श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

 ☆ तक्रार पेटी – कवी प्रा.विजय पोहनेरकर☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆ 

 

हजारो मिळोत का लाखो, किंवा मिळोत कोटी

काही काही माणसं म्हणजे निव्वळ तक्रार पेटी—-

 

हेच वाईट तेच वाईट, घोकत बसतात पाढे

समजतात मी सोडून सारे जगच वेडे—-

 

काही धरायचं काही सोडायचं कळत कसं नाही

किरकीऱ्या माणसाला सुख मिळतच नाही—-

 

नेहमीच तक्रारी केल्या की लोकं तुम्हाला टाळतात

नको रे बाबा म्हणून लांब लांब पळतात—-

 

याला त्याला नावं ठेऊन काही मिळत नाही

नकारात्मकता वाढत जाते कसं कळत नाही—–

 

Negativity वाढली की हाती काय येतं ?

शारीरिक व्याधी वाढून मन कलुषित होतं—-

 

मन कलुषित झालं की, सगळेच नकोसे वाटतात

त्यामुळेच जवळची नाती उसवतात आणि फाटतात—–

 

वेळीच सावध होऊन Adjust करायला शिका

पुन्हा पुन्हा त्याच त्याच करू नका चुका —–

 

माकड म्हणतं माझीच लाल, हा Concept सोडून द्या 

चांगल्याला चांगलं म्हणा, जीवनाचा आनंद घ्या —–

 

लोकं कशी जगतात जरा उघडून बघा डोळे

सोन्याचा घास असून करू नका वाट्टोळे—–

 

कुठल्याही परिस्थितीत मन प्रसन्न ठेवायचे

तक्रार पेटी होण्या पासून स्वतःला वाचवायचे—-

 

चेहरा पाडून बसू नका, उत्सव होऊ द्या जगण्याचा

इतरांना आनंद वाटू द्या तुमच्याकडे बघण्याचा —–

—– कवी प्रा.विजय पोहनेरकर

       9420929389

 

संग्राहक : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments