मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दत्त म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दत्त म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

🙏🏻 दत्त म्हणजे 

अद्वैत, अतर्क्य, अद्भूत, अनाकलनीय, अनादी, अथर्व, अनंत, अंतर्यामी, अवधूत, अर्चना आनंतयोगी

 

🙏🏻 दत्त म्हणजे

आई, आदर, आदेश, आशिर्वाद, आत्मा, आशा, आदित्य, आदिनाथ, आनंद, अल्लख

 

🙏🏻 दत्त म्हणजे

इशत्व, इप्सित, ऊर्जा, उपासना, उन्नती, उत्पत्ती, ऐश्वर्य, ऐक्य, एकाधिकार

 

🙏🏻 दत्त म्हणजे 

ओमकार, औदुंबर, औक्षण, अंतरात्मा, अंतर्मन, अंतरंग, अथर्ववेद,  आठरापुरण

 

🙏🏻 दत्त म्हणजे

ऋणमोचन, ऋगवेद, कर्म, कर्ता, किर्ती, करूणा, कृष्ण, खरेपणा

 

🙏🏻 दत्त म्हणजे

गणेश, गती, गर्भ, गायत्री, गार्गी, चमत्कार, चारित्र्य, चातुर्य, चित्त, जन्म, जरा, जप, तप

 

🙏🏻 दत्त म्हणजे

दया, दिशा, दिप, दान, दशा, दिगंबर, दास, धडाडी, धाडस, धर्म, नम्रता, निती, नाती, नियम

 

🙏🏻 दत्त म्हणजे

प्रेम, प्रीती, प्रचिती, पापक्षालन, प्रभा, प्रतिभा, फळ, बळ, भाव, नाव, माया, ममता, माता, मर्म

 

🙏🏻 दत्त म्हणजे

राम, रूप, रंग, लक्ष्य, लक्ष्मी, लाभ, वज्र, व्रत, वर्तन, वर्म, विष्णू, शरणागती, शंकर, शितल, शुभ, षडरस

 

🙏🏻 दत्त म्हणजे

समर्पण, समाधान, साधना, सेवा, सेवक, सर्वस्व, स्मर्तृगामी, सामर्थ्य, समर्थ, सुहास, सविता, स्वामी, संस्कार

 

🙏🏻 दत्त म्हणजे

क्षमा, क्षेम, क्षण, ज्ञान, ज्ञानेश्वर, त्राता, त्राण, प्राण

 

🙏🏻 दत्त म्हणजे

श्रम, श्रद्धा, कर्म आणि धर्म आहे.

 

संग्राहक : श्री अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुरूपौर्णिमा…… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गुरूपौर्णिमा… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

धर्मपुराणानुसार आषाढ पौर्णिमे दिवशी व्यासांचा जन्म झाला .महर्षी व्यासांनी वेदांचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवन संपन्न केले आहे .या अमौलिक कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्यासांचे पूजन केले जाते. हा दिवस ” व्यास पौर्णिमा “म्हणून ओळखला जातो. हाच दिवस”गुरुपौर्णिमा “म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान पूज्य मानले जाते. 

आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरु -शिष्य परंपरा चालत आली आहे .भारतीय गुरुपरंपरेत जनक -याज्ञवल्क्य, कृष्ण, सुदामा – सांदिपनी, कर्ण -परशुराम अर्जुन -द्रोणाचार्य स्वामी विवेकानंद -रामकृष्ण परमहंस, ज्ञानेश्वर -निवृत्तीनाथ ,चांगदेव- मुक्ताबाई यां नावांचा समावेश करता येइल.

आपला पहिला गुरु आई .ती आपल्याला बोलायला चालायला शिकवते, त्याचप्रमाणे वडील आपल्याला व्यवहार ज्ञान शिकवतात. वय वर्षे ५ते १६ हा काळ आपल्या आयुष्यात महत्त्वाचा असतो . या वयात संस्काराची गरज असते. हे अमूल्य संस्कार घरी आई वडील देतात तर शाळेत व्यक्ती सापेक्ष-मनुष्य सापेक्ष जीवन विचारसरणी शिकवली जाते.

” गुरु विना ज्ञान नाही, ज्ञाना विना शांती नाही आणि शांती विना आनंद नाही “हेच खरे. आपल्याला लहान मोठ्यांकडून बरेच काही शिकता येते पण त्यासाठी ते जाणून घेण्याचा दृष्टिकोन हवा.

केवळ व्यक्ती कडूनच ज्ञानमिळत असते असे नाही. तर  लहानपणापासून म्हातारपणापर्यंत जे जे विद्या देतात ते आपलेगुरु असतातच म्हणून निसर्ग हा आपला गुरु आहे .निसर्गाकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात ओहोळ रूपाने येणारी नदी वाहत असताना अनेक ओहळांना आपल्यात सामावून घेते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते पण जाताना जमीन सुपीक करते शेती फुलवते पिण्यासाठी पाणी देते तिचा उपयोग वीज निर्मितीसाठी होतो सर्वांना आपल्यात सामावून घ्या, शांत राहून इतरांना मदत करा ही   शिकवण नदीकडूनमिळते. डोंगरावर वादळ वाऱ्यासारखी संकटे येतात पण खचून न जाता पुन्हा कामाला लागा असा संदेश डोंगर देतात. वृक्ष, झाडे झुडपे लता वेली वगैरे वनस्पतींचे प्राणीमात्रावर अगणित उपकार आहेत वनस्पती नसतील तर कदाचित प्राणी मात्र जगू शकले नसते. श्वास घेण्यापासून ते पोट भरण्यापर्यंत आपल्याला या सर्वांची गरज असते. हे सर्वजण फांद्या फुल फळे यांचे ओझे वाहतात आणि आपल्याला मधुर फळ देतात. वाटेवरच्या वाटसरूला सावली देतात. उन्हामध्ये कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून ऑक्सिजन आपल्याला देतात , दातृत्वाची शिकवण देतात पण त्या बदल्यात निसर्ग आपल्याला काहीच मागत नाही म्हणून” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी “असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

एवढेच नव्हे चिमणी, पक्षी आपले घरटे बांधताना काटक्या गोळा करतात घरटे बांधतात त्या घरट्यामध्ये अंडी पण घालतात कधी कधी पाऊस वाऱ्याने ते खाली पडते पण हे पक्षी पुन्हा नवीन घरटे बांधतात.

घरात आढळणारा कीटक कोळी आपले जाळ विणत असताना अनेकदा खाली पडतो पण  तो जिद्दीने आपले जाळे तयार करतोच. आज आलेल्या संकटावर मात कशी करावी, सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा याचे ज्ञान आपल्याला या कीटकांकडून मिळते.

मुंगी एक कण दिसला तरी इतर मुंग्यांना गोळा करतात, एखाद्या पदार्थाला मुंग्यांची रांग लागलेली आपण पाहतो.,झाडावरून घसरुन  मुंगी खाली पडते पण ती आपले  कार्य सोडत नाही तर पुन्हा वर चढून आपले ध्येय गाठते.संकटाला न घाबरता प्रयत्न करा यश तुमच्या पाठीशी आहे असे शिकवते जणू!अशीअनेक उदाहरणे देता येतील. म्हणून निसर्गासारखा नाही रे ‌सोयरा

गुरु,सखा बंधू मायबाप

त्याच्या कुशीमधये सारें व्यापताप

मिटती क्षणात आपोआप 

निसर्गाप्रमाणे ग्रंथ गुरुची महती सांगता येईल. ग्रंथा मधून भूतकाळातील गोष्टी समजू शकतात, तसेच वर्तमान काळ , भविष्यकाळ याबद्दल अफाट ज्ञान ग्रंथातून, पुस्तकातून मिळते.,  हे अमूल्य ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केले जाते. पुस्तकामुळे ज्ञानवृद्धी होते. सकारात्मक विचारसरणी बनते .आत्मविश्वास वाढतो .चांगले संस्कार होतात .कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी पाठबळ मिळते. या गुरूकडे जात धर्मभेद नाही ,काळाचे बंधन नाही म्हणून ग्रंथ हे  सुध्दा आपले गुरु आहेत. 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गवसले की हरवले – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ गवसले की हरवले – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(समोर पिंपळाचा पार होता . त्याभोवती असलेल्या ओट्यावर बसून घरूनच आणलेला डबा अनेक प्रवाशी खायचे. ) 

इथून पुढे —

बस थांबली की हॉटेलचा हलवाई कढई चा जाळ वाढवायचा तेल गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी तो पाण्याचे छिटे मारायचा त्याचा चर्र चर्र आवाज यायचा, तेल गरम झाले की मग भजी तळली जायची, त्याचा गंध परिसरात पसरायचा, बरेच प्रवाशी गरम भजी घ्यायचे हॉटेलात टेबल वर बसून घरची शिदोरी खायचे. मालक कुणालाही विरोध करायचे नाही उलट पाणी पाठवायचे कधी कांदे मिरची द्यायचे. आई मला कधी भजी घेऊन द्यायची. तो कडकं मिशी वाला  मालक मला आठवतो लहान मुले असली की जिलबी चा एखादा आडा द्यायचा. मला मात्र दोन आडे द्यायचा. त्यामुळे तो मला अधिक आवडायचा. खाणे पिणे आटोपले की ड्रायव्हर ची वाट पाहात सर्व प्रवासी चर्चेत रंगायचे. एकमेकांची चौकशी केली जायची अनेकाचे नातेवाईक गावचेनिघायचे, जुन्या ओळख्या असल्याप्रमाणे लोक आत्मीयतेने  चर्चेत रंगायचे. मदतीची भावना एवढी तीव्र की अनेकांचे अवजड सामान उतरविण्यासाठी लोक बसवर चढायचे. बस लागणाऱ्या लोकांचे कान झापायचे त्यांना पाणी द्यायचे. एखादा प्रवाशी हळूच एखादी गोळी द्यायचा. कुणी आजीबाई पिशवीतून लवंग विलायची काढून द्यायची. तेव्हड्यात कंडक्टर काका जोरजोराने घंटी वाजवायचे. सर्व प्रवाशी धावपळ करीत चढले की ड्रायव्हर काका ला कुणीतरी तंबाखू द्यायचे नी ते चढले की दोनदा  टन टन वाजले की बस निघायची. आता बस ची गती थोडी वाढायची कारण पुढे घाट लागायचा व हळूहळू बस चालवावी लागायची त्यामुळे ड्रायव्हर काका गती वाढवायचे,मला मात्र घाट आवडायचा,रस्त्याची वळणे,तीव्र चढ़ाव उतार कुठे समोरुन येनारी वाहने त्याना साइड देतानाची घसाघिस सर्व मजेशिर वाटायाचे. सर्वात आवडणारी बाब म्हणजे पळसाची केसरी फुले, नी बहाव्याची पिवळी फुले त्यांनी बहरलेली झाडे, मध्येच शेळ्या मेंढ्यांच्या कळप हाकनारे आदिवासी, लभान समाजाच्या लोकांचे तांडे दिसायचे. त्यांच्या स्त्रियांचे रंगबिरंगी पेहराव हातातील पांढऱ्या बांगड्या नी कानातील लोंबकळत असलेली कर्णफुले सर्व पाहत रहावेसे वाटायाचे. सर्वात लक्षवेधक असायचे ते डोंगरावरून पडणारे धबधबे नी पाण्याचे वाहणारे ओहोळ. घाट संपला की एका खेड्यात बस थांबायची दुधाच्या खव्यासाठी हे आदिवासी गाव प्रसिद्ध होते तिथूनच शहराला खव्याचा पुरवठा व्हायचा,खव्यामुळे तिथे गुलाबजामुन ही मिठाई विकणारे हॉटेल होते . लोक मनसोक्त आस्वाद घ्यायचे सोबत खवा व गुलाब जामुन पार्सल घ्यायचे. आई मामासाठी हमखास खवा घ्यायची मला मात्र गुलाब जामून खायला मिळायचे. . . .

आणखी एक महत्वाचे म्हणजे बस थांबली की काही आदिवासी स्त्रिया यायच्या त्यांच्या जवळ विकण्यासाठी  सीताफळे,आवळे,जांभळं, टेंबर, खीरण्या,येरोण्या,बोर,कवठ असा रानमेवा असायचा लोक कमी पैसे देऊन घेण्याचा प्रयत्न करायचे मात्र आई त्यांना योग्य किंमत द्यायची,म्हणायची रानावनात फिरून आणतात बिचाऱ्या दोन पैसे मिळालेच पाहिजे त्यांना. मी मात्र त्या स्त्रियांच्या अंगावर गोंदलेली चित्रे न्याहाळीत असो.

 स्पीड बेकरच्या धक्क्याने माझी तंद्री तुटली समोर टोल नाका होता यांत्रिक सुविधेने आपोआप त्याचे पैसे देऊन कार समोर निघाली.

 बस आता दहा मिनिटात माझे शहर येणार होते. नवीन महामार्गांने प्रवास सुकर झाला होता. वेळ वाचला होता. पण लहान असतानाच आलेला तो एकही अनुभव आला नाही. सिमेंटचे महामार्ग बनले काळाची गरज म्हणून पण  अनेक गोष्टींना पारखे करून. मनात विचार घोळू लागले या महामार्गांमुळे खरंच बरेच मिळविले की बरेच हरपले?

— समाप्त —

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नुकत्याच झालेल्याआषाढी एकादशीच्या निमित्ताने… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ नुकत्याच झालेल्याआषाढी एकादशीच्या निमित्ताने… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे श्रीकृष्ण व रुक्मिणींनी द्वारकेला जाण्याचा निर्णय घेतला. पण तिकडे जाण्यापूर्वी पंढरीला लोकांचे निरोप घेण्यासाठी निघाले. प्रथम पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या कुटीजवळआले. पण आजच्या दिवशी पडलेल्या पावसामुळे कुटीसमोर चिखल असल्यामुळे त्यांनी अंगणातून पुंडलिकाला हाक मारली.

साक्षात परमेश्वर विष्णू दाराशी पाहताच पुंडलिक म्हणाला,” देवा मी माझ्या आई-वडिलांचे प्रातर्विधी उरकत आहे. कृपया आपण कुटी मध्ये येऊ नये. मी थोड्या वेळाने बाहेर येतो.” आणि श्री विष्णूंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून त्याने जवळ असलेली एक वीट उचलली व मनोभावे नमस्कार करून अंगणात टाकली आणि विनवणी केली,” मी बाहेर येईपर्यंत कृपया या विटेवर उभे रहा”.

श्रीकृष्ण त्याच्या विनंती प्रमाणे दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या टाकलेल्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाने आपल्या आई-वडिलांना श्री विष्णूचे दर्शन घडविले आणि श्रीकृष्ण आपल्या भक्ताची वाट पाहत विटेवर उभे राहिले. एक घटका होत आली तरीही पुंडलिक बाहेर आला नाही. विष्णूंना पाहून जनसमुदाय गोळा झाला.भगवंताला यायला उशीर का झाला हे पाहायला रखुमाई ही तेथे आल्या.

पांडुरंगाच्या हाकेला ही पुंडलिक का बाहेर आला नाही हे पाहण्यासाठी एक  सदगृहस्थ कुटीत गेले. तर पुंडलिकाचे आई वडील मरण पावले होते आणि त्यांच्या चरणी पुंडलिकाने आपल्या प्राणाचा त्याग केला होता.

त्याची अपार भक्ती पाहून पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले कोणत्याही पूजेत तुझे नाव प्रथम घेतले जाईल  “पुंडलिका” आणि जसा विटेवर उभा आहे त्या स्थितीत पाषाण रूपात ह्याच पंढरपुरात 28 युगे उभा राहून माझ्या भक्तांना दर्शन देत राहीन. त्यानंतर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या रखुमाई त्याच ठिकाणी पाषाण रूपात उभ्या राहिल्या.

तेव्हापासून विठ्ठल रुक्माई च्या स्वयंभू मूर्तीच्या चरणावर माथा टेकवून आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची लागली ती अजूनही अखंडित व अविरतपणे चालू आहे.

पंढरपुरात श्रीकृष्ण रुक्मिणी पाषाण स्वरूपात स्थितप्रज्ञ झालेला तो पवित्र दिवस म्हणजे “आषाढी एकादशी”

संत ज्ञानेश्वरांनी सुमारे आठशे वर्षांपूर्वी दीडशेच्या संख्येने सुरू केलेली वारी आजही खांद्यावर भगवी पताका, टाळमृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत रणरणत्या उन्हात पावसा पाण्याची पर्वा न करता दरवर्षी ला खूप वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात.

घेईन मी जन्म‌ याचसाठी देवा

तुझी चरणसेवा साधावया.

तुकाराम महाराजांनी म्हटलेल्या या अभंगाप्रमाणे 200 ते  225 किलोमीटर अंतराची पायी वाटचाल करीत  वारकरी एकादशीला पंढरपूरला पोचतात.

“जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल”

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गवसले की हरवले – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ गवसले की हरवले – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

नुकत्याच निर्माण झालेल्या चौपदरी महामार्गावरून सदाशिव ड्रायव्हर शंभर, एकशे वीसच्या गतीने कार चालवत होता. बाजूच्या सिटवर बसून मी दूरवर न्याहाळीत होतो. गुळगुळीत सिमेंटचा चौपदरी महामार्ग अगदी सरळ, नजर जावी तोपर्यंत वळण नसलेला ,दोन्ही बाजूस लोखंडी मजबूत कठडे, काठावर पांढरे पेंटचे पट्टे. मध्येच उंच पूल, नजर वळवली तर गावाला बाजूला टाकून मार्ग बनविला गेल्याचे लक्षात आले. अश्या कितीतरी छोट्या गावांना बाय पास करून मार्ग बनविण्यात आला होता . सदाशिवच्या आवाजाने मी भानावर आलो.

“मस्त बनलाय सर रस्ता. काही चिंता नाही समोरून येणाऱ्या वाहनांची, फक्त चालवीत रहायचे बस, तीन तासांत गावाजवळ”.

सदाशिवकडे माझं लक्षच नव्हतं. माझं मन भूतकाळात केव्हाच गेलं होतं .मामाच्या गावाला याच मार्गाने आईसोबत जाण्याचे ते दिवस आठवले. सी.पी. सिख कंपनीच्या बसने सकाळी सातला निघायचे नि दुपारी केव्हातरी मामाच्या गावी पोहचायचे. एकेरी वाहतुकीचा डांबरी रस्ता, लहान मोठे अनेक रपटेवजा पूल, दुतर्फा हिरवीकंच झाडे, त्यात तीस चाळीसच्या गतीने धावणारी, नि प्रत्येक गावाला थांबणारी ती बस आजही डोळ्यासमोर उभी राहते.  खिडकी- -जवळ बसून बाहेरचे दृश्य पाहणे हा माझा आवडीचा छंद होता. पावसाळ्याचे दिवस असले की शेताकडे जाणाऱ्या बायांचे थवे दिसायचे. प्रत्येकीच्या हातात विळा असायचा .कडेवर मूल ,डोक्यावर शिदोरीची टोपली- जलद गतीने जाणाऱ्या बायांकडे पाहून मला कुतूहल वाटायचे.त्यांच्यामागे एखादी बैलगाडी, त्यात भरलेले शेतीपयोगी सामान, ढवळ्या पवळ्यांची  जोडी , त्यांना हाकणारा गाडीवान पाहून आम्हाला चांदोबा मासिकातील चित्रे आठवायची .मध्येच बस अचानक थांबायची नि ड्रायव्हर जोरजोराने पोंगा वाजवायचा. नकळत नजर समोर जायची. गायी म्हशींचा कळप रस्त्यावरून चाललेला दिसायचा. काही लहान वासरे आपल्या आईच्यामागे असायची. एखादी धिप्पाड म्हैस हळूहळू डौलात चालायची, जणू काही चाळीतला दादा चाळीत फिरतोय असे वाटायचे .इतक्यात गुराखी धावत यायचा. हातातील काठीने गुरांना बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा. त्याची धावपळ व तोंडातून काढलेले आवाज ऐकून खूप आनंद वाटायचा. पुढे निघालो की बसला गती घेतांना जो घुरर घुर …..आवाज यायचा त्याची नक्कल आम्ही खेळताना करायचो. 

पुढे एखादे खेडे लागायचे. बाजूला एखादा तलाव दिसायचा. तलावात असलेली कमळाची फुले मन मोहून घ्यायची. काठावर कपडे धुणाऱ्या बाया, नि बैल धुणारे, त्यांना पाणी पाजणारे शेतकरी दिसायचे. तलावात एखादी होडी दिसायची. त्यावर बसलेला कोळी आपले जाळे फेकून मासे पकडीत असायचा. क्षणभर दिसणारी ही दृश्ये. पण मनपटलावर बिंबवली जायची. दिवाळीला मामाकडे जाताना ड्रायव्हर इथे गाडी थांबवायचा .लगेच अनेक स्त्रिया बसला गराडा घालायच्या. त्यांच्या हातात शिंगाड्यानी भरलेल्या परड्या असायच्या. तेव्हा पंचवीस पैशांना वीस शिंगाडे मिळायचे. दोन चार शिंगाडे जास्त मिळावे म्हणून घासाघीस चालायची. आईने घेऊन दिलेले शिंगाडे खाताना चालत्या गाडीतून  टरफल बाहेर फेकण्याची मजा वाटायची. मार्गात रेल्वेचे क्रॉसिंग यायचे. फाटक उघडे असावे असे लोक बोलायचे. पण मला मात्र ते बंद असले की आनंद वाटायचा. काही प्रवासी उतरून लघुशंका उरकून घ्यायचे नि फाटकाजवळ जाऊन उभे राहायचे. मला मात्र आई बसमधूनच पहा म्हणायची. दुरून आगगाडीची शिटी वाजली की तिकडे बघायचे. धडधडत गाडी यायची. त्यातही कोळशाचे इंजिन असले की धडधड आवाज यायचा. गाडी प्रवासी असली की गाडीतील काही प्रवाशी हात हलवायचे. खूप आनंद वाटायचा.

—क्रमशः…

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पक्ष्यांच्या गाण्याची खरी गोष्ट… श्री शरद मगदुम ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पक्ष्यांच्या गाण्याची खरी गोष्ट… श्री शरद मगदुम ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

पक्ष्यांच्या गाण्याची खरी गोष्ट 

एका भारतीय संगीतकाराच्या, इतिहास घडवणाऱ्या या पक्षांच्या गाण्याची खरी गोष्ट नक्कीच वाचा – सोनेरी गाणं

ऋषीतुल्य ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित ‘ माचीवरला बुधा ‘ या चित्रपटाच्या वेळी ज्येष्ठ संगीतकार धनंजय धुमाळ यांना स्वतःलाही माहीत नव्हतं की या चित्रपटातलं एक संस्मरणीय, विश्वविक्रमी गीत संगीतबद्ध होण्यासाठी त्यांची वाट पहातयं. याचं कारण असं की तब्बल ४० संगीतकारांनी नाकारलेलं गाणं आता प्रत्यक्षात कधी येणारच नाही अशी हळहळ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना वाटायला लागलेली असतानाच हे गाणं धनंजयजींच्या वाट्याला आलं आणि गाण्याचं अक्षरशः सोनं झालं.

झालं असं की, या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय दत्त आणि पटकथा, संवाद लेखक प्रताप गंगावणे एकदा बोलत होते. आपल्या चित्रपटात वेगळं काय बरं करता येईल असा विचार सुरू असतानाच अचानक, या चित्रपटात केवळ पक्षांचेच आवाज वापरून एक गाणं करायचं ही कल्पना प्रतापजींना सुचली. * कोणतंही वाद्य नको, कोणताही आवाज नको, फक्त पक्षांचेच आवाज असतील * असं गाणं हवं असं ठरलं. पण हे गाणं करायला कुणीही पुढे येईना. सिनेइंडस्ट्रीतील लहानमोठे तब्बल चाळीस संगीतकार गाठले, पण कुणीही हे आव्हान पेलण्याची तयारी दाखवली नाही. कुणी म्हणे, आम्ही तोंडाने आवाज काढू. कोणी म्हणे वाद्यावर आवाज काढू. पण वाद्याशिवाय, आवाजाशिवाय, केवळ पक्षांच्याच आवाजात गाणं करायचं ही कल्पनाच पचणारी नव्हती. आणि दुसरीकडे, केवळ नैसर्गिक आवाजांनी बद्ध असलेलं गाणंच हवं असा जणू दिग्दर्शकांनी (विजयदत्तजींनी) हट्टच धरला होता. अशावेळी कसं कोण जाणे, प्रतापजींना एकदम धनंजयजींचच नाव सुचलं आणि लगोलग त्यांना निरोप धाडला गेला. मुंबईला दादरला शिवाजी पार्कजवळ भेट झाली.

पक्षी आणि निसर्गातले वेगवेगळे आवाज घेऊन गाणं बनवायचंय, तुम्ही बनवू शकाल का.. असा प्रश्न समोरून येताच, धनंजयजींनी क्षणार्धात हे आव्हान घेतलं.. धनंजयजींचा आत्मविश्वास बघून खूश होऊन तत्क्षणी दिग्दर्शकांनी आपल्या खिशातले पाच हजार रूपये काढून बक्षीस म्हणून धनंजयजींच्या हातावर ठेवले आणि कामाचा श्रीगणेशा झाला.

मग सुरू झाला धनंजयजींचा प्रवास, अगदी झपाटल्यागत.. आव्हान घ्यायचं आणि ते पेलूनच यशस्वी व्हायचं हा स्वभाव असलेल्या धनंजयजींनी दिग्दर्शक विजयदत्तजींना सोबत घेऊन दोन- तीनदा जंगलाची सैर केली. केवळ पक्षांचेच आवाज ऐकायचे, आणि निसर्गातल्या अन्य आवाजांचा सतत कानोसा घेत जायचं– पक्ष्यांच्या गुजगोष्टींना ताल लयीत मांडायचे कसे हाच विचार… त्यासाठी जंगलं जंगलं पायाखाली तुडवली. लोणावळा, अर्नाळा, त्र्यंबकेश्वर, सातारा, सगळीकडली जंगलं पालथी घालता घालताच तिथले जे जे आवाज ऐकू येतील, ते ते निसर्गातले पक्ष्यांचे आवाज ध्वनिमुद्रीत करावे अशी कल्पना सुचली, आणि आपले मोठे बंधू ध्वनीमुद्रक गोरखनाथ धुमाळ यांना घेऊन जंगलाजंगलात फिरून आवाजांचं ध्वनीमुद्रण केलं.

तब्बल १९००० कि.मी. चा प्रवास करत, सहा महिने, रात्री बेरात्री, उन्हा पावसाची पर्वा न करता, पक्ष्यांचे आवाज गोळा करता करता, सुमारे २० ते २५ जीबीचा डाटा गोळा झाला. एवढ्या प्रचंड माहितीतून नेमकी माहिती हेरायची, नेमके आवाज हेरायचे, त्यांचाच उपयोग करून गाणं बनवायचं… सोपी गोष्ट नव्हतीच मुळी, अजिबातच… पण ते हरले नाहीत.. पुढला आठवडाभर या आवाजांचाच ध्यास घेतल्यागत दिवसरात्र तेच ते आवाज ऐकत राहिले. पक्ष्यांच्या आवाजासह मनातलं संगीत शोधत राहिले.

दोन आठवडे लोटले…. 

अन् एका जादूई क्षणी बुलबुल, सुतार, खंड्या, कावळा, चिमणी, करकोचे, बदक, कोकीळ अशा तब्बल ७२ पक्षांच्या आवाजासह मनातलं गाणं प्रत्यक्षात आलं. जगाच्या पाठीवरलं पहिलं असं गाणं, ज्यात कोणतंही वाद्य नाही, कोणतेही मानवनिर्मित आवाज नाहीत, कोणाही व्यक्तीचा आवाज नाही … आहेत ते केवळ नैसर्गिक आवाज, पक्षांचे आवाज.. आणि या गाण्याचे जन्मदाते, माझ्या नाशिकचे, थोर, जेष्ठ संगीतकार – पं. धनंजयजी धुमाळ ( सर ).. .. 

(आज जगात व्हायरल झालेले हे ७२ पक्ष्यांचे गाणे ऐका. आणि आनंद घ्या निसर्ग संगीताचा…..चित्रपट “ माचीवरला बुधा “) 

– मोहिनी घारापुरे – देशमुख, पत्रकार, नागपूर

संकलन : शरद मगदूम

अबकड कल्चरल ग्रुप, सांगली मो 94226 22626

 संग्राहिका : माधुरी परांजपे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 25 – परिव्राजक –३. गाजीपूर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 25 – परिव्राजक –३. गाजीपूरडाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गाजीपूरच्या लोकांबरोबर स्वामीजींच्या खूप छान वैचारिक चर्चा होत होत्या. आपल्या समाजात दूरवर शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. आपल्या संस्कृतीतील सत्वांश जाणून घेऊन समाजाला प्रेमाने विश्वासात घेऊन सुधारकांनी सुधारणा घडवून आणली पाहिजे. ती सहज प्रक्रियेतून व्हायला हवी. लादली जाऊ नये. शिक्षणाचा पाया आणि त्यातील तत्वे हिंदू विचारधारेवर आधारित असली पाहिजेत. जे चांगलं आहे ते गौरवपूर्वक मांडलं गेलं पाहिजे. हिंदू धर्मात मानले गेलेले आदर्श नीट समजून घेऊन समाजासमोर ठेवले पाहिजेत. असं समाजसुधारकांना बजावून सांगताना स्वामीजी म्हणतात, “ध्यानात ठेवा हिंदू धर्म हे काही केवळ चुकीच्या गोष्टींचे एक गाठोडे नाही. खोलवर बुडी मारा, तुमच्या हाताला अनमोल रत्ने लागतील. परक्या लोकांची संस्कृती आणि चालीरीती, यांच्या डामडौलावर भुलून जाऊ नका. आपली ही मातृभूमी कशी आहे ते समजून घ्या. आपल्या भारतीय समाजाचा जीवनहेतु काय आहे आणि त्याच्या अस्तित्वाची प्रेरणा कशात आहे, याचा तुम्ही शोध घ्या. आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक आदर्श आपण विसरून गेलो आहोत, हे आपले खरे दारिद्र्यपण आहे. आपल्या ठायी स्वत:च्या अस्मितेचे भान उत्पन्न होईल तेंव्हाच आपले सारे प्रश्न सुटतील”.

इथेच गाजीपूरमध्ये स्वामीजींच्या विचारांना एक आकार येत चालला होता. सतत आध्यात्मिक विचार तर होतेच डोक्यात, पण देशाच्या वर्तमानस्थितीबद्दल त्यांना चिंता सतावत होती आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधताना भविष्यातला दृष्टीकोण आकार घेत होता असे दिसते.

गाजीपूरला काही इंग्रज अधिकारीही होते. त्यातील दोघांशी स्वामीजींचा संवाद होत होता. अफू विभागात रॉस म्हणून एक अधिकारी होते, त्यांना हिंदू धर्म व त्यातले देवदेवता, उत्सव, सामाजिक चालीरीती, याचे खूप कुतूहल होते. काही रूढी आणि आचार उघड उघड सदोष होते, अशा आचारांना हिंदूच्या धर्मग्रंथात काही आधार आहे का याचं त्यांना कोडं पडलं होतं. मग स्वामीजींनी प्रतिसाद देत, धार्मिक कल्पनांचा विकास, आणि सामाजिक आचारांच्या मागे उभी असणारी आध्यात्मिक बैठक त्यांनी सांगितली. हे ऐकून हिंदू धर्मातला व्यापक दृष्टीकोण रॉस यांच्या लक्षात आला.

एकदा, रॉस यांनी तिथले जिल्हा न्यायाधीश पेंनिंग्टन यांची स्वामीजींशी भेट घडवून आणली. स्वामीजींनी त्यांच्या बरोबर हिंदू धर्माचे पुनरुत्थान, आजच्या विज्ञानामुळे होऊ घातलेले परिवर्तन, योगाच्या मागचा शास्त्रीय विचार, सन्याशांचा संयम आणि मनोनिग्रह यावर आधारित जीवननिष्ठा यावर संवाद साधला. स्वामीजींचा, मुलभूत मानवी शक्ति, प्रेरणा आणि साधना याबद्दलचा वेगळा दृष्टीकोण  पेंनिंग्टन यांना खूप आवडला. त्यांना वाटलं याचं तर आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे विश्लेषण होऊ शकतं की. ते एव्हढे प्रभावित झाले की, ते म्हणाले, “हिंदूंचा धर्म आणि त्यांचा सामाजिक आचार याविषयीचे आपले विचार तुम्ही इंग्लंडला जाऊन तेथील विचारवंतांपुढे ठेवले पाहिजेत.”

“वादे वादे जायते तत्वबोध:” सतत तत्वचिंतन सुरू असल्याने स्वामीजींचे हे विचार  आतापर्यंत फक्त गुरुबंधु, आपल्या समाजाचे लोक यांच्यापुरताच मर्यादित होते. आज मात्र ते निराळ्या संस्कृतीत वाढलेल्या विचारवंतांपुढे मांडल्यामुळे त्याचे परिमाणच बदलले होते.

स्वामीजींच्या या समाधानकारक चर्चा तर चालू होत्याच, पण गाजीपूरला येण्याचा त्यांचा मूळ उद्देश होता, श्रेष्ठ आध्यात्मिक विभूति पवहारी बाबा यांची भेट घेणं. न्याय, वेदान्त, व्याकरण अशा सर्व शास्त्रांचा अभ्यास, भारतभर केलेला प्रवास, संस्कृत बरोबर इतर भाषांचे ज्ञान, सद्गुरूंकडून योगमार्गाची मिळालेली दीक्षा, त्याप्रमाणे वर्षानुवर्षे केलेली साधना आणि शेवटी शेवटी चालू असलेला निराहार अवस्थेतला एकांतवास व मौनाचा स्वीकार अशा तपश्चर्येचं तेज असणारे पवहारी बाबा. स्वामीजींची यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यानंतर ते वाराणशी करून वराहनगर मठात आले. कारणही तसच होतं,  बलराम बाबू यांचं निधन झालं होतं, त्या पाठोपाठ सुरेन्द्र नाथांचे पण निधन झाले, त्यांच्या आध्यात्मिक परिवारात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.

वराहनगर मठाची  व्यवस्था लावून, नंतर त्यांना हिमालयात जाऊन गढवाल च्या शांत परिसरात साधना करण्याची इच्छा होती. यावेळी त्यांचा भ्रमणाचा काळ जवळ जवळ सलग पावणेतीन वर्ष होता. आणि प्रदेश थेट हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंतचा, विविध प्रांत, भाषा, प्रदेश, अनेक प्रकारच्या व्यक्ती असा विविधतेने नटलेल्या भारताच्या भागात त्यांनी संचार केला. त्यांनी गाजीपूरला समाजसुधारकांना म्हटलं होतं की, ‘आपली मातृभूमी समजून घ्या’ त्याप्रमाणे ते ही याच उद्देशाने स्वदेश संचाराला निघाले होते.    

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंढरीच्या वारी निमित्ताने… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

??

☆ पंढरीच्या वारी निमित्ताने… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

काय असेल विठोबाकडे ? इतकी का धाव या माऊलीच्या भेटीसाठी ? पाडुरंग भेटल्यावर समाधानी का होतात हे भक्त ? ही भक्ती  खरी असते का ?

वारीला जाता न येणाऱ्यांना खूप खंत का वाटते ? असे अनेक प्रश्न लहानपणी पडायचे.. आई म्हणायची 

सखू निघाली पंढरपूरा

येशीपासूनी आली घरा !

घरदार सोडून, अनंत व्याप सोडून लोक वारीला चालत जातात. सर्व सुखं दुःखं बाजूला सारुन एकमेकांना “माऊली” म्हणत अनेक स्त्री-पुरुष भक्तीमय वातावरणात विलिन होतात. तल्लीन होतात.

” पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज की जय ! “

हा जयघोष अखंड चालू असतो. पण या जयघोषात रुक्मिणी, जनाबाई, सोयराबाई, कुठेच नाहीत याची खंत मात्र माझ्यासारख्यांना वाटल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा भाग वेगळा असला तरी विचार करायला लावणारा आहे हे मात्र नक्की.

माझे आई वडील दोघेही विठोबाचे निस्सिम भक्त होते. आई दुसरा कोणताच देव मानत नव्हती. सर्व देवांचा देव म्हणजे विठोबा अशी तिची धारणा होती. वडिलांना संकष्टी सुद्धा करू द्यायची नाही. फक्त एकादशी करायची. घरातले सगळेच एकादशी करायचे. आम्हा लहानांना ते ऐच्छिक होतं, पण आम्हीही वेगवेगळ्या पदार्थांच्या आशेने एकादशी करायचो. आठवड्यातून दोन वेळा भजनी मंडळासोबत घरी भजन असायचे.. एकनाथ षष्ठी, रामनवमी, गोकूळ अष्टमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज हे सगळे दिवस अहोरात्र चोवीस तास भजन करुन साजरे केले जायचे. आईने सही करण्यापुरतीच अक्षरे गिरवलेली होती. पण सगळे अभंग तोंडपाठ. तिचं बालपण कर्नाटकात गेलेलं. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी लग्न होऊन महाराष्ट्रात जत येथे आली. केवळ कन्नड बोलता येणारी आई आमच्या मराठी शाळेतील शिक्षणामुळे आमच्याशी हळू हळू मराठी बोलायला शिकली. रेडिओवर लागणारे अभंग लक्षात ठेवून, आठवून, आठवून अभंग म्हणू लागली. भजनी मंडळात बऱ्याच वेळा ही एकटीच बाईमाणूस असायची. माझा विठोबा सगळं व्यवस्थित करेल हा तिचा विश्वास होता. वडील नोकरीनिमित्त बाहेर गावी असायचे आणि आई अभंगात रमून जायची.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ।

तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ।।

तुकोबांच्या अभंगात  ” आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे ” होऊन जगायची…

तुकोबांच्या अभंगांनी तिला नवे विचार मिळाले. तिने कधी वड पुजलेला अथवा कधी कर्मकांड केलेले आम्हाला दिसले नाहीत. जनाबाईला दळण दळायला विठोबाने मदत केली. तशी आपली दुःखं कमी करायला आणि ती सहन करायला तोच आपल्याला बळ देईल असे तिला वाटायचे..

सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी 

देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी –

हे तिचं आवडतं गाणं. मी अभ्यासात रमायचे, ती अभंगात रमायची. विपश्यना, विज्ञान, मानसशास्त्र तिला माहित नव्हतं, पण जगणं माहित होतं. सगळी सुखंदुःखं तुळशीच्या हाराच्या रुपाने पांडूरंगाच्या गळ्यात घालून ती किती सहज जगत होती. याचं मला राहून राहून आज आश्चर्य वाटतं. स्वतःच्या कर्तव्यात तिने कधी कसूर केली नाही. पहिली  संसाराची वारी मग विठोबाची वारी. गरजेनुसार शेतातली कामंसुद्धा ती न कंटाळता आनंदाने करायची. ” कांदा, मुळा,भाजी अवघी विठाई माझी.” म्हणत काम चालू असायचं. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची तेव्हा हे गाणं ती नेहमी गुणगुणायची–

कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो ।

हलाहला ते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो ।।

बहिणाबाईची कविता – “ अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर “ –आईला माहीत होती. रेडिओवर ऐकलेलं सगळं तिच्या लक्षात असायचं. माझ्यावर आध्यात्मिक संस्कार तिच्यामुळेच झाले.. तिच्या विठोबावरील भक्तीतला भाव आज मला कळतो. सगळं विठोबावर सोपवून ती किती आनंदी असायची आणि मी रोज नवे प्रश्न निर्माण करुन उत्तर शोधत राहते. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली तर विठोबा आपल्यालाही नक्की मदतीला येईल.

एकविसावे शतक हे मानसिक आजाराचे असेल असे काही तज्ञ लोक म्हणायचे. मला तेव्हा खरे वाटत नसे. असे होणे शक्य नाही असे वाटायचे. पण हे सत्य आहे. प्रत्येक चार माणसांमागे एका माणसाला मानसिक आजाराची लक्षणे दिसून येतात. यात स्त्रियांची संख्या अधिक आहे. मी refer करत असलेल्या psychiatrist ची opd , hospitals तुडुंब भरलेली दिसतात. आपल्याकडे मानसरोगतज्ञ संख्येने तसे खूप कमी आहेत. माणसात देव अनुभवणारी, समुपदेशन आणि रुग्णसेवेत रमणारी मी. तुम्हा सर्वांना माऊलीच्या रुपात पाहते. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे… आज माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांच्या  अडचणी समजून घेणं गरजेचं  आहे. त्यांना बोलतं करणं, त्यांचा आवाज होणं, त्यांना व्यक्त होऊ देणं, त्यांच्या मनातील भाव-भावना केवळ शांतपणे ऐकून घेण्याची गरज आहे. ज्याची त्याची लढाई, जो तो लढतोच आहे. केवळ आपण सोबत आहोत, सगळं व्यवस्थित होईल, एवढंच सांगण्याची गरज आहे…!

तू नाहीस हे माहित आहे तरीही—– भेटी लागी जीवा | लागलीसे आस || 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ ॥ मार्गदर्शक चिंतन॥ -॥ कर्मण्येवाधिकारस्ते’ ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

मार्गदर्शक चिंतन

☆ ॥ कर्मण्येवाधिकारस्ते’ ॥ – प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’☆

अर्थ है ”केवल कर्म पर ही तेरा अधिकार है यह मुहावरा विश्व प्रसिद्ध ग्रन्थ’‘ भगवत्ï-गीता के सुप्रसिद्ध श्लोक का एक चतुर्थांश है। भगवान श्री कृष्ण ने गीता में अर्जुन को समझाने के बहाने विश्व के मानव मात्र को कर्म करने का जो  अमर संदेश दिया है, वह अनुपम लोक कल्याणकारी सिद्धान्त है। इसमें कर्म की महत्ता प्रतिपादित की गई है क्योंकि कर्म के बिना न तो नव सृजन संभव है और न सृष्टि का संचालन। कर्म न केवल जीवन की आवश्यकताओं की पूर्ति के लिए ही आवश्यक है वरन्ï दैनिक जीवन में नवसृजन, प्रसन्नता तथा आनन्द की प्राप्ति और प्रगति व विकास के लिए भी अनिवार्य है। बिना कार्य के कोई उत्पादन संभव नहीं। खेत, हल और बीज के होते हुए भी यदि कि सान श्रम पूर्वक कर्म न करे तो फसल का उत्पादन असंभव हैं। ईंट, सीमेंट, रेत आदि के होते हुए भी यदि मजदूर परिश्रम न करे तो भवन नहीं बन सकता। इसी तरह केवल इच्छा करने मात्र से कोई उपलब्धि नहीं पा सकता। हर छोटी-बड़ी इच्छा को पूरी करने के लिए प्रकृति प्रदत्त समस्त साधनों के होते हुए भी बिना कर्म किए अर्थात्ï सोच-विचार श्रम किए बिना कुछ पाया नहीं जा सकता। कर्म के द्वारा इच्छानुसार अर्जन के लिए ही ईश्वर ने प्राणियों को कर्मेन्द्रियाँ दी हैं। कर्म के द्वारा कुछ भी असंभव नहीं है। आज की बड़ी-बड़ी वैज्ञानिक उपलब्धियाँ  मनुष्य के कठिन श्रम से किए गए कर्म के परिणाम हैं। कर्म की सृजनशीलता के आधार पर ही मनुष्य ने आज अन्तरिक्ष में उड़ान भरी है और कर्म के विश्वास पर ही कल और भी नये-नये चमत्कारों की प्राप्ति के लिये प्रयासरत है। कर्म की महानता को ही प्रतिपादित करते हुए तुलसीदास जी ने मानस में कहा है-

‘कर्म प्रधान विश्व करि राखा’-‘जो जस करिय सो तस फल चाखा॥’

इस संसार में कर्म की प्रमुखता है जो जैसा करता है वैसा ही परिणाम पाता है कर्मठता के विपरीत अकर्मण्यता को अपनाने वाले आलसी, सदा निराश और और उदास बने रहते हैं। केवल कामनाओं के स्वप्न देखते रहते हैं पर पाते कुछ नहीं। ‘दैव दैव आलसी पुकारा’ केवल भाग्य पर पूर्ण भरोसा करना उचित नहीं है। भाग्य भी उसी का साथ देता है जो कर्म करने को उद्यत होते हैं तथा कुछ पाने के लिए महत्वाकांक्षाएँ सँजोते हैं तथा श्रम करते हैं। लोक मान्य तिलक ने भी अपने ग्रंथ ‘गीता-रहस्य’ या ‘कर्म योग शास्त्र’ में कर्म और कत्र्तव्य के लिए मनुष्य को उन्मुख होने की सलाह दी है और गीता की वृहत व्याख्या में जीवन के युद्ध क्षेत्र में एक कर्मठ योद्धा की भाँति डटकर हर समस्या का सामना करने को कहा है। यही पुरुषार्थ है। संत बावरा जी महाराज ने भी कहा गीता की व्याख्या करते हुए कर्म और कर्मठता की पुरजोर वकालत की है। उन्होंने ईश्वर की उपासना और अपने कर्माे व कत्र्तव्यों की पूर्ति में लगे रहकर पूरी करने को श्रेष्ठ माना है। संसार के कर्मक्षेत्र से भागकर सन्यास लेने को श्रेयस्कर नहीं माना है।

यह तो सहज सभी के अनुभव की बात है कि कुछ न करने से बेहतर हमेशा कुछ कर्म करना ही हितकारी है क्योंकि कर्म से ही इच्छा की पूर्ति होती है। शायद इसी आशय को व्यक्त करती है यह सहज सी लोकोक्ति-”बैठे से बेगार भली।’‘ सक्रियता ही जीवन है। हाँ गीता का यह कथन और भी सार गर्भित है कि कर्म तो निरन्तर करते रहना चाहिए पर उसके फल के प्रति आशान्वित न रखकर हर कार्य करना चाहिए। व्यक्ति के हाथ में कर्म करने का अधिकार तो पूरा है और अच्छे कर्म का परिणाम भी अच्छा होता है किन्तु फिर भी फल ईश्वर के हाथ में है। इस भावना से मन लगाकर काम करने से मन में कभी निराशा नहीं होती और निरपेक्ष कत्र्तव्य बोध से, विपरीत परिणाम होने पर भी ईश्वरेच्छा का भाव होने के कारण किसी हितकारी विकास के लाभ की आशा न तो टूटती है और न हार का अनुभव ही होता है।

गीता के जिस परम उपदेश ने हताश और विषप्ण अर्जुन को युद्ध क्षेत्र कुरुक्षेत्र में अपने कत्र्तव्य की पूर्ति के लिए प्राणपण से जूझने को तैयार कर दिया वह हम सभी को कत्र्तव्य परायणता और कर्म के प्रति गहननिष्ठा की प्रेरणा देता है तथा यह शिक्षा नव जीवनदृष्टि देती हुई न तो कभी जीवनरण में हिम्मत हारने की और न ही कभी कर्म से विरत होने की, मूल्यवान सीख देती है। संकट के समय में भी मन को ताजगी और उत्साह से लबरेज रख कत्र्तव्य में जुटाये रखने वाली गीता यही कहती है कि-

आदमी है खुद अपना मित्र, स्वयं करना होता उद्धार,

समय को देता जो सम्मान, साथ देता उसका संसार।

बढ़ाचल, कभी न हिम्मत हार, कभी मत छोड़ कर्म का प्यार,

कर्म है जीवन का आनन्द, यही है जीवन का आधार॥

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

 ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, म.प्र. भारत पिन ४६२०२३ मो ७०००३७५७९८ [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे माहेर… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ माझे माहेर… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘पहिल्याच सरीचा ओला सुवास आला

माहेरच्या दिसांचा, क्षण एक भास झाला…’

होय,आषाढाचे सावळे गच्च मेघ आकाशात दाटी करतात,भिरभिर गार गार वारा चहूबाजूस भिरभिरू लागतो आणि मग मन आपोआपच पंढरीकडे धावू लागते. 

माझे माहेर पंढरी ।  आहे भीवरेच्या तिरी ।।

आषाढ लागताच माहेरची ओढ लागून रहाते.डोळ्यांपुढं पंढरीची वाट दिसू लागते . तन मनात टाळ मृदंग दुमदुमत रहातो अन सुरू होते माहेरी जाण्याची लगबग ! 

सामान ..सुमान ..आवराआवरी ..अहं ! माहेराला जाताना मुळी चिंता कसली? तिथं काळजी घ्यायला आहेत ना मायेची माणसे !आपण फक्त तिथवर जायचं बस्स ! संसारातल्या चिंता,कटकटी ,ताण तणावापासून मुक्त होऊन पुन्हा नव्यानं आव्हान स्वीकारायला सज्ज व्हायला माहेरात थोडे दिवस जावेच नै का ?

मोह मायेपासून थोडे दिवस का होईना अलिप्त व्हावं–संसाराच्या चिंता त्या जगंनीयंत्या विठू माऊलीच्या पायी वहायला…तो घेईल ना आपली काळजी, मग कशाला व्यर्थ चिंता ?आपण फक्त निश्चिन्त मनाने सगळं जिथल्या तिथं टाकून माहेराची वाट चालू लागायची. त्याला डोळे भरून पहाण्यासाठी, त्याला हृदयात जपण्यासाठी,अवघा देह त्याच्या त्या सावळ्या रुपात एकवटण्यासाठी !

एक पोत्याची खोळ , डोईवर तुळस ,चारदोन मोजके आवश्यक कपडे न टाळ– बस्स ! पंढरीचा प्रवास सुरु होतो –वाऱ्याच्या चिपळ्या दुतर्फा पिकांतून ,झाडाच्या पानातून वाजत रहातात—‘ जय जय रामकृष्ण हरी…’ त्यांना सुद्धा वर्षोनवर्षीच्या या जयघोषाची जणू सवय जडलीय.वारकरी चालू लागले की मग झाडांना ,पशु पक्ष्यान्नासुद्धा  त्या तालातच डुलावं ,झुलावं आणि गावं वाटू लागतं .भुरभुर पावसात आनंदाने चिंब होऊन ती सुद्धा विठुरायाशी एकरूप होतात. तहान भूक हरपून पावलं फक्त चालत रहातात ..नामघोष अंतर्मनी निनादत…तू कोण ? मी कोण? कुठला  ? नाव ? गाव ?– स्व विसरून त्या पंढरीच्या वाटेवरील गर्दीतला एक ठिपका ! पाय दुखतात,सुजतात पण पर्वा कसली? चालत रहायचं फक्त. क्षण एक विसावा घ्यावा, एकमेकांचा हालहवाल पुसावा अन झपझप आनंदाने चालू लागावं पाऊस वाऱ्याला झेलत.

माऊली ..माऊली ..येते ग्यानबा तुक्याची पालखी ..अन तल्लीन होतात सारीच गात्रे .. नुरते भान देहाचे मग काही … ओथंबते चिंब चिंब मन भक्ती रसात . मग पावलं चालत नाहीत तर मन चालत रहातं, पीस होऊन तरंगत रहातं  आभाळभर.

टाळांचा आवाज गगनाला भिडतो ,मृदंग खोल खोल काळजाला भिडतो, आणि माहेर  जवळ आल्याची ग्वाही देतो.

अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर..।।

पंढरपुरात घरंगळत घरंगळत कधी दाखल होतो कळतच नाही. चंद्रभागेच्या त्या वाळवंटात जिथं तिथं विठू हसतहसत बाहू पसरून आलिंगन देत रहातो सगळ्यांना आणि क्षेम विचारत रहातो, “ फार त्रास नाही नाझाला येताना ? सर्वजण आलात ना व्यवस्थित ? पाठीमागे नाही ना उरले कोणी? “

गार गार वाऱ्यात रात्री  विठूच्या मायेची सावळी उबदार घोंगडी अलगद सगळ्या लेकरांना कुशीत घेते. शांत शांत सुखाची झोप प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईच्या कुशीत..कशाला हवी मऊ मऊ पिसाची गादी ,उशी अन उबदार दुलई ? आभाळाच्या मंडपाखाली सर्व भेदाभेद मिटून जातात. गरीब-श्रीमंत,उच्च -नीच ,लहान- मोठा…सगळे एकजात एकसारखे !

काकड आरती ,भजन कीर्तन ,नामसंकीर्तन– पावलं मन देह थिरकू लागतो तालासुरात …आनंदाचा पूर ओसंडून वहात रहातो मनामनातून पंढरपुरात. अबीर बुक्का,ओल्या तुळशीमाळेचा  सुगंध आसमंतात दरवळू लागतो. अवघा देह पंढरपूर होतो.

सावळे सुंदर …रूप मनोहर

राहो निरंतर हृदयी माझे….. 

झुंबड उडते दर्शनाला ….निमिषार्ध एक चरणावर डोकं ठेवून मागणं  मागायला ..पण काय बरं मागायच होतं ?

मागणे न काही सांगण्यास आलो

आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो

आत्तापर्यंत इतकी पायपीट केली ती काही मागण्यासाठी ?छे ! फक्त त्याचं रूप डोळे भरून साठवायला ..आणि तो क्षण येतो ..निमिषार्धात आपलं डोकं चरणांवर विसावतं  अन फक्त ‘ सुखी ठेव सगळ्यांना ‘ अशी विश्वकल्याण आणि विश्वसुखाची याचना होते, कारण मीपण मागेच कुठेतरी गळून पडते. नेत्री अश्रुधारा वाहू लागतात. सोडावे वाटत नाहीत ते चरण ..तरी सोडावे लागतात. गर्दीत पुन्हा कुणीतरी मागे खेचते अन पुन्हा एक जडभार ठिपका घरंगळत घरंगळत जातो वैष्णवांच्या गर्दीत.अणू रेणूत विठ्ठल साठवून.

कुंकू ,अबीर ,प्रसाद, लाखेच्या बांगड्या …आठवत रहातात माहेराला येताना पाय धरलेल्यांच्या मागण्या आणि सुरू होतो परतीचा प्रवास…नको वाटत असतो  तो प्रपंचाचा भार ,पण जावेच लागते माघारी, निदान उपकारापुरता तरी तो पेलण्यासाठी ..जड जड पावलांनी आणि अंतःकरणाने …काहीतरी विसरलेय, चुकलंय ही अनामिक हुरहूर मनात घेऊन …… 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares