श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? शेवटी हात रिकामेच? श्री आशिष  बिवलकर ☆

जोडून कवडी कवडी,

व्यवसाय धंदा वाढवत नेला।

सारं काही सोडून येथे,

रिकाम्या हाती एकटाच तो गेला।

*

दिलखुलास स्वभाव त्याचा,

एक एक माणूस जोडत गेला।

साध्या मराठी माणसाचा,

दिलदार शेट नकळतच झाला।

*

अपार कष्ट उपसले त्याने,

नशीब देत गेलं त्याला साथ।

धावपळीत विसरला मात्र,

उत्तम आरोग्याची मुख्य बात।

*

अक्षम्य दुर्लक्ष केलं स्वतःकडे,

हात पाय पसरण्याचा लागला ध्यास।

काय लागत जगायला जगी,

सुखाची निद्रा आणि खळगीत घास।

*

उत्तम आरोग्य -कौटुंबिक स्वास्थ्य,

यावर असते जीवनाची खरी भिस्त।

बाकी कमावणं -गमावणं गौण सारं,

मोह टाळायाची असायला हवी शिस्त।

*

प्रत्येकाने काही क्षण थांबून जरा,

स्वतः आत्मचिंतन नक्कीच करावं।

कुठे होतो-कुठे आहे-कुठे जायचं,

आध्यात्मिक विचार करुन ठरवावं।

*

प्रत्येक जन्माला येणारा,

कधी ना कधी जाणारच असतो।

मृत्यू सर्वांग सोहळा,

काळ जगाला दाखवतच राहतो।

वास्तवरंग

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments