श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३५ ?

☆ भैरवी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सांजवेळी भैरवी तो गात आहे

सूर्य ढळला होत गेली रात आहे

*

कंठ आता साथ त्याला देत नाही

ही सुरांची थांबली बरसात आहे

*

काजव्यांनी व्यर्थ केला संप जेव्हा

रात्र तेव्हा जिंकली युद्धात आहे

*

एकतारीचीच केवळ साथ होती

तार तुटली आणि झाला घात आहे

*

निर्गमाची वेळ झाली का तरीही

तो अडकला या इथे पाशात आहे

*

तेल म्हणजे श्वास आहे या प्रभेचा

संपता ते शांत होते वात आहे

*

या यमाला टाळणेही शक्य नाही

ठाकलेला तो उभा दारात आहे

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted