☆ विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

चहा हवा आहे का कोणाला असा शब्द जरी कानी पडला, अगदी मध्य रात्री बारा वाजता तरी नकळत सगळ्यांचेच कान कसे टवकारतात . जणू काही तो चहा आपल्यालाच बोलवत आहे.

काय आहे असे त्या चहात?

तो मस्त सुगंध दरवळायला लागला की कशी, तो न पिताच तरतरी येते मनाला.

कट्ट्यावर रमलेल्या गप्पांमधेच जर गरम चहाचा कप आला तर मग काय सोने पे सुहागाच.

लहान मुलांच्या कंपूत असो, नाही तर मित्रांच्या घोळक्यात, नातेवाईकांच्या गर्दीत असो नाही तर आपल्या सहकार्यां बरोबर तो सगळ्यानाच आपलसं करून सोडतो.

संध्याकाळी दमून जर एखादी स्त्री घरी आली असेल आणि तिच्या हातात कोणी ऐता गरम चहा आणून ठेवला तर तिचे निम्मे अधिक श्रम, तो प्यायच्या आधीच पळून जातात.

मित्रां बरोबरचा तो टपरी वरचा चहा आणि गरम भजी यांची मैफिल तर खूप रंगतदार असते.

पहाटेच्या रम्य वेळी, मस्त आलं आणि गवतीचहा घातलेला चहा आणि वर बाहेर पडणारा धोधो पाऊस जणू स्वर्ग सुखच.

चहाची मजा तरी पहा तो आपण केव्हांही घेऊ शकतो.

कोण सकाळी लवकर जाग आली म्हणून घेतो, तर कोण रात्री झोप लागली नाही म्हणून, कोण मनाचा थकवा घालवण्यासाठी, तर कोण आनंद साजरा करण्यासाठी, कोणाला त्यात दुःख लपवायचे असते तर कोणी असाच घेत असतो वेळ जात नाही म्हणुन.

नाना रंगांनी, अनेक ढंगानी असा नटलेला हा चहा आहे मग तो टपरीवरचा असो, किंवा कॉलेज कॅन्टीन मधला, घरचा असो किंवा हॉटेलचा, मसाला असो किंवा ग्रीन टी तो कसा ही घेतला तरी सगळ्यांना खुश करून जातो, मनातली मरगळ दूर करून जातो.

शेवटी एवढंच म्हणेन की

 

चहा तर चहाच असतो

तो ह्याचा किंवा त्याचा नसतो

तो एकच प्याला सुखाचा असतो

जणू दुःखावर घातलेली फुंकर असतो

अरे चहा तर चहाच असतो

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments