सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ शब्दसुमनांजली: स्वरलतास श्रद्धांजली ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
शब्द भावना दाटल्या,
काहूर माजले अंतरंगी!
सोडून गेली काया ,
लताचे सूर राहिले जगी!
स्वर लता होती ती ,
दीनानाथांची कन्या !
सूर संगत घेऊन आली,
या पृथ्वीतलावर गाण्या!
जरी अटल सत्य होते,
जन्म-मृत्यूचे चक्र !
परी मनास उमजेना,
कशी आली मृत्यूची हाक!
जगी येणारा प्रत्येक,
घेऊन येई जीवनरेषा!
त्या जन्ममृत्यूच्या मध्ये,
आंदोलती आशा- निराशा!
मृत्यूचा अटळ तो घाला,
कधी नकळत घाव घाली!
कृतार्थ जीवन जगता जगता,
अलगद तो उचलून नेई !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे, पुणे (महाराष्ट्र)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈