संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “कभी हां कभी ना!” ☆ संध्या बेडेकर ☆

काल ताईकडे नातवाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्य मोठा कार्यक्रम होता. तसा आता थोडक्यात कार्यक्रम करायची पद्धत राहिलेली नाहीच. कार्यक्रम कोणताही असो, कार्यक्रम लहानसा असू शकतो पण तो event म्हणून जोरदार पद्धतीने साजरा होतो.

एकतर आता एकच एक चा जमाना आहे ना. म्हणजे मुलगा एक, त्याचे सर्व कार्यक्रम एकदाच, मग त्या मुलाचा मुलगा.. तो पण एकटाच. म्हणून कोणताही कार्यक्रम एकदाच करायचा, त्यामुळे तो event म्हणून करायचा असतो. पैसा भरपूर आहे, जवळचे मित्र मैत्रिणी High status चे मग… त्यांच्या status प्रमाणे करायचे असते. या अशा कार्यक्रमात कधी बायको, तर कधी नवरा दबक्या आवाजात विरोध करत असतो. पण शेवटी एकदाच तर करायचय… अस म्हणत सर्व तामझाम होतोच.

मित्र मैत्रीणिंच्या गृपमध्ये कार्यक्रम करायचा म्हणजे पाकिटावर जरा जास्त भार पडतो. कारण तेंव्हा स्वतःचे social status चा पण विचार असतो / किंवा दाखवायचे पण असते…

 नातेवाईंकासाठी करायचा असेल तर… त्यावेळेस नातेवाईकांचे status बघून कार्यक्रम होतो. Status प्रमाणे मेन्यू ठरतो. कोणाला बोलवायचे? कोणाला नाही? हे ठरत. status प्रमाणे हाॅटेल ठरत. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांकडे लक्ष दिलच पाहिजे, अशी जबाबदारी वगैरे नसते. किंवा कधी कधी तर दुर्लक्ष केल तरी चालत.. कभी हां कभी ना कॅटेगरीतील नातेवाईकही असतातच की.

म्हणजे काही नातेवाईक असे असतात, म्हणजे बोलवाव लागतय म्हणून बोलवलय.

बाकी खूप लक्ष वगैरे द्यायची गरज नसतेच. पण असे लोक जेंव्हा नात कस असाव? या विषयावर बोलतात, तेंव्हा आ हा हा!!!. ऐकत रहावस वाटत. म्हणजे एवढी समज असलेले great च नाही का? म्हणजे मला वाटत राज्य स्तरीय स्पर्धेत या भाषणाला पहिल बक्षीस नक्की मळेल.

 हे लोक आयुष्यात कस वागतात? हे त्यांनाही माहित असत आणि आपल्यालाही. ते अगदीच तस वागत नाहीत, अस म्हणता येणार नाही. काही specific मोजक्या लोकांबरोबर तस वागतात. वेळ पडली तर झुकतात. आपला फायदा लक्षात ठेवून चमचेगीरी पण व्यवस्थित करतात.

शेवटी Status हा एक Issue सध्या खूप महत्वाचा झालाच आहे. दुसर्यांच status तेच ठरवतात.

पैसा बोलता है। म्हणतात ना ते खरच आहे.

 status issue म्हणजे पैसा, मोठ्ठ घर rather बंगला, मोठी कार, आणि मुख्य म्हणजे तो कामाचा आहे का? हे सर्व त्या माणसापेक्षा जास्त महत्वपूर्ण असत. अशा माणसाबरोबर काढलेली Selfie म्हणजे पण एक achievemet च असत. त्या माणसाबद्दल रंगवून रंगवून सांगण, हा त्यांचा छंद असतो.

 कधी बोलवून अपमान होणे, किंवा न बोलवून अपमान करणे ही या so called / self proclaimed high status वाल्यांचे common behavior असत. केंव्हा पलटी मारतील ते सांगता येत नाही.

काल एक so called/ self proclaimed श्रीमंत नातेवाईक भेटले. मागच्याच आठवड्यात त्यांच्या मुलाचे लग्न झाले. या वेळेस आम्ही कभी ना या option category त होतो. आम्हाला म्हणाले… तुम्ही आला नाहीत हो लग्नाला.

 खर म्हणजे ही गोष्ट खूप जूनी विसरण्यासारखी नव्हतीच.

मी आणि ताई एकमेकींकडे बघतच राहिलो. अरे! म्हणजे तुम्ही काहीही करा, चूक आमचीच.

अशा लोकांच काय करायच? समजत नाही.

एकदा वाटत स्पष्ट उत्तर द्याव. हे आपल्याला बुद्धु समजतात बहुतेक.

आपली चूक पण दुसर्यांच्या माथी मारायचा प्रयत्न करतात

We r different. असा समज असणारे हे लोक 

Occasion प्रमाणे this time only few dignitaries r invited. Not everyone. अस सहज वागतात…

ही अशी कभी हां कभी ना. वाली नातेवाईकांची category पण असते बर का…

आपण नाही का? काही वस्तू गरजेनुसार वापरतो, गरज संपली की आपण सहज म्हणतो… आता जरा बाजूला, वर माळ्यावर ठेवा. सध्या आपल्याला यांची गरज नाही ना, मग नंतर जर गरज लागली तर, तेंव्हा बघू. असा विचार करून ती वस्तू बाजूला ठेवतो.

ही वस्तुंची कभी हां कभी ना वाली कॅटेगरी झाली.

तसच माणसांच्या बाबतीत पण असत.

कभी हां, कभी ना.

हे असे equations समजायला वेळ लागतो. एकदा समजल्यावर त्रास होतो. रागही येतो. स्वतःशीच खूप वाद/ संवाद होतात. एका दृष्टीने बर होत. आपल्याला आपली पूढची line of action ठरवायला सोप्प होत. आपल्यालाही कुठे लाईन ओढायची हे ठरविता येत.

समोरच्याला आता आपण नकोय हा विचार मानसिक त्रास देणारा नक्कीच आहे.

उद्या या म्हणतील, तेंव्हा आपण नाही गेलो तर तुम्ही आला नाहीत? का बर?

म्हणजे चित भी मेरी, पट भी मेरी.

या अशा परिस्थितचा आनंद घेणारे/ आग लावणारे पण असतातच की. लगेच कधी कधीच फोन करणारे, पण अशा वेळेस नक्कीच फोन करतात…

हो का? अग बाई! तुम्हाला मेसेज नाही मिळाला का? अस नक्कीच म्हणतील…

वाढत्या वयाबरोबर, अनुभवांवरून बरच काही समजू लागल आहे.

नात सांभाळण ही फक्त एकाच पार्टीची जबाबदारी नाही/ नसते.

हे खरय… At the same time…

You cannot force someone to 

respect you. but you can choose to walk away when they don’t. and that decision can change the direction of your life.

हर तकलीफ से इंसान का दिल दूखता बहुत है। पर हर वह तकलीफ से वो सीखता भी बहुत है।

आजकाल दिवसातून शंभरदा फोनवर डिलीट चे बटन दाबतोच ना. आपण unwanted messages delete कतोच ना.. तसच आपले विचार शांतमनाने फिल्टर करायचे, आणि आपली माणसांची लिस्ट Review करायची आणि जिथे आपल्याला

 value नाही, त्यांना महत्व द्यायची गरज नाही. तेथे डिलीट चे बटन दाबायचे. Option कॅटेगरीत स्वःतला ठेवायचे नाही.

तिथे आपला वेळ एनर्जी, वाया घालवायची गरज नाही. लगेचच आपल्या महत्वाच्या कामांची लिस्ट काढायची आणि त्यावर फोकस करायचे.

Distance is the new and only answer for such people.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted