मराठी साहित्य – मराठी कविता – ? सूर्यास्त ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

 

? सूर्यास्त ?

 

का भिडतो हा अस्त जिवाला

नित्य पडते कोडे मनाला

का घ्यावा अस्ताचा ध्यास

अन का रूजवावा मनी ऊर्जेचा -हास

 

सतत तळपत्या सूर्यालाही

का बघावे होतांना म्लान

क्षितिजाआड दडणा-या बिंबाचे

का ऐकावे मूक गान

 

मूक  गहिरी रंगछटा

व्यापी भूतल, चराचरास

आसमंती अन् जळी घुमती

भैरवीचे सूर उदास

 

चैतन्याच्या ह्या सम्राटाचे

घायाळ करी अस्तास जाणे

सांजसावल्यांसवे कातरवेळीचे

मंदमंद पदरव हे जीवघेणे

 

उदयास्ताची मैफल

अनोख्या रंगात रंगलेली

जन्ममृत्युच्या अटळतेची

कहाणी क्षितिजावर कोरलेली

 

©  सौ. ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ? प्रेमाला उपमा नाही ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

 

? प्रेमाला उपमा नाही ?

 

प्रेम करावे भरभरून , जीव ओवाळून , कधी कधी स्वतःत रमतांना स्वतःला विसरून !

 

प्रेम करावे तृणपात्याच्या दंवबिंदूवर

प्रेम करावे उषःकालच्या क्षितिजावर

प्रेम करावे किलबिलणा-या पाखरांवर

प्रेम करावे गंधित वायुलहरींवर

प्रेम करावे शहारणा-या जललहरींवर

प्रेम करावे रविकिरणांच्या ऊर्जेवर

प्रेम करावे चांद्रकालच्या भरतीवर

प्रेम करावे सांध्यकालच्या ओहोटीवर

प्रेम करावे सृष्टीच्या अथक सृजनावर

प्रेम करावे  पहाडाच्या उंचीवर

प्रेम करावे सागराच्या अथांगतेवर

प्रेम करावे आकाशाच्या असीमतेवर

प्रेम करावे आईच्या निरंतर वात्सल्यावर

प्रेम करावे बाल्याच्या निर्व्याज हास्यावर

प्रेम करावे दोस्तीच्या निखळ नितळपणावर

 

प्रेम खळाळत्या बालपणावर करावे

प्रेम सळसळत्या तारूण्यावर करावे

प्रेम शांत समंजस वानप्रस्थावर करावे

सर्व चराचर व्यापून असलेल्या चिरंतनावर तर प्रेम करावेच करावे

 

©  सौ. ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ पाऊस धारा☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ पाऊस धारा☆
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अत्यंत भावप्रवण कविता ☆ पाऊस धारा☆। ) 

 

कधी रिमझिम पाऊस धारा

कधी टपटप नाचती गारा

 

कोंब फुटतील असे तरांरा

अंगावरती जणू शहारा

आनंदुन हे मोर नाचती

फुलून गेला नवा पिसारा

 

नजर ना लागो या शिवारा

कणीसभर तो मोतीचारा

पक्षी घिरट्या घालत आले

गोफण हाती खडा पहारा

 

पक्षांची या चिवचिव दारा

आसमंत हा भरेल सारा

या धरतीने त्या गगनाने

कशा छेडिल्या सप्तक तारा

 

© अशोक भांबुरे, धनकवडी, पुणे.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ असीम बलिदान ‘पोलीस’ ☆ – श्री संतोष ज्ञानेश्वर भुमकर

श्री संतोष ज्ञानेश्वर भुमकर

असीम बलिदान ‘पोलीस’
(श्री संतोष ज्ञानेश्वर भुमकर जी का e-abhivyakti में स्वागत है। कौन कहता है कि सेना और पोलिस  में कार्यरत कर्मी संवेदनशील नहीं होते और साहित्य की रचना नहीं कर सकते? यह कविता इस सत्य को उजागर है। गंतंत्रता दिवस  (दिनाक २६/०१/२०१८ )  को रचित श्री संतोष जी को एवं उनकी कलम को नमन।)  

कोणी आले पोटासाठी कोणी आले प्रेमासाठी,

कोणी कुटुब जगविण्यासाठी तर कोणी देशभक्तीसाठी.

नऊ महीने पोटात वाढला, नऊ महीने मैदानात झिजला,

खडतर प्रशिक्षण पुर्ण करुनी तो झुजण्या पोलीस झाला.

 

जनसेवाची नशाच चढली आठवण कुटुबाची मनातच विरली.

कधीखुन कधीदरोडा तर कधी दगलीत दगड अंगावर आली.

भिती त्याच्या ना डोळ्यात ना मनात कर्तव्यतही ना दिसली.

करीता तपास त्याची लेखनी अन काया नाही कधी दमली.

 

चौकीलाच घर माने जनतेतच मायबापाचा शोध असे डोळी.

मुला बाळाची आठवण येता ना आश्रु ढाळी आनंदानी गिळी.

पत्नीच्या विरहात जरी त्याची जात असे रोजच रात्र काळी.

तरीही जोमाने कार्यास लागे रविच्या साक्षीने रोज सकाळी.

 

तो यंत्र आहे का देव कसला हा अजब मानव प्रश्न मज पडे

कीती प्रकारची कामे करती त्याचे मोजमाप नाही कोणाकडे.

करता तपास रात्रदिनी कोणी बंदोबस्तात सदैव असते व्यस्त.

कोणी नक्षल्याची झुजते त्याच्या कामाला कधीच नाही अस्त.

 

कोणी जखमी दगड फेकीत कोणी अतंकवाद्याच्या गोळ्यात,

कोणी भुसुरुगात गेले गाडुन कोणी नक्षल्याच्या चकमकीत,

तरीही त्याची माघार नसे कर्तव्यत दुःख लपवत अश्रु गिळत,

जनतेसाठी भावनांचे बलिदान देत आनंदाने होतो तो शहीद.

 

ज्यांच्या बलिदानावर कुटुब आपले सुरक्षित आम्ही जगतो.

त्याच्याच त्यागाच्या अश्रुवर आम्ही सणवार साजरे करतो.

आपण मात्र सुखात आपल्या ते बलिदान क्षणात विसरतो.

तो मात्र हा विचार नकरता विरहातही कार्यतत्परतेने करतो.

 

राज्या राखीव बल असो वा गडचिरोलीचा जहाबाज पोलीस.

मुबईचा असो वा रेल्वे, ग्रामीण, माझा महाराष्ट्रचा तो पोलीस.

प्रत्येकाचे आहे बलिदान मोठे, आम्हासाठी दुसरा पर्याय कुठे,

‘सदरक्षणाय खल निग्रहनाय’ हे ब्रीद त्याचे आचारातही वठे

 

क्षणा क्षणाला मी त्याचे हे बलीदान खाकीत स्वताही स्मरतो.

खाकीलाच शान मानतो जनतेसाठी, तिरंग्यासाठी जीव देतो.

माझा असे त्रिवार मुजरा धन्यावाद त्याचे व देवाचे मानतो.

या जन्मी मला तु केला पोलिस  पुढिल जन्माची वाट पाहतो.

 

©  संतोष ज्ञानेश्वर भुमकर.

पोमके सावरगाव.

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ?  अनोखे नाते ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

अनोखे नाते ?

 

(संभवतः विश्व में ऐसा कोई भी मनुष्य नहीं होगा जिसका पुस्तकों से परोक्ष या अपरोक्ष न रहा हो। सुश्री ज्योति हसबनीस जी e-abhivyakti के प्रारम्भिक साहित्यकारों में से एक हैं,  जिनका साहित्यिक सहयोग अविस्मरणीय है। आपकी यह कविता हमें बचपन से हमारे पुस्तकों से निर्बाध सम्बन्धों का स्मरण कराती हैं।)

 

पुस्तकांशी नातं लहानपणीच जडलं

चांदोबा वेताळ कुमार ने घट्ट घट्ट केलं

 

पऱ्यांच्या राज्यात मुक्त संचार

तर कधी जादुच्या सतरंजीवर होऊन स्वार किर्र जंगल घातले पालथे तर ऐटीत चढलो डोंगरमाथे ,

 

कधी मैफल जमली हिमगौरी अन् सात बुटक्यांची

तर चाखली गंमत फास्टर फेणेच्या सायकल शर्यतीची

 

तिरसिंगरावाच्या कुस्तीत हरवून गेलो

तर मॅंड्रेकच्या संमोहनात हरखून गेलो

ब. मों. नी साकारलेल्या शिवशाहीने मोहून गेलो

तर ह. ना. आपटेंच्या सूर्यग्रहणाने दु:खी झालो

 

बोकिल द. मांच्या मिष्कीलीत खळाळून हसलो तर पुलंच्या हसवणूकीत पार विरघळलो

 

विंदा, बोरकर, शांताबाईंच्या कवितेचे सूरच आगळे होते

कुसुमाग्रजांच्या कुंचल्याचे देखील आगळेच रूप होते

 

पुस्तकांतलं जग, जगातल्या जाणीवा

झिरपत झिरपत तनामनात रूजल्या

चराचराशी अनोखं नातं जोडत्या झाल्या

 

आजही माझ्या एकांती मी एकटी कधीच नसते

पुस्तकाची मला लाखमोलाची सोबत असते

 

तीच माझा सखा सोबती प्रियकर होतात

आणि जीवनाचे अनोखे धडे मला देतात

 

माझे अश्रू, माझे हास्य,

माझे कुतूहल, माझी खळबळ

सारं काही ह्या पुस्तकांभोवतीच

 

माझी जिज्ञासा, माझी ज्ञानलालसा

माझा लळा, माझा विरंगुळा

सारं काही ह्या पुस्तकांच्या संगतीच

 

अंतरीचे मळभ असो,

की मनमोराचा झंकार

पुस्तकांचा त्यांस तत्पर रूकार

 

वाटते ही सोबत जन्मजन्मांतरी लाभावी

पुस्तक वाचता वाचता पल्याडची हाक यावी ….!

 

©  सौ. ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ अळवाचं पाणी ☆ – श्रीमति सुजाता काले

श्रीमति सुजाता काले

अळवाचं पाणी

 

(प्रस्तुत है  श्रीमति सुजाता काले जी  की एक भावप्रवण  कविता  अळवाचं पाणी ।)

 

प्रिये,

तू चांदणी चमचमणारी !
मी टिमटिमणारा तारा ….

 

तू वादळ घोंघावणारं !
मी मंद वाहणारा वारा …..

 

तू धुक्यातील सकाळ,
मी दवबिंदू गवतावरचे….

 

तू मोती शिंपल्यातील,
मी पाणी अळवावरचे…!!

 

© सुजाता काले ✍

पंचगनी, महाराष्ट्र

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ सावली ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे
*सावली*
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अत्यंत भावप्रवण कविता। जीवन  के सत्य को अपनी गंभीर एवं दर्शनिक दृष्टि से चुने हुए शब्दों के साथ इस रचना को रचने के लिए आपकी कलम को नमन।) 

माझ्याच सावलीला फसतो कधी कधी

पाहून सूर्य मजला हसतो कधी कधी

 

हा आरसा बिलोरी मज सत्य सांगतो

मी चेहर्‍यात माझ्या नसतो कधी कधी

 

बाहेर चांदणे हे आहे टिपूर पण

नाराज चंद्र घरचा असतो कधी कधी

 

टाळून संकटांना जाणार मी कुठे

त्यांच्याच बैठकीला बसतो कधी कधी

 

पाऊल शेपटीवर पडले चुकून तर

मी साप पाळलेला डसतो कधी कधी

 

© अशोक भांबुरे, धनकवडी, पुणे.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – *उन्हाळी सुट्टी* – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

*उन्हाळी सुट्टी*

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा  रचित e-abhivyakti में प्रथम बाल गीत *उन्हाळी सुट्टी* प्रस्तुत है। मुझे पूर्ण विश्वास है कि आपको भी अपनी गर्मियों की छुट्टी याद आ ही जाएगी। इस बालगीत के लिए हम कविराज विजय यशवंत सातपुते जी के हृदय से आभारी हैं।) 

झाली परीक्षा आता आहे अभ्यासाशी कट्टी .
हवे तसे रे वागू आता सुरू  उन्हाळी सुट्टी.
गावी जाऊ मामाच्या नी खेळू मजेचे खेळ
आट्यापाट्या, सूरपारंब्या ,जमेल अमुची गट्टी.
उशीरा  उठणे, आणि पोहणे,पाणी कापत जाणे .
दंगा मस्ती, हाणामारी,  अन् क्षणाक्षणाला कट्टी .
आमराईचा आंबा म्हणजे राजेशाही खाणे
कच्ची कैरी भेळेमधली, पावभाजीला सुट्टी.
पन्हे कैरीचे, कोकम सरबत, कधी ताक नी लस्सी
कोकणचा तो रसाळ मेवा,  कोल्ड्रिंकशी कट्टी.
आला उन्हाळा, घरी बसा रे , दटावती सारे
बैठे खेळ ते बुद्धीबळाचे ,देऊ गेमला सुट्टी.
अशी ऊन्हाळी सुट्टी आमच्या होती बालपणात
सोडून गेले  शाळू सोबती, आता नाही बट्टी. . . !

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆  आक्रोश  ☆ – डॉ. रवींद्र वेदपाठक

डॉ. रवींद्र वेदपाठक

☆  आक्रोश  ☆

(प्रस्तुत है डॉ रवीन्द्र वेदपाठक जी की एक आक्रोशात्मक अभिव्यक्ति इस मराठी कविता  “आक्रोश” में।) 
आता नकोय मला
ती अश्रुंची किनार
चंडी होवुन आक्रोशाचा
मीच करणार आहे संहार….!! १ !!
अशोकवनातील सीता जरी
संयमाने बांधली होती
आक्रोशाचा बांध फुटताच
सारी धरती फाटली होती…..!! २ !!
मोहमयी सत्तेच्या गांधारीला
आंधळेपणाने जरी बांधले होते
द्रौपदीचे केस सुध्दा
दुशा:सनाचे रक्त प्यायले होते…..!! ३ !!
दिसत असली शांती तरी
हि युध्दाची नांदी समजावी
आमच्या गळणाऱ्या आक्रोशातुन
ज्वालामुखीची ठिणगी भडकावी…..!! ४ !!
आता मी सहन करणार नाही
ते अपमानाचे विखारी घोट
आता मी विझणार नाही
बनुन नुसतेच राखेचे गरम लोट…….!! ५ !!
आता मी फोडणार आहे
ज्वालामुखी माझ्या अंतरातील
ज्यातुन उसळुन येतील
लाव्हा होवुन अश्रु माझ्या डोळ्यातील….!! ६ !!
आता नकोय मला
ती अश्रुंची किनार
चंडी होवुन आक्रोशाचा
मीच करणार आहे संहार….!! १ !!
© डॉ. रवींद्र वेदपाठक
*तळेगाव*

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – * स्वप्नातलं घर…! * – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम
स्वप्नातलं घर…!

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं। प्रस्तुत  है उनकी नवीनतम कविता स्वप्नातलं घर…!)

घराच्याही स्वप्नातलं घर
विसरली आहेत माणसं.
चार भिंतीत मुकी राहू,
लागली आहेत माणसं
चार भिंतींच्या घराचं
गणित आता बदललंय,
चार भिंती एक छप्पर
नावापुरतंच उरलंय.
येण्याजाण्यासाठी घराला
दार तेवढं ठेवलंय.
“येता जाता बंद करा”
हे लेबल त्यावर लावलंय.
खिडकी मधून नजरेत येईल
तेवढं जग साठवायचं.
मनामधलं पोरकं जग,
गॅलरीत जाऊन आठवायचं.
बोलणं फारसं होत नाही
पण भेट तेवढी नक्की होते.
एवढ्या तेवढ्या कारणावरून
विनाकारण चिडचिड होते.
कळत नाही कुणाला काही
पण, काहीतरी हरवलंय.
मना मनातलं अंतर आता
नको इतकं वाढत चाललंय.
कामावरचं टेंशन आता
रोज सोबत घरात येतं.
दारामधून आत बाहेर
वार तेवढं वाहत राहतं.
आपापल्याच नादात इथे
प्रत्येक जण बिझी असतो.
टिव्ही समोर असतानाही
मोबाईलमध्ये डोकावत बसतो.
सारी नाती आता एका
मुठीमध्येच बंद होतात.
एका टच वर ऑनलाईन तर
एका टच वर ऑफलाईन होतात.
येणं जाणं कुणाचंही
सहन आता होत नाही.
घराबाहेर पडायला म्हणे
वेळ आता मिळत नाही.
सण सुध्दा हल्ली आता
चार भिंतींत साजरे होतात.
दाराबाहेरच्या चौकटी मात्र
रांगोळीसाठीच तडफडतात.
चार भिंती असल्या म्हणजे
घराला घरपण येत नाही.
फक्त घरात राहिलो म्हणजे
जगतोय म्हणता येत नाही..
©सुजित कदम
7276282626

Please share your Post !

Shares
image_print