मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १३ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १३ – भाग ६ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग २ ✈️

रात्रभर प्रवास करून बोट कालपेनी या कोचीनपासून २८७ किलोमीटर्सवरील बेटाजवळ आली. आठ किलोमीटरच्या या लांबट बेटावर नारळाची असंख्य झाडं झुलत होती. शहाळ्याचा आस्वाद घेऊन समुद्रकिनाऱ्यावरील आरामखुर्च्यांवर बसून निळा, हिरवा आसमंत न्याहाळत होतो. एकाएकी आभाळ भरून आलं. पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेत सारे मांडवात परतले. कोकणातल्यासारख्या नारळाच्या विणलेल्या झापांच्या त्या मोठ्या मांडवात टेबल खुर्च्यांची व्यवस्था होती. थोड्या वेळाने पाऊस थांबला पण आभाळ झाकोळलेलं राहीलं. त्यामुळे कडक उन्हाचा त्रास न होता सर्वांनी वॉटर स्पोर्ट्सची मजा अनुभवली. वॉटर स्पोर्टस्साठी समोरच्या दुसऱ्या बेटावर होडीतून जावं लागलं. समोरचं बेट आणि त्याच्या शेजारचं बेट यांच्यामध्ये शुभ्र फेसाच्या लाटा अडकुन राहिल्या आहेत किंवा तिथे बर्फाचा शुभ्र चुरा भुरभुरला आहे असं वाटत होतं. नंतर तिथल्या मदतनिसाकडून कळलं की तो पांढराशुभ्र मऊ,मुलायम वाळूचा बांध तयार झाला आहे.  त्याचंच एक बेट तयार झालेलं आहे. त्यावर मनुष्यवस्ती नाही.गंमत म्हणजे त्या बेटाजवळील पाणी गडद निळं होतं आणि आमची छोटी बोट हिरव्या पाण्यातून जात होती. इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व निरनिराळ्या रंगांचे लहान-मोठे मासे, सी ककुंबर यांचं दर्शन झालं.

कालपिनी बेटावर परत येऊन जेवण व विश्रांती झाली. नंतर तिथल्या स्थानिक रहिवाशांनी नाच करून दाखविला. लुंगीचा धोतरासारखा काचा मारला होता. एका हातात लांबट चौकोनी पत्रा व दुसऱ्या हातात लाकडी दंडुका होता. ‘भारत मेरा देश है’म्हणंत नाच चालू होता. गणपतीत आपल्याकडे कोकणातील बाल्ये लोक नाचतात तसा प्रकार होता. नंतर आम्हाला तिथल्या होजिअरी फॅक्टरीत नेलं. तिथे बनविलेले टीशर्ट तसेच शुद्ध खोबरेल तेल, नारळाचे लाडू , किसलेल्या नारळाचा वाळवलेला चुरा यांची खरेदी झाली.

आज बोटीवर परतल्यावर बोटीच्या डेकवर गेलो. अंधार होत आला होता. आकाश आणि आजूबाजूचा समुद्र राखाडी- काळसर झाला होता. शुक्राची चांदणी चमचमत  होती. थंडगार शुद्ध हवेमुळे प्रसन्न वाटत होतं. थोड्याच वेळात वेगाने दौडणाऱ्या बोटीच्या पाळण्यातील हलक्या झोक्यांमुळे डोळ्यावर पेंग आली.

कोचिनपासून ४०१ किलोमीटर्स दूर असलेले ‘कवरत्ती’   हे बेट लक्षद्वीपची राजधानी आहे.( आमच्या बोटीचं नावही ‘कवरत्ती’ होतं.) इथे आम्हाला काचेचा तळ असलेल्या, छोट्या दहा जणांच्या बोटीतून समुद्रात नेलं. असंख्य कोरल्स, लहान-मोठे, काळे-पांढरे, निळे, पिवळे मासे, कासवं ,शंख- शिंपले, सी ककुंबर अशी विधात्याने निर्मिलेली वेगळीच जीवसृष्टी बघायला मिळाली. दुपारी जेवण झाल्यावर म्युझिअम बघायला गेलो.  समुद्री जीवांचे सांगाडे, असंख्य प्रकारची, रंगांची कोरल्स, पूर्वीची मासेमारीची साधने, होड्या, स्थानिक वापरातील वस्तू तिथे होत्या. ॲक्वेरियममध्ये शार्कसह अनेक प्रकारचे रंगीत मासे पोहत होते .इथे ‘लक्षद्वीप डायव्हिंग ॲकाडमी’ आहे.

केरळचा चेराकुलातील शेवटचा राजा चेरामन पेरुमल याच्या कारकिर्दीमध्ये लक्षद्वीप बेटावर वसाहत करण्यास सुरुवात झाली असं समजलं जातं. प्रथम हिंदू व बौद्ध लोकांची वस्ती होती. सातव्या शतकात इथे इस्लामचा शिरकाव झाला. १७८७ मध्ये टिपू सुलतानाच्या ताब्यात इथल्या पाच बेटांचे प्रशासन होते. १७९९च्या श्रीरंगपट्टनमच्या लढाईनंतर ही बेटं ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या ताब्यात गेली. १८५४ मध्ये चिरक्कलच्या राजाने सारी बेटं ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये ‘युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप’ ची स्थापना झाली.

मुस्लिम बहुल असलेल्या या लक्षद्वीप बेटांवरील स्थानिकांचं आयुष्य तसं खडतरच आहे. नारळ भरपूर होतात. थोड्याफार केळी, टोमॅटो,आलं अशा भाज्या व कलिंगडासारखं फळं एवढेच उत्पन्न. साऱ्या जीवनावश्यक गोष्टी कोचीनहून येतात. बेटांवर बारावीपर्यंत शाळा आहेत. पुढील शिक्षणासाठी कोचीनला यावं लागतं. भारत सरकारतर्फे शिक्षण आणि आरोग्य सुविधा विनामूल्य दिल्या जातात.बोटीवरील सुसज्ज हॉस्पिटल मध्ये त्यांच्या आजारांवर उपचार होतात. मोठ्या ऑपरेशनसाठी बोटीने कोचीनला नेण्यात येते. इथला ८० टक्के पुरुषवर्ग देशी-परदेशी बोटींवर काम करतो. लोक साधे, अतिशय तत्परतेने मदत करणारे आहेत स्त्रिया शिक्षित आहेत. बुरख्याची पद्धत नाही. लग्नाचा खर्च नवऱ्यामुलाला करावा लागतो. लग्नानंतर नवरामुलगा मुलीच्या घरी जातो.

बोटीवरचा स्टाफ आपली सर्वतोपरी काळजी घेतो. बोटीवरील प्रवाशांच्या केबिन्सना कुलूप लावण्याची पद्धत नाही. तसंच वॉटर स्पोर्ट्सला जाताना तुम्ही किनाऱ्यावर ठेवलेले पर्स, पाकिटं, मोबाईल यांना कसलाही धोका नाही.सारं सुरक्षित असतं. विश्वासाने कारभार चालतो.

भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १३ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १३ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग १ ✈️

अथांग अरबी सागरात ‘कवरत्ती’ नावाची आमची पाच मजली बोट नांगर टाकून उभी होती. समोर दिसत असलेल्या मिनीकॉय बेटावर नारळाची असंख्य हिरवीगार झाडं वाऱ्यावर डुलत होती. आता आमच्या बोटीतून छोट्या यांत्रिक बोटीत उतरण्याची कसरत करायची होती. वाऱ्यामुळे, लाटांमुळे आमची बोट आणि छोटी यांत्रिक बोट, दोन्ही झुलत होत्या. या दोघींची भेट झाल्यावर बोटीच्या दारात उभा असलेला बोटीचा स्टाफ आम्हाला दोन्ही दंडाना धरून छोट्या बोटीमध्ये अलगद उतरवत होता.( लहानपणी केळशीला जाताना हर्णै बंदरातून किनाऱ्यावर पोचायला हाच उद्योग करावा लागत असल्याने त्याची प्रॅक्टिस होतीच)

लक्षद्वीप द्वीपसमूह  हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेला छत्तीस बेटांचा समूह आहे. यापैकी फक्त अकरा बेटांवर मनुष्यवस्ती आहे. केंद्रशासित असणाऱ्या या बेटांवर जाण्यासाठी केरळमधील कोची (कोचिन /एर्नाकुलम) इथून ठराविक दिवशी बोटी सुटतात.

समुद्रावरील ताजा, मोकळा वारा भरभरून घेत मिनीकॉयवर उतरलो. साधारण ११ किलोमीटर लांबीचं, अर्धवर्तुळाकार पसरलेलं हे बेट,  लक्षद्वीप द्वीपसमूहातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. (आकाराने पहिला क्रमांक ऍड्रॉथ या बेटाचा लागतो.) नारळीच्या दाट बनातून आमची गाडी दीपगृहाजवळ पोहोचली. ब्रिटिश काळात १८८५  साली बांधलेल्या या भक्कम दीपगृहाच्या २२० अर्धगोलाकार पायऱ्या चढून गेल्यावर  अफाट, निळ्या- निळ्या सागराचं नजर खिळवून ठेवणारं दर्शन घडतं.  तिथून रिसॉर्टला पोहोचल्यावर सर्वांचं शहाळ्याच्या मधुर पाण्याने, त्यातल्या कोवळ्या, गोड खोबर्‍याने स्वागत झालं. पारदर्शी, स्वच्छ, नितळ निळा समुद्र सर्वांना साद घालत होता. सेफ्टी जॅकेट्स चढवून डुंबण्यासाठी सज्ज झालो. (समुद्रातील पोहणं, कयाकिंग, स्नॉर्केलिंग वगैरे साऱ्या गोष्टींसाठी सेफ्टी जॅकेट व पायात रबरी बूट, चपला घालणं बंधनकारक आहे. नाहीतर पाण्यातून चालताना धारदार कोरल्समुळे जखम होण्याची शक्यता असते.) समुद्रावर अनेक प्रशिक्षित ट्रेनर्स आपल्या मदतीसाठी सज्ज असतात.

किनाऱ्यावरील पाण्यात अलगद बसण्याचा प्रयत्न केला. पण लाटांनी वर ढकलून दिलं. शेवटी धबाकन फतकल मारुन बसलो. अंगावर झेपावणाऱ्या थंड लाटांनी छान समुद्रस्नान झालं. आजूबाजूला हात घातला की तरतऱ्हेचे कोरल्स हातात येत .काहींचा आकार झाडांचा तर कांहींचा आकार फुलांचा, पानांचा, पक्ष्यांचा. कुणाला गणपती सुद्धा सापडले. तासाभराने उठलो तेव्हा जमविलेल्या  कोरल्सची संपत्ती ‘समुद्रार्पणमस्तु’ म्हणून समुद्रालाच परत केली.(कुठच्याही प्रकारचे कोरल्स लक्षद्वीपहून आणणं हा दंडनीय अपराध आहे.)

मदतनिसाबरोबर कयाकिंगला गेले. मजबूत प्लास्टिकच्या लांबट, हलक्या होडीतून वल्ही मारत जाण्याचा अनुभव खूप वेगळा होता. आकाशाच्या घुमटातून  परावर्तित होणारे ढगांचे विविध रंग, पारदर्शी निळ्या पाण्यात उतरत होते. निळा, जांभळा, पिवळा, केशरी, गुलाबी असे अनंत रंग पाण्यात तरंगत होते. हेमगर्भ सौंदर्य आणि गूढरम्य सुशांतता यांचा अपूर्व मिलाप झाला होता. अथांग पाणी आणि असीम क्षितिज यांच्या शिंपल्यात आपण अलगत शिरत आहोत असा एखाद्या परीकथेतल्याप्रमाणे आभास झाला. मदतनिसाने परतण्यासाठी कयाक वळविली तेव्हा भानावर आले.

मिनीकॉयपासून  १०० किलोमीटर्सवर मालदीव बेट आहे. अर्थातच मालदीवला जाण्याची सोय किंवा परवानगी नाही. जेवण व थोडी विश्रांती झाल्यावर दुपारी आम्हाला तिथल्या एका गावात नेण्यात आलं. ११००० लोकसंख्या असलेल्या मिनीकॉय बेटावर छोटी छोटी ११ गावे आहेत.मुखिया म्हणजे गावप्रमुख एकमताने निवडला जातो. ग्रामपंचायत आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक वापरासाठी एक मध्यवर्ती जागा ठेवलेली असते. गावातल्या कुठच्याही घरी काहीही कार्य असलं तरी प्रत्येकाने मदत करायची पद्धत आहे. आम्हाला ज्या गावात नेलं होतं ते तीनशे वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे.चहा, समोसा आणि नारळाची उकडलेली करंजी देऊन तेथील स्त्रियांनी आमचं स्वागत केलं. पांढऱ्याशुभ्र वाळूवर दोन लांबलचक होड्या सजवून ठेवल्या होत्या.दर डिसेंबरमध्ये तिथे नॅशनल मिनिकॉय फेस्ट साजरा होतो. शर्यतीसाठी प्रत्येक बोटीमध्ये वीस जोड्या वल्हव़त असतात. या बेटावर ट्युना कॅनिंग फॅक्टरी आहे. ट्युना माशांना परदेशात खूप मागणी आहे. त्यांची निर्यात केली जाते. इतर साऱ्या बेटांवरील बोलीभाषा, मल्याळम् असली तरी या बेटावर ‘महल'(Mahl) नावाची भाषा बोलली जाते.

भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ पर्यटन दिवस विशेष – भारत दर्शन : सांस्कृतिक यात्रा ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ यात्रा संस्मरण ☆ पर्यटन दिवस विशेष – भारत दर्शन : सांस्कृतिक यात्रा ☆ श्री कमलेश भारतीय ☆ 

यात्राएं न केवल हमें बाहर ले जाती हैं बल्कि अपने अंदर झांकने का अवसर भी प्रदान करती है । यह प्रसिद्ध कथाकार निर्मल वर्मा का मानना है । उन्होंने कितने ही यात्रा वृतांत लिखे । मुझे अवसर मिला भारतीय रेल की ओर से चलाई जा रही भारत

 दर्शन यात्रा में चंडीगढ से रामेश्वरम्,  कन्याकुमारी,  केरल व तिरूपति बालाजी की सांस्कृतिक यात्रा करने का । कहते हैं कि कश्मीर से कन्याकुमारी तक भारत एक हैं । मुझे कश्मीर की यात्रा का सुअवसर तो नहीं मिला लेकिन अंतिम छोर कन्याकुमारी तक छूने का अवसर जरूर मिल गया । मोहाली में मेरे छोटे भाई की पत्नी ने हमारे टिकट बुक करवा दिए और हमारी विवशता हो गई कि यह यात्रा करें । यह इसी वर्ष 17 मार्च की बात है । बस ,दिन रात दोनों बहनों में फोन पर यात्रा की तैयारियों को लेकर चर्चा होती रहती । खैर , हम 16 मार्च को मोहाली पहुंच गये । ताकि समय पर दूसरी सुबह भारत दर्शन की रेल में सवार हो सकें । 

अभी सुबह का अंधेरा था जब हमने भाई के पड़ोसी की कार में सामान ठूंसा और चंडीगढ रेलवे स्टेशन की ओर चल पडे । प्रातः सात बजकर दस मिनट पर भारत दर्शन छह सौ अस्सी लोगों को लेकर रामेश्वरम की ओर चल पड़ी । हम बारह लोग एक समूह के थे और ऐसे ही अगले बारह लोग मलोया व चंडीगढ़ से थे । मज़ेदार बात कि अपने पराए हो गये और पराए अपने हो गये । यह यात्रा में ही होता है । सहयात्री बदल जाते हैं । 

लगातार तीन दिन और तीन रात्रि रेल छुक छुक करती रही । कहीं आउटर पर खड़ी रही । इस बीच भारत दर्शन की ओर से रेल के डिब्बों में ही सुबह की फीकी मीठी चाय , गर्मागर्म परांठे,  पोहा , पकौड़े और तीनों समय का खाना परोसा जाता रहा । असल में यह भारत दर्शन रेल यात्रा करवाने के साथ ही आपके बाहर ठहरने और गाड़ी के अंदर खाने की व्यवस्था करती है । इसमें एक व्यक्ति का टिकट  11, 340 है । इसी में ये सुविधाएं शामिल हैं । माइक से लगातार चेतावनियां और जानकारियां दी जाती रहीं । सोते समय मोबाइल चार्ज नहीं करना , बाहर कुछ नहीं फेंकना , एक दूसरे की मदद करना आदि । एक प्रकार से गाइड की तरह भी कि रामेश्वरम् उतरने पर सिर्फ पचास रुपए में ऑटो हो जाता है और मंदिर दर्शन के मात्र पच्चीस रुपए का टिकट है । रामेश्वरम् के आने से पहले रेल समंदर के लगभग बीच से गुजरती है । कोई रेलिंग भी नहीं । सिर्फ रेल लाइन और विशाल समंदर । दिल धक् सा रह जाता है । तीन दिन तीन रात की लगभग पैंतीस सौ किलोमीटर की यात्रा के बाद रेल से उतरने का मौका मिला । 

शाम को होटल में सोये । कुछ ने कपड़े धोने में ही फुर्सत पूरी कर ली । हम छोटे से बाज़ार में घूमने निकले । बाहर से मंदिर का भव्य द्वार देखा । माला मोती की दुकानें । फटाफट चाय की रेहड़ियां । लुंगी लगाए लोग । पानी खारा । नहाने पर बाल चिपचिपाते । शैंपू लगाकर भी चिपचिपाहट दूर नहीं हुई । होटल की तीसरी मंजिल से रात को समंदर साफ , रोशनियों में डूबा समंदर देखा । नावें । सुबह के लिए आराम जरूरी था । गाड़ी बर्थ से तीन बाद सही बैड पर नींद खूब आई । 

सुबह चले रामेश्वरम् मंदिर । टिकट ली और दर्शन किए । समंदर के किनारे भी गये और फिर मंदिर में बने बाइस पवित्र कुडों के स्नान के लिए एक ब्राह्मण देवता का सहारा लेना ही पड़ा । कुंड में से बाल्टी से पानी निकाल कर लगातार स्नान होता रहा और आखिर मंदिर में ही अपनी लुंगी का पल्ला उठाकर ब्राह्मण देवता ने दक्षिणा मांगते कहा : आप लोगों के चलते ही परिवार पलता है । मैंने जल्दी से पैसे दिए और सपरिवार बाहर निकल आया । ये बाइस कुंड देश के सभी तीर्थों का पवित्र जल लिए हुए हैं । 

बाहर निकलते ही एक ऑटो वाला चिपक गया तो बस चिपक ही गया । हमने कहा कि भई,  अभी नाश्ता करेंगे , होटल में गीले कपड़े बदलेंगे पर वह तो टलने को तैयार ही नहीं था । लगभग डेढ़ घंटे बाद नाश्ता पानी लेकर ऑटो में सवार हुए । लगभग बीस किलोमीटर दूर धनुष कोटी गांव की ओर । जो गांव जरूर हैं पर वहां कोई मकान नहीं बना सकता । सिर्फ पुराने खंडहर हैं । सन् 1964 में समंदर ने इसे लील लिया था । उसके बाद से यहां आबादी नहीं है । सिर्फ रामसेतु देखने जाते हैं । चिलचिलाती धूप और गर्म रेत पर चल कर कुछ फोटो लिए । आइसक्रीम खाई और चल दिए । रास्ते में विभीषण मंदिर देखा । वहां जानकारी लिखी गयी हैं कि यहीं रामचंद्र ने विभीषण का राजतिलक किया था । बाहर निकल नारियल पानी का आनंद लिया और कच्ची गिरी भी खूब खाई । मात्र बीस रुपए का नारियल जो हिसार तक आते आते चालीस का हो जाता हैं । 

अंत में पूर्व राष्ट्रपति ए पी जे अब्दुल कलाम के आवास पर ऑटो रोका । बाहर बड़े बड़े बोर्ड लगे हैं । पहली मंजिल पर म्यूजियम है । दूसरी पर मोती माला व गिफ्ट्स का शोरूम । कलाम के बड़े भाई सबसे निचली मंजिल पर रहते हैं । मिलने की इच्छा थी पर वे आराम कर रहे थे । अधूरी इच्छा से लौट आए । फिर होटल और सामान उठा कर रेलवे स्टेशन की ओर भागे । 

रामेश्वरम से चल कर गाड़ी मदुरै की ओर बढ़ी । मीनाक्षी मंदिर के लिए । दूसरे दिन मदुरै में थे । फिर वही कतार । वही टिकट । वही इंतज़ार । मीनाक्षी मंदिर का शिल्प बहुत खूबसूरत है । पचास का टिकट लिया तब भीड़ से बाहर आए । कुछ खरीदारी । कुछ जानकारी । फिर प्लेटफॉर्म की ओर । यहां थोड़ी परेशानी उठानी पड़ी क्योंकि रेल को देरी हो रही थी और बच्चों को मच्छर काट रहे थे । यात्री शिकायत करने गये तब जाकर गाड़ी प्लेटफॉर्म पर लगी । यात्रा में कुछ परेशानी तो उठानी ही पड़ती है । इसके बिना भी यात्रा का क्या मज़ा ? सब मीठा मीठा थोड़े ही मिलेगा ? 

तीसरा पड़ाव केरल का त्रिवेन्द्रम रहा । पहले आयुर्वेद का शान्तिगिरी आश्रम दिखाया । सफेद संगमरमर से खिलते हुए कमल की कल्पना साकार की गयी है । नाम के अनुरूप शांति । पर हमारे यात्री काजू देख कर तोड़े बिना नहीं रहे । अशांति कर ही दी । 

वहां से बीच पर ले जाया गया । समंदर की लहरें किनारे पर ठाठें मारती आतीं और लौट जातीं । किनारे कश्ती और सुरक्षा कर्मचारी । लोग फिर भी लहरों से अठखेलियां करने जाते । 

त्रिवेन्द्रम के पद्मनाभ मंदिर के नियमों के अनुसार सिर्फ लुंगी लगाकर ही दर्शन किए जा सकते हैं । बस से उतरते ही सब लुंगियां खरीदने में जुट गये । फिर धर्मशाला में स्नान और वही लंबी कतार । धक्के पे धक्का । जय जयकार । गर्मी । छोटे बच्चों के रोने के स्वर ।

 पद्मनाभ मंदिर के बाहर पांचों पांडवों की प्रतिमाएं लगी हैं । काफी बड़ी बड़ी । इनका क्या संबंध है । किसी ने नहीं बताया । त्रिवेन्द्रम् से रेल चली कन्याकुमारी की ओर । देश के अंतिम छोर । उसके बाद सिर्फ समुद्र ही समुद्र । रात के समय थके हारे पहुंचे । सुबह-सुबह सूर्योदय देखना है । पर चार बजे से उठाना शुरू किया । परिवार नहीं जागा और सूर्योदय को होना था , सो हो गया । हम वंचित रह गये । होटल के गेट पर एक बूढ़ी महिला दही बेच रही थी । जिस दिन से घर से निकले दूध दही देखा ही नहीं । चटपट दो गिलास दही खरीदकर पीया । सभी दही पर टूट पडे । शायद एक घंटे के भीतर सारा दही बिक गया । नाश्ता किया और फिर निकले कन्याकुमारी के दर्शन करने । बाजार खूब सजा भरा । प्रोफेशनल फोटोग्राफर पिंड नहीं छोड़ते । पीछे लगा लेते हैं । हार कर कुछ फोटो उनसे भी करवाए । समंदर लहराता , लहरें चट्टानों से टकरातीं । विवेकानन्द स्मारक । गांधी स्मारक । पर कोई गांधी साहित्य बिक्री के लिए उपलब्ध नहीं । भारत माता की प्रतिमा भी लगी है बाहर लाॅन में । बच्चे हिम्मत करके वोट में चले गये विवेकानन्द स्मारक देखने । हम पति पत्नी हिम्मत नहीं जुटा पाए । शाम को बच्चों के साथ निकले सूर्यास्त देखने । खूब भीड़ । अलग अलग राज्यों के लोग । चाय की चुस्कियां और साथ में केले के पकौड़े । आखिर सूर्यास्त हुआ । धीरे-धीरे सूर्यदेव समुद्र में चले गये । डुबकी लगा कर । आराम कर दूसरी सुबह फिर तरोताज़ा होकर आएंगे । यही मनुष्य का कर्म है । चरैवेति चरैवेति । 

अब सिर्फ अंतिम पड़ाव तिरूपति बालाजी । देश का सबसे धनी मंदिर । दिव्य दर्शन के तीन सौ रुपये की टिकट । सर्वदर्शन के लिए लम्बी कतार । हाॅल में टीवी पर रामायण । लेकिन भाषा अलग । कहानी पता है तो समझ आ रही है । बीच में खिचड़ी का प्रसाद मिल जाता है । शाम छह बजे से हाॅल में और ग्यारह बजे बाद खुलते हैं द्वार । रेलिंग की भूल भूलैया में आखिरकार दर्शन । बाहर निकलते ही लड्डू का प्रसाद और हर 70 रुपए की टिकट पर चार चार बडे बडे लड्डू । हमारे पास एक दर्जन हो गये । चलो । अब बांट सकेंगे । 

अब वापसी । वही तीन रात दो दिन लम्बी यात्रा । 

चंडीगढ़ से चले थे तो पहले हरियाणा के स्टेशन आए । फिर दिल्ली । फिर हरियाणा , फिर राजस्थान,  मध्यप्रदेश,  फिर दक्षिण भारत । कितने राज्य और कितने दृश्य । कहीं सूखा । कहीं हरियाली । कहीं गेहूं कट चुकी , कहीं धान । नारियल के पेड़ , आम के फल , काजू , कटहल । कितना कुछ । कितनी बोलियां ? कितनी तरह के पहनावे । दक्षिण में फूलों की वेणी ही श्रृंगार है । उतर भारत में सोने का हार है । फूलों से मन भर जाए तो गहने किस काम के ? 

हम बहुत सी भाषाएं नहीं जानते थे । सामने वाले भी नहीं समझते थे पर संकेत से सब समझ जाते । सच , दिल है हिंदुस्तानी । रामेश्वरम् हो या कन्याकुमारी या केरल सब कामचलाऊ हिंदी समझते हैं। पर्यटन ही कन्याकुमारी और रामेश्वरम् का मुख्य आय का साधन हैं । फिर हिंदी क्यों न समझें ? इसके बावजूद दक्षिण के किसी रेलवे स्टेशन पर हिन्दी समाचार पत्र नहीं मिला । कोई हिंदी पत्रिका भी नहीं मिली । 

यह भारत दर्शन एक प्रकार से सांस्कृतिक जीवन की झलक हैं । झांकी हैं हमारे हिंदुस्तान की । हमारी बोली न भी जाने , दिल की भाषा एक हैं हमारी । जब तक हमारे सांस्कृतिक रूप से जुड़े रहेंगे , तब तक भारत कश्मीर से कन्याकुमारी तक एक ही रहेगा । वापसी पर रेवाड़ी ही उतर लिए और वहां से सुबह की गाड़ी से 29 मार्च को हिसार पहुंच गये । फिर किसी यात्रा की उम्मीद में ।

 

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग✈️

संध्याकाळी रिव्हर क्रूजमधून फेरफटका मारला. फोंटांका नदीच्या एका कॅनॉल मधून सुरू झालेली क्रूज, मोइका नदीतून, विंटर कॅनॉलमधून नीवा नदीमध्ये गेली आणि पुन्हा फोंटांकाच्या एका कालव्यात शिरून आम्ही किनार्‍याला उतरलो. क्रूज सहलीमध्ये दुतर्फा दिसलेल्या इमारती आता ओळखीच्या झाल्या होत्या. क्रूजमधील प्रवासाने सुंदर पीटर्सबर्गचा निरोप घेतला.

जिंकलेल्या प्रदेशातील उत्तमोत्तम गोष्टींचा विध्वंस करण्याची जेत्यांची प्रवृत्ती जगभर आढळते. पीटर्सबर्गमधील अनेकानेक कला प्रकार, प्रासाद शत्रूंनी नष्ट केले. पण आज ते ऐश्वर्य पुन्हा जसेच्या तसे दिमाखात उभे आहे. याची कारणे अनेक आहेत. पीटर दी ग्रेटपासून अशी पद्धत होती की, जी जी कलाकृती, पेंटिंग निर्माण होईल त्याचा छोटा नमुना व त्याची साद्यंत माहिती म्हणजे वापरलेले मटेरियल, त्याची रचना, मोजमाप वगैरे आर्काइव्हज मध्ये जतन करून ठेवण्यात येत असे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीटर्सबर्गमध्ये जशा अनेक नामांकित शैक्षणिक संस्था, सायन्स इंस्टिट्यूशन्स आहेत तशीच एक रिस्टोरेशन युनिव्हर्सिटी आहे. वेळेअभावी आम्ही ती पाहू शकलो नाही. पण नष्ट झालेल्या कलाकृतींचे पुनर्निर्माण आणि असलेल्या वस्तू आणि वास्तू सुस्थितीत ठेवण्यासाठी तिथे खास शिक्षण दिले जाते. याशिवाय राज्यकर्त्यांचा दृष्टिकोण आणि आर्थिक पाठबळ हेही महत्त्वाचे!

या पार्श्‍वभूमीवर आपल्याकडे काय परिस्थिती आहे? आपल्याकडेही अनेक नामवंत, उत्तमोत्तम चित्रकार, शिल्पकार, काष्ठ कलाकार आहेत. सर्वश्री बाबुराव सडवेलकर,व्ही. एस. गुर्जर,ज. द. गोंधळेकर, जाधव, शिंदे, शिल्पकार करमरकर,स.ल.हळदणकर,राजा रविवर्मा, रावबहादूर धुरंधर,एम.आर.आचरेकर, गोपाळराव देऊसकर, विश्वनाथ नागेशकर, भैय्यासाहेब ओंकार, डी. जी. कुलकर्णी, संभाजी कदम अशी असंख्य नावे आहेत. काही वर्षांपूर्वी नामवंत चित्रकार सुहास बहुलकर यांचा  लेख एका दिवाळी अंकात वाचला होता. दिवंगत नामवंत कलाकारांच्या कलाकृती मिळवून, त्याचे पुनर्लेपन,वॉर्निशिंग, माउंटिंग करून त्यांचे प्रदर्शन भरविणे व त्यायोगे कलाकाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळवून देणे अशा उद्देशाने त्यांनी अनेक कलाकारांच्या,  माळ्यावर धूळ खात पडलेल्या कलाकृती मोठ्या कष्टाने मिळविल्या. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव मन विषण्ण करणारे, निराशाजनक होते. वर्तमानपत्रातून जे.जे. महाविद्यालयातील चित्रांची, पुतळ्यांची हेळसांड, बेपर्वा वृत्ती, राजकारण हे सारे वाचून वाईट वाटते. हा आपला राष्ट्रीय ठेवा आहे. कलाकारांना आर्थिक काळजीतून मुक्त ठेवणे हे समाजाचे, सरकारचे काम आहे. या चित्रांचा, कलाकृतींचा सांभाळ, डागडुजी,पुनर्लेपन, वॉर्निशिंग,जपणूक, यासाठी शास्त्रोक्त शिक्षण आवश्यक आहे. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. राजकारण विरहीत राजकीय इच्छाशक्ती, आर्थिक पाठिंबा व सामान्य नागरिकांचा सहभाग असेल तरच हे सांस्कृतिक वैभव सांभाळले जाईल. आपला भारत हा सुद्धा ‘ऐश्वर्यसंपन्न’ देश आहे. प्रत्येकाने हे ऐश्वर्य सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे.

पीटर्सबर्ग समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग✈️

पीटर्सबर्गजवळील पीटरहॉप हे एक अतिशय रम्य, भव्य आणि देखणे ठिकाण आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे इसवी सन  १७०५ मध्ये पीटर दि ग्रेटने या जागेचा विकास करण्याचे ठरवले. दीडशे हेक्‍टरहून अधिक जागा व्यापलेल्या या भव्य परिसरामध्ये राजवाड्यासारख्या एक डझनाहून अधिक इमारती आहेत. ११ भव्य व सुंदर बगीचे झाडा फुलांनी, शेकडो सुंदर पुतळ्यांनी नटलेले आहेत. या बगिच्यातून २०० हून अधिक, तर्‍हेतर्‍हेची कारंजी आहेत. अप्पर गार्डन आणि लोअर पार्क यांच्या मध्यावर ग्रेट पॅलेसची वास्तु उभी आहे. पीटरहॉपपासून वीस किलोमीटर दूर असलेल्या उंच टेकड्यांवरील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी अप्पर गार्डनमधील तीन-चार मोठ्या तलावात साठविले आहे.  तिथून पाईपलाईन बांधून लोअर पार्कमधील कारंज्यांमध्ये पाणी खेळविले आहे. अप्पर गार्डन लोअर पार्कपेक्षा साठ फूट अधिक उंचीवर आहे. सर्व कारंजी इलेक्ट्रिक पंपाशिवाय फक्त गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर चालतात. या वॉटर सिस्टिमचे सर्व डिझायनिंग पीटर दि ग्रेटने स्वतः केले होते. अप्पर गार्डन व लोअर पार्क यांच्या मध्यावरील ग्रेट पॅलेसच्या पुढ्यात अतिशय भव्य असा ‘ग्रेट कास्केड’ आहे. या ग्रेट कास्केडपर्यंत पोहोचण्यासाठी दोन बाजूंना उतरती हिरवळ आणि दोन्हीकडे सतरा पायऱ्यांची उतरण आहे . पायर्‍यांवरुन झुळझुळ पाणी वाहत असते. पायर्‍यांच्या कडेला अतिशय सुंदर अशा ४० शिल्पाकृती आहेत.  दोन्हीकडील पायर्‍यांच्या मधोमध, एका मोठ्या पॉऺ॑डमध्ये, ग्रॅनाईटच्या खडकावर उंच उसळणाऱा पांढराशुभ्र जलस्तंभ आहे.   त्याच्या मागे, तसेच उसळणारे पण थोडेसे लहान फवारे आहेत.ग्रॅनाइट खडकाच्या चारही बाजूला सिंह, घोडा यांच्या तोंडाच्या शिल्पाकृती आहेत .त्यातून पाण्याचे फवारे उडत असतात. पॉ॑डला जोडून असलेला कॅनाल,सी कॅनालने, गल्फ ऑफ फिनलॅ॑डला जोडलेला आहे.पॉ॑डमधून उतरत जाणाऱ्या कॅनालच्या दोन्ही बाजूंना गोलाकार दगडी बशांमधून कारंज्यांच्या अर्धकमानी उसळत असतात. ग्रेट पॅलेसच्या पुढ्यात उभे राहिले की कारंजी,बागा, पुतळे आणि गल्फ ऑफ फिनलॅ॑डपर्यंत गेलेला कॅनाल व त्यापुढे दिसणारा निळा समुद्र हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते.

ग्रेट कॅस्केड’च्या उजव्या बाजूच्या भव्य बागेत एका किलवरसारख्या आकाराच्या पॉ॑डमध्ये, शक्तीचे प्रतीक असलेल्या सॅमसन याचा पिळदार अंगाचा सोनेरी उभा पुतळा आहे. सॅमसन हाताने सिंहाचा जबडा फाडत आहे व त्या सिंहमुखातुन वीस मीटर उंच, पांढरा स्वच्छ, मोठा फवारा वेगाने उसळत आहे हे दृश्य नजर खिळवून ठेवते. रशियाने स्वीडनवर  मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून हा पुतळा उभारण्यात आला.

ग्रेट कास्केडच्या चौथऱ्यावरील व पायऱ्यांवरील सोनेरी पुतळे तसेच सॅमसन  व सिंह यांचे सोनेरी पुतळे हे प्रथम शिशामध्ये बनविण्यात आले व नंतर त्यांना सोन्याचा मुलामा देण्यात आला.१८०१ मध्ये या सर्व पुतळ्यांचे जसेच्या तसे पुनर्निर्माण करण्यात आले. त्यावेळी ब्राँझवर सोन्याचा मुलामा देण्यात आला. बागांमधून व कारंज्यांजवळ असलेले संगमरवरी अपोलो, व्हिनस, नेपच्यून या देवतांचे पुतळे , तसेच स्नान करणाऱ्या स्त्रिया, पुरुष,मुले यांचे पुतळे अतिशय देखणे आहेत. जांभळ्या, पिवळ्या, लाल रंगाच्या फुलांनी नेटक्या राखलेल्या बागा व त्यामागील घनदाट वृक्षराजी या पार्श्वभूमीवर कारंजी, पुतळे अगदी शोभून दिसत होते.

गल्फच्या किनाऱ्यावर एका बाजूला एक मजली सुंदर पॅलेस आहे. राजवाड्याचा मधला भाग तंबूसारखा उंच तर दोन्ही बाजूला असलेल्या लांब गॅलऱ्या लहान-लहान विटांनी बांधलेल्या आहेत. पीटर दि ग्रेटची लायब्ररी व त्याने युरोपातून आणलेल्या पेंटिंग्जची आर्ट गॅलरी तिथे आहे. दुसऱ्या बाजूला अलेक्झांड्रिया इस्टेट ही गॉथिक शैलीतली छोटी सुबक इमारत आहे. या दोन्ही इमारतींच्या पुढील बाजूला पाच-सहा भव्य बागा आहेत. इथे ३०० प्रकारची ३०,००० लहान मोठी झाडे आहेत. रंगीत पानाफुलांची नेटकी कापलेली ही झाडे खूप सुंदर दिसतात. या बागांमधून हरतऱ्हेची कारंजी उडत असतात. त्यातील ‘सन’ हे कारंजे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या मध्यावर ब्रांझचे दोन अर्धगोल एकमेकांना जोडलेले आहेत. त्यांच्या कडांना असलेल्या बारीक छिद्रातून सूर्यकिरणांसारखे पाण्याचे फवारे उडतात. विशेष म्हणजे सूर्य जसा फिरेल तसे हे ब्राँझचे मध्यवर्ती गोल फिरतात.

५०५ उसळत्या धारा असलेले पिरॅमिडसारखे एक भव्य कारंजे एका पायऱ्या-पायऱ्यांच्या चौथऱ्यावर आहे.एके ठिकाणी चौथर्‍यावर रोमन शैलीतील फवारे असलेले कारंजे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. एके ठिकाणी हात पंख्याच्या आकाराच्या मोठ्या कमानीसारख्या जलधारा कोसळत होत्या. छत्रीच्या आकाराच्या एका कारंज्याभोवती अनेकांनी गर्दी केली होती. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी गोल खांबावर, छत्रीच्या आकाराचे छप्पर होते. त्याला कनातीसारखे लाल हिरवे डिझाईन होते. त्या छपराला असलेल्या  लहान- लहान भोकातून पावसासारख्या अखंड धारा पडत होत्या. त्या पावसामध्ये भिजण्यासाठी गर्दी झाली होती.

या बागेत कारंज्यांचा एक सुंदर खेळ बघायला व अनुभवायला  मिळाला. दुपारी दोन वाजण्याच्या आधी गाइडने सर्वांना दुतर्फा झाडी असलेल्या एका रस्त्यावर कडेला उभे राहायला सांगितले. बरोबर दोन वाजता त्या फुटपाथच्या कडेला असलेल्या भोकांतून पाण्याच्या कमानी उसळल्या.त्या रस्त्यावर पाण्याची एकमेकात गुंफलेल्या धारांची कमान झाली.जेमतेम तीन मिनिटांच्या या खेळात सर्वजण  चिंब भिजून गेले.

उतरत्या छपरासारखेअसलेले एक कारंजे होते. त्याच्या गच्चीचा भाग हा बुद्धिबळाच्या पटासारखा काळ्यापांढर्‍या ग्रॅनाईटने बनविला आहे. त्यावरील झुळझुळत्या कारंज्याच्या कडेला सुंदर शिल्पाकृती आहेत. दोन्ही बाजूच्या सुंदर पायर्‍या चढून वरपर्यंत जाता येते.  परतताना जवळच तीन वादक अत्यंत सुरेल अशा रचना झायलोफोनवर वाजवीत होते. सभोवताली रंगीबेरंगी फुले, पाण्याचा मंद आवाज आणि त्यामध्ये एकरूप झालेले हे सूर वेगळ्या जगात घेऊन गेले.

अप्पर गार्डन मध्ये मोठमोठे तलाव, वृक्ष व फळझाडे आहेत. अप्पर गार्डनमधील पाच रिझर्वायर्समधून लोअर गार्डनमधील सर्व कारंज्यांना पाणीपुरवठा होतो. अप्पर गार्डनच्या  मध्यभागी उंच चौथऱ्यावर नेपच्यून फाउंटन आहे. नेपच्यूनचा ब्राँझचा पुतळा, त्याखालील चौथऱ्यावर स्त्री-पुरुषांची, लहान मुलांची शिल्पे आहेत. सिंह मुखातून, लहान मुलांच्या तोंडातून पाण्याचा फवारे उडतात. तिथेच कडेला नेपच्यूनचा ब्रांझमधील घोड्याचा रथ आहे.

हिरव्या नानाविध छटांच्या  पार्श्वभूमीवर     कल्पकतेने उभारलेली ही कारंजी म्हणजे अभिजात सौंदर्यदृष्टीचे अनुपम दर्शन होते. इतकी वैविध्यपूर्ण कारंजी( शिवाय सर्व चालू स्थितीत) पाहून शरीर आणि मन त्या कारंज्यांच्या तुषारांसारखेच प्रसन्न झाले.

भाग ४ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर उभारलेले सेंट आयझॅक  कॅथेड्रल म्हणजे वास्तुशास्त्र आणि इंजीनियरिंग यांचा अजोड संगम आहे. कास्ट आयर्नच्या मुख्य घुमटाभोवती चार छोटे डोम आहेत. या सर्वांना सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यासाठी ४०० किलोहून अधिक सोने वापरण्यात आले आहे. बाहेरील भव्य खांबांवर कमळे, सुंदर पुतळे, पुराणकथांची शिल्पे खूप सुंदर आहेत. बसमधून फिरताना शहरातील सुंदर बागा,पॉपलार,ओक,बर्च यांचे भरदार उंच  वृक्ष,  कारंजी, शैक्षणिक संस्था  नाट्यगृहे, लायब्ररी,बॅ॑का यांच्या भव्य इमारतींवरील देखणे पुतळे लक्ष वेधून घेतात.

पहिला पीटर म्हणजे पीटर दि ग्रेट याने १७०२ मध्ये स्वीडनचा पराभव करून नीवा नदीच्या मुखावरील रशियाचा किल्ला परत जिंकून घेतला. नीवा नदी बाल्टिक समुद्राला मिळते. त्यामुळे रशियाचा बाल्टिक समुद्रामधून युरोपीयन देशांशी व्यापार चालू राहिला. आरमारी वर्चस्व कायम राहिले. पीटर दि ग्रेटने  पीटर्सबर्ग या सुंदर शहराचा पाया घातला. कित्येक वर्षं पीटर्सबर्ग हेच राजधानीचे ठिकाण होते. मध्यंतरी काही काळ या शहराला लेनिनग्राड असे संबोधण्यात येत असे. आता पूर्वीचे पीटर्सबर्ग हेच नाव आहे व राजधानी मास्को झाली आहे.

पीटर्सबर्गचे उपनगर असलेल्या पुष्किन या ठिकाणी गेलो. अलेक्झांडर पुष्किन या महान रशियन कवीचे नाव या गावाला दिले आहे. वाटेत प्रेसिडेंट पॅलेस लागला. देशामध्ये आलेल्या राजनैतिक  पाहुण्यांची इथे व्यवस्था करतात.इथेच ‘जी-८’राष्ट्रांची (त्यापैकी एक भारत) परिषद भरली होती.

रशियामध्ये साहित्यिक, कवी, कलावंत यांच्याविषयी नितांत आदर आहे. अलेक्झांडर पुष्किन, टॉलस्टॉय, मॅक्सिम गॉर्की यासारखे दिग्गज साहित्यिक व कवी यांनी उत्तमोत्तम साहित्य निर्मिती केली आहे. ‘वॉर अँड पीस’,अॅना कॅरोनिना, डॉक्टर झिवॅगो, क्राइम अँड पनिशमेंट सारख्या अजरामर साहित्यकृती निर्माण झाल्या. रशियन राज्यक्रांतीनंतर कलावंत, साहित्यिक, विद्वान व कवींना अतोनात छळाला सामोरे जावे  लागले. किंवा देहदंडही झाला. पण साऱ्यांनीच छळ सोसून आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपले. आज त्यांच्या कलाकृतींना, साहित्याला सन्मानपूर्वक जपले जाते. इथल्या भव्य हिरव्यागार बागेत तळहातावर डोके ठेवलेल्या स्थितीतील पुष्किन यांचा सुंदर पुतळा आहे.

तिथून जवळच  कॅथरीन पॅलेस आहे.मोठमोठ्या हॉलमध्ये सुंदर व भव्य पेंटिंग्ज आहेत.कॅथरीन दी ग्रेटचे  घोड्यावर बसलेले,पुरूषी वेश केलेले पेंटिंग आहे. ग्रीन डायनिंग रूममध्ये पडद्यापासून कटलरी पर्यंत शेवाळी रंगाची सुंदर रंगसंगती साधली आहे तर ब्ल्यू रूममध्ये इंग्लंडच्या फॅक्टरीत तयार झालेले निळे सिरॅमिक्स वापरले आहे. सुवर्ण महालातील जमिनीवरचे डिझाईन व भिंतीवरील डिझाईन एकसारखे आहे. भिंतीवरील, छतावरील भव्य पेंटिंग्ज जिवंत वाटतात. पूर्णाकृती स्त्रिया,बाळे, योद्धे, देवदूत पऱ्या ही सारी शिल्पे लिंडेन या लाकडाचा वापर करून बनवलेली आहेत व त्यावर पूर्ण सोन्याचा मुलामा दिला आहे. दोन डोळ्यांनी पाहू तेवढे थोडेच!

या पॅलेसमधील जगप्रसिद्ध अॅ॑बर (Amber) रूम दुसऱ्या महायुद्धात जर्मन नाझींनी नष्ट करून टाकली होती. १९५७ मध्ये पुनर्निर्माणाचे काम सुरू करण्यात आले. आणि आज अॅ॑बर रूम पूर्वीच्याच दिमाखात, वैभवात उभी आहे.पृथ्वीवरील भूकंप किंवा इतर नैसर्गिक घडामोडीत, जंगलेच्या जंगले गाडली  जातात. अनेकानेक वर्षानंतर ऑरगॅनिक प्रक्रियेमध्ये पृथ्वीच्या पोटात विविध रंगाची अमूल्य रत्ने माणके तयार होतात. अॅ॑बर हे नैसर्गिक बदामी व तपकिरी आणि पिवळट रंगाचे पातळ असे कपचे असतात. ते जोडून अप्रतिम डिझाईन्सच्या भिंती, फोटोफ्रेम, दिव्यांच्या शेडस्, फुलदाण्या बनविण्यात आल्या आहेत. रूममधील नैसर्गिक प्रकाश परिवर्तनाने आपल्याला एका वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते.

भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – यात्रा-संस्मरण ☆ देहरादून-मसूरी-हरिद्वार-ऋषिकेश-नैनीताल-ज़िम कार्बेट यात्रा संस्मरण- 8 ☆ श्री सुरेश पटवा

श्री सुरेश पटवा 

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। 

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से श्री सुरेश पटवा जी द्वारा हाल ही में की गई उत्तर भारत की यात्रा -संस्मरण  साझा कर रहे हैं।  आज से  प्रतिदिन प्रस्तुत है श्री सुरेश पटवा जी का  देहरादून-मसूरी-हरिद्वार-ऋषिकेश-नैनीताल-ज़िम कार्बेट यात्रा संस्मरण )

 ☆ यात्रा-संस्मरण  ☆ देहरादून-मसूरी-हरिद्वार-ऋषिकेश-नैनीताल-ज़िम कार्बेट यात्रा संस्मरण-8 ☆ श्री सुरेश पटवा ☆

1794-95 के दौरान गढ़वाल क्षेत्र गंभीर अकाल से ग्रस्त रहा तथा पुनः 1883 में यह क्षेत्र भयानक भूकंप से त्रस्त रहा। तब तक गोरखाओं ने इस क्षेत्र पर आक्रमण करना शुरू कर दिया था और इस क्षेत्र पर उनके प्रभाव की शुरुवात हुयी। सन 1803 में उन्होंने पुनः गढ़वाल क्षेत्र पर महाराजा प्रद्युम्न शाह के शासन काल में आक्रमण किया। महाराजा प्रद्युम्न शाह देहरादून में गौरखाओं से युद्ध करते हुए वीरगति को प्राप्त हुए परन्तु उनके एक मात्र नाबालिग पुत्र सुदर्शन शाह को उनके विश्वासपात्र राजदरबारियों ने चालाकी से बचा लिया। इस लड़ाई के पश्चात गोरखाओं की विजय के साथ ही उनका अधिराज्य गढ़वाल क्षेत्र में स्थापित हुआ। इसके पश्चात उनका राज्य कांगड़ा तक फैला और उन्होंने यहाँ 12 वर्षों तक राज्य किया जब तक कि उन्हें महाराजा रणजीत सिंह के द्वारा कांगड़ा से बाहर नहीं निकाल दिया गया। वहीँ दूसरी ओर सुदर्शन शाह ईस्ट इंडिया कम्पनी से मदद का प्रबंध करने लगे ताकि गोरखाओं से अपने राज्य को मुक्त करा सकें। ईस्ट इंडिया कम्पनी ने कुमाउं, देहरादून एवं पूर्वी गढ़वाल का एक साथ ब्रिटिश साम्राज्य में विलय कर दिया तथा पश्चिमी गढ़वाल को राजा सुदर्शन शाह को सौंप दिया जो टिहरी रियासत के नाम से जाना गया।

राजा अजयपाल और उनके उत्तराधिकारियों ने लगभग तीन सौ साल तक गढ़वाल पर शासन किया था, इस अवधि के दौरान उन्होंने कुमाऊं, मुगल, सिख, रोहिल्ला के कई हमलों का सामना किया था। गढ़वाल के इतिहास में गोरखा आक्रमण एक महत्वपूर्ण घटना थी। यह अत्यधिक क्रूरता के रूप में चिह्नित है और ‘गोरखायनी’ शब्द नरसंहार और लूटमार सेनाओं का पर्याय बन गया था। गोरखा ने दती और कुमाऊं को अधीन करने के बाद, गढ़वाल पर हमला किया और गढ़वाली सेनाओ द्वारा कठोर प्रतिरोधों के बावजूद लंगूरगढ़ तक पहुंच गए। लेकिन इस बीच, चीनी आक्रमण की खबर आ गयी और गोरखाओं को घेराबंदी हटाने के लिए मजबूर किया गया। हालांकि 1803 में उन्होंने फिर से एक आक्रमण किया। कुमाऊं को अपने अधीन करने के बाद  गढ़वाल में तीन तरफ़ से आक्रमण किया। पांच हज़ार गढ़वाली सैनिक उनके इस आक्रमण  के रोष के सामने टिक नही सके और राजा प्रदीमन शाह अपना बचाव करने के लिए देहरादून भाग गए। लेकिन उनकी सेनाएं की  गोरखा सेनाओ के साथ कोई तुलना नही हो सकती थी। गढ़वाली सैनिकों  भारी मात्रा में मारे गए और खुद राजा खुडबुडा की लड़ाई में मारे गए। 1804 में गोरखा पूरे गढ़वाल के स्वामी बन गए और बारह साल तक क्षेत्र पर शासन किया।

1815 में जब अंग्रेजों ने गोरखाओं को उनके कड़े विरोध के बावजूद पश्चिम में काली नदी तक खिसका दिया था तब गोरखों का शासन गढ़वाल क्षेत्र से समाप्त हुआ। गोरखा सेना की हार के बाद, 21 अप्रैल 1815 को अंग्रेजों ने गढ़वाल क्षेत्र के पूर्वी, गढ़वाल का आधा हिस्सा, जो कि अलकनंदा और मंदाकिनी नदी के पूर्व में स्थित है, जोकि बाद में, ‘ब्रिटिश गढ़वाल’ और देहरादून के दून के रूप में जाना जाता है, पर अपना शासन स्थापित करने का निर्णय लिया। पश्चिम में गढ़वाल के शेष भाग जो राजा सुदर्शन शाह के पास था, उन्होंने टिहरी में अपनी राजधानी स्थापित की। प्रारंभ में कुमाऊं और गढ़वाल के आयुक्त का मुख्यालय नैनीताल में ही था लेकिन बाद में गढ़वाल अलग हो गया और 1840 में सहायक आयुक्त के अंतर्गत  पौड़ी  जिले के रूप में स्थापित करके उसका मुख्यालय पौड़ी में गठित किया गया।

महाराजा सुदर्शन शाह ने अपनी राजधानी टिहरी नगर में स्थापित की तथा इसके पश्चात उनके उत्तराधिकारियों प्रताप शाह, कीर्ति शाह तथा नरेन्द्र शाह ने अपनी राजधानी क्रमशः प्रताप नगर, कीर्ति नगर एवं नरेंद नगर में स्थापित की। इनके वंशजों ने इस क्षेत्र में 1815 से 1949 तक शासन किया। भारत छोड़ो आन्दोलन के समय इस क्षेत्र के लोगों ने सक्रिय रूप से भारत की आजादी के लिए बढ़ चढ़ कर भाग लिया और अन्त में जब देश को 1947 में आजादी मिली टिहरी रियासत के निवासियों ने स्वतंत्र भारत में विलय के लिए आन्दोलन किया। इस आन्दोलन के कारण परिस्थियाँ महाराजा के वश में नहीं रहीं और उनके लिए शासन करना कठिन हो गया जिसके फलस्वरूप पंवार वंश के शासक महाराजा मानवेन्द्र शाह ने भारत सरकार की सम्प्रभुता स्वीकार कर ली। अन्ततः सन 1949 में टिहरी रियासत का भारत में विलय हो गया। इसके पश्चात टिहरी को उत्तर प्रदेश के एक नए जनपद का दर्जा दिया गया।

आजादी के समय, गढ़वाल, अल्मोड़ा और नैनीताल जिलों को कुमाऊं डिवीजन के आयुक्त द्वारा प्रशासित किया जाता था। 1960 के शुरुआती दिनों में, गढ़वाल जिले से चमोली जिले का गठन किया गया। 1969 में गढ़वाल मण्डल पौड़ी मुख्यालय के साथ गठित किया गया। 1998 में रुद्रप्रयाग के नए जिले के निर्माण के लिए जिला पौड़ी गढ़वाल के खिर्सू विकास खंड के 72 गांवों के लेने के बाद जिला पौड़ी गढ़वाल आज अपने वर्तमान रूप में पहुंच गया है।

© श्री सुरेश पटवा

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – यात्रा-संस्मरण ☆ देहरादून-मसूरी-हरिद्वार-ऋषिकेश-नैनीताल-ज़िम कार्बेट यात्रा संस्मरण- 7 ☆ श्री सुरेश पटवा

श्री सुरेश पटवा 

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। 

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से श्री सुरेश पटवा जी द्वारा हाल ही में की गई उत्तर भारत की यात्रा -संस्मरण  साझा कर रहे हैं।  आज से  प्रतिदिन प्रस्तुत है श्री सुरेश पटवा जी का  देहरादून-मसूरी-हरिद्वार-ऋषिकेश-नैनीताल-ज़िम कार्बेट यात्रा संस्मरण )

 ☆ यात्रा-संस्मरण  ☆ देहरादून-मसूरी-हरिद्वार-ऋषिकेश-नैनीताल-ज़िम कार्बेट यात्रा संस्मरण-7 ☆ श्री सुरेश पटवा ☆

गढ़वाल

गढ़वाल भारत के उत्तराखण्ड राज्य का एक प्रमुख क्षेत्र है। यहाँ की मुख्य भाषा गढ़वाली मिश्रित हिन्दी है। गढ़वाल का साहित्य तथा संस्कृति समृद्ध हैं। गढ़वाल मण्डल में:-चमोली, देहरादून, हरिद्वार, पौड़ी गढ़वाल, रुद्रप्रयाग, टिहरी गढ़वाल और उत्तरकाशी जिले आते हैं।

गढ़वाल हिमालय में मानव सभ्यता का विकास भारतीय उप-महाद्वीप क्षेत्रों के समानांतर हुआ है। कत्युरी पहला ऐतिहासिक राजवंश था, जिसने एकीकृत उत्तराखंड पर शासन किया और शिलालेख और मंदिरों के रूप में कुछ महत्वपूर्ण अभिलेख छोड़े थे। 18वीं शताब्दी के चित्रकार, कवि, राजनयिक और इतिहासकार मौला राम ने “गढ़राजवंश का इतिहास” लिखा है। गढ़वाल के शासकों के बारे में यही एकमात्र स्रोत है।

परंपरागत रूप से इस क्षेत्र का केदारखंड के रूप में विभिन्न हिंदू ग्रंथों में उल्लेख मिलता है। गढ़वाल राज्य क्षत्रियों का राज था। दूसरी शताब्दी ई.पू. के आसपास कुनिंदा राज्य भी विकसित हुआ। बाद में यह क्षेत्र कत्युरी राजाओं के अधीन रहा, जिन्होंने कत्युर घाटी, बैजनाथ, उत्तराखंड से कुमाऊं और गढ़वाल क्षेत्र में 6 वीं शताब्दी से 11 वीं शताब्दी तक राज किया, बाद में चंद राजाओं ने कुमाऊं में राज करना शुरू किया, उसी दौरान गढ़वाल कई छोटी रियासतों में बँट गया, ह्वेनसांग, नामक चीनी यात्री, जिसने 629 के आसपास क्षेत्र का दौरा किया था, ने इस क्षेत्र में ब्रह्मपुर नामक राज्य का उल्लेख किया है।

कत्यूरी राजवंश भारत के उत्तराखण्ड राज्य का एक मध्ययुगीन राजवंश था। इस राजवंश के बारे में में माना जाता है कि वे अयोध्या के शालिवाहन शासक के वंशज हैं और इसलिए वे सूर्यवंशी हैं। किन्तु, बहुत से इतिहासकार उन्हें कुणिन्द शासकों से जोड़ते हैं तथा कुछ इतिहासकार उन्हें खस मूल से भी जोड़ते है, जिनका कुमाऊँ क्षेत्र पर 6वीं से 11वीं सदी तक शासन था। कत्यूरी राजाओं ने ‘गिरीराज चक्रचूड़ामणि’ की उपाधि धारण की थी। उनकी पहली राजधानी जोशीमठ में थी, जो जल्द ही कार्तिकेयपुर में स्थानान्तरित कर दी गई थी। कत्यूरी राजा भी शक वंशावली के माने जाते हैं, जैसे राजा शालिवाहन, को भी शक वंश से माना जाता है। किन्तु, बद्री दत्त पाण्डेय जैसे इतिहासकारों का मानना है कि कत्यूरी, अयोध्या से आए थे। उन्होंने अपने राज्य को ‘कूर्मांचल’ कहा, अर्थात ‘कूर्म की भूमि’। कूर्म भगवान विष्णु का दूसरा अवतार था, जिससे इस स्थान को इसका वर्तमान नाम, कुमाऊँ मिला। कत्युरी राजा का कुलदेवता स्वामी कार्तिकेय (मोहन्याल) नेपाल के बोगटान राज्य मे विराजमान है। कत्यूरी वंश के संस्थापक वसंतदेव थे। कत्यूरी वंश की उत्पत्ति के कई अलग-अलग दावे किए जाते रहे हैं। कुछ इतिहासकार उन्हें कुणिंद वंश से संबंधित मानते हैं, जिनके सिक्के आसपास के क्षेत्रों में बड़ी संख्या में पाए गए हैं। राहुल सांकृत्यायन ने उनके पूर्वजों को शक वंश से संबंधित माना है, जो पहली शताब्दी ईसा पूर्व से पहले भारत में थे; सांकृत्यायन ने आगे इन्हीं शकों की पहचान खस वंश से की है। ई. टी. एटकिंसन ने भी अपनी पुस्तक “हिमालयन गजेटियर” के पहले खंड में ख़ुलासा किया है कि कत्यूरी कुमाऊँ के मूल निवासी हो सकते हैं, जिनकी जड़ें गोमती के तट पर अब खंडहर हो चुके नगर करवीरपुर में थीं। यह तथ्य, हालांकि, बद्री दत्त पाण्डेय सहित विभिन्न इतिहासकारों द्वारा नकारा गया है। पाण्डेय ने अपनी पुस्तक “कुमाऊँ का इतिहास” में कत्यूरियों को अयोध्या के शालिवाहन शासक घराने का वंशज माना है।उन्होंने खस वंश को इन हिमालयी क्षेत्रों का मूल निवासी बताया है, जो वेदों की रचना से पहले ही यहां आकर बस गए थे, जिसके बाद कत्यूरियों ने उन्हें पराजित कर क्षेत्र में अपने राज्य की स्थापना की।

यह माना जाता है कत्युरी राज्य के पतन के बाद की अवधि में गढ़वाल क्षेत्र 64 (चौसठ) से अधिक रियासतों में विखंडित हो गया था। मुख्य रियासतों में से एक चंद्रपुरगढ़ थी, जिस पर कनकपाल के वंशजो ने राज्य किया। 888 से पहले पूरा गढ़वाल क्षेत्र स्वतंत्र राजाओं द्वारा शासित छोटे-छोटे गढ़ों में विभाजित था। जिनके शासकों को राणा, राय और ठाकुर कहा जाता था। ऐसा कहा जाता है कि 823 में जब मालवा के राजकुमार कनकपाल श्री बदरीनाथ जी के दर्शन को आये। वहां उनकी भेंट तत्कालीन राजा भानुप्रताप से हुई। राजा भानुप्रताप ने राज कुमार कनक पाल से प्रभावित होकर अपनी एक मात्र पुत्री का विवाह उनके साथ तय कर दिया और अपना सारा राज्य उन्हें सौंप दिया। धीरे-धीरे कनक पाल एवं उनके वंशजों ने सारे गढ़ों पर विजय प्राप्त कर साम्राज्य का विस्तार किया। इस प्रकार 1803 तक तक समस्त गढ़वाल क्षेत्र इनके वंश के आधीन रहा।

15 वीं शताब्दी के मध्य में चंद्रपुरगढ़ जगतपाल (1455 से 1493 ईसवी), जो कनकपाल के वंशज थे, के शासन के तहत एक शक्तिशाली रियासत के रूप में उभरा। 15 वीं शताब्दी के अंत में अजयपाल ने चंद्रपुरगढ़ पर शासन  किया और कई रियासतों को उनके सरदारों के साथ एकजुट करके एक ही राज्य में समायोजित कर लिया और इस राज्य को गढ़वाल के नाम से जाना जाने लगा। इसके बाद उन्होंने 1506 से पहले अपनी राजधानी चांदपुर से देवलगढ़ और बाद में 1506 से 1519 ईसवी के दौरान श्रीनगर स्थानांतरित कर दी थी।

© श्री सुरेश पटवा

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग 

 

या हर्मिटेजमध्ये असंख्य प्रकारची घड्याळे आहेत. हिरे जडविलेली, लहान, गोंडस बाळांच्या हातात असलेली,होडीच़्या आकारातील, पऱ्यांनी हातात धरलेली, खांबांवर बसविलेली अशा अनेक तऱ्हा. या साऱ्यांमध्ये मोराचे घड्याळ अप्रतिम आहे. सोन्याचा मुलामा दिलेल्या एका गजांच्या पिंजऱ्यासारख्या घरामध्ये, सोनेरी मोर आपला निळा जांभळा रत्नजडित पिसारा फुलवून उभा आहे. त्याच्या पायाशी एका बाजूला एक मोठा लाल सोनेरी कोंबडा आहे. दुसऱ्या बाजूला खारुताईच्या डोक्यावर एक छोटा गोल आहे. कोंबड्याचा पोटात असलेली किल्ली फिरवून ठेवली की दर एक तासाने कोंबडा आरवे. कोंबडा आरवला की खारुताईच्या डोक्यावरील गोल पिंजरा फिरू लागे व त्याच्या घंटा मंजुळ वाजू लागत. घंटा वाजायला लागल्यावर मोर पिसारा फुलवे.  तांब्यावर सुवर्ण मुलामा दिलेली ही कलाकृती, त्यातील नाजूक यंत्रणेमुळे आता चालविण्यात येत नाही.

पण नजाकतीने पिसारा उभारलेला मोर मनामध्ये कोरला जातो. मोराच्या पिंजऱ्यापासून जवळ मोझॅक टाइल्समध्ये काढलेली माणसांची, पक्षी-प्राण्यांची अप्रतिम चित्रे आहेत. तर जवळच्या एका चहा टेबलाची षटकोनी नक्षीही मोझॅक टाइल्समधील  आहे. पाणी भरायला आलेल्या दोन स्त्रिया आपल्या उंच, उभ्या हंड्यांवर हात ठेवून, एकमेकींशी कुजबुजंत गप्पा मारत (स्त्रियांच्या गॉसिपिंगचा ऐतिहासिक पुरावा) उभ्या असलेले शिल्प नेहमीच्या परिचयाचे वाटल्याने लक्षात राहिले.

संध्याकाळी थोडे चालत, थोडे बसने जाऊन पॅलेस थिएटरला गेलो. हे दिवस ‘पांढर्‍या रात्रीं’चे म्हणजे व्हाईट नाईटसचे होते. रात्री उशिरापर्यंत चांगला उजेड असतो. रस्त्यांवरून मित्र-मैत्रिणी मजा करत हिंडत होती. दुकाने, मॉल्स, हॉटेल्स खच्चून भरली होती. एकदा का कडाक्‍याची थंडी सुरु झाली की घराबाहेर पडणे मुश्कील होते. रस्त्यावर झेंडू व लाल पिवळ्या फुलांची सुंदर सजावट केली होती. अधून मधून हिरवळीचे  गालिचे होते. आम्हाला बघून रस्त्यावरची लोकं  ,’इंडिया, इंडिया’ असे म्हणत व लगेच राज कपूरच्या सिनेमातील आणि लता मंगेशकरची गाणी म्हणायला सुरुवात करीत.’ मेरा जूता है जपानी’ तर फारच लोकप्रिय होतं. लोक  उंचनींच, धिप्पाड, नाकेले आणि लालसर गोरे होते.  तरुणाई युरोपियन फॅशनमध्ये होती. फॅशनेबल ड्रेसेस, त्यांचे रंग पेन्सिलसारख्या टाचा असलेले बूट सारे त्यांना शोभून दिसत होते. सारे पाहात भव्य युरोपा   हॉटेलवरून इटालियन स्ट्रीटवर पोहोचलो. आम्ही ग्रँड पॅलेस  थिएटरची ‘स्वान लेक’ या बॅलेची तिकिटे काढलेली होती. आमच्यासारखेच इतर देशातील प्रेक्षक लगबगीने आत शिरत होते. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट सोकोलाव्ह यांनी १७९९ मध्ये हे सुंदर वास्तुशिल्प उभारले. थिएटरचे देखणेपण कसोशीने जपले आहे. मार्बलच्या अर्धवर्तुळाकार  रूंद जिन्याने पहिल्या मजल्यावर गेलो. या जिन्याच्या कठड्याला पंख असलेल्या, कुरळ्या केसांच्या,  छोट्या गोंडस बाळांचे शिल्प अनेक ठिकाणी बसवीले आहेत. प्रवेशद्वारापाशी, देखणे सौष्ठव असलेल्या आईच्या मांडीवर निवांत पहुडलेल्या बाळाचे सुंदर शिल्प आहे. जिन्याच्या व प्रवेशद्वाराच्या भिंती सुंदर पेंटिंग्जनी,दिव्याचे आकर्षक खांब यांनी सजविल्या आहेत. मोठ्या हॉलच्या प्रवेशद्वारावर  सोनेरी रंगाची वेलबुट्टी आहे. त्याच्या पुढील पिवळट रंगाच्या ड्रॉइंगरूममध्ये सोव्हिनियर्स, बॅले ड्रेसमधील नर्तिका अशा वस्तूंची विक्री चालू होती. पुढे छोटा ग्रीन हॉल व बुफे रूम अशी रशियन क्लासिकल स्टाइल अंतर्गत सजावट आहे.

राजघराण्याच्या करमणुकीसाठी म्हणून १७४० मध्ये ‘इंपीरियल स्कूल ऑफ बॅले’ची पीटर्सबर्गमध्ये स्थापना झाली. रशियाच्या संपन्न परंपरेचे राष्ट्रीय लोकनृत्य म्हणजे बॅले.  राज्यकर्त्यांनी ही कला टिकावी, वाढावी म्हणून आर्थिक पाठिंबा व प्रोत्साहन दिले. महान रशियन कवी अलेक्झांडर पुष्किन यांनी ‘जीव ओतून केलेले, नजाकतीने सादर केलेले भावपूर्ण नृत्य म्हणजे बॅले’ असे बॅलेचे वर्णन केले आहे. (flight performed by the soul). किरॉव्ह बॅले कंपनी व बोलशाय  बॅले कंपनी या दोन जगप्रसिद्ध  बॅले कंपनी आहेत.किरॉव्हच्या परंपरेतील कोरियोग्राफी या ‘स्वान लेक’ला लाभली आहे. थिएटरमध्ये थोडीशी अर्धवर्तुळाकार अशी खुर्च्यांची रचना होती. आम्ही बसलो होतो त्याच्या थोड्या उंचीवर, भिंतीच्या दोन्ही कडांना तीन-तीन खुर्च्यांचे छोटे,तिरके बॉक्स होते. आपल्या अॉपेरा हाउस थिएटरमध्ये होते तसे!वर अर्धवर्तुळाकार लाकडी बाके असलेली गॅलरी होती. याला पॅराडाइज गॅलरी म्हणतात. वैशिष्ट्य म्हणजे लाइव्ह सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. स्टेजच्या पुढील बाजूस वाद्यवृंद बसला होता.

बरोबर आठला पडदा बाजूला झाला. कमनीय, लवचिक देहाच्या बारा पऱ्या, स्वच्छ पांढऱ्या पिसासारख्या फ्रिलचा ड्रेस घालून चवड्यावर शरीर तोलत, कधी स्वतःभोवती गिरक्या घेत होत्या तर कधी जोडीदाराच्या हातावर चढून शरीराचा तोल सांभाळत नृत्य करीत होत्या.  ही एका राजपुत्राची गोष्ट होती. राजपुत्र वयात येतो. किल्ल्याजवळील बागेत मित्रांबरोबर खाणेपिणे, नाच सुरू असते. राजमाता अचानक येते. पार्टीतील वाइन वगैरे बघून नाराज होते. मित्र गेल्यानंतर राजपुत्र बागेत फिरत असताना त्याला राजहंसांचा थवा दिसतो. शिकारीसाठी म्हणून तो त्यांच्या मागे बाण सरसावून जातो. त्याला दिसते की ते राजहंस जंगलाच्या मध्यभागी सरोवरात पोहत असतात.   ते राजहंस म्हणजे सुंदर तरुणींचे जादूगाराने केलेले रूपांतर असते .त्या तरुणी फक्त रात्री मनुष्यदेह धारण करू शकतात. त्यातील राजकन्या राजपुत्राच्या प्रेमात पडते. पण तिला जादूगाराची भीती वाटत असते.  राजपुत्र तिला स्वतःच्या प्रेमाची, निष्ठेची ग्वाही देतो. तेव्हा हाच आपली दुष्ट जादूगाराच्या तावडीतून सुटका करू शकेल अशी तिला खात्री वाटते. राजमहालात परतल्यानंतर राजपुत्राच्या आईने त्याच्यासाठी देशोदेशीच्या अनेक राजकन्या पसंतीसाठी आणलेल्या असतात. त्यांच्याबरोबर राजपुत्राला नृत्य करावे लागते. त्यावेळी जादूगार आपल्या मुलीला राजहंसाच्या रूपातील राजकन्येसारखे  बनवतो. राजकुमार फसतो. तो जादूगाराच्या  मुलीची निवड करणार एवढ्यात त्याला किल्ल्याच्या खिडकीमध्ये खरी राजकन्या  दिसते. सारे तिथेच सोडून तो तिच्यामागे धावत जंगलातील सरोवरामध्ये जातो. राजकन्येचा गैरसमज दूर करतो व तिथे आलेल्या जादूगाराचे पंख छाटून त्याला मारून टाकतो. राजकन्या व तिच्या सख्यांची सुटका होते. सकाळच्या कोवळ्या  सूर्यप्रकाशात राजकन्या व तिच्या सख्या आनंदाने नाचू लागतात. अर्थातच राजपुत्र व राजकन्या यांचा विवाह होऊन ते सुखाने नांदू लागतात अशी गोष्ट होती.  अतिशय लयदार, शिस्तबद्ध, कधी हवेत तरंगत केल्यासारखे वाटणारे सांघिक हालचालींचे हे समूह नृत्य व त्यातून सादर केलेल्या गोष्टीने आम्हाला एक तासभर खुर्च्यांवर जणू बांधून ठेवले होते.  सुंदर प्रकाशयोजना व संगीत संयोजन यामुळे बॅले रंगतदार झाला होता.

आपल्याकडेही असे अनेक राजहंस आहेत. समूह नृत्य प्रकारातून ऐतिहासिक व पौराणिक कथा अतिशय कौशल्याने, सांघिक हालचालीने  सादर केल्या जातात. श्री शिवरायांच्या जीवनावरील ‘जाणता राजा’ ,अशोक हांडे यांचे ‘मराठी बाणा’, किंवा गोव्याच्या कलाकारांनी सादर केलेले श्रीकृष्णाच्या जीवनावरील ‘संभवामी युगे युगे’ अशी अनेक सुंदर नृत्य नाट्ये सादर होतात. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातही असे सुंदर सामूहिक नृत्य प्रकार आहेत. ही कला टिकविण्यासाठी आपण अशा कार्यक्रमांना सक्रीय पाठिंबा देऊन, कलाकारांना, निर्मात्यांना शाबासकीची थाप दिली पाहिजे.

 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – यात्रा-संस्मरण ☆ देहरादून-मसूरी-हरिद्वार-ऋषिकेश-नैनीताल-ज़िम कार्बेट यात्रा संस्मरण- 6☆ श्री सुरेश पटवा

श्री सुरेश पटवा 

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। 

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से श्री सुरेश पटवा जी द्वारा हाल ही में की गई उत्तर भारत की यात्रा -संस्मरण  साझा कर रहे हैं।  आज से  प्रतिदिन प्रस्तुत है श्री सुरेश पटवा जी का  देहरादून-मसूरी-हरिद्वार-ऋषिकेश-नैनीताल-ज़िम कार्बेट यात्रा संस्मरण )

 ☆ यात्रा-संस्मरण  ☆ देहरादून-मसूरी-हरिद्वार-ऋषिकेश-नैनीताल-ज़िम कार्बेट यात्रा संस्मरण-6 ☆ श्री सुरेश पटवा ☆

1857 के प्रथम स्वतंत्रता संग्राम में कुमांऊँ के लोगों की भागीदारी उल्लेखनीय रही। 1870 में अल्मोड़ा के शिक्षित व जागरूक लोगों ने मिलकर सामाजिक, आर्थिक, राजनीतिक और सांस्कृतिक समस्याओं के समाधान के लिए चंद्रवंशीय राजा भीमसिंह के नेतृत्व में एक क्लब की स्थापना की। जिसने 1871 में ‘अल्मोड़ा अखबार’ का प्रकाशन प्रारंभ किया।

अंग्रेज प्रशासक गार्डनर ने गोरखों से कुमांऊँ की सत्ता का कार्यभार ले लिया था। 1891 तक कुमांऊँ कमिश्नरी में कुमांऊँ-गढ़वाल और तराई के तीन जिले शामिल थे। उसके बाद कुमांऊँ को अल्मोड़ा व नैनीताल दो जिलों में बाँटा गया। ट्रैल, लैशिगंटन, बैटन, हेनरी रामसे आदि विभिन्न कमिश्नरों ने कुमांऊँ में समय-समय पर विभिन्न सुधार तथा रचनात्मक कार्य किए। जमीन का बंदोबस्त, लगान निर्धारण, न्याय व्यवस्था, शिक्षा का प्रसार, परिवहन के साधनों की उपलब्धता के कारण अंग्रेजों के शासनकाल में कुमांऊँ की खूब उन्नति हुई। हेनरी रामसे के विषय में बद्रीदत्त पांडे लिखते हैं- ‘उनको कुमांऊँ का बच्चा-बच्चा जानता है। वे यहाँ के लोगों से हिल-मिल गए थे। घर-घर की बातें जानते थे। पहाड़ी बोली भी बोलते थे। किसानों के घर की मंडुवे की रोटी भी खा लेते थे।’ अंग्रेजों ने शासन व्यवस्था में पर्याप्त सुधार किए, वहीं अपने शासन को सुदृढ़ बनाने के लिए कठोरतम न्याय व्यवस्था भी स्थापित की। 15 अगस्त 1947 को सम्पूर्ण भारत के साथ कुमाऊँ भी स्वाधीन हो गया।

प्रसिद्ध शिकारी और संरक्षणवादी जिम कॉर्बेट द्वारा “कुमाऊं के मैन-ईटर्स” पुस्तक के प्रकाशन के बाद इस क्षेत्र ने अंतरराष्ट्रीय स्तर पर ध्यान आकर्षित किया, जिसमें लेखक ने वनीय सौंदर्य का वर्णन करते हुए आदमखोर बाघों की तलाश की और उन्हें मार दिया गया था। चंपावत टाइगर और चौगढ़ टाइगर्स जैसे जानवरों ने कई वर्षों तक इस क्षेत्र को त्रस्त किया, पूर्व में अनुमान लगाया गया था कि 1920-28 के वर्षों में आदमखोर जानवरों ने नेपाल और फिर कुमाऊं में चार सौ से अधिक मनुष्यों को मार डाला था।

महात्मा गांधी का आगमन कुमाऊं में अंग्रेजों के लिए मौत की घंटी जैसा लग रहा था। लोग अब ब्रिटिश राज की ज्यादतियों से अवगत हो अंग्रेजों के खिलाफ हो गए थे और स्वतंत्रता के लिए भारतीय संघर्ष में सक्रिय भूमिका निभाई थी। 12 दिनों तक कुमाऊं में कारावास की कठोरता से उबरने के बाद गांधी ने अनाशक्ति योग लिखा।

“सभी पुरुष इन पहाड़ियों में प्रकृति के आतिथ्य ग्रहण कर सकते हैं। हिमालय की मनमोहक सुंदरता, आकर्षक जलवायु और सुखदायक हरियाली जो आपको घेर लेती है। मुझे आश्चर्य है कि इन पहाड़ियों के दृश्यों और जलवायु की तुलना करने पर, ये दुनिया के किसी भी सौंदर्य स्थल से आगे निकल जाते हैं। अल्मोड़ा की पहाड़ियों में लगभग तीन सप्ताह बिताने के बाद, मैं पहले से कहीं अधिक चकित हूँ कि हमारे लोगों को स्वास्थ्य की तलाश में यूरोप जाने की आवश्यकता क्यों है।”  महात्मा गांधी, अल्मोड़ा इंप्रेशन, यंग इंडिया (11 जुलाई 1929)।

गांधी इन भागों में पूजनीय थे और उनके आह्वान पर राम सिंह धोनी के नेतृत्व में सलाम सालिया सत्याग्रह का संघर्ष शुरू हुआ जिसने कुमाऊं में ब्रिटिश शासन की जड़ें हिला दीं। पुलिस की बर्बरता के कारण सलाम सत्याग्रह में कई लोगों की जान चली गई। गांधी ने इसे कुमाऊं की बारडोली नाम दिया जो बारडोली सत्याग्रह का संकेत है। नेताजी सुभाष चंद्र बोस के नेतृत्व में कई कुमाऊंनी भारतीय राष्ट्रीय सेना में भी शामिल हुए।

1947 में भारत के स्वतंत्र होने के बाद, संयुक्त प्रांतों को नवगठित भारतीय राज्य उत्तर प्रदेश में बदल दिया गया। टिहरी गढ़वाल की रियासत 1949 में भारतीय संघ में शामिल होकर कुमाऊं मंडल के तहत एक जिला बन गई। तीन नए जिले अर्थात अल्मोड़ा से पिथौरागढ़, गढ़वाल से चमोली और टिहरी गढ़वाल से उत्तरकाशी का गठन 1960 में किया गया था। कुमाऊं मंडल के इन 3 जिलों से उत्तराखंड डिवीजन नामक एक नया राजस्व मंडल बनाया गया था।

वर्ष 1969 में उत्तर प्रदेश के इन पहाड़ी क्षेत्रों में बड़े प्रशासनिक सुधार हुए, और एक नया गढ़वाल डिवीजन, जिसका मुख्यालय पौड़ी में था, का गठन कुमाऊं डिवीजन से टिहरी गढ़वाल और गढ़वाल जिलों और उत्तराखंड डिवीजन से उत्तरकाशी और चमोली के साथ किया गया था। उसी वर्ष उत्तराखंड संभाग को भी विस्थापित कर दिया गया था, और पिथौरागढ़ के शेष जिले को कुमाऊं मंडल में वापस लाया गया था, इसलिए इसे इसका वर्तमान आकार दिया गया। 90 के दशक में तीन नए जिले बनाए गए, जिसमें संभाग में जिलों की कुल संख्या 6 हो गई। 1995 में नैनीताल से उधम सिंह नगर, और अल्मोड़ा से बागेश्वर और 1997 में पिथौरागढ़ से चंपावत।

 

© श्री सुरेश पटवा

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares
image_print