श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ कवितेचा उत्सव ☆ मोह ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

 

आठवाच्या पावसाने पूर आला लोचनाला

आसवाचे हेच पाणी ओल देते काळजाला

 

वाढलो आहे तरीही अंगणीचे बाळ झालो

ओसरीला ठेवलेल्या खेळण्यांचा मोह झाला

 

बंधनांच्या रिंगणाणी कैद केले भावनेला

वासनांचे आज ओझे पेलवेना माणसाला

 

थांबला तो संपला हा मंत्र आहे या जगाचा

काळ आहे धावणारा थांबतो कोठे कशाला

 

सोबतीने मी सखीच्या ध्येय गाठाया निघालो

चालताना धैर्य आले लाभले बळ पावलाला

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Adv.Sursing Bhoite

Really great prof.Tukaram Patil. I appreciate short and sweet charoli focussing on today’ s prevailing behaviour of some calprits in our society that has lost fellow feelings.