सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ऐरण ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

एक घाव लोहाराचा, शंभर सोनाराचे 

जगण्याचे हे तंत्र शिकवती बोल ऐरणीचे ||

*
संकटाची जरी आली वादळे 

येतील तैसी जातील सत्वरे 

सौख्याचे बघ घर्मबिंदू हार अभिमानाचे ||

*
हातोड्या या अनेक येती 

घाव घालूनी तुटून जाती 

अभंग ऐरण शिकवी जगाला जिणे अभंगाचे||

*

या खेळाचे घटक दोन 

एक भाता अन दुसरा घण 

ठिणग्यांचे जरी वादळ भोवती बळ ये समर्थ्यांचे ||

कवयित्री : वर्षा बालगोपाल

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments