☆ कवितेचा उत्सव ☆ पाहुनी ही एकता ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

 

उगवू दे नी उजळूदे,  साऱ्या मनांचे सूर्य आता ।

अंधाराला भय वाटू दे, पाहुनी ही एकता ।।धृ।।

 

मनसूर्याचा जन्म व्हावा, घेऊनी किरण माणुसकीचे  ।

करुणेचा स्रोत पाझरावा, दर्शन व्ह्यावे प्रीतीचे ।

मानवतेचा जय व्हावा, यावी निववळ नीरामयता ।

अंधाराला भय वाटावे, पाहुनी ही एकता ।।1।।

 

पेटलेली आग हृदयी, नव सार्थकी लागावी ।

धार जिभेच्या तलवारीची, घाव घालण्या नसावी  ।

भेद सारे आता मिटावे, जाणता नि अजाणता ।

अंधाराला भय वाटावे, पाहुनी ही एकता ।।2।।

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
रत्नाकर घाग

अप्रतिम काव्य रचना