श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ धर्मो रक्षति रक्षितः ।। ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज विजयादशमी. नऊ रात्र ( दिवस) साधना केली, शक्तीची आराधना केली तर विजयाची दशमी येणे अगदीच स्वाभाविक….. !!!

आपल्या पूर्वसुरींनी याचि अनुभूती घेऊन आपल्याला हे करायला सांगितले. भारतात जशी टाटांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट चांगली असणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात खात्री /विश्वास आहे, अगदीच तीच खात्री/विश्वास आपल्या धर्माने सांगितलेल्या प्रत्येक कर्मकांडावर ठेवून, आपण त्याप्रमाणे आचरण केले तर भारतात पुन्हा सोन्याचा धूर निघेल यात शंका नसावी.

संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,

“धर्माचे पालन । करणे पाखंडखंडण ।। 

हेचि आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम।।”

(अभंग क्रमांक २०७६ : सार्थ तुकाराम गाथा)

सध्या बाजारात SAP, oracle, ERP अशी विविध प्रकारची softwares उपलब्ध आहेत. अनेक कंपन्या त्या विकत घेतात आणि त्याचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी करतात. सनातन धर्माचे एक software आणि एक हार्डवेअर आहे. ते आपण नीट आचरणात आणून पाहिले तर ते चांगले की वाईट हे ठरविणे सोपे जाईल. पण आजची तथाकथित विद्वान मंडळी, अमलात, आचरणात न आणता हिंदू धर्माला नावे ठेवतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

मनुष्य श्रद्धेवर जगत असतो. पुढचा क्षण नक्की आनंदाचा असेल अशी श्रद्धा मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. ही श्रद्धा टिकून रहावी म्हणून धर्माने काही कर्मकांड सांगितली आहेत. एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये अमुक बटण दाबले की अमुक होते आणि दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये तेच बटण दाबून काहीतरी वेगळे होते, याचा अर्थ पाहिले software निकामी झाले आहे असे म्हणणे हे जितके हास्यास्पद तितकेच सनातन धर्माचे पूर्ण श्रध्देने आचरण न करता त्याला नाव ठेवणे हास्यास्पद नव्हे काय ? कितीही महाग सॉफ्टवेअर घेतले, महागडा मोबाईल घेतला तरी त्यात एक anti virus software घ्यावं लागते. आपल्या धर्माने अशी काही antivirus software तयार केली आणि अमुक करू नका, अमुक करा असे सांगितले तर ते उचित नव्हे काय ?

आपल्या मागील अनेक पिढ्या सनातन धर्माचे प्रॉडक्ट आहेत. ते आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्वावान होते, आनंदात होते, समाधानी होते असे म्हणता येईल कारण त्यांनी उभारलेल्या इमारती, किल्ले, निर्माण केलेल्या अनेक वास्तू, कलाकुसर आणि अनेक गोष्टीयाचि साक्ष देत आहे…..

जुने अवघे खराब हा मंत्र दुराग्रहाने आचरणात न आणता, त्यातील दोष (असल्यास) कमी करून नवीन पद्धतीने मांडणी करून, त्याचे आचरण आपण करू. हे एक प्रकारचे सिम्मोलंघन ठरावे.

शक्तीची उपासना करून प्राप्त केलेली शक्ति देव, देश आणि धर्माच्या कार्यासाठी खर्च करता आली तर ती शक्ती दुप्पट होऊन आपल्याकडे परत येईल, असा मला विश्वास आहे.

भारतासारख्या महान देशात आपण जन्माला आलो हेच आपल्या आयुष्याचे सोने म्हंटले तर अतिशयोक्ति होणार नाही. आज आपण सर्वांना शिलांगणाचे सोने वाटतो, लुटतो. हा उपक्रम याचि साक्ष देतो की भारतात रस्त्यावर मेथीच्या भाजी सारखे सोने विकले जात होते…….

जो दुसऱ्याला सोने द्यायला शिकवितो, तिळगुळ द्यायला शिकवितो, राखी बांधायला शिकवितो, तो धर्म किती महान असेल……

“ धर्मो रक्षति रक्षितः ।। “ 

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय!!!! भारत माता की जय!!!!

सर्वांना विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments