संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “फक्त समजून घेता यायला हवं…“ ☆ संध्या बेडेकर ☆
Life is a balance of holding on and letting go
आपण नेहमी ऐकतो वाचतो की वर्तमान काळात जगावं. भूतकाळ म्हणजे जे घडायचे होत ते घडून गेलं. चांगलं वाईट, नमकीन खटठा मीठा सर्व स्वाद चाखायला मिळाले. तरी भूतकाळ अगदी भूतासारखा मागे लागलेलाच असतो. त्याला कितीदा सांगितलं अरे बाबा!!
“Pl do not knock at my door, I do not have anything new to tell you. ”
सर्व माहित असून सुद्धा पुन्हा पुन्हा त्रास द्यायला मागेच असतो.
मी आता तुला (भूतकाळ) मागे सोडलय.
हे नक्की की भूतकाळात घडलेल्या घटना, आपण घेतलेले निर्णय, माणसांचे खरे चेहरे, यावरून मी खूप शिकले आणि आता बऱ्यापैकी हुशार झाले आहे.
Life is a balance of holding on and letting go.
आयुष्यात खूप अनुभव आले. खूपदा हेच कळत नाही की सरळ उभ रहाव की थोडं तिरकच , कारण तिरक ऊभ राहिल्याशिवाय काही लोक सरळ उभे रहात नाही. हे कळलय. कधी कधी आपले मत मांडणे ही गरजेचे असते. नाही तर भोवऱ्यात अडकायला होत.
आयुष्याच्या परीक्षेपेक्षा शाळेची परीक्षा सोपी होती.
तेंव्हा एक सिलेबस तरी असायचा.
आपण कोणत्या वर्गात आहोत. हे माहीत असायचे. परीक्षा झाली की पास की फेल हेही कळायचे.
म्हणजे असं म्हणावस वाटतं
शाळेतला अभ्यासाचा आयुष्यात तसा काही फारसा उपयोग होत नाहीं. तो अभ्यास फक्त डिग्री मिळविण्यापूरताच असतो. मी पदवीधर आहे. हे जगाला सांगायला. बाकी अभ्यासाची हुशारी आयुष्यात उपयोगात येत नाही. कारण येथे कोणताही एक नियम नसतो जो Universal नियम म्हणता येईल. येथे परिस्थीती प्रमाणे नियम बदलतात. येथे चेहरा बघून, गरजेप्रमाणे लोक बदलतात म्हणून नियमही बदलतात..
“एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. ”
पायथागोरस चे प्रमेय किंवा न्युटन चे नियम काही आयुष्यात लागू पडत नाहीत.
आता आपण नेहमी चांगल वागावं हा आयुष्यातील एक नियम आहे,
न्युटनच्या नियमाप्रमाणे
Every action has equal and opposite reaction.
पण त्या नुसार तसं काही आयुष्यात घडत नाही. चांगल्या वागण्याचे परिणाम नेहमीच चांगले मिळतात असं नाही. चांगल्या वागण्याने लोक बुद्धू समजतात. They take you for granted. म्हणजे खूप दा तर असं वाटतं
आपल status Fill in the Blank सारखं आहे. म्हणजे,
वेळ आल्यावर/ गरज पडल्यावर लोक जसं कावळ्याला ही मानाने बोलावतात ना तसंच काहीसं वाटतं.
म्हणजे असं म्हणावस वाटतं,
जिंदगी इन लोगों के नखरों से बेहतर तो स्कूल की किताबें थी, जो देर से ही सही लेकिन समझ में तो आ जाती थी।
येथे माणसं समजतच नाहीत.
चांगुलपणा असण चांगलंच आहे. पण त्या बरोबर तितकच सजग सावध डोळसही असायला हवे.
आता वयानुसार, अनुभवावरून बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या.
कोणी आपल्याला सोडून जातंय तर जाऊ दे. का?? कशाला? काय झालं?? वगैरे विचारायच नाही. त्यात वेळ घालवायचा नाही.
हे असं वागणं म्हणजे माझा घमंड, गुरूर नाही, मी सर्वांना आवडली पाहिजे असा माझा हट्टही नाही. कधी नव्हताच.
People pleasing च्या चक्रात फसायचंच नाही.
What people think about me is not important for me, What I think about myself means a lot for me.
लोक असं का वागतात? याच दुःख आता मला होत नाही. फक्त वाईट याच वाटतं हे सर्व समजेपर्यंत माझं अर्ध्याहून अधिक आयुष्य संपल. याच दुःख जास्त होतंय.
आता वयानुसार विचारांची range वाढली. एकाच ठिकाणी पोहचण्याचे अनेक मार्ग असतात, त्याचप्रमाणे एकाच गोष्टीला बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. हे कळलय.
सर्वांबरोबर आपले विचार जुळणे शक्यच नाही. बेमेल विचारांना ही समजून घेता आले पाहिजे. हे कळलय.
खरी परिस्थिती ही आहे की
जब तक जिंदगी के रास्ते समझे में आते हैं तब तक लौटने का वक्त हो जाता हैं ।
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



