शालिनी जोशी
कवितेचा उत्सव
☆ पान ☆ शालिनी जोशी ☆
☆
मांगल्य सांगे आंब्याचा डहाळा
त्याचेच तोरण सण सोहळा
.
तुळशीचे पत्र करी प्रसाद पवित्र
जोडले त्याशी श्रीकृष्ण चरित्र
.
दुर्वा जुड्यांची गणेशाला प्रीती
दाह या देवाचा दूर करिती
.
बेलाचे त्रिदल महादेवा शिरी
विषाचा प्रभाव शांत करी
.
आपट्याचे पान दसऱ्याची शान
मिळे आज त्याला सोन्याचा मान
.
विड्याच्या पानाविण पूजा अपूर्ण
भोजनाची समाप्ती विडा रंगून
.
केळीच्या पानी पक्वानाची रांग
राजाशाही भोजनाचे तेच आंग
.
वर्षप्रतिपदा कडूलिंबा मान
वर्षभर देणारा आरोग्य दान
.
अशी पानांची कथा सांगता
किती सांगावी नाही पूर्णता
☆
© शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
















