श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– तोडणारा क्षण… –
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
धरा जरी वाटे शांत,
पोटात शिजतो ज्वालामुखी !
उद्रेक लाव्हारसाचा होई,
होरपळती सारे होऊन दुःखी !
जे वरकरणी वाटते शांत,
आत काहीतरी धुमसत असते !
मनात चालत असते घालमेल,
जगणेच नकोसे होऊन जाते !
भूतकाळात दिग्गजांनी,
निराशेत स्वतःला संपवले !
धक्कादायक कृतीने,
जगा रहस्य ठेवून रडवले !
उंच उंच भरारी घेणारा,
शिखरावर एकटाच असतो !
मनमोकळे करण्यासाठी,
कुणीच योग्य वाटत नसतो !
पंखात असते बळ,
तितकीच घ्यावी झेप आकाशी !
सावरण्याचे आत्मबळ,
सांभाळून ठेवावे आपल्यापाशी ! ……
☆
© श्री आशिष बिवलकर
15 ऑगस्ट 2023
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈