भारतीयांची पवित्र नदी गंगा. अलकनंदा आणि मंदाकिनी गंगेच्या उपनद्या आहेत. दोन्हींच्या संगमानंतर गंगा म्हणून पुढे वाहते. अलकनंदा आणि मंदाकिनी या बहिणी बहिणी. पृथ्वीवरच्या उत्तरांचलच्या देवभूमीतून वाहणाऱ्या. आता यांच्या नावाना आपल्या आकाशगंगेत स्थान मिळाले आहे. ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या आपण जी आकाशगंगा पाहतो तिला ‘मंदाकिनी’ म्हणतात. आता शास्त्रज्ञांनी नवीन आकाशगंगेचा शोध लावला. तिला ‘अलकनंदा’ नाव दिले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे हा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला. आकाशगंगेच्या रचनेवर संशोधन करणारी पीएचडीची विद्यार्थ्यांनी राशी जैन हिने तिचे वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले. दोन डिसेंबर २५ ला हे प्रसारित झाले.
२७००आकाशगंगा म्हणजेच दीर्घिकांचा अभ्यास करून ही पूर्ण विकसित दीर्घिका शोधली. वैशिष्ट्य म्हणजे विश्वाचे वय फक्त दीड अब्ज कोटी वर्षे असताना ही पूर्ण विकसित झाली होती. ती आपल्यापासून १२. २ अब्ज प्रकाश वर्षे अंतरावर आहे. सर्पिलाकार भुजा आहेत. खरंतर दीर्घिका पूर्ण विकसित होण्यासाठी दीर्घ कालावधी लागत असताना विश्वाचे वय दहा टक्के असतानाच ही विकसित झाली. ही इतक्या कमी कालावधीत तयार कशी झाली, हेच आश्चर्य. त्यात तारे निर्माण झाले आहेत. ही एक प्रभावी वैश्विक केंद्र आहे. तर यांचे वस्तुमान आपल्या सूर्यमालेच्या दहा अब्ज पट आहे. मध्यभाग फुगीर असून व्यास ३०००प्रकाश वर्षे आहे.
आता याचा अभ्यास हे शास्त्रज्ञाना आव्हान आहे. याची रचना मंदाकिनी सारखीच असल्यामुळे शास्त्रज्ञांनी अलकनंदा नाव दिले. विश्वाच्या बाल्यावस्थेतील हा एक अज्ञात पैलू जगासमोर आला. वैशिष्ट्यपूर्ण अशी ही सर्वात दूरवरची आकाशगंगा, राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र, टाटा मूलभूत केंद्र, पुणे येथे हे संशोधन चालू आहे.
भारतीय शास्त्रज्ञांनी खगोल शास्त्रातील या महत्त्वाच्या शोधातून भारतीय बुद्धिमत्ता आणि कौशल्याचे दर्शन जगाला घडवले. प्राचीन काळातील खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट, वराहमिहीर यांची परंपरा पुढे चालू ठेवली.
रूरल पोस्टिंगच्या फायनल लिस्टमधे आपलं नाव बऱ्याच वर आहे याचा संदीपला अंदाज होताच. पण म्हणून ट्रान्स्फर आॅर्डर इतक्या लवकर येईल अशी त्याची अपेक्षा नव्हती.
आता घराची ऊब आणि मुंबई दोन्ही सोडून शहराची सावलीही माहित नसलेल्या एका आडवळणावरच्या अनोळखी खेड्यांत निघून जायचं..!
त्याने मनोमन हे पूर्वीच स्वीकारलेलं होतं, पण प्रियानंही सगळं मनापासून स्वीकारणं त्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं होतं!
सगळं वाढून होण्यापूर्वीच संदीपने गडबडीने भात कालवायला सुरुवात केली.
त्याला ठसका लागलाच.
“अहो.. सावकाश जरा.. “
तो ठसकतच राहिला. प्रियाने तत्परतेने पाण्याचा ग्लास त्याच्यापुढे केला. मग कसाबसा भात संपवून तो उठलाच.
“काय हो हे? दोन घास व्यवस्थित जेवा तरी पोटभर.. “
“नको प्रिया,.. आज थोडं लवकरच निघायला हवं होतं. आता जेवत बसलो तर उशीरच होईल. तू पटकन् डबाच भर… ” तो हात धुताधुताच बोलत राहिला.. “आणि हे बघ, संध्याकाळी तूच तेजूला पाळणाघरातून आण. माझी जाण्यापूर्वीची सगळी कामं आवरायची म्हणजे हे दोन-तीन दिवस मला यायला उशीरच होईल.. “
“जाण्यापूर्वीची म्हणजे? तुम्ही जायचं पक्कं ठरवलंयत तर”
” प्रिया… “
“जनरल मॅनेजरना भेटून तुम्ही तुमची ट्रान्सफर कॅन्सल कां करून घेत नाही हो? हवं तर या रविवारी आपण त्यांना घरी जाऊन भेटून येऊ. मी कन्व्हिन्स करीन त्यांना आपले प्रॉब्लेम्स्… “
” प्रॉब्लेम्स..? संदीप मनापासून हसला. “काय सांगणार त्यांना? मी सुध्दा नोकरी करते, आमची तेजू अजून खूप लहान आहे…. “
“ती निदान शाळेत जात असती तरी माझी एवढी धावफळ झाली नसती हो. आता रोज तिला पाळणाघरांत पोचवायचं, संध्याकाळी परत आणायचं, शिवाय रोजची लोकलची धावपळ, घरचं सगळं.. खरंच कसं निभणार हो मला..? ” प्रिया खूप हळवी झाली.
“आई येते म्हणालीय ना गं थोडे दिवस? “
“हो, पण ते थोडेच दिवस. त्या कायम इथे कुठं रहाणार आहेत?
हा प्रश्न तसा न संपणाराच होता.
“प्रिया, आपण यावर नंतर निवांतपणाने सविस्तर बोलू आणि मग नक्की काय ते ठरवू. ठिकाय? “
हा अनपेक्षित दिलासा मिळाला आणि प्रिया लहान मुलीसारखी खुदकन् हसली.
संदीप तिला थोपटून तिचा निरोप घेत जिना उतरू लागला आणि क्षणात नजरेआड झाला.
त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या स्मितरेषेचा आणि ओझरत्या स्पर्शाचा सुद्धा प्रियाला खूप आधार वाटला!
निसटू पहाणारे हे असेच क्षण प्राणपणाने घट्ट धरून ठेवायची तिची धडपड सुरू होती!!
————–
दारावरची बेल वाजली.
“बाबा आsलेs.. “म्हणत तेजू भात तसाच टाकून उठलीच. दुडदुडत दाराकडे जाऊ लागली.
प्रिया तिच्यामागं धावली.
“अं.. अं.. मी उगतनाल दाल… “
“तेजूs.. अगं हात पोचणाराय कां तुझा? … ” म्हणत प्रियाने तिला अलगद वर उचलून घेत दार उघडलं. खरकट्या तोंडाने तेजू संदीपकडे झेपावली. संदीपने दारातच तिला प्रेमाने जवळ घेत तिचा पापा घेतला. तेवढ्याशा आपुलकीनेही ती सुखावली.
“तेजू.. पुरेs त्यांना आत तरी येऊ दे.. चलाs शहाण्या मुलीसारखं मम्म संपवायचं हं आता. गोsड आहे माझं पिल्लू ते. हं.. हाs शेवटचा घास.. बाबांचा.. “
स्वत:च्याच तोंडून सहजच बाहेर पडलेल्या ‘शेवटचा’ घास या शब्दांनीच जखम केल्यासारखा तिचा आवाज भरून आला.
संदीपने चमकून तिच्याकडं पाहिलं.
“काय झालं प्रिया..? “
“हिला चूळ भरवून जरा नेता कां हो आत? ” ती रडवेल्या आवाजातच म्हणाली.. “बघा बरं झोपतीय कां? तोपर्यंत मी आपलं वाढून घेते. “
संदीपनं तेजूला अलगद उचलून खांद्यावर घेतलं. तिचे डोळे पेंगुळले होते, तरीही बाबांनी गुदगुल्या करताच तिची झोप पळाली. आपले गोरे गोबरे गाल त्याच्या कुरळ्या केसांवर घासत ती खिदळत राहिली.
“झोपली कां? “
“हो… ” संदीप अलगद उठला.
दोघेही पानावर बसले.
” काय म्हणाले जी. एम्.? ” ‘सकाळच्या संभाषणाचा धागा हिने मनात अजून घट्ट धरून ठेवलाय तर! ‘.. तो हसला.
“भेटला नाहीत ना? ” प्रिया दुखावली.
” प्रियाs.. , पुढची प्रमोशन्स हवी असतील तर किमान दोन वर्षं रुरल ब्रॅंचमधे काम करायला हवं हा प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेतला नियमच आहे. आता फक्त पुढची प्रमोशन्स हवीत कीं नकोत ते आपण ठरवायचं. “
“आपण? कीं फक्त तुम्ही? ” त्याच्याकडे रोखून पहात तिने उपरोधाने विचारलं.
“म्हणजे? “
” म्हणजे पुढची प्रमोशन्स आपल्याला नकोच असं मी म्हटलं तर ऐकणार आहात तुम्ही? “
” प्रिया, आयुष्यभर कसं जगायचं हे स्वतःच्या मनाशी आधीच पक्कं ठरवून त्याच सरळ रेषेत चालायची तू धडपड करतेयस म्हणून तुला हे सगळं अवघड वाटतंय. अगं, आपल्या बँकेत इथं माझ्यासारखे कितीतरी ज्युनिअर ऑफिसर्स असे आहेत जे कॉम्प्रमाईज म्हणून दोन वर्षांसाठी मुंबई सोडायला मनापासून तयार आहेत. त्या तुलनेत आमच्या रूलर ब्रॅंचेसच कमी पडतायत. मी नाही म्हणायचा अवकाश दुसरं कुणीतरी तिथे जाईल. “
” पण जायलाच हवं तर ते इतक्या लांब कां म्हणून? शनिवार-रविवार येता येईल अशी एकही ब्रॅंच नाहीय मुंबईजवळ? “
” हा प्रश्न माझ्या एकट्याचा नाही आहे प्रिया. आणि तुला हे सगळं खरंच अवघड वाटत असेल ना, तर तू न् तेजूही चला ना माझ्याबरोबर. हा फ्लॅट आपण दोन वर्षं लॉक करून ठेवू हवंतर”
प्रिया गप्प बसली.
” प्रिया, मी खरंच मनापासून सांगतोय. “
“हो? आणि नंतर आपण पुन्हा परत येऊ तेव्हा दोन वर्षांनंतर कोण जॉब देणाराय मला? पुढच्या वर्षी तेजूच्या अॅडमिशनचाही प्रश्न येईल. तिला काय त्या खेड्यातल्या शाळेत घालायचा विचार आहे? “
“प्रिया, आपण सगळेच एकमेकाला फार गृहीत धरून चालतो म्हणून अशी जीवघेणी ओढाताण होते. कधी कधी माणूस त्याच्याही नकळत पटकन् होत्याचा नव्हता होऊन जातो. त्या वेळी हे गृहित पुसलं जातंच ना? जगरहाटी थांबते कधी त्याच्याशिवाय? इथे तर फक्त दोन वर्षांचा प्रश्न आहे प्रिया.. थोडीशी ऍडजस्टमेंट…? “
“मी प्रयत्न तरी नक्कीच करीन. नाही जमलं तर हार पत्करून परत येईन. मला माहित आहे, मी यंत्र नाहीय. माणूसच आहे. मलाही मन आहे, भावना आहेत. तुम्हा दोघींची सोबत आणि इथलं स्वास्थ्य सोडून जाणं मला सुखावह होणार नाहीय. पण ते सुसह्य होण्यासाठी तरी तू हसतमुखाने निरोप द्यायला हवा ना? “
तिला पुढे काय बोलावं सुचेना. तिला धड कांही सोडता येईना आणि धरताही येईना.
“कधी निघणार? ” अखेर सगळं स्वीकारल्यासारखं तिने विचारलं.
” आई उद्या परवा येईल कीं लगेच निघावंच लागेल. “
प्रियाचे डोळे भरून आले.
“प्रिया, तूच असा धीर सोडलास तर तेजूला कोण समजावेल गं? “
त्याही स्थितीत प्रिया खुदकन् हसली. पण ते हसू क्षणभरच टिकलं. मळभ पुन्हा भरून आलं…
“गेल्याबरोबर माझ्या ऑफिसमधे फोन करा लगेच आणि… आणि तब्येतीला जपून रहा… ” भरून आलेल्या आवाजात ती म्हणाली.
संदीपने तिला उत्कटतेने जवळ घेतलं. आपल्या अश्रूंना बांथ घालायचं भान ती त्याच्या मिठीतच कुठंतरी हरवून बसली होती…!!
पुणे येथील ‘ गाणे मनामनांचे ‘ या संस्थेकडून आजी आजोबांसाठी प्रेमपत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामधून पाच सर्वोत्तम पत्राची निवड केली जाणार होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझ्या एका मैत्रिणी च्या भाच्याने मला आग्रह केला आणि माहिती पाठवली. मग मी या स्पर्धेसंबंधी विचार करायला लागले…. प्रेम पत्र तर आजपर्यंत कोणाला लिहिले नाही… त्याचा विचारही केला नाही… विषय अवघड… लेखणी थांबली…! आता काही अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा म्हणून एका गटातील मैत्रीणीला फोन केला… ती म्हणाली, “नाही हो शीला ताई असलं काय नसतंय बघा मी तर कधी लिहिलं नाही” आता अनुभवी लोकांकडून पहिला नकार आला. माझ्या एका मैत्रिणीला… तिचा प्रेम विवाह होता…. तिला विचारलं…. एकाच गावात असल्यामुळे आम्ही कधी पत्र लिहिले नाही… तिने उत्तर दिले. विषय असा होता की ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे अशा कुणालाही तुम्ही पत्र लिहा भावाला बहिणीला आईला देशाला मैत्रिणीला.. प्रेम पत्र म्हणले की प्रेम पत्र हे प्रियकरालाच लिहिले पाहिजे अशी माझी तरी धारणा…. मग मी विचार करून प्रेम पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला… कलावंताला जशा सगळ्या भूमिका निभावता आल्या पाहिजेत तशा लेखकाला कोणत्याही विषयावर लिहिता आले पाहिजे. असे मनाला बजावले आणि प्रेम पत्र लिहायला सुरुवात केली जरा संकोच वाटत होता. ज्याचा कधी तरुण वयात विचार केला नाही ते आता म्हातारपणी विचार करायची वेळ आली…. पण शेवटी स्पर्धा होती त्यातून पाच सर्वोत्तम पत्राची निवड केली जाणार होती..! पारितोषिक हा भाग आता महत्त्वाचा राहिला नाही आता एक्सेप्ट द चॅलेंज हा भाग महत्त्वाचा आहे, किंबहुना आता या विषयापुरता तरी तो वाटला आणि मग लिहायला बसले. पत्रलेखन पूर्ण झाल्यावर अनुभवी माणसांचा थोडा सल्ला घेतला… बरे झाले आहे का? असे विचारले.. काही चुकत तर नाही ना याबद्दल खात्री केली आणि ते स्पर्धेला धाडले……… आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पाच सर्वोत्तम पत्रामध्ये माझ्या पत्राची निवड झाली असा एक मेसेजही फेसबुक वर आला मला आनंद यासाठी झाला की अनुभवातून लिहिणारी मी किंवा अनुभवामुळे लेखन करणारी मी पण या विषयात मात्र प्रचंड कल्पनाशक्तीचा वापर करून मी हे लेखन केले आहे आपल्या ग्रुप वर ते पत्र टाकते आहे वाचा आनंद घ्या त्रुटी असतील तर कळवा म्हणजे पुढे काही स्पर्धा असतील तर सुधारणा करता येतील माझ्या लेखनाला आपले सर्वांचे प्रोत्साहन नेहमीच लाभले आहे त्यातूनच ही प्रगती….!
धन्यवाद! – ते पुरस्कारप्राप्त पत्र असे– – –
प्रिय वसुधा,
लग्नाला 40 वर्षे झाली पण तुला प्रेम पत्र काय साध कार्डही लिहणे जमलं नाही. वसु आपल्यामध्ये व्यक्त होण्याची पद्धतच नाही पण आज मात्र मी ठरवलंय माझ्या मनातलं सगळं तुला सांगायचं… ऐकतेस ना..?
वसु मी पहिल्यांदा तुला पाहायला आलो ना माझ्यासमोर एक वीस वर्षाची लांब सडक केसांची किंचित सावळी टपोऱ्या डोळ्यांची एक गोड मुलगी हातात ट्रे घेऊन आली.. खरं सांगू मी त्याच वेळेला खलास…. मनाने ताबडतोब सांगितलं… “अरे हीच माझी वहिदा” मन गुणगुणायला लागलं… चौधविका चांद हो या आफताब हो.. हृदयात वाजे समथिंग… डोक्यात घंटा वाजायला लागल्या.. मंजुळ सुरेख… माझी पसंती तेव्हाच झाली.
माझ्या तीन खोल्यांच्या घरात निशिकांतची बायको म्हणून तू प्रवेश केलास.. घरात कसला प्रत्येकाच्या मनात प्रवेश केलास. तीन खोल्याचं छोटसं घर सगळं तू आपलं केलं. आईच्या मार्गदर्शनाखाली तू सगळं उत्तम निभावून नेलं. वसु त्या तीन खोल्यात आपल्याला म्हणावा तसा एकांत मिळत नव्हता. मग काय नजरेचे खेळ! जेवायला बसल्यावर मी चटणीचे बोट जिभेवर ठेवून टक् टक् करायचं आणि ओठावर बोट ठेवायचं आई ओरडायची… काय रे आवाज करत जेवतोस… पण तो आपला एक वेगळाच इशारा होता. तू पटकन तोंड लपवून पाठमोरी होऊन हसायचीस. आणि हातावर सुपारी ठेवताना हळूच चिमटा काढायची… मी आई गss असं ओरडायचं.. आई म्हणायची काय रे…? काही नाही ऑफिसला चाललोय… किती रोमँटिक दिवस होते ना!
ऑफिसातून येताना मी तुझ्यासाठी गजरा आणायचो ते कोणाला कळू नये म्हणून देवासाठी मोगरा असलेली फुलपुडी आणायची. मग ते आठ बाय आठच्या खोलीत… खोलीभर तो मोगरा दरवळायचा मग काय…
मी मोगरा माळवतो तुला.. आणि शब्द ओठात घोळतो
शब्द रेंगाळतो जिभेवर.. मौन संवाद साधतो //
प्रेमाचा संवादच आगळा.. देह सारा बोलतो..
शब्दांचे मुके पण तिथे जरी.. भाव संवाद साधतो//
अशी मुक्या संवादाची सुरुवात व्हायची शब्दाच्याही पलीकडची भाषा समजण्याचे आपले प्रेम.. कधी बोलावच लागलं नाही. पण या मोगऱ्या पलीकडे मी तुझी कोणतीच हौस करू शकलो नाही ना?
वसु पण खरं सांगतो माझ्या आयुष्यात तू आलीसआणि तू माझी प्रेरणा झालीस कुणासाठीकाही करून दाखवावं अशी तू एकटी होतीस तुझ्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला पुढे पुढे जात राहिलो आणि मागे तू धावत राहिलीस बिनतक्रार.!
गाण्यातली विशारद तू गाण्याचे क्लास घरी घेताना तुझा रियाज व्हायचं तेवढाच खूप वाटायचा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपाव तू एखादी सुंदर चीज माझ्यासाठी गात रहावी पण असं आपल्याला हे जमलं नाही ना. कधी चार माणसाच्या घरात असं प्रेम करता येत नाही म्हणतात, खरं आहे ते! मी तुला काही देऊ शकलो नाही पण प्रेम मात्र भरभरून दिल. जागेचा अभाव आणि माणसांची रेलचेल असलेले छोट्या घरात आपले प्रेम मात्र अभावातल्या ऐश्वर्या सारखे वर्धिष्णू झाले मग त्या प्रेमात थोडी असूया आलीच… तुझा मामेभाऊ सुभाष जेव्हा आला आणि तुझ्याशी सुधी सुधी म्हणून बोलायला लागला तेव्हा माझा संताप झाला होता, पण एक दिवसासाठी आला म्हणून गप्प बसलो. तुला आठवतंय त्यावेळेला माझा राजकपूर झाला होता. मी एक गाणं गुणगुणत होतो.. तूम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही तुम किसी गैर को चाहोगी तो मुश्किल होगी…. तो पोपट्या तुझा भाऊ असल्यामुळे तुझा हात धर धरून बसवत होता आणि बोलत होता.. सुधी असं सुधी तसं माझा जरा तोल गेलाच. मी म्हणलं.. “अरे वसुधा नाव आहे तिचं “तो म्हणाला, “चालते हो भाऊजी मी हिला नेहमीच सुधी म्हणायचो” तो गेला तेव्हा मी खूप रागावलो होतो तुझ्यावर आणि तू हसत होतीस. म्हणालीस, ” आज काहीतरी जळलं बाई घरात “तो रुसवा फुगवा दोन दिवस चालला होता आणि मग तू माझ्यासाठी खास विणलेला स्वेटर मला सरप्राईज भेट दिलास त्या स्वेटर पेक्षा तुझ्या प्रेमाची उब होती. प्रेमात मी पुन्हा एकदा न्हाऊन निघालो… सगळा रुसवा गळून गेला फक्त उब शिल्लक. वसु तु मला एक नाव ठेवलं होतं फक्त आपण दोघं असतानाच तू मला हाक मारायची… *निक* निशिकांतचा निक झालो…! आपण पुढे आपल्या मुलांच्या जबाबदाऱ्या आईच आजारपण यात सगळं हरवून गेलो नाही? मग तू मला बाबा म्हणायला लागलीस कारण आता मुलांचा बाबा झालो होतो ना मी…! दिवस भराभर सरले केसातली चांदी गडद झाली. वसु तुला आठवतं आई गेली त्या रात्री मी पार कोलमडलो होतो तिचं सगळं झाल्यानंतर मी एके रात्री तुझ्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडलो होतो तेव्हा तू माझी पत्नी नव्हतीस तर आई झाली होतीस तेव्हा हे वाक्य मला जास्त पटलं की” स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता असते”… अगं किती भूमिका निभवल्यास बायको आई बहीण आणि छान मैत्रीण पण मी मात्र तुला प्रेमाचे दोन शब्द काही मोकळेपणाने बोलू शकलो नव्हतो… पण तुला माझ्या डोळ्यात, स्पर्शात हे बहुदा दिसत असावं म्हणूनच इतक्या समाधानांन माझा संसार मार्गी लावलास… आता तुझे चांदण्याचे हात सखे माझ्या गळा हे असेच निरंतर ठेवशील ना? आता आपण दोघेच… अभी ना जाओ छोडके के दिल अभी भरा नही… आता एकमेकांपासून दूर होणे नाही आता देवानंद नाही आता फक्त तुझा निकी आता इतकंच खरं आहे की हमे तुमसे प्यार कितना हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारी बिना हेच खर. खरं तर आपलं प्रेम शब्दात मांडण्याच्या पलीकडे पण जमतील तेवढे शब्द जमवून लिहिले आहेत. वसु खाली माझ्या ओठाचा एक ठसा उमटवलाय त्याच्यावर तुझे ओठ टेकव उरलेलं सगळं माझ्या मनातला आपोआप तुझ्या हृदयात उतरेल करशील ना एवढं….?
☆ “दोनशे साठ रुपयांचे कर्ज…” ☆ डॉ. धनंजय देशपांडे☆
– – जे आजही माझ्या डोक्यावर आहे.
पुण्यात आल्यावर आधी भाड्याच्या घरात होतो, नंतर स्वतःचा फ्लॅट झाला.
ऑफिस देखील आधी भाड्याचे व नंतर स्वतःचे झाले. दोन्ही मालमत्ता अर्थातच कर्ज काढून घेतलेल्या मात्र घराचे हप्ते वेळेवर अन ऑफिसचे तर वेळेपूर्वीच संपवले.
पण तरी मी स्वतःला आजही कर्जमुक्त मानत नाही. त्याचे एक कारण आहे आजही मी आज ही मी दोन माणसांचे मिळून दोनशे साठ रुपये देणे बाकी आहे. त्याचीच हि चित्तरकथा.
घटना आहे १९८८ सालाची. अभिनव चित्रकला महाविद्यालया ची शेवटच्या वर्षाची परीक्षा त्या काळात मुंबईच्या जे. जे. मध्ये व्हायची.
दहा दिवस मुंबईत राहावं लागायच. परीक्षेची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच अशी असली तरी त्यावेळेत तिथं असलंच पाहिजे असं नसायचं.
एकूण दहा दिवसात चार पेपर तुमच्या सोयीने सोडवायचे. त्यामुळे कधी कुणी लेट यायच तर कुणी लवकर संध्याकाळी लवकर जायचे.
दहा दिवसासाठी एकूण खर्च म्हणून अडीचशे रुपये घेऊन पुण्यातून मी मुंबईत गेलेलो. माझ्या मोठ्या भावाचे एक मित्र सायन इथं राहायचे. त्यांच्या घरी माझी सोय त्याने करून दिलेली. तिथून जे. जे. ला रोज जाणे येणे करायचो.
पहिल्या दिवशी लोकल ट्रेनने तिकीट वगैरे काढून व्यवस्थित निघालो. जे. जे. कॉलेजच्या स्टेशन वर उतरलो.
हाताशी थोडा वेळ होता, तर लिंबूसरबत घ्यावे म्हणून तिथल्या गाडीवर गेलो. त्यावेळी काहीतरी तीन रुपयात शरबत मिळायचे. तर पैसे काढून देण्यासाठी खिशात हात घातला अन शॉक बसला. कारण माझा खिसा ट्रेनमध्ये मारला गेला होता.
माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. हातापायात लटलट सुरु झाली. कारण आता पुढचे दहा दिवस जगायचं कस? आता वर्ष वाया जाणार की काय पुन्हा? कोण देणार या मुंबईत मला पैसे? असं सगळं आठवून डोळ्यात पाणीच आलं. काहीच सुचेना.
माझी हि अवस्था त्या सरबतवाल्या भय्याला कळली. त्याने मायेने विचारलं,
‘क्या हुआ बेटा? ’
मला मग अजूनच रडायला येऊ लागलं. भय्याने मग तिथल्या स्टूलवर बसवलं.
आधी साधं पाणी दिलं. मी घटाघटा प्यायलो. त्याला सांगितलं की, ‘ मेरी जेब किसीने काटी है. ’
मी मुंबईत नवीन असल्याचे त्याने ओळखून त्याने इतर चौकशी केली की, कुठून आलास, मुंबईत काय काम काढलं वगैरे.
मी ते सगळं सांगितलं अन आता माझ्या परीक्षेचे काय? हि काळजी बोलून दाखवली.
त्याने विचारलं, ‘ बम्बईमे और कोनो नाही का पहचान में? ‘
मी म्हंटल, ‘ एक मावस भाऊ आहे. गोरेगावला राहतो अन दादरला महाराष्ट्र बँकेत आहे. पण त्याचा डिटेल पत्ता माहित नाही. ‘
यावर भय्याने काय करावं?
आधी मला शरबत प्यायला दिलं. ‘ पीओ बेटा, पैसे नाही लुंगा. ’
अन नंतर त्याने त्याच्या खिशातून दहा रुपये काढून मला दिले व म्हणाला, ‘ दादर को जावं ट्रेन पकडकर, वहा किसी पुलिस से बँकका पता पूछो. भाई मिल जायेगा. आनेजाने का भाडा दिया है. अगर उहा काम नही हुआ तो यहा फिर आ जाना. कुछ करेंगे ‘
माणसात देव असतो, हे मी नेहमी मानत आलो ते याच कारणासाठी. अन त्या भय्याने सांगितल्यानुसार दादरला गेलो. पोलिसाने नीट पत्ता समजावून सांगितल्यावर मी बँकेत गेलो. आत जाताच समोरच भाऊ दिसला.
तोही चकित, मी अचानक आलेलं पाहून. त्याच्या समोर जाऊन बसलो अन थोडक्यात परीक्षेसाठी आलोय. सायंनला सोय झालीय राहण्याची वगैरे सांगताना परत एकदा डोळ्यात पाणी आलं.
त्याला बहुतेक अंदाज आला असावा. कारण त्याने थेट विचारलं की, ‘ पाकीट मारलं गेलंय कां? ‘ मी मानेनेच हो म्हणून सांगितलं.
त्याने फक्त इतकंच विचारलं, किती होते खिशात, मी सांगितलं अडीचशे. भावाने काहीही न बोलता त्याच्या खिशातून अडीचशे काढून मला दिले.
मी म्हटलं, ‘ पुण्यात गेलो की लगेच मनीऑर्डरने पाठवतो. ’
तो म्हणाला, ‘ असू दे. ते नंतर पाहू. तू आता शांतपणे परीक्षेला जा. मन शांत कर. अन अजून काही लागलं तर फोन करून कळव. ’
– असं म्हणून त्याने बँकेचे त्याचे कार्ड मला दिले. ते घेऊन मी निघालो. जीव भांड्यात पडला होता.
पटकन ट्रेन पकडून पुन्हा जे. जे. ला आलो. तरी या घोळात माझे दोन अडीच तास गेले होते. मात्र वेळेचं बंधन असं नसल्याने ती काळजी नव्हती.
त्या दिवशीचा पेपर सोडवणे सुरु केले. म्हणजे पोस्टर करण्याचा तो विषय होता. अन संध्याकाळी बाहेर पडल्यावर आधी त्या सरबतवाल्या भय्याकडे गेलो. खिशातून अडीचशे मधले दहा रुपये काढून त्याला दिले.
मनाची तयारी केलेली की, आता २४० रुपयांत भागवायच आहे. ते जमवू म्हटलं. अन भय्यापुढे दहाची नोट काही न बोलता धरली.
सकाळचा मीच तो मुलगा, त्याने ओळखलं. प्रसन्न हसून म्हणाला, ‘ काम हुई गवा न? ‘ मी हो म्हटलं अन त्याला सांगितलं की, ‘ ये आपके दस रुपये. ’
तो म्हणाला. ‘ बेटा, रहने दो, फिर कभी किसी को जरुरत पडे तो उसे तुम काम आ जाना. बास, मेरे पैसे उसी दिन मुझे मिल जायेंगे. ’
मी थक्क झालो. एक उच्चपदस्थ व उच्च शिक्षित मोठा बँकेतील माणूस अन एक फुटपाथवरचा अशिक्षित भय्या पण दोन्ही त्यावेळी मला देवाची रूपे दिसली.
नंतर पुण्यात आलो. नोकरीला लागलो. त्याच काळात तो मुंबईचा भाऊ एकदा माझ्याकडे पुण्यात आला तेव्हा आवर्जून त्याला ते अडीचशे परत देत होतो तर तो म्हणाला,
‘मोठे झाले आता बाळासाहेब तुम्ही. असू द्या पैसे तुमच्याकडे. नंतर कधी कुणाला तरी अशीच मदत कर. बास. ’
अगदी हीच सेम भावना त्या भय्या’ने मला बोलून दाखवलेलं आठवलं अन मी नतमस्तक झालो.
– – तर, हेच ते माझ्यावर अजून असलेले अडीचशे प्लस दहा असे दोनशे साठ रुपयाचे कर्ज. जे अद्याप फेडू शकलो नाहीये.
…… काही काही ऋण अशीच असावीत आयुष्यात जी फेडण्यापेक्षा मिरवण्यात आनंद वाटावा असे हे माझे कर्ज
(रवि १५ फेब्रु. २०२६ रोजी महाशिवरात्र आहे. त्यानिमित्त)
☆
प्रस्तावना
महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेत काही रचना अशा आहेत की त्या केवळ ऐकल्या किंवा म्हटल्या जात नाहीत, तर साक्षात जगल्या जातात. समर्थ रामदासस्वामी विरचित “लवथवती विक्राळा” ही शंकरांची आरती त्यापैकीच एक. घराघरांत नित्यनेमानं उच्चारली जाणारी ही आरती वरवर साधी वाटली, तरी तिच्या गर्भात शिवतत्त्वाचं अत्यंत गहन, विश्वात्म आणि अद्वैतदर्शी चिंतन सामावलेलं आहे. ही आरती म्हणजे केवळ स्तुतीगीत नसून, शिव या तत्त्वाची अनुभूती देणारं भव्यदिव्य तत्त्वकाव्य आहे.
विक्राळतेचं तत्त्वज्ञान
आरतीचा आरंभ —
“लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा”
या ओळीनं होतो. इथे समर्थ शंकरांचं सौम्य रूप पुढे न आणता त्यांची विक्राळता उभी करतात. मात्र ही विक्राळता हिंसक नसून अज्ञानाला हादरवणाऱ्या सत्याची आहे. “ब्रह्मांडी माळा” या एका शब्दातून संपूर्ण विश्व शंकरांच्या कंठाभोवती गुंफलं जातं. शिव इथे एखाद्या विशिष्ट स्थानी विराजमान असलेले देव न राहता, संपूर्ण विश्व व्यापून उरणारं चैतन्य ठरतात—विश्वात असूनही विश्वापलीकडचे.
*विष, करुणा आणि साक्षीभाव*
“वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा”
या ओळीत समुद्रमंथनाची पुराणकथा येते. देव-दैत्यांच्या संघर्षातून निघालेलं हळाहळ विष शंकरांनी प्राशन केलं; मात्र ते कंठातच रोधून धरलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला.
या कृतीचा तात्त्विक अर्थ अत्यंत सूक्ष्म आहे. शिव दुःख नष्ट करत नाहीत. ते दुःख स्वतःमध्ये सामावून घेतात; पण त्याचा प्रसार इतरत्र होऊ देत नाहीत. “त्रिनेत्रातील ज्वाळा” म्हणजे संहाराची आग नव्हे, तर भूत–वर्तमान–भविष्य या तिन्ही काळांचं जागृत ज्ञान. शिव म्हणजे संहारक नाही, तर सजग साक्षीपुरुष.
रौद्रता आणि सौम्यतेचा अद्वैत संगम
हे विक्राळ रूप पुढच्याच ओळीत सौंदर्यात विलीन होतं —
“लावण्यसुंदर मस्तकीं बाळा”
शंकर लावण्यवान आहेत. त्यांच्या मस्तकावर ‘बाळा’ म्हणजे गंगा आहे. स्वर्गातून प्रचंड वेगानं येणाऱ्या गंगेला आपल्या जटाभारात सामावून, तिचा वेग रोखून पृथ्वीवर केवळ कल्याणकारी सौम्य धार सोडली—म्हणून समर्थ गंगेला ‘बाळा’ म्हणतात.
शिवाच्या मस्तकावरला चंद्र शीतलतेचं आणि संतुलनाचं प्रतीक आहे. रौद्रता आणि सौम्यता, भय आणि करुणा — या विरोधी भासणाऱ्या गुणांचा अद्वैत संगम म्हणजे शिवतत्त्व. जिथं चंद्र आहे, तिथं अंधार असला तरी शीतल प्रकाश असतो.
चैतन्याचा प्रवाह
“तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां”
या ओळीत गंगेचं अवतरण दिसतं. शंकरांच्या जटांमधून वाहणारी गंगा केवळ पौराणिक नदी नाही, तर साक्षात चैतन्याचा, करुणेचा आणि पवित्रतेचा अखंड प्रवाह आहे. संहारक मानला जाणारा शिवच जीवन टिकवून ठेवतो—ही विसंगती नसून हे पूर्णत्व आहे.
कर्पूरगौर शिव : अहंकारशून्य तेज
धृवपदातील “कर्पूरगौरा” या शब्दातून शिव अत्यंत गोरे असल्याचं सांगितलं आहे. कापूर जसा जळून पूर्णपणे नाहीसा होतो, तसा शिव अहंकारशून्य आहे. भोळेपणा म्हणजे दुर्बलता नाही, तर निर्मळ भावावर प्रसन्न होणारी सहज दैवी वृत्ती आहे. विशाल नेत्र म्हणजे सर्वांना सामावून घेणारं अपरंपार वात्सल्य, कारुण्य.
अर्धनारीनटेश्वर : अद्वैताचा कळस
“अर्धांगीं पार्वती”
या ओळीत अर्धनारीनटेश्वर तत्त्व प्रकट होतं. शिव आणि शक्ती वेगळे नाहीत — चेतना आणि क्रिया, पुरुष आणि प्रकृती यांचं द्वैत इथं विरघळतं. त्यामुळे शिवतत्त्व हे केवळ वैराग्याचं प्रतीक न राहता, संतुलित, समन्वयी आणि समग्र जीवनदृष्टीचं प्रतीक ठरतं.
भस्म : वैराग्याची जागृती
“विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा”
विभूती म्हणजे भस्म. शिव सर्वांगावर चिताभस्म धारण करतात. भक्त शिवावर चिताभस्माची उधळण करतात. भस्म ही मृत्यूची आठवण आहे; पण निराशेची नाही—ती वैराग्याची जागृती आहे.
समुद्रमंथनाच्या कथेत अमृताआधी विष येतं. हा निव्वळ पौराणिक तपशील नसून मानवी जीवनाचा शाश्वत नियम आहे. साधना असो वा संसार—संघर्षाविना अमृत मिळत नाही. शिव विष पितात, पण ते गिळून टाकत नाहीत—हेच शिवतत्त्वाचं जीवनसूत्र आहे.
योगी शिव
आरतीच्या अखेरच्या कडव्यात शिव योगी रूपात प्रकट होतात—
“व्याघ्रांबर, फणिवरधर, सुंदर मदनारी”
भय, काळ आणि वासना यांवर विजय मिळवलेला शिव इंथ योगी आहे.
_“पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी”
शिव पंचमुखी आहेत. ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात—किंवा पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये आणि सृष्टीची पाच कार्यं यांची प्रतीकात्मक अभिव्यक्ती म्हणजे पंचानन शिव.
“शतकोटीचें बीज वाचे उच्चारी”
ॐ या एकाक्षरी प्रणवात संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे. स्वयं शिव या नादात सदा मग्न आहेत.
राम–शिव अद्वैत
“रामदासा अंतरीं”
या उल्लेखातून समर्थ स्वतःला रामभक्त म्हणवतात. ते म्हणतात की, रघुकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष श्रीराम माझ्या हृदयी विराजमान आहे. रामाच्या अंतःकरणात शिव वास करतो; म्हणजेच रामदासाच्याही अंतःकरणात शिवच वास करतो. राम आणि शंकर वेगळे राहत नाहीत—इथं भक्तीतलं अद्वैत अतिशय सूक्ष्मपणे समर्थांनी उलगडलंय.
काव्यमीमांसा
या तात्त्विक गहनतेला न्याय देणारं समर्थांचं काव्यप्रभुत्व तितकंच विलक्षण आहे. विषयाला साजेसं ठेकेदार, गंभीर वृत्त, ओघवती लय आणि अर्थघन शब्दयोजना यांमुळे आरती उच्चारताना ती केवळ ऐकू येत नाही, तर अनुभवली जाते.
‘लवथव’, ‘विक्राळ’, ‘ब्रह्मांडमाळा’, ‘मदनारी’, ‘फणिवरधर’ हे शब्द अलंकार म्हणून नाही, तर तत्त्वसूचक चिन्हं म्हणून येतात. प्रथम कडव्यातील ‘ल’ आणि ‘ळ’ वर्णांचा अनुप्रास श्रुतिमधुर वाटतो.
*विरोधाभासातून परिणाम साधणारी कलाकृती*— विक्राळ पण लावण्यसुंदर, संहारक पण करुणाकर — असं शिवरूप भक्ताच्या मनात खोलवर स्थिरावतं.
समारोप
अशा प्रकारे _“लवथवती विक्राळा”_ ही आरती शिवाची स्तुती न राहता शिव होण्याची दिशा दाखवणारं तत्त्वकाव्य ठरतं. म्हणूनच ती शतकानुशतकं टिकून आहे. ती देवाला माणसाजवळ आणत नाही; उलट माणसाला अधिक विशाल, अधिक सजग आणि अधिक शिवमय बनवते. हेच या आरतीचं खरं यश आहे.
‘१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे’ हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.
काही वर्षांपूर्वी हा शब्द पण आपल्याला माहीत नव्हता आणि आता तरुणाईकरता, तो अगदी महत्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात, की, हा परदेशी सण आहे. आपण का म्हणून साजरा करायचा?
आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा, की, नाही, याकरता हे माहिती करणे जरुरी आहे, की, व्हॅलेंटाईन चा काय अर्थ आहे, आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय?
व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण, म्हणजे जन्म स्थान आहे, इटली मधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे, हे रोम मध्ये राहणारे एक पाद्री (प्रिस्ट) होते. त्यावेळेस तिथे क्लोडियस या सम्राटाचे राज्य होते. त्याला आपले साम्राज्य खूप वाढवायचे होते. त्याची अशी समज होती, की, सैन्यामधल्या लोकांनी जर लग्न केलं, तर ते मन लावून लढू शकत नाहीत. म्हणून सम्राटानी असा हुकूम काढला, की, सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नाही. व्हॅलेंटाईन आणि कुणालाच हे पसंत नव्हते. पण – आलीया भोगासी. लोक लपून छपून व्हॅलेंटाईनच्या मदतीने लग्न करायला लागले. राजापासून अशी गोष्ट किती दिवस लपून राहणार! राजाला हे समजताच, व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि व्हॅलेंटाईनची रवानगी तुरुंगात झाली.
. रोम च्या लोकांचा असा समज आणि अनुभव होता, की, व्हॅलेंटाईनकडे दिव्य शक्ती आहे आणि त्यामुळे तो कुठलेही व्यंग / आजार दूर करू शकतो. तुरुंगाच्या जेलरची मुलगी जन्मापासून अंध होती. जेलरच्या विनंतीवरून व्हॅलेंटाईन नी आपल्या दिव्य शक्तींनी त्या मुलीला दृष्टी मिळवून दिली. मुलगी रोज व्हॅलेंटाईन ला भेटायला तुरुंगामध्ये यायला लागली, आणि दोघांमध्ये मैत्रीभाव निर्माण झाला आणि त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. फाशीचा दिवस उजाडला.
व्हॅलेंटाईन नी जेलर कडून कागद आणि पेन मागून घेतला, आणि त्याच्या मुलीला चिठ्ठी लिहिली आणि खाली लिहिले – “तुझा व्हॅलेंटाईन”.
हा दिवस होता १४ फेब्रुवारी ४९६.
तेव्हापासून व्हॅलेंटाईन आणि त्या मुलीच्या प्रेमाची स्मृती म्हणून, जगभरातले प्रेमी – प्रेमिका हा दिवस वैलेंटाइन डे म्हणून साजरा करायला लागले. आपले प्रेम व्यक्त करण्याकरता फुलं, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट एकमेकांना देण्याची प्रथा पण सुरु झाली. हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली आणि नवरा- बायको, मित्र – मैत्रिणी, नातेवाईक, पाळीव प्राणी, असे सगळेच या परिघात आले. ज्याच्या विषयी आपल्या मनात प्रेमभावना आहे, त्यांना जगभरातले लोक, या दिवशी शुभेच्छा देतात आणि हा सण साजरा करतात.
. दोन तीन दशकांपूर्वी आपल्याकडे जागतिकीकरणाचे (ग्लोबलायझेशन) चे वातावरण तयार झाले आणि देश विदेशातील इतर गोष्टींबरोबर संस्कृतीची पण देवाणघेवाण सुरु झाली. आधी मंद गतीने सुरु झाली आणि आतातर झपाट्याने सुरु आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा याचाच भाग आहे, असे म्हणता येईल.
आपल्या देशाला सणांचा देश असे म्हटल्या जाते. इथल्या इतके सण इतर कुठेही साजरे होत नाहीत. दीवाळी, राखी, होळी, पोळा, ईद, ख्रिसमस, असे अनेक सण, उत्सव आपण आनंदानी, उत्साहानी आणि एकोप्याने साजरे करतो. आमचा – तुमचा असा भेदभाव, आपण भारतीय कधीच करत नाही.
सगळ्या सणांमागची कल्पना एकच असते, आणि ती म्हणजे, आपले प्रेम व्यक्त करणे. मग नवरा – बायको करता असो, प्रियकर – प्रेयसी करता असो, नातेसंबंधांकरता असो, मित्र परिवाराकरता असो, , प्राणिमात्रांकरता असो, किंवा निसर्गा करता असो. मनापासून कुणावरही प्रेम व्यक्त केलं, तर आपलं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं.
पण आजच्या धकाधकीच्या जीवनात, आजच्या पळापळीच्या जीवनात, आपण सर्व जण, मनानी आणि शरीराने सारखे पळत आहोत. त्यामुळे वेळ आपल्या हातातून कायम निसटून जात आहे. आता आपल्याकडे म्हणजे कुणाकडे वेळच नाही, त्यामुळे कुणावरही मनापासून प्रेम तरी कधी करणार! जीवनात प्रेम नाही, म्हणून आनंद नाही, आणि आनंद नाही म्हणून उत्साह नाही. या दुष्ट चक्रात आपण सगळेच अडकलो आहोत. भविष्यकाळात हे सगळे असे घडणार आहे, हे ओळखून, आपल्या पूर्वजांनी निरनिराळ्या सणांची मुहूर्तमेढ रचली असावी. हेतू हाच, की, थोड्या थोड्या दिवसांनी असे सण येत जातील आणि त्या त्या दिवशी सगळे आनंदात राहतील. कुठलाही सण आला, की, आपण आधीपासून प्लॅनिंग करतो, वेळ काढतो आणि आपले प्रेम व्यक्त करत, सण आणि तो दिवस आनंदानी साजरा करतो.
असं म्हणतात – Love and happiness go hand in hand. The happiness you feel is in direct proportion with the love you give.
कुणाही बरोबर आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता काळ / वेळ / आपली प्रथा / परदेशी प्रथा, यांचं बंधन असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. कारण –
True love knows no reason
आणि
Love has no boundaries.
सगळ्यांविषयी आपलं प्रेम व्यक्त करायला, आजचा व्हॅलेंटाईन डे हा पण एक छान दिवस आहे.
पूर्वी सगळे नोकरदार एक तारखेला खुश असायचे –
“खूष है जमाना, आज पहिली तारीख है”.
आता सगळे प्रेम व्यक्त करणारे १४ फेब्रुवारीला खुश असतात – “खूष है जमाना, आज व्हॅलेंटाईन डे है”.
नुकतेच KBC Junior 2025 संपले. आजकालच्या मुलांचे सर्व विषयांवरील व्यापक ज्ञान पाहून आपण थक्क होतोच; पण ज्ञानापेक्षा अधिक भावून जातो तो त्यांचा confidence, बिनधास्त बोलणे, खदखदून हसणे आणि तो निरागस innocence. सरळसोट, कुठलाही आडपडदा नाही… खूप छान वाटतं.
अशाच एका भागात एक दहा- बारा वर्षांची चिमुरडी आली होती. काही प्रश्नांनंतर गप्पा मारताना अमिताभ बच्चन तिच्यावर खूश झाले आणि त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिला, “चिरंजीवी भव. ”
ती चिमुरडी आधी नम्रपणे “Thank you, sir” म्हणाली. पण मग… कथेमध्ये ट्विस्ट आला.
ती अगदी बिनधास्तपणे म्हणाली,
“Thank you, sir! लेकिन मैं चिरंजीवी नहीं बनना चाहती. म्हातारपणी हात-पाय दुखतात, कंबर दुखते, नीट चालता येत नाही, काठी लागते. काही लोक bedridden होतात, तर काहींना कायम मदतनीस लागतो. त्यापेक्षा मला वेळेवर exit घ्यायला आवडेल. आज नाही तर उद्या exit घ्यायचंच आहे, तो मुझे time पे exit लेना हैं”. अमिताभ बच्चन पण ह्या उत्तराने थक्क झाले.
इतक्यावरच ती थांबली नाही. पुढे ती अमिताभ बच्चन यांना म्हणाली,
“आप हो जाओ चिरंजीव. आपके पास इलाज करने के लिये पैसा है. आप चिरंजीव हो गये, तो भी ठीक. ”
क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. कदाचित तिने कुणाचंतरी आजारपण अगदी जवळून पाहिलं असेल. आजारपणातली हतबलता बघितली असेल – आजारी व्यक्तीची अणि कुटुंबाचीसुद्धा.
पण तरीही… ही Gen Alpha काहीतरी वेगळीच आहे, हे नक्की.
तिच्या या बोलण्याने मला ‘इच्छा मरण’ या संकल्पनेची आठवण झाली. नाव ऐकतानादेखील आपल्याला ती संकल्पना अजूनही विचित्र, अस्वस्थ करणारी वाटते. पण प्रत्यक्षात काही देशांमध्ये euthanasia कायदेशीर आहे—ठरावीक नियम आणि अटींसह. नेदरलॅंड, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, कॅनडा, कोलंबिया स्पेन, न्यूझीलंड, पोर्तुगाल तसेच ऑस्ट्रेलिया आणि यूएसमधील काही states मध्ये terminal illness असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या देशात अरुणा शानबागच्या वेळी हा मुद्दा उठला होता. आयुष्यातली बेचाळीस वर्ष… बेचाळीस वर्ष ……
पण आज ह्या चिमुरडीच्या बोलण्याने मनात एक विचार आला. किमान इतकं तरी करता आलं पाहिजे की आपण स्वतःच आधीच जाहीर करू शकू—
एका ठरावीक वयानंतर किंवा ठरावीक परिस्थितीत मला ventilator वर ठेवू नका किंवा कृत्रिमरीत्या जगवू नका.
असं एखादं will किंवा living directive असणं किती दिलासादायक ठरेल!
यामुळे आपल्या पुढच्या पिढीला निर्णय घ्यायला सोपं जाईल…
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—
त्यांच्या मनावर कधीही guiltचं ओझं राहणार नाही.
आपण नेहमी “आई-वडिलांसाठी काहीही करायला तयार आहोत, ” असं म्हणतो. पण कधी कधी काहीही न करणे हाच सर्वात मोठा करुणेचा निर्णय असू शकतो, हे स्वीकारायला आपल्याला अजून वेळ लागेल. आज वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्य वाढवता येतंय, पण प्रश्न असा आहे की—फक्त श्वास चालू ठेवणं म्हणजे जगणं का?
जगणं म्हणजे आठवणी, संवाद, स्वाभिमान, स्वतःच्या शरीरावर आणि निर्णयांवरचा अधिकार. ते सगळं हरवल्यावर फक्त मशीनवर अवलंबून असलेलं अस्तित्व आपण “जीवन” म्हणू शकतो का? कदाचित हीच पिढी हा प्रश्न निर्भीडपणे विचारेल.
त्या चिमुरडीने ‘इच्छा मरण’ हा शब्द वापरला नाही. तिने फक्त वेळेवर exit घ्यायची इच्छा व्यक्त केली. किती साधं, किती स्पष्ट आणि तरीही किती खोल! मृत्यूची भीती नसून, वेदनांची आणि परावलंबित्वाची भीती तिने मांडली होती.
उद्या हीच पिढी policy बनवेल, कायदे ठरवेल, आणि “जगण्याचा अर्थ” नव्याने define करेल. तेव्हा कदाचित ‘इच्छा मरण’ ही संकल्पना भीतीदायक न वाटता, करुणेची, समजुतीची आणि सन्मानाची भाषा वाटेल.
आणि तेव्हा कदाचित ह्या वाक्याचा खरा अर्थ आपण लावू…
“बाबू मोशाय! ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं! ”
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डा. मुक्ता जीहरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख मैं, मैं और सिर्फ़ मैं। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # ३०९ ☆
☆ मैं, मैं और सिर्फ़ मैं… ☆
‘कोई भी इंसान खुश रह सकता है, बशर्ते वह ‘मैं, मैं और सिर्फ़ मैं’ कहना छोड़ दे और स्वार्थी न बने’ मैथ्यू आर्नल्ड का यह कथन इस ओर इंगित करता है कि मानव को कभी फ़ुरसत में अपनी कमियों पर अवश्य ग़ौर करना चाहिए; दूसरों को आईना भी दिखाने की आदत स्वत: छूट जाएगी।
मानव स्वयं को सर्वश्रेष्ठ समझ आजीवन दूसरों के दोष-अवगुण खोजने में व्यस्त रहता है। उसे अपने अंतर्मन में झांकने का समय ही कहां मिलता है? वह स्वयं को ही नहीं, अपने परिवारजनों को भी सबसे अधिक विद्वान, बुद्धिमान अर्थात् ख़ुदा से कम नहीं आंकता। सो! उसके परिवार-जन सदैव दोषारोपण करना ही अपने जीवन का लक्ष्य स्वीकारते हैं। इसलिए न परिवार में सामंजस्यता की स्थिति आ सकती है; न ही समाज में समरसता। चारों ओर विश्रृंखलता व विषमता का दबदबा रहता है, क्योंकि मानव स्वयं को सर्वश्रेष्ठ सिद्ध करने में लिप्त रहता है और अपनी अहंनिष्ठता के कारण वह सबकी नज़रों से गिर जाता है। आपाधापी भरे युग में मानव एक-दूसरे को पीछे धकेल आगे बढ़ जाना चाहता है; भले ही उसे दूसरों की भावनाओं को रौंद कर आगे ही क्यों न आगे बढ़ना पड़े? सो! उसे दूसरों के अधिकारों के हनन से कोई सरोकार नहीं होता। वह निपट स्वार्थांध मानव केवल अपने हित के बारे में सोचता है और अपने अधिकारों के प्रति सजग व अपने कर्त्तव्यों से अनभिज्ञ दूसरों को उपेक्षा भाव से देखता है, जबकि अन्य के अधिकार तभी आरक्षित व सुरक्षित रह सकते हैं; जब वह अपने कर्त्तव्य व दायित्वों का सहर्ष निर्वहन करे। मैं, मैं और सिर्फ़ मैं की भावना से आप्लावित मानव आत्मकेंद्रित होता है। वह केवल अपनी अहंतुष्टि करना चाहता है तथा उसके लिए वह अपने संबंधों व पारिवारिक दायित्वों को तिलांजलि देकर निरंतर आगे बढ़ता चला जाता है; जहां उसकी काम- वासनाओं का अंत नहीं होता… और संबंध व सामाजिक सरोकारों से निस्पृह मानव एक दिन स्वयं को नितांत अकेला अनुभव करता है और ‘मैं’ ‘मैं’ के दायरे व चक्रव्यूह से बाहर आना चाहता है; स्वयं में स्थित होना चाहता है और प्रायश्चित करना चाहता है…परंतु अब किसी को उसकी व उसकी करुणा-कृपा की ज़रूरत नहीं होती।
इस दौर में वह अपनी कमियों पर ग़ौर करके अपने अंतर्मन मेंं झांकना व आत्मावलोकन करना चाहता है। परंतु उसे अपने भीतर अवगुण, दोष व बुराइयों का पिटारा दिखाई पड़ता है और वह स्वयं को काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार में लिप्त पाता है। इन विषम परिस्थितियों में वह उस स्वनिर्मित जाल से बाहर निकल, संबंध व सरोकारों का महत्व समझ कर लौट जाना चाहता है; उन अपनों में; अपने आत्मजों में, परिजनों में… जो अब उसकी अहमियत नहीं स्वीकारते, क्योंकि उन्हें उससे कोई अपेक्षा नहीं रहती। वैसे भी ज़िंदगी मांग व पूर्ति के सिद्धांत पर निर्भर है। हमें भूख लगने पर भोजन तथा प्यास लगने पर पानी की दरक़ार होती है और यथासमय स्नेह, प्रेम, सहयोग व सौहार्द की। सो! बचपन में उसे माता के स्नेह व पिता के सुरक्षा-दायरे की ज़रूरत व उनके सानिध्य की अपेक्षा रहती है। युवावस्था में उसे अपने जीवन- साथी, दोस्तों व केवल अपने परिवारजनों की अपेक्षा रहती है; माता-पिता के संरक्षण की नहीं। सो! अपेक्षा व उपेक्षा भाव दोनों सुख-दु:ख की मानिंद एक स्थान पर नहीं रह सकते, क्योंकि प्रथम भाव है, तो द्वितीय अभाव और इनमें सामंजस्य ही जीवन की मांग है।
जीवन जहां संघर्ष का पर्याय है; वहीं समझौता भी है, क्योंकि संघर्ष से हम वह सब नहीं प्राप्त कर पाते; जो प्रेम द्वारा पल-भर में प्राप्त कर सकते हैं। आपका मधुर व्यवहार ही आपकी सफलता की कसौटी है, जिसके बल पर आप लाखों लोगों के प्रिय बन कर उनके हृदय पर आधिपत्य स्थापित कर सकते हैं। विनम्रता हमें नमन सिखाती है; शालीनता का पाठ पढ़ाती है, और विनम्र व्यक्ति विपदा-आपदा के समय पर अपना मानसिक संतुलन नहीं खोता… सदैव धैर्य बनाए रखता है। अहं उसके निकट जाकर भी उसे छूने का साहस नहीं जुटा पाता अर्थात् वह ‘मैं, मैं और सिर्फ़ मैं’ के शिकंजे से सदैव मुक्त रहता है और आत्मावलोकन कर ख़ुद में सुधार लाने की डगर पर चल पड़ता है। वह अपनी कमियों को दूर करने का भरसक प्रयास करता है और कबीरदास जी की भांति ‘बुरा जो देखन मैं चला, मोसों बुरा न कोय’ अर्थात् पूरे संसार में उसे ख़ुद से बुरा व कुटिल कोई अन्य दिखाई नहीं पड़ता। इसी प्रकार सूर, तुलसी आदि को भी स्वयं से बड़ा पातकी ढूंढने पर भी दिखाई नहीं पड़ता, क्योंकि ऐसे लोग स्वयं को बदलते हैं; संसार को बदलने की अपेक्षा नहीं रखते।
कंटकों से आच्छादित मार्ग से सभी कांटो को चुनना अत्यंत दुष्कर कार्य है। हां! आत्मरक्षा के लिए पांवों में चप्पल पहन कर चलना अधिक सुविधाजनक व कारग़र है। सो! समस्या का समाधान खोजिए; ख़ुद मेंं बदलाव लाइए और दूसरों को बदलने में अपनी ऊर्जा नष्ट मत कीजिए। जब आपकी सोच व दुनिया को देखने का नज़रिया बदल जाएगा; आपको किसी में कोई भी दोष नज़र नहीं आयेगा और आप उस स्थिति में पहुंच जाएंगे… जहां आपको अनुभव होगा कि जब परमात्मा की कृपा के बिना एक पत्ता तक भी नहीं हिल सकता, तो व्यक्ति किसी का बुरा करने की बात सोच भी कैसे सकता है? सृष्टि-नियंता ही मानव से सब कुछ कराता है… इसलिए वह दोषी कैसे हुआ? इस स्थिति में उसे दूसरों को आईना दिखाने की आवश्यकता ही नहीं पड़ती।
मानव ग़लतियों का पुतला है। यदि आप अपने जैसा दूसरा ढूंढने को निकलेंगे, तो अकेले रह जाएंगे। इसलिए दूसरों को उनकी कमियों के साथ स्वीकारना सीखिये … यही जीवन जीने का सही अंदाज़ है। वैसे भी आपको जीवन में जो भी अच्छा लगे, उसे सहेज व संजोकर रखिए और शेष को छोड़ दीजिए। इस संदर्भ में आपकी ज़रूरत ही महत्वपूर्ण है और ‘आवश्यकता आविष्कार की जननी है’ तथा ‘जहां चाह, वहां राह… यह है जीने का सही राह।’ यदि मानव दृढ़-प्रतिज्ञ व आत्मविश्वासी है, तो वह नवीन राह ढूंढ ही लेता है और उस स्थिति में उसका मंज़िल पर पहुंचना अवश्यंभावी हो जाता है। सो! साहस व धैर्य का दामन थामे रखिए; मंज़िल अवश्य प्राप्त हो जाएगी।
हां! अपने लक्ष्य को प्राप्त करने के लिए आपको सत्य की राह पर चलना होगा, क्योंकि सत्य ही शिव है, कल्याणकारी है…और जो मंगलकारी है, वह सुंदर तो अवश्य ही होगा। इसलिए सत्य की राह सर्वोत्तम है। सुख-दु:ख तो मेहमान की भांति आते-जाते रहते हैं। एक की अनुपस्थिति में ही दूसरा दस्तक देता है। सो! इनसे घबराना व डरना कैसा? इसलिए ‘जो हम चाहते हैं, वह होता नहीं और जो ज़िंदगी में होता है, हमें भाता नहीं’… वही हमारे दु:खों का मूल कारण है।’ जिस दिन हम दूसरों को बदलने की भावना को त्याग कर ख़ुद में सुधार लाने का मन बना लेंगे, दु:ख, पीड़ा, अवमानना, आलोचना, तिरस्कार आदि अवगुण-दोष सदैव के लिए जीवन से नदारद हो जाएंगे। इसलिए ‘परखिए नहीं, समझिए’ … यही जीने का सर्वोत्कृष्ट मार्ग है। इसका दूसरा पक्ष यह है कि ‘जब चुभने लगें, ज़माने की नज़रों मेंं/ तो समझ लेना तुम्हारी चमक बढ़ रही है’ अर्थात् महान् व बुद्धिमान मनुष्य की सदैव आलोचना व निंदा होती है और वे सामान्य लोगों की नज़रों में काँटा बन कर खटकने लगते हैं। इस स्थिति में मानव को कभी भी निराश नहीं होना चाहिए, बल्कि प्रसन्नता से स्वयं को ग़ौरवान्वित अनुभव करना चाहिए कि ‘आपकी बढ़ती चमक व प्रसिद्धि देख लोग आपसे ईर्ष्या करने लगेंगे, परंतु आपको निरंतर उसी राह पर अग्रसर होते रहना चाहिए।’
ज़िंदगी जहां हर पल नया इम्तहान लेती है, वहीं एक सुहाना सफ़र है। कौन जानता है, अगले पल क्या होने वाला है? इसलिए चिंता, तनाव व अवसाद में स्वयं को झोंक कर अपना जीवन नष्ट नहीं करने का संदेश प्रेषित है। स्वामी विवेकानंद जी के शब्दों में–’उठो! आगे बढ़ो और तब तक न रुको; जब तक आप मंज़िल को नहीं प्राप्त कर लेते। उस स्थिति में मन में केवल वही विचार रखें, जो तुम जो पाना चाहते हैं और केवल उसे ही हर दिन दोहराओ…आपको उस लक्ष्य के प्राप्ति अवश्य हो जाएगी।’
अंत में मैं कहना चाहूंगी कि ‘सिर्फ़ मैं’ के भाव का दंभ मत भरें; आत्मावलोकन कर अपने अंतर्मन में झांकें व दोष-दर्शन कर अपनी कमियों को सुधारने में प्रयासरत रहें… आप स्वयं को अवगुणों की खान अनुभव करेंगे। दूसरों से अपेक्षा मत करें और जब आपके हृदय में दैवीय गुण विकसित हो जाएं और आप लोगों की नज़रों में खटकने लगें, तो सोचें कि आपका जीवन, आपका स्वभाव व आपके कर्म उत्तम हैं, श्रेष्ठ हैं, अनुकरणीय हैं। सो! आप जीवन में अपेक्षा-उपेक्षा के जंजाल से मुक्त रहें…कोई बाधा आपकी राह नहीं रोक पाएगी। यही खुश रहने का सर्वश्रेष्ठ मार्ग है। परंतु यह तभी संभव होगा, जब आप स्व-पर से ऊपर उठ कर, नि:स्वार्थ भाव से पर-हित के कार्यों में स्वयं को लिप्त कर, उन्हें दु:खों से मुक्ति दिलाकर सुक़ून अनुभव करने लगेंगे। सो! दूसरों से उम्मीद रखने की अपेक्षा ख़ुद से उम्मीद रखना श्रेयस्कर है, क्योंकि इससे निराशा नहीं, आनंदोपलब्धि होगी और मानव-मात्र के सब मनोरथ पूरे होंगे।