श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ डोंगर – झाडे – आणि पाणी ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

डोंगर आणि झाडाशिवाय जमिनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे. 

1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते. मात्र  भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. याउलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 

2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठवले जाते. एक मृत साठ्याचे पाणी आणि दुसरे जिवंत साठ्याचे पाणी . 

मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० फूट व त्यापेक्षा अधिक पातळीवर आढळते.

जेेव्हा पाऊस पडतो तेव्हा नदी-नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते, जे की एकदा उपसले की संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 

तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंत्रणा हवी असते. 

3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजेच दहा फुटांवर जाण्यासाठी दहा वर्ष लागतात. 

4)  एक झाड एका दिवसाला दहा लिटर पाणी जमिनीत ५० फुटावर घेऊन जाते. कारण झाड हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात. म्हणून झाडं ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 

5) एक लिंबाचे झाड एकूण दहा हजार लिटर पाणी पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब, चिंच ,जांभूळ, आंबा , मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 

6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्याही खाली. वडाची व पिंपळाची मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 

एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते, आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 

म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 

आपण एका बोअरवेलसाठी एक लाख रु.खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख रु. खर्च करतो. पण पाणी लागण्याची  कुठलीच शाश्वती नसते. 

— कारण आपली नियत ही धूर्त असते. डोंगर संपुष्टात आणण्याची, डोंगरावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची नियत असते. म्हणून मग पाणी येणार तरी कुठून? 

6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानवनिर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही. खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 

हवा ही ऊर्जा आहे.

पाणी हे अमृत आहे

तर माती ही जननी आहे.

तर झाडं हे जीवनदायी आहेत. —

झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

7) झाडांचं मूल्य समजून घ्या… आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात, नाही तर माळरानावर, डोंगरावर कुठेही जगविण्याची जबाबदारी घ्या…. 

या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साधं काम करा. 

झाडं माणसाचे मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 

8) एक सदैव लक्षात असू द्या. झाडांची पाणी साठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या  वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.

— “झाडे लावा – झाडे जगवा” —

माहिती प्रस्तुती : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments