मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटायर्ड माणूस – स्व. पु.ल. देशपांडे ☆ प्रस्तुति – सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ रिटायर्ड माणूस – स्व. पु.ल देशपांडे ☆ प्रस्तुति – सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

वाचक..सौ.अंजली दिलिप गोखले

स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे)

जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस…! …. पु.लं.

 

रिटायर्ड माणसांनो,

भावांनो,सहकाऱ्यांनो…

 

जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा

प्राणी म्हणजे “रिटायर माणूस” होय..!

 

पु.लं च्या भाषेत सांगायचं म्हणजे

 

पुण्यांच्या दुकानदारांच्या नजरेतून

सगऴ्यांत दुर्लक्षीत प्राणी म्हणजे

गिऱ्हाईक अगदी त्याचप्रमाणे

समजा…!

 

गरिब बिचारा,भांबावलेला,

बावरलेला,काहिसा आत्मविश्वास हरवलेला असा हा प्राणी असतो..!

 

कोणे एके काळी या माणसाचे

पण सुगीचे दिवस असतात.

त्याचा रूबाब! वाखाणण्याजोगा असतो.

सर्व गोष्टी हातात मिळत

असतात.

घरी व कार्यालयात देखील..

 

टेबलावरून फायली फिरत

असतात,मोठ्या मोठ्या

करारांवर सह्या होत असतात.

नुसती बेल वाजवलीना तरी

तीन तीन शिपाई धावत येत

असतात.एक चहा घेऊन.

एक बिस्कीटं घेऊन,तर एक

बडीशोप घेऊन..!

 

अहाहा…त्या शिपायाच्या

चेहऱ्यावर भाव असतो,

तो हा,की साहेब हे फक्त

आपल्याचसाठीच्…

 

आणि आता,टेबलावर

मिरच्यांची देठं काढली जातात,भेंडी पुसली जाते. लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतात…!

अरेरे… किती हा विरोधाभास?

 

रिटायर्ड माणसाला कुठंही डोकं चालवायला वा मध्ये घालायला बंदी असते,कधी कधी मला,तर

वाटतं, की रिटायर्ड माणूस त्याचं डोकं फक्त उशीवर टेकवायलाच वापरत असावा सध्या…बिच्चारा…!

 

कुणी समदु:खी माणूस त्याला

घरी भेटायला आलाच,तर हिंदी

चित्रपटात यात्रेत हरवलेला भाऊ भेटल्यावर नायकाला जो आनंद होतो,अगदी तसाच किंबहूना त्याहून जास्त आनंद रिटायर्ड माणसाला होतो.पण त्यांचं.बोलणं किचनचा सी.सी. टिपत असतो,हे त्याच्या ध्यानी नसतं…

 

आपल्या सुगीच्या दिवसांत हा

माणूस कट्टयावर मित्रांसमवेत

हास्य विनोद करत असतो.

मधून मधून नेत्र व्यायामही

सुरू असतो,तोच बिचारा

आता मंदिराच्या कट्टयावर वा

वाचनालयाच्या ओट्यावर

विसावलेला असतो…

 

ज्या चौपाटीवर सणसणीत

भेळ,रगडा,बर्फाचा गोळा

खातांना नजर भिरभीरत

ठेवलेली असते,गार वार वारा

अंगावर घेत रिटायर्ड लाईफ नंतरच्या आयुष्याची स्वप्न रंगवलेली असतात,तिथेच चटई टाकून योगा करायची वेळ आलेली असते…

 

दिवसभरांत टोमणे ऐकावे

लागतात,ते शेजारचे बघा,या वयातही किती फीट व धीट

आहेत…नाही तर..तुम्ही बघा,

भित्रे काळवीट..वगैरे वगैरे…!

 

अरे कांय,आहे कांय हे…!?

 

एक नवीन मुद्दा मला कळलांय,तो तुम्हाला सांगतो. या रिटायर्ड माणसांचा उल्लेख पुराणांत म्हणजे महाभारतात सुध्दा आला आहे….

चक्रावलात नां..?

मग ऐका…समोर सागराप्रमाणे पसरलेला विशाल सैन्याचा समुह,त्यातले स्नेही,आप्तेष्ट पाहून अर्जुन जेव्हा युध्द करायला नकार देतो,तेंव्हा कृष्ण भगवान अर्जुनाला

म्हणतात…

 

अर्जुना असा रिटायर्ड

माणसासारखा हताश व

निराश होऊ नकोस.उठ व

लढायला सज्ज हो…!!

 

पुढं कालांतरानं रिटायर हा

शब्द गीतेतून वगळण्यांत

आला.कां,तर “भविष्यांत

रिटायर्ड लोकांच्या भावना

दुखाऊ नयेत”.

 

बघा,लोकहो…!त्या काळांत

पण यांच्या भावनांची कदर

केली जात होती आणि आता

सुकलेल्या पालापाचोळ्या प्रमाणे त्या पायदळी तुडवल्या जातात…अरेरे…!!

 

सरते  शेवटी भगवंतानं रिटायर्ड लोकांना हताश न होण्याचा मार्ग सुचवला..

भगवान म्हणाले…!

 

अरे वत्सा,रिटायर्ड माणसा…!

हताश व निराश होऊ नकोस,

मी तुला फंड व पेन्शन या

दोन गुळाच्या वेेली देतो,जो

पावेतो त्या तुझ्याकडं आहेत,

तोवर तुला मरण नाही…

 

मरण नाही,म्हणजे खरं मरण

नाही,रोजच्या जीवनात तू ज्या

यातना वा अपमान भोगशील,

त्या यातना तुझ्याकडं असलेल्या,या दोन शस्रांनी सुसह्य होतील…

फंड व पेन्शन जो पावेतो

तुझ्याकडे आहेत,तो पर्यंत सारे

तुझे असतील….

 

उठ,वत्सा उठ आणि आयुष्याच्या संग्रामास तयार हो. उठ…!!

 

खाडकन जाग आली…!

 

भानावर आलो.आणि की

माझी ती दोन शस्र जागेवर

आहेत,की नाही हे बघण्यासाठी अंथरूणातून बाहेर आलो…

 

माझ्या सर्व सेवानिवृत्त (रिटायर )झालेल्या व होऊ घातलेल्या मित्रांना समर्पित..?

 

संग्राहक – सौ.अंजली दिलिप गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाजारहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ बाजारहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

खरेदी पूर्वीची ते आँन लाईन

आठवडी बाजार आणि जत्रा या  प्रत्येक गावाच्या वैशिष्ट्यपुर्ण गो़ष्टी. शनिवार म्हणले की  आम्हाला आठवतो आमच्या गावचा म्हणजे सांगलीचा आठवडी बाजार. मारुती रोड पासून हरभट रोड ते कापड पेठ, गणपती पेठे पर्यत पसरलेला. आजच्या आँनलाईन खरेदी आणि लाँकडाऊन च्या प्रार्श्वभूमीवर याबाबतच्या आठवणी

तसं पहायला गेलं ते प्रत्येक व्यक्तीची खरेदीची सुरवात अगदी लहानपणापासून सुरु झालेली असते. पूर्वी आपल्या घरी नातेवाईक / ओळखीचे/ शेजारचे कुणीही कधीही अगदी अचानक येऊ शकत. फोनवर विचारून येणे, आधी Appointment घेणे मग येणे वेगैरे मँनर्स सांभाळण्याचा तो काळ नव्हताच मुळी. आणि घरी आलेल्याला चला सगळे मिळून हाँटेलात जाऊ आम्ही पण अजून या हाँटेलात गेलो नाही असे म्हणायचे ही ते दिवस नसायचे. अश्यावेळी आलेल्या पाहुण्यांसाठी चक्क घरात पोहे/ उपमा/ शिरा / चहा / सरबत असं काहीस बनवले जायचे.

कधीकधी अचानक आलेल्या स्नेंहीमुळे आईची गडबड व्हायची, चहा घेणार का?  असे विचारताच चक्क ‘हो’  म्हणायचा तो काळ असायचा आणि थांबा आधण ठेवते असे म्हणायला आणि चहा पुड संपलीय हे लक्षात यायला एकच गाठ पडायची.

अशावेळी जा ग / जा रे कोप-यावरच्या दुकानातून चहा पुड/ आले/ बिस्किटं घेऊन ये अशी आँर्डर दिली जायची. पैसे नंतर देते असं सांग काकांना आणि काका चक्क तयार व्हायचे.  घेतलेल्या सामाना बरोबर हातावर श्रीखंडाची गोळी ठेवायला विसरायचे नाहीत

साधारण लहानपणी पहिल्यांदा अशा प्रकारचा बाजारहाट केलेला सगळ्यांनाच आठवत असेल.

वाड्यात मित्र-मैत्रिणींबरोबर खेळ ऐन रंगात आला असताना आईचे बोलवणे आणि काहीतरी आणायला सांगणे हे जीवावर आल्यासारखे वाटायचे. मलाच का आई दरवेळेला बोलवते, माझ्या बहिणीला / भावाला पण कधी बोलवत नाही याचे दु:ख ही वाटायचे मात्र अभ्यास करत असताना असे बाहेर जाणे मात्र आवडायचं

जसं जसं मोठे होत गेलो तसे खरेदीचा आवाका वाढला आणि मग आम्हाला  आठवडा बाजारासाठी कामाला लावण्यात आले. आठवडा  बाजारासाठी यादी करणे, घरातल्यां  बरोबर  खरेदीला जाणे, दुकान (यादी) वाटून घेणे, खरेदी झाल्यावर मारुती मंदिरात समोरील रसवंती गृहात बसून लिटरच्या मापात उसाचा रस पिणे, ऐनवेळच्या यादी व्यतिरिक्त जास्ती खरेदीची मजा घेणे, बाजारहाट करताना बरोबरचीचे मित्र – मैत्रिणी भेटणॆ, त्यांचे पालक भेटणे,  मग आपल्या पालकांची ओळख करुन देणे, मग चर्चा अभ्यासावर येणे यात नेमके समोर शाळेतल्या बाई येऊन सामील होणे मग हळूच आई मी तिकडे ते घेऊन तिथे थांबतोय/ थांबतीय  ग म्हणून सटकणे, दरावरुन घासाघासी करणे, दर पटला नाही म्हणून पुढे जाणे (आणि परत पहिल्या वाल्याकडूनच त्याच दरात वस्तू घेणे), बाजूच्या मंदीरातील देवाला रस्त्यावरुनच चप्पल काढून हात जोडणे, सगळी ओझी सांभाळत चालत घरी येणे,  माल खराब निघाला तर दुस-यादिवशी बदलून घेणे त्यासाठी भांडण करणे , येताना आणि चार नवीन गोष्टी आणणे

हु:श दमलो / दमले  म्हणत परत घरात आईला मदत करणे

मस्त बाजारहाट असायचा तो. त्याची मजा माँल मधील अलिप्त वाटणा-या खरेदीला नाही, आँनलाईन खरेदीला तर नाहीच नाही. आँन लाईन खरेदी मधून “हाती आले ते पवित्र झाले ” या न्यायाने जी काही वस्तू आली ती स्विकारायची. काही कारणाने बदलायची झाल्यास ” भिक नको पण कुत्र आवर ” अशी परिस्थितीत.  त्या सगळ्या प्रोसीजर पेक्षा परत बाजारात जाऊन प्रत्यक्ष परत नवीन वस्तू आणलेली एकवेळ परवडेल. पण अर्थात श्रम / त्रास यातून थोडी मुक्तता मिळते हे नक्की

पण पारंपारिक बाजारहाट ची मजा काही वेगळीच होती हे नक्की आणि आपल्या पिढीने मस्त एन्जाॅय केला बाजारहाट, बरोबर ना?

(बाजार उठवणारा) अमोल ?

©  श्री अमोल अनंत केळकर

२२/०५/२१

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वर्गाची करन्सी.. – सौ. वर्षा विनायक पांडे ☆ प्रस्तुति – सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ स्वर्गाची करन्सी !!! ☆ प्रस्तुति – सौ.स्मिता पंडित ☆ 

एक Industrialist होता..अतिशय धन्याढ्य…!! भरपूर गाड्या, बंगले, कंपन्या…काही म्हणता कशालाच काही कमी नव्हतं…

एक दिवस, गाडीमधून कंपनीत जाताना, त्याने ड्रायव्हरला रेडीओ लावायला सांगितला…कुठलं तरी अधलं-मधलं चँनेल लागलं. चँनेलवर एकाचं काही अध्यात्मिक बोलणं चालू होतं…तो प्रवचक बोलत होता,” मनुष्य, आयुष्यात भौतिक अर्थाने जे काही कमवतो, ते सर्व काही म्रुत्यूसमयी त्याला इथेच सोडून जावं लागतं…तो त्यातले काही म्हणजे काहीच घेऊन जाऊ शकत नाही…..”

या बिझनेसमँननी हे ऐकल्यावर तो एकदम अंतर्मुख? झाला……एकदम सतर्क? झाला….

त्याला एकाएकी जाणवलं, डोक्यात लख्खकन् प्रकाश ?पडला की आपण जे काही प्रचंड वैभव?????? उभारलं आहे त्यातला एकही रूपया मरताना आपण आपल्या पुढल्या जन्मासाठी घेऊन जाऊ शकत नाही….

सर्वकाही इथेच सोडून जावं लागणार आहे…

त्याला एकदम कसंतरीच झालं. तो कमालीचा अस्वस्थ? झाला….

आँफीसमधे पोहोचल्यावर त्यानी emergency meeting बोलावली. झाडून सगळे सहाय्यक, सचीव, सल्लागार, सेक्रेटरी, कायदेतज्ञ बोलावले आणि जाहीरपणे सांगितलं की,’ मी ही अगणित संपत्ती मिळवली आहे, ती मी मरताना माझ्याबरोबर घेऊन जाऊ इच्छितो..तर मी ते कसे घेऊन जाऊ शकतो, ते मला नीटपणे, विचारपूर्वक सांगा…’

सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले की आज साहेब हे काहीतरी असंबध्द काय बोलतायेत!? मरताना तर कुणालाच काही बरोबर नेता येत नाही..हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि हे तर ढिगभर संपत्ती न्यायची भाषा बोलतायेत…हे जमणार कसं?

साहेबांनी सर्वांना शोधकार्य करायला सांगितलं…… बक्षिसे जाहीर केलं की जो कुणी मला यासाठी 100% प्रभावी पध्दत सांगेल, त्याला मी बेसुमार संपत्ती बहाल करीन…

जो तो पध्दत शोधायचा प्रयत्न करू लागला, माहीती काढू लागला..पण काही जमेना..प्रत्येक जण अथक प्रयत्न करत होता..पण उत्तर काही सापडत नव्हतं… बिझनेसमन दिवसागणिक उदास होत होता, त्याला हरल्याप्रमाणेच वाटू लागलं की मी का हे सर्व बरोबर नेऊ शकत नाही..? म्हणजे मी हे सर्व इथेच सोडून जायचं? का? मला न्यायचंय हे सर्व..जे मी मेहनतीने मिळवलंय….ते मला का नेता येऊ नये?..त्याला काही सुचेना..

मग त्यांनी यासाठी जाहीरात दिली….भलंमोठं बक्षिस ठेवलं…पण उत्तर सापडेना…

एक दिवस, अचानक एक माणूस या बिझनेसमनच्या आँफिसमधे आला..’साहेबांना भेटायचंय’.. म्हणाला..

बिझनेसमननी त्याला केबिनमधे बोलावलं…तो म्हणाला,’ माझं नाव श्याम……..  मला तुम्हांला काही विचारायचंय..मगच मी यावर काही उत्तर सांगू शकेन…’

बिझनेसमन म्हणाला,’ विचार……’

याने विचारलं की,’ साहेब, तुम्ही अमेरीकेला गेलाय..!?’

‘हो…’ इति बिझनेसमन…

‘खरेदी केलीये तिथे!?…श्यामने विचारले..

‘हो…’ – बिझनेसमन

‘पैसे कसे दिलेत…!? – इति श्याम

‘कसे म्हणजे..!? आपले पैसे देऊन अमेरीकन dollars विकत घेतले व दिले…इति बिझनेसमन…

बाकी आणखी कुठल्या कुठल्या देशात गेलात, खरेदी केलीत आणि काय काय currency वापरलीत?

आँस्टेलियाला आँस्ट्रेलिअन dollar

सिंगापूरला सिंगापूर dollars

मलेशियाला रिंगिट

जपानला येन

बांगलादेशला टका

सौदी अरेबियाला रियाल

दुबईला दिरहम्स

थायलंड बाथ

युरोपला युरो

म्हणजेच  ज्या ज्या ठिकाणी जी जी म्हणून currency चालते, तीच घ्यावी लागते व वापरावी लागते…….बिझनेसमन म्हणाला..

‘म्हणजे तुमच्याकडे असलेले पैसे हे सर्व ठिकाणी जसेच्या तसे चालत नाहीत..तर ते तुम्हांला देशानुरूप, जागेनुरूप  बदलून घ्यावे लागतात. जिथे जिथे, जी जी currency आहे ती ती, तुमच्याकडचे रूपये देऊन बदलून घ्यावी लागते…

‘बरोबर…’ – बिझनेसमन

मग त्याच न्यायाने तुम्हांला तुमचे पैसे देऊन त्याबदली स्वर्गाची करन्सी देखिल विकत घ्यावी लागेल…..तिथे तुमचे रूपये कसे चालतील!? – श्याम म्हणाला..

‘मग…!?’ बिझनेसमनने कुतूहलाने विचारले….

तिथे ही करन्सी चालणार नाही कारण स्वर्गाची करन्सी आहे    “‘पुण्य..!” आणि तिथे तीच तुम्हांला घ्यावी लागेल आणि मगच तुम्हांला वापरता येईल..!

तेव्हा तुमच्याकडचे पैसे हे तुम्हांला ‘पुण्य’ नावाच्या करन्सीमधे convert करून घ्यावे लागतील…मगच ती बरोबर नेता येईल..आणि तिथे वापरता येईल…

बिझनेसमनच्या डोक्यात आता जास्त लख्ख? प्रकाश पडला की शेवटी बरोबर न्यायला ‘पुण्यच’ कमवायला हवं!

इथली करन्सी अशीच convert करावी लागेल की जी पुण्यांमधे convert होऊन मिळेल…….

आणि असा काही विचार- वर्तन, आचरण करावं लागेल की जे जाताना पुण्याच्या रूपात बरोबर नेता येईल!!

बिझनेसमनच्या प्रश्नाला यथार्थ उत्तर मिळालं होतं…तो श्यामच्या पायाच पडला….त्याला  यथोचित बक्षिस दिले आणि सत्कार केला…!!

आणि मनोमन ठरवलं की या भूतलावर जगण्यासाठी जे काही मिळवतो आहे…मिळवलं आहे..ते आता ‘पुण्य’ नावाच्या currency मधे रूपांतरीत करून घ्याचचं…आणि ते शेवटपर्यंत करतच राहायचं…

वरती जाताना घेऊन जायला!!!!

संग्राहक – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खरी श्रीमंती…भाग 2 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? विविधा ?

 ☆ खरी श्रीमंती…भाग 2 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

………..दुःखी माणसाचे दुःख कमी करणे, श्रीमंताने गरीबांची गरीबी कमी करणे ही श्रीमंती. चांगल्या गोष्टींची योग्य पारख ही श्रीमंती.

भाग-२

अशी श्रीमंती सर्वांना लाभावी असे क्षण आपल्या आयुष्यात यावेत. ते अनुभवायला मिळणे ही श्रीमंती. आपल्या आसपास भरपूर चांगली माणसे असावीत आणि आपण खरच श्रीमंत व्हावे. मनमोकळ हसावं बोलावं म्हणजे खरी श्रीमंती. सुंदर निरोगी आरोग्य ही श्रीमंती आणि अशा श्रीमंतीने मिळणारं समाधान हेच श्रीमंतीचं खरे दुसरे नाव होय. लहान बाळाकडे पाहील्यावर मिळणारा आनंद ही श्रीमंती कशी हे मी ते माझ्या एका कवितेत वर्णन केले आहे.

बाळ

बाळ किती छान

गोरं गोरं पान

गुलाबासारखे गाल

ओठ किती लाल

खोडकर स्वभाव

मिश्कील हसणं

निरागस डोळे हसरे छान

सर्वांना देते आनंदाचे दान

तसेच मनाच्या श्रीमंतीचे/मोठेपणाचेही वर्णन, मनाच्या विशालतेचे वर्णन अनेकांनी केले आहे. ते मीही केले आहे.

मन

मन हे अतीविशाल

त्याचा नाही ठाव

शब्दानाही शक्य नसे

सांगावया त्याचा भाव

वेग त्याचा अपार

तया नसे जराही उसंत

रुप त्याचे अरुप,स्वरूप

ते असे अनादी ,अनंत

असे तया प्रेमक्षुब्धा

परसुखाशी ते झुरते

सौंदर्य मनाचे संस्कारानीच ठरते

विशाल मन हिच खरी श्रीमंती

समाधानी व्रुत्ती हिच खरी श्रीमंती

त्याचप्रमाणे आपल्याला संकटात मदत करणारे मित्र/नातेवाईक हवे व आपल्या आनंदात/यशात त्यांनी सहभागी व्हावे व आपणही त्यांच्या उपयोगी पडावे, आनंदात दुःखात सहभागी व्हावे. मन मोकळ करायला, गावाहून आल्यावर चहा-पाणी विचारणारा, विश्वासाने किल्ली, निरोप, पत्र ठेवून घेऊन आठवणीने देणारा शेजारी मिळणे ही खरी श्रीमंती. यातही वेगळच समाधान मिळते. आपण जन्म दिलेली मुलं चांगली निघणं,शिक्षण घेऊन योग्य मार्गाला लागणे व त्यांनी आईवडिलांना म्हातारपणी नीट वागणूक देणे हीसुद्धा एक श्रीमंतीच मानायला हवी. चांगली सुन मिळणे हीसुद्धा एक श्रीमंती होय.अशा प्रकारची श्रीमंती मिळणे हे पुर्वजन्मीचे पुंण्यच  होय.

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

?मनमंजुषेतून ?

☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

ढेबेवाडी! एक टुमदार लहानसं खेडं! त्या गावातील बस स्टॅण्ड जवळच एक लहानसं तळं होतं. पाऊस चांगला झाला तर ते थोडं तलावासारखं दिसे. एरवी वर्षभर  ते  डबकं असे. या तळ्याच्या काठावर मोठे मोठे खडक होते. जवळच एक वडाचं झाड होतं. पंचायतीच्या मदतीने झाडाभोवती एक पार बांधला होता.झाडाची सावली खडकांच्या काही भागांवर पडत असे.झाडाच्या चारी बाजूंनी पारंब्या लोंबत होत्या. सकाळी गावातल्या बायका धुणीभांडी करायला येत. संध्याकाळी पुरुष लोकांची बैठक असे पारावर.गावातल्या मुलांसाठी हे एक प्रकारचं जिमच होतं म्हणा ना!

आज ऊन्हाचा तडाखा काही वेगळाच होता. उन मी म्हणत होतं. झाडाचं एकही पान हलत नव्हतं. एस. टी स्टँड च्या पायऱ्यांवर बसलेला लंगडा भिकारी कुणीतरी दिलेला पावाचा कोरडाच तुकडा खात होता. खाऊन झाल्यावर त्यानं हात अंगातल्या घामानं भिजलेल्या कळकट्ट शर्टच्या बाहीला पुसला. त्याच हातानं त्यानं कपाळावरुन खाली ओघळलेला घामही पुसला. पावाचे कण त्याच्या घामानं चिकचिकलेल्या गालाला चिकटले.आता त्याला तहान लागली . शेजारी पायरीला टेकवून ऊभी केलेली काठी त्यानं उजव्या हातानं पकडली. लंगडत लंगडत काठी ओढत तो समोरच्या कोपऱ्यातल्या नळावर गेला.अशक्त , कृश, ऊजवा पाय वर करुन , काठी आधारासाठी काखेत धरून त्यानं तोटी फिरवली. किं. . ‌ . किं. . किं. . करत नळ उघडला.आपली हाताची ओंजळ तोल सावरत तोटीला लावली. ओणवा होऊन त्यानं तोंड ओंजळीपर्यंत नेलं. पाण्याचे काही थेंब त्याच्या हातावर सांडले. नळ भकास तोटी करून त्याच्या ओंजळीकडं कोरडाच बघत होता.आपलं तोंड ओंजळीला लावून ते थेंब तीर्था सारखे त्यानं चाटले. वडावरचे दोन कावळे कर्कश काकसूर लावत उडाले.धाडधाड आवाज करत दोनची एस. टी. स्टॅंडवर आली. त्या लाल डब्याच्या खिडकीच्या काचा खणखाण आवाज करत ओरडल्या. कंडक्टर धाडकन दार उघडून उतरला. त्यानं शिट्टी कर्कश्शवाणी वाजवून एस. टी. मागं घेतली. पुण्याच्या थांब्यावर आणून थांबवली. एस. टी च्या लाला पिवळ्या पत्र्यावर हातानं थाड थाड वाजवून ड्रायव्हरला ब्रेक लावायचा इशारा दिला.एस. टीनं मागच्या धुराड्यातून काळा गरम धूर सोडला. भस्स भस्स आवाज करत , श्वास टाकत तिचा वरखाली होणारा ऊर हळूहळू शांत झाला. ड्रायव्हरनं त्याच्या सीटवरून खाली ऊडी मारली.त्याच्या बाजूचं अर्धं दार खाडकन उघडून थाडकन बंद केलं. खिडकीची आधीच खिळखिळी झालेली , तुटलेली काच आपलं अस्तित्व दाखवत आवाज करत खुडमुडली.

आपले नाकावर नसलेले मास्क कानाच्या खुंटीवरून काढून दोघं चहाच्या टपरीकडं वळले.

एवढा वेळ बाकड्यावर वाट बघत बसलेले सरपंच, उपसरपंच, कोरोनाची पुण्यातली ताजी खबर ऐकायला पोट आणि पोटावरून घसरणारी पॅंट सावरत टपरी कडं पळाले. लगोलग चार-पाच जणांचं टोळकं तयार झालं. कोरोनच्या बातम्या रंजकतेनं सांगितल्या जाऊ लागल्या. स्टार माझा किंवा आजतक पेक्षा जास्त रंजक, भडक, अतिरंजित आणि धडकी भरवणाऱ्या होत्या.

गण्या, परशा आणि वासू थोडा वेळ ऐकत थांबले.

नंतर ते तळ्याकडं गेले. पाण्यात पाय सोडून ते खडकावर बसले.

त्यांच्या गावात अजूनही कोरोनाचं पाऊल पडलं नव्हतं. पण सायन्सच्या मोघे सरांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात होत्या. या महामारीचं गांभीर्य त्यांना समजलं होतं. ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू, ऑक्सिजन गळती, हॉस्पिटलमध्ये सातत्यानं होरपळणारे पेशंटस्. बातम्या ऐकून आज त्यांचा सूर पारंब्या चा खेळ थांबला होता. पाण्यात भाकरी ऊठत नव्हत्या. लहान लहान पावलं स्थिर होती. पाण्यात हलवून लाटांचा आवाज सुध्दा करत नव्हती.

वासूचा चेहरा खूपच गंभीर झाला होता.

तो म्हणाला, “काहीतरी करायला पाहिजे गड्या.”

परशा, जा बर, आपल्या सगळ्या दोस्तांना बोलव इकडं”

परशानं ओळखलं, वासूच्या डोक्यात काही तरी शिजतय. तो पळालाच. पळता पळता तो हाका मारत होता. “ए गंम्प्या, ए, मन्या या रे तळ्यावर.”

“अरे एक राजा चल की. वाश्या बोलवतोय बघ.”

थोड्याच वेळात वडाखाली वानरसेना जमली. सावल्या लांब होईपर्यंत चर्चा सुरू होती. टोळक नंतर मोघे सरांच्या घराकड गेलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठची गाडी गावच्या वेशीवर च आडवली गेली. वासू, गण्या, परशा बरोबर त्यांचे बरेच शाळासोबती रस्ता अडवून ऊभे होते. ड्रायव्हरला गाडी थांबवावीच लागली. कंडक्टर खाली उतरला. वासू त्याच्याशी काही बोलला. गाडी तून एक एक पॅसेंजर खाली उतरु लागले. गण्या थर्मल गन घेऊन ऊभा होता. परशा  प्रवाशांनी मास्क नीट घातलाय ना हे बघू लागला.

वासू प्रत्येकाच्या बोटाला oxymeter लावून बघत होता. राजा तेवढ्यात भाषण ठोकून कोरोनाच्या सोवळ्याचे नियम सांगू लागला.काही मुलांनी गावात, स्टॅंडवर, जिथं जमेल तिथं कोरोनात घेण्याच्या काळजी घे, नियमांचे फलक लावले.आख्ख्या ढेबेवाडीचा नूरच बदलला.सरपंचांनी चावडीवर मुलांना सहकार्य करण्याचं फर्मान  सोडलं.आजही उन्हाळा तोच होता. रखरख तशीच होती. स्टॅंडवर एस. टी तशीच खडखडाट करत येत होती. पण एक सूज्ञ विचारांचा वारा गावात गारवा पसरवत होता. तळ्यातलं पाणी लहान लहान लाटांतून हसत होतं.

वडाखाली गाय शांत झोपली होती. वडाच्या झाडाची हिरवी सळसळ वाऱ्याबरोबर आनंद तरंग पसरवत होती.

 

सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत~महाराष्ट्राची लोककला – पोवाडा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

 

? सूरसंगत ?

☆ सूर संगत~महाराष्ट्राची लोककला – पोवाडा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार म्हणजे पोवाडा.

पोवाड्यांत तीन प्रकारची कवने आढळतात

  1. देवतांच्या अद्भूत लीलांचे वर्णन,तीर्थक्षेत्रांचे महात्म्य. – >> हे गायक गोंधळी म्हणून ओळखले जातात.
  2. राजे,सरदार,धनिक यांचे पराक्रम,वैभव,कर्तुत्व इत्यादीचा गौरव आणि त्यांची शौर्य गाथा! ->> ह्या प्रकारातील गायक मंडळीना भाट म्हटले जाते.
  3. लढाई,दंगा,दरोडा,दुष्काळ,पूर आदि घटनांचे रसभरीत निवेदन. ->> ह्या प्रकारातील गायक शाहीर या संज्ञेत मोडतात.

पोवाड्याचे कार्य काही अंशी आजच्या वर्तमानपत्रासारखे होते. घडलेल्या घटनांवर शाहीर लगेचच कवने रचीत आणि पोवाड्याच्या स्वरूपात सादर करीत असत.

पोवाड्याची रचना द्दृष्य वाक्यांची प्रवाही व स्वैर पद्यात्मक असते.बोली भाषेतील जिवंतपणा,ओघ आणि लय ह्यामुळे ती प्रभावी होते.

रचना करतांना लघु गुरू मात्रा मोजल्या जात नाहीत मात्र एकेक चरण चार किंवा आठ मात्रांच्या आवर्तनात गायले जातात.

वीरश्रीयुक्त असा हा गायनाचा प्रकार असल्यामुळे गायकाचा आवाज एकदम खडा,उमदा,टीपेचा असला तरच रसनिष्पत्ती होऊन श्रोतृवृंदात एकप्रकारचा आवेश निर्माण होतो.हा प्रकार गद्य आणि पद्यमिश्रित असल्यामुळे उच्चरवातील संवाद व दमदार गायन हे पोवाड्याचे वैशिष्ठ्य आहे.

शिवाजी, महाराष्ट्राचा जाणता राजा, सर्वांना आदरणीय, त्यामुळे शिवछत्रपतींचे अनेक पोवाडे सतराव्या शतकापासून ते आज एकविसाव्या शतकापर्यंत लिहीले गेले. १६८९ साली शाहीर अज्ञानदासाने जिजाऊंच्या आदेशावरून “अफझलखानाचा वध” हा पोवाडा रचला आणि २००९ साली मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटासाठी अफझलखानाचा वध हा पोवाडा लिहिला गेला.

पोवाड्याची भाषा कशी जळजळीत,तडफदार आणि रांगडी असते त्याचा हा नमूना.

“उठला अफझलखान

जिता जागता सैतान

शिवबाला टाकतो चिरडून?

महाराजांची कीर्ति बेफाम

भल्याभल्यांना फुटला घाम

अशा वाघिणीचा तो छावा

गनिमाला कसा ठेचावा”

तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सिंहगड, धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेले पोवाडे उपलब्ध आहेत.

राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी तानाजीच्या पोवाड्याप्रारंभी जे नमन गायले आहे ते पहा~~

“ओम् नमो श्रीजगदंबे

नमन तुज अंबे

करून प्रारंभे

डफावर थाप तुणतुण्या तान

शाहीर हा महाराष्ट्राचा प्रान

शिवरायाचे गातो गुनगान”

ह्यावरून शाहीराची भूमिका आपल्याला समजते.

डफ,ढोलकी,संबळ,झांजा ही तालवाद्ये तसेच तुणतुणे,पूंगी,घांगळी ही तंतूवाद्ये पोवाडा गाताना साथीला घेतली जातात.

पठ्ठे बापूराव,रामजोशी,कवी अनंतफंदी,होनाजी बाळा,प्रभाकर आणि अगदी आधुनिक काळात अमरशेख,शाहीर साबळे,विठ्ठल उमप इत्यादी शाहीरांची नावे आपल्याला परिचित आहेतच.

पठ्ठे बापूरावांनी मुंबईवर पोवाडा लिहिला होता आणि संगीत सौदागर छोटा गंधर्व यांनी तो गायला होता.

वाचकांसाठी काही पंक्ति देत आहे.

“मुंबई नगरी बडी बाका

जशी रावणाची दुसरी लंका

मुंबई नगरी सदा तरनी

व्यापार चाले मनभरनी”

शाहीर विठ्ठल उमप हे आंबेडकरवादी होते.त्यांनी त्यांच्या रचनांतून अनेक सामाजिक व मानवतावादी प्रश्न मांडले. ‘खंडोबाचं लगीन’,’गाढवाचं लग्न’,’जांभूळ आख्यान’ हे त्यांचे कार्यक्रम फार लोकप्रिय झाले आहेत.

महाराष्ट्राची ही लोककला म्हणजे नुसतेच लोकरंजन नसून समाजप्रबोधनही आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 94 ☆ आत्मसाक्षात्कार – भाग -1 ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 94☆

☆ आत्मसाक्षात्कार – भाग -1 ☆ 

आम्ही कुलिनांच्या कन्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात अखिल भारतीय महिला दिनाच्या निमित्ताने साहित्यदीप संस्थेचं  कवयित्री  संमेलन होतं, सूत्रसंचालन कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी करत होती.. मृणालिनी प्रत्येक कवयित्री ची ओळख करून देताना ज्येष्ठ कवयित्रींच्या कवितेतील ओळींचा आधार घेऊन त्या कवयित्रीच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत होती.

मृणालिनीची निवेदनाची ही पद्धत खुपच छान  होती, ती कवितेविषयी न बोलता  कवयित्री विषयी बोलत होती…..माझ्या विषयी बोलताना  ती म्हणाली, प्रभा ताईंना पाहून मला पद्मा गोळेंच्या ओळी  आठवतात, “आम्ही कुलिनांच्या कन्या, चाफेकळ्या पानाआड…….”

मी सुखावले आणि आयुष्याचं  सिंहावलोकन करू लागले….

माझा जन्म सधन शेतकरी-बागाईतदार कुटुंबातला शहाण्णव कुळी मराठा घराणं, आजोबांची पंचक्रोशीत पत प्रतिष्ठा होती. वडील वर्षानुवर्षे गावचे पोलिस पाटील होते. खरंतर आम्ही नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या वडनेर या गावचे वतनदार पण आजोबांची बहिण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या पिंपरी -वाघाळे या गावातील सरदार पवार यांची पत्नी, सरदार पवार देवास(म.प्र.) येथे वास्तव्य करून होते पण पतिनिधनानंतर आजोबांची बहिण (आम्ही त्यांना मासाहेब म्हणत असू.) त्या त्यांच्या वतनाच्या जमीनी असलेल्या वाघाळे -पिंपरी या गावात आल्या, पवारांचे मामा म्हणून सगळे गाव आजोबांना मामा म्हणत असे. बहिणीच्या गावला आजोबांनी आपली कर्मभूमी मानली, तिथे स्वकष्टाने शेकडो एकर जमीन खरेदी करून तिथे फळांच्या बागा लावल्या. माझा जन्म झाला तो काळ खुप वैभवशाली, ऐश्वर्यसंपन्न काळ होता. आजोबांच्या तीन बहिणी देवास, बडोदा, सूरत येथे राजघराण्यातल्या सूना , माझ्या दोन आत्याही देवास व बडोदा येथील संस्थानिकांच्या घरातच नांदत होत्या.

जमीन जुमला, गाई म्हशी, घोडे, मोठा दगडीवाडा, नोकर चाकर अशा सरंजामशाही वातावरणातला माझा जन्म !त्या गावातला आमचा रूबाब काही वेगळाच होता….पण ते एक लहान  खेडेगाव असल्यामुळे चौथी पर्यंतच शाळा होती म्हणून आम्हा मुलांच्या शिक्षणासाठी माझी  आई माझ्या माँटेसरी पासून पुण्यात आम्हा सख्ख्या चुलत पाच भावंडांना घेऊन  बि-हाड करून राहिली होती.

आम्ही सुट्टीत गावाकडे जात असू, आमच्या वाड्याच्या शेजारी  एक गुजराती कुटुंब रहात होतं, त्यांचं किराणा मालाचं छोटसं दुकान होतं, त्या कुटुंबातल्या चंपा आणि शांतू या मुली वयाने माझ्या पेक्षा मोठ्या होत्या पण मी त्यांच्या घरी जात असे आणि त्या हंड्यावर हंडे घेऊन पाणी आणायला विहिरीवर जात त्याचं मला खुप कौतुक वाटत असे. त्या ओढ्यावर कपडे धुवायला चालल्या की मीही त्यांच्या बरोबर ओढ्यावर जाऊन पाण्यात खेळत असे, एकदा चंपा, शांतू बरोबर ओढ्यावर गेले असताना आमची मोलकरीण कमल मला बोलवायला आली, घरी आल्यावर आजीने समज दिली, “त्या चंपा शांतू बरोबर जात जाऊ नको, गावातले लोक नावं ठेवतील, मोठ्या घरची पोरगी ओढ्यावर हिंडती!”

मृणालिनी कानिटकर म्हटल्या प्रमाणेच, मी जन्माने कुलिनांच्या घरातली कन्या होते हे नक्की!

…….त्याचे फायदे तोटेही अनुभवले

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खरी श्रीमंती…भाग 1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?विविधा?

 ☆ खरी श्रीमंती…भाग 1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

खरी श्रीमंती म्हणजे मनाचे समाधान

श्रीमंतीचं दुसरं नाव म्हणजे समाधान होय.माझ्या मते ‘श्रीमंती’ ही फक्त बाह्यांगावरच अवलंबून नसून ती मनाच्या अंतरंगावर व मोठेपणावर जास्त अवलंबून आहे. घर,फर्निचर, भरपूर पैसा, इस्टेट, दागदागिने म्हणजे श्रीमंती का? आई-वडील, जेष्ठ मंडळींची हेडसाळ, भावंडामधे एकाच तोंड पुर्वेला तर दुसऱ्याचं पश्चिमेला अशी विरुद्ध परिस्थिती चालेल का? संस्कारहिन तरुण मंडळी चालतील का? घरात देवाची पूजा नाही,एकही सुंदर पुस्तक नाही. मग ते श्रीमंत कसे?या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सुज्ञ माणूस नकारार्थीच देईल हे निश्चित. याचा अर्थ श्रीमंती ही पैशांशी निगडीत नसून ती व्यक्तीच्या मनाशी निगडीत आहे. माणूस पैशांपेक्षा मनाने/विचाराने श्रीमंत हवा त्याचे जगणे सुसंस्कारित हवे. संस्कृतीचा सन्मान करणारे हवे. घाम व श्रम यांची पुजा करणारा माणूस खरा श्रीमंत असे माझे मत आहे.

षडरिपुंना थारा नसणाऱ्या मोठ्या मनाच्या माणसाचे आचरण शुद्ध असते. तेथे व्यसनांना थारा नसतो. माणसाच्या घरात व मनात पवित्र देवघर हवे. त्याचबरोबर सुसंस्कारासाठी ग्रंथ व त्या ग्रंथाचे सार जाणणारा माणूसही घरात हवा. नुकताच अर्थ प्राप्त असून उपयोग नाही तर तसे आचरणही हवे. श्रीमंतीचं दर्शन पवित्र वाटणे ती पाहून मनाला प्रसंनता वाटणे आवश्यक आहे. जिथे माणसामाणसातले संवाद हरवत चालले आहेत तेथे पैशांची श्रीमंती काय कामाची? आजच्या काळात समर्थपणे उत्तर द्यायला मनाच्या श्रीमंतीशिवाय दुसरा पर्याय नाही हेच खरे.

घरात रोज ताजी फुले/फळं असणं म्हणजे श्रीमंती. आज अवचित पाहुणा घरी आल्यावर त्याला मी पोटभर जेवू घालू शकलो आणि तो समाधानाने जेवला तर मी श्रीमंत होय. एखादी वस्तू, गोष्ट माझ्याकडे हवी त्यावेळी नक्की मिळणार हा विश्वास म्हणजे श्रीमंती. मदतीसाठी तेवढ्या विश्वसाने मित्राचा/नातेवाईकांचा फोन येणं याचाच अर्थ ती माझी श्रीमंती. कोण अडचणीत असेल तर त्याला आपली आठवण आली तर मी श्रीमंत.

भर उन्हात घराच्या अंगणात फुललेला गुलमोहोर/गार सावलीचा डेरेदार  व्रुक्ष दिसावा ही नजरेची श्रीमंती. एखाद्याच्या चांगल्या गुणांचे मनापासून कौतुक करणं, त्याला त्याची कला वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे ही उदार मनाची श्रीमंती. थंडीत अंगणभर बुचाची फुले पडावीत तर कधी प्राजक्ताच्या सड्याने अंगण व वातावरण भरून जावं ही खरी श्रीमंती.

होय मला अशीच श्रीमंती हवी.एखादी गोष्ट केल्यानंतर आठवण ठेवून एखाद्या विशिष्ठ व्यक्तिसाठी राखून ठेवणे व आठवणीने देणे ही वेगळीच श्रीमंती होय.एखादे सुंदर द्रुश्य किंवा भगवंताचे रुप पाहील्यावर त्याचे कवितेत, सुंदर शब्दात वर्णन करता येणे ही बुद्धिची श्रीमंती. यशाचा आनंद सर्वांनी एकत्र मिळून लुटणे हीसुद्धा श्रीमंतीचं. दुसऱ्याच्या आनंदात आपले दुःख बाजूला ठेवून विसरून त्यांचा आनंद द्विगुणित करणे ही श्रीमंती. दुःखी माणसाचे दुःख कमी करणे, श्रीमंताने गरीबांची गरीबी कमी करणे ही श्रीमंती. चांगल्या गोष्टींची योग्य पारख ही श्रीमंती.

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चक्री वादळ… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ चक्री वादळ… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

चक्रीवादळाच्या नावांचा रंजक इतिहास  – कॅटरिना, नर्गिस, नीलम, निलोफर अन् लैला… संकलन – श्री साहेबराव माने. पुणे.

कॅटरिना, नर्गिस, निलोफर, लैला ही नावे आहेत चक्रीवादळाची. या चक्रीवादळांना अनेक मजेशीर नावे असून, त्यांचा इतिहासही रंजक आहे. किनारपट्टीवरच्या लोकांना वादळाचा धोका कळावा म्हणून अशी नावे देण्याचा ट्रेंड सुरू झाला. बंगालच्या उपसागरात येणार्‍या वादळाचे बारसे घालण्याचे काम पूर्वी आठ देश करीत असत; पण आता एकूण 14 देश करतात. आता आलेल्या  चक्रीवादळाला तोक्ते हे नाव म्यानमार देशाने दिले आहे.

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील नावे ठरविण्याचा अधिकार भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या आठ देशांना जागतिक हवामान संघटनेने बहाल केला.  भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू अशी मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील नावे दिली, तर पाकिस्तानने नर्गिस, निलोफर, नीलम, लैला अशी अभिनेत्रींची नावे दिली. कॅटरिना हे नाव अमेरिकेने दिले आहे.

आठ देशांनी दिली 64 नावे ः  भारत : अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू. बांगलादेश : ओनिल, ओग्नी, निशा, गिरी, हेलन, चंपाला, ओखी, फनी. मालदीव : हिब्रू, गोनू, ऐला, कैला, मादी, रोनू, मेकुनू, हिक्का. म्यानमार : प्यार, येमयीन, फॅन, ठाणे, नौक, कँट, दाय, कायर, तोक्ते.ओमान : बाझ, सीदर, वर्ड, मृजन, हुडहुड, नाडा, लुबन, महा. पाकिस्तान : पुनूस, नर्गिस,  लैला, नीलम, निलोफर, वरध, तितली, बुलबुल. श्रीलंका : माला, रश्मी, बंडू, वियारू, अशोबा, मरूथा, गज, पवन. थायलंड : मुकदा, खाई-मूक, फेट, फायलीन, कोमेन, मोरा, फेथाई, आंफन  बंगालच्या उपसागरात गतवर्षी आलेल्या आंफन महाचक्रीवादळाला  थायलंड देशाने नाव दिले. 20 वर्षांतील हे सर्वात मोठे हे वादळ होते. जी वादळं प्रचंड नुकसान करून जातात, त्यांची नावे यादीतून कायमची काढली जातात. 2005 साली अमेरिकेतील न्यू एरोलिना प्रांतात आलेल्या ‘कॅटरिना’ वादळाने प्रचंड नुकसान केले, त्यामुळे ते नाव यादीतून काढले आहे. भारताने गती, तेज, मुरासू, आग, व्योम, जहर, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, गुरूनी, अंबुद, जलाधी, वेग अशी 13 नवी नावे दिली आहेत.

तोक्ते म्हणजे सुरेल आवाजाचा सरडा..

यंदाच्या हंगामाची सुरुवात तोक्ते नावाच्या चक्रीवादळाने होत आहे. हे नाव म्यानमार देशाने दिले आहे. तेथे तोक्ते नावाचा सरडा सुरेल आवाज काढतो. त्यावरून हे नाव दिले आहे. या वादळाचा वेग ताशी 160 ते 175 कि. मी. राहू शकतो.

संकलन – श्री साहेबराव माने. पुणे.

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ यमपत्नी… – सौ. वर्षा विनायक पांडे ☆ प्रस्तुति – सुश्री संध्या पुरकर

? वाचताना वेचलेले ?

☆ यमपत्नी… – सौ. वर्षा विनायक पांडे ☆ प्रस्तुति – सुश्री संध्या पुरकर ☆ 

आपण आजवर सर्व देवांच्या “सौं.” चे म्हणजे देवींच्या  बद्दल ऐकले आहेच पण यमाची यमी नेहमीच दुर्लक्षित राहिली. एक वर्षापासून जिचा नवरा अहोरात्र कामावर आहे अश्या या “यमपत्नी” चे मनोगत ऐकायला नको का..?

लेखिका : सौ. वर्षा विनायक पांडे, लक्ष्मीनगर, नागपूर

यमिणबाई म्हणाल्या यमाला आता कंटाळले बाई,

किती तुमचे टार्गेट्स, घरी येण्याची नाही तुम्हाला घाई..

 

तुम्हाला ऑर्डर देणारा तो भगवंत,

घरात स्वतः आहे निवांत..

 

बालाजी तिरुपतीत उभा,

मारुतीचा आतल्या आत नुसताच त्रागा..

 

विठ्ठल आहे रुक्मिणी संग,

होत नाही शंकराची समाधी भंग..

 

सरस्वतीच्या वीणेच्या शांत आहेत तारा,

लक्ष्मी शांततेने घालते विष्णूला वारा..

 

सगळे करतायत “वर्क फ्रोम होम”,

तुम्ही मात्र सतत “नॉट ऍट होम”..

 

सगळे कसे जोडी जोडीने बंद मंदिराच्या दारात,

तुम्ही आपले सतत पुढच्या “पिक-अप” च्या विचारात..

 

अश्या कश्या सगळ्या यंत्रणा माणुसकीला झाल्या फितूर,

तुम्ही दवाखान्याबाहेर एकेकाला उचलण्यास आतुर..

 

तुमच्या वागण्याचं बाई आजकाल मला काही कळत नाही,

तुमच्या कामाला नियम, पद्धत काही राहिलीय की नाही..

 

ऍम्बुलंस, विमान, गाड्या-घोड्या आणि अगदी ऑटोमधुनही घालताय तुम्ही राडा,

जाऊ द्या ना यमदेवा, बरा आहे ना आपला संयमी आणि संथ रेडा..

 

उचलाउचलीचे हे सत्र आता तुमचे पुरे झाले,

आपल्या सात पिढ्यांचेही टार्गेट आता पूर्ण झाले..

 

पुरे झाले काम आता आवरा तुम्ही स्वतःला,

पांढऱ्या चादरीच्या सोबत राहून काळा रंग ही मलूल झाला..

 

काय होता तुम्ही, केवढी होती तुमची शान,

पण अशा अतिरेकी वागण्याने घालवला तुम्ही तुमचा मान..

 

घरातले कर्ते हात उचलण्यात कोणता आहे पुरुषार्थ,

कोरोनाला उचलून दाखवा आणि सिद्ध करा तुमचे सामर्थ्य..

 

सिद्ध करा तुमचे सामर्थ्य …………….. ??

 

संग्राहक –  सुश्री संध्या पुरकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print