सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ काळ– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
काळ कुणाला समजत नाही
काळ कोणाचे ऐकत नाही
जरी मिरवले द्रष्टा म्हणुनी
तरी दैवापुढे काही चालत नाही ||
*
कोण चूकीचे कोण बरोबर
कोण चांगले कोण आहे वाईट
येता वेळ निघून जायची
कोणतेच नियम त्याला नाहीत||
*
कोण लहान वा असो कोण मोठा
ज्याचा जेवढा आहे येथे साठा
अंतीम क्षण तो समीप येता
काळा पुढे न चाले हो ताठा||
*
आताचा क्षणच आपला आहे
पुढच्या क्षणाचा नाही भरवसा
जगू हा क्षणच प्रेमाने आनंदाने
आयुष्यावर पाडू स्नेहल कवडसा||
*
म्हणूनच असे जगू या जीवनामध्ये
आहे आपले जीवन जोवर
असुया वाटेल काळाला ही
म्हणेल कदाचित येईन नंतर||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




