सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “पितृपक्ष…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

मला कावळे दिसले नि वेगळेच मनात आले

कावळ्याचा आणि आपला किती जवळचा संबंध आहे ? नाही का? अगदी लहान असल्यापासून एक चिऊ आणि एक काऊची गोष्ट आपण ऐकलेली आहे. नंतर मग लोभी कावळ्याची गोष्ट मग तहानलेल्या कावळ्याची गोष्ट मग कावळ्याला काणा का म्हणतात ती गोष्ट मग कावळ्यासारखी दृष्टी ठेवण्याची शिकवण मग मुलगी वयात आली की काकस्पर्शाची शिकवण अशा अनेक वळणांवर भेटलेला कावळा मेल्यानंतर पिंडाला शिवायला आवश्यकच आणि त्यानंतर येणार्‍या प्रत्येक पक्ष पंधरवड्यात तर यांचा मान जास्तच!!

पण हे एवढे महत्वाचे दिवस•••• त्यासाठी आणि जीवनाच्या वेगवेगळ्या वळणांवर भेटणारा हा कावळा क्षुल्लक का? का त्याला कमी लेखले जाते?

खरं तर त्याच्या रूपाने आपण आपले पूर्वज पहात असतो मग ज्ञानेश्र्वरांनी म्हटल्याप्रमाणे पाहुण्यांचा, आपल्यांचा संकेत घेऊन येणार्‍या या कावळ्याचे पाय खरोखर तुझे सोन्याने मढविन पाऊ ईतके महत्व तर त्याला मिळालेच पाहिजे नाहि का?

अहो हे पक्ष पंधरवड्याचे दिवस ! त्या दिवसांना सुद्धा आपण कमीच लेखतो की••••• म्हणे या दिवसात शुभ कार्ये करायची नाहित•••• म्हणे यामधे चांगले निर्णय पण घ्यायचे नाहीत••• मुलगा मुलगी बघायचे कार्यक्रम करायचे नाहित•••• इत्यादि इत्यादि••••

पण याच अनुशंगाने एक प्रश्न विचारावासा वाटतो•••• या दिवसांमध्ये कावळ्याच्या रूपाने आपले सगळे पूर्वज आपल्या घरी जेवायला येतात यावर तुम्ही विश्वास / श्रद्धा ठेवता ना? मग मला सांगा आपले पूर्वज आपले कधी वाईट चिंततील का हो? नाही ना?

मग जर तसे असेल तर त्यांच्या हजेरीत चांगला निर्णय घेतला शुभकार्य केले किंवा मुलगा मुलगी पहाण्याचे कार्यक्रम केले तर या कार्यक्रमांना आपले पूर्वजही हजर राहून ते आपल्याला आशिर्वाद नाही देणार का? मग देव आप्तेष्ट आणि पूर्वजांच्या हजेरीत या गोष्टी का करायच्या नाहीत?

उलट इतर कोणत्याही दिवशी केलेल्या कार्यांपेक्षा या दिवसात केलेल्या कार्यांना यश जास्त येईल. तेव्हा शुभस्य शिघ्रम ! तेव्हा या पंधरवड्यासाठी म्हणून काही निर्णय लांबणीवर टाकले असतील तर ते त्वरीत घ्या!! आणि प्रत्यक्षच त्याचे परिणाम अनुभवा!!

आपल्याला पण म्हणावेसे वाटेल••• पैलतोगे काऊ कोकताहे••• शकून गे माये सांगताहे••••

अजून एक विचार आला कावळ्याच्या रुपाने आपण आपल्या पूर्वजांना बोलावतो एक दिवसाचा जुलमाचा रामराम करतो. पण पूर्वज जर खरेच कावळ्याच्या रूपाने येत असतील तर त्यांना असे येणे आवडत असेल का? ज्यांना जीवंतपणी मुलांच्याकडे हाल सोसावे लागले असतील तर ते नाईलाजाने येत असतील का? का मुलांच्या प्रेमापोटी ते सगळे विसरून त्यांना माफ करायला येत असतील?

काही काही कावळे ना घर का ना घाटका अशी वेळ येऊन उपाशीच रहात असतील का?

अजून एक विचार करावासा वाटतो पूर्वजांच्या प्रती सद्भावना प्रेम व्यक्त करायला ठराविक पंधरवडाच कशाला पाहिजे? घरात नेहमी शक्य नसले तरी जेव्हा जेव्हा चांगल्या घटना घडतात किंवा वाईट प्रसंग येतात तेव्हा तेव्हा त्यांचे स्मरण व्हायला हवे. अगदी छोट्या छोट्या कारणांनीही म्हणजे खाण्याचे पदार्थ कपड्याचा रंग प्रकार आदिंनीही त्यांना आठवणीतून जपले पाहिजे. त्यांची चांगली शिकवण आचरली पाहिजे.

मग पितृपक्षाची गरजच राहणार नाही. रोजच्या जेवणातल्या सारखे गोग्रासा सारखा कावळ्याचा घासही बाजूला ठेवा. मग पितृजनाच्या कृपेने आपले सगळेच जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments