सुश्री संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ सध्या मी स्वतः बरोबरच गप्पा मारण्यात रमते… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
या एक दीड वर्षात सगळंच बदललय. कुठे जाणे नाही, आणि कोणी घरी येत नाही. ज्या काही गप्पा रंगतात त्या फक्त फोनवरच.
पूर्वी बाहेर जाणे होत असे. रिटायरमेंट नंतर भरपूर रिकामा वेळ मिळाला. मी नोकरी करत असल्याने कधी सुट्टी मिळाली, की घरचीच पेंडिंग कामे होत असतं. किंवा काही आवश्यक कामे त्या दिवशी करायची. हाच परिपाठ जवळ जवळ तीस वर्षे सुरू होता. •••
नोकरी पूर्ण झाल्यावर ठरवलंच होत, आता ते सर्व करायचे, जे कधी मनात असूनही वेळेअभावी करता आले नाही. आम्ही पुण्यात स्थायिक झालो. योग वर्ग सुरू केला. दोन भिशी सुरू झाल्या. वाचक मंच, जेष्ठ नागरिक संघ. नाटक, गाण्याच्या मैफली exhibitions वगैरे वगैरे. एकंदरीत पुण्याच्या कल्चर मधे मी रंगून गेले. सर्व मैत्रिणी मिळून बाहेर जेवायला जाणे. ‘TTMM ‘ प्रमाणे खर्च करणे. एक दोन दिवसांची पावसाळी, हिवाळी ट्रीप काढणे. त्यामुळे वेळ कमीच पडत होता. कधी डोहाळजेवण तर कधी हळदीकुंकू. जेमतेम घरची कामे करणे व नंतर कुठेतरी भटकंती असायचीच. आठवड्यातून दोन तीन दिवस जरी असा काही प्रोग्रम झाला की बाकी दिवस आराम करण्यात जात असत. एकंदरीत मी खूप बिझी असायची. म्हणजे ‘ ‘Busy without Business’ म्हंटल तरी चालेल. •••••
आता मात्र सर्व एकदम बदललंय.
आता घर एक घर. या खोलीतून त्या खोलीत एवढीच भटकंती. बोलायला घरी आम्ही दोघेच. या दरम्यान बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. मला माझ्या घराची नव्याने ओळख झाली. आपल्या घरात किती अनावश्यक गोष्टी आहेत. कुठे काय ठेवलं आहे? किती तरी गोष्टी आत दडपून ठेवल्या आहेत. त्यांना कधी वापरल्याचे आठवत नाही. जावई येईल तेंव्हा हा सेट काढूया. जावई आहेत अमेरिकेत. ते केंव्हा येणार?? माहीत नाही. ते सेट कित्तेक दिवस वापरलेच जात नाहीत. •••
घरात लक्ष द्यायला वेळ मिळाला, तर अनेक गोष्टी कळल्या. स्वच्छता वाढली. अडगळ कमी केली. अनावश्यक गोष्टी फेकल्या गेल्या, किंवा दिल्या गेल्या. म्हणजे थोडक्यात बाहेर फिरण्याच्या नादात जी कामे साचलेली होती ती पूर्ण केली. घरात वस्तू असूनही किती तरी वस्तू उगीच घेतल्या. कारण वेळेवर कधी त्या दिसल्याच नाहीत. आता वयामानाप्रमाणे विसर पडणे होणारच आहे. तेंव्हा प्रत्त्येक गोष्ट योग्य जागी व्यवस्थित ठेवली. लिस्ट लिहून ठेवल्या. आता वेळ छान जाऊ लागला. नव्याने घर लावण्याचा आनंद मिळला. ••••
हे सर्व करताना मला एक नवीन मैत्रिण मिळाली. ••••
‘तीच ती, माझीच मी’
जी नेहमीच माझ्या बरोबर होती. पण इतरांशी गप्पा मारण्यात तिच्याशी बोलायला वेळच मिळत नव्हता. गप्पा मारल्या तरी वरवरचं गप्पा होत असत. आता मात्र तिच्याशिवाय माझे पान हालत नाही. खूप गप्पा मारतो आम्ही. काही वेळ काळ बघावा लागत नाही. कपडे बदला, मेकअप करा. काही भानगडीच नाही. हा माझा नवीन छंद मला खूप आवडतोय. आता ती मला खूप गोष्टी सूचवते. नवीन आयडिया देते. किती तरी कामांची आठवण करून दिली तिने. तिच्या नवीन कल्पना मला खूप आवडतात. ••••
मनसोक्त गप्पा मारणे. चर्चा करणे चालूच असते आमचे. वेळ छान जातो मन हलकं होतं. एक तर लपवाछपवी नाही. हे सांगू की नको. ती काय म्हणेल?? हसेल का माझ्यावर.??? या भानगडीच नाही. कूठे जायची गरजही नाही. मी बोलायच्या आतच तिला सर्व कळते. प्रत्त्येक गोष्ट छान ‘logically ‘ समजाविते. भावनांच्या आहारी जाऊ देत नाही. विचारांना बरोबर दिशा देते. •••••
किती तरी जूने पारंपरिक पदार्थ तिने करायला सांगितले. अगदी व्यवस्थित रेसिपी सांगितली. काही ही करायच्या आधी तिचे होमवर्क जबरदस्त असते. त्यामुळे सर्व व्यवस्थित पार पडत. मग ते घरातील एखादे काम असो, एखादा पदार्थ करणे असो, नाहीतर कोणाला फोन करणे असो. प्रत्त्येक कार्यात समाधान मिळते. आपल्या क्षमतेनुसार आपण छान केलंय असं वाटतं •••
आठवतातच. काही चांगल्या तर काही वाईट. काहींच्या आठवणीने आजही डोळ्यात पाणी येतं. तेव्हा ती लगेच म्हणते, ••• रडते कशाला?? तेंव्हा तुझीच चूक होती?? एवढ्या ‘अपेक्षा’ ठेवशील तर असेच होईल. ••••इतकं कोणाच्या म्हणण्यात येऊ नये. ••••लोकांसमोर किती ‘झुकायचे ‘हे कळलेच पाहिजे. ••••इतकी ‘अकडही’ कामाची नाही. ••••एवढं काही झालं नव्हतं तेंव्हा, तू उगाचच ‘बाऊ’ केला होता. अस नाही की नेहमी रागवतेच, कधी कधी कौतुकाची थाप पण देते. •••••
अग! ! असंच असतं आयुष्यात. कधी आपण जिंकतो तर कधी आपण बरोबर, योग्य असूनही ते आपल्याला मिळत नाही. नोकरीचे अनुभव आहेत ना तुझ्याकडे. मनात यायचाच अवकाश, की तिचे उत्तर तयार. •••••
म्हणायचाच अवकाश की कंबर दुखतेय, •••की लगेच लेक्चर मिळत, ••• सांगितले कोणी होते?? बाथरूम स्वच्छ करायला. झेपत नाही ना मग कशाला करायचे?? जेवढं झेपत तेवढंच करं ना. कोणी येत नाही तुझं घर बघायला. ••••
आता मला घरीच एक Advisor friend, philosopher guide. One in all. मिळाली आहे. मला खूप मजा येते. माझ्या जीवाभावाची मैत्रिण घरीच आहे. ••••
उशीरा का होईना बऱ्याच जून्या गोष्टी नवीन दृष्टीकोनातून स्पष्टपणे तिने दाखविल्या. आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांचा गुंता हळूहळू सूटत होता. मन स्वच्छ होतं होत. इतकी वर्षे उगाच डोक्यावर भार ठेवून जगण्याची चूक कळत होती. वय वाढलं. अनुभव वाढले. घटनांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. या रिकाम्या वेळेत त्याचे संपूर्ण विश्लेशण करायला वेळ मिळाला. व मनसोक्त खुल्या मनाने बोलणे झाले. ••••
“स्वाभिमान व अहंकार मधली पुसटशी रेघ लक्षात आली. “स्वतः चेच गैरसमज दूर झाले. दुसऱ्यांच्या नजरेतून घटना बघता आल्या. •••••
चांगल्या व वाईट विचारांचे “अनुलोम विलोम” करायला शिकले. ••••
मनातलं ओझं कमी करायचे एकमेव विश्वासाचे ठिकाण म्हणजे स्वतः ची स्वतः बरोबर असलेली मैत्री. हे लक्षात आले. गोष्टी समजण्याची योग्य पध्दत शिकायला थोडा वेळ लागतो पण एकदा समजल्या की पूढे आयुष्य सोपे होते. ••••
कठीण काळात नेहमी सर्व वाईटच होत असं नाही. कधी कधी खूप महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो. ••••
मिळालेला हा एकांत माझ्या साठी उपयोगी ठरला. घराचे, विचारांचे सुयोग्य व्यवस्थापन झाले. माणसांची खरी ओळख झाली. माझ्यातल्या माझ्या सखीने याकाळात मला खूप सल्ले दिले. सर्व गोष्टी आमच्या दोघींमध्येच राहिल्या. अनेक प्रश्न सूटले. विचारांचा गुंता सुटला. आयुष्य जास्त सरळ व सोप्पं झाल. मन स्थीर झाल. •••••
आता ठरवलंय सखीला विचारल्या शिवाय काहीही करायचे नाही. ••••
ती नेहमी म्हणते, ••••
अग! ! एखाद्या वटवृक्षा सारखं हो. स्थीर, धीर, गंभीर. लहान सहान गोष्टींना घाबरायच नाही. प्रत्त्येक दिवशी नवीन पालवी फूटू दे. वृक्षाच्या शाखा वाढू दे. कोणाला तरी त्याचा आधार नाही तर सावली मिळु दे.. ••••
म्हणतात ना, •••
‘मन’ से ज्यादा उपजाऊ जगह और कोई नहीं, क्योंकि वहां जो भी कुछ बोया जाए, वह बढ़ता जरूर है । चाहे वह “विचार “हो, “नफरत “हो, या “प्यार” हो ।••••
© सुश्री संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





