मराठी साहित्य – विविधा ☆ स्वातंत्र्य ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ स्वातंत्र्य ☆ डॉ मेधा फणसळकर 

आज ठरवलच आहे मी स्वतंत्र होणार! किती दिवस हे सगळे सहन करु? पण मी स्वतंत्र झाले तर माझे हे दोन बछडे राहतील माझ्याशिवाय? पण बाबा आहेच की त्यांची काळजी घ्यायला. त्यालाही कळू दे आपली जबाबदारी! इतके दिवस मीच सांभाळत आलीय सगळे. घर- दार- सासू- सासरे- पै पाहुणे मीच ओढत होते रामरगाडा! त्याची किंमत तर नाहीच, पण आपल्याला घरच्या कामवाल्या बाईपेक्षाही कमी किंमत दिली जातीय! व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य या सगळ्या बेगडी कल्पना आहेत. लग्नापूर्वी याच कल्पना किती पोटतिडकीने मांडत मी अनेक वक्तृत्व- वादविवाद स्पर्धा गाजवल्या. तीच मी आज माझ्याच स्वातंत्र्यासाठी झगडतेय.पण आज ठरवलंय मुक्त व्हायचे ! तुटतंय जरा पोटात पिल्लांचा विचार करुन! पण शिकतील तीही कधीतरी स्वतंत्रपणे जगायला! मी मात्र पक्क ठरवलंय आज स्वतंत्र, मुक्त व्हायचे या पाशातून …….

आशिष

जमणार आहे का मला तो NEET चा अभ्यास करणे? नाही आवडत मला तो biology विषय! समोर घेतलाच की झोप यायला लागते. पण तो सोडून मला नाही चालणार! आमचे पूर्ण घराणे डॉक्टरांचे! मग परंपरा कशी मोडायची? मला मेडिकललाच जावे लागणार असे पप्पांनी निक्षून सांगितले आहे. मम्मीचा पण तोच आग्रह आहे. ती बिचारी तर हॉस्पिटलमध्ये काम करुन दमून येते, पण माझ्यासाठी पुन्हा रात्री जागते.अरे यार! पण नाही मला हा अभ्यास करायला आवडत! त्यापेक्षा मला माझ्या आवडीचे व्हायोलिन का नाही शिकून देत? पण आता मात्र ठरवलंय मी की या सर्वांतून मुक्त होणार!मम्मी-पप्पांना वाईट वाटेल खूप! पण मला नाही पूर्ण करता येणार त्यांच्या अपेक्षा!म्हणूनच मी स्वतंत्र व्हायचे ठरवलंय! मी घरातूनच अशा ठिकाणी निघून जाईन की नाहीच शोधू शकणार कोणी मला! मी मुक्त होणार…. मी स्वतंत्र होणार …..

नाना- नानी

काय मिळवलं आम्ही मुलाला एवढे उच्च शिक्षण देऊन? परिस्थिती नसतानाही पै पै जमवून याला अमेरिकेला पाठवले. वाटले होते की म्हातारपणी तरी सुखात, आरामात आयुष्य जगता येईल. पण पोटच्या पोरालाच आम्ही जड झालो, तिथे दुसऱ्या घरातून आलेली ती मुलगी का आम्हाला प्रेम देईल? या वृद्धाश्रमाच्या चार भिंतीत फार कोंडल्यासारखं वाटते. आम्हाला स्वतंत्र व्हायचंय, स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मनासारखं जगायला आवडेल आम्हाला! मिळवू शकू का आम्ही ते स्वातंत्र्य?

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन!

त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात आतल्या कोपऱ्यात तीन बातम्या होत्या….

* शहरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेची गळफास लावून आत्महत्या!

* शहरातील एका प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक दाम्पत्याच्या १२वीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरी हाताची नस कापून घेऊन आत्महत्या!

*शहरातील एका वृद्धाश्रमातील दाम्पत्याची विष खाऊन आत्महत्या !

मिताली, आशिष आणि नाना-नानी स्वातंत्र्यदिनादिवशीच स्वतंत्र झाले होते.त्यांना हवे होते ते स्वातंत्र्य त्यांनी मिळवले?

 

©️ डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेच्या किड्याची  शरीर रचना (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेच्या किड्याची  शरीर रचना (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

आजच्या भागात जाणून  घेऊया  लाखेच्या  किड्याची शरीर रचना.  लाखेच्या  किड्यात नरकिडा आणि मादी किडा अशी दोन लिंगे असतात.  नर  आणि   मादी  लाख किड्यांच्या  बाह्य  शरीर  रचनेत,  आकारमानात  आणि  काही  अवयवांमध्ये फरक असतो.  नर लाख किडा  हा आकारान मोठा आणि  लाल रंगाचा  असतो.  शरीराचे  डोके, वक्ष आणि  उदर असे  भाग  होतात.  डोक्याला स्पर्शिकांची (जशा झुरळाला असतात.) एक  जोडी  आणि  डोळ्यांची एक  जोडी  असते.  या किड्याला मुखांगे (हे असे अवयव असतात जे अन्न ग्रहण करण्यास आवश्यक असतात.) नसतात. त्यामुळं  हा नर लाख किडा  खाऊ  शकत नाही. वक्षाच्या खालील  बाजूस तीन पायांच्या  जोड्या  असतात.  पंख असतातच  असं  नाही.  उदर हा शरीराचा  सर्वात  मोठा  भाग  असतो.   उदराच्या पश्च  टोकाला पुरुषांचे जननेंद्रिय असते.  आता जाणून घेऊया मादी लाख किडा कोणती  वैशिष्टे  दाखवितो. मादी  शरीराने लहान असते.  तिच्याही डोक्याला  स्पर्शिकांची एक  जोडी  असते.  तशीच  एक  सोंडही असते.  मादी लाख किड्याला डोळे  नसतात. मादी लाख किड्याला पंख  आणि  पायही नसतात. यामागचं  कारण ही तसंच  मजेशीर  आहे.  मादी अळी एकदा  एका  जागी स्थिर  झाली  की मुळी सुद्धा हलत नाही. वापर न झाल्यामुळं तिचे पाय आणि  पंख दोन्ही  नष्ट  होतात.  युज अँड डिसयुज हे उत्क्रांतितत्त्व  इथं  सिद्ध  झालेलं  दिसतं. या मादी लाख किड्यापासून आपल्याला लाखेचं उत्पादन  मिळते.

आता  आपण  लाखेच्या  किड्याचे जीवनचक्र  कसे असते  हे बघू.  या किड्याच्या जीवनचक्रात अनेक अवस्था  दिसून  येतात. जसं १ डिंभ, २ नर लाक्षाकोष्ठ, ३ मादी  लाक्षाकोष्ठ, ४.पंखहीन प्रौढ नर, ५. पंखयुक्त प्रौढ नर, ६. प्रौढ  मादी, ७. पक्व मादी  लाक्षाकोष्ठ आणि  ८. झाडाच्या  फांद्या वरील  लाखेचा थर.

सूक्ष्म, नावेसारख्या आकाराच्या  लाल रंगाच्या  डिंभापासून या किड्याच्या  जीवनचक्रास सुरुवात  होते.  डिंभाची लांबी शून्य  पॉइंट  पाच मिमी. आणि  रुंदी शून्य  पॉइंट  पंचवीस मिमी. असते.  एक  निकोप  मादी  तीनशे  ते एक हजार डिंभांना जन्म  देते.  डिंभ ही स्वतंत्रपणे  अन्न  मिळवून जगणारी  अवस्था  असं  म्हणता  येईल.  डिंभाचं प्रौढ किड्याशी साम्य  नसते.  (सोयीसाठी इथून पुढे डिंभाचा उल्लेख अळी असा केला आहे)ज्या झाडांवर   या अळ्या वाढतात त्या; म्हणजेच आश्रयी वृक्षांच्या रसाळ, कोवळ्या डहाळ्यांवर त्या  स्थिरावतातही.  आपली सोंड सालीत खुपसून अन्नरस शोषून  घेतात. त्या दाट रेझीनयुक्त द्रव स्त्रवतात. त्या स्त्रावाने त्यांचे  शरीर  आच्छादले जाते.  हा स्त्राव अळ्यांच्या उपत्वचेखाली असणार्‍या ग्रंथींमधून  स्त्रवला जातो. फक्त मुख, दोन  श्वासरंध्रे, आणि  गुदद्वार या भागांवर लाख स्त्रवणार्‍या ग्रंथी नसतात.  अळी अशारितीने  स्वत:च्या स्त्रावाने बनलेल्या कोष्ठाच्या आवरणामध्ये बंदिस्त  होते.  काही  काळानं  सर्व  अळ्यांचा स्त्राव एकरुप होतो. त्यामुळं  डहाळीवर एक  टणक  अखंड  थर तयार  होतो. (त्याच किड्यांचं  जीवनचक्र  पूर्ण  झाल्यावर  आणि  पुढच्या  पिढीतील डिंभ बाहेर  पडण्यास सुरुवात  होण्याच्या  वेळेला  डहाळ्या  कापून  घेतात, वाळवितात  आणि  लाख मिळवण्याची प्रक्रिया  करतात.)

 

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ न फुटणारा आरसा… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ न फुटणारा आरसा… ☆ श्री अरविंद लिमये ☆

वाचणे’ हे दोन अर्थ असणारे क्रियापद.एक एखाद्या संकटापासून,अरिष्टापासून सुटका होणे आणि दुसरा लिखित वाङमय,पुस्तके,संहिता यांचे वाचन करणे.वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘वाचाल तर वाचाल ‘ ही टॅग लाईन ‘वाचणे’या क्रियापदाचे दोन्ही अर्थ सामावून घेत वाचन संस्कृती लयाला जात असताना तिला वाचवू पहातेय. वाचनाचे महत्त्व पटवून देण्यापेक्षाही न वाचाल,तर तुम्ही निर्माण होणाऱ्या संकटांपासून वाचूच शकणार नाही याचा पोटतिकडीने इशारा देते.

वाचनाची आवड जाणिवपूर्वक जोपासणारे त्याचं महत्त्व तर जाणतातच,आणि वाचनातून आनंदही मिळवतात. किंबहुना वाचनाची आवड असणारे आहेत म्हणूनच लिहणारे लिहिते राहू शकतात.

वाचनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी वाचनाकडे पहायचा दृष्टीकोन मात्र निकोप हवा.वाचन हे वेळ घालवायचे साथन नसावे. त्यापासून मिळणारे ज्ञान आत्मसात  करण्याची दृष्टी महत्त्वाची.वाचन फक्त ज्ञानच देत नाही तर जगावे कसे हेही शिकवते.वाचनाची आवड नसणार्ऱ्यांचं जगणं या संस्कारांअभावी झापडबंद होत जातं.माणसांची मनं वाचण्याची कला वाचनाने समृध्द केलेल्या मनाला नकळतच अवगत होत असते.त्यामुळे माणसांना समजून घेणे,स्विकारणे सहजसुलभ घडत जाते.जगाकडे आणि जगण्याकडे पहाण्याचा निकोप दृष्टीकोन सकस वाचनानेच प्राप्त होत असतो.लेखनप्रतिभेची देन लाभलेल्या भाग्यवंतांनीही आपल्या लेखनाचा कस टिकवून ठेवण्यासाठी विविध विषयांवरील इतरांचे लेखन आवर्जून वाचायला हवे.तरच त्यांच्या लेखनातले वैविध्य न् ताजेपण टिकून राहील.

लेखकाला त्याचं अनुभव विश्व लिहिण्यास प्रेरणा देत असतं,तसंच मनाला स्पर्शून  जाणारे लेखन वाचकालाही अनुभवसंपन्न करीत असते. लेखकाचं लेखन एक ‘न फुटणारा आरसा’च असतं. वाचणारा त्यात प्रतिबिंबित होणारं, एरवी दिसू न शकणारं स्वत:चं,स्वत:च्या जगण्याचं प्रतिबिंब अंतर्दृष्टीने  पाहू शकतो.अर्थात त्यासाठी सजग दृष्टीने वाचनाची आवड लावून घेणे न् ती जोपासने हे  महत्त्वाचे असते !

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेचा किडा  (भाग १) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेचा किडा  (भाग १) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

आपल्या  आजूबाजूला  अनेक  सजीव  हालचाल  करताना  दिसतात . काही  डोळयांना  सहज दिसतात  तर काहींच निरीक्षण  सूक्ष्मदर्शक  वापरुन  करावं  लागतं . ऋतुप्रमाणं या जीवांच्या  संख्येत बदल होताना दिसतो. काही किटक कोणत्याही हवामानात तग धरून राहतात. काही किटक मात्र ठराविक हवामानातच जिवंत राहू शकतात.

सुरवंट या किटकाचं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरात रुपांतर होतं. मध चाखायला येणारी मधमाशी, रेशीम देणारे रेशमाचे किडे, शाई बनवण्याच्या कामात उपयोगी पडणारा लाखेचा किडा, परागीकरण करणारे किटक  असे माणसाला उपयोगी पडणारे किटक आहेत.

निसर्गानं माणसाला प्राणी आणि त्यांच्या पासून मिळणाऱ्या गोष्टींच्या रुपात एक अनमोल खजिना दिला आहे. प्राण्यांच्या विचित्र, विलक्षण आणि गुंतागुंतीच्या वर्तणुकीमुळं मानवाला त्यांच्या बद्दल नेहमीच एक औत्सुक्य वाटत आलं आहे. लाखेच्या किड्यानही मानवाचं कुतूहल असंच जागृत केलं.

लाखेचा वापर भारतात अगदी महाभारताच्या काळापासून होत आलेला दिसतो. कौरवांनी कुंतीसह पांडवांना जाळण्यासाठी लाखेचा महाल म्हणजेच लाक्षागृह बांधल्याची नोंद महाभारतात आढळते. अथर्ववेदातही लाखेचा उल्लेख आढळतो. यावरून पुरातन काळी हिंदूंना लाख आणि तिच्या उपयोगा विषयीची माहिती होती हे लक्षात येते.

इ.स. पू. बाराशेच्या सुमारास भारतात लाखेपासून शोभिवंत वस्तू तयार केल्या जात असा उल्लेख आढळतो. सतराव्या शतकातही व्यापाऱ्यांनी लाखेचं रंजकद्रव्य आणि शेलॅक (पत्रीच्या स्वरुपातील लाख ) ही उत्पादनं युरोपीय बाजारपेठेत नेली.

लाखेचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास मात्र बराच ऊशीरा सुरु झाल्याचे लक्षात येते. 1709 मध्ये फादर टाकार्ड यांनी लाखेच्या किड्याचा शोध लावला. 1782 मध्ये केर्र या शास्त्रज्ञानं प्रथम  कोकस लॅका असं नामकरण केलं. इतर  काही  शास्त्रज्ञांनी  ते मान्यही केलं . परंतु  नंतर  एकोणीसशे बावीस  मध्ये श्री . ग्रीन आणि  एकोणीसशे पंधरा मध्ये श्री. चॅटर्जी यांनी  या किड्याला टॅकार्डिया लॅका असं  नाव दिलं. फादर टाकार्डा यांच्या नावावरून टॅकार्डिया आणि  केर्र यांनी  दिलेल्या  नावावरून  लॅका. मंडळी, बघा बरं   “नावात काय नाही ?” नामकरणाची ही पध्दत मोठी  मजेशीर आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांचा सन्मानही झाला आणि  कोणीही  इतिहासाच्या पानावरुन पुसलं गेलं नाही.

लाख  किडा अनेक झाडांवर तसेच  झुडुपांवर आढळतो. किंबहुना या झाडांवर  परजिवी ( parasite ) म्हणून राहतो. म्हणजे या झाडांच्या खोडातील रस शोषून तो आपली उपजीविका करतो. जसं . . . कुसुम, पळस ,  बेर  ,बाबुळ ,खैर अरहर  इत्यादी .

 

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 8 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 8 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझ्या नृत्याच्या प्रवासातील अत्युच्च बिंदू आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलेल्या कोठडीमध्ये त्यांनीच लिहिलेल्या गीतावर आणि माझ्या गुरुं सोबत नृत्य करण्याचा आलेला दुर्मिळ योग. तो परम भाग्याचा क्षण आम्हाला लाभला आणि आमच्या जन्माचे सार्थक झाले.

2011 हे वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धाडशी उडीचे शतक वर्ष. या उच्चकोटीच्या साहसाला मानवंदना देण्यासाठी सावरकर प्रेमी नी स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान पदस्पर्श शताब्दी सोहळा, चार जुलै ते 12 जुलै 2011 या कालावधीत आयोजित केला होता. अंदमानच्या त्या तुरुंगात जाऊन सावरकरांच्या त्या कोठडीला नमन करण्याचे भाग्य ज्या निवडक भाग्यवंतांना लाभले त्यापैकी आम्ही तिघे म्हणजे मी, माझ्या गुरु सौ धनश्री आपटे आणि माझी मैत्रीण नेहा गुजराती या होतो.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला अंदमानला जायला मिळालं. त्यासाठी सावरकरांचे आशीर्वाद, माझ्या आई बाबांचा खंबीर पाठिंबा, धनश्री ताई यांची मेहनत, आणि माझी बहिण सौ वर्षा आणि तिचे यजमान श्री विनायक देशपांडे यांच्या मदतीचा लाभलेला हात.

सांगलीमध्ये बाबाराव स्मारक समिती आहे. त्यामध्ये अनेक सावरकर प्रेमी काम करतात. त्यापैकीच एक आहेत श्रीयुत बाळासाहेब देशपांडे. 2011 हे वर्ष स्वातंत्र्यवीरांच्या या धाडसी उडीचे शंभरावे वर्ष होते. केवळ देश प्रेमामुळे सावरकरांनी हे धाडस केले होते. आपली भारत माता पारतंत्र्यात अडकलेली त्यांना सहन होत नव्हतं. त्या एका ध्यासापोटी त्यांनी हा अतुलनीय पराक्रम केला. खरंतर त्यांच्या त्यामुळेच आपण सगळे भारतीय स्वातंत्र्याचा आनंद उपभोगतो आहोत. मोकळा श्वास घेतो आहोत. त्याची थोडीतरी जाणीव आपण ठेवली पाहिजे ना! त्यांना मानवंदना प्रत्यक्ष त्या ठिकाणी अंदमानला जाऊन द्यायची असं या लोकांनी ठरवलं होतं. स्वातंत्र्यवीरांची गाणी नृत्याविष्कार करून मानवंदना देण्याचे ठरवले होते. त्यामध्ये मी, धनश्री ताई आणि नेहा यांनी नृत्य बसवली होती.

जवळजवळ दोन अडीच महिने आम्ही नृत्य बसवत होतो. सावरकरांनी तुरुंगातील त्या कोठडीमध्ये, काट्यांनी खिळ्यांनी लिहिलेल्या कविता सादर करायच्या ठरवल्या होत्या.त्या गाण्यांना विकास जोशी यांनी चाली लावून, सांगलीच्या स्वरदा गोखले तिच्याकडून त्या कविता गाऊन घेतल्या आणि आपल्या धनश्री ताई यांच्या अथक परिश्रमाने आणि मार्गदर्शनाने नृत्य अविष्कार बसवला.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आम्ही तिघींनी आमचे नृत्य सावरकरांच्या त्या कोठडीत केले जिथे त्यांना बंदिस्त ठेवले होते. ती 123 नंबर ची खोली आहे. एक विशेष म्हणजे लोकांना, पर्यटकांना पाहण्यासाठी ती खोली तशीच ठेवली आहे. आम्ही तिथे गेलो तो दिवस बरोबर सावरकरांनी जी धाडसी उडी घेतली तोच दिवस होता. त्यादिवशी सावरकरांचा फोटो तिथे ठेवला होता.संपूर्ण खोली फुलांनी सजवली होती. ज्या भिंतींना सावरकरांचा सहवास लाभला होता त्याच भिंतींना आम्ही सावरकरांची ती अमर गा णी, ते अमर काव्य त्यातून सादर करून दाखवलं. ती कोठडी छोटी म्हणजे फक्त दहा बाय दहाची होती. कशीबशी तीन-चार माणसं उभे राहू शकतील एवढीच. पण आम्हाला त्याच भिंतींना दाखवायचं होतं की त्यांच्यावर सावरकरांनी लिहिलेलं ते अमर अतुलनीय काव्य नृत्याच्या फुलांची ओंजळ त्याच ठिकाणी वहात आहोत.

धनश्री ताईंनी अतिशय चांगल्या तऱ्हेने सायं घंटा नावाचे काव्य नृत्या मध्ये सादर केले. ह्या कवितेचा आशय समजून घेण्यासारखा आहे. कै दे मध्ये असताना सावरकरांना हातांमध्ये को लू घालून अक्षरश: घाण्यावरील बैलाप्रमाणे जुंपून त्यांना तेल काढायला लागायचं. अतिशय कष्टाचं त्रासाचं काम होतं ते. त्यावेळचा तो बारी बाबा जेलर खूप क्रूरपणे वागायचा. कष्टाचे सगळी काम झाल्यावर संध्याकाळचे ते घंटा म्हणजे काम संपल्याची घंटा कधी असते यावर कैद्यांचे लक्ष असायचं. सायन घंटा वाजली म्हणजे हुश्य !तो दिवस संपला. ते काव्य ज्या खोलीत लिहिले गेले त्याच खोलीत धनश्री ताईंनी हे नृत्य सादर केलं. बारी बाबा करत असलेला छळ त्यांनी दाखवला. त्याचबरोबर सावरकरांच्या संवेदना उत्कृष्टपणे दाखवल्या.

मी आणि नेहा गुजराती आम्ही दोघांनी सावरकरांचं मातृभूमीचे मंगल काव्य अर्थात जयोस्तुते सादर केले. अतिशय बुद्धिमान अशा सावरकरांनी जे हे महाकाव्य लिहिलं आणि मंगेशकर बंधू-भगिनींनी जीव ओतून त्या उच्च भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या, आपल्या मनामध्ये भिनवल्या, त्या नृत्यामध्ये सादर करण्याचे परमभाग्य आम्हाला मिळालं.

जयस्तुते सादर करताना भारत माता मी झाले होते आणि नेहाने वाईट शक्ती साकारली होती. म्हणजे वाईट शक्ती आणि भारत मातेचे लढाई आम्ही उभी केली. तुम्हाला सांगते, “हे अधम रक्त रंजी ते” यावर नृत्य करताना माझ्या अंगामध्ये जोश संचारला होता. अंगावर रोमांच उभे राहिले होते. ती वाईट शक्ती लढाई मध्ये पायाशी पडली तेव्हा मला सुद्धा आनंद झाला. अशा तऱ्हेने जयोस्तुते या ठिकाणी सादर करायला मिळाले हे मी माझं भाग्य समजते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बातमीचा “सूत्रधार तो” .. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ बातमीचा “सूत्रधार तो” .. ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(रविवारची टुकारगिरी)

मंडळी नमस्कार

‘मी परत येईन’ नंतर गेले काही दिवस सगळ्यांच्याच ओळखीची एक व्यक्ती प्रसिध्द झालेली होती  ती म्हणजे

बातमीचा “सूत्रधार” तो, इथे निरंतर न्यूज पाडतो

या सूत्रधाराने सांगितलेल्या किती गोपनीय बातम्या प्रत्यक्षात ख-या निघाल्या हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण यामुळे गेले काही दिवस वृत्तवाहिन्यांचा टि.आर.पी  वाढण्यास आणि तुमच्या आमच्या सारख्यांचे मनोरंजन होण्यात नक्कीच वाढ झाली हे आम्ही स्वतः या लेखाचे ‘सूत्रधार’ म्हणून अगदी खात्रीपुर्वक सांगतो

पण हाच सूत्रधार एकेकाळी अत्यंत विश्वासू असायचा. याचे नियोजन अनेक नाटकांतून दोन अंक जोडताना, भूतकाळात जाताना, कथानक पुढे नेताना, दोन – तीन वेगवेगळ्या घटना एकत्र गुंफताना दिग्दर्शक अगदी खुबीने करायचा.

आठवतीय ‘हमलोग’ मालिका. प्रत्येक दिवशी मालिका संपली की अशोक कुमार ‘सूत्रधार’ म्हणून येऊन बोलायचे

एखाद्या कार्यक्रमाचे ‘निवेदक’ हे ‘दिसणारे सूत्रधार’ . मात्र असे कार्यक्रम (इव्हेंट मॅनेजमेंट ) पुर्णत्वास नेणारे पडद्यामागचे असंख्य अदृश्य सूत्रधार ही महत्वाचे ठरतात, जे जास्त प्रसिध्द पावत नाहीत.  यात मी “सूत्र शिरोमणी” म्हणून पु.लं च्या ‘नारायणाचा’ आवर्जून उल्लेख करेन.

जाता जाता विविध स्नेहसंमेलने, शाळेचे मैत्री मेळावे, कवि संमेलने आणि अशा विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे ‘सूत्र’ संचलन करणा-या सर्व विभूतींची आठवण यानिमित्ताने करणे आवश्यक वाटते.

आरोपींना आम्ही पकडूच पण त्याच्या ‘ सूत्रधाराला’ ही बेड्या ठोकू असे ही आपण वाचतो आणि नंतर विसरतो.

मंडळी , पण अजून एक सूत्रधार आहे बरं जो आपल्या सगळ्यांना कठपुतली बाहुल्यांन प्रमाणे नाचवत आहे. देव, नियती, प्रारब्ध,  कर्म अशी काही वेगळी नावे ही या सूत्रधारास आहेत

यावेळची “ब्रेकींग न्यूज” ( सगळ्यात मोठी बातमी)

आत्ताच आमच्या अंतर्गत सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की प्रस्तुत ( टुकार) लेखकाने जर सन १९९४- ते – १९९७. रासायनिक अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना ” सूत्रांचा” योग्य पद्धतीने अभ्यास केला असता तर आज या लेखकावर असा लेख लिहिण्याची वेळ आली नसती ?

तरीपण

जीवनगाणे गातच रहावे, ‘सूत्र ‘ धार ते समजून घ्यावे पुढे पुढे चालावे

( सूत्रधार) अमोल

१/१२/१९

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ७) – भैरवी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ७) – भैरवी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

मागच्या भागात सांगितलेल्या पौराणिक कथेनुसार जे सहा राग पहिल्यांदा उत्पन्न झाले त्या मुख्य सहा रागांच्या प्रत्येकी सहा किंवा पाच (याबबत प्राचीन ग्रंथकारांच्या मतांमधे भिन्नता आढळते) रागिण्या आणि पुढं प्रत्येक रागिणीचे पुत्रराग व पुत्रवधू राग अशी ‘राग-वर्गीकरण’ पद्धती प्राचीन ग्रंथांत आढळून येते. त्याकाळी ती प्रचलितही होती. मात्र, ह्या कल्पनेला काहीही वैज्ञानिक, शास्त्रीय आधार नसल्याने ती लोप पावत जात पुढे इतर रागवर्गीकरण पद्धती अस्तित्वात आल्या. त्या सहा मुख्य रागांपैकी ज्या भैरव रागाची माहिती आपण मागच्या भागात घेतली त्याची एक रागिणी म्हणजे ‘भैरवी’!

‘भैरवी’ हा दहा थाटांमधील हा एक थाटही असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे हा राग भैरवी थाटाचा आश्रयराग आहे. भैरवी हे नाव प्रत्येकाच्याच परिचयाचे असते. कारण कुठल्याही मैफिलीची सांगता ही भैरवीमधील रचना गाऊन करायची अशी एक पद्धती आपल्याकडे रूढ झाली आहे. त्यामुळे कधी इतर एखाद्या कंटाळवाण्या व्याख्यान/प्रवचनात किंवा अगदी गंमतीत घरी बोलत असतानाही बोलणं ‘आवरतं’ घ्या हे सूचित करण्यासाठी आता ‘भैरवी घ्या’ असं म्हटलं जातं, कारण भैरवी म्हणजे ‘सांगता’ ही सर्वसामान्य माणसाची कल्पना असते. शास्त्रीय संगीत जाणणाऱ्या किंवा न जाणणाऱ्या सगळ्यांचाच एखाद्या कार्यक्रमाला जाऊन आलेल्याकडे ‘भैरवी कोणती गायली?’ हा उत्सुक प्रश्न असतोच.

खरंतर उत्तर भारतीय हिंदुस्थानी संगीत पद्धतीत कोणताही राग गाण्याची शास्त्राधारित वेळ ठरलेली आहे. त्यानुसार भैरवी हा प्रात:कालीन राग आहे. मग कोणत्याही वेळी होणाऱ्या मैफिलीची सांगता भैरवीने करायची ही प्रथा रूढ होण्यामागे काय कारण असावं? तर काही गुणी अभ्यासू व्यक्तींच्या मते काही प्रथा ह्या ‘समाजमान्यतेतून निर्माण होतात. भैरवी हा राग लोकांना इतका भावला असेल कि प्रत्येक मैफिलीमधे तो ऐकायला मिळावा असे वाटू लागले असेल, गायकालाही भैरवी गायल्यानंतर परिपूर्णतेची अनुभूती येत असेल आणि त्यातूनच मग हा पायंडा पडत गेला असावा.

भैरवी रागाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागात आरामशीर ख्यालगायन आपल्याला ऐकायला मिळत नाही. अगदी संपूर्ण शास्त्रीय गायनाची मैफील असेल तेव्हांही सांगतेला भैरवीतली एखादी उपशास्त्रीय रचना किंवा भैरवीतला छोटा ख्याल व तराणा, बंदिश कि ठुमरी असं काहीतरी गायलं जातं. मात्र ठुमरी, टप्पा, गझल इ. उपशात्रीय प्रकारांमधे, सुगम संगीतामधे ह्या रागाचा भरपूर वापर केलेला दिसून येतो. दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागात पूर्ण बारा स्वरांचा वापर केला जातो. खरंतर रागात म्हणण्यापेक्षा ह्या रागाधारित रचना करताना किंवा रचनांना विस्तार करताना असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. अर्थातच उपशास्त्रीय रचनांमधे रागाचे नियम पाळण्याचे बंधन नसतेच. मात्र ह्या रागात इतर सर्वच स्वरांचा वापर खुलूनही दिसतो. परंतू, जेव्हां एखादी रचना भैरवी रागाची ‘बंदिश’ म्हणून प्रस्तुत केली जात असेल तेव्हां मात्र रागनियम पाळावेच लागतात. इतर स्वरांपैकी फक्त शुद्ध रे चा आरोही वापर हा बंदिशींमधेच दिसून येतो तेवढाच!

भैरवी थाटाचे सर्व सूर ह्या रागाच्या आरोह-अवरोहात आहेत. म्हणजे सर्व सात सूर आहेतच मात्र त्यांत रे , ग, ध, नि हे चारही स्वर कोमल आहेत. ह्या रागाच्या वादी-संवादी स्वरांविषयी मतभिन्नता आहे. काहीजण ते अनुक्रमे म व सा तर काहीजण ध व ग असल्याचे मानतात. संपूर्ण सातही स्वरांचा वापर झाल्याने रागाची जाती ही ‘संपूर्ण’ आहे. समाजमान्य प्रथेनुसार हा सर्वकालीन राग मानला गेला असला तरी शास्त्रानुसार तो प्रात:कालीन राग आहे.

मात्र सगळ्या व्याकरणीय गोष्टींच्या पलीकडे जाऊन भैरवी अनुभवताना आपण स्वत:ला विसरून एका वेगळ्याच विश्वात पोहोचतो. ही भैरवी अंत:चक्षूंना ‘पैलतीर’ दाखवते किंवा अंतर्मनाला ती जाणीव करून देते असं मला वाटतं. गुणी गायकाची संपूर्ण सर्वांगसुंदर मैफिल ऐकल्यावरही परमानंदाच्या उच्च शिखरावर नेणारी भैरवी म्हणूनच कदाचित सर्वांनाच हवीहवीशी!

किशोरी ताईंचं ‘अवघा रंग एक झाला’, भीमसेनजींचं ‘जो भजे हरी को सदा’, जसराजजींचं ‘निरंजनी नारायणी’, अभिषेकी बुवांचं ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ ह्या रचनांचं स्मरण झालं तरी श्वासांतलं चैतन्य जाणवून अंगावर रोमांच उभे राहातात…. त्या जणू कैवल्याचं चांदणंच वाटतात! ह्या रागातल्या किती रचना सांगाव्या…!

अगा वैकुंठीच्या राया, प्रभु अजि गमला, बोला अमृत बोला, तम निशेचा स्मरला, सुकतातची जगी या अशी कित्येक नाट्यपदं भवानी दयानी, जे का रंजले गांजले, अच्युता अनंता श्रीधरा माधवा, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, जातो माघारी पंढरीनाथा, जनी नामयाची रंगली कीर्तनी, अजि सोनियाचा दिनु, गा बाळांनो श्री रामायण, वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा कित्येक भक्तिरचना, असेन मी नसेन मी, एकाच जा जन्मी जणू, रंगरेखा घेऊनी मी, आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे अशी कित्येक भावगीतं, खुलविते मेंदी माझासारखी लावणी, झुकझुकझुकझुक अगीनगाडी सारखं बालगीत अशा सगळ्याच रचनांमधे भैरवी खुलली आहे… अर्थातच राग भैरवीतल्या स्वरांसोबत इतरही स्वरांचा वापर करून!

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

खरच नावांप्रमाणे आमचे बालपण मोरपंखी होतं. कसलेच टेंशन नाही.

दिवस भर शाळा करायची. भरपूर वेळ खेळायचे आणि उरलेला वेळ अभ्यास करायचा. थोडा अभ्यास पुरायचा कारण त्यावेळी मुलं शाळेत शिक्षक काय शिकवतात हे लक्ष देऊन ऐकायचे, कारण क्लास लावणे हे परवडत पण नव्हते आणि फॅड पण नव्हते आणि कोणत्याच शिक्षकांचा तो व्यवसाय पण नव्हता तेव्हा कोणतेच शिक्षक पैसे कमावण्यासाठी शिकवत नव्हते तर कुंभार जसा ओल्या मातीला आकार देतो त्याच प्रमाणे विद्यार्थी घडवत होते.

पोहायला शिकण्यासाठी आम्हाला कोणत्याही क्लासला घालावे लागले नाही. आमच्या गल्लीत विजू काका म्हणुन एक काका होते त्यांनी गल्लीतल्या प्रत्येक मुलाला पोहायला आलेच पाहिजे असा चंग त्यांनी बांधला होता. प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत ते सगळ्या मुलांना पाटील विहिरीत घेऊन जायचे शिकवायला. कोणी येणार नाही म्हणायचेच नाही तर, त्यांनी प्रत्येक  मुलाला उत्तम पोहायला शिकवले. तिथे तासावर नाही तर तासनतांस डुंबत रहायचो आम्ही सगळे. शेवटी पोटात कावळे ओरडायला लागले की यायचो घरी, डबे, ट्यूब आणि दोर हे सारे साहित्य घेऊन. कोणतीही फी न घेता आत्मियतेने शिकवणार्या माझ्या त्या काकांना माझा सलाम. नित्य नेमाने त्यांच्याबरोबर जायचे हीच त्यांची फी.

आमच्या वेळी सायकल शिकायची म्हणजे पण एकधमाल असायची. एका तासाला आठआणे भाडे देऊन आधी सायकल भाड्याने घ्यायची आणि मग गल्लीतले ताई दादा यांनी कोणीतरी सायकल शिकवायची. मला आमच्या घराच्या शेजारी सुगंधा म्हणून रहायची, तिने सायकल शिकवली. कितीदा तरी पडले, खरचटले पण धडपडत सायकल शिकले एकदा, आणि सुरुवातीला त्याला एक घंटी असते हे लक्षातच यायचे नाही. घंटी वाजवायच्या ऐवजी मी तोंडानेच सरका सरका असे म्हणायचे. आत्ता मुलांना आधी नवीकोरी सायकल मिळते मग ते चालवायला शिकतात आमच्या वेळी मात्र आधी चालवायला शिका मग सायकल मिळेल अस होतं.

गेले ते दिवस जेव्हा रणरणत्या उन्हांतही आंबे तोडतांना झाडाची सावली मिळायची, चिंचा पाडताना, नकळत आंबट चव जिभेवर रेंगाळायची, मित्र जमवून जिगळी तयार करताना न कळत आपुलकी वाढायची.

आता मुलांच्या खिश्यात असतात कॅडबरी, च्युईंगम, टाॉफी , आमच्या वेळी खिसे भरलेले असायचे  आवळा, सुपारी आणि बोरांनी. मन तृप्त व्हायचे पेरू आणि करवंदानी. चिमणीचा घास म्हणून आवळा जेव्हा तोडला जायचा तेव्हा तो ऊष्टा कोणाला वाटत नसे. कोणीतरी खिश्यातून आणलेली मीठ मसाल्याची पुडी असायची त्याला तो लावून खाल्ला की त्याची चव तर अवर्णनीय असायची. आत्ता सारखे चॉकलेट नसायचे आमच्याकडे पण खिसे लाल वाटाणे, शेंगदाणे आणि फुटाणे ह्यानी भरलेले असायचे. आत्मियतेने भरलेले हे खिसे कधी रिकामे होऊन त्याच्या जागी शिष्टाचार आला हेच कळले नाही. कोणाच्याही झाडावर चढून पेरू तोडून खाताना कधी कमीपणा वाटला नाही, ना पकडले गेल्यावर एक धपाटा खाण्यात कमीपणा, कारण त्या धपाट्यात पण आपलेपणा असायचा आणि त्या काकूही दुसरे दिवशी आमची वाट पहायच्या. हेच जर आत्ता सापडलो तर लगेच म्हणतील विचारून घ्यायचा ना मी दिला असता, पण त्यांना कुठे माहिती की चोरून पेरू तोडून खाण्यात आणि त्या आपुलकीच्या धपाट्यात किती माया दडलेली असायची ते.

पूर्वी घरचे भडंग, कांदा कैरी अस घेऊन आम्ही उद्यानात जात असू आता हीच जागा पॉपकॉर्न कुरकुरे ने घेतली. एखाद्या वेळी येताना गुर्ऱ्हाळ्यात जाऊन उसाचा रस आणि आलेपाक म्हणजे आमच्या साठी मेजवानी असायची आणि आता पिझा, बर्गर ही संस्कृती होऊन बसली.

नारळाच्या शहाळ्याची जागा कधी पेप्सी ने घेतली हे कळलेच नाही,तसेच लिंबू सरबत कधी हद्द पार झाले आणि फ्रीझ मधे कोल्ड्रिंक कधी दिमाखात सजले ते ही कळलेच नाही. कोकम सरबताची जागा मीरिंडा ने घेतली आणि फ्रेंड सर्कल चा एक भाग बनून गेली.

आमच्या बालपणी कोणत्याही मित्र, मैत्रिणींच्या घरी थेट आत प्रवेश असायचा. आत्तासारखी फोन वर अपॉइंटमेंट घ्यावी लागत नसे.

मग सुट्टीत रंगायचा आमचा पत्यांचा एक डाव, कॅरम, नाहीतर कोणाच्या तरी गल्लीत लपंडाव, लगोरी, छप्पी. आताच्या मुलांना हे खेळ माहितही नसतील, बरोबर आहे म्हणा आम्ही रिकामे होतो ते बिझी असतात मोबाईल गेम्स आणि टीव्ही कार्टून पाहण्यात. आणी चुकून बाहेर पडलेच तर मॉल मधे जाऊन डॅशिंग कार खेळतात.

मला अजून एका गोष्टीची आठवण होते. मला आठवते ती टणटण वाजणारी हातगाडी. तो आवाज आला की सगळे गोळा व्हायचे  मस्त ऑरेंज, कोला चा बर्फाचा गोळा खायला आणि मुद्दामून जीभे वर चोळून जीभ रंगवायची. गेले ते दिवस गोळ्याचे, कुल्फी चे आणि हात गाडीच्या ऑरेंज कंँडीचे.

आता मिळते ती ट्रिपल लेयर, कसाटा , मस्तानी.

पण बर्फ चोखून खाल्लेले  समाधान यात कुठे ? पावसाळ्यात ते भाजलेले कणीस नाहीतर शेंगा म्हणजे आहाहा !!!! पर्वणीच. काय आली ना आठवण तुम्हाला पण तुमच्या बालपणीची??

खरच किती आठवणी, आता आठवणीच राहिल्या नाही का?

कुठे हरवले ते दिवस जेव्हा धडपडत सायकल शिकली जायची, कोणी तरी हक्काने पोहायला शिकण्यासाठी स्वतःच्या जिवाचा आटापिटा करायचे, आणि रणरणत्या उन्हातही सुखद सावली मिळायची.आपण मनात आणले तर हेच मोरपंखी दिवस आपण आपल्या पुढच्या पिढीला ही देऊ शकू, नाही का ?

पुन्हा कोकम, पन्ह, फ्रीझ मधे विराजमान होईल, कॉल्डड्रिंक, पीझा, बर्गर हद्द पार होतील आणि घरच्या भडंगाचा आस्वाद जिभेवर पुन्हा रेंगाळेल.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?1. 9.2020

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रिफ्रेशमेंट – मी, कागद आणि पेन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ रिफ्रेशमेंट – मी, कागद आणि पेन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

रिचार्ज व्हायचा आपापला एक फंडा असतो. कोणाचं गाणी ऐकून मन रिफ्रेश होतं तर कोणाचं चित्रपट बघून. पण माझे मन मात्रं  हातात लेखणी आली की रिफ्रेश व्हायला लागते.

माझी प्रत्येक रचना मग ती कथा असो कविता असो चारोळ्या असो अगदी आध्यात्मिकावरही लेख कविता असो ती माझ्या पेक्षा वेगळीच असू शकत नाही. मी जे लिहिते किंवा लिहिण्यासाठीजे शब्द निवडते..खरं म्हणजे मी त्याच शब्दांमध्ये असते.

रोजचं जीवन हे माझ्या लिखाणाचं मूळ लिखाण मला प्रेरणा देतात तर शब्द ऊर्जा आनंद..बोलायलाही खूप आवडतं आणि बोलतेही..अगदी पुस्तकांवरही ….

मनांचा मनाशी संवाद… प्रश्न माझेच आणि उत्तरेही माझीच…. ना तिथे हेवेदावे ना मतभेद.. फक्त समाधान

अतिव आनंद…मग मी म्हटलं संवादांना,क्षणांना,आठवणींना ,अनुभवांना ..तुम्हाला  मनात का कैद करू?

म्हणून मी कागदाशी मैत्री केली आणि त्या सर्वांना मी कागदावर उतरवतं गेले व्यक्त होत गेले. आजूबाजूला घडणारया प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकून त्याचेही अनुभव मी अगदी त्रयस्थ पणे मांडत गेली आणि अजूनही मांडत आहे… सूर्य ,चंद्र, पाऊस यांच्याशी सुद्धा माझी सलगी झाली आणि वेगळ्याच दृष्टीने जग कळू लागले.

शांततेपासून ते व्यक्त होण्याचा आणि अस्तित्वापासून ते परिपूर्णत्वाकडे नेणारा हा प्रवास…या प्रवासाने मला व्यक्त होता आले आणि मी लिखाणातून व्यक्त झालेही..आणि मी अजूनही व्यक्त होत आहे..

माझ्यातल्या मला शोधायला आवडतं आणि हो व्यक्त होऊन लिहायलाही आवडतं…

खरचं लेखणीचं एक वेगळंच विश्व असतं नाही का? व्यक्त व्हायला..

सोबत असतात कोरा कागद,पेन आणि भावना….

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

 ☆ काव्यानंद ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

रसग्रहण:

आयुष्यामध्ये कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला; मग ती एखादी कला असो, संशोधन असो, वारी किंवा परिक्रमा असो, देशसेवा असो त्या ध्यासापायी सर्वस्व उधळून देणे, त्या ध्येयाची धुंदी चढून इतर जाणिवा नाहीशा होणे ही जी तन्मयतेची, तंद्रीची, झपाटलेपणाची स्थिती आहे तिला म्हटले आहे “झपूर्झा “.

असा एखादा ध्यास घेऊन,त्यासाठी जगाला विसरून बेभान अवस्थेत त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी ध्येयपूर्ती करून यशोगाथा लिहिल्या आहेत, त्यांना अवलिया, साधक असे म्हटले जाते. हर्ष, खेद, हास्य, शोक या भावनांच्या त्यांच्या जाणीवा बोथट झालेल्या असतात.जे इतरांना व्यर्थ वाटते त्यात त्यांना अर्थ भरलेला जाणवतो आणि त्या अर्थासाठी ते धडपडतात. हा अर्थ त्यांनाच दिसतो ज्यांना त्याचे वेड लागलेले असते. या अर्थाचे बोल कसे असतात तर “झपूर्झा गडे झपूर्झा. ”

जिथे कुणाला काही दिसत नाही अशा ज्ञाता पलीकडे अज्ञाताच्या अंधारात त्यांना काहीतरी जाणवते.वीज चमकून जावी तसे होते. त्या उजेडात अंधुक जाणीवा होतात. तिथे काहीतरी आहे हे जाणवते आणि ते त्याचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान करतात. या जाणीवा गूढ गीते गातात. त्याचे बोल असतात “झपूर्झा गडे झपूर्झा.”

भुई नांगरलीच नाही तर पीक येईल कसे ? अशी कितीतरी जमीन नांगरल्याविनाच आहे. म्हणजेच विश्वात अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला ज्ञात नाहीत. त्यासाठी ते शोध घेत राहतात आणि शेवटी ते संशोधन फळाला येते. असंख्य शास्त्रज्ञांनी शोध लावले ते म्हणजे विश्वात असलेल्याच गोष्टींची उकल करून सर्वसामान्यांसाठी त्यांचे अस्तित्व सिद्ध करून दाखवले. त्यासाठी झपाटून शोधाचा ध्यास घेतला. त्यावेळचा मंत्र आहे “झपूर्झा गडे झपूर्झा.”

या विश्वाचा पसारा म्हणजे एक अवघड कोडे आहे. विश्वाची निर्मिती, मानवी जगाचा विकास हे समजून घेणे हाच ज्ञानाचा हेतु आहे. ज्ञान आणि कला यांच्या माध्यमातून विश्वाचे रहस्य, त्याची सुंदरता जाणवते. याचा अभ्यास ही अशाच अवलियांनी केला. तोही एकच मंत्र गात “झपूर्झा गडे झपूर्झा.’

आपल्या तारा मंडळातील मंडळी अव्याहत फिरत असतात. पण या तारा मंडळाच्या पलीकडेही असंख्य ग्रह-तारे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांचा अभ्यास करणे यासाठी इतर सर्व गोष्टी बाजूला सारून झपाटून जाऊन अभ्यास करणे, प्रयत्न करणे आणि तिथे पोहोचणे हे महत्त्वाचे असते. तेव्हा अशा या सर्व अशक्य कोटीतील कामांसाठी आवश्यक असते ते झपाटलेपण. त्यालाच म्हणतात “झपूर्झा.’

कवीने एके ठिकाणी सांगितले आहे की ,’त्यांनी काही मुलींना पिंगा घालताना पाहिले. त्या मुली “जपून जा पोरी जपून जा”असे म्हणत गोल फिरत होत्या. असे  म्हणत म्हणत फिरताना हळूहळू अंगात लय भिनत जाते आणि त्याचीच गुंगी येते. कवीने त्याच अर्थाने शब्द योजीले “झपूर्झा गडे झपूर्झा.”

कवितेच्या सुरुवातीला लिहिले आहे, आपल्याला जे  कांही नाही असे वाटते, त्यांतूनच महात्मे कल्याणाच्या चिजा बाहेर काढतात. त्या महात्म्यांची स्थिती लक्षात घेऊन पुढील गाणे वाचल्यास ते दुर्बोध होऊ नये असे वाटते .म्हणजेच ह्या अज्ञाताच्या गुहेमध्ये शिरणाऱ्या मनाला बजावले ‘जपून जा मना जपून जा’.तर त्या ध्यासामध्ये फिरत असताना त्याचेच कधी ” झपूर्झा रे झपूर्झा ” झाले हे त्या मनाला सुद्धा कळत नाही.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print