मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आरसा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

आरसा ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

करता उगी कशाला बदनाम आरश्याला

बघण्यास रूप तुमचे त्याचा गुलाम झाला

 *

पाहून आरश्याला हुरळू नका गड्यांनो

तुमचेच रूप असली तो दावतो तुम्हाला

 *

माणूस माणसाला अंदाज देत नाही

होतो तयार नकली नात्यात बांधण्याला

 *

सत्यास शोधण्याची आहेत कारणे ही

बाजार माणसांचा विकतोय माणसाला

 *

आनंद वाटताना नव्हता विचार केला

फिरले नशीब उलटे भलताच काळ आला

 *

निरखून पाहताना मी आरश्यात थोडे

आत्मा कुठे दिसेना मुखडा मलूल झाला

 *

आभार मानताना तो आरसा म्हणाला

तुमच्याच वास्तवाला लपवू उगा कशाला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 200 ☆ भारत मातेचा जयघोष…  ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 200 ? 

☆ भारत मातेचा जयघोष … ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(मुक्त कविता…)

 देशाचा सण साजरा होतो आहे

स्मरणीय गणतंत्र दिन आज आहे.!!

 *

स्वातंत्र्य ज्योत हृदयात प्रज्वलित आहे

ध्वजाच्या रंगांनी देश उजळतो आहे.!!

 *

शूर वीरांचे बलिदान आम्ही जपतो आहे

त्यांच्या त्यागाने हा देश घडतो आहे.!!

 *

संविधानाचा मंत्र आम्हाला सांगत आहे,

लोकशाहीचा अधिकार सर्वांचाच आहे.!!

 *

गर्वाने पुन्हा कविराज म्हणतो आहे.

भारत मातेचा जयघोष आज आहे.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लोकशाहीचे स्तंभ… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ लोकशाहीचे स्तंभ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(वनहारिणी – ८/८/८/८)

लोकशाहिला आधाराला

आहेत म्हणे चार स्तंभ हे

गोंधळ माजू नये म्हणोनी

असतात विधीकार स्तंभ हे

*

पळवाटांचा शोध लावती

त्यांना मोठा वचक बसावा

म्हणून येथे पोलीस रूपे

असती कार्यभार स्तंभ हे

*

ढासळू नये संसद अपुली

तोल उचलुनी सांभाळावा

यासाठी तर सुसज्ज असती

न्यायपालिका द्वार स्तंभ हे

*

पाय लंगडे तीन पाहता

चौथा आला आधाराला

सांभाळाया माध्यम म्हणजे

लेखणीचे प्रहार स्तंभ हे

*

कसले फसती पाय सदा हे

सत्तेला या सावरताना

बरेच पक्के हवे जनांचे

ऐक्याचे आधार स्तंभ हे

*

ताज घालण्या जनसत्तेला

सोनार कुशल तशीच जनता

निर्माणाला कारण बनले

सुवर्ण मंदिरकार स्तंभ हे

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सां ग ता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ सां ग ता ! ⭐ श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

मन झाले मोरपीस

वाऱ्यासवे हले-डुले,

रांगोळी इंद्रधनुची

अंगा अंगात फुले !

*

 काय घडले कसे घडले

 माझे मला न कळले,

 धून ऐकून हरीची

 नसेल ना तें चळले ?

*

मनी झाली घालमेल

चुके पावलांचा ताल,

आर्त स्वर बासरीचा

करी हृदयी घाव खोल !

*

 झाले कावरी बावरी

 शोधले परस दारी,

 परि दिसे ना कुठेच

 मज नंदाचा मुरारी !

*

जादू अशी मुरलीची

वाट दावे मज वनीची,

दिसता मूर्ती हरीची

झाली सांगता विरहाची !

झाली सांगता विरहाची !

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दमलेला जीव… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ दमलेला जीव ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

भुकेला कोंडा 

निजेला धोंडा

ही म्हणही इथे

बघा मागेच पडते

*

कष्ट करोनी

दमल्यावरती

मिरची ढिगावर

झोप लागते

*

दमल्या जीवा

आग न होते तिखटपणाने

ठसकाही नाही लागत याला

श्वास उच्छश्वासाने

*
निवांत झोपी 

जाई ऐसा

गिरद्यावरती

राजा जैसा

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “प्रेषित…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “प्रेषित…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

प्रेषित निघून जातात कालातीत विचारांचे ठसे ठेवत.

आम्ही मात्र काळाच्या पडद्यावर रक्तलांच्छित ठसे ठेवतो.

*

ते सुळावर चढतात आमच्या कल्याणा साठी.

त्यांच्या विचारांना आम्ही सुळी देतो स्वार्थासाठी.

*

ते आपलाच क्रूस वागवतात खांद्यावर स्वतःच्याच.

आम्ही जबाबदारीचे ओझेही पेलत नाही स्वतःच्याच.

*

मृत्यूनंतरही ते पुन्हा प्रकटतात आमच्या भल्यासाठी.

मारेकरी मात्र सतत जन्म घेतात क्रौर्यासाठी.

*

एकदा क्रूरपणे त्यांना प्रत्यक्ष मारण्यासाठी,

 मग अधिक क्रूरपणे विचारांना मारण्यासाठी.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ ओढ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

संध्याकाळच्या वेळेस पक्ष्यांची माळ घरट्याकडे परतत होती,

दूरवर राहिलेल्या घरट्याला कवेत घेऊ पाहत होती.

चुकलेला, राहीलेला असेल मागे कोणी

म्हणाली, ” पुरे आता, फिरा माघारी, नका थांबू आणि,

*

अनुभवलेल्या गोष्टींचे भांडार होते तिच्यापाशी,

भविष्यासाठी असेच शिकणार होते ते प्रत्येक दिवशी.

अंगातला थकवा रात्रीच्या विसाव्याने घालवून,

प्रसन्न मनाने ते उदया परत उडणार होते आनंदून.

*

पण त्यासाठी आज घरी परतणे अनिवार्य होते,

काहींचे कुटुंब येण्याची त्यांच्या वाट पाहत होते,

सांगायचे होते काहींना आज त्यांनी काय पाहीले,

जे घरी राहून न गेलेल्यांचे अनुभवायचे राहीले.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 240 ☆ सौभाग्य कंकण..! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 240 – विजय साहित्य ?

☆ सौभाग्य कंकण..! ☆

(काव्यप्रकार अष्टाक्षरी.)

सौभाग्य कंकण,

संस्कारी बंधन.

हळव्या मनाचे,

सुरेल स्पंदन…! १

*

सौभाग्य भूषण,

पहिले‌ कंगण.

माहेरी सोडले,

वधुने अंगण…!२

*

सौभाग्य वायन ,

हातीचे कंकण.

मनाचे मनात,

संस्कारी रींगण..!३

*

सप्तरंगी चुडा,

हिरव्या मनात .

हिरवी बांगडी,

हिरव्या तनात…!४

*

प्रेमाचे प्रतीक,

लाल नी नारंगी .

जपावा संसार   ,

नानाविध अंगी..!५

*

निळाई ज्ञानाची,

पिवळा आनंदी.

सांगतो हिरवा,

रहावे स्वच्छंदी…!६

*

यशाचा केशरी ,

पांढरा पावन .

जांभळ्या रंगात,

आषाढ श्रावण..!७

*

वज्रचुडा हाती ,

स्वप्नांचे कोंदण.

माया ममतेचे,

जाहले गोंदण…!८

*

आयुष्य पतीचे ,

वाढवी कंगण.

जपते बांगडी,

नात्यांचे बंधन…!    ९

*

चांदीचे ऐश्वर्य,

सोन्याची समृद्धी.

मोत्यांची बांगडी ,

करी सौख्य वृद्धी..!१०

*

भरल्या करात,

वाजू दे कंकण ,

काचेची बांगडी,

संसारी पैंजण…!११

*

चुडा हा वधूचा,

हाती आलंकृत .

सासर माहेर ,

झाली सालंकृत..!१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सेतू… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ सेतू… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

झाडांनाही माहित असतं

सगळीच पानं पिवळी होऊन चालत नाही

उद्या उमलणा-या कळ्यांसाठी

काही पानांना हिरवं रहावच लागतं

 

माहित असतं त्यांना,

करावाच लागतो संघर्ष

स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी

 

फांद्यांना आकाशाचे वेध लागले तरी

मुळांना माती सोडून जाता येत नाही

 

पिकली पानं गळून जातील आपोआप

पालवीही फुटेल,आपोआपच,

तरीही

फुलणं आणि सुकणं

यांना जोडणारा सेतू होऊन

झाड झुंजत राहतं वादळवा-यात,

पिवळ्या पानांना निरोप दे॓ऊन

हिरवी पानं अंगावर मिरवत

प्रत्येक ऋतूचं स्वागत करत !

प्रत्येक ऋतूचं स्वागत करत !

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च । 

अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥ ३१ ॥ 

*
विवेक नाही धर्माधर्म कर्तव्य-अकर्तव्याचा 

त्या पुरुषाला जाणी धनंजया राजस बुद्धीचा ॥३१॥

*
अधर्मं धर्ममिति या मन्यसे तमसावृता । 

सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ ३२ ॥ 

*
अधर्मास जी मती जाणते श्रेष्ठधर्म म्हणोनीया

सर्वार्थासी विपरित मानित तामसी बुद्धी धनंजया ॥३२॥

*

धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः । 

योगोनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३ ॥ 

*

ध्यानयोगे धारण करितो मनप्राणगात्रकर्मणा

अव्यभिचारिणी ती होय पार्था सात्विक धारणा ॥३३॥

*
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन । 

प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४ ॥ 

*
फलाशाऽसक्तीग्रस्त धर्मार्थकाम धारियतो

राजसी धारणाशक्ती पार्था तयास संबोधितो ॥३४॥

*
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च । 

न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५ ॥ 

*
निद्रा भय दुःख शोक मद धारयितो दुष्टमती

धारणाशक्तीसी ऐश्या धनंजया तामसी म्हणती ॥३५॥

*
सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ । 

अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ ३६ ॥

*
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्‌ । 

तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्‌ ॥ ३७ ॥ 

*
भरतकुलश्रेष्ठा तुजसी त्रिविध सुखांचे गुह्य सांगतो

ध्यान भजन सेवेसम परिपाठे दुःख विसरुनी रमतो

प्रारंभी गरळासम भासतो तरीही अमृतासम असतो

सुखदायी प्रसाद आत्मबुद्धीचा सात्त्विक खलु असतो ॥३६, ३७॥

*
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्‌ । 

परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्‌ ॥ ३८ ॥ 

*
सुखे विषयेंद्रियांचे भोगकाळी परमसुखदायी असती

विषसम परिणती तयाची सुख तया राजस म्हणती ॥३८॥

*
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः । 

निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ ३९ ॥ 

*

भोगकाळी परिणामी मोहविती जी आत्म्याला

निद्राआळसप्रमाद उद्भव तामस सुख म्हणती त्याला ॥३९॥

*
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु व पुनः । 

सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ ४० ॥ 

*

इहलोकी अंतरिक्षात देवलोकी वा विश्वात 

सृष्टीज त्रिगुणमुक्त कोणी नाही चराचरात ॥४०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares