श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “घड्याळ…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

जेवतांना सहज घडाळ्याकडे लक्ष गेल. आज पर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहील हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिल आणि घडाळ्यातील तीन काट्यात आणि परिवारात काहितरी साम्य जाणवल.

घडाळ्यात तासकाटा,मिनीटकाटा, आणि सेकंदकाटा असतो. तसच परिवारातील तासकाटा म्हणजे वडील,मिनीटकाटा म्हणजे आई,व सेकंदकाटा म्हणजे मुलं असल्याचं जाणवल.

या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती असली तरी प्रत्येकाची गती वेगळी पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तूळ पुर्ण झाल्याशिवाय तास पुर्णत्वास येऊ शकत नाही.

परिवारातील वडील म्हणजे तासकाटा,याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व ऊद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पुर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडीलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात. आणि ध्येय पुर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.

आई म्हणजे मिनीटकाटा असते. प्रत्येक मिनिटाला (अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत) तीची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनीटकाटा जस फिरताना कधी तास काट्याच्या मागे असतो, थोड्यावेळाने थोडाकाळ तो तास काट्या बरोबर थांबतो,व परत तास काट्याला मागे टाकून त्यांची ओढ सेकंद काट्याकडे असते, अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असतांना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने घालवते,व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंदकाट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

आणि सेकंदकाटा म्हणजे आपली मुलं. ती कितीही मोठी झाली तरीही आई-वडिलांच्या मागे पुढे कायम ऊत्साहाने तुरूतुरू पळतांना,खेळताना,बागडताना दिसतात. ती सतत तासकाटा आणि मिनीटकाटा (वडील आणि आई) यांच्या मध्येच धडपडतांना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्या पेक्षा जास्त असतो.

जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशीवाय पुर्णत्व येत नाही,तसेच अगदी आपल्या कुटुंबाचे आहे. या तीन काट्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील,आई, आणि मुल यांची गती एकाच दिशेला असल्याशीवाय घराला पुर्णत्व येत नाही.

पण लक्षात ठेवा,सेकंद, मिनिटे,तास यामुळे दिवस, आठवडे, महिने,वर्ष हे पुर्ण झाले तरी यासाठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत. तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे. एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते. तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ उडेल.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments