श्री जगदीश काबरे
☆ वारसा ☆ श्री जगदीश काबरे ☆
प्रत्येक माणसाचे जन्म आणि मृत्यूचे दिनांक ठरलेले असतात. त्याने जन्म कुठे घ्यावा आणि केव्हा मरावे एवढे मात्र त्याच्या हातात नसते. म्हणून जन्म हा मित्र असला तरी मृत्यू हा शत्रू नाही… ही दोन्ही आहेत ती फक्त शाश्वत सत्ये.
माणूस जेव्हा हे सत्य स्वीकारतो तेव्हा त्याला जन्मदिनाचा आनंदही होत नाही आणि मृत्यूचे भयही वाटत नाही. त्यामुळे त्याला स्वतःच्या फसव्या समाधानासाठी अमर आत्मा, परमात्म्याचीही गरज लागत नाही. म्हणून तो मृत्यूला हसत हसत सामोरे जातो. कारण त्याला हे कळलेले असते की, मृत्यू म्हणजे चेतनेचा अंत. आणि चेतना संपली म्हणजे सगळे संपते.
माणूस शरीराने मरतो पण उरतो वारसा रूपाने. नंतर विचारभावना आणि जीवनमूल्यांच्या वारश्याच्या पलीकडे काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून आपल्या प्रियजनांसाठी कोणता वारसा आपण मागे ठेवणार आहोत, हा विचार प्रत्येकानेच जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान मिळालेल्या काळात करायला हवा. नाही का?
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






