मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्य अजिबात कठीण  नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ आयुष्य अजिबात कठीण  नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

कधी नळाला पाणी नसतं…

कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं…

 

कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .

कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .

 

कधी जागा नसते . .

कधी जागा असून स्पेस नसते . .

कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची ऊब नसते . .

 

कधी डब्यात आवडती भाजी नसते . .

कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . .

दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .

 

कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . .

कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्यासारखे वाटते . .

 

कधी काही शब्द कानावर पडतात . .

कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .

 

कधी आपण कसे वागायचे समजत नाही . .

कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .

 

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . .

कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .

 

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . .

कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .

 

कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटू लागतो. .

कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .

 

कधी पैसा असला, की नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली, की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत, म्हणून जीव हिरमुसतो

. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ?

 

ताण घेतला तर तणाव . .

आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते.

 

आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात रहावं

या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं ….  –

 

लेखक : श्री विजय बोंगिरवार

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इशारा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ इशारा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

बेधुंद वादळाला केला कुणी इशारा

होवून शांत आता सुटलाय गार वारा

 

रानात श्वपदांच्या बेचैन जीव होतो

आवाज दडपणारा असतो किती पसारा

 

दमदार पावलांची चाहूल मंद येता

बसतो दडून कोल्हा जोरात भुंकणारा

 

गर्दीत माणसांच्या असतात खूप दर्दी

लढवून तर्क तेव्हा गाठायचा किनारा

 

आत्मीक चिंतनाने होते पवित्र वाणी

शब्दात साधकाच्या असतो खरा दरारा

 

पाऊस छान येतो चैतन्य देत जातो

जगण्यास सावराया मिळतो जरा सहारा

 

आहे निसर्ग वेडा दाता तरी सुखांचा

लुटतो मजेत त्याला माणूस जाणणारा

 

जेथे समाज आहे तेथे रिवाज आहे

नेता तिथे असावा संपर्क साधणारा

 

कार्यात गुंतताना हमखास यश मिळाया

सन्मार्ग दाखवाया देवास त्या पुकारा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #158 ☆ संत सेना महाराज… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 158 ☆ संत सेना महाराज…☆ श्री सुजित कदम ☆

उच्च विचारसरणी

संत सेना महाराज

वैशाखात द्वितीयेला

जन्मा आले संतराज…! १

 

न्हावी समाजाचे संत

भक्ती रस अभंगात

व्यवसाय करताना

दंग सदा पुजनात…! २

 

बुद्धी चौकस चंचल

समतेचा पुरस्कार

हिंदी मराठी भाषेत

केल्या रचना साकार….! ३

 

महाराष्ट्र पंजाबात

दोहे अभंग रचले

विठ्ठलाच्या चिंतनात

सारे आयुष्य वेचले…! ४

 

हजामत करताना

मुखी विठ्ठलाचे नाम

वारकरी चळवळ

भक्तीभाव निजधाम…! ५

 

हिंदी मराठी काव्याचा

केला मुक्त अंगीकार

संकीर्तन प्रवचनी

केला अध्यात्म प्रसार…! ६

 

नाम पर उपदेश

पाखंड्यांचे निर्दालन

गुरू ग्रंथ साहेबात

दोहा अभंग लेखन…! ७

 

सुख वाटतसे जीवा

जाता पंढरीसी कोणी

साध्या सोप्या रचनेत

शब्द धन वाही गोणी…! ८

 

दाढी करताना दिसेल

राजालाही भगवंत

संत सेना महाराज

प्रादेशिक कलावंत…! ९

 

दीर्घ काळ पंढरीत

सेना न्हावी करी सेवा

हरिभक्ती पारायण

दिला अभंगांचा ठेवा…! १०

 

श्रावणाची द्वादशी ही

पुण्यतिथी महोत्सव

संत सेना महाराज

करी  अभंग उत्सव…! ११

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ राम हवा की कृष्ण… – अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

🍀 – राम हवा की कृष्ण … – अज्ञात 🍀 ☆ सुश्री सुश्री कालिंदी नवाथे ☆

कोणीतरी विचारले मला परवा

तुला राम हवा की कृष्ण हवा

 

मी म्हणाले किती छान विचारला प्रश्न

सांगते, कधी मला राम पाहिजे कधी कृष्ण

 

रामराया पोटात घालेल माझी चूक

आणि कृष्ण भागवेल माझी भूक

 

रात्रीची शांत झोप रामरायच देतो

भूक लागली की कृष्णच आठवतो,

 

कशाचीही भीती वाटली की

मला आठवतो राम

कष्ट झाले , दुखः झाले की

कृष्णाकडेच मिळतो आराम,

 

रक्षण कर सांगते रामरायालाच

सुखी ठेव सांगते मी श्रीकृष्णालाच

 

बुध्दीचा विवेक रामाशिवाय कोणाकडे मागावा,

व्यवहारातील चतुरपणा कृष्णानीच शिकवावा,

 

सहनशक्ती दे रे माझ्या रामराया

कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्याया,

 

रामाला फक्त शरण जावे वाटते

कृष्णाशी मात्र बोलावेसे भांडावेसे वाटते, 

 

रामाला क्षमा मागावी

कृष्णाला भीक मागावी

 

रामाला स्मरावे

कृष्णाला जगावे

 

अभ्यास करताना प्रार्थना राजमणी रामाला

पायावर उभे राहताना विनवणी विष्णूला

 

एकाचे दोन होताना घ्यावे रामाचे आशीर्वाद

संसार करताना आवर्जून द्यावा नारायणाला प्रसाद

 

आरोग्य देणारा राम

सौंदर्य देणारा कृष्ण

राज्य देणारा राम

सेना देणारा कृष्ण

 

बरोबर चूक सांगतो राम

चांगले वाईट सांगणे कृष्णाचे काम

 

रामाकडे मागावे आई वडिलांचे क्षेम

कृष्णाकडे मागते मी मित्रांचे प्रेम

पाळण्यात नाव ठेवताना गोविंद घ्या गोपाळ घ्या

 

अंतीम वेळी  मात्र रामनाम घ्या,

 

— दोघांकडे  मागावे तरी काय काय

      ते दोघे हसत बघत आहेत माझ्याकडे,

      म्हणत आहेत, अग आम्ही एकच

      तू फसलीस की  काय…..,

 

      म्हणाले, कोण हवा हा प्रश्नच नाही

      मिळू दोघेही नाहीतर कोणीच नाही,

 

मी रडले आणि म्हणाले –

—  दोघेही रहा माझ्याबरोबर 

     परत नाही विचारणार हा प्रश्न

     राम का कृष्ण परत विचारले जरी

     फक्त म्हणेन जय जय  रामकृष्ण हरी  

 

     जय जय रामकृष्ण हरी

 

कवी : अज्ञात

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 179 ☆ सखी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 179 ?

💥 सखी… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

(अनिकेत मधून…….१९९७ नोव्हेंबर)

आयुष्याचं पुस्तक उघडलं की,

पहिल्यांदा तू सामोरी येतेस!

तुझा नितळ सावळा रंग,

दाटलेल्या मेघासारखा

बरसत रहातो पुस्तकभर!

तू नायिका की सहनायिका?

नेमकी कोणती तुझी भूमिका ?

तुझ्या आठवणी पानोपानी,

बहरलेल्या वृक्षासारख्या !

 शाळेसमोरच शिरीषाचं झाड,

तुझ्या माझ्यातल्या नात्याचं साक्षीदार!

सारं कसं निर्मळ,निखळ,

उमलत जाणारं कृष्णकमळ!

गणिताच्या पेपराच्या आदल्या रात्री

पाहिलेला,देव आनंद चा ‘गाईड’

तरीही तुला मिळालेले साठ

आणि

माझ्या पेपरावरचे आठ,

अजूनही आठवतात,

आणि आठवणींचं झाड बोलू लागतं ,

कधी मीनाकुमारीची शायरी,

तर कधी अमीन सयानी चा आवाज,

बुधवारची “बिनाका गीत माला”

न चुकता ऐकलेली!

इतिहासाच्या वहीत ठेवलेला,

जितेंद्रचा फोटो आणि

अंगणात खेळलेला,

साही सुट्ट्यो !

बोरीच्या झाडाखाली वाचलेली,

काकोडकरांची कादंबरी,

आणि “मेल्याहून मेल्यासारखं होणं “

म्हणजे काय?

हे न उलगडणारं कोडं!

सारं कसं स्वच्छ वाचता येतंय!

आपल्या वर्गातली मी गीता बाली,

तर तू माला सिन्हा होतीस!

मला मात्र तू नीटशी कळली नाहीस !

आयुष्याचा सिनेमा झाला,

तेव्हाही तू सहीसलामत सुटलीस,

सहनायिके सारखी !

पण मला नायिका व्हायचंच नव्हतं गं !

“ओ मेरे हमराही, मेरी बाह थामे चलना “

म्हणणारी तू–

अर्ध्या वाटेवरच गेलीस निघून,

परतीचे दोर कापून!

तरीही सगळं आयुष्य तू टाकलंयस व्यापून !

हातावर,भाळावर,

मनामनावर,पानापानावर,

कोरलंय तुझ्या आठवणीचं गोंदण!

जन्मभरची व्यथाही तूच दिलीस ना आंदण?

तूच कविता आहेस,तूच कादंबरी !

मी शोधते आहे अजूनही–

तुझ्यातली शकुंतला ,

माझ्यातली प्रियंवदा मात्र,

समजलीच नाही कोणाला !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खुळ्या कळ्या… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ खुळ्या कळ्या… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

खुळ्या कळ्या…

पूजेसाठी आलेल्या फुलपुड्यामध्ये निशिगंधाच्या काही कळ्या आल्या. आणि मग त्यांना नीट फुलायला मिळावं म्हणून मी एका हिरव्या बाऊलमध्ये थोडसं पाणी घालून त्यांना खिडकीत ठेवलं. किती प्रयत्न केला पण त्या काही उभ्या राहात नव्हत्या. सारख्या आडव्या होत होत्या. मग मला जाणवलं की त्यांची अजूनही त्यांची नीज उतरली नाहीये‌. हा मंदधुंद श्वास जणू त्यांच्या गोड झोपेची साक्षच !…. काय बरं स्वप्नं पहात या निजल्या असतील. आपण आपल्या हिरव्या आईच्या कुशीत नाही आहोत हे कळलं असेल का त्यांना.‌.. उठल्यावर जेव्हा त्या बघतील की आपण भलतीकडेच आहोत तेव्हा त्या काय विचार करतील… दुःख होईल का त्यांना… काय बरं वाटत असेल या कळ्यांना….. 

… आणि वाटीतल्या कळ्या उमलल्या नाही तरी.. माझ्या मनात मात्र त्या कळ्या उमलू लागल्या…

साध्या भोळ्या शब्दांत फुलूही लागल्या……. 

हिरव्यागार वाटीत

निजवलं होतं कळ्यांना

किती वेळ झोपावं 

कळेनाच की खुळ्यांना 

झोपेतही चालू होता 

त्यांचा मंद मंद श्वास

अन् घरभर दरवळला 

त्यांचा निरागस सुवास 

इवलुसा देह त्यांचा

इवलुसं हे जगणं 

इवलुशा या जीवांचं  

इवलुसंच स्वप्नं 

असू कुठेही आपण

फांदीत अथवा मातीत 

दुःखी नाही व्हायचं

नि:स्वार्थतेनं जगायचं 

सोनुले किरण आले की 

त्यांच्या संग खेळायचं

वाऱ्यासंगे सुगंधाला

सुरेल गुणगुण द्यायचं 

कधी पडायचं परडीत

कधी सजायचं वेणीत

कधी गुंफायचं हारात

तर कधी झुलायचं दारात 

इवलुसं हे आपलं आयुष्य

सदा घमघमत ठेवायचं

अखेरच्या क्षणीदेखील 

अत्तर होऊन जगायचं …

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #185 ☆ रेशमाची शाल… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 185 ?

☆ रेशमाची शाल…  ☆

अक्षरांनाही वळाले लागते

आशयासाठी झुरावे लागते

 

कागदावर हक्क शाई सांगता

हृदय त्यावर पांघरावे लागते

 

पीठ थापुन होत नाही भाकरी

दुःख कांडावे दळावे लागते

 

लाकडाची, धातुची कसली असो

लेखणीलाही झिजावे लागते

 

प्राक्तनाला येत नाही टाळता

वेळ येता गरळ प्यावे लागते

 

वादळाला माज सत्तेचा किती

सज्जनांना भिरभिरावे लागते

 

मानसा तू प्रगत होता या इथे

पाखरांना दूर जावे लागते

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ मी… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

काफिर मी,

फकीर मी.

प्रारब्ध रेषेतली,

नेमकी लकीर मी.

रुक्ष मी,

वृक्ष मी.

पानगळीच्या विनाशी,

एकमात्र साक्ष मी.

नि:शब्द मी,

निस्तब्ध मी.

बोधिवृक्षाखालचा,

ज्ञानयोगी बुद्ध मी.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पळसफुले… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वळीव… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

रुणझुण रुणझुण ताल निनादत

अलवारसे गीत छेडित

ठुमकत ठुमकत गिरक्या घेत

वळीव सखा येई अवचित

 

वादळवाऱ्या संगे गर्जत

विंझणवाऱ्या संगे नाचत

वातलहरींची सुखमय संगत

येई कुठूनसा मना सुखवित

 

तरल सुगंधित फुलती धुमारे

अंगांगावर मृदुल शहारे

शांतवितसे तप्त झळा रे

शतशत गारा -फुले उधळीत

 

मनभावन हा मित्र कलंदर

खळाळता हा हसरा निर्झर

गुंफूनी अलगद करातची कर

जाई परतून हास्य फुलवित

 

चंचल अवखळ परी शुभंकर

हवाहवासा मनमीत मनोहर

सौख्यफुलांनी गंधित अंतर

चैतन्यमय सखा येई अवचित

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 128 ☆ स्त्री व्यथा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 128 ? 

☆ स्त्री व्यथा…

स्त्री जन्म मिळाला

काय दोष घडला

समाजात आम्हाला

सन्मान का अडला…

 

लहानपणी खेळ

खूप खूप खेळले

कळी उमलताच

का कुणाला नडले…

 

वयात येणे आमुचे

का बरे खटकले

देव्हाऱ्यातील देवाला

कोडे असेल पडले…

 

नेमके कसले परिवर्तन

प्रकार नाही कळला

वयात येणं काय

आईने उपदेश केला…

 

हळदी कुंकवाला

आम्हाला अडवलं

शहाणं होणं तेव्हा

माज-घरातचं अडकलं…

 

देवाची असे करणी

नारळात साचे पाणी

आम्ही का असे घडलो

रक्तरंजित झाली न्हाणी…

 

काय हा समाज पहा

काय असली तऱ्हा

देवाच्या दातृत्वाला

ठेवले कुणी पैऱ्हा…

 

चार पाच दिस एकटे

जगणे आले वाट्याला

जिथे अवतार देवा-दिकांचा

त्याचा विंटाळ झाला…

 

मंदिराची कवाडे

बंद केली गेली

ज्ञानी पंडित लोकांनी

आमची, दुर्दशा मांडली…

 

धार्मिक वेडे धुरंदर

अडाणी मूर्ख झाले

दातृत्व कर्तीला

दूर दूर लोटले…

 

असा सर्व पसारा

अशी आमची व्यथा

आमच्या ह्या व्यथेला

नका करू कधीच कथा…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares