संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “द्वंद्व मनातले.. ☆ संध्या बेडेकर ☆

हो की नाही ?? बरोबर की चूक ??

योग्य वर्तन की अयोग्य वर्तन ?? खूपदा हे द्वंद्व आपली परीक्षा घेत असत.

आज सकाळी आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी म्हणाल्या.

काकू माझ्या जावेची आई वारली हो.

मी म्हटलं,

अरे !! हो का ? मग तुम्ही गेल्या नाही. का बरं ? 

 मला या लोकांचं खूप कौतुक वाटतं 

ही मंडळी नातीगोती आपल्या पेक्षा जास्त छान सांभाळतात.

माहेरी सासरी कोणताही कार्यक्रम असो, या बस चां प्रवास करून तेथे नक्की जाणार. आज पाऊस आहे, ऊन आहे असे प्रश्न यांना पडत नाहीत बहुतेक.

बरं ! असंही नाही की त्या दिवशी त्या कामाला येणार नाही. पायी चालत येणे, काम करणे, पुन्हा घरी पायी जाऊन, बसने दोन तासांचा प्रवास करून, तेथून पुन्हा पायी चालत कधी कधी तर भर चिखलात चालून त्या तेथे पोहचतात.

कौतुक आहे. नाही का ?? 

आपल्या सारखं (म्हणजे मी माझ्या बद्दल बोलतेय) नाही की आपल्या सोयीनुसार आपण जातो किंवा फोन करून आपलं कर्तव्य पार पाडतो.

असं म्हणतात,

एकवेळ सुखात सहभागी झालं नाही तरी चालेल, पण दुःखात माणसाने जरूर जावे, आधार द्यावा.

मावशी म्हणाल्या,

काकू ! जायला तर हवं होत हो, पण मी नाही गेले. त्या पूढे म्हणाल्या,

काल पूर्ण दिवस याच विचारात गेला. एक मन म्हणतं होत जायला पाहिजे, तर दुसरं मन जून्या घटनेची सारखी आठवण करून देत होतं.

 काकू!! दोन वर्षांपूर्वी माझे आई वडील दोघेही गेले, पण या माझ्या जावेने एकदाही विचारलं नाही. साधी चौकशी ही केली नाही. आता आमची लोक पण फोन वगैरे करतातच की. पण एक फोन सुद्धा केला नाही हो.

न येण्याचे खोटे कारणही सांगितले नाही.

फक्त पाऊस पडला की भात लावायला ये असा फोन न चूकता करतात.

 काकू! श्रीमंतीचा भारी माज आहे तिला. हेच जर एखाद्या श्रीमंत घरात घडलं असतं, तर लगेच धावत गेले असते.

बरं! हे असं वागणं काही पहिल्यांदाचच आहे, असं नाही.

मी बरोबर नक्कीच वागले नाही, पण त्यांना त्यांच्या वागण्याची जाणीव केंव्हा होईल ? 

 काल मी देवाची माफी सुद्धा मागितली.

म्हंटल,

देवा !! आजचे दोन नंबर कापून घे बाबा. पण यावेळी मी असंच वागणार. या दोन नंबरची भरपाई मी कधी तरी करेन.

 गरीबांच्या घरचे मरण म्हणजे मरण नाही का ? काहीच संवेदनशील घटना नाही का ?? 

प्रत्येक वेळेस यांची श्रीमंती महत्वाची, कौतुकाची का ?? 

खरं तर त्यांच्या आईचा काहीच दोष नाही हो यात, पण मी गेले नाही.

माझ्या लक्षात आलं,

हा श्रीमंतीचा रोग समाजातील प्रत्येक पातळीवर आहे.

या रोगाने पछाडलेल्या लोकांची जमात सर्व ठिकाणी आढळते.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक बरेच असतात.

तसं मला मावशीचे म्हणणे पटले. अगदी सहज सुलभ प्रत्येकाच्या मनात येणारे हे विचार आहेत.

असे प्रसंग आपल्याला दुविधेत टाकतात. आपली चूक कळत असते, पण झालेला अपमानही लक्षात असतोच ना.

योग्य वर्तन विरुद्ध (×) अयोग्य वर्तन या मध्ये खडाजंगी युद्ध चालू असत.

 आपलेच प्रश्न ? त्यावर आपणच दिलेली उत्तरे, नंतर उत्तरांचे विश्लेषण. यांचे जणू पारायण सुरु असते. एका विचारांवर थांबल्या नंतर पुन्हा थोड्या वेळाने तीच सायकल सुरू होते.

हो. की. नाही ???

 यापैकी एकावर येऊन गाडी काही लवकर थांबत नाही. असं किती तरी वेळ / कधी कधी तर बरेच दिवस हा खेळ मनात चालू असतो. यावेळी अनेक वाचलेले सुविचार ही आठवतात.

 कोणी कसं वागावं ? हे आपल्या हातात नाही. पण आपण नेहमी व्यवस्थित वागावं ना.

असं वागल्याने खरंतर ते स्वतःचाच अपमान करतात. आपला कुठे झाला ?

 असे एक ना अनेक विचार मध्ये मध्ये लुडबुड करतात. आपला निर्णय बदलण्याचा प्रयत्न करतात 

पण का ? का म्हणून नेहमी ऐकायचं ? सहन करायचं ? त्यांचे ऐकत राहिले तर समोरच्या ची हिम्मत वाढते. आपण काहीही करू शकतो, कसेही वागू शकतो, असा त्यांचा समज कधीतरी दूर केलाच पाहिजे.

They should not take us for granted.

बरं एवढं करून श्रीमंत म्हणजे असे काही गडगंज वगैरे नाही. आणि असले तरी त्यांच्या दाराशी आम्ही उभे आहोत का ?? 

मोठी कार, डोळ्यांवर मोठा गॉगल्स, हातात मोठा मोबाईल, मग तो आय फोन असेल तर अजून स्मार्ट, अजून श्रीमंत समजून वागणारे लोक आजूबाजूला बरेच दिसतात.

दोन चार वाक्य इंग्रजीचे बोलता आले तर श्रीमंतीत अजून दोन डिग्री ची वाढ.

 हीच श्रीमंती, हाच स्मार्टनेस बस. बाकी कांक्रीट असं काही दिसत नाही त्यांच्यात.

खरं तर 

Making other people feel small, doesn’t make you big.

अशा लोकांशी वागायची आपली एक पॉलिसी आपल्यालाच तयार करायची असते.

 माझं माझं मी ठरवलंय. अगदी पहिल्या च अनुभवावरून नाही, पण जर असं वागणं नेहमीचच झालं तर, मग मात्र काही तरी ठरवावच लागत. त्यावेळी 

I follow the Principle.

Forget the past but Remember the lesson.

Moral in my life is very simple.

You treat me good, I will definitely treat you better.

कधी कधी आपल्याला आपल्याच वागण्याचे कारण लक्षात येत. की 

We have reduced communication to the people we love, not because we hate them but because they make us feel like, we are nothing to them.

चांगले संबंध नक्कीच असावेत, पण ती काय एकाच पार्टीची जबाबदारी असते का ??

I follow these principles in my life.

मावशीचे बोलणे ऐकून, मी आपल्याच विचारात दंग होते.

मावशींच्या बोलण्याने पुन्हा भानावर आले.

त्या विचारत होत्या,

काकू !! मी बरोबर बोलतेय का ? माझ वागणं एकदम चूकच आहे का ? 

आता काय उत्तर द्यावं ?? कळेना मला.

मी म्हटलं,

“कुसुम ताई कोणावर एवढं नाराज होऊ नका. ” त्याच महत्व आपल्या आयुष्यात कमी करा. पण या अशा प्रसंगी जाऊन या.

तुम्हालाच बरं वाटेल.

नाहीतर तुमच मन तुम्हाला खात राहील.

 शैवटी मला माझंच कौतुक वाटलं. समाधान मिळाल.

चांगले बरोबर विचारांनी चूक अयोग्य वर्तनावर मात केली.

म्हणतात ना,

Be a good person but do not waste time to prove it.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted