सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
ऐरण
सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
एक घाव लोहाराचा, शंभर सोनाराचे
जगण्याचे हे तंत्र शिकवती बोल ऐरणीचे ||
*
संकटाची जरी आली वादळे
येतील तैसी जातील सत्वरे
सौख्याचे बघ घर्मबिंदू हार अभिमानाचे ||
*
हातोड्या या अनेक येती
घाव घालूनी तुटून जाती
अभंग ऐरण शिकवी जगाला जिणे अभंगाचे||
*
या खेळाचे घटक दोन
एक भाता अन दुसरा घण
ठिणग्यांचे जरी वादळ भोवती बळ ये समर्थ्यांचे ||
कवयित्री : वर्षा बालगोपाल
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈