मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वासुदेव… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ संसाराच्या रंगपटावर… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

 *

मंचावर येतांना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेवुनी येई नाना वेश ||१||

 *

जगण्याला भूमिका घेवूनी

सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

 *

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधत राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||३||

 *

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||४||

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समर्पण (२)

पांडुरंगाची भक्ती करताना संत तुकाराम भगवंताच्या पायी लीन झाले आहेत, त्यांची देह बुद्धी नष्ट होऊन परमेश्वराशी त्यांनी स्वतःला कसे समर्पित केले आहे याविषयीचे काही अभंग मागील लेखात आपण पाहिले. आज आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.

महाराजांना चोहीकडे एका परमेश्वराचेच रूप दिसत आहे, त्याचाच आवाज त्याला ऐकू येत आहे. ते देवाला म्हणतात…

ध्याईन तुझे रूप/ गाईन तुझे नाम/

आन न करी काम/ जिव्हा मुखे//

पाहिन तुझे पाय/ ठेवीन मी डोई/

पृथक ते काही/ न करी आन//

तुझेचि गुण नाद/ आईकेन कानी/

आणिकांची वाणी/ पुरे आता//

करीन मी सेवा करे/ चालेन मी पायी/

आणिक न वजे ठायी/ तुजविण//

तुका म्हणे जीव/ ठेवीन मी पायी/

आणिक ते काही/ देऊ कवणा//

हे देवा मी सदैव तुझेच रूप माझ्या डोळ्याने पाहत राहीन आणि तुझेच नाम सतत गात राहीन. माझ्या जिभेवर दुसरे काहीच येणार नाही. माझ्या डोळ्यांनी फक्त तुझे पाय मी पाहीन आणि त्यावरच माझे मस्तक ठेवीन.

त्याशिवाय दुसरे काही करणार नाही. तुझे गुणगान ऐकत राहीन, बाकी काही बडबड करणार नाही. तुझ्याकडे पायी चालत येईन आणि या माझ्या हाताने तुझी सेवा करीन. तुला सोडून दुसरीकडे कोठेही मी जाणार नाही. हा माझा जीव तुझ्या चरणी अर्पण करीन. आता दुसऱ्या कुणाला देण्यासाठी माझ्याकडे काही उरले नाही. हरीनामा- व्यतिरिक्त तुकारामांकडे काही नव्हते, ते हरिमय झाले होते.

एका विठू माऊलीला शरण गेल्याने भक्ताचा कसा फायदा होतो ते महाराज या अभंगात सांगत आहेत.

भावे ऐसा नाश/ अवघिया  दिला त्रास/

अविटाचा केला संग / सर्व भोगी पांडुरंग//

आइताच पाक/ संयोगाचा सकळीका/

तुका म्हणे धणी / सीमा राहिली होऊनी//

आज पर्यंत मी दुसऱ्यांना जो काही त्रास दिला असेल आणि त्यामुळे मला जे पाप लागले असेल, ते या पांडुरंगाला शरण गेल्यामुळे आता नष्ट होईल. कारण त्याच्या अवीट भक्तीमुळे मला त्याचा संग लागला आहे आणि माझी सर्व सुखदुःखे तो एक पांडुरंग आता भोगत आहे. तुकाराम महाराजांना हेच सांगायचे आहे की हरिभक्तीत लीन झाल्यामुळे भक्ताला सुखदुःखाची जाणीव राहत नाही. कोणत्याही परिस्थितीत, चांगली अथवा वाईट त्याचा समभाव राहतो.

तुकाराम सांगतात की अन्नाचा दुष्काळ पडला आहे किंवा त्यांना फार भूक लागली आहे म्हणून ते अन्न सेवन करत नाहीत, तर सर्वसाक्षी जनार्दनाचा मान राखण्यासाठी ते भोजन करतात. बालका बरोबर जर ते जेवावयास बसले तर त्यांना असे जाणवते की आमचा पिताच आम्हाला मोठ्या प्रेमाने भरवीत आहे.

चांगली आणि वाईट दोन्ही कर्मे जेथे जळून जातात ते आत्मपद महाराजांना प्राप्त झाले आहे. मी कोणी नसून कर्ता- करविता तोच एक नियंता आहे याची अनुभूती त्यांना आलेली आहे.

तुकारामांच्या मनाची ही अवस्था ते या अभंगातून कशी व्यक्त करत आहेत ते बघा.

जे जे काही करितो देवा/ ते ते सेवा समर्पे//

भेद नाही सर्वात्मना/ नारायणा तुज मज //

आम्ही दुजे नेणो कोणा/ हेचि मना मन साक्ष/

तुका म्हणे जगन्नाथा/ हे अन्यथा नव्हे की//

ते जे जे काही कर्म करतात ते ते सर्व एका नारायणाला समर्पित करायचे या एका मनोभूमीकेतून. सर्वात्मक सर्वेश्वर आणि तुकाराम महाराज स्वतः यात तो आणि मी असा जराही भेद आता राहिलेला नाही. त्यांचे मनच या स्थितीला साक्षी आहे. ते पुन्हा पुन्हा सांगतात, ” हे जगन्नाथा, मी हे जे सांगतो आहे ते पूर्ण सत्य आहे, यात जराही खोटेपणा नाही.”

लोहचुंबकाच्या बळे/ उभे राहिले निराळे/

तैसा तूचि आम्हा ठाई/ खेळतासी अंतर्बाही //

भक्ष अग्नीचा तो दोरा/ त्यासी वाचवी मोहरा/

तुका म्हणे अधीलपणे/ नेली लाकडे चंदने//

नारायणाच्या संगतीने भक्त कसा परमेश्वराशी एकरूप होतो हे तुकाराम महाराजांनी वरील अभंगात काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.

चुंबकाच्या आकर्षणाने लोखंडाची सुई उभी राहते, तसा परमेश्वर भक्तांच्या अंतर्बाह्य उभा आहे. धाग्याचा धर्म आगीने जळण्याचा असतो, परंतु तोच धागा मोहरा नामक खड्याला गुंडाळून अग्नीत टाकला तर जळत नाही. चंदनाच्या संगतीने इतर वृक्षांचे गुणधर्म जाऊन त्यांना चंदनाचा सुगंधी गुण येतो. सत्संग किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते. तात्पर्य, देवाच्या संगतीने भक्त आमुलाग्र बदलतो.

समर्पणाविषयी अनेक अभंग आपल्याला गाथेत आढळतात. मला असे वाटते की या सर्व अभंगांचा आपण अभ्यास करावा. चांगल्या वाचनाने आपल्यावरही चांगले संस्कार होऊन उचित परिणाम होऊ शकतो. यास्तव पुढील लेखात समर्पणाविषयीचे आणखी काही अभंग आपण अवश्य विवेचनासाठी घेऊ.

क्रमशः… ३२

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मित्रत्वाचा सल्ला ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मित्रत्वाचा सल्ला ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

 पाऊस धो धो पडतोय 

गाठ पडली बिळात,

विसरला नाहीस नां रे

हरवले तुला खेळात ?

 शर्यतीत गाजर खाऊन

 झोपलास झाडाखाली,

 असं कसं विसरलास

 शर्यत लागल्ये आपली ?

सल्ला देतो तुला मित्रा

गर्वाच घर खाली असतं,

हवा डोक्यात गेली की

बक्षीस हमखास हुकतं !

 इसापनीतीत प्रसिद्ध 

 ससूल्या आपली जोडी,

 हट्ट करून शर्यतीसाठी

 काढू नको परत खोडी !

 काढू नको परत खोडी !

आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ गंगा माहेराची… + संपादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

🎇 अ भि नं द न  🎇

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच या संस्थेने आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांच्या काव्यास उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे सौ. तानवडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

आज पुरस्कार प्राप्त काव्य प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ?

☆ “सांग दर्पणा” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित काव्य स्पर्धा ‘उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त’)

न्याहाळते दर्पणी मी

सज्ज होऊनी साजिरी

ल्याली आभूषणे भारी

शालू माझा भरजरी ||

केला शृंगार देखणा

फिदा माझ्यावरती मी

सांग दर्पणा यामध्ये

काही नसे ना रे कमी ||

 *

तूच खरा मित्र जगी

रूप अचूक दाखवी

उणे अधिक काहीही

ओळखाया तू शिकवी ||

 *

ऐक दर्पणा एवढे

आठवाने मी लाजते

छबी नयनात त्याच्या

पाहण्याला आसुसते ||

 *

त्याची चाहूल लागता

सुखावले मी अंतरी

लाज साखर मिठीची

उमटली गालावरी ||

 *

नेत्र दर्पणी दोघांना

खूण पटे अंतरीची

सरे क्षणातच दूरी

साथ सात पावलांची ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२५ ☆ ।। गझल ।। ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२५ ?

☆ ।। गझल ।। ☆  प्रभा सोनवणे ☆

वागू नका असे की…उन्मत्त ते सवाली

आहे अजून भारत भरपूर भाग्यशाली

मारायला निघाले आहेत माय भू ला

सोडून लाज लज्जा करतात जे दलाली

 *

प्रत्येकजण सुखाचा मागेल एक प्याला

एका कुणास येथे बघ लाभती पखाली

 *

हे पाप कोणते अन पुण्यास कोण वाली

सारेच संत आता भोंदू, भुके, मवाली  

 *

राष्ट्रीय सण कधीही विसरू नका मुलांनो

देऊन प्राण गेले ते वीर…हो अकाली

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३५ ☆ मराठी भावानुवाद – डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

रवींद्रनाथ टागोरांच्या इंग्रजी गीतांजली मधील १०३ कवितांचा भावानुवाद आम्ही बहिणींनी, मंजिरी येडूरकर व शोभना आगाशे, मिळून केला. हे कोविड काळातील अपत्य!

घरातल्या सगळ्यांनी त्या कवितांचं खूप कौतुक केलं आणि यांचं पुस्तक छापायचं हे ठरवून टाकलं. शेवटी ‘गीतांजली जशी भावली तशी’ हे पुस्तक प्रकाशित झालं, वर्षभरात चार संस्थांनी त्याचा गौरवही केला. हे सगळं आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच व अनपेक्षीत घडल्यामुळं भारी वाटत होतं.

पण खरं भारी वाटलं ते कवितांचा अनुवाद करतांना! मूळ इंग्रजी कविता, गद्य स्वरूपाच्या आहेत. जुन्या स्टाईलचं अवघड इंग्रजी आहे. आम्ही सुरवातीलाच ठरवलं होतं की आपण दुसऱ्या कुणाचाही अनुवाद आधी वाचायचा नाही; कारण कोणताही पूर्वग्रह घेऊन केलेला अनुवाद ‘आपला’ वाटणार नाही. मग त्यातल्या बऱ्या वाईटाची जबाबदारी आपण कशी घेणार! आपल्या कविता शक्यतो गेय होतील, असा प्रयत्न करायचा. मन अगदी स्वच्छ ठेऊन, आपल्याला काय वाटतंय ते लिहायचं. अर्थात याचं पुढे जाऊन पुस्तक होईल हे ध्यानी मनी सुद्धा नव्हतं. जवळजवळ महिनाभर आम्ही चर्चा करून प्रत्येक कवितेचा कीस पाडलाय.

एक मुख्य अडचण वाटली, ती म्हणजे, या कविता आध्यात्मिक विषयावर आहेत, असं वाचलं होतं. पण आमच्या लक्षात आलं की, अगदी अध्यात्मिक नाही पण प्रत्येक कविता एक विचार व्यक्त करते. मात्र तो विचार व्यक्त करण्यासाठी रविंद्रनाथ जी रूपकं वापरतात, ती समजायला जरा अवघड, त्यातून इंग्रजीमध्ये, त्यामुळे काही काही कवितांवरील चर्चा दिवस दिवस चालायची. पण शेवटी एकतर एकमत व्हायचं किंवा दोघींपैकी एकीवर पूर्ण जबाबदारी टाकली जायची.

त्यांच्या बऱ्याच कविता गोष्टीसारख्या आहेत. ३१ व्या कवितेत कवीला खूप श्रीमंत व्हायचं असतं. जगावर सत्ता मिळवायची, म्हणजे अनभिषिक्त सम्राट व्हायचं असतं. त्यासाठी तो सगळ्या जगाला कैदी बनवणार असतो. त्यासाठी तो रात्रभर बसून जड साखळदंड बनवतो. सकाळी उठून पाहतो तर त्या साखळदंडांनी तो स्वतःच जखडला गेलेला असतो. यातून आपण सुविचार सांगू शकतो, दुसऱ्याचं वाईट चिंतून किंवा मोहात लिप्त राहून आपलं भलं होत नाही.

६४ व्या कवितेत नदीच्या उतरणीवरून संध्याकाळी एक स्त्री दिवा घेऊन निघालेली असते. कवी तिला तो दिवा आपल्याला देण्याची विनंती करतो कारण त्याच्या घरात अंधार असतो. ती म्हणते हा नदीच्या प्रवाहात सोडण्यासाठी नेते आहे. पुन्हा ती अशीच दिवा घेऊन येते. पुन्हा कवी तिला दिवा मागतो. ती म्हणते नभाला अर्पण करणार आहे. पुन्हा रात्री येते. ती म्हणते दिव्यांची आरास करायची आहे. कवीला सर्व दिवे तिनं व्यर्थ घालवले असं वाटतं. वर वर पाहता यात दडलेला अर्थ लक्षात येत नाही पण विचार केल्यावर समजतं की कवीला इथे सांगायचं आहे की, आपल्या अज्ञानाचा अंधार दुसऱ्यांच्या आयत्या दिव्यांनी नष्ट होत नाही. त्यासाठी आपणच प्रयत्नपूर्वक ज्ञानाचा दीप चेतवून हा अंधार दूर करावा लागतो. किंवा जे ज्ञानी लोक असतात ते पूर्ण आसमंत उजळून टाकण्याची इच्छा बाळगतात.

आणखी एक उदाहरण द्यावं असं वाटतंय. ५८ व्या कवितेत आनंद कुठं कुठं राहतो याचं वर्णन आहे. त्यातील एक वाक्य असं आहे, the ‘joy that sits still with its tears on the open red Lotus of pain’ याचा अर्थ काय असेल याचा विचार करताना मनात आलं उमलताना कमळाला त्रास होत असेल का, त्याच्या अश्रूच्या थेंबात आनंद राहत असेल का? की तो थेंब ओघळू नये, अश्रू आहेत हे कळू नये म्हणून राहतो, का त्या चमकणाऱ्या थेंबाकडे पाहताना आपण खूप आनंद मिळवावा म्हणून तिथे आनंद राहतो. किंवा आणखी काय काय चर्चा करत होतो, शेवटी लक्षात आलं की कवीला म्हणायचं आहे की सुखदुःख, हसू-आसू हे एकत्रच असतात, एका पाठोपाठच येतात.

ह्या निर्मितीच्या काळात होणाऱ्या आमच्या बौद्धिक चर्चा, त्यासाठी केलं जाणारं वाचन सगळं फार भारी वाटायचं. कारण शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यापासून बुद्धीला खाद्य मिळणे बंद झालं होतं. एकूण सगळं खूप कष्टाचं, पण खूप आनंददायी होतं.

त्यानंतर सांगलीतल्या साहित्यिक मैत्रिणींच्यामुळे ई अभिव्यक्तीची माहिती कळली. सुश्री उज्ज्वला केळकर, श्री सुहास पंडित, सुश्री मंजुषा मुळे व अन्य सर्व सुहृदांच्या प्रोत्साहनामुळे इतरही काहीबाही लिहायला लागलो व साहित्य, साहित्यिक यांच्या संगतीमुळं आमचा बौद्धिक विकास होऊ लागला.

१० डिसेंबर २०२५ पासून आमच्या गीतांजलीतील कविता, मूळ इंग्रजी कवितांसह ई अभिव्यक्तीवर प्रकाशित व्हायला सुरवात झाली. आजच्या या ३५ व्या भागाबरोबर ही मालिका संपन्न होत आहे. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल ई-अभिव्यक्ती साहित्य-मंचाच्या संपादक मंडळाचे मनापासून आभार.

शोभना आगाशे 

मंजिरी येडूरकर 

—–

☆ गीत : १०२ ☆

I BOASTED among men that I had known you. They see your pictures in all works of mine. They come and ask me, “Who is he? ” I know not how to answer them. I say, “Indeed, I cannot tell. ” They blame me and they go away in scorn. And you sit there smiling.

I put my tales of you into lasting songs. The secret gushes out from my heart. They come and ask me, “Tell me all your meanings. ” I know not how to answer them. I say, “Ah, who knows what they mean! ” They smile and go away in utter scorn. And you sit there smiling.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : १०२ ☆

अभिमानाने मी सांगितले

तुझ्या ओळखीची खूण म्हणोनि

मोरपीस मी तुझे दाविले॥

*
तू दिससी मम गीतांमधुनी

जागोजागी त्यां जाणविसी

तसेच सार्‍या कलाकृतीतुनी॥

*

पुसती मज ते उत्सुकतेने

संभ्रमित अन् पाहती मजला

कोण तो‘, कथी विस्ताराने॥

*

उत्तर त्यांना देऊ न शकतो

उपहासाने जाती निघुनी 

तिथेच असुनी, तो मज हसतो॥

*

तुझ्या कथांची गीते लिहिता

उचंबळुनि ये गुपित हृदीचे 

गूढ ते मम शब्दात उमटता॥

*

पुसती मज ते उत्सुकतेने

संभ्रमित अन् पाहती मजला

अर्थ गीतांचा, कथी विस्ताराने॥

*

उत्तर त्यांना देऊ न शकतो

उपहासाने जाती निघुनी 

तिथेच असुनी तो मज हसतो॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : १०३ ☆

IN one salutation to thee, my God, let all my senses spread out and touch this world at thy feet.

Like a rain-cloud of July hung low with its burden of unshed showers let all my mind bend down at thy door in one salutation to thee.

Let all my songs gather together their diverse strains into a single current and flow to a 

sea of silence in one salutation to thee.

Like a flock of homesick cranes flying night and day back to their mountain nests let all my life take its voyage to its eternal home in one salutation to thee.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : १०३ ☆

तुझ्याच चरणी जग हे सारे 

तुझ्या दर्शने भगवंता रे

शांत होतसे तनमन सारे

उद्धरुनि मज स्वीकारी रे॥

*

ओथंबुनी घन येत धरेवर

लीन तसा मी तव चरणांवर

आस घेऊनि आलो इथवर

पडो कृपा कटाक्ष मजवर॥

*

पक्षी जाती दिगंतरासी

फिरुनी येती घरट्यापाशी 

थकलेला रे मी प्रवासी

निजधामासी मजला नेसी॥

*

माझी गीते वेडीवाकुडी

आली ओंजळी दीनबापुडी

अर्पण करितो, अता ही कुडी

सारुप्य घडो, येता जगबुडी॥

(लेखमाला समाप्त)

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली, दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३३५ ☆ भैरवी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३५ ?

☆ भैरवी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सांजवेळी भैरवी तो गात आहे

सूर्य ढळला होत गेली रात आहे

*

कंठ आता साथ त्याला देत नाही

ही सुरांची थांबली बरसात आहे

*

काजव्यांनी व्यर्थ केला संप जेव्हा

रात्र तेव्हा जिंकली युद्धात आहे

*

एकतारीचीच केवळ साथ होती

तार तुटली आणि झाला घात आहे

*

निर्गमाची वेळ झाली का तरीही

तो अडकला या इथे पाशात आहे

*

तेल म्हणजे श्वास आहे या प्रभेचा

संपता ते शांत होते वात आहे

*

या यमाला टाळणेही शक्य नाही

ठाकलेला तो उभा दारात आहे

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आषाढ भेट… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ आषाढ भेट... ☆ श्रीशैल चौगुले ☆

मज न आले सावरता

ते आभाळ जीने पेलले

नवल म्हणावे कि कृपा

संकट काव्याने झेलले.

हसू ढगांचे खुणावती

नि उगी शब्द आठवणी

आषाढाचा पाऊस चिंब

नि भिजे काव्य क्षणोक्षणी.

 *

तृण फुलावे भाव हृदयी

तृप्त धरेत ओळ ओहोळ

पक्षी-मानव सुख संतुष्टी

पेर उगी रचनेला बळ.

 *

असे गीत व्याकुळ विरही

मोरपिसारे नृत्य पालवी

वारा संगीत तुला साद ती

प्रीतभंग लेखणीत कवी.

  

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “राजे आणि दुसरं घर..!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “राजे आणि दुसरं घर..!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

अवघ्या त्रेपन्न वर्षांचा एक सत्पुरुष..

पंचतत्त्वात विलीन झाला आणि…

चित्रगुप्ताच्या दरबारात हजर झाला..

चित्रगुप्तानं बसायला मानाचं आसन दिलं,

अन् राजांना अपमान झालेला तो दरबार आठवला..

दोघांनीही त्यावर स्मितहास्य केलं.

 

चला राजे, तुम्हांला स्वर्गाच्या दारापर्यंत

सोडायची जबाबदारी माझी आहे.

आयुष्यभर पायाला भिंगरी लावून फिरलात,

आता जरा उसंत घ्यावी.

चित्रगुप्त अंमळ हुशारीने म्हणाला.

 

राजे जागचे हलले नाहीत, अन् तो चिंताक्रांत झाला.

चलावं महाराज, याचसाठी तर असतो मानव जातीचा अट्टहास.. यावेळी स्वरात जरा अजीजी होती.

 

नको देवा, अर्ध्यातच बोलावलंस न विचारता,

अन् ह्या स्वर्गाचा आग्रह नव्हताच कधी मनात.

श्रींच्या इच्छेचं स्वराज्य तर झालं,

सुराज्यासाठी तू वेळ कुठे दिला..

इथे स्वर्गात गेलो तर देवत्व मिळेल,

आणि खाली मूर्ती आणि टाक होतील माझ्या.

मला मानवच राहू देत आणि राहिलेला अर्धा डाव पूर्ण करु दे.

 

भाग्य लिहीलं गेलंय राजे, आता बदल नाही.

या दरबारातून थेट स्वर्गात, याला पर्याय नाही.

 

राजे पुन्हा हसले,

देवा, माझी वही नीट तपासलीत ना,

तुरी द्यायची कला अवगत आहे मला.

 

स्वर्ग सोडून राजाने पृथ्वीचाच हट्ट धरला

आता मात्र चित्रगुप्ताचा नाईलाज झाला.

जगत्पिता ब्रह्मदेवाशी बोलणी करुन,

राजांसोबत महाराष्ट्रातील गर्भवतींच्या स्वप्नात दाखल झाला.

 

गर्भवती १

देवी, हे मूल देतोय तुला, तेजस्वी आहे.

राजकारणात जाईल, सुराज्य देईल.

नको देवा, शिकून सवरुन नोकरी करेल,

असंच मूल हवंय मला. दुसरं घर बघ.

 

गर्भवती २

देवी, हे मूल देतोय तुला.संस्कारी आहे,

रांझ्याच्या पाटलाचे हात तोडेल, शत्रूकडच्या स्त्रीलाही सन्मान देईल.

नको देवा.आपण भलं आणि आपलं घर भलं,असं मानणारंच मूल दे मला, दुसरं घर बघ.

 

गर्भवती ३

देवी, हे मूल देतोय तुला, परोपकारी आहे,

रयतेचं हित बघेल, कुणाला उपाशी ठेवणार नाही,

प्रसंगी धनिकाकडून घेईल व गरीबाला देईल.

नको देवा, भौतिक सुखांची सवय झालीय मला,

असं उपद्व्यापी मूल नकोय मला, दुसरं घर बघ.

 

गर्भवती ४,५,६…..

देवींनो, होऊ घातल्या मातांनो,

इतिहास बदलू शकणारं एक मूल कूस मागतंय,

स्वर्गाचा दरवाजा सोडून, चंद्रमौळी अंगण मागतंय,

सुराज्याच्या राहिलेल्या स्वप्नासाठी,

स्वतःच निर्मिलेल्या राज्यात,

पुनर्जन्मासाठी एक जिजामाता शोधतंय..

कुणीतरी या पुढे आणि आपल्या उदरात

सामावून घ्या हा सूर्य.

 

देवा, कितीदा सांगावं तुला,

जे आहे ते सहन करावं, जे होईल ते स्वीकारत जावं,

निगुतीनं वागावं अन् स्वतःचं पहावं, हेच अंगात भिनलंय आता.

अन्याय बिन्याय, सत्यासाठी लढा, वगैरे वगैरे म्हणजे

लष्कराच्या भाकरी आहेत रे, नाही भाजायच्या आम्हांला.

हे सूर्याचं तेज सांभाळणारी जिजाऊ शेजारच्या घरात आहे बहुतेक.

आमचा पिच्छा सोड देवा आणि कृपा करुन दुसरं घर बघ.

 

हताश झालेल्या स्वरात चित्रगुप्त म्हणाला,

राजे, उणीपुरी तीनशे चाळीस वर्ष फिरवताएत मला.

एव्हाना तुमचा देव केलाय हो लोकांनी,

मणभर सोन्याचं सिंहासन, आणि रुप्याचे टाक झालेत तुमचे आणि मूर्तीही विसावल्यात देव्हा-यात.

पुतळे तर तुम्ही न पाहिलेल्या, न जिंकलेल्या प्रदेशातही उभारलेत. 

तुमचा पुनर्जन्म हा तर तुमचं नावं घेऊन मनमानी करणा-यांनाही घात ठरेल. त्यांनाही नकोसा असेल हा पुनर्जन्म. आता तरी स्वर्गात चला.

 

देवा, असा हताश झालो असतो तर,

चार मित्र घेऊन भवानीसमोर शपथ घेतलीच नसती,

कोवळ्या पोराला घेऊन आग्र्याहून सुटलोच नसतो,

सर्व काही गमावलेल्या तहातून उभा राहिलोच नसतो,

अमर्याद सागराशी पैज घेतलीच नसती,

दक्षिणेचा दिग्विजय मिळवलाच नसता,

स्वराज्यासाठी आदर्श आज्ञापत्रे लिहीलीच नसती,

आणि..

माझ्यानंतरही चालणारं राज्य निर्माण केलंच नसतं.

एकदा सुराज्य येऊ दे देवा, तुम्ही म्हणाल तेथे येईन.

तोपर्यंत…?

तोपर्यंत,

राजांचा आत्मा न मागितलेल्या देवत्वाच्या माळेत गुंफलेला राहणार,

आणि

मावळ्यांचे हात केवळ ढोल-ताशांच्या गजरात गुंतलेले राहणार..!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ संस्कारांचे बीज ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? संस्कारांचे बीज ? श्री आशिष  बिवलकर ☆

सुखावला आज | सखा पांडुरंग |

चिमुकल्यांसंग | पालखीत ||१||

*

निर्मळ ह्रदय | मुखावर भाव |

भक्ती गाठे ठाव | अंतरीचा ||२||

*

संस्कारांचे बीज | ओली मऊ माती |

बालकांच्या हाती | धर्मध्वज ||३||

*

सनातन धर्म | पताका भगवी |

हीच पिढी भावी | वाढवाया ||४||

*

आषाढ महिना | एकादशी दिंडी |

पिंडी ते ब्रम्हांडी | हेच सत्य ||५||

*

अवतरलीय | गावात पंढरी |

रामकृष्ण हरी | नामघोष ||६||

*

सावळा विठ्ठल | भक्तीचा भुकेला |

धावतो हाकेला | श्रद्धा मनी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares