श्री विष्णू सोळंके
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ सत्तेचा सारीपाट… ☆ श्री विष्णू सोळंके ☆
सत्ता, व्यवस्था आणि रस्त्यावरचा माणूस?
कोणत्याही सत्तेचा सारीपाट मात्र अजब गजब असतो – –
मग तो, महाभारतातील काळ असो, रामायणातील किंवा लोकशाही मिळाल्यानंतरचा काळ असो,
सारेच कसे सत्तेसाठी? डाव- प्रतिडाव मांडले जातात…. तेव्हा सुद्धा, द्रौपदीचे वस्त्रहरण झालेच होते!
आता सुध्दा मुखवटे पांघरून सत्ता सामान्य माणसाला एक भविष्यकालीन स्वप्न दाखवित नेहमी गोंजारत असते. आश्वासनाच्या घोषणा वाटत असते कारण एकच..
सत्ता आपल्या हाती ठेवण्यासाठी आता तर, साम, दाम, दंड हे नवे अस्त्र वापरले जाते…
तसेच व्यवस्था सुद्धा अशीच कायमचे गुलाम करीत असते, सामान्य माणसाला..
मग ते शिक्षण, रोजगार, आरोग्य, प्रशासन या पातळीवर..
रस्त्यावरचा माणूस आयुष्यभर ‘तारीख पे तारीख’ सारखा, या व्यवस्थेत कायमस्वरूपी मरत असतो
…. आयुष्यभर,
कधी ‘जिंदाबाद’, कधी ‘भाऊ तुम आगे बढो’.. अशा घोषणा देण्यातच निघून जाते आयुष्य.
शेतकरी, शेतमजूर, तसेच बेरोजगार यांचे प्रश्न सामान्य माणसाला कायमस्वरूपी गिळत असतात
.. तरी सुद्धा, सत्ता केवळ आश्वासनाच्या घोषणा वाटत असते.. दररोज?
पिढी दर पिढी हा संघर्ष असाच सुरू असतोच.
मला वाटते की सामान्य माणसाला मुळ प्रश्नापासून दूर करण्यासाठी सत्ता आणि व्यवस्था पद्धतशीरपणे राबविली जाते..
हे मात्र खरे आहे?
सात बारा कोरा होणार आहे?
कोण खरा? कोण खोटा?
. काहीही समजत नाही
– – तरीही ते म्हणतात ‘ देशात लोकशाही आहे.’…
☆
© श्री विष्णू सोळंके
काव्य संध्या, मुदलियारनगर अमरावती ४४४६०६ – मो ७०२०३००८२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर






