे. आईने सही करण्यापुरतीच अक्षरे गिरवलेली होती. पण सगळे अभंग तोंडपाठ. तिचं बालपण कर्नाटकात गेलेलं. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी लग्न होऊन महाराष्ट्रात जत येथे आली. केवळ कन्नड बोलता येणारी आई आमच्या मराठी शाळेतील शिक्षणामुळे आमच्याशी हळू हळू मराठी बोलायला शिकली. रेडिओवर लागणारे अभंग लक्षात ठेवून, आठवून, आठवून अभंग म्हणू लागली. भजनी मंडळात बऱ्याच वेळा ही एकटीच बाईमाणूस असायची. माझा विठोबा सगळं व्यवस्थित करेल हा तिचा विश्वास होता. वडील नोकरीनिमित्त बाहेर गावी असायचे आणि आई अभंगात रमून जायची.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ।

तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ।।

तुकोबांच्या अभंगात  ” आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे ” होऊन जगायची…

तुकोबांच्या अभंगांनी तिला नवे विचार मिळाले. तिने कधी वड पुजलेला अथवा कधी कर्मकांड केलेले आम्हाला दिसले नाहीत. जनाबाईला दळण दळायला विठोबाने मदत केली. तशी आपली दुःखं कमी करायला आणि ती सहन करायला तोच आपल्याला बळ देईल असे तिला वाटायचे..

सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी 

देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी –

हे तिचं आवडतं गाणं. मी अभ्यासात रमायचे, ती अभंगात रमायची. विपश्यना, विज्ञान, मानसशास्त्र तिला माहित नव्हतं, पण जगणं माहित होतं. सगळी सुखंदुःखं तुळशीच्या हाराच्या रुपाने पांडूरंगाच्या गळ्यात घालून ती किती सहज जगत होती. याचं मला राहून राहून आज आश्चर्य वाटतं. स्वतःच्या कर्तव्यात तिने कधी कसूर केली नाही. पहिली  संसाराची वारी मग विठोबाची वारी. गरजेनुसार शेतातली कामंसुद्धा ती न कंटाळता आनंदाने करायची. ” कांदा, मुळा,भाजी अवघी विठाई माझी.” म्हणत काम चालू असायचं. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची तेव्हा हे गाणं ती नेहमी गुणगुणायची–

कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो ।

हलाहला ते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो ।।

बहिणाबाईची कविता – “ अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर “ –आईला माहीत होती. रेडिओवर ऐकलेलं सगळं तिच्या लक्षात असायचं. माझ्यावर आध्यात्मिक संस्कार तिच्यामुळेच झाले.. तिच्या विठोबावरील भक्तीतला भाव आज मला कळतो. सगळं विठोबावर सोपवून ती किती आनंदी असायची आणि मी रोज नवे प्रश्न निर्माण करुन उत्तर शोधत राहते. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली तर विठोबा आपल्यालाही नक्की मदतीला येईल.

एकविसावे शतक हे मानसिक आजाराचे असेल असे काही तज्ञ लोक म्हणायचे. मला तेव्हा खरे वाटत नसे. असे होणे शक्य नाही असे वाटायचे. पण हे सत्य आहे. प्रत्येक चार माणसांमागे एका माणसाला मानसिक आजाराची लक्षणे दिसून येतात. यात स्त्रियांची संख्या अधिक आहे. मी refer करत असलेल्या psychiatrist ची opd , hospitals तुडुंब भरलेली दिसतात. आपल्याकडे मानसरोगतज्ञ संख्येने तसे खूप कमी आहेत. माणसात देव अनुभवणारी, समुपदेशन आणि रुग्णसेवेत रमणारी मी. तुम्हा सर्वांना माऊलीच्या रुपात पाहते. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे… आज माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांच्या  अडचणी समजून घेणं गरजेचं  आहे. त्यांना बोलतं करणं, त्यांचा आवाज होणं, त्यांना व्यक्त होऊ देणं, त्यांच्या मनातील भाव-भावना केवळ शांतपणे ऐकून घेण्याची गरज आहे. ज्याची त्याची लढाई, जो तो लढतोच आहे. केवळ आपण सोबत आहोत, सगळं व्यवस्थित होईल, एवढंच सांगण्याची गरज आहे…!

तू नाहीस हे माहित आहे तरीही—– भेटी लागी जीवा | लागलीसे आस || 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ ॥ मार्गदर्शक चिंतन॥ -॥ कर्मण्येवाधिकारस्ते’ ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

मार्गदर्शक चिंतन

☆ ॥ कर्मण्येवाधिकारस्ते’ ॥ – प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’☆

अर्थ है ”केवल कर्म पर ही तेरा अधिकार है यह मुहावरा विश्व प्रसिद्ध ग्रन्थ’‘ भगवत्ï-गीता के सुप्रसिद्ध श्लोक का एक चतुर्थांश है। भगवान श्री कृष्ण ने गीता में अर्जुन को समझाने के बहाने विश्व के मानव मात्र को कर्म करने का जो  अमर संदेश दिया है, वह अनुपम लोक कल्याणकारी सिद्धान्त है। इसमें कर्म की महत्ता प्रतिपादित की गई है क्योंकि कर्म के बिना न तो नव सृजन संभव है और न सृष्टि का संचालन। कर्म न केवल जीवन की आवश्यकताओं की पूर्ति के लिए ही आवश्यक है वरन्ï दैनिक जीवन में नवसृजन, प्रसन्नता तथा आनन्द की प्राप्ति और प्रगति व विकास के लिए भी अनिवार्य है। बिना कार्य के कोई उत्पादन संभव नहीं। खेत, हल और बीज के होते हुए भी यदि कि सान श्रम पूर्वक कर्म न करे तो फसल का उत्पादन असंभव हैं। ईंट, सीमेंट, रेत आदि के होते हुए भी यदि मजदूर परिश्रम न करे तो भवन नहीं बन सकता। इसी तरह केवल इच्छा करने मात्र से कोई उपलब्धि नहीं पा सकता। हर छोटी-बड़ी इच्छा को पूरी करने के लिए प्रकृति प्रदत्त समस्त साधनों के होते हुए भी बिना कर्म किए अर्थात्ï सोच-विचार श्रम किए बिना कुछ पाया नहीं जा सकता। कर्म के द्वारा इच्छानुसार अर्जन के लिए ही ईश्वर ने प्राणियों को कर्मेन्द्रियाँ दी हैं। कर्म के द्वारा कुछ भी असंभव नहीं है। आज की बड़ी-बड़ी वैज्ञानिक उपलब्धियाँ  मनुष्य के कठिन श्रम से किए गए कर्म के परिणाम हैं। कर्म की सृजनशीलता के आधार पर ही मनुष्य ने आज अन्तरिक्ष में उड़ान भरी है और कर्म के विश्वास पर ही कल और भी नये-नये चमत्कारों की प्राप्ति के लिये प्रयासरत है। कर्म की महानता को ही प्रतिपादित करते हुए तुलसीदास जी ने मानस में कहा है-

‘कर्म प्रधान विश्व करि राखा’-‘जो जस करिय सो तस फल चाखा॥’

इस संसार में कर्म की प्रमुखता है जो जैसा करता है वैसा ही परिणाम पाता है कर्मठता के विपरीत अकर्मण्यता को अपनाने वाले आलसी, सदा निराश और और उदास बने रहते हैं। केवल कामनाओं के स्वप्न देखते रहते हैं पर पाते कुछ नहीं। ‘दैव दैव आलसी पुकारा’ केवल भाग्य पर पूर्ण भरोसा करना उचित नहीं है। भाग्य भी उसी का साथ देता है जो कर्म करने को उद्यत होते हैं तथा कुछ पाने के लिए महत्वाकांक्षाएँ सँजोते हैं तथा श्रम करते हैं। लोक मान्य तिलक ने भी अपने ग्रंथ ‘गीता-रहस्य’ या ‘कर्म योग शास्त्र’ में कर्म और कत्र्तव्य के लिए मनुष्य को उन्मुख होने की सलाह दी है और गीता की वृहत व्याख्या में जीवन के युद्ध क्षेत्र में एक कर्मठ योद्धा की भाँति डटकर हर समस्या का सामना करने को कहा है। यही पुरुषार्थ है। संत बावरा जी महाराज ने भी कहा गीता की व्याख्या करते हुए कर्म और कर्मठता की पुरजोर वकालत की है। उन्होंने ईश्वर की उपासना और अपने कर्माे व कत्र्तव्यों की पूर्ति में लगे रहकर पूरी करने को श्रेष्ठ माना है। संसार के कर्मक्षेत्र से भागकर सन्यास लेने को श्रेयस्कर नहीं माना है।

यह तो सहज सभी के अनुभव की बात है कि कुछ न करने से बेहतर हमेशा कुछ कर्म करना ही हितकारी है क्योंकि कर्म से ही इच्छा की पूर्ति होती है। शायद इसी आशय को व्यक्त करती है यह सहज सी लोकोक्ति-”बैठे से बेगार भली।’‘ सक्रियता ही जीवन है। हाँ गीता का यह कथन और भी सार गर्भित है कि कर्म तो निरन्तर करते रहना चाहिए पर उसके फल के प्रति आशान्वित न रखकर हर कार्य करना चाहिए। व्यक्ति के हाथ में कर्म करने का अधिकार तो पूरा है और अच्छे कर्म का परिणाम भी अच्छा होता है किन्तु फिर भी फल ईश्वर के हाथ में है। इस भावना से मन लगाकर काम करने से मन में कभी निराशा नहीं होती और निरपेक्ष कत्र्तव्य बोध से, विपरीत परिणाम होने पर भी ईश्वरेच्छा का भाव होने के कारण किसी हितकारी विकास के लाभ की आशा न तो टूटती है और न हार का अनुभव ही होता है।

गीता के जिस परम उपदेश ने हताश और विषप्ण अर्जुन को युद्ध क्षेत्र कुरुक्षेत्र में अपने कत्र्तव्य की पूर्ति के लिए प्राणपण से जूझने को तैयार कर दिया वह हम सभी को कत्र्तव्य परायणता और कर्म के प्रति गहननिष्ठा की प्रेरणा देता है तथा यह शिक्षा नव जीवनदृष्टि देती हुई न तो कभी जीवनरण में हिम्मत हारने की और न ही कभी कर्म से विरत होने की, मूल्यवान सीख देती है। संकट के समय में भी मन को ताजगी और उत्साह से लबरेज रख कत्र्तव्य में जुटाये रखने वाली गीता यही कहती है कि-

आदमी है खुद अपना मित्र, स्वयं करना होता उद्धार,

समय को देता जो सम्मान, साथ देता उसका संसार।

बढ़ाचल, कभी न हिम्मत हार, कभी मत छोड़ कर्म का प्यार,

कर्म है जीवन का आनन्द, यही है जीवन का आधार॥

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

 ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, म.प्र. भारत पिन ४६२०२३ मो ७०००३७५७९८ [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे माहेर… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ माझे माहेर… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘पहिल्याच सरीचा ओला सुवास आला

माहेरच्या दिसांचा, क्षण एक भास झाला…’

होय,आषाढाचे सावळे गच्च मेघ आकाशात दाटी करतात,भिरभिर गार गार वारा चहूबाजूस भिरभिरू लागतो आणि मग मन आपोआपच पंढरीकडे धावू लागते. 

माझे माहेर पंढरी ।  आहे भीवरेच्या तिरी ।।

आषाढ लागताच माहेरची ओढ लागून रहाते.डोळ्यांपुढं पंढरीची वाट दिसू लागते . तन मनात टाळ मृदंग दुमदुमत रहातो अन सुरू होते माहेरी जाण्याची लगबग ! 

सामान ..सुमान ..आवराआवरी ..अहं ! माहेराला जाताना मुळी चिंता कसली? तिथं काळजी घ्यायला आहेत ना मायेची माणसे !आपण फक्त तिथवर जायचं बस्स ! संसारातल्या चिंता,कटकटी ,ताण तणावापासून मुक्त होऊन पुन्हा नव्यानं आव्हान स्वीकारायला सज्ज व्हायला माहेरात थोडे दिवस जावेच नै का ?

मोह मायेपासून थोडे दिवस का होईना अलिप्त व्हावं–संसाराच्या चिंता त्या जगंनीयंत्या विठू माऊलीच्या पायी वहायला…तो घेईल ना आपली काळजी, मग कशाला व्यर्थ चिंता ?आपण फक्त निश्चिन्त मनाने सगळं जिथल्या तिथं टाकून माहेराची वाट चालू लागायची. त्याला डोळे भरून पहाण्यासाठी, त्याला हृदयात जपण्यासाठी,अवघा देह त्याच्या त्या सावळ्या रुपात एकवटण्यासाठी !

एक पोत्याची खोळ , डोईवर तुळस ,चारदोन मोजके आवश्यक कपडे न टाळ– बस्स ! पंढरीचा प्रवास सुरु होतो –वाऱ्याच्या चिपळ्या दुतर्फा पिकांतून ,झाडाच्या पानातून वाजत रहातात—‘ जय जय रामकृष्ण हरी…’ त्यांना सुद्धा वर्षोनवर्षीच्या या जयघोषाची जणू सवय जडलीय.वारकरी चालू लागले की मग झाडांना ,पशु पक्ष्यान्नासुद्धा  त्या तालातच डुलावं ,झुलावं आणि गावं वाटू लागतं .भुरभुर पावसात आनंदाने चिंब होऊन ती सुद्धा विठुरायाशी एकरूप होतात. तहान भूक हरपून पावलं फक्त चालत रहातात ..नामघोष अंतर्मनी निनादत…तू कोण ? मी कोण? कुठला  ? नाव ? गाव ?– स्व विसरून त्या पंढरीच्या वाटेवरील गर्दीतला एक ठिपका ! पाय दुखतात,सुजतात पण पर्वा कसली? चालत रहायचं फक्त. क्षण एक विसावा घ्यावा, एकमेकांचा हालहवाल पुसावा अन झपझप आनंदाने चालू लागावं पाऊस वाऱ्याला झेलत.

माऊली ..माऊली ..येते ग्यानबा तुक्याची पालखी ..अन तल्लीन होतात सारीच गात्रे .. नुरते भान देहाचे मग काही … ओथंबते चिंब चिंब मन भक्ती रसात . मग पावलं चालत नाहीत तर मन चालत रहातं, पीस होऊन तरंगत रहातं  आभाळभर.

टाळांचा आवाज गगनाला भिडतो ,मृदंग खोल खोल काळजाला भिडतो, आणि माहेर  जवळ आल्याची ग्वाही देतो.

अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर..।।

पंढरपुरात घरंगळत घरंगळत कधी दाखल होतो कळतच नाही. चंद्रभागेच्या त्या वाळवंटात जिथं तिथं विठू हसतहसत बाहू पसरून आलिंगन देत रहातो सगळ्यांना आणि क्षेम विचारत रहातो, “ फार त्रास नाही नाझाला येताना ? सर्वजण आलात ना व्यवस्थित ? पाठीमागे नाही ना उरले कोणी? “

गार गार वाऱ्यात रात्री  विठूच्या मायेची सावळी उबदार घोंगडी अलगद सगळ्या लेकरांना कुशीत घेते. शांत शांत सुखाची झोप प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईच्या कुशीत..कशाला हवी मऊ मऊ पिसाची गादी ,उशी अन उबदार दुलई ? आभाळाच्या मंडपाखाली सर्व भेदाभेद मिटून जातात. गरीब-श्रीमंत,उच्च -नीच ,लहान- मोठा…सगळे एकजात एकसारखे !

काकड आरती ,भजन कीर्तन ,नामसंकीर्तन– पावलं मन देह थिरकू लागतो तालासुरात …आनंदाचा पूर ओसंडून वहात रहातो मनामनातून पंढरपुरात. अबीर बुक्का,ओल्या तुळशीमाळेचा  सुगंध आसमंतात दरवळू लागतो. अवघा देह पंढरपूर होतो.

सावळे सुंदर …रूप मनोहर

राहो निरंतर हृदयी माझे….. 

झुंबड उडते दर्शनाला ….निमिषार्ध एक चरणावर डोकं ठेवून मागणं  मागायला ..पण काय बरं मागायच होतं ?

मागणे न काही सांगण्यास आलो

आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो

आत्तापर्यंत इतकी पायपीट केली ती काही मागण्यासाठी ?छे ! फक्त त्याचं रूप डोळे भरून साठवायला ..आणि तो क्षण येतो ..निमिषार्धात आपलं डोकं चरणांवर विसावतं  अन फक्त ‘ सुखी ठेव सगळ्यांना ‘ अशी विश्वकल्याण आणि विश्वसुखाची याचना होते, कारण मीपण मागेच कुठेतरी गळून पडते. नेत्री अश्रुधारा वाहू लागतात. सोडावे वाटत नाहीत ते चरण ..तरी सोडावे लागतात. गर्दीत पुन्हा कुणीतरी मागे खेचते अन पुन्हा एक जडभार ठिपका घरंगळत घरंगळत जातो वैष्णवांच्या गर्दीत.अणू रेणूत विठ्ठल साठवून.

कुंकू ,अबीर ,प्रसाद, लाखेच्या बांगड्या …आठवत रहातात माहेराला येताना पाय धरलेल्यांच्या मागण्या आणि सुरू होतो परतीचा प्रवास…नको वाटत असतो  तो प्रपंचाचा भार ,पण जावेच लागते माघारी, निदान उपकारापुरता तरी तो पेलण्यासाठी ..जड जड पावलांनी आणि अंतःकरणाने …काहीतरी विसरलेय, चुकलंय ही अनामिक हुरहूर मनात घेऊन …… 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे 

भिंतीवर कॅलेंडर लावले जाते, हे ठीक. पण कॅलेंडरच्याच भिंती पण तयार होतात. कुठे ??????

अहो, रसवंती गृहात!

नवनाथ, गणपती, शंकरपार्वती,  दत्तगुरू, साईबाबा, रामलक्ष्मणसीता, ज्योतिबा,  तुळजाभवानी,  अंबाबाई, तिरूपती यांच्या कॅलेंडरनीच बनलेल्या असतात त्या भिंती! हे सगळे जणू उसाचा रस प्यायला आलेले असतात, त्याचबरोबर राजेश खन्ना पासून रणवीर पर्यंत,  वैजयंती मालापासून आलिया भट पर्यंत  सर्व नटनट्या नटूनथटून हजर असतात. अशा रंगीबेरंगी भिंती,  चिमुकली टेबले आणि बाक, चरकाच्या घुंगरांचा खुळखुळ आवाज आणि आलेलिंबू घालून केलेला तो गोड गार उसाचा रस…अहाहा! त्या छोट्याश्या जागेत केवढा परमानंद असतो, ते तिथे बसून रस प्याल्याशिवाय कळणार नाही. अजूनपर्यंत अशा भिंती शिवाय असलेलं  एकही रसवंतीगृह मी बघितलं नाही.

माझ्या बाबांचे एक मित्र पोलीस होते.त्यांना भेटायला बाबा पोलीस चौकीत गेले होते, मी पण बरोबर होते. तिथे भिंतीवरचे ते गुन्हेगारांचे फोटो बघून मी इतकी घाबरले होते की त्या दिवशी जेवलेच नाही. पुढे कित्येक दिवस त्या भिंतींच्या आठवणींचा धसका मनात होता.

कारागृहाच्या भिंती हे अतिशय दारूण सत्य गुन्हेगारांना स्वीकारावंच लागतं. काळ्याभोर दगडांच्या उंच उंच भिंतींच्या आत काय आहे, हे बाहेरून कधीच कळत नाही. जगापासून दूर ठेवणा-या भिंतीही गुन्हेगारांना काही शिकवत असतील का?

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय बदलले आहे ? ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ काय बदलले आहे ? ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते की, “ जग बदलत आहे “. पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात…!!!

आजपर्यंत मिरचीने तिखटपणा नाही सोडला.., तर आंब्याने गोडपणा नाही सोडला…!!!

वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला…., तर वृक्षांनी सावली देणे नाही सोडले…!!!

सूर्याने तळपणे नाही सोडले.., तर चंद्राने शीतलता नाही सोडली…!!!

फुलाने सुगंध नाही सोडला..,  तर वा-याने वाहणे नाही सोडले…!!!

नदीने आपला मार्ग नाही बदलला.., तर सागराने आपली मर्यादा नाही सोडली…!!!

पक्षांनी विहार करणे नाही सोडले.., निसर्गाने कोमलता नाही सोडली.., ईश्वराने दयाळूपणा नाही सोडला…!!!

मग नेमके बदलले आहे ते काय ?—–

 बदलला आहे तो फक्त माणूस.., माणसाने माणूसकी सोडली…!!!

सृष्टी त्रेतायुगात अशीच होती. सत्ययुगात पण अशीच होती. द्वापार युगातही अशीच होती. आणि आता कलियुगातही तशीच आहे…!!!

बदलला आहे फक्त केवळ माणूस आणि त्याचे विचार. पण तो मात्र साऱ्या जगाला दोष देत असतो…!!!

 माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा…!!!

आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की, आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ शकत नाही…!!!

 तसेच जग बदललेय म्हणून जगरहाटीला दोष देऊ नका, समाधानी रहा सर्वांचे आभार माना…!!!

आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!                              

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे 

घरांप्रमाणे आता कार्यालयातही भिंतीना असेच महत्त्वाचे स्थान आहे. नवीन पद्धतीप्रमाणे Corporate offices मध्ये कमी उंचीच्या फायबर ग्लासच्या पार्टिशन्स करतात,  हेतु हा की प्रत्येक कर्मचा-याची काम करताना एकाग्रता साधणे, अलगपणा जपणे, त्याचबरोबर सहका-यांना मदतही करणे. या छोट्या उंचीच्या  भिंतींचे विचार किती उच्च आहेत नाही?

चीनची भिंत पूर्वी पासून प्रसिद्ध. गेल्या शतकापासून या भिंतीला फक्त लांबीचे महत्त्व उरले आहे. कारण जगाने चीनकडे किंवा चीनने जगाकडे ही भिंत ओलांडून संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याची उपयुक्तता आणि परिणाम किंवा सौहार्द की विनाश,  हा विषय वेगळा!

पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी मधली भिंत पडली. पण ती पडल्यानंतर खरंच पूर्व-पश्चिम जर्मनी तले अंतर कमी झाले व संबंध चांगले झाले.

शाळेच्या भिंतींची प्रत्येक वीट,  प्रत्येक चिरा वंदनीय असतात. भिंतीवरचे बाराखडीचे, अक्षरांचे, शब्दांचे, अंकांचे, पाढ्यांचे तक्ते,  सुविचारांनी रंगलेल्या भिंती कोणीच विसरणार नाही.  वर्गात आता भिंतीवर फळ्याबरोबर digital screens ही असतात. मातीच्या गोळ्याला सुबक आकार देऊन छोटुल्याला मोठा करणा-या शाळेच्या भिंतीं…..

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी पाहिलेला सुखी माणूस…व त्याचा ७०% चा मंत्र ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

??

☆ मी पाहिलेला सुखी माणूस व त्याचा ७०% चा मंत्र ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

१) दोन वर्षापूर्वीची एक घटना : मी एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी लीगल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होतो. ती एक अमेरिकन कंपनी होती, व त्या कंपनीचा Chief Technology Officer (CTO) हा जर्मन माणूस होता. तो भारतातील काही बँकांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेवा पुरवायचा. तो जर्मनीमध्ये जन्मलेला, त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण जर्मनीमध्ये झाले. त्यानंतर त्याने पार्टटाईम नोकरी करून त्याचे इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण केले. नंतर तो त्या सॉफ्टवेअर कंपनीत CTO म्हणून काम करू लागला. त्याच्यासोबत बऱ्याच वेळा संपर्क होत असल्याने बऱ्यापैकी ओळख झालेली. त्याचे घर ७०० ते ८०० स्क्वेअरफूट इतके लहान आहे. परंतु त्याचे वार्षिक वेतन तीन लाख डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे तब्बल २ कोटी रुपये होतात. त्याची पत्नी पेशाने डॉक्टर आहे. तरी सुध्दा त्याचे घर लहान आहे, म्हणजे अमेरिकेत अशी घरे सर्वात लहान समजली जातात. तो साधी कार व आयफोनचे साधे मॉडेल वापरतो. मोजकेच कपडे, एक छोटीशी डायरी, मोजकेच ८-१० मित्र.. कमीत कमी तणावात काम करणारा व कामानिमित्त जगभर फिरणारा असा हा माणूस– त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याने ७०% चा एक मंत्र सांगितला. 

२) महाग फोन : आपल्या देशात बरेच जण स्टाईल व दिखावा करण्यासाठी महागडा आयफोन वापरतात. सध्याचे आयफोनचे नवीन मॉडेल हे एक लाखापर्यंत मिळते. परंतु त्यातले ७०% फंक्शन आपल्यासाठी निरुपयोगी असतात. आपल्याकडे कॉल्सव्यतिरिक्त फोनचा वापर सोशलमीडिया, गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठीच केला जातो. ही कामे १० हजाराच्या स्वस्त फोनमध्ये सुध्दा केली जाऊ शकतात, म्हणजे महागड्या फोनमध्ये ७०% फंक्शन व aps निरुपयोगी असतात.

३) महागडे घर : आजकाल मोठमोठे बंगले बांधले जातात किंवा उच्चभ्रू वसाहतीत थ्री-बीएचके, फोर-बीएचके फ्लॅट किंवा ड्युप्लेक्स खरेदी करण्याचे बऱ्याच जणांना फॅड असते, परंतु या मोठमोठ्या घराचा केवळ ३०% उपयोग आपण करतो. जे अशी घरे कर्ज काढून घेतात, ते आपला ७०% वेळ घराबाहेर घालवत असतात. त्यांना घराचे हप्ते भरण्यासाठी अधिक काम करावे लागते.

४) महागडी कार : हल्ली बरेच लोक कार खरेदी करतात. मध्यमवर्गीयांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. कार घेतली तर महागडीच व नामवंत ब्रॅंडची घेतात. परंतु त्याचा वापर हा केवळ ३०% च होत असतो. मुंबईतले लोक कार तर घेतात. परंतू सुरूवातीचे काही दिवस वगळता नंतर लोकल ट्रेननेच जातात. कुटुंबियांसोबत बाहेर प्रवास क्वचितच होतो. तेव्हा महागडी कार घेऊनही ती जवळ जवळ ७०% उपयोगात आणली जात नाही. तिचा वापर हा सरासरी ३०% च केला जातो.

५) महागडे कपडे : उच्च, आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून लोक ब्रॅंडेड रेडीमेड कपडे वापरू लागले आहेत. कपाट अशा ब्रॅंडेड व विविध प्रकारच्या महागड्या कपड्यांनी भरलेले असते. परंतू हे कपडे खूप कमी, म्हणजे  फक्त ठराविक वेळीच वापरले जातात, एरवी कपाटातच पडून राहतात.  म्हणजे हे कपडे ७०% निरुपयोगी असतात. लग्नातला सूट ९९% जण परत वापरतच नाहीत. 

६) मित्र/नातेवाईक : प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्र व नातेवाईक असतात. ते आपल्या आनंदाच्या क्षणी, कार्यक्रमांना आपल्यासोबत सहभागी होतात. परंतु यातले ७०% नातेवाईक निरुपयोगी असतात , कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा आर्थिक संकटात असता तेव्हा त्यापैकी ७०% लोक हे आपल्यापासून दूर होतात, किंवा गरजेच्या वेळी मदत नाही करत. गर्दीपेक्षा दर्दी लोकांत रहा.

७) कमाविलेला पैसा : आपण मिळवलेल्या पैशांचेही तसेच असते, ज्या व्यक्तीजवळ प्रचंड संपत्ती असते, तो त्यातल्या केवळ ३०% संपत्तीचाच उपयोग करत असतो. त्यापैकी ७०% संपत्ती अशीच पडून असते. त्यामुळे सतत डोक्यावर ओझे तयार होते व अतिप्रमाणात संपत्ती असूनही लोक सुखी नसतात. कुणासाठी व कशासाठी काम करतो व कमवितो हेच कळत नाही. पोरांसाठी कितीही कमवून ठेवा, तुम्ही मेल्यावर ते विकूनच  खाणार. काही मूर्ख रिटायर झाल्यावर बंगला बांधतात व दोन-तीन वर्षानी मरून जातात. शेवटी त्या बंगल्यात त्याचा हार घातलेला फोटो असतो. फोटो अडकवायला बंगला बांधता का? 

८) भांडी व साड्या : आपल्या घरात अनेक विविध प्रकारची भांडी असतात. परंतु त्यापैकी ७०% भांडी ही विनावापरामुळे धूळ खात पडलेली असतात व दैनंदिन वापरासाठी ठरलेलीच ३०% भांडी आपण वापरतो. तसेच बायकांजवळ असलेल्या महागड्या साड्या त्या रोज नेसत नसतात. बऱ्याच ठिकाणी आधुनिक लाईफस्टाईल म्हणून कितीतरी बायका साड्या नेसत नाहीत. इतर कपडे वापरतात. आणि फक्त ठराविक कार्यक्रम समारंभात साड्या नेसतात . त्यामुळे त्यांचाही ७०% वापर होतच नाही.

आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपण कळत नकळत ७०% पैसा, वेळ, संसाधने, वस्तु वाया घालवत असतो. प्रत्येकाला खूप पैसा कमावण्याचे, महागड्या वस्तु खरेदी करण्याचे वेड असते. परंतु पाश्चात्य देशातील लोक आवश्यक तेवढ्याच गोष्टी बाळगतात आणि ते त्यांच्या बुध्दीमत्ता विकास, अनुभव व जीवनातील खरा आनंद मिळविण्यावर अधिक भर देतात. यामुळे त्यांचे मन हे संतुलित असते व फारशा अवास्तव अपेक्षा नसल्याने ते नेहमी समाधानी असतात. त्यांच्याकडे अनावश्यक गोष्टींचे ओझे नसते. 

Do not collect assets… Collect happiness,  & achievement, experience  & enjoyment in life… Earn honour… Earn respect… Earn Name. 

CTO च्या वेतनाच्या तुलनेत त्याचा खर्च फक्त २०% होता.  त्यामुळे तो ९९% तणावरहित काम करू शकत होता व खूप आनंदी होता. 

त्याने एकच अत्यंत महत्वाचा संदेश दिला,  ” Do not buy, hold, own anything which you can’t use, consume, monitor. Do not carry any unnecessary weight or burdens on your head, mind and brain.”

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares