? कवितेचा उत्सव ?

☆ अनोळखी गांव ☆ मेहबूब जमादार ☆

म्हणायचीस नेहमी तू, अखंड देईन साथ

मग का बरे सुटावा, मध्येच तुझा प्रेमळ हात?

 

कॉलेजकट्ट्यावर झालेली तुझी पहीली भेट

काय झाले,पण काळजात रूतूनी बसली थेट

 

हळुहळू रस्ते चुकले मग तास ही चुकून गेले

कॉलेजात येवूनही  सारे तास बगीच्यात झाले

 

भेटीवरून भेटी सरल्या, खरेच जुळले यमक

घरच्यानां कळून चुकले आपल्या भेटीतले गमक

 

ब-याच दिसानीं घडले विपरीत रस्ते चुकून गेले

ओळखीचे गांव आपुले, का बरेअनोळखी झाले?

 

– मेहबूब जमादार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments