श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ रीतिरिवाज ऋतूचक्राचे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
संपून गेल्या वयाकडे थोडेस
वळून पहा.
गळून गेल्या पानाकडे पहात
वृक्षवत रहा.
वाटेवर की पावलांवर विश्वासावं,
मूलतः हा प्रश्न आहे.
वाटचाल कशी करावी
हा ज्याचात्याचा प्रश्न आहे.
ऋतुचक्राचे कांही रीतरिवाज
असतात.
पानगळीला कोणतेही आवाज
नसतात .
बाकी एवढ्याच घटना घडल्या .
तुम्ही दरवाजे बंद केले.
मीही मग खिडक्या मिटल्या.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈