संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ “मेरा वाला ऐसा नहीं हैं!” ☆ संध्या बेडेकर ☆

काल देशमुख परिवार थोडा disturbed च होता. कारण कालच पल्लवी ने सर्वांना प्रतीक बद्दल माहिती सांगितली. प्रतिक सिंह तिच्या च कंपनीत काम करणारा तिचाच कलीग. उत्तर भारतीय, हिंदी भाषी.

साधारण सहा महिनेच झाले असतील, दोघे बरोबर काम करतायेत. दोघांची ओळख होऊन. एकाच प्रोजेक्टवर रोज आठ दहा तास काम करतात, त्यामुळे ओळख मैत्रीत व मैत्री प्रेमात झाली. गोष्टी लग्न करण्यापर्यंत पोहचल्या.

पल्लवी ने आई बाबांना याबाबत सांगितले.

तसे आजकाल अशा सर्व गोष्टी म्हणजे नवीन, वेगळं असं काही वाटत नाही. दुसऱ्यांच्या बाबतीत आपण ऐकून,

 हो का!! असं म्हणून लगेच थांबतो. आणि काही वेळानंतर विसरतोही. परंतु तीच गोष्ट आपल्या घरात जेंव्हा ऐकतो, तेंव्हा स्तब्ध होतो. क्षणभर आपण ऐकलेली गोष्ट खरी का?

हा विचार येतो, त्या मागोमाग अनेक प्रश्न डोक्यात येतात. त्या प्रश्नांमध्ये भीती, आश्चर्य, शंका कुशंका असतात. अस्वस्थता असते. काल्पनिक सुनामी येते. आजूबाजूला घडलेली अनेक intercaste marriages लक्षात येतात. अनेक चांगल्या पेक्षा वाईट बातम्या पुन्हा पुन्हा आठवतात. अनेक प्रश्न त्याची अनेक उत्तर मनात येतात. टीव्ही वरही या संदर्भातील अनेक बातम्या आपणं ऐकतो. फसवाफसवी ची किती तरी उदाहरण वर्तमानपत्रात वाचतो. आता तर अशा बातम्यांना ऊत आला आहे की काय? ? असं वाटतं.

 जेंव्हा आपल्यावर वेळ येते तेंव्हा जीव घाबरतो. तेंव्हा स्वतः लाच समजावयाचे, स्वतः लाच सांगायचे की आजकाल तर हे सहज घडतंय. मग मी एवढी अस्वस्थ का होतेय? ? आपण शोधलेला मुलगा चांगलाच असेल कशावरून? कोणाच्या चेहऱ्यावर काही लिहिलं असतं का? आणि

 महाराष्ट्रातला चांगला आणि दुसरी भाषा बोलणारा असला तरी पण मुलगा च आहे ना.

आता हा प्रतीक सिंह ही चांगला असूच शकतो ना.

चांगला शिकलेला तर आहेच. नोकरी पण चांगलीच आहे. पल्लवी ने काही तरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना.

फक्त थोडी घाई करतेय का? सहा महिने काळ एखाद्या ला समजायला पूरेसा आहे का? ? तसं ३६ गुण मिळालेल जोडपं पण आयुष्य भर आनंदाने संसार करतातच असं नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत स्वभावाचे वेगवेगळे रंग नेहमी दिसतच असतात.

वगैरे वगैरे.

आपणही जो मुलगा शोधणार आहोत / होतो, तो पण नवीनच असेल ना.

घरातील आई पदावर बसलेली व्यक्ती जास्त अस्वस्थ होते.

पल्लवी ने प्रतीक बद्दल सांगायला सुरुवात केली.

पल्लवी म्हणाली,

 आई बाबा!! तो हुषार आहे. कॉलेज चा Topper होता. त्यांचे future bright आहे. त्याचे बाबा सरकारी नोकरीत आहेत. आई बॅंकेत नोकरीला आहे. एक बहिण आहे. तिचे लग्न झाले आहे. आपल्या सारखाच मध्यम परिस्थिती चा परिवार असावा बहुतेक.

बाबा म्हणाले,

अग?! आपण श्रीमंत मुलांच्या शोधात तसाही प्रयत्न करत नव्हतोच. तो प्रश्नच नाही.

Intercaste marriages लाही आमचा विरोध नाहीच.

फक्त प्रतीक हुषार बरोबर शहाणा आहे का? हे महत्वाचे.

अग! कॉलेज मध्ये टॉप करायला हुषारी लागते पण जोडीदारा बरोबर समाधानी आनंदी आयुष्य काढायला शहाणपण लागत. येथे IQ पेक्षा EQ महत्वाचा असतो.. लग्नाबद्दल त्यांचे विचार मला समजून घ्यायचे आहेत. कारण 

लग्न करणे आणि संसार करणे म्हणजेच 

Wedding आणि marriage दोन्हीत खूप अंतर आहे. Wedding नंतर दुसऱ्याच दिवशी पासून संसार सुरू होतो.

 तसं बघितलं तर लग्न म्हणजे एक दिवसाचा सोहळा आहे. पण marriage म्हणजे पूर्ण आयुष्य भराचा साथ, सहवास commitment आहे. त्यात विश्वास असावा लागतो, भीती नाही. शाश्वती असावी, अनिश्चितता नाही.

जमलं तर जमलं नाही तर ड्रायव्हर्स हे option आहेच. अस नको.

 माझ्या मते या विचाराला तर स्थान नाहींच.

तू नही तो और सही. हा असा विचारही नसावा.

लग्न म्हणजे emotional connection.

तुम्ही कार्पोरेट मध्ये काम करणारी मुलं आमच्या पेक्षा खूप स्मार्ट, हुषार, प्रॅक्टीकल आहात. academics, knowledge, professionally हिशोब करण्यात एक नंबर आहात. इतर गोष्टीतही perfect असता.

 Pre wedding shoot पासून संगीत, मेहंदी and what not सर्व नवीन रितीरिवाज जीव ओतून पार पाडता. पण Pre wedding responsibilities, pre wedding training, pre wedding coaching, marriage concept हा विषय समजून घेणे जास्त आवश्यक आहे.

 मला हा प्रश्न आजच्या २५ ते ४० वयोगटाच्या सर्व मुलांनाच विचारायचा आहे.

Wedding च्या दुसऱ्या दिवशी पासून संसार सुरू होतो. नातं कसं सांभाळायचं? ? हे दोघांनाही समजावं लागेल, शिकावं लागेल.

नात्यातला जिव्हाळा मोजमाप करायला कोणतंही मशीन नाही किंवा स्केलपट्टी, तराजू नाही, तो वागण्या बोलण्यात जाणवला पाहिजे.

ते काय होऊन जाईल असं म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.

लग्नानंतर togetherness ची भावना असावी.

 हे साध गणित आहे की दोन वेगवेगळ्या घरातील मुलगा मुलगी एकत्र रहायला सुरुवात करतात. संस्कार वेगळे, सवयी खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या. विचार करायची, खर्च करायची पद्धत वेगळी, मग एकत्र रहायला लागल्यानंतर हुषारी बरोबर शहाणपण पण लागतच.

कुठे, काय, किती बोलायच? ? बोलायचं की नाही? हे शिकावं लागतं. संयंम लागतो. त्यात दोन चार वर्ष सहज निघून जातात. तेवढा patience ठेवायला हवा. दोन्ही कडचे आई वडील महत्वाचेच, त्यांचा हात सोडायचा नाहीच पण तुम्ही दोघांनी दोन्ही हात घट्ट पकडून ठेवणे. येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा सामना करणे, चर्चा करून एकमताने निर्णय घेणे. मग ती कोणतीही छोटी मोठी गोष्ट असो. कोणी दुसऱ्यां व्यक्तींच्या बोलण्याचा तुमच्या वर किती प्रभाव पडतो? ? हा पण महत्वाचा मुद्दा आहे.

कारण कोणाच्या ही बोलण्याचा स्वतः वर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने कमजोर असते. थोडक्यात कच्च्या कानाचे नसावे.

 दोघांनी एकमेकांच्या मान ठेवणे, एकमेकांना सांभाळणे, आपले प्रश्न दोघांमध्येच सोडविणे हे महत्वाचे. म्हणजे पल्लवी तुझ्या आईने सूद्धा तुमच्या मध्ये मध्ये केलेले मला आवडणार नाही. चालणार तर अजिबात नाही.

 म्हणून प्रतीक ला समजून घे.

मी माझ्यापरीने चौकशी करणारच आहे.

प्रतीक चांगला असेलही. पण मला माझी जबाबदारी व्यवस्थीत पूर्ण करायची आहे. खात्री करून घ्यावी लागेल.

पल्लवी म्हणाली, बाबा! तो खरच चांगला आहे. इतर मुलांसारखा नाही.

बाबा म्हणाले,

अग!! हो तो चांगला असेलही. चेहरा नेहमी भोळाच असतो ग. चेहऱ्याला बघून काय कळते? मनातलं कळत का? ? माणसाचा खरा स्वभाव विपरीत परिस्थितीत, राग आल्यावर कळतो. या परिस्थितीत प्रत्येक मुलीला 

मेरा वाला वैसा नहीं हैं । वो बहुत अच्छा हैं ।

असच वाटत.

चौकशी करण गरजेचे आहे ग।

 अग!! तुम्ही भेटत रहा. त्याला घरी घेऊन ये. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.

अजून थोडा वेळ घ्या. घाई करू नका. स्वतः बद्दल मोकळेपणाने बोला. फक्त स्वतः चे चांगले गुणच नाही तर वाईट गुणांची, आवडी निवडी बद्दलही चर्चा करा.

 हं! अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यावर चर्चा करा. ती म्हणजे तुम्ही दोघे professionals आहात. दोघांच्या नोकरीत ups and downs येतील. कधी तू पूढे असशील तर कधी तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी दोन पावले मागे पण घ्यावी लागतील. तेंव्हा तुमचा ego मध्ये यायला नको. या सर्व गोष्टी लक्षात घ्या.

जीवनाची सुरुवात करताना दमदार पाऊल पडलं पाहिजे.

त्यात विश्वास, आधार, आपुलकी, सहनशीलता, एकमेकांबद्दल आदर सन्मान असावा. तेंव्हा च आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला धैर्याने तोंड देणे जमेल 

Boy friend आणि girl friend चे casual relationship नसाव. तर त्यात commitment असावं लागतं. Dating करताना आपल्या values, boundaries लक्षात असू द्याव्यात.

 हे माझे सद्य परिस्थिती बघता अनुभवाचे बोल आहेत.

पल्लवी तुझ्या मतांचा, मी मान ठेवतो. कोणतेही चूकीचे पाऊल तू उचलणार नाही याची खात्री आहे मला.

सर्व व्यवस्थित होईल.

प्रतीक ला घरी घेऊन ये. आपण त्यांच्या घरी पण जाऊ. भरपूर गप्पा करू. एकमेकांना समजायचा वेळ देऊ आणि घेऊ.

 

म्हणतात ना,

Alone you can attack, together you have powerful defence.

Alone you can win the match, together you can win the tournament.

 आयुष्याची Tournament जिंकायला, नेहमी एकत्र असणं, एकमेकांना समजण आवश्यक आहे.

तेंव्हा बाबा बरोबर म्हणातायेत,

 मेरा वाला वैसा नहीं हैं,

अस म्हणून घाई करू नये.

हेच बरोबर आहे.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted