सुश्री संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ आई-वडील म्हणजे ‘शबरी’ नाहीत… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
आई-वडील म्हणजे ‘शबरी’ नाहीत – –
“आई वडिलांना आपल्या मुलांबरोबर ‘शबरी’ सारख वागायची गरज नाही. ” •••••
काल ताईच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून आम्ही सर्व गेलो होतो. आम्हा सर्वांना एकत्र यायला, काही तरी कारणच लागत. कधी तिच्या घरी, कधी माझ्या कडे, नाही तर बाहेर जायचे. दोन चार तास सर्व एकत्र बसले, गप्पा मारल्या, जेवलो, की सर्व Recharge होतात. आमच्या सारख्या ज्येष्ठांसाठी तर ही करमुणकच आहे. या आमच्या जमावडयात चार लहान मुलेही असतात त्यांची हुशारी बघून, मोबाईल चे ज्ञान बघून तर आश्चर्य वाटत. आमचे मोबाईल चे प्रश्न ते सहज सोडवतात. त्यांचे मोबाईल संदर्भातील ज्ञान बघून त्यांची Tuition च लावावी का?? असं मला नेहमी वाटतं. कोणत्याही कारचे चित्र दाखवा लगेच ओळखतात. गम्मत वाटते. ••••
ताईचा नातू ‘अनय ‘ तिसऱ्या वर्गात आहे. ताईने अनयला आवाज दिला, •••• म्हणाली, ••• अरे अनय, आज लिंब आणायची राहूनच गेली. जाऊन आणतोस का??
“आणतो आजी.” असं म्हणून लगेच पिशवी घेऊन अनय तयार झाला. •••
आजी म्हणाली, ••••” अनय, लिंब, कोथींबीर व उदया तुझा डबा आहे ना, मग पाव किलो भेंडी घेऊन ये. ” ••••
अनयने बाबांकडून पैसे घेतले व थोड्यावेळातच सर्व घेऊन आला. •••
अनय म्हणाला, •••••आजी, दोन रुपयाचे एक लिंबू होत, पाच रुपयाला तीन देत होता. म्हणून मी तीन लिंब आणली. ••• भेंडी दुसऱ्या दुकानात चांगली दिसली, म्हणून तेथून अर्धा किलो घेतली. ••••लिंब, कोथिंबीर, भेंडीचा सगळा हिशोब सांगून शंभरातून उरलेले पंचेचाळीस रूपये त्याने बाबांना परत दिले. •••••
त्याचा असा चोख व्यवहार बघून सर्वांना नवलच वाटले. सर्वांनी कौतुक केले. अनय चे व त्याच्या आई बाबांचे. आजी आजोबांचे. •••
अरे व्वा!!! कौतुक आहे. पूर्ण काम अगदी चोख केले. व्यवहार ज्ञान छान आहे. •••••
अजय म्हणाला ••••हो!! आम्ही त्याला छोट्या मोठ्या कामांसाठी बाहेर पाठवतो. पैसे हातात देतो. सुरवातीला गडबड व्हायची. एकदा पैसे दिले, आणि भाजी घ्यायला विसरला. एकदा जास्त पैसे दिले व उरलेले पैसे घ्यायला विसरला. आता मात्र व्यवस्थित काम करतो. ••••
आम्ही त्याच्या फीस चे पैसे पण त्याला देतो. पैसे सांभाळून नेणे, जमा करणे, रसीद चेक करून घेणे म्हणजे रसीदवरील amount, date, सही सर्व चेक करणे व घरी येऊन फाईल मधे व्यवस्थित ठेवतो. ••••
वेगवेगळे अनुभव आले, घटना घडल्या. त्यावरून आम्ही त्याला शिकवत गेलो.. योग्य सरळ रस्ता दाखवत गेलो. अभ्यास नोकरी हे तर होईलच. परंतु सर्व साधारण काम करता आली पाहिजेत. व्यवहार ज्ञान असले पाहिजे. ••••
धोका लहानपणी मिळाला तर त्याचे प्रमाणही कमी राहील. पण अनुभव नेहमी साठी होईल. सतर्कता वाढेल. •••
सुरवातीला एकदा पन्नास रुपये त्याच्या हातुन पडले, हरवले. मी पुन्हा त्याला पन्नास रुपये दिले, व तेच काम करायला सांगितले. त्यानंतर मात्र त्याने कधीच पैसे हरविले नाही. पन्नास रुपयात ही शिकवण मिळाली त्याला. खूप झालं. ••••
पैशाचे व्यवहार आलेच पाहिजे. उगीच कोणाचे जास्तीचे पैसे ठेवायचे नाही. आपले पैसे बरोबर परत घ्यायचे. हे शिकणे गरजेचे आहे. हा सर्व सवयींचा भाग आहे. एकदा का चांगल्या सवयी लागल्या तर पूढे प्रोब्लेम्स येत नाही. घरातील सदस्यांचा आपापसात संवाद असला तर मुलं खूप गोष्टी सहज शिकतात. चांगल्या गोष्टी शिकविणे हे आपल्यावरच अवलंबून आहे. ••••
माझ्या मते अभ्यासात दोन मार्क्स कमी चालतील, पण जनरल स्मार्टनेस
पाहिजे. या जगात फूकट काहीच मिळत नाही. जेथे फूकट वस्तू दयायची लालच दाखविली जाते. म्हणजे कुठे तरी काही तरी शिजतंय. हे ही कळलच पाहिजे. फूकटच्या जाळ्यात अडकायचे नाही. कोणी कशाला तुम्हाला उगीच काही फ्री मधे देईल??
There is no free lunch anywhere. आणि दुसऱ्यांच्या पैशावर नजर का असावी?? जसा माझा पैसा महत्वाचा, तसाच त्याचा पण महत्त्वाचाच आहे. ही समज ठेवावी. फूकट मिळेल, लॉटरी लागेल, येथे पैसे ठेवले तर खूप जास्त intetest मिळेल. ही इच्छा जेंव्हा तुमच्या मनात येते, म्हणजेच तुम्ही भवऱ्यात फसत आहात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. अशी किती तरी उदाहरण आपण रोज ऐकतो / बघतो. चांगली शिकलेली माणसं या जाळ्यात फसतात. •••
सवयी चांगल्या असल्या, तुमचे स्वतः चे काही प्रिंसिपल्स लहानपणापासून मनात कोरले गेले, तर तुम्ही उगीच भानगडीत पडत नाहीं. सरळ विचार करता येतो. ताठ मानेने जगता येत. काल मी मोबाईल विकत घ्यायला गेलो. महागडा मोबाईल त्याने दाखवला व म्हणाला साहेब लोनवर घेऊ शकता. लगेच अनय म्हणाला, ••••
” बाबा घ्या ना, ••••
मला चान्स मिळाला, त्याला लगेच समजाविले. अरे!! उगीच लोनवर कशाला घ्यायचे?? महागडा मोबाईल काही जरूरी वस्तू नाही. तेंव्हा लोन अगदी आवश्यक गरजेसाठी घ्यायचे असते. उगीच नाही?? •••••
पैसे कमविणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच पैसे सांभाळणे, वाचविणे हेही महत्वाचे.
आपल्या मुलांचे पूढचे आयुष्य लक्षात घेऊन त्यांना तयार करायचे आहे. ••••
स्पून फिडींग नकोच. ••••
आई वडिलांनी ‘शबरी ‘सारखे वागायची गरज नाही. शबरी ने प्रत्त्येक बोर चेक करून रामाला खायला दिले होते. तसं करायची गरज नाही आपल्याला. त्यांना वेगवेगळे अनुभव यायलाच हवे. आंबट, खारट ची चवही मिळालीच पाहिजे. जेवढी लवकर मिळेल तेवढं चांगलं. ••••
असं केल्याने पूढे धोका होणारच नाही, असं नाही. पण तरी मुलं सावध राहतील. येणाऱ्या काळात धोका देण्याचे नवनवीन प्रकार निघतीलच. सतर्क राहणे. लक्ष देऊन काम करणे हे शिक्षण कामास येईल. ••••
म्हणतात ना, ••••
“सावधानी हटी दुर्घटना घटी ।” ••••
शारीरिक, मानसिक ताकद किती ही असली तरी महत्वाचा असतो तो लगाम. स्वतः वर. मग तो मानसिक असो नाही तर शारीरिक. वेळेवर लगाम लावता आला पाहिजे. शिक्षण म्हणजे एक डिग्रीचा कागद असतो. खरे शिक्षण तर अनुभवातूनच मिळते. ••••
आपली प्रतिमा निर्माण करणं हे तुमच्या हातात असतं. आपले व दुसऱ्यांचे अनुभव बघून /ऐकून चांगले व बरोबर निर्णय घेता येतात. ••••
म्हणतात ना, •••
“आपका शांत और स्थिर दिमाग, आपके जीवन की प्रत्येक लड़ाई का ब्रह्मास्त्र हैं।” ••••
“Quality of life is never an accident. It is the result of your thoughts, habits, intentions, hard work, choices, and most importantly your attitude.” ••••
© सुश्री संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






