मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 260 ☆ कोण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 260 ?

☆ कोण ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

कुसुम, कोमल,

कामिनी कुंजवनीची,

कौतुक करावे किती,

कलिका कुजबुजती!

कादंबिनी,

कोकिळ कूजती !

काननी केवडा,

केतकी, कुंद कोमेजती!

 कल्पना कृतीत,

कविता, कादंबरी!

कुठली कस्तुरी ??

कार्तिकातली कुमुदिनी!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिवजयंती विशेष – जनतेचा कैवारी… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ शिवजयंती विशेष – जनतेचा कैवारीसौ. वृंदा गंभीर

जिजाऊ पोटी हिरा जन्मला

नाव ठेवले शिवाजी

वदंन माझे शिवरायाला

मारली स्वराज्याची बाजी

*

स्वप्न पाहिले स्वराज्याचे

मर्द मावळे जमविले

शंख फुकले लढाईचे

एक एक करून किल्ले मिळविले

*

प्रताप, राज, तोरणा, पुरंदर

जोडीला होते नाईक

जाधव, मोहिते, निंबाळकर

झाले जनतेचे पाईक

*

सह्याद्रीचा सिंह काडडला

घोड्यावर स्वार होऊनी

ताकदीने वैऱ्यांशी भिडाला

भगवा फडकवला राजांनी

*

रायगडावर तोरण बांधले

शिव छत्रपती राजा झाले

जनतेचा कैवारी म्हणू लागले

शिवबा शिवतारी ठरले

*

माँ साहेबांचे स्वप्न पूर्ण केले

सह्याद्रीला कवेत घेतले

स्वामी रामदासांचे आशीर्वाद

रायगडावर स्थिर झाले

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जागा सुखदायी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ जागा सुखदायी ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

उजळायाच्या कधी सावल्या

भवती अंधाराच्या

तुडवत आलो खूप लांबवर

वाटा दैवगतीच्या

अजून नाही भाग्य लाभले

झाल्या तिन्हीसांजा

मीच लागलो मागे आता

दुर्धर दुर्भाग्याच्या

 

तोल सावरत आलो धावत

काळा संगे जेंव्हा

तेंव्हा सा-या संपत गेल्या

भेटी दिलदारांच्या

चित्तथरारक असते खेळी

आपल्या आयुष्याची

सांभाळावे तिला लागते

वाटेवर जगण्याच्या

 

चालतजाव्या निवांत सा-या

चाली संसाराच्या

नको कधी ही बिघडायाला

नादाने भलत्यांच्या

जमेल जेव्हा असे वागणे

साधे भोळे तेव्हा

दिसतील जगा समोर तुमच्या

सुखदायी जगण्याच्या

 

किती लागलो होतो मागे

क्षणिक आनंदाच्या

या देहाच्या होत्या खेळी

केवळ हव्यासाच्या

जेव्हा कळले तेंव्हा पडली

आत्म्यालाही भ्रांती

पुन्हा जाहलो स्वाधीन तेव्हा

अखेर वास्तवतेच्या

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ योगी… कवयित्री – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण.. श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ योगी… कवयित्री – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण.. श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

माणसाचा आणि निसर्गाचा काहीही संबंध नाही असे समजणारी माणसे समाजामध्ये आहेत. पण ती माणसे हे विसरुन जातात की माणूस हाच मुळी निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. आपला प्रत्येक सण, उत्सव किंबहुना आपली संस्कृतीच निसर्गावर आधारलेली आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे कवी, कवयित्री, चित्रकार यासारख्या कलाकाराला स्वतःच्या आयुष्याकडे पाहतानाही निसर्ग हा आठवतोच! निसर्गातील प्रतीके वापरुन मानवी जीवनाचा अर्थ व्यक्त करणारी अनेक काव्ये, साहित्यकृती आपण वाचल्या आहेत. अशीच एक रुपकात्मक कविता वाचनात आली. ती म्हणजे कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांची ‘ योगी ‘ ही कविता.

सौ राधिका भांडारकर

☆ योगी ☆

मातीतल्या बीजाला

अंकुर फुटतो

धरणीला आनंद होतो

पावसाचे शिंपण होते

अन् रोप उलगडते

हळुहळू त्याचा

वृक्ष होतो

तो बहरतो, फुलतो, फळतो

आनंदाची सर्वत्र पखरण करतो

 

मग आयुष्याचा तो क्षण येतो

पानगळीचा…

एक एक पान गळू लागते

फांदीला सोडून धरणीवर उतरते

त्याचवेळी आभाळाची ओढ सरते

ज्या मातीतून उगवले

तिथेच परतीची पाऊले

विलग पानांचा होतो पाचोळा

वार्‍यावर उडतो कचरा सोनसळा

वृक्ष होतो बोडका

तरी भासतो योग्यासारखा

गळणार्‍या पर्णांना निरोप देताना

उभा ताठ, ना खंत ना वेदना

कर्मयोगी निवृत्तनाथ

ऋतुचक्राशी असे बद्ध

एकाकी हा कातरवेळी

संवाद करी पानगळी

हा शिशिर सरेल

पुन्हा वसंत फुलेल

नव्या जन्मी नवी पालवी

हिरवाईने पुन्हा नटेल. .

~ राधिका भांडारकर

‘योगी’ ही एक रुपकात्मक कविता आहे. माणसाचं जगणं समजावून सांगण्यासाठी निसर्गातील वृक्षाचा रुपक म्हणून उपयोग करुन घेतला आहे. कविता जसजशी वाचत जावी तसतसं लक्षात येत की हे सगळं मानवी जीवनाला लागू होतय. सुरुवातीला कवयित्री म्हणते,

“मातीतल्या बीजाला

 अंकुर फुटतो

 धरणीला आनंद होतो

 पावसाचे शिंपण होते

 अन् रोप उलगडते

 हळुहळू त्याचा

 वृक्ष होतो

 तो बहरतो, फुलतो, फळतो

 आनंदाची सर्वत्र पखरण करतो”

बाळाला जन्म दिल्यावर मातेला होणारा आनंद आणि बीजाला अंकुर फुटल्यावर मातीला होणारा आनंद — मातेला होणारा असो किंवा मातीला होणारा आनंद असो — त्या आनंदाची अनुभूती एकाच प्रतीची नाही का ? सृजनशीलतेचा आनंद अगदी एकसारखाच आहे. पुढे पाऊस पडतो. पाणी मिळत जातं आणि रोप उलगडते. आई तरी याशिवाय वेगळं काय करते ? संगोपनाच्या मेघातून मायेचा वर्षाव होतो आणि मूल मोठं होत जातं, नाही का ? कवितेत पुढे म्हटल्याप्रमाणे रोपाचा जसा वृक्ष होतो तसे त्या बाळाचेही रुपांतर पूर्ण व्यक्तीमध्ये होते. वृक्षाने सर्वांगाने बहरावे त्याप्रमाणे माणूसही त्याच्यावर होणार -या संस्कारांमुळे पूर्ण विकसित होतो. त्याच्या कर्तृत्वाने फुलतो, कर्माची फळे मिळवत जातो आणि आनंदाची, सौख्याची पखरण करतो–एखाद्या वृक्षाप्रमाणेच!

निसर्गाचा जो नियम वृक्षाला लागू, तोच नियम माणसालाही लागू होतो. (कारण माणूस निसर्गापासून वेगळा नाहीच). यापुढील काव्यपंक्ती,

“मग आयुष्याचा तो क्षण येतो

 पानगळीचा. . .

 एक एक पान गळू लागते

 फांदीला सोडून धरणीवर उतरते

 त्याचवेळी आभाळाची ओढ

 सरते. “

या काव्यपंक्ती काय सुचवतात पहा. वृक्षांची पानगळ सुरु होते. पूर्ण बहरलेला वृक्ष एक एक पान गाळू लागतो आणि निष्पर्ण होऊ लागतो. त्याचे वैभव ओसरते. ही पानगळ असते त्या वृक्षाच्या आयुष्यातील उतरणीचा, संकटाचा काळ असतो. माणसाच्या आयुष्यातही संकटे येतात. माणूस काही काळ खचून जातो. वैभवाला, प्रगतीला उतरती कळा लागते. कवयित्रीने पुढे म्हटल्याप्रमाणे ” आभाळाची ओढ सरते “. म्हणजे नवीन काही करण्याची, पुढे जाण्याची, आभाळ कवेत घेण्याची उमेद रहात नाही. त्यापुढील काव्यपंक्ती

“ज्या मातीतून उगवले

 तिथेच परतीची पाऊले”

या ओळी हेच सांगतात की ज्या मातीतून पाने वर वर आली त्याच मातीत पानगळीच्या निमित्ताने ती पाचोळा होऊन खाली पडत आहेत, वृक्षापासून अलग होत आहेत. म्हणजे जिथे वैभव मिळाले तिथेच ते सोडून देण्याची वेळ येते. बघता बघता वृक्ष बोडका होतो. फक्त शुष्क फांद्या दिसू लागतात. पानगळ होत असताना तो निमुटपणे सहन करत एखाद्या कर्मयोग्यासारखा, खंत, खेदाच्या पलीकडे जाऊन ताठपणे उभा असतो. जी पाने गळून गेली त्याबद्दल दुःख नाही. उलट ऋतूचक्राशी असलेले नाते समजून घेऊन पानझडीचा शिशिर संपण्याची वाट पहात उभा असतो. कारण त्याला माहित असतं, पुढे वसंत येणार आहे. पालवी फुटणार आहे. नवी पाने येणार आहेत. पुन्हा हिरवाईने नटायचे आहे. आभाळाकडे झेप घ्यायची आहे.

मानवी जीवनाचे यापेक्षा वेगळे काय आहे ? संकटांचा ऋतू आला की सुखाची पानगळ सुरु होते. प्रगती थांबली की काय असे वाटू लागते. हे सगळं यश, वैभव इथेच सोडून जावं लागणार की काय ? अशीही भावना होऊ लागते. पण… पण तरीही माणूस डगमगत नाही. कारण त्यालाही जीवनचक्राचे नियम माहित होतात. दुःखाचे वादळ आले तरी त्याला वावटळ समजून अंगावर घेतले पाहिजे. कारण पुढे सुखाचा वसंत येणार आहे याची खात्री असते. हा विश्वास त्याला कुठून मिळतो ? निसर्गातूनच! असा एखादा वृक्ष दिसू लागतो पुनःपुन्हा बहरणारा आणि त्याच्या मनाच्या मातीतही उमेदीचे अंकुर फुटू लागतात. मानवी जीवन आणि निसर्ग यांच हे अतूट नातं कवयित्रिने अगदी अचूकपणे टिपले आहे.

कवितेत वापरलेले ‘कर्मयोगी निवृत्तीनाथ’ हे शब्द मला फार महत्त्वाचे वाटतात. कारण कर्म करुनही त्याचे फळ मिळाले नाही किंवा मिळालेले फळ निसटून गेले तरी मनाची शांती ढळू न देता जो निवृत्त होतो तोच खरा कर्मयोगी आणि निवृत्तीनाथ ! वृक्षाच्या प्रतिकातून मानवी जीवनावर सहजपणे भाष्य करताना कवितेला झालेल्या या आध्यात्मिक विचारांच्या स्पर्शामुळे कविता एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचते. आयुष्यातील चढउतार पचवायची ताकद ख-या कर्मयोग्यातच असते. निवृत्त होऊनही नव्या जन्मीच्या हिरवाईची वाट पाहणारा जीवनाविषयीचा आशावाद, सकारात्मकता या कवितेतून दिसून येते.

“ज्या मातीतून उगवले

 तिथेच परतीची पाऊले”

या ओळी वाचताना “माती असशी, मातीत मिसळशी” किंवा “तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी, माती सांगे कुंभाराला” या काव्यपंक्तींची आठवण येतेच. एकच विचार प्रत्येक कवी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने कशा पद्धतीने मांडत असतो हे अशा काव्यांतून स्पष्ट होते.

वृक्षाच्या अंगी असलेले कर्मयोगीत्व जर माणसाने अंगिकारले तर त्याचं जीवनही पुनःपुन्हा प्रगतीच्या, वैभवाच्या हिरवाईने बहरून येईल असा सुप्त संदेश देणारी ही कविता एक सुंदर निसर्ग काव्याचे रुप घेऊन आपल्यासमोर सादर केल्याबद्दल कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांना मनःपूर्वक धन्यवाद!

रसग्रहण –  सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #272 ☆ आली जीवनी सरिता… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 272 ?

आली जीवनी सरिता…  श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आली जीवनी सरिता, स्वच्छ वाटते मनास

थांब सांगतो मी आता, तीव्र उन्हास उन्हास

*

दरवळ हा कशाचा, मला वाटे ओळखीचा

स्पर्श वाऱ्याच्या सारखा, आहे माझ्याच सखीचा

तिच्या श्वसात भरला, आहे सुवास सुवास

*

नाही बिघडले काही, सूर्य उगवला नाही

शुभ्र कातीचा उजेड, मला  वाटतो प्रवाही

माझ्या भोवताली आहे, तिचा प्रकाश प्रकाश

*

आले अंगणी चांदणे, त्याच्या सोबत चालणे

फडफड ही डोळ्यांची, तिचे मिठास बोलणे

नाही राहत मी आता, कधी उदास उदास

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “टांगलेले शिंकाळे…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “टांगलेले शिंकाळे…” ☆ सुश्री शीला पतकी 

बाल मुकुंदाचे लोणी

शिंक्क्यांमध्ये ग टांगले

ईगतीने केले फस्त

सारे पसार पांगले

*

जनाबाईचा भाकऱ्या

सावत्याचा भाजीपाला

 गोऱ्या कुंभाराचा कर्हा

त्याने राखिला राखीला

*

दारांमध्ये टांगलेला

त्यांन राखीला कोहळा

 कुणा पाप्याची नजर

नाही लागली घराला

*

रानी पेरायच्या बिया

 बीज टांगून राखले

 जिमिनीत किती  किती

किडा मुंगीचे दाखले

*

टांगलेले शिंके मला

 सांगे संसाराचे सार

दोन जीव टांगणीला

परी एकच ईचार

*

दोन दोऱ्या दोन जीव

 एकमेकांत गुंतती

जीव लावती टांगणी

अन् आधार ग देती

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवा छंद ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ नवा छंद  ⭐ श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

वेड वाचनाचे मजला

होते काल परवा पर्यंत,

शेकडो पुस्तके वाचली,

अथ पासून इतिपर्यंत !

 *

आजकाल वाचायचा

येतो मज फार कंटाळा,

कळत नाही वाचतांना

कधी लागतो डोळा !

 *

मग ठरवले मनाशी

वाचन तर करायचे,

पण पुस्तकां ऐवजी

माणसांना वाचायचे !

 *

नवीन छंद माझा मला

मनापासून आवडला,

वाचनापेक्षा आनंद

मी त्यातच अनुभवला !

 *

पण झाला एक घोटाळा

घडले वेगळेच आक्रीत,

भेटता पुस्तकांतील पात्रे

झालो खरा मी चकीत !

 *

जागेपणी ‘भेटलेली’ पात्रे

‘वाचली’ होती पुस्तकांत,

विश्वास ठेवा माझ्यावर

काढू नका मज वेड्यात !

काढू नका मज वेड्यात !

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – बालपणीचा काळ सुखाचा… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बालपणीचा काळ सुखाचा.? श्री आशिष  बिवलकर ☆

बालपणीचा काळ सुखाचा,

हलक्या फुलक्या आठवणी |

मौज मजा धमाल मस्ती सारी,

सुखाची आकाशाला गवसणी |

*

आभाळ ही वाटालं ठेंगण तेव्हा,

सुंदर स्वप्नांची उंच उंच भरारी |

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद,

नव्हती कसलीच दुनियादारी |

*

काळ्या मातीत मुक्त बागडणे,

मोकळ्या मैदानावरचे खेळ |

माळरानाची बिनधास्त सफर,

मित्रमंडळींसाठी भरपूर वेळ |

*

कैऱ्या चिंच पेरू रानमेवा,

रोज चालायची मेजवानी |

पंचतारांकीतच होत जगणं,

ऐट सारी होती राजावानी |

*

अंगावर फाटका कपडा तरी,

नव्हती परिस्थितीची लाज |

मर्यादित साधन सामुगीत,

संस्कारांनी चढवला साज |

*
दुर्मिळ होत चाललय आता सर्व,

जीवघेण्या स्पर्धेत बालकांची उडी |

हिरावून घेतलं जातंय बालपण त्यांचं,

माफ कशी करेल तुम्हां आताची पिढी?

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “प्रेम…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “प्रेम…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

नाही आडपडदे, नाही आडवळणं…

नितळ निर्मळ झऱ्यासारखं सतत झुळझुळत असतं

प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

*

नको जातीपातींचे चढउतार… नको नात्यागोत्यांची कुंपणं

उघड्या बोडक्या खडकावर अल्लाद फ़ुंकूनही फुलणारं

मऊ लुसलुशीत गवत असतं… तसंच अगदी तसंच…

प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

*

नाही व्यवहाराचा वायदा… नाही परतफेडीचा तगादा

नाही कोणती लिखापढी… नाही कर्तव्याची तागडी…

कारण कर्तव्यात प्रेम असावंच असं नसतं…

आणि प्रेमात तर दुसरं तिसरं काहीच नसतं…

 प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

*

नाही नर – नारी हा भेद, नाही बंधन वयाचे

सारे सान सारे थोर… होती एकाच मापाचे

साऱ्यांसाठी एकच गुबगुबीत मऊ उबदार पांघरूण असतं…

प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

*

अथांग सागर… अमर्याद आभाळ… इवल्याशा मनात दाटलेलं

शेषशाही विष्णू अन घननीळ कृष्ण… तिथेच जणू विसावलेले

मग तिथेच नकळत जन्मलेलं देवत्व असतं…

तिथेच खरं प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

*

 प्रेम म्हणजे प्रेम.. म्हणजे फक्त प्रेमच असतं…

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ध्यास… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ ध्यास ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तो नभीचा चांद होता की फुलांचा ताटवा

शांतविण्या या मनाला एकदा हो भेटवा

*

ओढणीचा मेघ झाला चांदवा तो झाकला

स्पर्शिण्या परि चांदण्याला जीव गुंतू लागला

*

मी कधी ना पाहिलेले पाहिले हो काल रात्री

लावणीचा शृंगार सारा साठला अद्याप नेत्री

*

एक होती ती डहाळी रातराणीच्या फुलांची

मोग-याची वेल होती की रास होती पाकळ्यांची

*

यौवनाचे गीत होते तो सूर होता आगळा

संयमाला धार होती तो रोख होता वेगळा

*

स्वप्न होते, सत्य होते, काय होता भास तो

गुंतले हे ह्रदय माझे, एक आता ध्यास तो

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares