संध्या बेडेकर
जीवनरंग
☆ “आज पुन्हा एकदा आई जिंकली..” भाग – १ लेखिका : चेतना वैद्य ☆ संध्या बेडेकर ☆
आज सकाळपासूनच आईच्या फोनची वाट बघत होतो. चारदा आम्ही दोघी बहिणींचे आपापसात विचारण झाल. आज आईच्या फोनची सर्वच वाट बघत होते. आज बाबा घरी येणार होते ना. आज बाबांना डिस्चार्ज मिळणार होता ना. म्हणून सर्वांचे लक्ष तेथे होते.
आज मी आई बरोबर असायला हव होत.
माझ्या मनात येणारा हा आणि असे अनेक प्रश्न ? नेहमीच मला अस्वस्थ करतात.
आपण अमेरिकेत स्थायिक झालो… हे बरोबर आहे का ? आम्ही दोघी बहिणी भारताच्या बाहेर आहोत. जस जस आईबाबांच वय वाढतय, तसतसा हा प्रश्न मला खूप त्रास देतोय. आता तर मी पण चाळीशी पार केलीय, माझी मुल मोठी झाली. आता त्यांचे भविष्य, आईबाबांचे वर्तमान दोन्ही महत्वाचे. दोन्ही जबाबदार्या मनापासून पूर्ण करताना शारीरिक पेक्षा मानसिक ओढाताण खूप होते. हे जरी खर असल, तरी हे असच चालत राहणार आहे… हेही कळतय.
करोनाच्या काळात बाबा दवाखान्यात भरती होते. त्यांचे डायलिसिस चालू होते. आई तिथे एकटी, बाबा दवाखान्यात, आणि आम्ही दोघी येथे.
तो काळ खूप कठिण गेला. फोन, व्हिडिओ हेच एक साधन होते त्यावेळेस बाबा वरती हात लावून परत आले. अस म्हंटल तरी चालेल. ही जंग आईने एकटीने लढली आणि जिंकली सुद्धा.. मानसिक खंबीरता म्हणजे काय ? याचे जणू उदाहरणच आईने सेट केले. आम्हाला तर अजिबात यायच नाही, अशी सख्त ताकीदच आईने दिली होती.
केंव्हा एकदा हा करोनाचा काळ संपतो आणि आम्हाला भारतात यायची परमिशन मिळते. याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो.
एकदाचा कोरोना निवळला, आईची परमिशन पण मिळाली, आणि आम्ही दोघी बहिणी परिवारासह आईकडे आलो. बाबांना बघून बर वाटल. आईचे कौतुक वाटल.
आई खूप खुश होती. दृष्ट लागावी अस माझ्या घराच आज गोकुळ झालय. सूख म्हणजे नक्की काय ? याचा प्रत्यक्ष्य अनुभव मी घेतेय. आज मी गोकुळात आहे, आनंदी आहे. अस आई सहज बोलून गेली. तुम्हा सगळ्यांना बघून माझा थकवा गेला. माझ्या या गोकुळाला कोणाची नजर नको लागायला. आई देवाजवळ प्रार्थनेत अस म्हणत होती.
पण देवाच्या मनात काही तरी वेगळच planning सुरू होत.
आई थकलेली दिसत होती. सर्दी खोकला पण झाला होता.
बाबा म्हणाले… मुलींनो ! जरा आईला पण एकदा डोॅक्टर कडे घेऊन जा. तिची तब्येत पण बरीच खालवली आहे.
आईचे औषध पाणी सुरू झाले. पण औषधाचा म्हणावा तसा असर दिसत नव्हता. X ray, अनेक टेस्ट्स झाल्या. शेवटी डोॅक्टरने आधी बायोप्सी, नंतर पेट स्कॅन करायला सांगीतल. या टेस्टच नाव ऐकल्यानंतर तर चांगले चांगले लोक आधीच घाबरतात.
खर तर बर्याच दिवसांनंतर आम्ही सर्व भेटलो होतो. एका मोठया संकटाला तोंड देऊन टेंशन फ्री झालो होतो. देवाचे आभार मानत होतो. तर आता पुन्हा एक नवीनच प्रश्न समोर येऊन उभा होता.
टेस्ट झाली आणि डॉक्टरने रिपोर्ट वाचून लंग कॅन्सर चे निदान केले. आणि आई सूखाच्या शिखरावरून धप्पकन खाली पडली.
आता तर सर्वांचेच धाबे दणाणले.
अनपेक्षितपणे, दूर दूर पर्यंत मनात अस काही असेल हे आलच नाही. साधा खोकला जो कोणालाही होतो आणि बराही होतो, तो आईचा बराच झाला नाही. तो या स्तरापर्यंत गेला असेल, हे कोणाच्या मनी ध्यानी पण आल नाही. हा सर्वांना एक मोठा धक्काच होता.
आज पुन्हा एकदा असहनीय शांतता घरात होती. प्रत्येक जण सहज सामान्य वागायचा प्रयत्न करत होता.
आई सरळ आपल्या बेडरूम मध्ये जाऊन बसली. मला माझ्या स्वतः बरोबर थोडा वेळ हवाय. अस म्हणाली. पूर्ण दोन दिवस 48 तास तिने बहुतेक स्वतःशीच वाद घातला असावा, संवाद साधला असावा. तिलाही हे accept करण कठिणच होत. जेवावस वाटत नाही, चहा पण घ्यावासा वाटत नाही. अशी अनेकदा ऐकलेली वाक्य आज आई स्वतः अनुभवत होती.
अशा वेळेस विचारांची सुनामी आलेली असते, भावनांचा विलक्षण गोंधळ मनात चालूच असतो.
भीती- काळजी-जबाबदारी-चिंता भविष्यात होणार्या संभावित घटना. मनाची तर क्षणात तोळा तर क्षणात मासा अशी अवस्था असते. विचार, भावना क्षणाक्षणाला बदलत असतात. अस्वस्थ मनाला शांत व्हायला वेळ लागतोच… वास्तव स्विकारायला मन शांत असाव लागत.
स्वतःसाठी वेळ काढून अंतर्गत शांततेत स्वतःशी संवाद साधला, तर प्रश्नांची उत्तर सापडतात. ताण कमी होतो. संकटाशी लढण्याचा मार्ग मिळतो. किंवा मार्ग काढावाच लागतो. दुसरा पर्याय समोर नाही हे लक्षात येत.
Sometimes being alone is the only way to know your power.
समोर असलेल्या नवीन प्रोजेक्ट वर फोकस करून पुन्हा एकदा Restart, Reorganize चा विचार करता येतो.
विचार भावना आणि आपले वर्तन यांचा परस्पर खूप संबंध असतो. त्यामुळे योग्य निर्णय वेळेवर घेणे आवश्यक असत.
घरात सर्वच panic / disturbed होतेच.
दोन दिवसांनी आई व्यवस्थित तयार होऊन बाहेर आली. सर्वांसाठी आलं टाकून छान कडक चहा केला.
आई म्हणाली… मी ठीक आहे. जे आहे ते accept केलय मी. आता यापुढचा प्रवास खडतर आहे, हे माहित आहे मला. 1/2 दिवसांत डोॅक्टर कडे जाऊन line of treatment बद्दल समजून घेऊया. वेळ लागेल पण सर्व ठीक होईल, याची खात्री आहे मला. जशी वेळ येईल, तसा या परीक्षेचा अभ्यास करायच ठरवलय मी. तुम्ही सर्व आहातच बरोबर. गरज पडली तर मदतीला दुसरे पर्याय आहेतच.
सुरवातीला मला हे सत्य पचवायला त्रास झाला. पण now I am ok.
A correct decision doubles the confidence.
बाबा म्हणाले… अग! मी आहे ना तुझ्या बरोबर. काळजी करू नको. सर्व ठीक होईल. आता एडव्हांस टेक्नोलॉजी आहे. काल मी आणि शाल्मली डाॅक्टरला भेटून आलो. सध्या अगदी सुरवातच आहे. आपल्याला लगेच कळल, हे खूप बर झाल.
– क्रमशः भाग पहिला
लेखिका : चेतना वैद्य
प्रस्तुती संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





