श्री राहूल लाळे
चित्रकाव्य
– संध्यारंग… –
☆ श्री राहूल लाळे ☆
☆
संध्याकाळच्या आभाळात
केशरी रंग भरला,
अन्
दिवसभराचा प्रवास संपवून
सूर्य क्षितिजाकडे वळला…
ढगांच्या कुशीत विसावताना
क्षणभर थांबला तो,
जणू निरोप देताना म्हणाला—
“उद्याही भेटेन पुन्हा! ”
रस्त्यावरची धावपळ सुरूच,
वाहनांची गर्दी तशीच,
पण त्या गोंगाटातही
निसर्गाची कमाल दिसली…
एक क्षण टिपला कॅमेऱ्याने,
एक क्षण मनात साठला,
मावळता सूर्य सांगून गेला—
“अंत नाही हा…हा तर नव्या पहाटेचा वायदा! ”
☆
© श्री राहुल लाळे
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







