सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ भीम प्रतिज्ञा… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
☆
किती युगे हे असे चालणार
द्रौपदीचे वस्त्रहरण होणार
कशी कळेना तिची वेदना
का बोथट झाल्यात संवेदना
कशी आहेत पट्टी बांधून
डोळे आणि समज असून
प्रश्न येत नाहीत सोडवता
तर कशाला मग हवी सत्ता
द्वेष हिंसा उद्रेक जमावाचा
का दिला जातो बळी स्त्रीचा
प्रतीक्षा माता-भगिनींना
करावी अशी भीम प्रतिज्ञा
धिंड काढावी नाराधामांची
छाटणी करावी त्या पुरुषत्वाची
कृष्ण मारुती जन्मा यावेत
शिवबा सम सिंह अवतरावेत
☆
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈