मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 28 ☆ बुकीची सून ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है।  श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनके स्वानुभव  एवं  संबंधों  पर आधारित  संस्मरणात्मक कथा  “बुकीची सून ”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है।  ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 28 ☆

☆ बुकीची सून ☆ 

(विषय   :- व्यक्तिरेखा )

दिवाळीची सुट्टी सुरू झाली होती त्यामुळे मोठी मुलगी व तिच्या मुली आल्या होत्या.सकाळच्या वेळी मी अंगण झाडत होते माझ्या दोन्ही नाती अश्विनी अक्षया माझ्या मागेपुढे करत होत्या.त्या शहरात रहात असल्याने त्यांना मोठ्ठ अंगण म्हणजे अगदी अप्रूप वाटायचं.

दसरा नवरात्रीची धामधूम संपली की आमच्या दारावर रांगोळी विकणाऱ्या बायका येतात.तशीच एक जाडजूड काळी बाई डोक्यावर रांगोळीचं भांड घेऊन “रांगोळी

..ए ..असं जोरजोरात म्हणत

आली अन्  माझ्या जवळच थांबली न् मला म्हणाली ” आवो ,ऽऽ घ्यावो ..ऽऽ. ताई… एकदम पांढरी लयी छान हाय बगा.”

दसऱ्याला घेतलेली बरीच रांगोळी शिल्लक असल्यानं मी तिच्या बोलण्याकडं लक्ष दिलं नाही मी माझं हातातलं काम करत राहिले तशी घ्याहो.. म्हणून माझ्या मागेच लागली. मी म्हटल मागचीच शिल्लक आहे आणि आता घरादारात फरशा बसवल्यात त्यामुळे रांगोळी फार संपत नाही गं…मग मात्र माझं लक्ष वेधून घेण्यासाठी ती जोरात म्हणाली आवो ताई  तुमच्या ” बुकीची सून हाय ओ….मी….!” .

तिचं बोलणं ऐकून माझ्या दोन्ही नातींना काही उलगडा होईना .

या भिकारणीसारख्या दिसणाऱ्या  बाईची सासू …आजीची ” बुकी “… म्हणजे काय..?..

पण मला झाला..

कारण….

सुमारे पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी भिक्षा मागण्यास बंदी नव्हती. त्यावेळी आमच्या पेठेत एक भिकारीण रोज यायची. तेव्हा आजच्या सारख्या घंटागाड्याही नव्हत्या. कोपऱ्या कोपऱ्यावर नगर परिषदेच्या कचरा कुंड्या असायच्या.

तर ही भिकारीण आमच्या सगळ्यांच्या घरच्या केरकचऱ्याच्या बादल्या त्या कुंडीत रित्या करायची. आणि त्याबदल्यात तिला सर्व घरातील उरलेलं शिळं अन्न दिलं जायचं.

ती मुकी असल्यानं तिचं नाव कुणाला माहीत नव्हतं ऐकूही येत नसल्यानं तिच्याशी कोणाचा संवाद नसायचा, पण मी मात्र तिच्याशी खाणाखुणांनी बोलायचे. कधीमधी तिला छान  ताज ताक, थंडगार कलिंगडाची फोड द्यायचे. तिला ते खूप  बरं वाटायचं खाऊन पिऊन झाल्यावर ती मला  स्वत:च्या छातीवर हात ठेवून जीभ टाळ्याला लावून टक्क् असा मोठ्ठा आवाज करायची म्हणजे खूप छान होतं, आवडलं .! असं सुचवायची.

मलाही खूप बरं वाटायचं.तशी ती नाकी डोळी नीटस होती.

तिला मुकी भिकारीण असं ल़ोक म्हणत आणि ते माझ्या मुलांना आवडायचं नाही. म्हणून त्यांनी तिचं नाव शाॅर्टमधे करायचं ठरवलं. मुकी भिकारीण म्हणून आधी ” भुकी ” म्हणायचं असं  सर्वांनी ठरवलं पण त्यातून ती भुकेली आहे असा निष्कर्ष निघतो इति माझा मोठा मुलगा ! मग तो म्हणाला आपण तिला “बुकी” म्हणूया…मग सर्वांनी एकमताने अनुमोदन देऊन तिचे नामकरण “बुकी” असे झाले.तेव्हापासून ती आमच्या पेठेची बुकी झाली.

तिचं येणं नित्यनियमाचं असायचं.एकदा बरेच दिवस ती आलीच नाही बरं.. चौकशी तरी कुठं करायची.दोन अडीच महिन्यांनी एकेदिवशी ती दिसली.सगळ्यांनी विचारुन तिला बेजार केलं. मग मीच तिला एक दिवस खुणेनं विचारलं तेव्हा लाजत लाजत कपाळावरच्या कुंकवाकडे हात दाखवून नवऱ्याकडे गावी गेले‌होते असं. म्हणाली.

असेच काही दिवस गेले आणि ती पोटुशी असल्याचं लक्षात आलं.मग आम्ही तिला जरा आंबट चिंबट पदार्थ लोणची असं देऊन आम्ही आनंद घेत होतो.व तिचं जरा कौतुक करत होतो तीलाही ते आवडत होतं.मग तिला मुलगा झाला.त्याला काखेच्या झोळीत बांधून ती यायला लागली.ते बाळही गुटगुटीत छान होतं विशेष म्हणजे ते बोलू शकतं हे खुणेनेच  सांगताना तिला झालेल्या आनंदाचं वर्णंनच नाही करता येणार.?

कालांतराने भिक्षा मागण्यास शासनाने मनाई केल्यामुळे की काय ती परत आम्हाला दिसलीच नाही. आम्हीही आमच्या रोजच्या घर ऑफिस मुलं सुना नातवंडे यात गुंतल्याने तिला विसरून गेलो.

आणि आज माझ्या “बुकीची सून” प्रत्यक्ष माझ्या समोर उभी !

आता नको असली तरी अधूनमधून मी तिच्याकडून रांगोळी घेते. तिचा आवाज मात्र भसाडा घोगरा आहे…ती ” रांगोळी ‘.. म्हणून ओरडत येते तेव्हा कानावर हात ठेवावा लागतो. आता हिचं नाव काय ठेवावं असा प्रश्न पडलाय.

सुचवाल कां एखादं नाजूक सुंदर नाव…

माझ्या बुकीच्या सूनेसाठी…!

कां आपलं हेच बरं आहे..” बुकीची सून ‘!!!

 

©®उर्मिला इंगळे

सतारा  मो –  9028815585

दिनांक:-.२१-३-२०

!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ उतारवयातील लग्न… ☆ सौ .योगिता किरण पाखले

सौ .योगिता किरण पाखले

(आदरणीया सौ .योगिता किरण पाखले जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की  सशक्त हस्ताक्षर हैं। आप कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी रचनाएँ स्तरीय पत्र पत्रिकाओं / चैनलों में प्रकाशित/प्रसारित हुई हैं। आज प्रस्तुत है आपकी  जीवन के संध्याकाळ में विवाह पर एक विचारोत्तेजक आलेख    उतारवयातील लग्न… ।  आपने इस आलेख में  उपरोक्त विषय पर जीवन के संध्याकाळ में होने वाले विवाह का भरे पूरे परिवार पर प्रभाव साथ ही यदि वृद्ध युगल में कोई एक शेष रहता है अथवा वृद्धाश्रम में रहता है तो जीवन पर प्रभाव पर विस्तृत विमर्श किया है।  हम भविष्य में आपकी और चुनिन्दा रचनाओं को प्रकाशित करने की अपेक्षा करते हैं।)   

 ☆ उतारवयातील लग्न… ☆

काही दिवसांपूर्वी व्हाट्स अप वर एका लेखकाचा प्रेमाविषयीचा लेख वाचला. प्रेमाचे अनेक टप्पे ज्यात त्यांनी मांडले होते. प्रत्येक वयात होणाऱ्या प्रेमाचे स्वरूप ,त्याची कारणं आणि गरज सुद्धा वेगवेगळी असते. मग ते प्रेम किशोर वयातील प्रेमापासून  ते वृद्धत्वा पर्यंत नव्हे तर  शेवटच्या श्वासापर्यंतचे असो….

प्रेमाला वयाचं बंधन कुठे? होय ना … आणि ते नसतंच आणि नसावं सुद्धा.

“संसारी लोणचं मुरतं  तारुण्य सरल्यावर

चाखतो चव त्याची जशी प्रेमात पडल्यावर”

पण या मुरलेल्या लोणच्याची चव चाखण्यासाठी जोडीदार मधेच सोडून गेला तर ?आज समाजात बघितले तर 50 ते 60 वर्षापुढील माणसे ही एकटी आहेत. संसाराच्या अर्ध्या वाटवेर जोडीदाराने साथ सोडली. त्यांच्या परिवारात मुलं ,मुली ,नातवंड आहेत पण….. उणीव आहे ती हक्काच्या आधाराची !!!

ती मिळवून देण्यासाठी समाजाने घालून दिलेली किंबहुना स्वतःच कुठेतरी बिंबवून घेतलेली अलिखित नियम आडवी येतात. काळानुसार बदल आणि गरजेनुसार काळ कुठेतरी बदलतोय म्हणून या अलिखित नियमांच्या (चौकटीच्या) बाहेर जाऊन या वयात लग्न ही गोष्ट जन्म घेऊ लागली आहे.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजेच दोन चार भाऊ आणि त्यांचे कुटुंब एकत्र होते. त्यात जर कुणाचा जोडीदार सोडून गेला याचे दुःख हे कुटुंबासोबत राहून विरून जायचे.आणि मी वर म्हटल्याप्रमाणे अलिखित नियम तर होताच; परंतु फार फार तर दोन किंवा एक अपत्य असलेल्या आई वडिलांच्या जीवनात असा प्रसंग येतो तेव्हा हा विचार जन्म घेतो.

आता हा विचार योग्य की अयोग्य या दोन शब्दात उत्तर देणं म्हणजे फक्त बुद्धी किंवा मन याच्या एकाच अंगाने विचार करण्यासारखे असेल. खरं तर कुठलीही गोष्ट ही व्यक्तिपरत्वे तिच्या प्राप्त परिस्थितीनुसार  योग्य आणि अयोग्य यात बांधली जाते. परंतु एक तटस्थ व्यक्ती एका बाजूला झुकलेल्या मापापेक्षा फक्त मधोमध असलेल्या काट्या कडे पहातो तेव्हा तो विचार हा योग्य आणि अयोग्य या शब्दांच्या पलीकडचा होतो. त्याला वास्तवाची झालर असतेच असते.

जर या वयातील व्यक्तींनी दुसरा जोडीदार निवडला तर त्याची आज 30 ते 35शीत असलेली मुलं, मुली हे बाहेरून आलेली आई किंवा वडील स्वीकारतील का ?त्यांना आई बाबा म्हणून हाक मारतील का ? सख्यांसारख नाही पण किमान आपूलकीचं नात निर्माण होईल का? याच उत्तर कदाचित हो राहील असतं पण जेव्हा मुलं ही लहान असती. कारण लहानपणापासून त्यांचं संगोपन बाहेरून आलेल्या आई किंवा वडिलांनी केलं असतं .पण मुलांचीही आज 4 ते 5   वर्षाची मुलं असतात ते त्याचा संसारात गुंतलेली असतात अशात आई वडिलांचे लग्न हे स्वीकारणे खरचं झेपेल का? हे झालं मुलांच्या बाबतीत. पण सुनेचा विचार केला तर आज सख्खे सासू सासरे ही जिथे नको असतात तिथे परक्या व्यक्तीचा विचार होईल की नाही  याची शाश्वती कशी देणार..?

उदाहरणासह सांगायचं तर (सासूचा विचार करू) सासूचे दुसरे लग्न करायचे यात  बघितलं तर सासूला हक्काचा जोडीदार मिळेल म्हणजेच तिची आर्थिक जबाबदारी त्याचप्रमाणे भविष्यात  वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक व्याधी याची मोठया प्रमाणात जबादारी जोडीदार घेईल. यामुळे आपोआपच सासूचे मुलं, सूना यातून बऱ्याच अंशी  जबाबदारीतून मोकळे होतील.

परंतू जेव्हा घरात नवीन आई, सासू आणायची आहे तेव्हा मुलं व सुनेची जबाबदारी वाढेल  सर्वच बाजूने. या सर्व परिणामांचा विचार सर्व अंगाने करणे गरजेचे आहे.

एक सत्य घटना नमूद करावीशी वाटते. ‘एका व्यक्तीने वयाच्या 50 व्या वर्षी दुसरे लग्न केले . मुलांची इच्छा नसतांना. तो आर्थिक दृष्ट्या अतिशय सधन. त्याची मुले ही कमावती ज्यांना वडिलांच्या संपत्तीची हाव आणि गरज नाही . ते जोडपे  त्या मुलांमध्ये न रहाता वेगळे रहायचे. ती व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याची पत्नी काळजी देखील घेत नव्हती आणि शेवटी ती व्यक्ती वारली  या आधीच त्या व्यक्तीची सर्व संपत्ती त्या बाईने स्वतःच्या नावावर करून ठेवली होती . तुमचा  बाप वारला हे सुद्धा त्या मुलांना  कळविण्याची तसदी तिने घेतली नाही .  याचे मुलांना फार वाईट वाटले .तिचा हेतू फक्त संपत्ती मिळवणे इतकाच होता.’ या घटनांचा विचार अशा वयात लग्न करतांना घ्यायला हवा.

ज्यांना मुलबाळ नाही व जीवनसाथी अर्ध्यात सोडून गेला त्यांच्यासाठी या वयातील लग्न हे त्यांच्या आयुष्याला सुखाचे वळण नक्कीच देणारे आहे. ज्यांची मुले  त्यांचा सांभाळ करीत नाहीत अथवा वृद्धाश्रमात रहातात अशा साठी सुद्धा जीवनसाथी मिळणं सुखावह आहे.

तारुण्यात लग्न करतांना शिक्षण, सौंदर्य, पैसा ,प्रतिष्ठा या गोष्टीचा मुख्यतः विचार होतो मात्र  उतरत्या वयात फक्त निखळ प्रेम,आधार आणि सगळ्यात महत्त्वाचा शुद्ध हेतू ठेवून लग्न व्हायला हवीत कारण या वयात जर विश्वासघात झाला तर ते दुःख सहन करण्याची ताकद कशी बरं राहील…..!

उतरत्या वयात होणारी लग्न ही काळाची गरज आहे. हा बदल स्वागतार्ह नक्कीच आहे  परंतु तो  प्रत्येकाच्या कौटुंबिक परिस्थिती नुसार ,वास्तविकतेला अनुसरून,परिणामांचा विचार या सर्व बाबी (condition) त्यात रहाणाऱ्या आहेतच. जशा नाण्याला दोन बाजू असतात त्यातील एक बाजू किंवा दोन्ही बाजू देखील  बघून चालणार नाही तर त्याची तिसरी बाजू जो बघू शकतो तो यशस्वी नक्कीच होईल यात शंका नाही.

 

© सौ. योगिता किरण पाखले, पुणे

मोबा 9225794658

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 39 – त्या हळूवार, अलवार  क्षणांची  साक्षीदार ……… ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनके चौदह वर्ष की आयु से प्रारम्भ साहित्यिक यात्रा के दौरान उनके साहित्य  के   ‘वाङमय चौर्य’  के  कटु अनुभव पर आधारित एक विचारणीय आलेख “त्या हळूवार, अलवार  क्षणांची  साक्षीदार ……….  सुश्री प्रभा जी  का यह आलेख इसलिए भी विचारणीय है, क्योंकि  हमारी समवयस्क पीढ़ी को साहित्यिक चोरी का पता काफी देर से चलता था जबकि सोशल मीडिया के इस जमाने में चोरी बड़ी आसानी से और जल्दी ही पकड़ ली जाती है। किन्तु, शब्दों और विचारों के हेर फेर के बाद  ‘वाङमय चौर्य’  के  अनुभव को आप क्या कहेंगे। प्रत्येक व्यक्ति अपने जीवन को अपने तरीके से जीता है।  जैसे वह जीता है , वैसा ही उसका अनुभव होता है।  इस अतिसुन्दर  एवं विचारणीय आलेख के लिए  वे बधाई की पात्र हैं। उनकी लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 39 ☆

☆  त्या हळूवार, अलवार  क्षणांची  साक्षीदार ……… ☆ 

वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी कविता माझ्या आयुष्यात आली. शाळेत असताना हस्तलिखिताच्या निमित्ताने!

विसाव्या वर्षा नंतर कविता थांबेल असं मला वाटलं होतं, पण काही  वर्षे थांबल्या नंतर….कवितेच्या पुन्हा प्रेमात पडले, कवितेला व्यासपीठ मिळालं, अनेक ग्रुप मिळाले,  एका ग्रुप मधल्या बारा तेरा वर्षांनी मोठ्या असलेल्या कवयित्री बरोबर मैत्री झाली. आमची घरे जवळ असल्यामुळे  एकमेकींच्या घरी जाणं, कविसंमेलनात एकत्र सहभागी होणं, रिक्षा शेअर करणं यामुळे मैत्री वाढली, पण काही वर्षापासून असा शोध लागला की त्या कवयित्री कडे स्वतःची चांगली कविता नाही, ती सादर करत असलेल्या, दाद घेणा-या सर्व कविता मान्यवर कवींच्या चोरलेल्या कविता आहेत, हल्ली फेसबुक, व्हाटस् अॅप मुळे तिच्या चो-या उघडकीस आल्या, तिने त्या त्या कवींची माफीही मागितली पण निर्ढावलेपण अंगी मुरलेलं, वयाची पंचाहत्तरी उलटून गेली तरी व्यासपीठावर कविता सादर करण्याची इच्छा, दुस-यांच्या कविता वाचून दाद, मोठेपणा मिळवायची सवय लागलेली, कवयित्री म्हणून प्रतिमा पूर्ण डागाळलेली……पण मैत्रीच्या नात्याचं काय?

काही आयोजकांच्या मते आता तिच्या या वयात तिला वाळीत टाकणं म्हणजे तिला धक्का बसून ती कोलमडून जाईल, म्हणून वाङमय चौर्य हा गुन्हा माफ करायचा का ? थोड्या थोडक्या नव्हे वीस पंचवीस चोरलेल्या कवितांच्या आधारे सगळी कारकीर्द गाजवली! बाई उच्चशिक्षित, मराठीत एम.ए. असलेली, पण कवितेची चोर नव्हे तर अट्टल दरोडेखोर! तिला वृत्ताची जाण नाही पण अनेक वृत्तबद्ध कविता अनेक वर्षे सादर केल्या इतकंच नव्हे त्या दुस-यांच्या कविता स्वतःच्या संग्रहातही छापल्या. एका कवीने “पोलिसकेस करीन” म्हटल्यावर तिने  त्याला जाहीर माफी पत्र लिहून दिले ते फेसबुक वर प्रसिद्ध झाले!

केवढी ही शोकांतिका! असे मोह का होत असतील? तिच्या बरोबर केलेल्या अनेक मैफिली आठवल्या, तिचं खोटेपण, चोरटेपण आज लक्षात आलं!

कवयित्री म्हणून ती निश्चितच बाद झाली पण मैत्री चं काय?? त्या हळूवार, अलवार  क्षणांची  साक्षीदार असलेली पण सतत काव्यक्षेत्रात दुस्वास करणारी, कुरघोडी करू पहाणारी ती……एक प्रश्नचिन्ह बनूनच राहिली आहे!

तिने मुक्तपणे माळली, दुस-याच्या बागेतली

सुंदर सुंदर फुले स्वतःच्या केसात…

आणि मिरवली

गंध स्वतःच्याच मालकीचा असल्याच्या तो-यात,

ती फुलं ही दुस-याची आणि गंधही परकाच असल्याचं समजलं सगळ्यांना

आणि बागेतल्या सा-याच फुलांनी केला  उठाव…..

तिची लूट थोपवण्यासाठी…

कवितेचे कित्येक ताटवे…   परतताहेत आता…

आपापल्या मालकांकडे  !

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ कुसुमाग्रज – जन्म दिवस विशेष – मी मराठी बोलतेय… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज – जन्म दिवस विशेष

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है  स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज – जन्म दिवस पर विशेष  आलेख  “मी मराठी बोलतेय…”)

 ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज – जन्म दिवस विशेष –  मी मराठी बोलतेय…☆

 

“होय.. तुमची माय मराठीच बोलतेय! सर्व प्रथम माझ्या वर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व सान थोर सुपुत्रांना अनेकानेक शुभाशिर्वाद. आज विष्णू वामन शिरवाडकर  उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. या दिवशी मला राजभाषा म्हणून माझा गौरव दिन साजरा करण्यात येतो आहे हे पाहून मन भरून आलय. मित्र हो,  आज मला बोलायचय.!”

“महानुभाव पंथीय काळापासून आपण माझा प्रचार प्रसार करीत आला आहात.  अकराव्या शतकापासून मी तुम्हाला  आणि तुम्ही मला समृद्ध करीत  आलो आहोत. गुरू बंधू निवृत्ती नाथ यांच्या कृपाशार्वादाने संत  ज्ञानेश्वरांनी *भावार्थ दीपिका* लिहिली आणि माझे विकास पर्व सुरू झाले.”

ग्रामीण संस्कृती परंपरा,  उत्सव, रिती रिवाज,  बालसाहित्य,  लोकसाहित्य,  लोककला सारं काही मौखिक स्वरूपात घराघरातून ऐकू यायचं. अभंग, भूपाळी, भजन, कीर्तन,  ओवी, कीर्तन, भारूड तमाशा ही सारी माझी संवाद माध्यमे. . . ! संत कवी, पंत कवी, तंत कवी यांनी मला लेखनातून शारदीय सारस्वतात मानाचं स्थान दिलं.  छंदोबद्ध रचनांनी, ललित  अलंकारिक, वैचारीक, गूढ,  आणि वैज्ञानिक साहित्याने माझं अंतःकरण समृद्ध केले. मला  एका पिढीतून दुसर्‍या पिढी कडे सन्मानाने पोहोचवले. माय भाषा, मायबोली म्हणून माझा सन्मान केला. !”

“कौतुकाचे गोडवे पुस्तक पोथ्या पुराणात बंदिस्त झाले आणि दैनंदिन व्यवहारात मात्र माझे स्वरूप संमिश्र, धेडगुजरी, झाले.  अनेक भाषा भगिनी  एकत्र येऊन माझ्या  आश्रयाने स्वतःची पथारी पसरू लागल्या. मराठी शाळेचे भवितव्य धोक्यात आले आणि मग मात्र मला माझ्या  अस्तित्वाची चिंता वाटू लागली.”

“बकुळीच्या फुलाप्रमाणे दरवळणारी मी (मराठी) आतल्या आत घुसमटत राहू लागले. *वाचन संस्कृतीचा -हास* हे नवे संकट समोर  उभे ठाकले.  ओवी ज्ञानेशाची,  गाथा तुकोबांची माझे शब्द   पूर्णब्रम्ह,  करणारी असली तरी संत परंपरा,  आणि  प्रबोधन काळ मागे पडला. प्रबोधन  आणि वैचारिक साहित्य पुस्तकात बंदिस्त झाले. नाही म्हणायला संतकवी,  पंतकवी, यांनी संस्कारांचा पारीजात रूजविला. त्याची पाळेमुळे,  अभिजात साहित्याकडे झेपावली.”

“कधी भक्ती, कधी शक्ती, कधी सृजन मातीत

नृत्य, नाट्य, कला, क्रीडा, यातून माझा प्रवास सुरू होता. नवरस,अलंकार,वृत्त छंद,साज हे सारं पुढच्या पिढीत पोहचत नाही ही खंत मनाला जाचत आहे

आजही अय्या,ईश्य,उच्चाराला, अन्य भाषेत तितका प्रभावशाली प्रती शब्द आलेला नाही!”.

“माझ्या लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, गायक, लोककलावंतानी माझा   कला संस्कृती वारसा आजही जोपासला आहे. त्याचा मला अभिमान आहे शाहीरांच्या पोवाड्यात,माझा आरसा दिसतो आहे!”

“मला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी माझे   काही सुपुत्र अत्यंत निष्ठेने प्रयत्न करत आहेत. भाषा हे संवाद माध्यम  असले वैचारिकता, सृजनशीलता आणि संशोधन संक्रमित करण्यात तीचा वाटा नेहमीच महत्त्व पूर्ण राहिला आहे.  भाषा सक्ती पेक्षा भाषेची  आसक्ती निर्माण होईल  असे  उपक्रम,  असे संस्कार लेकरांनो आपण पुढच्या पिढीवर करू शकलात तर मला कोणताच धोका नाही.”

“गौरव दिन हा शब्द समारंभा पुरता असू नये, त्यातील मतितार्थ प्रत्येकाच्या बोलीभाषेत व्यक्त झाला तरी, तुमची मायबोली म्हणून मिरवल्याचे, माझ्या वैभवशाली परंपरेचे सार्थक होईल, असे मला वाटते. लेकरांनो मला कुणाला दोष द्यायचा नाही पण  .. . *तुझी आई फाटकी साडी नसते* हा आरोप विनाकारण सहन करू नका. तुमच्या वैचारिक संपन्नतेत मी आलंकृत आहे.  लेकरांनो स्वतः मोठे होताना  इतरांना मोठे करायला विसरू नका.  बंदिस्त साहित्य नव्या पिढीला वाचायला द्या. माणसाने माणसाला वाचू देत. माणूस माणसाला वाचायला शिकला ना की त्याची मायबोली पण सालंकृत झालीच समजा. !”

“शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, संगणकीय तंत्रज्ञान प्रत्येक ठिकाणी मला तुमची साथ द्यायला आवडेल. कुणी कसा, किती, केव्हा आणि  कधी माझा वापर करायचा हे मात्र लेकरांनो सर्वस्वी तुमच्याच हातात आहे.  *ज्ञानार्जन* *ज्ञानदान* आणि *नव निर्मिती* यात माझे पाऊल कधीही मागे नव्हते, मागे नाही आणि मागे नसेल याची खात्री बाळगा. मी तुमची आहे  आणि तुम्ही माझे  आहात याची जाणीव सदैव  असू देत.”

“अच्छा .. चला निरोप घेते. या निमित्ताने मन मोकळे झाले. जय हिंद. जय महाराष्ट्र !”

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 35 – आज प्रेम बदलत चाललयं का…? आणि निखळ प्रेम  कसं असावं…? ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है  आपका एक सामयिक एवं विचारोत्तेजक आलेख  “आज प्रेम बदलत चाललयं का…? आणि निखळ प्रेम  कसं असावं…?)

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 35 ☆ 

 ☆ आज प्रेम बदलत चाललयं का…? आणि निखळ प्रेम  कसं असावं…?

आज प्रेम बदलत चाललयं का ? असा विचार करण्या पेक्षा आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम आहे हे समजून घेण्याची आज खरी गरज आहे. आयुष्यातील अनेक वळणावर आपल्याला अनेक व्यक्ती आवडून जातात, मग ते एखाद्या मित्र असेल, मैत्रीण असेल,एखादा सहकारी असेल, शिक्षक असतील, शिक्षिका असतील किंवा आणखी  कुणी असेल, जीवानात येणाऱ्या प्रत्येकाचा वेगळा रंग,वेगळा ढंग,  वेगळी जीवन शैली, वेगवेगळे स्वभाव, गुण आपल्या मनात नकळत घर करून जाते याचा अर्थ माझं समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे असं समजणे आणि त्याला खतपाणी घालणे कितपत बरोबर आहे  आणि असं असेल तर आयुष्यात किती वेळा आणि किती जणांशी आपण प्रेम करणार आहोत परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की कुठेतरी याच आकर्षणाला आज प्रेम समजून त्याला खतपाणी घातलं जातं….! ज्याच्या एखाद्या पैलुवर भाळून आपण प्रेम करायला लागलो त्याचे इतर गुण/  बाबी नाही आवडल्या की ब्रेकअप असा प्रकार सर्रास पाहायला मिळतो परंतु ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला त्याच्या गुणदोषासह स्विकारणं म्हणजे प्रेम असतं हा संस्कारच आज समूळ नष्ट होताना दिसत  आहे. एक प्रियकर किंवा प्रेयसी शंभर टक्के परफेक्ट असणे हे फक्त नाटक /सिनेमातच   शक्य आहे आपल्याला कधी कळणार आहे कोण जाणे …….!

जगात फक्त प्रियकर आणि प्रेयसी, नवरा/ बायको एवढीचं नाती आहेत का…..? विश्व बंधुत्वाची परंपरा जपणाऱ्या देशात निख्खळ मैत्री, मानस भाऊ बहीण, आई वडील,काका मामा, आजी आजोबा ही सगळी लयाला गेली आहेत का…?

थोडंस आपलं लहानपणीचे दिवस आठवा वडिलांचे सगळे मित्र काका त्यांची मुले ताई-दादा, आत्त्याच्या मैत्रीणी आत्त्या आईच्या माहेरी सगळे मावशी मामा आजी आजोबा असायचे. ही सगळी नाती तितक्याच आत्मियतेने सांभाळली जायची यात  जिव्हाळा, प्रेम,आपुलकी, सुरक्षितता ओतप्रोत भरलेली असायची परंतु आजच्या चौकोनी कुटुंबात पाचवा माणूस परका समजला जातो…! हीच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मग ज्याच्या बद्दल आपल्या मनात अशी जिव्हाळ्याची सुरक्षिततेची भावना निर्माण होते तो प्रियकर किंवा प्रेयसी असा अर्थ लावून  मोकळे होतो आणि पुढचे मनोरे बांधायला सुरुवात करतो आणि नकळत ते ढासाळले की ….. ! अनेक विकृतींचा यातूनच जन्म होतो….।

खरी गरज आहे या चौकोनातून बाहेर पडून ताईची मैत्रीणी ताई अन् दादाचा मित्र दादा असू शकतो हे वास्तविक संस्कार  मनावर बिंबवण्याची…अन्यथा कुठलाही कायदा ही परिस्थितीत बदलण्यासाठी असमर्थ ठरतील यात वादच नाही.

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 36 – वैभव जोशी….. एक वैभवशाली गझलकार ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनका  एक  स्मृति चित्र “वैभव जोशी….. एक वैभवशाली गझलकार.  अक्सर हमारे जीवन में कुछ लोग मिलते हैं और अपने सहज सौम्य व्यक्तित्व की एक अमिट छाप छोड़ देते हैं। साहित्यिक विभूतियों का जीवन भी कुछ भिन्न नहीं है।  ऐसे ही प्रभावशाली व्यक्तित्व के  धनी हैं  श्री वैभव जोशी जी। मैं आभारी हूँ , सुश्री प्रभा जी  का जो उन्होंने मेरे आग्रह को स्वीकारा और सुप्रसिद्ध मराठी कवि / ग़ज़लकार / गीतकार श्री वैभव जोशी जी  के सन्दर्भ में अपने आत्मीय विचार उतने ही सहज भाव से हमें हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करने का अवसर दिया।   

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 36 ☆

☆ वैभव जोशी….. एक वैभवशाली गझलकार ☆ 

कवी / गझलकार / गीतकार  म्हणून  आज वैभव जोशी सर्वदूर परिचित आहेत.

माझ्या मते वैभव सध्या  सर्वाधिक लोकप्रिय कवी आहे! मी वैभव जोशींना सर्व प्रथम वाईच्या “गजल सागर” च्या  संमेलनात सर्वप्रथम ऐकलं, त्यांची गझल आणि सादरीकरण अप्रतिम होतं!

त्या वर्षी मी “काव्य शिल्प” या कवींच्या संस्थेची अध्यक्ष होते, एका कार्यक्रमात मी वैभव जोशी ना पाहुणा म्हणून बोलंवलं! कारण  गजलसागरच्या नियतकालिकांमध्ये वैभवच्या गझला वाचल्या होत्या, तीच आमची ओळख एकमेकांशी!

त्यानंतर नागपूर च्या अ.भा.साहित्य संमेलना निमित्ताने  नागपूर येथे भेट झाली मी निमंत्रित कविसंमेलनात होते तर वैभव गझलसंमेलनात!

वैभव च्या वाढदिवसानिमित्त उद्यानप्रसाद कार्यालयात आयोजित केलेल्या चंद्रशेखर सानेकरांबरोबरच्या   कार्यक्रमाला मी गेले होते नंतर भरत नाट्यमंदिरात झालेल्या सौमित्र बरोबर च्या कार्यक्रमानंतर  वैभव चे अनेक कार्यक्रम पाहिले, टीव्ही, सिनेमात वैभव ची गीतं ऐकली, फेसबुक वर अनेक कविता, गझला ऐकल्या!

दोन वर्षांपूर्वी माझा सत्तावन्न वर्षाचा मामेभाऊ गेला, ती भावना व्यक्त करणारी पोस्ट मी फेसबुक वर टाकली तेव्हा वैभवची कमेन्ट होती, “ताई…क्लेश होणारच,  कधीही एकाकीपण वाटलं तर मला हाक मारा . मी आहे”.

वैभव मला नेहमीच धाकट्या भावासारखाच वाटतो, मी गेली अनेक वर्षे काव्यक्षेत्रातील वैभवची दैदिप्यमान कारकीर्द पहाते आहे. कवी म्हणून आणि माणूस म्हणूनही वैभव आवडतोच, हसतमुख, प्रेमळ, वडिलधा-यांचा आदर ठेवणारा! एक कवयित्री मध्यंतरी खुप भारावून सांगत होती, “अगं  वैभव जोशी नी मला अगदी वाकून नमस्कार केला”!

मी म्हटलं “तो सगळ्या म्हाता-या कवयित्रींना तसा नमस्कार करतो, मलाही!”

एकूण वैभव च्या डोक्यात हवा गेलेली नाही, त्याच्या अनेक गझला, कविता, गीतं आवडतात…..पूर्वी मला तो क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत सारखा वाटायचा…आता कधीतरी त्याच्यात यशवंत दत्त चा भास होतो, असो. तरीही वैभव वैभव आहे एकमेव! अनेकांचा लाडका कवी! स्वतःचं वेगळेपण जपणारा! वैभव ची “वगैरे” गझल खुप गाजलेली!

शेवटी माझा आवडता वैभव जोशी चा शेर—

बोलला सायलेंटली पण जाब मागत राहिला,

रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला

अनेक शुभेच्छांसह,

-प्रभा सोनवणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ वार्ता ☆ शब्दांचा प्रवास हृदयपासून हृदयपर्यन्त – कविराज विजय यशवंत सातपुते ☆ वार्ताकार – श्री काशिराम खरडे

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है  मोहरली लेखणी साहित्य समुह का विशेष  वार्ता कार्यक्रम  आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत…। किसी भी विशिष्ट व्यक्ति से वार्ता एक कला है। श्री काशिराम खरडे जी वास्तव में इस कला में दक्ष हैं। हम इस विशेष वार्ता के लिए कविराज विजय यशवंत सातपुते जी, मोहरली लेखणी साहित्य समुह एवं श्री काशिराम खरडे जी  के हृदय से आभारी हैं । 

 मोहरली लेखणी साहित्य समुह प्रस्तुति –  आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत… ☆

नमस्कार मोहरलीकर…

आज आपण _आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत…_ या आपल्या साप्ताहिक उपक्रमाअंतर्गत एका अशा साहित्यिकांशी संवाद साधणार आहोत, जे मागिल तीन दशकांहून अधिक काळ साहित्यसेवा करत आहेत. राज्य शासनाच्या अनुदानातून ज्यांचा काव्य संग्रह रसिकांपर्यंत पोहोचला. शेतीमाती पासून चित्रपटांपर्यंत ज्यांच्या शब्दांनी रसिकमनाला भुरळ घातली. असे जेष्ठ साहित्यिक “कवीराज विजय सातपुते”…

चला तर मग… जाणून घेऊया विजयजींकडून त्यांच्या साहित्यिक प्रवासाबद्दल…

नमस्कार कवीराज

मोहरली लेखणी साहित्य समुहाच्या “आठवांच्या हिंदोळ्यावर.. काशिराम खरडे सोबत… आ उपक्रमात आपले स्वागत..

खरं तर एवढा मोठा साहित्य प्रवास, साहित्याची अस्सल जाण, साहित्यासोबतच पत्रकारीतेच्या क्षेत्रातही नावलौकिक मिळवत शब्दांची नैसर्गिकता जपणं… हे खूप कमी लोकांना जमतं. आपण ‘साहित्य’ या संकल्पनेकडे कसं बघता….

विजय सातपुतेनमस्कार, सर्व प्रथम  आपल्याला.  आणि समस्त मोहरली करांना.

कथा,  कविता, लेख यांची निर्मिती करताना मांडलेले  आशय, विषय जितके लोकाभिमुख तितके  आपले साहित्य रसिकांना जास्त भावते त्या साठी वाचन, लेखन, चिंतन आणि मनन, यांचा व्यासंग खूप  उपयोगी ठरतो  असे मला वाटते. साहित्य हे माणूस जीवंत ठेवण्याचे प्रभावी माध्यम आहे  असे मला वाटते.

काशिराम खरडे व्वाह…!!

माणसाचं जिवंतपण साहित्यात दडलेलं आहे हा अतिशय उमदा विचार आपला… बहोत खूब…!

सर, आपण १९८८ पासून लिहिताय, असं आम्हाला कळलं. हा एवढा प्रदीर्घ साहित्यिक अनुभव गाठीशी बांधून साहित्याच्या प्रांगणात वावरत असतांना बऱ्याच आठवणींच्या गाठोड्यातील एखादी अशी आठवण सांगता येईल की ज्यामुळे आपण साहित्याशी जुळले गेलात…?

विजय सातपुतेखरं तर  आज मागे वळून बघताना  इतका साहित्य प्रवास  आपला होईल हे त्या वेळी कुणी भाकीत केले  असते तर ते खोटे ठरले  असते पण दोन महत्वपूर्ण घटना घडल्या  आणि मी साहित्याशी जोडला गेलो.

1992 मध्ये राज्य स्तरीय काव्य संमेलन आणि स्पर्धा चे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. यावेळी राजा गोसावी, वसंत शिंदे, वसंत बापट आणि जीवन राव कीर्लोस्कर व्यासपीठावर होते. तेव्हा मी केलेले स्वागत गीत आणि मोरपीस कविता सर्वांना  अतिशय  आवडली.  वसंत बापट यांनी सभागृहातून माझ्या वडिलांना व्यासपीठावर बोलावून घेतले. त्यांच्या हातून पुष्पहार अर्पण केला व पेढे दिले आणि त्याच वेळी मला कविराज पदवी बहाल केली. हा  आनंद क्षण आणि जगदीश खेबुडकर यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन मला साहित्याचा नावकरी आणि गावकरी बनवून गेले.

ऐन वसंती,  बहर संगती

वसंत बापट नाव गाजते

भावनेच्या शिशिरालाही

वसंत वैभव देऊन जाते

धन्य लेखणी नरोत्तमाची

स्वागत करतो तिचे

स्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम.

 

राजा राजा काय चीज ही

वाचून पाहून सांगा मजला

गोष्ट राजा गोसावींची

धन्य धन्य त्या  अभिनयाची

स्वागत करतो  अभिनयाचे

स्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम.

 

असे त्यातील ददोन कडवी होती.

काशिराम खरडे खरंच किती भाग्यवान आहात आपण इतक्या उत्तुंग व्यक्तीमत्वांकडून कौतुकाची थाप मिळणं, ही खूप मोठी गोष्ट आहे.

आपल्या एकंदरीत साहित्य प्रवासाबद्दल सांगावं…

विजय सातपुतेसाहित्यिक, नाट्य, संगीत, आणि तमाशा कलावंतांना जवळून पाहण्याची संधी या साहित्य प्रवासाने दिली. 1993 ते 2013 पर्यत डिफेन्स अकौंट मध्ये सर्व्हिस केली.  अनेक कविता लिहिल्या.  2005 मध्ये पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला.  अक्षरलेणी या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचे  अनुदान मिळाले.  अनेक शासकीय  आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले.  अक्षरलेणीकार म्हणून  ओळख मिळाली. प्रस्तावना कार,  मानपत्र लेखन  आणि वृत्त पत्र स्तंभलेखन यातून संपूर्ण महाराष्ट्रात मित्रपरीवार रसिक वर्ग निर्माण झाला.

2012 मध्ये अक्षरलेणी संग्रहाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली.  या संग्रहास महाकवी कालिदास पुरस्कार प्राप्त झाला.

आजपर्यंत कवितेच्या प्रत्येक काव्य प्रकारात लेखन केले आहे. विविध काव्य प्रकारात प्रविण्य संपादन करून अनेक पुरस्कार कवितानी मिळवून दिले आहेत.  गझल, हायकू,  चारोळी,  छंदोबद्ध रचना, मुक्त छंद रचना,   अभंग ,ओवी,  अष्टाक्षरी आणि नवकाव्य प्रकारात आजवर विपुल लेखन केले आहे. कथा लेखन,  ललित लेख लेखन दिवाळी अंकासाठी दरवर्षी केले जाते.  बालसाहित्य देखील लिहिले आहे.  अनेक शाळातून मुलांसाठी काव्य सादरीकरण केले आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावरून माझ्या जास्तीत जास्त कथांचे  अभिवाचन झाले आहे.  अनेक काव्य लेखन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा  आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी  आयोजन केले आहे.  अनेक कार्यक्रमांचे निवेदन केले आहे .या प्रवासात  वीस हून अधिक संस्थेत विविध पदांवर कार्यरत आहे ही संधी साहित्य क्षेत्राने दिली.

काशिराम खरडे आजवरच्या वाचनात सर्वात जास्त आडलेली साहित्याकृती….

विजय सातपुतेवाचनाचा वारसा  आईकडून मिळाला.  माझी आई 1967 सालची जगन्नाथ शंकर शेठ स्काॅलरशीप मिळालेली विदुषी आहे.  माझ्या दुप्पट वाचन तिचे आहे.  माझे वडील सरकारी कर्मचारी. पण वाचन संस्कृतीचा प्रचार  आणि प्रसार करण्यासाठी होम सर्व्हिस लायब्ररी भाग्यश्री वाचनालय सुरू केले. त्यामुळे विपुल वाचन केले  आहे. छावा कादंबरी, कुसुमाग्रज यांचा विशाखा कविता संग्रह  आणि शांता शेळके यांचा रेशीमरेघा कविता संग्रह या  आवडत्या साहित्य कलाकृती  आहेत.  डिटेक्टिव्ह कथा देखील खूप वाचायला  आवडतात.

काशिराम खरडे आपण पुणेकर आहात. पुणे हि खरंतर आपली सांस्कृतिक राजधानी. पण वेगळ्या अर्थाने विचारायचे झाल्यास पुणेरी पाट्या, पुणेरी टोमणे, पुणेरी लहेजा या व अशा इतर तत्सम गोष्टींमधूनही साहित्य डोकावतच असतं. पुण्याला साहित्याचा वारसाही खूप मोठा आहे. पुणेरी साहित्याबद्दल काय सांगाल…?

विजय सातपुते साहित्य जेव्हा लोकाभिमुख होते तेव्हा प्रांतनिहाय त्याचे वर्गीकरण लोकवैशिष्ट्ये पाहून केले जाते.  यात मनोरंजन,  प्रबोधन या बरोबरच स्वभाव प्रणित शब्द चित्र, व्यक्ती चित्रण देखील तुम्हाला लोकाभिमुख करतात. पुणेरी पाट्या, पुणेरी टोमणे याबरोबरीने  अभिजात साहित्यिक पुण्याने दिले आहेत.   वसंत बापट यांनी कित्येक संस्थाची घोषवाक्ये,  जाहिराती स्लोगन लिहिलेली आहेत. घेतलेल्या  अनुभवांच प्रगटीकरण करताना माणूस माणसाशी जोडला जावा हा लेखन  उद्देश मनात ठेऊन  आजवर चे लेखन  आणि साहित्यिक वाटचाल झाली आहे.  अजूनही सुरू आहे.

काशिराम खरडे कवितेबद्दल काय सांगाल…?

विजय सातपुते शब्दांचा प्रवास ह्रदयापासून ह्रदयापर्यत होताना होणारी कविता स्वतः जगते आणि  आपल्यातल्या माणसाला जगवते . कवितेने  मला  आजवर जे काही दिले आहे त्यात रसिकांचा  आशिर्वाद आणि दैनंदिन लेखन कला व्यासंग माझ्या दृष्टीने  अत्यंत महत्त्वाचा आहे.

जन्मणारी आपली प्रत्येक कलाकृती ही नवजात किंवा नवोदित  असते ती रसिकांसमोर स्पर्धा,  सादरीकरण या माध्यमातून  आली पाहिजे.  आपण  आता ज्येष्ठ झालो अमुक स्पर्धेत सहभागी होऊ नये हे मला पटत नाही. हा पण पुरस्कार मिळाले की लेखन  अधिक जबाबदारीने करावेसे वाटते त्यामुळे लेखन काळजीपूर्वक केले जाते. नाविन्य  आणि विविधता लेखनात  असावी त्या शिवाय लिखाण समृद्ध होत नाही  असे माझे मत आहे.  अनेक विषयांवर लेखन  आत्ता पर्यंत वृत्त पत्रातून कैले आहे.

काशिराम खरडे आणखी काय सांगाल…?

विजय सातपुते निवेदन, वृत्त पत्र लेखन,  काव्य लेखन,  कथा, कादंबरी,   आणि चित्रपट पटकथा लेखन  असा साहित्य प्रवास झाला आहे. दक्ष या  चित्रपटाची पटकथा व तीन गाणी लिहिली आहेत. मार्च 2020 मध्ये शुटिंग सुरू होईल. जय जवान, जय किसान या विषयावर सदर चित्रपट आहे.

प्रकाश पर्व हा कविता संग्रह जून 2019 मध्ये प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्र भूषण  अष्टपैलू व्यक्ती मत्व म्हणून पुरस्कार डॉ  श्रीपाल.  सबनीस यांच्या हस्ते  आजवरच्या साहित्यिक वाटचालीकरता प्रदान करण्यात आला आहे.

निवेदन, वृत्त पत्र लेखन,  काव्य लेखन,  कथा, कादंबरी,   आणि चित्रपट पटकथा लेखन  असा साहित्य प्रवास झाला आहे. दक्ष या  चित्रपटाची पटकथा व तीन गाणी लिहिली आहेत. मार्च 2020 मध्ये शुटिंग सुरू होईल. जय जवान, जय किसान या विषयावर सदर चित्रपट आहे.

धन्यवाद विजय सातपुते जी. मोहरली लेखणी साहित्य समुहाला वेळ आणि मुलाखत दिली. आपल्या आगामी साहित्य प्रवासाला अनेक शुभेच्छा

प्रस्तुति – मोहरली लेखणी साहित्य समुह – आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत…

साभार – विजय यशवंत सातपुते, यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009., मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ नव वर्ष विशेष -आज ह्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस… ☆ – सुश्री आरुशी दाते

सुश्री आरुशी दाते

( नव वर्ष की पूर्व संध्या पर  सुश्री आरूशी दाते जी  का  एक आलेख आज ह्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस… )

 

☆ आज ह्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस…  

 

ह्या वर्षी जीवनात अनेक चढ उतार पाहिले, भिन्न भिन्न लोकांना भेटले, काही लोकं सोडून गेले(का ते मला माहित नाही), काही नवीन लोक जोडले गेले, काही जुनेच लोक नव्याने समोर आले…

खूप सारे अनुभव गाठीशी आले, कोणी चिखलफेक केली तर कोणी कौतुकाची फुलं उधळली, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या… मला माझा छंद जोपासता आला… अपेक्षित, अनपेक्षीत प्रसंगांना सामोरं जावं लागलं, कधी कधी पार खचून गेले, कधी कधी तब्येतीनं नाराजी व्यक्त केली…

हाती घेतलेली काही कामं सोडून द्यावी लागली, तर नवीन कामांची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली… पण हा प्रवास कुठेही थांबला नाही… मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक बाजू सांभाळताना होणारी ससेहोलपट आठवली की अंगावर शहारा येतो… अनेक संकटे आली तरी, सुखाच्या क्षणांनी संकटांना तोंड देण्यासाठी पंखात बळ दिले…

ह्याच सुखाच्या क्षणांना सोबत घेऊन आणि हे सुखाचे क्षण माझ्या आयुष्यात आणणारे माझे पती, माझी मुलगी, सासरचे कुटुंबीय, माहेरचे कुटुंबीय, नातलग आणि जीवश्च कठश्च मित्र मैत्रिणी ह्यांच्या सोबतीने पुढील वर्षात पदार्पण करते…

तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि तुमच्या ऋणात राहू दे हेच मागणे मागते…

आपणासर्वांना नवं वर्ष सुखाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

 

लोभ असावा,

 

© आरुशी  दाते 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 29 – मला प्रभावित करणा-या स्त्रिया ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनका एक संस्मरणात्मक आलेख   “मला प्रभावित करणा-या स्त्रिया.  सुश्री प्रभा जी  ने  अतिसुन्दर, सहज एवं सजीव  रूप से उन सभी स्त्रियों  के साथ अपने संस्मरणों पर विमर्श किया है, जिन्होंने उनके जीवन को प्रभावित किया है। ऐसा अनुभव होता है जैसे वे क्षण चलचित्र की भांति हमारे नेत्रों के समक्ष व्यतीत हो रहे हों।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 29 ☆

☆ आलेख – मला प्रभावित करणा-या स्त्रिया ☆ 

मला वाचनाची आवड  इयत्ता  आठवी/ नववीत लागली. मी शिरूर च्या विद्याधाम प्रशालेत शिकत होते. आम्ही पुण्याहून  शिरूर ला आमचे  नातेवाईक पवार यांच्या घराजवळ रहायला गेलो. पवारांचं सरदार घराणं! पवार काकी खरोखरच एक घरंदाज खानदानी व्यक्तिमत्व, त्यांचा प्रभाव माझ्यावर निश्चितच पडला. त्यांच्याच घरात वाचनाची गोडी लागली. पवार काकींची पुस्तकाची लायब्ररी समोरच होती. एक कादंबरी  आणि  एक मासिक मिळत  असे. तो काळ मराठी लेखिकां चा सुवर्णकाळ होता. पण शैलजा राजे या लेखिकेच्या कथा कादंब-या मी त्या काळात खुप वाचल्या. साकव .साकेत.. दोना पाॅवला, अनुबंध   इ. त्या काळात त्या माझ्या आवडत्या लेखिका बनल्या. पुढे पुण्यात आल्यावर माझ्या घराच्या  अगदी जवळच “सुंदर नगरी” त त्या रहायला होत्या. मी धाडस करून त्यांना भेटायला गेले. त्या काळात आमचा दूधाचा व्यवसाय होता. मी त्यांच्या साठी डब्यात खरवस घेऊन गेले होते. त्या डब्यात त्यांनी बोरं घालून दिली.. रिकामा डबा देऊ नये म्हणून… त्या नंतर मी त्यांच्या घरी  अनेकदा गेले… त्या खुप छान आणि  आपुलकीने बोलायच्या. माझ्या कविता त्यांनी खुप लक्षपूर्वक  ऐकल्या होत्या आणि छान दाद ही दिली होती. पुढे मी अभिमानश्री हा दिवाळी अंक सुरु केल्यावर त्यांनी अंकासाठी कथा ही दिली होती.

विद्या बाळ, छाया दातार, गौरी देशपांडे या स्रीवादी लेखिकांचाही माझ्यावर खुप प्रभाव राहिला आहे…..

मी स्रीवादी बनू शकले नाही. पण स्रीवादी चळवळीचा आणि विचारसरणी चा प्रभाव माझ्यावर आहे. विद्याताई बाळ यांचा नारी समता मंच  आणि मिळून सा-याजणी मासिकामुळे परिचय झाला. गौरी देशपांडे चे साहित्य मी झपाटल्यासारखे वाचले आणि पीएचडी साठी “गौरी देशपांडे च्या समग्र साहित्याचा चिकित्सक  अभ्यास” हा विषय घेतला होता त्या संदर्भात गौरी देशपांडें शी काही पत्रव्यवहारही झाला (त्या काळात त्या परदेशात  असल्यामुळे) पण  माझे संशोधन पूर्ण होऊ शकले नाही. आणि त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची  इच्छा ही पूर्ण होऊ शकली नाही.

वरील सर्व स्त्रियां चा माझ्या  आयुष्यावर  प्रभाव राहिला आहे हे नक्की.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी हे सुद्धा लहानपणापासून आवडणारं प्रभावी व्यक्तिमत्व!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ रंजना जी यांचे साहित्य #- 26 – आजची युवा पिढी आपल्या मुळ संस्कृतीपासुन दुरावत चालली आहे…? ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है एक आदर्श शिक्षिका के कलम से  मात्र युवा पीढ़ी ही नहीं अपितु हमारी पीढ़ी के लिए भी एक सार्थक सन्देश  देता आलेख  “आजची युवा पिढी आपल्या मुळ संस्कृतीपासुन दुरावत चालली आहे…?”  यह आलेख साहित्यधारा साहित्य समुह अमरावती व्दारा आयोजित भव्य लेख स्पर्धा में प्रविष्टि स्वरुप  प्रेषित किया गया था। )

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 26 ☆ 

 ☆ आजची युवा पिढी आपल्या मुळ संस्कृतीपासुन दुरावत चालली आहे…? 

 

नशीब  म्हणायचं की, डोळ्यासमोर स्वतःसाठी वृद्धाश्रम दिसायला लागल्या नंतर तरी आपल्याला संस्कृतीची आठवण झाली. आणि युवा पिढीला संस्कार नाहीत संस्कृती पासून दुरावत चालली हे म्हणणे कितपत बरोबर आहे.  कारण संस्कार आणि संस्कृती पुस्तके वाचून शिकायची नव्हे तर आचरणातून घडवायची बाब आहे. मुलं जे पाहातं तेच शिकत असतं.

मुलांना नावं ठेवणाऱ्या पालकांना माझा साधा प्रश्न आहे.. किती आईवडील संध्याकाळी आपल्या मुलांना घेऊन शुभंकरोती म्हणतात?  बोधकथा सांगतात, मुलांसमोर आई वडील सासू सासरे इतर मोठी माणसं यांचा मान ठेवतात. निःस्वार्थ शेजार धर्म पाळतात, किती गरजू लोकांना मदत करतात  हाहीप्रश्नच आहे.

शिवाय मुलांना फास्ट फूड,कोल्ड्रिंक्स, पिझ्झा बर्गरची, सवय कुणी लावली?

किती जणांच्या घरी आज घरी बनवलेले लोणचे, पापड, कुरडई, साखर आंबा, आवळ्याचा मुरंबा, तिळाची, पोळी गुळाची, पोळी, तीळ / शेंगदाण्याचे लाडू असे पदार्थ बनवलेले असतात ?  जे आपण लहानपणी भरपेट खाल्ले,….

अनेक माता आज मुलांना डब्यात चक्क मॕगी करून देतात. काहीजण मुरमुरे तेलमीठ लावून तर काहीजणी चक्क दहा रूपये देऊन मुलांना कुरकुरे,चक्के पे चक्का घ्यायला सांगतात.  मग त्या पैशात मुलांनी नेमकं काय केलं हे पाहायची सुद्धा तसदी घेत नाहीत. … मी मुलांना डब्यात पोळी भाजीची सक्ती केली तेव्हा  घरी बसणाऱ्या एका माऊलीने चक्क एक रूपयाची लोणच्याची पुडी आणि एक पोळी देऊन पाठवलं.  रोज पोहे चालणार नाहीत असा निरोप दिल्या नंतर मला तीनचार डबे द्यावे लागतात “मह्यानं व्हतं नाही” असं उत्तर दिलं.  आम्ही काही देऊ मॕडमला काय करायचं अशी आपलीच  भावना असते, आणि मग यातूनच जो रोज नवनवीन फास्ट फूड आणणार  तोच श्रेष्ठ आदर्श बनतो ते पाहून बाकीचे घरी हट्ट करून तेच आणतात.  दिलेल्या दहा रूपयातून  चौथी पर्यंतचा मुलगा पाच रूपयाची माजाची किंवा थम्सअपची बॉटल विकत घेतो, यात जर आई वडीलांना काही वावगे वाटत नसेल, तर बारावीत त्याने ड्रिंक्स घेतले तर त्यात नवल  ते काय !

एखाद्या वेळी सर मॕमनी मारलं, की दंड थोपटून आपणच भांडायला तयार. …..! आम्हाला वेळ नाही आणि शाळेतल्यांना काय करायचं……. यातूनच शिक्षक फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढेच आपले काम समजतात. . ….बाकी अभ्यासाचं गुत्ते ट्युशनचे . ….. आणि मग आम्ही झालो आदर्श पालक! हे झालं श्रीमंती थाटाचे लक्षण.

याशिवाय गरीबांनाही मुलं इंग्रजी शाळेतच हवे असतात.  तिथं मुलं काय शिकतात हे यांना कळत नाही, हे मुलांना कळायला फार वेळ लागत नाही.  मग मुलं श्रीमंत मुलांची बरोबरी करण्याच्या नादात अनेक भलेबुरे मार्ग अवलंबतात. शिवाय गरीब असो की श्रीमंत आई वडीलां पेक्षा आपणच हुशार आहोत ते बिन डोकं असा समज झाल्यानंतर सुरूवातीला ते आईला तुला काही कळत नाही म्हणतात, त्यात काही वावगं आहे असं कोणालाही वाटत नाही  मग हळूहळू वडीलांचा नंबर , मग अशा आई वडीलांच काही ऐकण्याचा प्रश्न येतोच कुठे? अशी  मुलांची हळूहळू  मानसिकता बनते आणि यातूनच मुलं  उद्धट,  उद्दाम होतात. पुढे नकळतच   मोकाट होतात यात शंकाच नाही.

आजी आजोबा शिवाय घर असण्याची ही तिसरी पिढी आहे खरंतर. ..परंतु आपण एवढे दिवस आई बाबा आणि मुलं या चौकोनी घरात खुश होतो. पण आता आपलाच पत्ता काटला जात आहे याचं टेन्शन आल्या मुळे मुलं संस्कार आणि संस्कृती पासून दूरावत असल्याची जाणीव आपल्याला व्हावी ही खेदाची बाब आहे

आदरनिय बाबा आमटे यांची सलग तिसरी पिढी त्यांचे कार्य अविरत पुढे चालवत असेल. … आणि तेही आपल्या मते आजच्या रसातळाला पोहचू पाहणाऱ्या संस्कृतीत……!  तर कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच गरज आहे.  यासाठी प्रबोधन हवेच असेल तर अगोदर प्रौढांचे करण्याची गरज आहे, कारण हे संस्काराचे बीज त्यांच्याच आदर्शातून उगवलेले आहे असं माझं स्पष्ट मत आहे.

कारण सकाळच्या वेळी सुंदर भजन लावून ठेवायला, देव पूजा करायला,एक टिकला गंध लावायला, घरातील मोठ्यांच्या पाया पडायला, घरी आलेल्यांची अस्थेने चौकशी करायला, घरी आणलेली नवीन वस्तू शेजारी किंवा निदान कामवालीला तरी घासभर द्यायला,फारसा वेळ किंवा पैसा लागत नाही. परंतु याची आपल्याला गरजच वाटत नसेल तर मुलांच्या नावाने ओरडण्यात काय अर्थ आहे.

दिवसभर व्यस्त आहात ठीक आहे पण निदान रात्रीचे जेवण सर्वांनी मिळून  टीव्ही लावून न करता आपल्या लहानपणी करत असू तसं गप्पा गोष्टीत करायला काय हरकत. तोही वेळ आपण मुलांसाठी देत नसू तर मुलांना सांभाळणारी आया किंवा गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड जवळचे वाटले तर त्यात नवल काय?

थोडं आपलं लहानपण आठवून पाहा अशा कितीतरी गोष्टी असायच्या ज्या पळत येऊन ताई- दादा, आई- बाबा,आजी- आजोबांना सांगायच्या असायच्या आणि त्या बदल्यात ढीगभर प्रेम किंवा तोंडभर खाऊ घेऊन आपण नाचत पळायचो.  दंगामस्ती करायला घरचं काय अख्खी गल्ली सुध्दा कमी पडायची.. … चिखल,माती, दगड, वाळू, पाऊस कशाचीही तमा नसायची.  ओलसर मातीचे किंवा वाळूचे खोपे बणवण्यात तासन् तास गुंग असायचे आणि मोठेही कौतुकानं पाहायचे तोंडभर कौतुक करायचे…. मूठभर मास चढायचं…..

नुसतं पास झालो कळालं तरी पेढ्यांचा पुडा घेऊन गल्लीभर वाटायचो. ….जसं काही एव्हरेस्ट सर केले एवढा आनंद असायचा. सागळ्यांच्या कौतुकानं छाती फुगून यायची. .. केवढा!! आत्मविश्वास वाढलेला असायचा. आज मुलं घाबरतात. ….स्वच्छ आई बाबांना…! मुलांना शी घाण च्या नावावर माती, पाणी, पाऊस, वाळूपासूनच नव्हे तर स्वच्छंदपणा पासूनच तोडलं आहे आपण,  घरात घाण नको,पसारा नको, मोठ्याने आवाज नको, घरी कुणी,सोबती नको बाहेरची मुलं घरात नको. ….

मग. …..पुस्तकात,नजर चुकवून मोबाईल किंवा टीव्हीला डोळे लावून बसतात. …. बऱ्याच माऊली सुद्धा मुलगा  शांत बसतो म्हणून मोबाईल हाती देऊन धन्यतेचा अनुभव घेत असतात.

मुलांना 80%,90% मार्क्स मिळाले तरी कुणाला तरी 95% मिळाल्यामुळे कमीपणाची भावना आणि पालकांची भिती वाटत असते.  मुलं म्हणजे काय मशीन आहेत का?  आणि सगळ्यांनाच 99% टक्के कसे पडतील सगळेच डॉक्टर झाले तर कसं चालेल हो…. अन् क्लासवन अॉफिसर सोडले तर बाकी लोक जगतात ते  काय जीवन नसतं. ….! नंबर वनच्या नादात आपण आपलं जीवन हरवून बसतं आहोत हेच मुळी आपल्याला समजेनासे झाले आहे.  मुलांशी मुक्त संवाद नाही त्यांच्या आवडी, निवडीचा विचार नाही, अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं चक्क गुदमरून जाऊन टोकाची पाऊले उचलतात. मग ती आत्महत्या असो की व्यसनाधिनता……!

नातेवाईकांचे येणे जाणे नाही कुणी आलं गेलं तरीसुद्धा हातचं राखून. …..! प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट पैशात मोजून, तुसडेपणाणे  आपले वागणे….

मुल जेव्हा मावस चुलत आत्ते भावंडे जमतात तेव्हा हिशोब करतात त्यांच्यापासून वस्तू लपवून ठेवतात त्यांना नीट बोलत नाहीत  ते कधी जातील याची वाट पहातात तेव्हा आपल्याला मजा आणि त्यांच्या हुशारीचं कौतुक सुद्धा वाटतं, परंतु हीच मुलं जेव्हा आपल्या बाबतीत हिशोब लावतात तेव्हा आपल्याला संस्कृतीचा ऱ्हास जाणवायला लागतो. परंतु ही संकुचित वृत्ती निर्माण कोणी केली याचा विसर आपल्याला पडलेला आसतो.  पेराल तेच उगवते हाच जगाचा नियम आहे हेच सत्य आहे. याचं भान प्रत्येकाला असायलाच हवं.आणि तरीदेखील संस्कार /संस्कृती ऱ्हासाचं खापर आपण त्यांच्याच माथी फोडत असू तर हा चक्क कृतघ्नपणा ठरेल.

अर्थातच हे मत माझें आहे आणि याला अनेक अपवाद सुद्धा असू शकतात. परंतु बहुतांशी हेच चित्र सत्य आहे.

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares
image_print