श्री तुकाराम दादा पाटील
विविधा
☆ सहज… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
जीवन म्हणजे अनोळखी जागी अंधारात मारलेली उडी,ती कुठे कशी पडेल याचा अचूक अंदाज बांधणे सहज शक्य नाही. पण म्हणून ते त्यागताही येत नाही. त्याचे ओझे परमेश्वराने प्रत्येक जीवावर जबरदस्तीने लादलेले आहे. ते त्यागायचा नुसता प्रयत्न केला तरी माणसाच्या कपाळी डरपोक असल्याचा शिक्का समाजाकडूनच मारला जातो. म्हणूनच ते ओझे पेलतच जगावे लागते. त्या शिवाय माणसाजवळ कुठलाच पर्याय नसतो. संथ,शांत, धाडशी, चंचल, गंभीर, सोज्वळ, संयमी, सात्विक, बदफैली, निरागस ,अशा अनेक प्रकारे ते जगता येते. पण त्यासाठी सुध्दा बळकट मनोधैर्य, मनोनिर्धार असावाच लागतो. तो नसेल तर त्या जगण्याला अर्थच उरत नाही.
जगणारे ते स्वीकारतात, जगण्याचा पर्याय निवडतात आणि जगू लागतात. आपल्या जगण्याचा आराखडा तयार करतात. तो प्रयत्न पूर्वक राबवत असतात तिथेही जगणाराला अंदाजच बांधावा लागतो .तो कितपत यशस्वी होईल हे निश्चित सांगता येत नाही.सगळ जगणच असं विचित्र आवर्तनाने भरलेल आहे. हे माहीत असूनही जगणारा ते जगतच जातो. शेवटी जगणं म्हणजे गुडघाभर चिखलात चालायच, चिखलात भरभर, जोरात चालतात येत नाही, आणि दमल्यावर खाली बसताही येत नाही. कारण जगणं माणसांची दमछा करण्या साठीच दिलं गेलं आहे . माणसाला माणसाची ओळख पटावी म्हणूनच हे नियोजन असावं. प्रत्येकाच्या जगण्यात स्वर्थीमाणसं यायलाच हवीत त्याच्याशिवाय माणसाला निस्वार्थी माणसांची किंमतच कळणार नाही. देवही मोठाच डोकेबाज आहे .त्यानं माणसाला सहजपणे या जगण्याच्या चक्रव्यूहात अडकवून टाकलं आहे आणि तो बसलाय त्यांची गंमत बघत.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






