मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #222 ☆ भाकरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 222 ?

 

☆ भाकरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मी एका हिरे व्यापाऱ्याला विचारलं

जगातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती

तर तो म्हणाला “हिरा”

*

मग मी एका सराफाला विचारलं

जगातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती

तर तो म्हणाला “सोनं”

*

त्या नंत मी एका भुकेल्या माणसाला विचारलं

जगातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती

तर तो म्हणाला “भाकरी”

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्रीमंती” – कवी :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “श्रीमंती” – कवी :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

भूतकाळातील व वर्तमानातील

सर्व गोष्टी लक्षात राहणे

चष्म्याशिवाय बघता व वाचता येणे

कानाने सुमधुर संगीत व संवाद ऐकू येणे

बत्तिशी शाबूत असणे व

ऊस-चिक्की खाता येणे

सुंदर फुलांचा सुगंध घेता येणे

ही खरोखरच साठीनंतरची श्रीमंती आहे

 

लिमलेटच्या गोळ्या व कॅडबरी खाता येणे

आपण लिहिलेले दुसऱ्याला वाचता येणे

कुठल्याही कागदपत्रांवर

एकसारखी सही करता येणे

जिन्याच्या पायऱ्या आधाराशिवाय

पटापट उतरता येणे

डोक्यावरती केशसंभार

(फक्त त्याचा ) भार असणे

ही खरोखर साठीनंतरची श्रीमंती आहे

 

आपल्या गरजेपुरते निवृत्तीवेतन असणे

कर्जाचा कोणताही भार डोक्यावर नसणे

आपली मुलेबाळे आपल्या जवळ असणे

नातवंडांचे कोडकौतुक करायला मिळणे

मनात आले की सहलीला जाता येणे

ही खरोखरच साठीनंतरची श्रीमंती आहे

 

शाळा-कॉलेजमधले

बालमित्र-मैत्रिणी संपर्कात असणे

नोकरीमधले सहकारी

अधूनमधून भेटणे

सहजच आठवण आली म्हणून

नातेवाईकांनी फोन करणे

आधुनिक काळातील सर्व

गॅझेट्स लीलया वापरता येणे

कुटुंबामध्ये सुसंवाद आनंद

व मनःशांती असणे

इतके सर्व असेल तर

हीच खरी

अगदी फुलटूस श्रीमंती आहे

 

कवी : अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अमृतसिद्धी योग… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– अमृतसिद्धी योग…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

प्रजासत्ताक हा | गणराज्य दिन |

संविधानी लीन | भारतीय ||१||

*

दीडशे वर्षाचे  | संपे पारतंत्र्य |

भारत स्वातंत्र्य | संघर्षाने ||२||

*

स्वातंत्र्यानंतर |  संविधान भिस्त |

घटनेची शिस्त | सार्वभौम  ||३||

*

पंचाहत्तरावे | साजरे हे वर्षं |

मनी आहे हर्ष | घटनेच्या ||४||

*

अमृत सिद्धीचा  | योग आला आज |

विविधता साज | चढवोनी ||५||

*

राष्ट्राचे सामर्थ्य | कर्तव्य पथासी |

शस्त्रसज्जतेसी | कवायत ||६||

*

विश्वगुरु राष्ट्र | रामराज्य नांदी |

प्रजा हॊ आनंदी | भारताची ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नाती☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

समजून घेतजाऊ वहिवाट या जगाची

जपतात लोक येथे नातीच फायद्याची

*

या बेगडी जगाला असतेच हौस मोठी

दुस-या समोर नुसते चमकून लाजण्याची

*

लाचार भाट येथे घेतात की सुपारी

खोटी मधाळ बोली रेटून बोलण्याची

*

हे साळसूद ढोंगी झालेत भक्त भोंदू

मिळते मुभा तयाना खैरात मागण्याची

*

नादान टोळक्याना जपतोय आज आम्ही

देतात तेच धमकी जाळून मारण्याची

*

झडतात रोज फैरी बेफाम घोषणांच्या

होते शिकार जनता जातीय भांडणाची

*

जो तो इथे स्वतःला समजून थोर घेतो

आलीय वेळ त्याला हटकून रोखण्याची

*

स्वातंत्र्य स्वैरतेने गोत्यात येत आहे

नाही तमा कुणाला धुंदीत वागण्याची

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 158 ☆ हे शब्द अंतरीचे… हाक तुला अंतरीची…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 158 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… हाक तुला अंतरीची…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

(अष्टअक्षरी)

हाक तुला अंतरीची

ऐक कृष्णा या दीनाची

नसे तुझ्या-विना कोणी

आस तुझ्या चरणाची…!!

*

दाव तुझे रूप देवा

भावा आहे माझा भोळा

पावा वाजवी कृपाळा

नको अव्हेरू या वेळा…!!

*

दोषी आहे मीच खरा

तुला ओळखलेच नाही

आता करितो विनंती

स्नेह भावे मज पाही…!!

*

राज नम्र शुद्ध भावे

दास म्हणवितो तुझा

प्रेम तुझे अपेक्षित

स्वार्थ पुरवावा माझा…!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ – विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆

पाशही सगळे सोडू मोकळे चल जाऊया दूर तिथे

तुझे माझे, देणे घेणे, नसतील असले शब्द जिथे

नसेल खुरटे घरटे अपुले बंद ही नसतील कधी दारे

 स्वच्छ मोकळ्या माळावरुनी वाहत येतील शीतल वारे

आशंकेला नसेल जागा नसेल कल्लोळ कुशंकांचे

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत पिल्ले येतील चिऊ काऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोनपाखरे आठवणींची

धकाधकीच्या जीवनातले कण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे हासत पुढच्या हाती देऊ

 खूप जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा पार जुना

 – श्री सुहास रघुनाथ पंडित

(प्रेम रंगे, ऋतुसंगे या काव्यसंग्रहातून)

पती-पत्नीच्या नात्यात संध्या पर्व हे जीवनाच्या किनाऱ्यावरचे साक्षी पर्वच असते. आयुष्याकडे मागे वळून पाहताना खूप काही मिळवलं आणि खूप काही गमावलं असं वाटू लागतं.  हरवलेल्या अनेक क्षणांना गवसण्याची हूरहुरही लागते.  “पुरे आता, उरलेलं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जगूया की..” असे काहीसे भाव मनात उमटतात.

याच आशयाची सुप्रसिद्ध कवी श्री सुहास पंडित यांची ही कविता. शीर्षक आहे विश्रांतीचा पार जुना*

ही कविता म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर पती-पत्नींचे  एक मनोगत आहे. मनातलं काहीतरी मोकळेपणाने आता तरी परस्परांना सांगावं या भावनेतून आलेले हे विचार आहेत.

पाश ही सगळे सोडू मोकळे चल जाऊया दूर तिथे

तुझे माझे देणे घेणे नसतील असले शब्द जिथे

बंधनात, नियमांच्या चौकटीतल्या आयुष्याला आता वेगळ्या वाटेवर नेऊया. आता कसलेही माया— पाश नकोत, कसलीही गुंतवणूक नको. तुझं माझं दिल्या घेतल्याच्या अपेक्षांचं ओझंही नको, अशा मुक्त ठिकाणी आता दूर जाऊया.

नसेल खुरटे घरटे अपुले बंदही नसतील कधी दारे

स्वच्छ मोकळ्या माळावरती वाहत येतील शीँँतल वारे

आज पर्यंत आपल्या भोवतीचं वातावरण खूप संकुचित होतं. कदाचित जबाबदार्‍यांच्या ओझ्यामुळे, मर्यादित आर्थिक परिस्थितीमुळे असेल आपल्याला काटकसरीने राहावं लागलं, आपल्याकडे कोण येणार कोण नाही याचे तारतम्यही ठेवावे लागले, आपल्याच मनाची दारे आपणच बंद ठेवली, मनाला खूप मारलं पण आता मात्र आपण आपल्या मनाची कवाडे मुक्तपणे उघडूया, आपल्या जगण्याचे वावर आता मोकळं आणि अधिक रुंद करूया जेणेकरून तेथे फक्त आनंदाचेच स्वच्छ आणि शीतल वारे वाहत राहतील.  मनावरची सारी जळमटं, राग —रुसवे, मतभेद, अढ्या दूर करूया.

आशंकेला नसेल जागा नसेल कल्लोळ कुशंकाचे   

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे

एकमेकांविषयी आता कसल्या ही शंका कुशंकांचा गोंधळ नको.  इथून पुढे विश्वासानेच परस्परांच्या नात्याला उजळवूया.  झालं गेलं विसरून एकमेकांची मने पुन्हा जिंकूया,जुळवूया.सगळी भांडणे, मतभेद विसरुन जाऊया.

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत पिल्ले येतील चिऊकाऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोन पाखरे आठवणींची

काळ किती सरला!  आपल्या घरट्यातली आपली चिमणी पाखरं आता मोठी झाली उडून गेली पण त्यांच्या पिल्लांनी आता आपल्या घराचं गोकुळ होईल.. पुन्हा,” एक होती चिमणी एक होता कावळा” या बालकथा आपल्या घरट्यात रंगतील आणि पुन्हा एकदा बालसंगोपनाचा आपण भोगलेला तो गोजिरवाणा काळ आपल्यासाठी मनात उतरेल.  या दोन ओळीत उतार वयातील नातवंडांची ओढ कवीने अतिशय हळुवारपणे उलगडलेली आहे आणि आयुष्य कसं नकळत टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जातं याची जाणीवही दिलेली आहे.

धकाधकीच्या जीवनातले कण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे हासत पुढच्या हाती देऊ

जीवनातले अत्यंत अवघड खाचखळगे पार केले, दगड धोंड्या च्या वाटेवर ठेचकाळलो  पण त्याही धकाधकीत आनंदाचे क्षण होतेच की!   आता या उतार वयात आपण फक्त तेच आनंदाचे, शांतीचे क्षण वेचूया  आणि सुखानंदांनी भरलेले  हे मधुघट पुढच्या पिढीच्या हातात सोपवूया.

कवीने या इतक्या सोप्या, सहज आणि अल्प शब्दांतून केवढा विशाल विचार मांडलाय! दुःख विसरू या आणि आनंद आठवूया.  भूतकाळात कुढत बसण्यापेक्षा सुखाच्या आठवणींनी मन भरुया आणि हाच आनंदाचा, सुसंस्कारांचा वारसा पुढच्या पिढीला देताना हलकेच जीवनातून निवृत्तही होऊया.  पुढच्या पिढीच्या आयुष्यात आपली कशाला हवी लुडबुड? त्यांचं त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दे. आपल्या विचारांचं, मतांचं दडपण आपण त्यांना कां बरं द्यावं ?

पुरे जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा फार जुना

किती सुंदर आणि आशय घन आहेत या काव्यपंक्ती! सगळ्यांचं सगळं निस्तरलं, सतत दुसऱ्यांचा विचार केला, त्यांच्यासाठीच राब राब राबलो, कित्येक वेळा याकरिता आपण आपल्या स्वतःच्या सुखालाही पारखे झालो पण आता पुरे झालं! आता फक्त तू मला आणि मी तुला. नको कसली धावाधाव. जरा थांबूया, निवांतपणे  आपल्याच जीवनवृक्षाच्या  पारावर विश्रांती घेऊया. विश्रांतीचा तो पार आपल्याला बोलावतो आहे.

विश्रांतीचा  पार जुना या शब्दरचनेचा मी असा अर्थ लावते की आता निवांतपणे या पारावर बसून विश्रांती घेऊ आणि भूतकाळातल्या जुन्या, सुखद आठवणींना उजाळा देऊ.

संपूर्ण कवितेतील एक एक ओळ आणि शब्द वाचकाच्या मनावर कशी शीतल फुंकर घालते..  शिवाय वृद्धत्व कसं निभवावं, कसं ते हलकं, सुसह्य आणि आनंदाचा करावं हे अगदी सहजपणे साध्या सरळ शब्दात सांगते.

प्रतिभा, उत्पत्ती, अलंकार या काव्य कारणांना काव्यशास्त्रात महत्त्व आहेच. कवी सुहास पंडितांच्या काव्यात या काव्य कारणांची सहजता नेहमीच जाणवते. मनातील संवेदना स्पंदने ते जाता जाता लीलया मांडतात त्यामुळे वाचक, कवी मनाशी सहज जोडला जातो, कुठलाही अवजडपणा,बोजडपणा,क्लीष्टता, काठिण्य त्यांच्या काव्यात नसते.

विश्रांतीचा पार जुना या काव्यातही याचा अनुभव येतो. जिथे —तिथे, दारे —वारे,घेऊ —देऊ यासारखी स्वरयमके या कवितेला लय देतात.

खुरटे— घरटे, कल्लोळ कुशंकांचा, खपणे— जपणे या मधला अनुप्रासही फारच सुंदर रित्या साधलेला आहे.

कुंभ सुखाचे, सोनपाखरे आठवणींची, कण शांतीचे, विश्रांतीचा पार या सुरेख उपमा काव्यार्थाचा धागा पटकन जुळवतात.

मनात तेव्हा फडफड करतील सोन पाखरे आठवणींची या ओळीतील चेतनागुणोक्ती  अलंकार खरोखरच बहारदार भासतो.

खुरटे घरटे ही शब्द रचनाही मला फार आवडली. यातला खुरटे हा शब्द अनेकार्थी आणि अतिशय बोलका आहे. चौकटीत जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाची मानसिकताच या खुरटे शब्दात तंतोतंत साठवलेली आहे. आणि याच खुरटेपणातून, खुजेपणातून मुक्त होऊन मोकळ्या आभाळाखाली मोकळा श्वास घेण्याचं हे स्वप्न फक्त काव्यातील त्या दोघांचं न राहता ते सर्वांचं होऊन जातं.

या कवितेतला आणखी एक दडलेला भाव मला अतिशय आवडला. तो भाव कृतज्ञतेचा. पतीने पत्नीविषयी दाखवलेला कृतज्ञ भाव. “आयुष्यभर तू या संसारासाठी खूप खपलीस, खूप त्याग केलास, कामाच्या धबगड्यात मीही तुझ्या भावनांकडे दुर्लक्ष केले, तुला गृहीत धरले,पण आता एकमेकांची मने जपूया”संसारात ही कबुली म्हणजे एक पावतीच,श्रमांची सार्थकता,धन्यता!

खरोखरच आयुष्याच्या या सांजवेळी काय हवं असतं हो? हवा असतो एक निवांतपणा, शांती, विनापाश जगणं. दडपण नको ,भार नको हवा फक्त एक विश्रांतीचा पार आणि जुन्या सुखद आठवणींचा शीतल वारा. दोघां मधल्या विश्वासाच्या सुंदर नात्यांची जपणूक..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रजासत्ताक दिन ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रजासत्ताक दिन…🇮🇳 ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

जन्मलो देशात त्याचे

नाव हिंदुस्थान आहे 

फडकतो डौलात अमुचा

तो तिरंगा प्राण आहे

*

भिन्न भाषा वेशभूषा

संस्कृतीने एक आम्ही

प्राणाहूनीही प्रिय आम्हा

आमची ही हिंदभूमी

*

गतिमान हे विज्ञानयुग

आम्ही इथे आहोत राजे

 चिमटीत धरतो विश्व

 अनुशक्तीत आमुचे नाव गाजे

*

दूत आम्ही शांतीचे

आम्हा नको कधीही लढाई

मनगटे पोलादी परि ना

मारतो खोटी बढाई

*

आहेत आम्हाला समस्या

त्या आम्ही पाहून घेऊ

सदनात आमुच्या दुष्मनांनो

 तुम्ही नका चोरुन पाहू

*

रक्षिण्या स्वातंत्र्य येथे

वीरता बेबंद आहे

रक्तामध्ये एल्गार अन

श्वासामध्ये जयहिंद आहे

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ इतके मला पुरे आहे – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

इतके मला पुरे आहे लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

बसायला आराम खुर्ची आहे

हातामध्ये पुस्तक आहे

डोळ्यावर चष्मा आहे

इतके मला पुरे आहे ।।१।।

*

निसर्गामध्ये सौंदर्य आहे

निळे आकाश आहे

हिरवी झाडी आहे

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे

इतके मला पुरे आहे ।।२।।

*

जगामध्ये संगीत आहे

स्वरांचे कलाकार आहेत

कानाला सुरांची जाण आहे

इतके मला पुरे आहे ।।३।।

*

बागांमध्ये फुले आहेत

फुलांना सुवास आहे

तो घ्यायला श्वास आहे

इतके मला पुरे आहे ।।४।।

*

साधे चवदार जेवण आहे

सुमधुर फळे आहेत

ती चाखायला रसना आहे

इतके मला पुरे आहे ।।५।।

*

जवळचे नातेवाईक आहेत,

मोबाईलवर संपर्कात आहेत

कधीतरी भेटत आहेत,

इतके मला पुरे आहे ।।६।।

*

डोक्यावरती छत आहे

कष्टाचे दोन पैसे आहेत

दोन वेळा दोन घास आहेत

इतके मला पुरे आहे ।।७।।

*

देहामध्ये प्राण आहे

चालायला त्राण आहे

शांत झोप लागत आहे

इतके मला पुरे आहे ।।८।।

*

याहून जास्त आपल्याला काय हवे आहे?

जगातील चांगले घेण्याचा

आनंदी आशावादी राहण्याचा

विवेक हवा आहे

इतके मला पुरे आहे ।।९।।

*

शरीर माझे योग्य साथ देते आहे,

स्मृतीची मला साथ आहे,

मी कुणावरही आज अवलंबून नाही

इतके मला पुरे आहे ll10ll

*

इतकेच मला पुरे आहे!

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खात्री असू दे… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ खात्री असू दे… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

‘मंदिर त्याचे अयोध्येमध्ये

माझे का नाही  ?’… 

रुसून बसला बाळकृष्ण

अन् बोलेना काही… 

*

‘द्वारकेआधी जन्मलास ना 

अयोध्येत तू रामरूपाने

का मग रूसतो सांग कन्हैया

उगीच आता हट्टाने !…  

*

सोड हट्ट हा आणिक रुसवा 

लवकर जा रे गोधन घेऊनी 

गोपाल तुझी बघ वाट पहाती

हुंदडायला वनरानी…

*

रुसू नको रे पूर्ण होऊ दे 

अवधनगरी ती सर्वांगानी 

मथुरेतही मग होईल सारे 

खात्री असू दे तुझ्या मनी ‘ —

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वप्न अधुरे राहिले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ स्वप्न अधुरे राहिले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

हात तुझा हाती होता,

राहून गेले चालणे !

साथ तुझी हवी होती,

जमले नाही थांबणे !… १

*

स्वप्नात थवा उंच गेला,

उडून नील आभाळी !

पहात बसले येथे,

भग्न स्वप्नं भूतकाळी !… २

*

अधुऱ्या  स्वप्नांची माला,

गात होती माझ्या मनी!

गीत ते संपले कधी,

कळले नाही जीवनी !… ३

*

आक्रंदणाऱ्या रे मना,

दु:ख जगी दाऊ नको !

हसतील तुज सारे,

अगतिक  होऊ नको!.. ४

*

जे मिळाले आजवर,

जपेन ते अंतरात !

आयुष्य सारे  त्यावर,

पेलेल  खंत मनात !…. ५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares